Showing posts with label Muslim Freedom Fighter. Show all posts
Showing posts with label Muslim Freedom Fighter. Show all posts

मुस्लिम क्रांतिकारक मौलवी भाग ४ - Muslim Indian Freedom Fighter


 

नवाब अमीर खान (१७६८-१८३४) :

नवाब अमीर खान टोक संस्थानिकाचे संस्थापक आणि राज्यकर्ते होते. वडिलांचे नाव मोहम्मद हयात खान आणि आजोबांचे नाव ताले मोहम्मद खान होते. ताले मोहम्मद खान, मुगल राजा मोहम्मद शहा च्या काळात सरहद पासून रुहेल खंडाच्या ठिकाणी आले. 

अमीर खानचा जन्म १७६८ मध्ये संबल जिल्हा मुरादाबाद मध्ये झाला. आमीर खान हे खूप बहाद्दूर आणि निडर होते. त्यांनी मराठा सरदार यशवंतराव होळकर च्या साथीने अनेक मोहिमावर जाऊन विजय मिळविला होता. सन १८१७ पर्यंत ते इंग्रजांच्या विरुद्ध राहून अनेक वेळा त्यांच्याविरुद्ध युद्धात इंग्रजांना पाणी पाजले होते. पण ६ जानेवारी १८१८ला इंग्रजाबरोबर त्यांना नाईलाजाने तह करावा लागला या तहानुसार मिर खान यांना टॉक संस्थानिकाचा राजा मानण्यात आले. या तहाच्या अगोदर सय्यद अहमद शहीद सात वर्षापर्यंत त्यांच्या सेनेमध्ये होते. सप्टेंबर १८३४ ला आमीर खान यांचा मृत्यू झाला.

नवाब सिराजउद्दौला ला इंग्रजा विषयी खूप गुरूंना होती. त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या किल्ले आणि फॅक्टरीवर कब्जा करून कलकत्त्यामध्ये इंग्रजांना जगणे दुससहाय्य करून सोडले होत. २३ जून १७५७ ला प्लासीच्या मैदानात इंग्रजाबरोबर युद्ध झाले. मीर जाफर सारख्या गद्दाराला मुळे लवकरच त्यांना अटक झाली आणि २ जुलाई १७५७ ला सर्वांसमोर त्यांची हत्या केली गेली.

बहादुर शहा जफर (१७७५-१८६२)

अबू जफर सिराजुद्दीन मोहम्मद बहादुर शहा जफर मोगल साम्राज्याचे शेवटचे बादशाह होते. हाफिज मोहम्मद इब्राहिम आणि कारी मोहम्मद खलील इ. शिक्षकांकडून धार्मिक शिक्षण घेतले. सय्यद जलालुद्दीन हैदर आणि मीर इब्राहीम आली यांच्याकडून लिहायला व वाचायला शिकले. याव्यतिरिक्त धनुष्य चालवणे, तलवारबाजी, निशानेबाजी,आणि घोडेस्वारीमध्ये हि प्राविण्य मिळवले होते. २८ सप्टेंबर १८३७ ला दुसरा अकबर शहा यांच्या मृत्यूनंतर दिल्लीच्या गादीवर विराजमान झाले. १८५७ च्या स्वतंत्र संग्राम आपल्याच झेंड्याखाली लढला गेला. स्वातंत्र्यसंग्रामात इंग्रजांचा विजय झाला. २१ सप्टेंबर १८५७ ला हुमायु च्या कबरीजवळून बहादुर शहा जफर ला अटक केली गेली. युवराजांची हत्या केली गेली होती आणि यांच्याविरुद्ध  द्रोहाचा गुन्हा दाखल केला गेला.२७ जानेवारी १८५८ ला कोर्टाची कारवाई सुरू झाली व ९ मार्च १८५८ ला निकाल देण्यात आला. त्यांना देश सोडण्यास सांगण्यात आले व राणी जीनत महल आणि मुलगा जवान बक्तच्या बरोबर त्यांना रंगूला पाठवण्यात आले. ६०० रू महिना त्यांना ठरवून देण्यात आला होता. ज्याला बहादुर शहा जफर ने घेण्यास नकार दिला आणि राहिलेले चार वर्ष एकदम हलाखीत आणि गरिबीत काढले व त्यातच ७ नोव्हेंबर १८६२ ला त्यांना मृत्यूने कवटाळले.


मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी 

मौलाना चा जन्म १८३२ मध्ये सहारनपुर जिल्ह्यातील नानोता गावात झाला. १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी मोठ्या हिरीरीने भाग घेतला आणि शामली च्या जवळ इंग्रजांच्या विरुद्ध जो मोर्चा तयार झाला होता त्याचे नेतृत्व मौलाना मोहम्मद कासिम नानोत्वी यांनीच केले होते. युद्धात इंग्रजांचा विजय झाला आणि मौलाना यांच्याविरुद्ध अटक वॉरंट निघाले. बक्षिसाची घोषणा करण्यात आली पण इंग्रज पोलीस खूप प्रयत्न नंतरही त्यांना अटक करू शकले नाही. दोन वर्षापर्यंत असेच गावात शहरात भुमिगत राहिले.

मौलाना नानोत्वी एक ज्ञानी संपादक होते. रोजगारावर त्यांनी कित्येक पुस्तकांचे प्रकाशन केले होते. शिक्षणाचा प्रसार करण्यात अग्रेसर होते.दारुल उलूम देवबंद सारखे मोठे मोठे मदरसे शिक्षण संस्था उभ्या केल्या व त्यामधूनच त्यांनी खूप प्रमाणात स्वातंत्र्य चळवळीसाठी मोठा युवक वर्ग उभा केला होता.१५ एप्रिल १८८० ला त्यांचा मृत्यू झाला.


मौलाना फरिदुद्दिन देहलवी - शहीद १८५७ 

मौलाना फरिदुद्दिन त्यावेळेचे खूप मोठे धर्मोपदेशक होते. त्यांना बहादुर शहा जफर यांनी जामा मजीत मध्ये धर्मोपदेश  देण्यासाठी नियुक्ती केले होते. त्यांनी  १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतला होता. इंग्रजांच्या विरुद्ध च्या लढ्याच्या फतव्यावर त्यांची सुद्धा स्वाक्षरी होत. स्वातंत्र्य संग्रामाच्या आदेशानंतर एकेदवशी इंग्रजांची सेना त्यांच्या घरात घुसली आणि त्यांना शहीद करण्यात आले.


मौलाना किफायत आली काकी शहीद

शहीद १८५८ मौलाना किफायत आली काकी खानदान चे वारस होते. मुरादाबाद ला ते रहात होते. १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी हिरीरीने भाग घेतला. नवाब मुजददिन उर्फ नवाब मज्जू खानच्या स्वातंत्र्य राज्यात ते कायदा मंत्री होते. जेव्हा मुरादाबाद वर नवाब यांचे रामपूर ला वर्चस्व कायम झाले तर इंग्रजांच्या विरुद्ध लढ्याच फतवा जारी केला आणि या फतव्याला दुसऱ्या ठिकाणी सुद्धा पोहोचविले. २५ ऑक्टोबर १८५० ला मुरादाबाद वर परत इंग्रजांचा कब्जा झाला आणि ३० एप्रिल १८५८ ला त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांना फासावर लटकवण्यात आले. मौलाना काकीला मुरादाबाद च्या जेलच्या बाहेर जमा झालेल्या लोकांसमोर फाशी देण्यात आली आणि तेथेच त्यांना दफन करण्यात आले. 


शैखुल हिंद मौलाना महमूद हसन देवबंदी - 

शैखुल हिंद मौलाना मोहम्मद हसन देवबंदी एक मोठे धार्मिक विद्वान, तर्कशास्त्र, प्राविण्य, धर्मोपदेशक, मार्गदर्शक आणि स्वातंत्र्यसंग्रामातील चळवळीचे अग्रणीचे नेते होते. 

