Showing posts with label Indain Constitution. Show all posts
Showing posts with label Indain Constitution. Show all posts

डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जीवन घटनाक्रम आणि कार्यकर्तृत्व - Dr Babasaheb Ambedkar

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357d

 डॉ बाबासाहेब आंबेडकर : जीवन घटनाक्रम आणि कार्यकर्तृत्वाचा चे काही आठवणी 



१४ एप्रिल १८९१ : सुभेदार रामजी व श्रीमती भिमाबाई आंबेडकर या मातापित्यांचे चौदावे अपत्य. ( जन्मस्थळ : महू इंदोर जवळ मध्य प्रदेश) 

१८९६ : माता भिमाबाई यांचा मृत्यू.

नोव्हेंबर १९०० : गवर्नमेंट व्हर्णा क्युलर (मराठी) शाळा सातारा मध्ये प्रवेश.

एप्रिल १९०६ : श्री भिकू वालंगकरांची कन्या रमाबाई बरोबर विवाह.

जानेवारी १९०८ : मुंबई विद्यापीठाची मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण.

डिसेंबर १९१२ :  यशवंतराव या पुत्राचा जन्म.

जानेवारी १९१३ : बी. ए उत्तीर्ण ( पर्शियन व इंग्रजी विषय घेऊन)

फेब्रुवारी १९१३ : वडील सुभेदार रामजी यांचा मृत्यू.

जुलै १९१३ : बडोद्याचे सयाजीराव महाराज यांची शिष्यवृत्ती प्राप्त, न्यूयॉर्क विश्वविद्यालय कोलंबिया येथे राज्यशास्त्र (विभागात) उच्चशिक्षणासाठी प्रवेश. 

१९१५ : अर्थशास्त्र हा मुख्य विषय व समाजशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान, राज्य नीतिशास्त्र हे दुय्यम विषय घेऊन उत्तीर्ण.

मे १९१६ : "भारतातील जाती" या विषयावर प्रा. गोल्डनविजर यांचे समोर प्रबंध वाचन. हासले पुढे प्रकाशित झाला. हे  डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले पुस्तक.

१९१६ : नॅशनल डिव्हीडंट ऑफ इंडिया या शीर्षकाखाली पीएच. डी.

जून १९१६ : लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या विख्यात संस्थेत ( इंग्लंडमध्ये) पुन्हा विशेष अभ्यासासाठी प्रवेश.

जून १९१७ : कोलंबिया विद्यापीठाची पी एच डी प्राप्त तेव्हापासून डॉक्टर ही पदवी बाबासाहेबांना प्राप्त झाली आहे. 

जून १९१७ : एम एस सी अर्थशास्त्र ही लंडनची पदवी मिळवून भारतात.

१९१७ : बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचे संस्थानात मिलिटरी सेक्रेटरी या पदावर नियुक्ती. बाबासाहेबांची संस्थानात भावी काळात अर्थमंत्री पदावर नेमणूक महाराजांना करावयाची होती. परंतु बाबासाहेब अस्पृश्य समाजातील असल्याने कार्य व्यवहारातील इतर लोकांनी बाबासाहेबांशी गैरवर्तन केल्यामुळे स्वाभिमानी बाबासाहेबांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. 

१९१७ : "भारतातील अत्यल्प शेती धोरण व त्यावर उपाय" या विषयावर पुस्तक प्रकाशित केले.

१९१८ : साऊथबरो कमिशन हे सार्वत्रिक मताधिकार याबाबत भारतात आले असता त्यापुढे मत अधिकाराबद्दल साक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मते अस्पृश्यांसाठी विभक्त मतदार संघ निर्माण करावयास पाहिजे होते. कमिशने त्यांचे म्हणणे स्वीकारले आहे.

१९१८ नोवेंबर : मुंबईतील सिडनहॅम कॉलेजात अर्थशास्त्र या विषयाचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती.

जानेवारी १९२० : "मूकनायक" हे दलितांचे पहिले साप्ताहिक मराठीमधून प्रकाशित.

सप्टेंबर १९२० : लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये पुढच्या अभ्यासासाठी व बॅरिस्टर च्या अभ्यासा साठी लंडनला (इंग्लंडला) दाखल.

जून १९२१ : "प्रोविन्शियल डिसेंट्रलाइजेशन ऑफ इम्पेरियल फायनान्स इन ब्रिटीश इंडिया" या विषयावर प्रबंध सादर हो तो स्वीकारला गेला. एम एस सी अर्थशास्त्र लंडन ही पदवी प्राप्त.

१९२२ - २३ : बॉन विद्यापीठ जर्मनी येथे अर्थशास्त्र शिक्षणासाठी काही महिने व्यतीत केले.

मार्च १९२३ : "प्रॉब्लेम ऑफ डी रुपी" या विषयावरील प्रबंध यामुळे डी.एस.सी. बॉन विद्यापीठाची पदवी प्राप्त.

१९२३ : बॅरिस्टर ग्रेज इन पदवीप्राप्त.

एप्रिल १९२३ : भारतात आगमन अजून पासून मुंबई उच्च न्यायालयात वकिली प्रारंभ. तेथेसुद्धा जातीयतेचा कडवट अनुभव.




जुलै १९२४ : दलित वर्गाच्या व्यापक हितासाठी "बहिष्कृत हितकारणी सभा" या संस्थेची मुंबईत स्थापना.

१९२५ : "ब्रिटीशकालीन भारतात प्रांतीय अर्थव्यवस्थेचा विकास" या विषयावरील महत्त्वाचे पुस्तक प्रकाशित.

१९२६ : भारतीय मुद्रा (रुपिया) या विषयावर रॉयल कमिशन ( हिल्टन यंग) पुढे साक्ष.

१९२६ : मुंबई प्रांतातील प्रांतिक मंडळाचे सभासद म्हणून सरकारने नेमणूक केली.

मार्च १९२७ : चवदार तळ्याचा महाड प्रसिद्ध संग्राम अस्पृश्यांना सार्वजनिक तळ्यातील पाणी पिण्याचा अधिकार आहे हे दाखविण्यासाठी पहिला सत्याग्रह. दलित चळवळीतील आंदोलनाचे हे पहिले पाहूल.

एप्रिल १९२७ : "बहिष्कृत भारत" पाक्षिकाचे प्रथम प्रकाशन "समाज समता संघाची" स्थापना.

मे १९२८ : सायमन कमिशन समोर अस्पृश्यांना विभक्त मतदारसंघ कशासाठी पाहिजे त्यावर आग्रही प्रतिपादन.

जून १९२८ : गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध काय ते विषयाचे प्राध्यापक.

मार्च १९३० : "जनता" साप्ताहिक सुरु.

