डॉ बाबासाहेब आंबेडकर : जीवन घटनाक्रम आणि कार्यकर्तृत्वाचा चे काही आठवणी
१४ एप्रिल १८९१ : सुभेदार रामजी व श्रीमती भिमाबाई आंबेडकर या मातापित्यांचे चौदावे अपत्य. ( जन्मस्थळ : महू इंदोर जवळ मध्य प्रदेश)
१८९६ : माता भिमाबाई यांचा मृत्यू.
नोव्हेंबर १९०० : गवर्नमेंट व्हर्णा क्युलर (मराठी) शाळा सातारा मध्ये प्रवेश.
एप्रिल १९०६ : श्री भिकू वालंगकरांची कन्या रमाबाई बरोबर विवाह.
जानेवारी १९०८ : मुंबई विद्यापीठाची मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण.
डिसेंबर १९१२ : यशवंतराव या पुत्राचा जन्म.
जानेवारी १९१३ : बी. ए उत्तीर्ण ( पर्शियन व इंग्रजी विषय घेऊन)
फेब्रुवारी १९१३ : वडील सुभेदार रामजी यांचा मृत्यू.
जुलै १९१३ : बडोद्याचे सयाजीराव महाराज यांची शिष्यवृत्ती प्राप्त, न्यूयॉर्क विश्वविद्यालय कोलंबिया येथे राज्यशास्त्र (विभागात) उच्चशिक्षणासाठी प्रवेश.
१९१५ : अर्थशास्त्र हा मुख्य विषय व समाजशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान, राज्य नीतिशास्त्र हे दुय्यम विषय घेऊन उत्तीर्ण.
मे १९१६ : "भारतातील जाती" या विषयावर प्रा. गोल्डनविजर यांचे समोर प्रबंध वाचन. हासले पुढे प्रकाशित झाला. हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले पुस्तक.
१९१६ : नॅशनल डिव्हीडंट ऑफ इंडिया या शीर्षकाखाली पीएच. डी.
जून १९१६ : लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या विख्यात संस्थेत ( इंग्लंडमध्ये) पुन्हा विशेष अभ्यासासाठी प्रवेश.
जून १९१७ : कोलंबिया विद्यापीठाची पी एच डी प्राप्त तेव्हापासून डॉक्टर ही पदवी बाबासाहेबांना प्राप्त झाली आहे.
जून १९१७ : एम एस सी अर्थशास्त्र ही लंडनची पदवी मिळवून भारतात.
१९१७ : बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचे संस्थानात मिलिटरी सेक्रेटरी या पदावर नियुक्ती. बाबासाहेबांची संस्थानात भावी काळात अर्थमंत्री पदावर नेमणूक महाराजांना करावयाची होती. परंतु बाबासाहेब अस्पृश्य समाजातील असल्याने कार्य व्यवहारातील इतर लोकांनी बाबासाहेबांशी गैरवर्तन केल्यामुळे स्वाभिमानी बाबासाहेबांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
१९१७ : "भारतातील अत्यल्प शेती धोरण व त्यावर उपाय" या विषयावर पुस्तक प्रकाशित केले.
१९१८ : साऊथबरो कमिशन हे सार्वत्रिक मताधिकार याबाबत भारतात आले असता त्यापुढे मत अधिकाराबद्दल साक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मते अस्पृश्यांसाठी विभक्त मतदार संघ निर्माण करावयास पाहिजे होते. कमिशने त्यांचे म्हणणे स्वीकारले आहे.
१९१८ नोवेंबर : मुंबईतील सिडनहॅम कॉलेजात अर्थशास्त्र या विषयाचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती.
जानेवारी १९२० : "मूकनायक" हे दलितांचे पहिले साप्ताहिक मराठीमधून प्रकाशित.
सप्टेंबर १९२० : लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये पुढच्या अभ्यासासाठी व बॅरिस्टर च्या अभ्यासा साठी लंडनला (इंग्लंडला) दाखल.
जून १९२१ : "प्रोविन्शियल डिसेंट्रलाइजेशन ऑफ इम्पेरियल फायनान्स इन ब्रिटीश इंडिया" या विषयावर प्रबंध सादर हो तो स्वीकारला गेला. एम एस सी अर्थशास्त्र लंडन ही पदवी प्राप्त.
१९२२ - २३ : बॉन विद्यापीठ जर्मनी येथे अर्थशास्त्र शिक्षणासाठी काही महिने व्यतीत केले.
मार्च १९२३ : "प्रॉब्लेम ऑफ डी रुपी" या विषयावरील प्रबंध यामुळे डी.एस.सी. बॉन विद्यापीठाची पदवी प्राप्त.
१९२३ : बॅरिस्टर ग्रेज इन पदवीप्राप्त.
एप्रिल १९२३ : भारतात आगमन अजून पासून मुंबई उच्च न्यायालयात वकिली प्रारंभ. तेथेसुद्धा जातीयतेचा कडवट अनुभव.
जुलै १९२४ : दलित वर्गाच्या व्यापक हितासाठी "बहिष्कृत हितकारणी सभा" या संस्थेची मुंबईत स्थापना.