स्वातंत्र्याच्या संग्रामातील मोलाचे योगदान उल्लेखनीय आहे. मौलानांनी स्वातंत्र्यसंग्रामाला सुरुवात त्यावेळेस केली ज्यावेळेस इंडियन नॅशनल काँग्रेस अस्तित्वात सुद्धा नव्हती. १८७८ मध्ये त्यांनी "अंजुमन तम्रतुतर्तिब" स्थापन करून स्वातंत्र्यासाठी संघर्ष सुरू केला. १९०९ मध्ये जमियातुल अन्सार, १९१६ मध्ये रेशमी रुमाल चळवळ या नावाने स्वातंत्र्याच्या चळवळ सुरू करून क्रांतिकारकांना जोडून प्रोत्साहन दिले.

इंग्रजांना देश सोडण्यासाठी एक अशी सुनियोजित योजना तयार केली होती की ती जर यशस्वी झाली असती तर पूर्ण जगातील इंग्रजांचे वर्चस्व समाप्त झाले असते. मौलाना यांच्या या आंदोलनाचा प्रसार भारतातून रशिया जर्मनी तुर्की अफगाणिस्तानात आणि अरब देशापर्यंत झाला होता.पण दुर्दैव हे की वेळेपूर्वीच गुपित फुटले आणि स्वातंत्र्याच्या क्रांतिकारी जेलमध्ये बंद केले गले.

मौलाना मोहम्मद हसन यांना त्यांचे चार सोबत त्यांचं मक्का शहरात अटक करण्यात आली आणि मिश्र (इजिप्त) च्या आणि मालाच्या तुरुंगात बंद करण्यात आले. तीन वर्ष जेल मध्ये राहिल्यानंतर १९२० ला त्यांना भारतात आणण्यात आले. ३० नोवेंबर १९२० ला दीर्घ आजाराने त्यांचा मृत्यू झाला.


मौलाना उबेदउल्ला सिंधी (१८७२-१९४४) 

इन्कलाब चळवळीचे अग्रणी होते. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी २४ वर्षापर्यंत लागोपाठ एका देशातून दुसऱ्या देशात जाऊन प्रयत्न करीत राहिले. विविध शिक्षकांकडून शिक्षण घेतल्यानंतर उच्च शिक्षणासाठी देव बंदला आले आणि तेथे मौलाना गंगोही कडून ज्ञान प्राप्त केला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शेखुल हिंद यांनी स्वातंत्र्य चळवळीच्या आणि ध्येयाचे गुपित सांगून सदस्य बनवून सिंध प्रांतात पाठवले. तेथे ज्ञानदाना बरोबर स्वातंत्र्याच्या चळवळीचे काम वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केले. सन १९१४ मध्ये विश्व युद्ध भडकल्या नंतर शेखुल हिंदच्या आदेशाने काबूलला गेले आणि इंग्रजी राजवटीच्या विरुद्ध इस्लामी देशांची एकजूट करण्याचे प्रयत्न केले आणि स्वतंत्र भारताची पायाभरणी केली व यासाठी विभिन्न देशाचा दौरा केला. भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी मॉस्को पर्यंत गेले. पण शेखुल हिंदीचे स्वातंत्र्याची चळवळ अपयशी ठरली आणि त्यांना देश सोडण्याचा आदेश जारी करण्यात आला देशात ज्या ज्या लोकांना अटक झाली त्यांना काही वर्षानंतर सोडून देण्यात आले. परंतु मौलानांची हद्दपारी रद्द झाली नाही. १९३७ ला त्यांच्यावरील बंदी उठवण्यात आली आणि २४ वर्षानंतर आपल्या मातृभूमीवर पाय ठेवला काही दिवस दिल्लीला राहिले आणि मग लाहोरला गेले. २ ऑगस्ट १९४४ ला त्यांचा मृत्यू झाला.


