Showing posts with label MUZAFFAR SAYYED. Show all posts
Showing posts with label MUZAFFAR SAYYED. Show all posts

महातमा फुल्यांच्या विचारांची फुलबाग फुलवा - MUZAFFAR SAYYED

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

 महातमा  फुल्यांच्या विचारांची फुलबाग फुलवा 



 "विषारी ते वेद, अज्ञान्या डसती
 बिळात पळती, सर्पावत"

हा म. फुले ह्या महाकवीचा, मराठी आधुनिक कवितेच्या जनकाचा *'अखंड'* आहे. ही रचना अभंगासारखी वाटत असली तरी हा अभंग नाही. भक्तीचे स्तोम माजवून बहुजनांना वेडे करण्याचा म. फुलेंचा दुष्ट विचार नव्हता. त्यांनी जाणिवपूर्वक आपण सामाजिक आशयाची कविता (अखंड) लिहित आहोत, हे दाखवून दिले. आकाशातील कवितेला म. फुल्यांनी जमिनीवर आणले. त्यांनी माणसांची, माणसांसाठी व माणुसकीची प्रथम कविता मराठीत लिहिली. मराठी कवितेला आशय व अभिव्यक्तीच्या दोन्ही अंगाने आधुनिक साज चढविला. वरील त्यांचा एकच *'अखंड'* स्पष्टीकरणासाठी पुरेसा आहे.

म. फुल्यांनी वेद संस्कृतीवर प्रखर हल्ले चढविले. ब्राह्मण वर्गाने ज्या वेदांना पुजनीय मानले, वेदांच्या आधारे चातुर्वर्ण्यव्यवस्था प्रस्थापित केली त्या वेदांनाच म. फुले यांनी केवळ नाकारले नाही तर त्यांना विषारी सर्पाची उपमा दिली. वेदांमध्ये जातियतेचे, विषमतेचे विष भरलेले आहे. ब्राह्मण वर्ग ज्या वेदांचे भांडवल करुन हजारो वर्षे देशातील बहुजनांवर राज्य करीत होता, त्या त्यांच्या जगण्याच्या भांडवलालाच म. फुल्यांनी विषारी साप म्हणावे, यालाच क्रांती म्हणतात.

म. फुल्यांनी १९ व्या शतकात येथील विषारी व्यवस्थेविरुद्ध युद्ध पुकारले होते. येथील ब्राम्हणांनी धर्माचा दुरुपयोग केला, धंदा केला व बहुजनांना गुलाम करुन वागविले म्हणून त्यांनी ब्राम्हणांवर जहरी टीका केली. तशी ती करणे काळाची गरज होती. कोणी तरी हे करणे गरजेचेच होते. फुल्यांनी तो धीटपणा दाखविला, म्हणून फुले आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार ठरतात.

सन १८१८ साली पेशवाई बुडाली. पुण्याच्या शनिवार वाड्यावर ब्रिटिशांचा ध्वज फडकला. पेशवाई बुडाली याचे दु:ख महाराष्ट्रातील ब्राम्हणांना होणे स्वाभाविकच होते. पण पुरा महाराष्ट्र आनंदित झाला होता. ब्रिटिशांची गुलामगिरी सुरु झाल्याने महाराष्ट्र आनंदीत झाला नव्हता तर पेशव्यांच्या अमानुष गुलामगिरीतून मुक्तता झाली म्हणून महाराष्ट्राने आनंदोत्सव साजरा केला होता. तरीही धार्मिक - सांस्कृतिक गुलामीत महाराष्ट्र अडकूनच पडलेला होता. अशा काळात म्हणजे पेशवाईचा अंत झाल्यानंतर सन १८२७ मध्ये म. फुले ह्या युगपुरुषाचा जन्म झाला.

महाराष्ट्रात धर्मसत्तेचा प्रभाव जीवनातील सर्वच क्षेत्रावर पडलेला होता. त्या धर्माची उपनामे पहा............................