सप्टेंबर १९३२ : ब्रिटन पंतप्रधान मॅक्डोनाल्ड यांनी "कम्युनल अवॉर्ड" जाहीर करून विभक्त मतदारसंघांची मागणी अशांत पूर्ण केली होती. यावर निषेध म्हणून गांधींचे प्रांतिक उपोषण. गांधींचे प्राण वाचून अस्पृश्य वरील भावी संकट टाळावे या हेतूने डॉ बाबासाहेबांनी "पुणे करारावर" स्वाक्षरी केली व संयुक्त मतदारसंघात मान्यता दिली.

१९३२ - ३४ : संविधान सुधारणा संबंधी संसदेच्या संयुक्त समितीचे सभासद.

मे १९३५ : रमाबाई आंबेडकर यांचा मृत्यू.

जून १९३५ : गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचे प्रिन्सिपल म्हणून नियुक्ती.

डिसेंबर १९३५ : "जात पात" तोडक मंडळ लाहोरच्या परिषदेला अध्यक्ष म्हणून आमंत्रण.

१९३६ : "जाती पद्धतीचे उच्चाटन" यावर गाजलेले अध्यक्ष भाषण त्यांना सादर करण्यास "जात पात तोळख मंडळ" या संयोजक संस्थेने परवानगी दिली नाही. त्यावर गांधींनी हरिजन साप्ताहिक प्रचंड टीका केली. त्यावर डॉक्टरांनी सडेतोड उत्तर दिले.

ऑगस्ट १९३६ : स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना.

जानेवारी १९३७ : मुंबई प्रांतिक सभेत सभासद म्हणून निवड निवडून आलेत.

जानेवारी १९३९ : काळे स्मृती व्याख्यानमाला पुण्याचे गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या प्रसिद्ध संस्थेमार्फत केली जात होती. तेथे भाषणात १९३५  च्या स्वातंत्र्याच्या सरकारी योजनेवर टीकेची झोड.

एप्रिल १९४२ : गव्हर्नर च्या दिल्ली कार्यकारणी परिषदेचे मजूर सदस्य म्हणून नेमणूक.

डिसेंबर १९४२ : कॅनडामध्ये पॅसिफीक रिलेशन्स परिषदेत "गांधी आणि अस्पृश्यांची मुक्ति" या विषयावर एक निबंध सादर केला. जो १९४३ मध्ये पुस्तक रूपाने प्रकाशित झाला.

जानेवारी १९४३ : 'गांधीजी व रानडे' या विषयावर न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या १०१ या जन्मदिनी दिनाच्या निमित्ताने झालेल्या समारंभात भाषण दिले. पुढे पुस्तकरूपाने प्रसिद्ध 'शॉर्ट ऑन पाकिस्तान' या पुस्तकाचे प्रकाशन.

जून १९४५ : गांधी व काँग्रेसने अस्पृश्यांसाठी काय केले? या शीर्षकाचे पुस्तक प्रसिद्ध.

एप्रिल १९४५ : पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना.

एप्रिल १९४६ : सिद्धार्थ कॉलेज मुंबई उद्घाटन.

जुलै १९४६ : व्हॉईसरॉय कौन्सिल सदस्यत्वाचा राजीनामा (बाबासाहेब बंगाल कॉन्स्टिट्यूशन सदस्य म्हणून निवडून गेले होते. परंतु भारत पाकिस्तान विभाजन निश्चित झाल्यावर सर्व सभासदांनी राजीनामा दिला, त्यात डॉ बाबासाहेबांनी सुद्धा राजीनामा दिला.) त्यानंतर मुंबई विधिमंडळ काँग्रेस पक्षाने विधिमंडळात डॉ. जयकर यांच्या राजीनाम्यामुळे रिकामी झालेली जागा डॉ बाबासाहेबांना दिली डॉ बाबासाहेब विधिमंडळाचे सभासद झाले. 

सप्टेंबर १९४६ : अस्पृश्यांच्या हीत संबंधाचे स्वतंत्र भारतात रक्षण करण्यासाठी काय केले पाहिजे यावर इंग्लंडच्या कॅबिनेट मिशन ने चुका केल्या होत्या. आपले याबाबतचे मत सांगण्यासाठी डॉ बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली लंडनला शिष्टमंडळ रवाना.

ऑक्टोबर १९४६ : अस्पृश्य पूर्वी कोण होते ? हे पुस्तक प्रसिद्ध केले.

मार्च १९४७ : शासन आणि अल्पसंख्यांक या विषयावर अल्पसंख्यांकाचे मूलभूत अधिकार संरक्षण याबाबत एक टिपणी सादर.

ऑगस्ट १९४७ : पंडित नेहरू च्या अंतरिम सरकार मध्ये कायदा मंत्री म्हणून सामील, घटना समितीच्या ग्राफ्टिंग समितीचे सदस्य.

एप्रिल १९४८ : कृष्णराव बी. कबीर यांच्या मुलीबरोबर शारदा कबीर यांच्याशी विवाह.

ऑक्टोबर १९४८ : भाषा व प्रांतिक रचना कमिशन पुढे (धर कमिशन) डॉ बाबासाहेबांनी महाराष्ट्र भाषावर प्रांत रचनेत त्यांचे स्वरूप यावर निवेदन दिले.

नोव्हेंबर १९४८ : 'मसुदा समितीचे अध्यक्ष' या नात्याने घटनेच्या मसुदा अंतरिम लोकसभेचे पुढे सादर केला.

जून १९५० : मिलिंद महाविद्यालय, औरंगाबाद स्थापना.

डिसेंबर १९५० : जागतिक बौद्ध परिषद, कोलंबो प्रतिनिधी.

फेब्रुवारी १९५१ : हिंदू कोड बिल लोकसभेत मांडले.

९ मे १९५१ : जनतेच्या  प्रतिनिधित्वाचे बिल (निवडणुकीचा कायदा)

जुलै १९५१ : "भारतीय बौद्ध जनसंघ" ची स्थापना.

https://www.amazon.in/gp/product/B08G896B5S/ref=as_li_tl?ie=UTF8&tag=jpnews786-21&camp=3638&creative=24630&linkCode=as2&creativeASIN=B08G896B5S&linkId=2fb3ed0d185aea3df8fe7d30e11507f8सप्टेंबर १९५१ : 'बुद्ध उपासना पाठ' या पुस्तकांचे संकलन केले.

डिसेंबर १९५१ : हिंदू कोड बिलाला काँग्रेसने संपूर्ण पाठिंबा दिला होता पण सनातन्यांच्या विरोधामुळे काँग्रेसला माघार घ्यावी लागली. या कारणाने तसेच इतर मतभेदांमुळे डॉ आंबेडकरनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. 