१९२५ : "ब्रिटीशकालीन भारतात प्रांतीय अर्थव्यवस्थेचा विकास" या विषयावरील महत्त्वाचे पुस्तक प्रकाशित.
१९२६ : भारतीय मुद्रा (रुपिया) या विषयावर रॉयल कमिशन ( हिल्टन यंग) पुढे साक्ष.
१९२६ : मुंबई प्रांतातील प्रांतिक मंडळाचे सभासद म्हणून सरकारने नेमणूक केली.
मार्च १९२७ : चवदार तळ्याचा महाड प्रसिद्ध संग्राम अस्पृश्यांना सार्वजनिक तळ्यातील पाणी पिण्याचा अधिकार आहे हे दाखविण्यासाठी पहिला सत्याग्रह. दलित चळवळीतील आंदोलनाचे हे पहिले पाहूल.
एप्रिल १९२७ : "बहिष्कृत भारत" पाक्षिकाचे प्रथम प्रकाशन "समाज समता संघाची" स्थापना.
मे १९२८ : सायमन कमिशन समोर अस्पृश्यांना विभक्त मतदारसंघ कशासाठी पाहिजे त्यावर आग्रही प्रतिपादन.
जून १९२८ : गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध काय ते विषयाचे प्राध्यापक.
मार्च १९३० : "जनता" साप्ताहिक सुरु.
सप्टेंबर १९३२ : ब्रिटन पंतप्रधान मॅक्डोनाल्ड यांनी "कम्युनल अवॉर्ड" जाहीर करून विभक्त मतदारसंघांची मागणी अशांत पूर्ण केली होती. यावर निषेध म्हणून गांधींचे प्रांतिक उपोषण. गांधींचे प्राण वाचून अस्पृश्य वरील भावी संकट टाळावे या हेतूने डॉ बाबासाहेबांनी "पुणे करारावर" स्वाक्षरी केली व संयुक्त मतदारसंघात मान्यता दिली.
१९३२ - ३४ : संविधान सुधारणा संबंधी संसदेच्या संयुक्त समितीचे सभासद.
मे १९३५ : रमाबाई आंबेडकर यांचा मृत्यू.
जून १९३५ : गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचे प्रिन्सिपल म्हणून नियुक्ती.
डिसेंबर १९३५ : "जात पात" तोडक मंडळ लाहोरच्या परिषदेला अध्यक्ष म्हणून आमंत्रण.
१९३६ : "जाती पद्धतीचे उच्चाटन" यावर गाजलेले अध्यक्ष भाषण त्यांना सादर करण्यास "जात पात तोळख मंडळ" या संयोजक संस्थेने परवानगी दिली नाही. त्यावर गांधींनी हरिजन साप्ताहिक प्रचंड टीका केली. त्यावर डॉक्टरांनी सडेतोड उत्तर दिले.
ऑगस्ट १९३६ : स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना.
जानेवारी १९३७ : मुंबई प्रांतिक सभेत सभासद म्हणून निवड निवडून आलेत.
जानेवारी १९३९ : काळे स्मृती व्याख्यानमाला पुण्याचे गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या प्रसिद्ध संस्थेमार्फत केली जात होती. तेथे भाषणात १९३५ च्या स्वातंत्र्याच्या सरकारी योजनेवर टीकेची झोड.
एप्रिल १९४२ : गव्हर्नर च्या दिल्ली कार्यकारणी परिषदेचे मजूर सदस्य म्हणून नेमणूक.
डिसेंबर १९४२ : कॅनडामध्ये पॅसिफीक रिलेशन्स परिषदेत "गांधी आणि अस्पृश्यांची मुक्ति" या विषयावर एक निबंध सादर केला. जो १९४३ मध्ये पुस्तक रूपाने प्रकाशित झाला.
जानेवारी १९४३ : 'गांधीजी व रानडे' या विषयावर न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या १०१ या जन्मदिनी दिनाच्या निमित्ताने झालेल्या समारंभात भाषण दिले. पुढे पुस्तकरूपाने प्रसिद्ध 'शॉर्ट ऑन पाकिस्तान' या पुस्तकाचे प्रकाशन.
जून १९४५ : गांधी व काँग्रेसने अस्पृश्यांसाठी काय केले? या शीर्षकाचे पुस्तक प्रसिद्ध.
एप्रिल १९४५ : पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना.
एप्रिल १९४६ : सिद्धार्थ कॉलेज मुंबई उद्घाटन.
जुलै १९४६ : व्हॉईसरॉय कौन्सिल सदस्यत्वाचा राजीनामा (बाबासाहेब बंगाल कॉन्स्टिट्यूशन सदस्य म्हणून निवडून गेले होते. परंतु भारत पाकिस्तान विभाजन निश्चित झाल्यावर सर्व सभासदांनी राजीनामा दिला, त्यात डॉ बाबासाहेबांनी सुद्धा राजीनामा दिला.) त्यानंतर मुंबई विधिमंडळ काँग्रेस पक्षाने विधिमंडळात डॉ. जयकर यांच्या राजीनाम्यामुळे रिकामी झालेली जागा डॉ बाबासाहेबांना दिली डॉ बाबासाहेब विधिमंडळाचे सभासद झाले.