१) पत्नी धर्म

२) सेवक धर्म

३) राज धर्म

४) कुल धर्म

५) वर्ण धर्म

६) व्यवसाय धर्म

 १) पत्नी धर्म :- महिला ही गुलामच होती. मनुस्मृतीने तिला पुरुषांच्या तुरुंगात कैद करुन ठेवलेले. पत्नीने नवऱ्याची मरेपर्यंत सेवा करायची, हा पत्नीधर्म अस्तित्वात होता. तिने नवऱ्याला पतीदेव म्हणायचे. येथील ब्राह्मण संस्कृतीने स्त्रीला कायमची गुलाम केले होते.

म. फुल्यांनी प्रचलित धर्माचा अर्थच बदलून टाकला. हीच त्यांची क्रांती होती. स्त्रीला पुरुषांइतकेच स्थान असले पाहिजे, हा स्त्री - पुरुष समानतेचा सिध्दांन्त महाराष्ट्रात प्रथम फुल्यांनी मांडला. महाराष्ट्रात बोलके सुधाकर खूप झाले. ते सर्वच ब्राह्मण वर्गातले होते. ब्राह्मण समाज सुधारकांची समाज - सुधारणा आपल्या घराबाहेर असायची, घरात नसायची. समाजसुधारक आगरकरांची पत्नी कुठे होती ? न्या. रानड्यांची पत्नी कुठे होती ? यांची तर कुणाला नावेही माहीत नाहीत. परंतु म. फुल्यांच्या पत्नीचे म्हणजे सावित्रीमाईचे नाव आजही अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे. म. फुल्यांनी प्रथम आपल्या पत्नीलाच शिकवून स्त्री - शिक्षणाचा प्रारंभ केला. सावित्रीमाई शिकल्या व शिक्षिका झाल्या.महाराष्ट्रातील आद्य शिक्षिकेचा मान त्यांनाच द्यावा लागतो. ज्या ब्राह्मण समाजातील काही महिलांची नावे सतत आज पुढे केली जातात, आम्ही विचारतो सावित्रीमाई नसत्या तर ह्या कुठे असत्या ? सावित्रीमाई नसत्या तर पंडिता रमाबाई, आनंदीबाई जोशी, काशीबाई कानेटकर, लक्ष्मीबाई टिळक, दुर्गा भागवत ह्या महिला निर्माणच झाल्या नसत्या. पत्नीधर्म सांभाळत चुली फुंकत राहिल्या असत्या व मुलांचे लेंढार सांभाळत राहिल्या असत्या.

 २) सेवक धर्म :- आपल्याशिवाय सर्वच जातीचे लोक आपले सेवक आहेत, त्यांनी आपली सेवा केली पाहिजे, असे दंडक धर्मग्रंथात ब्राम्हणांनी लिहून ठेऊन *'सेवक धर्म'* बहुजनांवर लादला. क्षत्रियांना त्यांनी आपले रक्षण करण्यास सांगितले. तो त्यांचा *'सेवक-धर्म'* . वैश्यांना व्यापार करायला लावून आपली मिरचीची (संसाराची) सोय ब्राम्हणांनी करुन ठेवली. क्षत्रिय राजांना सुध्दा आपल्या सेवेची ब्राम्हणांविषयीची कर्तव्ये लिहून ठेवली आणि ८५ टक्के बहुजन समाजाला शुद्र अतिशुद्रांच्या यादीत टाकून त्यांना तर गुलामच केले. म. फुल्यांनी हे 'ब्राम्हणांचे कसब' ओळखले व ह्याच नावाचा ग्रंथ लिहून जगासमोर ठेवला. ब्राम्हणांचा *'सेवक धर्म'* नाकारण्याचे बहुजनांना म. फुल्यांनी जाहीर आवाहनच केले.

३) राजधर्म :- राजाने राजा म्हणून राज्य करताना स्वबुध्दीने राज्यकारभार करु नये. धर्मग्रंथात म्हटले आहे त्याच पध्दतीने राजाने राज्यकारभार करावा, हे सर्व दंडक हुशार ब्राम्हणांनी धर्मग्रंथात लिहून ठेऊन राजांनाही गुलाम केले.