मे १९५२ : राज्यसभा सदस्य म्हणून नियुक्ती, त्याआधी मुंबईतील लोकसभा निवडणुकीत विजयी होऊ शकले नाही.

मे १९५२ : कोलंबिया विद्यापीठाच्या (अमेरिका) द्वी शताब्दी समारंभानिमित्त एल. एल. डी सन्मानाने दिली.

मे १९५३ : सिद्धार्थ कॉलेज - मुंबई कॉमर्स अर्थशास्त्र विभागाचे उद्घाटन लोकसभेच्या पोटनवडणुकीसाठी अर्ज भरला.

डिसेंबर १९५४ : जागतिक बौद्ध परिषद (रंगून) येथे प्रतिनिधी.

मे १९५५ : भारतीय बौद्ध महासभेची स्थापना.

डिसेंबर १९५५ : भाषावर प्रांतरचना संबंधी संयुक्त महाराष्ट्र बाबत ठाम मत मांडले.

जून १९५६ : सिद्धार्थ लॉ कॉलेज चे उद्घाटन.

१४ ऑक्टोबर १९५६ : नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.

१५ ऑक्टोबर १९५६ : नागपूर दीक्षा भूमीवर भाषण देले.

१५ नोव्हेंबर १९५६ : काठमांडू नेपाळ येथील चौथ्या जागतिक बौद्ध परिषदेत भाषण.

६ डिसेंबर १९५६ : महापरिनिर्वाण

१४ एप्रिल १९९० : मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान.

ॲड. निर्मलकुमार सूर्यवंशी लिखित संविधानाचे अंतरंग या पुस्तकातून.


वाचा - 

अहमदनगर किला - AHMEDNAGAR FORT ...

मुस्लिम धर्मीयांची चौकशी करून जात प्रमाणपत्र द्या! उच्च न्यायालय - Mumbai High court...

ऐतिहासिक अहमदनगर काही घटना काही आठवणी - Historical Ahmednagar ...

१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान भाग ३ - Indian Muslim Freedom Fighter....

एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्या पत्राला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले उत्तर - MP IMTIYAZ JALIL

वृत्तपत्रांचा ५ टक्के कस्टम शुल्क रद्द करण्यासाठी प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे सादर – खासदार इम्तियाज जलील यांच्या पत्राची केंद्रीय मंत्रालयाने घेतली दखल



पत्रकारांना नोकरीवरुन न काढण्याचे केंद्र सरकारचे सुचना जारी

औरंगाबाद : खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी दिनांक १४ जुलै २०२० रोजी कोव्हिड च्या काळात पत्रकारांच्या नोकरीच्या सुरक्षेबाबत आणि सर्व मीडिया हाऊसना विविध लाभ देणेबाबत तसेच कोणत्याही पत्रकाराला नोकरीवरुन न काढण्याचे शासनाने सर्व मिडिया हाऊसला आदेशित करावे त्यासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रव्यवहार केला होता.

          त्या अनुषंगाने केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी माहिती व प्रसारण मंत्रालयाने सदरील प्रकरणाची गंभीर दखल घेवुन सर्व मिडिया हाऊसला पत्रकारांना नोकरीवरुन न काढण्याचे सुचना देण्यात आले असुन तसेच मे, २०२० मध्ये ब्रॉडकास्टिंग क्षेत्राच्या समस्यांबद्दल चर्चा करुन मुद्रण माध्यमांचा ५ टक्के मुलभुत कस्टम शुल्क रद्द करण्यासाठी अर्थ मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांना पत्राव्दारे कळविली आहे.

          केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी खासदार इम्तियाज जलील यांना दिलेल्या पत्रात पुढे नमुद केले की, यापूर्वी दिनांक २२ एप्रिल, २०२० रोजी माहिती व प्रसारण मंत्रालयाने सर्व मिडिया हाऊसच्या व्यवस्थापनाला त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांची आवश्यक ती खबरदारी घ्यावी अशी सुचना जारी केली होती. तसेच केंद्र सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाने २० मार्च २०२० रोजी परिपत्रकाव्दारे मिडिया हाऊसच्या व्यवस्थापनाला कळविले होते की, त्यांनी त्यांच्या पत्रकारांना आणि कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी न करता त्यांना योग्य ते सहकार्य करावे.

          केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने दिनांक २९ मार्च २०२० रोजी सर्व खाजगी प्रसारमाध्यमांना सुध्दा परिपत्रक जारी करण्यात आल्याचे नमुद केले. परिपत्रकामध्ये विविध टिव्ही मालिकांत काम करणाऱ्या टिव्ही कलाकारासह सर्व कर्मचाऱ्यांना त्यांचे प्रलंबित मोबदला, पगार लवकरात लवकर देण्याचे सुचना खाजगी प्रसारमाध्यमांना देण्यात आल्याची माहिती दिली. तसेच शासकीय जाहिरात दराच्या वाढीसंदर्भात, जानेवारी २०१९ मध्ये प्रिंट / इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या शासकीय जाहिरातींचे दर सुधारित करण्यात आले असुन तेच सुधारित दर तीन वर्षांसाठी वैध असल्याचे पत्रात केंद्रीय मंत्री यांनी नमुद केले आहे.

          खासदार इम्तियाज जलील यांचे पत्र व भारतीय वृत्तपत्र सोसायटी (आयएनएस) कडून दिलेल्या निवेदनात वृत्तपत्रांना ५ टक्के मुलभुत कस्टम शुल्क रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. सदरील मागणीची सुध्दा दखल घेवुन ५ टक्के कस्टम शुल्क रद्द करण्याच्या दृष्टिने योग्य त्या निर्णयासाठी प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठविण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी खासदार इम्तियाज जलील यांना दिलेल्या पत्रात नमुद केले आहे.

वाचा - 

अमीत शाह पत्रकार का नही दे पाए जवाब - AMIT SHAH ...

क्या मुस्लीम व्यक्तीको पगडी पहनने का अधीकार नही है ? Indian farmer...

मुस्लिमांची कट्टरता - Mujahid Shaikh ...

Guru Nanak : पैगम्बर मुहम्मद ﷺ साहब के बारे में, गुरु नानक जी के सुनहरे विचार....