सप्टेंबर १९४६ : अस्पृश्यांच्या हीत संबंधाचे स्वतंत्र भारतात रक्षण करण्यासाठी काय केले पाहिजे यावर इंग्लंडच्या कॅबिनेट मिशन ने चुका केल्या होत्या. आपले याबाबतचे मत सांगण्यासाठी डॉ बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली लंडनला शिष्टमंडळ रवाना.
ऑक्टोबर १९४६ : अस्पृश्य पूर्वी कोण होते ? हे पुस्तक प्रसिद्ध केले.
मार्च १९४७ : शासन आणि अल्पसंख्यांक या विषयावर अल्पसंख्यांकाचे मूलभूत अधिकार संरक्षण याबाबत एक टिपणी सादर.
ऑगस्ट १९४७ : पंडित नेहरू च्या अंतरिम सरकार मध्ये कायदा मंत्री म्हणून सामील, घटना समितीच्या ग्राफ्टिंग समितीचे सदस्य.
एप्रिल १९४८ : कृष्णराव बी. कबीर यांच्या मुलीबरोबर शारदा कबीर यांच्याशी विवाह.
ऑक्टोबर १९४८ : भाषा व प्रांतिक रचना कमिशन पुढे (धर कमिशन) डॉ बाबासाहेबांनी महाराष्ट्र भाषावर प्रांत रचनेत त्यांचे स्वरूप यावर निवेदन दिले.
नोव्हेंबर १९४८ : 'मसुदा समितीचे अध्यक्ष' या नात्याने घटनेच्या मसुदा अंतरिम लोकसभेचे पुढे सादर केला.
जून १९५० : मिलिंद महाविद्यालय, औरंगाबाद स्थापना.
डिसेंबर १९५० : जागतिक बौद्ध परिषद, कोलंबो प्रतिनिधी.
फेब्रुवारी १९५१ : हिंदू कोड बिल लोकसभेत मांडले.
९ मे १९५१ : जनतेच्या प्रतिनिधित्वाचे बिल (निवडणुकीचा कायदा)
जुलै १९५१ : "भारतीय बौद्ध जनसंघ" ची स्थापना.
https://www.amazon.in/gp/product/B08G896B5S/ref=as_li_tl?ie=UTF8&tag=jpnews786-21&camp=3638&creative=24630&linkCode=as2&creativeASIN=B08G896B5S&linkId=2fb3ed0d185aea3df8fe7d30e11507f8सप्टेंबर १९५१ : 'बुद्ध उपासना पाठ' या पुस्तकांचे संकलन केले.
डिसेंबर १९५१ : हिंदू कोड बिलाला काँग्रेसने संपूर्ण पाठिंबा दिला होता पण सनातन्यांच्या विरोधामुळे काँग्रेसला माघार घ्यावी लागली. या कारणाने तसेच इतर मतभेदांमुळे डॉ आंबेडकरनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
मे १९५२ : राज्यसभा सदस्य म्हणून नियुक्ती, त्याआधी मुंबईतील लोकसभा निवडणुकीत विजयी होऊ शकले नाही.
मे १९५२ : कोलंबिया विद्यापीठाच्या (अमेरिका) द्वी शताब्दी समारंभानिमित्त एल. एल. डी सन्मानाने दिली.
मे १९५३ : सिद्धार्थ कॉलेज - मुंबई कॉमर्स अर्थशास्त्र विभागाचे उद्घाटन लोकसभेच्या पोटनवडणुकीसाठी अर्ज भरला.
डिसेंबर १९५४ : जागतिक बौद्ध परिषद (रंगून) येथे प्रतिनिधी.
मे १९५५ : भारतीय बौद्ध महासभेची स्थापना.
डिसेंबर १९५५ : भाषावर प्रांतरचना संबंधी संयुक्त महाराष्ट्र बाबत ठाम मत मांडले.
जून १९५६ : सिद्धार्थ लॉ कॉलेज चे उद्घाटन.
१४ ऑक्टोबर १९५६ : नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.
१५ ऑक्टोबर १९५६ : नागपूर दीक्षा भूमीवर भाषण देले.
१५ नोव्हेंबर १९५६ : काठमांडू नेपाळ येथील चौथ्या जागतिक बौद्ध परिषदेत भाषण.
६ डिसेंबर १९५६ : महापरिनिर्वाण
१४ एप्रिल १९९० : मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान.
ॲड. निर्मलकुमार सूर्यवंशी लिखित संविधानाचे अंतरंग या पुस्तकातून.
वाचा -
अहमदनगर किला - AHMEDNAGAR FORT ...
मुस्लिम धर्मीयांची चौकशी करून जात प्रमाणपत्र द्या! उच्च न्यायालय - Mumbai High court...
ऐतिहासिक अहमदनगर काही घटना काही आठवणी - Historical Ahmednagar ...
१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान भाग ३ - Indian Muslim Freedom Fighter....