महाराष्ट्रात ब्राम्हणांच्या धर्मसत्तेचा अंमल जो हजारो वर्षे चालू होता, तो प्रथम फुल्यांच्या लक्षात आला नि त्यांनी धर्मसत्तेविरुध्द युध्दच पुकारले. म. फुल्यांनी देव - भक्त यांच्या मधील ब्राह्मण नामक दलाल नाकारला. ही फार मोठी क्रांती होती. फुल्यांची क्रांती आजही बहुजन वर्गाला अजिबात कळली नाही. आजही बहुजन वर्गाचे ब्राम्हणांशिवाय पान हालत नाही. प्रत्येक धार्मिक विधीसाठी त्यांना ब्राम्हणच लागतो. देवळातील पुजारी, सत्य नारायणाची पूजा करणारा भटजी, लग्न लावणारा भटजी हाच खरा दलाल असल्याचे म. फुले उघडपणे सांगायचे व ह्या दलालांना दूर ठेवा, असेही बेधडकपणे बोलायचे, लिहायचे. धर्माच्या ठेकेदारांचा ठेकाच त्यांनी नाकारला. हीच त्यांची क्रांती होती.

म. फुल्यांनी कधीही देवाला देव म्हटले नाही. त्यांनी विश्वनिर्मात्या निसर्गाला *'निर्मिक'* म्हटले. *'निर्मिक'* हा शब्द खूप जाणीवपूर्वक त्यांनी निर्माण केला. परंतु ब्राम्हणांनी येथील ९० टक्के लोकांच्या डोक्यात ३३ कोटी देव इतके फिट करुन ठेवलेत की ते कधीच डोक्याबाहेर जाणारच नाहीत. क्रांतिकारकांचा पराभव करण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. देव संकल्पना येथील लोकांच्या मनाच्या पाटीवरुन पुसलीच जाणार नाही. हिंदूधर्म सत्तेचा अंमल अबाधित आहे. दररोज एक मंदिर भारतात बांधले जाते. मंदिरे ही ब्राम्हणांची पैसे कमविण्याची बाजारपेठ आहे. धंदा तेजीत आहे. संत रामदासांनी महाराष्ट्रात मंदिरे बांधण्याची मोहिम सुरु केली. आध्यात्माचा धंदा खरा तर त्यांनीच तेजीत आणला. ह्या धार्मिक बाजारपेठेचा पहिला व्यापारी रामदासच होते. त्यांना पक्के माहित असावे की, येथे धर्मवेडे लोकच जास्त आहेत, तेच आपले गिऱ्हाईक आहेत. त्यांनी श्लोक रचले. त्यातून समाजाला सज्ञान करण्याऐवजी अज्ञानीच ठेवले. ते म्हणायचे, *'जगी सर्व सुखी असा कोण आहे ?'* 

आजही लोकांना हा प्रश्न खरा वाटतो. म. फुल्यांचा यावर आक्षेप होता. ते म्हणत असत की, जगात कोणी सुखी नाही असा जगाविषयी, जीवनाविषयी तुच्छतेचा व नकारात्मक भाव रामदासांनी सांगून बहुजनांची बौद्धिक फसवणूक केली. जगात कोणीच सुखी नाही, असे सांगताना रामदासांना असेही सांगायचे आहे की, जगात सर्वच दु:खी आहेत, तुम्हीही दु:खातच राहा. म. फुल्यांनी रामदासांचा सुखाचा चुकीचा सिध्दांतच नाकारला. ही त्यांची क्रांती होती. पण त्यांच्या क्रांतीचा अर्थ आजही बहुजनांना कळला नाही. फुल्यांना लोक विसरले. रामदास घराघरात जीवंत आहेत. कोणी धर्माधिकारी नावाच्या माणसाने बैठका नावाचा प्रकार सुरु केला. अवघा महाराष्ट्र वेडा झालाय. लोक कामंधामं सोडून बैठकांना जातात. त्या बैठकीत रामदास शिकविला जातो. रामदास अवतारी पुरुष होता, असे बिंबवले जाते. रामदासाचा दासबोध घराघरात हळद-अबीर-गुलाल-फुलांनी पुजला जातो. ब्राम्हणांचा आध्यात्मिक धंदा आजही जोरात चालू आहे. येथे क्रांतिकारक म. फुले वेडे ठरले. कोणालाच म. फुले नको आहेत. आज ज्यांना म. फुले जीवंत ठेवायचे असेल त्यांनी घराघरात म. फुल्यांचा *'ब्राम्हणांचे कसब'* ग्रंथ ठेवावा. त्याचे पारायण करावे. रामदासांचे श्लोक म्हणण्याऐवजी म. फुल्यांचे *'अखंड'* वाचावेत. ते अखंड खंड न पाडता वाचावेत. म. फुल्यांचे *' त्रुतीय रत्न'* नाटक रंगभूमीवर आणा. ते नाटक बहुजन वर्गातील प्रत्येक स्त्री - पुरुषांनी पाहावे. पुन्हा पुन्हा पहावे. फुल्यांची विचारांची फुलबाग फुलवा, इतकीच आपणा सर्वांना प्रार्थना.