महातमा फुल्यांच्या विचारांची फुलबाग फुलवा - MUZAFFAR SAYYED

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

 महातमा  फुल्यांच्या विचारांची फुलबाग फुलवा 



 "विषारी ते वेद, अज्ञान्या डसती
 बिळात पळती, सर्पावत"

हा म. फुले ह्या महाकवीचा, मराठी आधुनिक कवितेच्या जनकाचा *'अखंड'* आहे. ही रचना अभंगासारखी वाटत असली तरी हा अभंग नाही. भक्तीचे स्तोम माजवून बहुजनांना वेडे करण्याचा म. फुलेंचा दुष्ट विचार नव्हता. त्यांनी जाणिवपूर्वक आपण सामाजिक आशयाची कविता (अखंड) लिहित आहोत, हे दाखवून दिले. आकाशातील कवितेला म. फुल्यांनी जमिनीवर आणले. त्यांनी माणसांची, माणसांसाठी व माणुसकीची प्रथम कविता मराठीत लिहिली. मराठी कवितेला आशय व अभिव्यक्तीच्या दोन्ही अंगाने आधुनिक साज चढविला. वरील त्यांचा एकच *'अखंड'* स्पष्टीकरणासाठी पुरेसा आहे.

म. फुल्यांनी वेद संस्कृतीवर प्रखर हल्ले चढविले. ब्राह्मण वर्गाने ज्या वेदांना पुजनीय मानले, वेदांच्या आधारे चातुर्वर्ण्यव्यवस्था प्रस्थापित केली त्या वेदांनाच म. फुले यांनी केवळ नाकारले नाही तर त्यांना विषारी सर्पाची उपमा दिली. वेदांमध्ये जातियतेचे, विषमतेचे विष भरलेले आहे. ब्राह्मण वर्ग ज्या वेदांचे भांडवल करुन हजारो वर्षे देशातील बहुजनांवर राज्य करीत होता, त्या त्यांच्या जगण्याच्या भांडवलालाच म. फुल्यांनी विषारी साप म्हणावे, यालाच क्रांती म्हणतात.

म. फुल्यांनी १९ व्या शतकात येथील विषारी व्यवस्थेविरुद्ध युद्ध पुकारले होते. येथील ब्राम्हणांनी धर्माचा दुरुपयोग केला, धंदा केला व बहुजनांना गुलाम करुन वागविले म्हणून त्यांनी ब्राम्हणांवर जहरी टीका केली. तशी ती करणे काळाची गरज होती. कोणी तरी हे करणे गरजेचेच होते. फुल्यांनी तो धीटपणा दाखविला, म्हणून फुले आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार ठरतात.

सन १८१८ साली पेशवाई बुडाली. पुण्याच्या शनिवार वाड्यावर ब्रिटिशांचा ध्वज फडकला. पेशवाई बुडाली याचे दु:ख महाराष्ट्रातील ब्राम्हणांना होणे स्वाभाविकच होते. पण पुरा महाराष्ट्र आनंदित झाला होता. ब्रिटिशांची गुलामगिरी सुरु झाल्याने महाराष्ट्र आनंदीत झाला नव्हता तर पेशव्यांच्या अमानुष गुलामगिरीतून मुक्तता झाली म्हणून महाराष्ट्राने आनंदोत्सव साजरा केला होता. तरीही धार्मिक - सांस्कृतिक गुलामीत महाराष्ट्र अडकूनच पडलेला होता. अशा काळात म्हणजे पेशवाईचा अंत झाल्यानंतर सन १८२७ मध्ये म. फुले ह्या युगपुरुषाचा जन्म झाला.

महाराष्ट्रात धर्मसत्तेचा प्रभाव जीवनातील सर्वच क्षेत्रावर पडलेला होता. त्या धर्माची उपनामे पहा............................

१) पत्नी धर्म

२) सेवक धर्म

३) राज धर्म

४) कुल धर्म

५) वर्ण धर्म

६) व्यवसाय धर्म

 १) पत्नी धर्म :- महिला ही गुलामच होती. मनुस्मृतीने तिला पुरुषांच्या तुरुंगात कैद करुन ठेवलेले. पत्नीने नवऱ्याची मरेपर्यंत सेवा करायची, हा पत्नीधर्म अस्तित्वात होता. तिने नवऱ्याला पतीदेव म्हणायचे. येथील ब्राह्मण संस्कृतीने स्त्रीला कायमची गुलाम केले होते.

म. फुल्यांनी प्रचलित धर्माचा अर्थच बदलून टाकला. हीच त्यांची क्रांती होती. स्त्रीला पुरुषांइतकेच स्थान असले पाहिजे, हा स्त्री - पुरुष समानतेचा सिध्दांन्त महाराष्ट्रात प्रथम फुल्यांनी मांडला. महाराष्ट्रात बोलके सुधाकर खूप झाले. ते सर्वच ब्राह्मण वर्गातले होते. ब्राह्मण समाज सुधारकांची समाज - सुधारणा आपल्या घराबाहेर असायची, घरात नसायची. समाजसुधारक आगरकरांची पत्नी कुठे होती ? न्या. रानड्यांची पत्नी कुठे होती ? यांची तर कुणाला नावेही माहीत नाहीत. परंतु म. फुल्यांच्या पत्नीचे म्हणजे सावित्रीमाईचे नाव आजही अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे. म. फुल्यांनी प्रथम आपल्या पत्नीलाच शिकवून स्त्री - शिक्षणाचा प्रारंभ केला. सावित्रीमाई शिकल्या व शिक्षिका झाल्या.महाराष्ट्रातील आद्य शिक्षिकेचा मान त्यांनाच द्यावा लागतो. ज्या ब्राह्मण समाजातील काही महिलांची नावे सतत आज पुढे केली जातात, आम्ही विचारतो सावित्रीमाई नसत्या तर ह्या कुठे असत्या ? सावित्रीमाई नसत्या तर पंडिता रमाबाई, आनंदीबाई जोशी, काशीबाई कानेटकर, लक्ष्मीबाई टिळक, दुर्गा भागवत ह्या महिला निर्माणच झाल्या नसत्या. पत्नीधर्म सांभाळत चुली फुंकत राहिल्या असत्या व मुलांचे लेंढार सांभाळत राहिल्या असत्या.

 २) सेवक धर्म :- आपल्याशिवाय सर्वच जातीचे लोक आपले सेवक आहेत, त्यांनी आपली सेवा केली पाहिजे, असे दंडक धर्मग्रंथात ब्राम्हणांनी लिहून ठेऊन *'सेवक धर्म'* बहुजनांवर लादला. क्षत्रियांना त्यांनी आपले रक्षण करण्यास सांगितले. तो त्यांचा *'सेवक-धर्म'* . वैश्यांना व्यापार करायला लावून आपली मिरचीची (संसाराची) सोय ब्राम्हणांनी करुन ठेवली. क्षत्रिय राजांना सुध्दा आपल्या सेवेची ब्राम्हणांविषयीची कर्तव्ये लिहून ठेवली आणि ८५ टक्के बहुजन समाजाला शुद्र अतिशुद्रांच्या यादीत टाकून त्यांना तर गुलामच केले. म. फुल्यांनी हे 'ब्राम्हणांचे कसब' ओळखले व ह्याच नावाचा ग्रंथ लिहून जगासमोर ठेवला. ब्राम्हणांचा *'सेवक धर्म'* नाकारण्याचे बहुजनांना म. फुल्यांनी जाहीर आवाहनच केले.