मौलाना सय्यद हुसेन अहमद मदनी १८७९ - १९५७

शैखुल इस्लाम मौलाना सय्यद हुसेन अहमद मदनी यांचा जन्म १९७९ ला बांगर मऊ जिल्हा उन्नाव मध्ये झाला. हजरत शैखुल हिंद च्या मृत्यूनंतर समाजाचे नेतृत्वाची जबाबदारी त्यांच्यावर आल्यावर त्यांनी यशस्वी करून त्यांची उद्देश पूर्ती केली. मौलाना सय्यद मदनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी चार वेळा जेल मध्ये शिक्षा भोगली आणि खूप यातना सहन केल्या. त्यांनी सर्व मिळून एकंदर सात वर्ष तुरुंगात घालविले, ५ सप्टेंबर १९५७ ला देवबद मध्ये त्यांचा मृत्यू झाला.


मौलाना बरकतुल्लाह भोपाली १८६२-१९२७

मौलाना बरकतुल्लाह भोपाली स्वातंत्र्यलढ्यातील एक मोठे लढवय्ये भोपाल राज्याचे तत्कालीन प्रधानमंत्री, गदर पार्टीचे संस्थापक आणि शैखुल  हिंद द्वारा चालवलेल्या चळवळीचे सेनापती होते. १८६२ मध्ये भोपाळमध्ये जन्म झाला. काही दिवस मुंबईमध्ये राहून इंग्रजीचे शिक्षण घेतले. १८९० मध्ये इंग्लंडला गेले. तेथून त्यांच्यावर देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी प्रयत्न मिळाली आणि त्यामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिले आणि स्वातंत्र्यप्राप्तीच्या प्रयत्नात त्यांनी अनेक देशांचा दौरा केला. युरोप आणि आशिया च्या कानाकोपऱ्यात पोहोचले. लंडन, अमेरिका, तुर्की, फ्रान्स, जर्मनी, डेनमार्क, जपान, रशिया, अफगाणिस्थान आणि अरब देशांचे ३६ वर्षापर्यंत लागोपाठ दौरे केले. जीवनातील सर्वात जास्त काळ त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत घालवला. २७ सप्टेंबर १९२७ ला त्यांचा मृत्यू झाला.





मुफ्ती किफायतुल्लाह १८७५ - १९५२

भारताचे प्रसिद्ध मुफ्ती आणि भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाचे सरसेनापती होते. विचारक मार्गदर्शक धर्मापदेशक शायर गणितज्ञ राजनीती तज्ञ आणि क्रांतिकारी लढवय्ये होते. मुफ्ती किफायतुल्लाह, शहाजहाँपूरच्या एका गरीब परिवारात जन्म झाला. वयाच्या २२ व्या वर्षी एक गरीब परिवारातील युवक शैखुल हिंद च्या बरोबर राहून स्वातंत्र्य चळवळीचा भाग बनला. हजरत गंगोही च्या मार्गदर्शनात पुढील वाटचाल केली. १९१७ मध्य स्वातंत्र्यासाठी " अंजुमन अआनत नजर बंदाने इस्लाम" नावाची संघटना उभी केली. जमियात उलमा ए हिंद च्या स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिका होती. २० वर्षापर्यंत जमियतचे अध्यक्ष होते. स्वातंत्र्यचळवळीत अनेकदा जेल जावे लागले.


मौलाना मुहम्मद अली जोहर १८७८-१९३१

मोहम्मद अली जोहर भारतातील एक महान व्यक्ती व महत्त्वाचे नाव आहे. जे इंग्रजी मधील एक जबरदस्त लेखक उर्दूचे प्रसिद्ध शायर आणि निडर व्यक्ती परिपक्व राजनीती तज्ञ आणि स्वातंत्र्याच्या लढाईतील सेनापती होते. मोहम्मद अली जोहर चा जन्म १० डिसेंबर १८७८ ला रामपूर उत्तर प्रदेश मध्ये झाला. प्राथमिक शिक्षण बरेली हायस्कूल येथे झाले. उच्च शिक्षणासाठी प्रथम अलिगड विश्वविद्यालयात आणि नंतर ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी ला गेले. मौलाना अब्दुल बारी फिरंगी महली कडून मार्गदर्शन लाभले. मदरसा निजामीयां मधून मौलाना ची डिग्री प्राप्त केली आणि मिस्टर च्या ऐवजी मौलाना च्या नावाने प्रसिद्ध झाले. 