मुजफ्फरभाई सय्यद

कार्याध्यक्ष

अ. भा. साहित्य कलामंच

 ९९६०३२५०५७

वाचा - 

महात्मा फुल्यांनी पैगंबरांवर लिहिलेला पोवाडा - MAHATMA PHULE...

सूल्तान_महमूद_ग़ज़नवी - Mahemood Gajnavi.....

मोगलांचा शासनकाळ व प्रजा - Muzaffar Sayyed .....

इतिहास किती विक्रुत कराल ?....

धर्मनिरपेक्ष, सहिष्णू, अमर शहिद टीपू सुलतान (रह.) - HAZRAT TIPU SULTAN R.

 धर्मनिरपेक्ष, सहिष्णू, अमर शहिद टीपू सुलतान (रह.)


देश -

ह. टीपू सूलतान र. हा अत्यंत धार्मिक व्रुत्तीचा होता. याच बरोबर तो पूर्वग्रह दोषापासून दूर आणि अत्यंत सहिष्णू व्रुत्तीचा होता. हि गोष्ट सर्व न्यायनिष्ठ इतिहासकारांनी मान्य केलेली आहे. पूर्वग्रह दोष बाळगणाऱ्या इतिहासकारांनी याबाबतची सुलतान टीपूची बदनामी करण्याचा खूप आटापिटा केलेला आहे. भारतातील हिंदू मुसलमानांमध्ये फूट पाडावी व आपली सत्ता कायम टिकवावी अशी इंग्रजांची कुटील नीती होती ही गोष्ट तर जगप्रसिद्ध आहे. म्हैसूरच्या कणाकणात अमर शहिद टीपू सुलतानच्या धार्मिक सहिष्णुतेचे पुरावे आजही अस्तित्वात आहेत. हल्ली तर प्रवास करणे इतके सोपे झाले आहे की ज्याला सत्य जाणून घ्यायचे आहे तो प्रत्येक मनुष्य म्हैसुरात जाऊन टीपू सुलतानच्या धार्मिक सहिष्णुतेचे आपल्या डोळ्यांनी दर्शन घेऊ शकतो.

म्हैसूर राज्यात प्रवेश करताच सर्वप्रथम ज्या इमारती आपल्या अस्तित्वाची चोहिकडे ठळकपणे जाणीव करुन देतात त्या म्हणजे हिंदूची प्राचीन मठ व मंदिरे या होत. यापैकी काही तर हजार वर्षाच्याही पूर्वी बांधलेली आहेत. टीपू सुलतान जर द्वेष बाळगणारा असता तर सदरहू मंदिरे नामशेष करणे त्याला सहज शक्य होते परंतु याच्या अगदी उलट या मंदिरांना त्याने जहांगिऱ्या व इनाम दिलेले आहेत. यासंबंधीची शाही फर्माने व सनदा अद्यापही सदरहू मंदिरात उपलब्ध आहेत. सत्य शोधणाऱ्यांसाठी त्या लाभदायी ठरु शकतात.

श्रीरंगापट्टनम टीपू सुलतानच्या राजधानीचे शहर पुष्कळांनी पाहिले असेलच. प्रतिवर्षी दूरदूरहून हजारोंच्या संख्येत लोक ते पाहण्यासाठी येतच असतात. श्रीरंगपट्टनम रेल्वे स्थानकाच्या बाहेर पडताक्षणीच दोन भव्य मंदिरांवर पर्यटकांची द्रुष्टी खिळून राहते. या मंदिराच्या अगदी जवळच टीपू सुलतानचा राजमहल होता. त्यांच्या महालाच्या पाठीमागे अगदी लागून दुसरे एक भव्य मंदिर आहे. बंगलोरात देखील टीपूच्या महालाला लागून एक लहान मंदिर अद्यापही उभे आहे तसेच म्हैसूर प्रदेशातील श्रीनगरी, वेल्लूर, नजनगड, अल्सुर, बंगलुर इ. ठिकाणी अशीच कित्येक शतकांपूर्वी बांधलेली मंदिरे अद्यापही डौलाने उभी आहेत. या मंदिरातही टीपूने 'वतने' व 'इनाम' दिलेले आहेत. या मंदिरातील स्वामी व आचारींबद्दल त्याच्या मनात नितांत आदर होता. याबाबत बोलके पुरावे व प्रमाण आजही म्हैसूर राज्यातील पुरातन विभागात सुरक्षित आहेत.