३) राजधर्म :- राजाने राजा म्हणून राज्य करताना स्वबुध्दीने राज्यकारभार करु नये. धर्मग्रंथात म्हटले आहे त्याच पध्दतीने राजाने राज्यकारभार करावा, हे सर्व दंडक हुशार ब्राम्हणांनी धर्मग्रंथात लिहून ठेऊन राजांनाही गुलाम केले.

महाराष्ट्रात ब्राम्हणांच्या धर्मसत्तेचा अंमल जो हजारो वर्षे चालू होता, तो प्रथम फुल्यांच्या लक्षात आला नि त्यांनी धर्मसत्तेविरुध्द युध्दच पुकारले. म. फुल्यांनी देव - भक्त यांच्या मधील ब्राह्मण नामक दलाल नाकारला. ही फार मोठी क्रांती होती. फुल्यांची क्रांती आजही बहुजन वर्गाला अजिबात कळली नाही. आजही बहुजन वर्गाचे ब्राम्हणांशिवाय पान हालत नाही. प्रत्येक धार्मिक विधीसाठी त्यांना ब्राम्हणच लागतो. देवळातील पुजारी, सत्य नारायणाची पूजा करणारा भटजी, लग्न लावणारा भटजी हाच खरा दलाल असल्याचे म. फुले उघडपणे सांगायचे व ह्या दलालांना दूर ठेवा, असेही बेधडकपणे बोलायचे, लिहायचे. धर्माच्या ठेकेदारांचा ठेकाच त्यांनी नाकारला. हीच त्यांची क्रांती होती.

म. फुल्यांनी कधीही देवाला देव म्हटले नाही. त्यांनी विश्वनिर्मात्या निसर्गाला *'निर्मिक'* म्हटले. *'निर्मिक'* हा शब्द खूप जाणीवपूर्वक त्यांनी निर्माण केला. परंतु ब्राम्हणांनी येथील ९० टक्के लोकांच्या डोक्यात ३३ कोटी देव इतके फिट करुन ठेवलेत की ते कधीच डोक्याबाहेर जाणारच नाहीत. क्रांतिकारकांचा पराभव करण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. देव संकल्पना येथील लोकांच्या मनाच्या पाटीवरुन पुसलीच जाणार नाही. हिंदूधर्म सत्तेचा अंमल अबाधित आहे. दररोज एक मंदिर भारतात बांधले जाते. मंदिरे ही ब्राम्हणांची पैसे कमविण्याची बाजारपेठ आहे. धंदा तेजीत आहे. संत रामदासांनी महाराष्ट्रात मंदिरे बांधण्याची मोहिम सुरु केली. आध्यात्माचा धंदा खरा तर त्यांनीच तेजीत आणला. ह्या धार्मिक बाजारपेठेचा पहिला व्यापारी रामदासच होते. त्यांना पक्के माहित असावे की, येथे धर्मवेडे लोकच जास्त आहेत, तेच आपले गिऱ्हाईक आहेत. त्यांनी श्लोक रचले. त्यातून समाजाला सज्ञान करण्याऐवजी अज्ञानीच ठेवले. ते म्हणायचे, *'जगी सर्व सुखी असा कोण आहे ?'* 

आजही लोकांना हा प्रश्न खरा वाटतो. म. फुल्यांचा यावर आक्षेप होता. ते म्हणत असत की, जगात कोणी सुखी नाही असा जगाविषयी, जीवनाविषयी तुच्छतेचा व नकारात्मक भाव रामदासांनी सांगून बहुजनांची बौद्धिक फसवणूक केली. जगात कोणीच सुखी नाही, असे सांगताना रामदासांना असेही सांगायचे आहे की, जगात सर्वच दु:खी आहेत, तुम्हीही दु:खातच राहा. म. फुल्यांनी रामदासांचा सुखाचा चुकीचा सिध्दांतच नाकारला. ही त्यांची क्रांती होती. पण त्यांच्या क्रांतीचा अर्थ आजही बहुजनांना कळला नाही. फुल्यांना लोक विसरले. रामदास घराघरात जीवंत आहेत. कोणी धर्माधिकारी नावाच्या माणसाने बैठका नावाचा प्रकार सुरु केला. अवघा महाराष्ट्र वेडा झालाय. लोक कामंधामं सोडून बैठकांना जातात. त्या बैठकीत रामदास शिकविला जातो. रामदास अवतारी पुरुष होता, असे बिंबवले जाते. रामदासाचा दासबोध घराघरात हळद-अबीर-गुलाल-फुलांनी पुजला जातो. ब्राम्हणांचा आध्यात्मिक धंदा आजही जोरात चालू आहे. येथे क्रांतिकारक म. फुले वेडे ठरले. कोणालाच म. फुले नको आहेत. आज ज्यांना म. फुले जीवंत ठेवायचे असेल त्यांनी घराघरात म. फुल्यांचा *'ब्राम्हणांचे कसब'* ग्रंथ ठेवावा. त्याचे पारायण करावे. रामदासांचे श्लोक म्हणण्याऐवजी म. फुल्यांचे *'अखंड'* वाचावेत. ते अखंड खंड न पाडता वाचावेत. म. फुल्यांचे *' त्रुतीय रत्न'* नाटक रंगभूमीवर आणा. ते नाटक बहुजन वर्गातील प्रत्येक स्त्री - पुरुषांनी पाहावे. पुन्हा पुन्हा पहावे. फुल्यांची विचारांची फुलबाग फुलवा, इतकीच आपणा सर्वांना प्रार्थना.

मुजफ्फरभाई सय्यद

कार्याध्यक्ष

अ. भा. साहित्य कलामंच

 ९९६०३२५०५७

वाचा - 

महात्मा फुल्यांनी पैगंबरांवर लिहिलेला पोवाडा - MAHATMA PHULE...

सूल्तान_महमूद_ग़ज़नवी - Mahemood Gajnavi.....

मोगलांचा शासनकाळ व प्रजा - Muzaffar Sayyed .....

इतिहास किती विक्रुत कराल ?....

संविधान भारताचा आत्मा आहे -Shahid Shaikh

 संविधान भारताचा आत्मा आहे - शाहीद शेख

    


     भारतीय संविधानाचे शिल्पकार क्रांतिनायक डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ ला मनुस्मृती जाहिरपणे जाळली आणि २६ जानेवारी १९५० रोजी या मनुस्मृतीला भारतीय संविधान हा पर्याय दिला.