ते स्वातंत्र्य चळवळीचे महान योद्धा व क्रांतिकारी होते. स्वातंत्र्य संग्रामातील आपल्या कार्याला तोड नव्हती. मौलानांनी इंग्रजी साप्ताहिक कॉम्रेड आणि उर्दू दैनिक वृत्तपत्र हमदर्द च्या माध्यमातून स्वातंत्र्य आंदोलनाला नवे वळण दिले.


मौलाना अबुल कलाम १८८८-१९५८

इमामुल हिंद मौलाना अबुल कलाम आझाद भारताचे एक महान सुपुत्र स्वातंत्र्य चळवळीचे सरसेनापती आणि एक महान हरहुन्नरी व्यक्तिमत्व होते. १७ ऑगस्ट १८८८ रोजी मक्का शहरात जन्म झाला. वडिलांचे नाव खैरुद्दिन होते जे एक प्रसिद्ध धर्मोपदेशक होते. कला आणि संस्कृती वर प्रभुत्व होते. त्यांच्या भाषणात एक प्रकारची जादू होती.

आपल्या भाषणाने आणि लेखणीने हजारो-लाखच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत जागविली. त्यांचे वृत्तपत्र अल हिलाल ने देशाच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्याच्या बिगुल वाजवला. १९१५ मध्य आपल्या राजनीतिक कार्यामुळे बंगाल सरकारने त्यांना हद्दपार करून रांचीमध्ये नजरबंद केले. त्यानंतर स्वातंत्र्याच्या लढाईत अनेक वेळा अटक होत राहिली. मौलानांनी जवळ-जवळ १६ वर्ष तुरुंगात शिक्षा भोगली.

सुरुवातीला जमियात उलमा ए हिंद वर्किंग कमिटीचे सदस्य होते. लाहोरमधील मुख्य अधिवेशन १९२१ आणि कराची चे अधिवेशन १९३१ मध्य कांग्रेस पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते. स्वातंत्र्यापूर्वी सात वर्ष काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वात " अंग्रेज भारत छोडो" quit India movement 1942 आंदोलन चालवले होते. स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले शिक्षण मंत्री झाले.मौलानांच्या राजकीय धार्मिक आणि ज्ञानावर इतके लिहिले गेले आहे की ते सर्व एकत्र केले की कित्येक पुस्तके तयार होतील. सन १९५८ मध्ये मौलानांचा मृत्यू झाला.



मौलाना शौकत अली १८७३-१९३३

मौलाना शौकत अली खिलाफत चळवळीचे महत्त्वाचे नेते. अंजुमने खुद्दामे काबा चे संस्थापक. मौलाना मोहम्मद अली जोहर च मोठे भाऊ होते. १० मार्च १८७३ तुझा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण बरेली च्या हायस्कूलमध्ये झाले. मुस्लीम युनिव्हर्सिटी अलिगड मधून १८८९ का बी. ए पास झाले. ग्रॅज्युएट झाल्यानंतर सरकारी नोकरी केली. सर आगाखान चे खाजगी सेक्रेटरी सुद्धा होते. देश सेवेसाठी नंतर सर्व सोडून दिले. स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला प्रथम ३० मे १९१५ ला अटक झाली. डिसेंबर १९१९ ला सुटका झाली, नंतर खिलाफत चळवळीच्या बाबत प्रसिद्ध कराचीच्या खटल्यात दोन वेळा तुरुंगवास भोगला. आपल्या सोबतया बरोबर दोन वर्ष करायची जेलमध्ये होते. त्याच वेळी दोन्ही भाऊ अली बंधू च्या नावाने प्रसिद्ध झाले.