म्हैसुरच्या पुरातन विभागाच्या अहवालाबाबत इ. स. १९१६ यात लिहिले आहे. श्रीनगरीच्या मठात नवाब हैदर अलीचे तीन पुत्र व टीपू सुलतानची तीस पत्रे व फर्मान मिळवली आहेत. सदरहून पत्र व फर्मानात हिजरी सणाबरोबरच स्वत: सुलतानने निर्माण केलेला मौलदी सनदी लिहिलेला आहे. इतर पत्रांच्याविरुध्द ज्यांच्यात सुलतानचे नाव प्रथम लिहिले जात असे. सुलतान श्रीनगरी मठाच्या शंकराचार्याचे नाव व मायने प्रथम लिहिले आहेत. स्वतः च्या नावाबरोबर त्याने कोणताच किताब व मायना लिहिलेला नाही. या पत्रापैकी बहुतेक पत्र म्हैसूरच्या तिसऱ्या युध्दातील घटनांवर प्रखरपणे प्रकाश टाकतात. काही पत्रे श्रीनगरी मठातील शंकराचार्यांनी लिहिलेल्या पत्राच्या उत्तरात लिहिलेली आहेत.

म्हैसुरच्या तिसऱ्या युद्धात इंग्रज निजाम व पेशवे तिन्हींनी टीपूवर हल्ला चढविला होता. पेशवाई सैन्य भाऊंच्या तैनातीत होते. सदरहून सैन्याने इतर सर्व प्रदेशात लूटमार आणि विनाश तर पसरविलाच परंतु श्रीनगरीसारखे स्थळही त्यांच्या हातून वाचू शकले नाही. शंकराचार्यांनी टीपू सुलतानला लिहिले की पेशवाई सैन्याने श्रीनगरातील मठ लुटून उध्दवस्त केला आहे. शारदा देवतेची मूर्ती देखील आपल्या जागेतून उखडून फेकून टाकली आहे. मठातील हत्ती व घोडे इत्यादी सर्व मराठी सैन्याने लुटून नेले आहे. 

याचे उत्तर टीपू सुलतानने मोहरब्बानी ३० इ. स.१७९१ ला खालीलप्रमाणे दिले आहे. आमच्या मुलुखावर हल्ला चढवून जे आमच्या रयतेला छळीत आहेत त्या शत्रुंना आम्ही शिक्षा करीत आहोत. आपण सार त्याग केलेले विभूती आहात म्हणून शत्रूंचा नाश व्हावा यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करणे आपले व मंदिरातील इतर ब्राम्हणांचे कर्तव्य आहे. जेणेकरुन देश सुरक्षित व रयत सुखी आणि आनंदित रहावी.

दुसऱ्या एका पत्रात स्वामीजींनी सुलतानला लिहिले होते की त्यांना अन्य एका ठिकाणी मुक्काम हलविणे भाग पडले आहे. तसेच पेशव्यांच्या सैन्यांनी मंदिरात शिरुन ब्राम्हणांना ठार व जखमी केले आहे. शिवाय मंदिरातील सर्व मालमत्ता लुटून नेली आहे. म्हणूनच सरकारच्या मदतीशिवाय शारदादेवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणे शक्य नाही यांच्या उत्तरात सुलतानने लिहिले पवित्र स्थळांचे अनादर करताना देखील जे लोक नाहीत या कलियुगात क्वचितच आपली कडू फळे मिळतील. लोक वाईट क्रुत्य हसत हसत करतात परंतु त्यांची कडू फळे रडत रडत चाखतील. शंकराचार्यांशी द्रोह म्हणजेच स्वतःचे वंश निर्मूलन करणे होय.  