   जगभरातील लोकशाही राष्ट्रांचा अभ्यास करून त्या त्या राष्ट्रांतील लोकशाही सरासरी पातळी मोजणारा स्वीडनमधील व्ही-डेन या जगविख्यात संशोधन संस्थेचा अहवाल नुकताच प्रकाशित झाला आहे.

"व्ही-डेन" ही स्वीडनमधील

गोथेनबर्ग या विद्यापीठातील एक संशोधक शाखा असून,२०११ पासून ही संस्था लोकशाही राष्ट्रांतील नागरिकांचे हक्क,अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा अभ्यास करते आहे.या संस्थेच्या अहवालाची जागतिक पातळीवर गंभीरतापूर्वक दखल घेतली जाते; मात्र आपल्या देशातील मुख्य प्रवाहातल्या माध्यमांनी या अहवालाकडे डोळेझाक केल्याने सामाजिक आणि राजकीय पातळीवर चर्चाच झाली नाही.अहवालातील निष्कर्ष धक्कादायक असून,त्याची सुरवातच प्ररसारमाध्यमांपासून होते,म्हणून कदाचित माध्यमांनी हा अहवाल दुर्लक्षिला असू शकतो.

   बरे असो, ही एक जाणिवपूर्वक मोहक अशी चाल आहे ज्याचे सत्तारूढ वर्णवर्चस्ववादी सारथी आहेत.

  सम्राट अशोकाचा नातू बृहद्रथ ! इ.पू १८५ मध्ये पुष्यमित्र शुंग या ब्राम्हणाने बुध्द धम्माचा विनाश करण्यासाठी मौर्य सम्राट बृहद्रथाचा वध केला आणि ब्राम्हणी सत्ता प्रस्थापित केली.डाॅ.आंबेडकर यांनी स्वच्छंदपणे सांगितले आहे की इ.स.पू १७० ते इ.स.पू १५० या काळात सुमती भार्गवाने मनुस्मृतीची रचना केली आणि आपल्या राज्याचा कायदा म्हणून पुष्पमित्र शुंगाने या मनुस्मृतीला मान्यता प्राप्त करून दिली.डाॅ.आंबेडकर यांनी म्हटले आहे की- " The code known as Manu Smirti was promulgated by Pushyamitra as embodying the principles of Brahmnic Revolution against Buddhist state of the Mauryas"

याचा अर्थ बुध्दाच्या अनुशासनानुसार 

चालणा-या मौर्य साम्राज्याच्या विरूध्द पुष्यमित्राने ब्राम्हणवादाची सांस्कृतिक सत्ता प्रस्थापित करण्यासाठी मनुस्मृतीचा आपल्या राज्याचे धर्मशास्त्र म्हणूनच केवळ नव्हे तर समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र म्हणूनही पुरस्कार केला.

  आज अमेरिका आणि भारत या दोन बलशाली राष्ट्रांतही लोकशाहीच्या -हासाला आरंभ झाला असून,गेल्या चार-पाच वर्षात नागरी स्वातंत्र्याचा संकोच होत आहे.असा "व्ही-डेन" चा अहवालाचा निष्कर्ष आहे उदा.नागरी समाजाच्या हक्कांसाठी,आदिवासींच्या उत्थनासाठी काम करणा-या शेकडो स्वयंसेवी संस्थांची मुस्कटदाबी करण्यात आली आहे, सेवाभावी काम करणा-या संस्थांवर आजवर धर्मांतरांचा आरोप ठेवण्यात येत होता,मात्र तो सिद्ध न झाल्याने 'फेरा' कायद्याचा बडगा उगारून या संस्थांना परदेशातून मिळणारा निधीच गोठवून टाकण्यात आला,दुसरीकडे नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी आवाज उठविणा-यांना अर्बन नक्षलवादी ठरवले गेले.मानवधिकारांसाठी काम करणा-यांवर सरकारी कामात हस्तक्षेप केल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावरही खटले भरले गेले.

  राष्ट्रवादाच्या नावाखाली सुरू झालेली बहुसंख्याकांची धार्मिक कट्टरता,जम्मू-काश्मीरातील जनतेला विश्वासात न घेता करण्यात आलेले त्रिभाजन,बहुमताच्या जोरावर करण्यात आलेले कायदे ,प्रसारमाध्यमांवर अंकुश अशा उदाहरणांची जंत्री या अहवालात आहे.

   अंधभक्तांनो ब्रिटनमधल्या इकाॅनाॅमिस्ट इंटेलिजन्स युनिट या कंपनीने अहवालात म्हटले आहे की,भारताचा लोकशाही इंडेक्स दहा अंकांनी घसरल्याचे म्हटले आहे.याचाच अर्थ असा की,भारताची वाटचाल सदोष लोकशाहीकडे सुरू असल्याचा इशाराही आहे.म्हणून आज संविधानावर अप्रत्यक्षरित्या घाव घालण्यात येत असून ही वाटचाल हुकुमशाही कडे जात आहे याचे सर्वोत्तम साधार व उदाहरण घ्यावयाचे झाल्यास २ वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जनतेसमोर येऊन स्पष्टोक्ती केली की," या देशाची लोकशाही संकटात आहे'.याहून आश्चर्यचकित बाब काय असू शकते?

  डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्माण केले आज ती बदल्याची चाल ही जाणीवपूर्वक एका विशिष्ट समूहाकडून केली जात आहे म्हणून आपल्याला संविधान वाचवणारे हात निर्माण करणे गरजेचे आहे.

   या विविधतेने नटलेल्या भारताला विनाशकारी हुकुमशाहीला रोखण्याचे सामर्थ्य मनुस्मृती मध्ये नसून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या पवित्र संविधानात आहे.

 डाॅ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की " आम्ही जे मनुस्मृतीचे वाचन केले आहे त्यावरून आमची अशी खात्री आहे की,या ग्रंथात शुद्र जातीचा निंदा करणारी,त्यांचा उपमर्द करणारी; कुटाळ उत्पत्तीचा कलंक त्यांच्या माथी मारणारी व त्यांच्याविषयी समाजात अनादर वाढविणारी वचने ओतप्रोत भरलेली आहेत.त्यात धर्माची धारणा नसून,धर्माची विटंबना आहे; आणि समतेचा मागमूस नसून,अस्मितेची धुळवड घातली आहे.स्वयंनिर्णयाचे तत्व प्रस्थापित करावयास निघालेल्या सुधारणावादी यांस असला ग्रंथ कधीच मान्य होणे शक्य नाही व तो अस्पृश्य वर्गासही मान्य नाही एवढेच दर्शविण्याकरिता महाड येथे त्याचा होळी करून ती खाक करण्यात आली( संदर्भ:- रिडल्स इन हिंदूइझम खंड ४)

  यावरून मनुस्मृतीपेक्षा कैक पटीने संविधान श्रेष्ठ आहे.