शौकत अलींच्या समाज सेवेला पाहून त्यांचे गुरु व धर्मोपदेशक मार्गदर्शक मौलाना अब्दुल बारी फिरंगी महली यांनी मौलाना ची मानाची पदवी प्रदान केली आणि त्यानंतर मौलाना च्या नावाने प्रसिद्ध झाले. २६ नोव्हेंबर २९३३ ला दिल्लीमध्ये मृत्यू झाला. जामा मस्जिद च्या पूर्वी कडील दरवाज्याच्या जवळील छोट्या  मस्जिद च्या आवारात दफन करण्यात आले.

संदर्भ - भारतीय स्वतंत्रता आंदोलन और मुसलमान

कांती विशेष अंक ४ ऑक्टोबर २०१५ 

वाचा - 

मुस्लिम धर्मीयांची चौकशी करून जात प्रमाणपत्र द्या! उच्च न्यायालय - Mumbai High court....

चीनी नायलॉन मांजा विकणाऱ्या व्यापारीवर कारवाही का होत नाही? डॉ परवेज अशरफी .....

मखदुम सोसायटीच्यावतीने मिर्जा गालिब जयंती साजरी - MIRZA GALIB....

ऐतिहासिक अहमदनगर काही घटना काही आठवणी - Historical Ahmednagar ....

१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान भाग ३ - Indian Muslim Freedom Fighter...

ऐतिहासिक अहमदनगर काही घटना काही आठवणी - Historical Ahmednagar

 


इ.स. ४ थे शतक : वस्ती चा अंदाज मात्र इ. स. २४०  म्हणजे सम्राट अशोकाच्या साम्राज्यत अहमदनगर प्रांत मोडत होता. स्थूल मानाने अहमदनगर प्रांता वरील पुढील राज घराण्याची सत्ता होती.

राज्य महिना हिजरी सण ८९५ अर्थात २८ मे १४९० भिंगार जवळील मैदानावर वहामनीच्या जहांगीर खानशी  झालेल्या लढाईत मिळालेल्या विजया प्रीत्यर्थ अहमद शहा निजामाने त्याजागी भुईकोट किल्ला (कोट -बाग -) निजाम बांधून अहमदनगर ची स्थापना केली.

इ. स.१४९४ : पंचक्रोशीतील खेडेगावाहून, तलावांतून खापरी नळातून पाणी आणून वाडे महाल बाग यांची निर्मिती करून अहमदनगर शहर बसवले गेले.

इ. स. १४९४ : भांगरे नावाच्या गोष्टी समाजातील श्रीमंत माणसाने अहमदशहा च्या परवानगीने कापड विणण्याचा व्यवसाय सर्वप्रथम सुरू केला.

इ. स. १५०८ : अहमदनगर संस्थापक अहमदशहा निजामाचे निधन.

इ. स. १५२६ : बुर्‍हाण शहाच्या कारकिद्रीत विद्वान शहा  ताहीरच्या प्रयत्नाने कोटला ( मदर्सा) बांधून पूर्ण झाला. बाराईमाम (ताबूत) उत्सव सुरू झाले. हुसैनी मदर्स स्थापन झाले.

इ. स  १५५० : चुलबी रुबी खान या तुर्की तंत्राने धूळधाण आणि सुप्रसिद्ध तोफ मलिक ई मैदान या २ तोफा ओतल्या.

इ.स. १५५९ : हुसेन निजामशहाने भुईकोट किल्ला दुरुस्त करून पुन्हा नव्याने बांधला.

इ.स. १५८० : शहा डोंगरावर सलाबतखानाने टेहळणी मनोरा (चांदबीबी महाल) बांधला. (सलाबतखान महाल)

इ.स. १५८३ : फरहा बक्ष बागेची निर्मित.