या पत्रासह टीपू सुलतानने एक आज्ञापत्रही नगरप्रमुखाच्या नावाने पाठविले होते. त्यात त्या प्रमुखाला हुकूम दिलेला होता की दोनशे राहती अशरफी रोख व दोनशे राहती किंमतीचे खाद्यान तुरंत स्वामीजींच्या सेवेत पाठविले जावेत. सदरहून पत्रात सुलतानने स्वामीजींना लिहिले होते.

'इनामी गावामधून वस्तूंची गरज असेल ती घेण्याचा आपणास अधिकार आहे. पाठविलेली रक्कम आणि अन्नपदार्थातून शारदादेवतेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना ब्राम्हणांना भोजन दिले जावे व आमच्या शत्रूंच्या विनाशासाठी प्रार्थना केली जावी.

आणखीन एक सुलतानचे पत्र 'आपण पाठविलेला प्रसाद आणि शाली मिळाल्या आहेत. आपल्या उपयोगासाठी एक शालजोडी व देवीच्या मूर्तीसाठी वस्त्रे पाठविली जात आहेत. 

जाकरी महिन्यात सुलतानने आणखी एक पत्र लिहिले आहे. त्यात स्वामीजींना कळविले आहे की 'त्यांच्या खास स्वामीसाठी एक हत्ती पाठविला जात आहे. याच पत्रात टीपूने आपल्या अधिकाऱ्यांच्या नावे जे आज्ञापत्र लिहिले होते त्याची नक्कलही जोडलेली होती. त्या आज्ञापत्रात बजावले गेले होते की स्वामीजींच्या शिष्यांवर बाहेर येण्या जाण्या संबंधी कोणतेही बंधन घातले जाऊ नये.'

हैदरी महिन्यातील एका नोंदीवरुन कळते कि स्वामीजींनी मठातील दोन विशिष्ट पूजाविधी पार पाडण्यासाठी सुलतानकडे आर्थिक सहाय्य मागितले होते. सदरहून पूजा ४८ दिवसांपर्यंत दररोज होणार होती. सुलतानने त्या विधीला मदत करण्याचे मान्य केले होते. त्यानुसार त्याने नगर प्रमुखाला आज्ञा जारी केली की श्रीनगरी पाहून व्यवस्था परिपूर्ण करण्यात स्वामीजींशी सहकार्य करावे. हैदरी महिन्यात स्वामीजींना देखील टीपू सुलतानने एक पत्र लिहिले की 'आपल्या इच्छेनुसार पूजेच्या काळात दररोज सहस्त्र ब्राह्मण भोजनासाठी व रोख रक्कम देण्यासाठी नगर प्रमुखाला हुकूम दिलेला आहे.'

दीनी महिन्यातील चार नोंदी आजही मंदिरात मौजूद आहेत. त्यापैकी पहिल्या नोंदीत नगरप्रमुख महमंद रजाखानला आदेश मिळाला आहे की पूजेच्या काळात विशिष्ट व्यवस्था ठेवावी जेणेकरुन खोडसाळ लोकांकडून मठाच्या कामकाजात बाधा येऊ नये. आणखीन एका नोंदीत टीपूने कळविले आहे की शारदा देवतेच्या मूर्तीसाठी एक पालखी व स्वामीजींच्या वापरासाठी दुसरी एक पालखी चोबदार फकीर महमंद समवेत पाठविली जात आहे.