     तीन टक्के माकडे आर्यवंशीय घोड्यावरून भारतात आहे हे खरे पण जर का संविधानास मानले नाही तर गाढवारून तुम्हांला जिकढून आलात तिकडे पाठविण्यात येईल हे तितकेच खरे.

प्रा.शाहिद शेख

वाचा -

ओवेसी ने दि अमीत शाह को खुली चूनौती....

सूल्तान_महमूद_ग़ज़नवी....

मोगलांचा शासनकाळ व प्रजा....

एम आय एम महाराष्ट्रातील सर्व निवणुका....







मुज़फ्फर अहमद उर्फ काका बाबू - INDIAN FREEDOM FIGHTER

 स्वतंत्रता सेनानी - मुज़फ्फर अहमद उर्फ काका बाबू



मुज़फ्फर अहमद की पैदाइश 5 अगस्त सन् 1889 को ईस्ट बंगाल (मौजूदा बांग्लादेश) के सनद्वीप गांव (नोवाखाली) में हुई थी। आप एक गरीब घराने में पैदा हुए।

कम उम्र में ही घर की ज़िम्मेदारी के साथ ही आप पढ़ाई भी करते रहे। पढ़ाई में आपकी लगन और मेहनत देखकर टीचर भी कहते थे कि काका एक दिन स्कूल का नाम ज़रूर रोशन करेगा।

आपकी कोशिशों ने आपको पहले लेखक-वक्ता और बाद में नेता बना दिया।

आपने पहली बार सन् 1906 में बंगाल-बंटवारे से आंदोलन में क़दम रखा। उस वक्त आप इन्टर में पढ़ा करते थे। तब से ब्रिटिश हुकूमत के ख़िलाफ़ लिखना और जलसों में बोलना आपका एक आम शौक हो गया।

सन् 1916 से आप बंगाल के रिवूलूशनरी ग्रुप के साथ रहने लगे थे। सन् 1919 में रोलेक्ट एक्ट के ख़िलाफ़ आपने आंदोलन में हिस्सा लिया, गिरफ्तार भी हुए, लेकिन कम उम्र को देखते हुए वार्निंग देकर छोड़ दिये गये।

बंगाल रिव्युलूशनरी ग्रुप के मुजाहेदीन के साथ रशिया से हिजरत कर बंगाल आये कम्युनिस्ट ग्रुप के साथ आपके ताल्लुक़ात इतने बढे़ कि आप खुद भी कम्युनिस्ट ख्यालों के हो गये। बंगाल में कम्युनिस्ट आंदोलन की बुनियाद रखनेवाले काका बाबू ही थे। ब्रिटिश हुकूमत हिन्दुस्तान में किसी भी तरह कम्युनिस्ट मूवमेंट को शुरू होने से रोकना चाहती थी।

इसी वजह से मुज़फ्फर अहमद को पेशावर कांस्प्रेसी केस में फंसाकर बुरी तरह टार्चर किया गया।

आपने हिम्मत से इसका मुक़ाबला किया और जब जेल से छूटकर आये तो अपनी क़लम से अंग्रेज़ी हुकूमत की पुरज़ोर मुख़ालिफ़त की।

कलम की इसी धार ने आपको सन् 1924 में फिर जेल पहुंचा दिया, जहां से सन् 1925 में रिहा हुए।

सन् 1925 से 1927 तक आप इण्डियन नेशनल कांग्रेस के भी कई ओहदों पर रहे। आप बंगाल कांग्रेस कमेटी के सूबाई सेक्रेटरी भी रहे।

सन् 1939 में जब दूसरी जंगे-अज़ीम शुरू हुई तो आपने इस जंग के खिलाफ आंदोलन चलाया और अंग्रेज़ी हुकूमत ने गिरफ़्तार कर जेल में डाल दिया।

सन् 1941 में जेल से आपकी रिहाई हुई। सन् 1942 मंे जब कांग्रेस ने अंग्रेज़ो भारत छोड़ो आंदोलन शुरू किया, तब कम्युनिस्ट पार्टी ने इसमें शामिल होने से मनाकर दिया।

फिर भी काका बाबू कांग्रेस के इस आंदोलन में शामिल हुए और फिर जेल गये।

ब्रिटिश हुकूमत से लड़ते हुए जंगे-आज़ादी के इस सपूत ने कुल सात या आठ साल जेल में बिताया, कई बार पुलिस की मार और टार्चर भी सहा।

काका बाबू सिर्फ एक राइटर, स्वतंत्रता-संग्राम-सेनानी या कम्युनिस्ट लीडर की वजह से मशहूर नहीं थे बल्कि उन्हें आम आदमी के मददगार और उसके साथ हर दुःख में खड़े रहनेवाले इंसान के तौर पर भी लोग याद करते थे।

उन्होंने आखिरी सांस 18 दिसम्बर सन् 1973 को कलकत्ता में ली।

 इतनी जंगे लड़नेवाले मुजाहिद को मुल्क आज़ाद होने के बाद भी किसी ने नहीं पूछा।

आप आख़िरी वक़्त तक लिखने-पढ़ने की आमदनी से ही अपनी ज़िन्दगी बसर करते रहे।

 संदर्भ : लहू बोलता भी है

 लेखक- सय्यद शहनवाज अहमद कादरी,

संकलन - अताउल्ला पठाण सर , महाराष्ट्र


वाचा -

दिपावली और बहादूर शाह जफर.....

क्या है ई वी एम का राझ? Is EVM can be hacked ..

शिक्षण दिवस के मौकेपर मौलाना आझाद का बयान - MAULANA AZAD...

मौलाना मुहम्मद बाकीर भारत देश के पहले शहीद पत्रकार - MUHAMMAD BAQIR...

इतिहास किती विक्रुत कराल ?...

शाह वजीहउद्दीन मिन्हाजी - FREEDOM FIGHTER ....

विद्यापीठाची स्थापना व टिपूंचे ग्रंथालय - Tipu Sultan....


अगर है शौक़े सफ़र तो हमारे साथ चलो,। नहीं है मौत का डर तो हमारे साथ चलो ! CORONA 19

अगर है शौक़े सफ़र तो हमारे साथ चलो,।
नहीं है मौत का डर तो हमारे साथ चलो !