तर जाकिरी महिन्यातील एका नोंदीत लिहिले आहे की लबाडी टोळीच्या हल्ल्यापासून मंदिर सुरक्षित ठेवण्यासाठी पायदलातील सैनिकांना मंदिराच्या रक्षणासाठी नियुक्त केले आहे. लंबाडी जंगलात राहणारी एक हिंदूजात आहे जिला 'सगाली' असेही म्हटले जाते. याच मंदिरात आणखीन एक नोंद आहे त्यात नगर जिल्हाप्रमुख सय्यद महंमद याला टीपूने लिहिले आहे 'स्वामीजी समुद्र स्नानासाठी जाणार आहेत त्यांना प्रवासात सर्व गरजेच्या वस्तू पुरविल्या जाव्यात.' टीपू सुलतानची धार्मिक सहिष्णुता दाखविणारे असे कितीतरी पुरावे आजही जिवंत आहेत. रब्बानी महिन्यातील एका नोंदीवरुन हे जास्तच स्पष्ट होते. रब्बानी महिन्यात सुलतानाने स्वामीजींना कळविले आहे की त्यांच्या उपयोगासाठी दोन चांदीच्या चिनूर पाठविलेल्या आहेत असे वाटते की स्वामीजींनी सुलतानला विनंती करताना अशी इच्छा दर्शवली होती की ते स्वत: पर्रशुराम भाऊकडे जाऊन पेशवाई सैन्याने मठातील सर्व लुटून नेलेली मालमत्ता परत करण्याची त्यांना विनंती करतील. याच्या उत्तरात टीपूने स्वामीजींना रहदारीचा परवाना देताना सर्व अधिकाऱ्यांना लिहिले आहे की स्वामीजींना प्रवासातील सर्व प्रकारच्या सवलती व गरजेच्या सर्व वस्तू उपलब्ध करुन दिल्या जाव्यात. याच पत्रात टीपूने स्वामीजींच्या उपयोगासाठी शाली, हत्ती, नौबत, नगारा आणि झेंडा पाठविल्याचा उल्लेख केला आहे. या सर्व वस्तू त्याने स्वामीजींना आपल्याकडून भेट म्हणून दिल्या होत्या. 

अशाच एका अहवालावर नजर टाकली असता हे स्पष्ट होते की स्वामीजी पुण्याला पोहोचले व पर्रशुराम भाऊच्या त्यांनी गाठी भेटी घेतल्या. परंतु त्यांना यश मिळाले नाही म्हणून त्यांना तेथे जास्त काळ रहावे लागले. यामुळेही टीपू सुलतानने त्यांना एक पत्र लिहिले हे पत्र 'रजी' महिन्यातील असून प्लेट क्र. ७०, ३ यात आज ही सुरक्षित आहे त्यात तो लिहितो

'आपण जगत गुरु आहात. जगाच्या कल्याणासाठी आपण नेहमी उपासमग्न असता. ज्या देशात आपल्यासारख्या पवित्र विभूतीचे अस्तित्व असेल त्या देशात ईश्वरक्रुपा वास करते. चांगली वर्षा व उत्तम पिके येतात. एका परक्या देशात इतका दिर्घकाळ थांबण्याची आपणास गरज काय ? आपले काम लवकर आटोपून स्वदेशात परत यावे. 

अशाच प्रकारच्या रब्बानी महिन्यातील एका पत्रात सुलतान टीपूने स्वामीजींना कळविले आहे. 'आपल्या आदेशानुसार धर्मशाळेत ब्राम्हणांना भोजन दिले जात आहे. आपल्या सुखपतेसंबंधी वेळोवेळी कळवीत रहावे. 

इ. स. १७९८ मध्ये स्वामीजींनी कळविले आहे की ते पुण्याहून परत येणार आहेत त्याच्या उत्तरात टीपूने आपल्या अधिकाऱ्यांना आदेश जारी केला आहे "वाटेत स्वामीजींना गरजेच्या वस्तू पुरविल्या जाव्यात व त्यांचा मान व प्रतिष्ठेचा आदर केला जावा." 

या आणखीन एका पत्रात सुलतानने स्वामीजींना विनंती केली आहे की राजधानीत येऊन दर्शन देण्याची क्रुपा करावी. आतापर्यंत जे काही लिहिले गेले आहे ते श्रीनगरीच्या मठाशी संबंधित आहे. सदरहू मंदिर संपूर्ण दक्षिण भारत आणि म्हैसुरात अत्यंत पवित्र व शुभ मानले जाते. येथील स्वामी बव्हंशी राजांचे धार्मिक नेते समजले जातात. हिंदूंचे वैभवशाली राज्य विजय नगर येथील राज्यांचे धार्मिक नेते याच मठातील ब्राह्मण स्वामी होते. टीपू सुलतान सदरहू मंदिर व त्यातील स्वामींशी कशा प्रकारे वागला आहे याचे बोलके पुरावे वर उल्लेखित सर्व ऐतिहासिक नोंदी व अहवाल सादर करीत आहोत. हे पुरावे अद्यापही मंदिरात सुरक्षित आहेत त्याचप्रमाणे टीपूच्या राज्यातील इतर सर्व मंदिरात देखील अशाच प्रकारचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. 

याशिवाय टिपू सुलतानची धार्मिक सहिष्णुता आणि त्याच्या उदारतेचे उदाहरण यापेक्षा मोठे अन्य कोणते असू शकते की सरकारी नोकरीत त्याने मुसलमानांबरोबरच हिंदूंनादेखील मोठमोठे हुद्दे दिले होते. पुर्निया ज्याचे नाव मीर सादीक प्रमाणेच लहान लहान मुलांच्याही तोंडात आहे त्याच्या राज्याचा दिवान होता. श्रीरंगपट्टनम आणि बंगलूर येथील किल्ल्यांना राज्यात अनन्यसाधारण महत्त्व होते. या किल्ल्याचे प्रमुख किशनराव व शताबराय होते. पोस्ट विभागाचा प्रमुख अजयश्याम होता. याशिवाय टीपूच्या राज्यातील सैन्य व शासकीय यादी पडताळली गेली तर कळविण्यात येईल की हिंदू अधिकाऱ्यांची संख्याही मुसलमान अधिकाऱ्यांच्या संख्येपेक्षा काही कमी नव्हती. ग्राम व खेड्यांचे शानभोग सर्वचे सर्व ब्राह्मण होते तसेच पाटील एक तर ब्राह्मण किंवा इतर हिंदू जातीचेच असत. 

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आपले व्रुत्तपत्र 'यंग इंडिया' यात टीपू सुलतानला वाहिलेल्या आदरांजलीत लिहिले आहे. 'टिपू सुलतान स्वावलंबी सत्ताधीश होता. परंतु आपले जमाखर्च अरबी भाषेत ठेवण्यास हिंदू सावकारांना भाग पाडावे असे विचार त्याच्या मनात कधी आले नाहीत. याउलट त्याने आपल्या राष्ट्रीय भाषेत शंकराचार्यांच्या पत्रांची उत्तरे देताना त्यांच्याकडे तोस्पयेची विनंती आणि आपल्या देशाचे भले व सर्व जगाच्या कल्याणासाठी प्रार्थनेची इच्छा केली होती. कारण पुण्यशीलांच्या पायगुणामुळे पाऊस पडतो व पिके उत्तम येतात. हे पत्र सुवर्ण अक्षरांनी लिहिण्याजोगे आहे. टिपूने हिंदू मंदिरासाठी अत्यंत उदारतेने जायदादी धर्मदाय केल्या आहेत. खुद्द टिपूच्या महालाभोवती श्री व्यंकट रामण्णा श्रीनिवास आणि श्रीरंगनाथाच्या मंदिराचे अस्तित्व सुलतानच्या उदारव्रुत्ती आणि धार्मिक सहिष्णुतेचे पुरावे आहेत. यावरुन हे सिध्द होते की शहिद टिपू सुलतान यापेक्षा श्रेष्ठ राष्ट्रीय हुतात्मा कुणी दुसरा सापडणे नाही. अल्लाहची उपासना करताना हिंदूंच्या पूजेतील घंटा निनादामुळे तो कधी त्रासला जात नव्हता. टीपूचे हे दिव्य वचन आम्हीदेखील स्मरणात ठेवले पाहिजे. 

'दोन दिवस सिंहाप्रमाणे जगणे हे कुत्र्यांच्या दोनशे वर्षाच्या जगण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. 'हे अल्लाह' युध्दाचे हे ढग ज्यांच्यातून आमच्या शिरावर रक्त ठिबकत असावे. मानहानी व निर्लज्जतेने जगण्यापेक्षा मरण पत्करणे शतपट बेहत्तर आहे.' 

अमर शहीद शेरे हिंद टिपू सुलतान (रह.) यांचा हा आम्हास संदेश . 

मुजफ्फरभाई सय्यद

कार्याध्यक्ष

अ. भा. साहित्य कलामंच

९९६०३२५०५७


वाचा - 

मुस्लिम आरक्षणाचे वास्तव - MUSLIM RESERVATION...

मराठवाड्यातील पहिले बॅरिस्टर- उमर कमाल फारुकी 1st barrister...


सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या