पुणे -

        मूलनिवासी मुस्लीम मंचच्या कार्यकर्त्यांना असे वाटते की, आपण जे काम करीत आहोत त्यातून आपल्याला पुण्यमिळेल, सवाब मिळेल. माणुसकीचे नाते जपता येईल, असे विचार घेऊन ते कार्य करीत आहेत. त्यांच्या कुटुंबाचा त्यांना पाठिंबा आहे. मंचने जेव्हा दहन, दफनच्या कार्यास सुरूवात केली,बातम्या येऊ लागल्या तेव्हा जवळचे मित्र त्यांना पाहिल्या नंतर बोलत नव्हते. असे कार्य करू नये, असा सल्ला देत होते, कुटुंबाची आठवण करून देत होते. मदत तर नव्हती, उपदेश होते. मंचचे कार्यकर्ते त्यांच्याकडे दुर्लक्ष करून सकारात्मक विचार करून लोकांना मदत करीत होते. प्रसंगी स्वत:च्याखिशातील पैसे खर्च करून काम करीत होते. असेच काम पुढेही करण्याचे ठरविले आहे. लॉक- डाऊन मुळे कार्यकर्त्यांचीही परिस्थिती कठीणच आहे तरीही त्यांचा आत्मविश्वास आहे. भारत माझा देश आहे, भारतातील सर्वजण माझे बांधव आहेत या विश्वासाने मूलनिवासी मुस्लीम मंच व त्यांच्या सहकारी संस्था कार्य करीत आहेत._ 

     हिंदूंचे दहन केलेल्यांची काही उदाहरणे 

        डॉ. प्रतिभा मोरेश्वर भोळे मराठीतील सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत मानाचे स्थान असणाऱ्या ज्येष्ठ गायिका जोत्स्ना भोळे यांची नात प्रतिभा मोरेश्वर भोळे यांचे १ सप्टेंबर, २०२० रोजी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल,पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या सुप्रसिद्ध अंध कवयिती होत्या व अंधांसाठी त्यांनी भरीव कार्य केले. प्रतिभा भोळे अंध असल्यामुळे साहित्य क्षेत्रात स्थान मिळविण्यासाठी त्यांना फार मोठा संघर्ष करावा लागला. तसेच अंध व दिव्यांगनां साठी काम करणारी स्वयं- -सेविका म्हणून त्या सर्वपरिचित होत्या. त्यांच्या कार्याची दखल घेऊन शासकीय व खाजगी संस्थांमार्फत अनेक पुरस्कार प्रदान केले होते. त्यांचा मित्र परिवार मोठा होता आणि नातेवाईकांचा गोतावळा मोठा होता. परंतु अखेरच्या क्षणी, त्यांच्या पती शिवाय त्यांच्या जवळ कोणीच नव्हते. प्रतिभा भोळेंच्या मृत्यूनंतर अंतिम संस्कार करण्यासाठी जवळचे मित्र,नातेवाईक कोरोनामुळे येण्यास तयार नव्हते. प्रतिभा भोळे यांचे पती सुनिल परमार यांनी मूलनिवासी मुस्लीम मंचाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला.अवघ्या वीस मिनिटात कार्यकर्ते मदतीसाठी पोहोचले. प्रेतासंबंधी आवश्यक ते कागदपत्रे पूर्ण करून, प्रेत दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल कडून आपल्या ताब्यात घेतले. पतीला सोबत घेऊन पुण्यातील नवी पेठ येथील वैकुंठ स्मशान भूमीत हिंदू रितीरिवाजा प्रमाणे अंत्यसंस्कार केले.डॉक्टरप्रतिभा भोळे यांचा अंत्यसंस्कार आमच्या हातून होणे हे आमच्या साठी भाग्याचे लक्षण आहे असे आम्ही मानतो, असे मूलनिवासी मुस्लीम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार व त्यांचे सहकारी साबीर शेख तोपखाना, जमीर मोमीन, मौलाना शकील शेख,साबिर सय्यद,दानिश खान, अमजद शेख यांनी व्यक्त केले.

   वाचा -

एम आय एम और ध्रुवीकरण - AIMIM and Polarization ..

एम आय एम हरेगाव अध्यक्ष पदी अविनाश वाहुळ- AIMIM Ahmednagar

एम आय एम उंदिरगाव अध्यक्ष पदी अमीर शेख - AIMIM Ahmednagar..

मौलाना हसरत मोहानी - Indian Freedom Fighter

मौलाना हसरत मोहानी 



        डॉ बाबासाहेबांच्या बरोबर चर्चा करणारी या चित्रातील व्यक्ती म्हणजे मौलाना हसरत मोहानी! मौलानाचा पूर्ण नाव सय्यद फजल - उल - हसन तखल्लुस हसरत होते. ते मोहान गावत  जिल्हा उन्नाव  १८७५ ला जनमले .१९०३ साली अलीगढ येतून बी ए चा शिक्षण घेतले.    

     भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्व प्रकारे योगदान देणाऱ्या मौलाना हे नेहमी इंग्रज विरोधातील लढ्यात शामील होते. मौलाना साहेबांनी अनेकदा सश्रम कारावासाची शिक्षा भोगली. संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करणारे ते पहिले नेते! 

१९०७ मध्ये मौलाना साहेबांनी एक लेख लिहिला त्याचे नाव "मिस्र मी ब्रीतानियो की पोलिसी" ज्या मुले इंग्रजांना त्यांचा खूप राग आला आणी त्यांना अटक करून जेल मध्ये पटवण्यात आले. १९२१ चे खिलाफत आंदोलनात मौलाना सहभागी झाले. १९१९ साली सर्वात पहिले "इन्कलाब जिंदाबाद" ची घोषणा आपल्या कलमाने लिहला. या घोष्णाला भगत सिंघ यांनी मशहूर केला. 

शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू जी "इन्कलाब जिंदाबाद" घोषणा देत फासावर चढले, ती "इन्कलाब जिंदाबाद" (Long Live the Revolution!) ही घोषणा पहिल्यांदा देणारे आणि लोकप्रिय करणारे मौलानाच!

१९४७ च्या भारत विभाजानला त्यांचा शेवट पर्यंत विरोध होता. त्यासाठी राजकिय विजनवास पत्करला. डॉ आंबेडकरांबरोबर त्यांचा विशेष स्नेह होता आणी घटना समितीचेही ते सदस्य होते. १३ मे १९५१ ला मौलाना हसरत मोहानी यांची अचानक मृत्यू झाली. 

राजकारणी, शिक्षणतज्ञ, कायदेतज्ज्ञ, स्वातंत्र्यसैनिक असणारे मौलाना हे महान शायर होते.

त्यांनी -

हुब्बे वतन, 
मुआशरते इस्लाही, 
कौमी एकता,
मजहबी और सियासी नजरीयात वर प्रकाश टाकले.

२०१४ मध्ये भारत सरकारने मौलाना हसरत मोहानी यांच्या सम्मानात डाक तिकीट जारी केले आहे.

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या