२० फेब्रुवारी स. १५९६ : मोगलांच्या सुरुंगामुळे कोसळलेली तटाची भिंत पाहून चांद सुलतान चौथडलेल्या वाघिणीसारखी शत्रूवर अपुर्‍या सैन्यासह धावून गेली. रातोरात भिंत बांधून काढली. चिटपणे मोगलांशी लढा देऊन अहमदनगर चे रक्षण केले.

इ. स. १६२४ : कुतुबशाही, आदिलशाही, मोगलशाही या ३ शहांशी आपल्या अपुऱ्या सैन्यासह गनिमीकाव्याने मलिक अंबर आणि शहाजीराजे भोसले यांनी भातवडी येथे चिवटपणे लढून त्यांचा पराभव केला.

इ. स. १६३६ : निजामशाहीची अखेर. 



मोगल साम्राज्याची राजवट सुरू.

२७ फेब्रुवारी १७०७ : मोगलांच्या सम्राट आलमगीर औरंगजेब यांचा (मराठ्यांशी लढता-लढता) आजारी पडून मृत्यू.

१७५९ नानासाहेब पेशवे आणि मोगल सेनापती मत अहमद खान उर्फ कविजंग यांच्यामधील करारानुसार अहमदनगर मराठ्यांच्या साम्राज्यात विलीन. नारो बाबाजी नगरकर नवा कर्तबगार सुभेदार.

८ ऑगस्ट १८०३ : दुष्काळाच्या भीषण छायेत गव्हर्नर लॉर्ड वेलस्लीच्या फंद फितुरीने अहमदनगर किल्ल्यावर कब्जा.

इ. स. १८१८ पेशवाईच्या अस्ता नंतर अहमदनगर पूर्णपणे ब्रिटिशांच्या ताब्यात.

इ. स १८३१ : ख्रिस्ती मिशनरी ॲलन आणि रीड यांचे अहमदनगर मध्ये आगमन.

इ. स १८३३ : दुष्काळ

इ. स १८३८ : महाराष्ट्रातील सर्वात जुने वाचनालय, अहमदनगर जिल्हा वाचनालयाची स्थापना.

इ. स १८४२ : ख्रिस्ती मिशनरी मंडळाचे ज्ञानोदय नवोदय नियतकालिक सुरू.

इ. स.१८४५-४६ : दुष्काळाचे वर्ष.

इ. स १८४७ : पारशी समाजाचे अग्यार (प्रार्थना मंदिर) सुरू.

इ. स. १८५१ : अहमदनगर मधील कॅम्प भागात रोमन कॅथलिक सेंटर जॉन ऐनस चर्च बांधले गेले.

१ नोव्हेंबर १८५४ : अहमदनगर पालिका स्थापना झाली.

इ. स.१८५५ : आजच्या वाडिया पार्क भागात विश्रामबाग (रिक्रिएशन गार्डन) तयार केले गेले.

इ. स १९५७ : स्वातंत्र्या समरा मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील कोळी समाजातील लोकांची ठिकाणी बंडे आणि होतातम्या.

इ. स. १८६० : दैनिक वृत्त वैभव पत्र सुरू.

इ.स.१८६२ : दुष्काळ

इ. स १८६४-६५ : नगरपालिकेची घरपट्टी लागू.

इ. स.१८६५-६६ : नगरपालिकेने दोन मराठी शाळा स्थापन केल्या.

इ. स. १८६६ : संपादक कुकडे यांचे दैनिक न्यायसिंधू सुर.

इ. स १८६९ : मुंबई प्रांत गव्हर्नर ने गॅझेटियरमध्ये अहमदनगर ची माहिती प्रकाशित केली.

इ. स १८७२ : दुष्काळ निवारण समिती स्थापन.

इ. स १८७३ : पहिली वकृत्व सभा स्थापन.

इ. स.१८७८ : दौंड मनमाड रेल्वे मार्ग सुरू. अहमदनगरशी रेल्वेमार्गाचा संपर्क. 

इ. स १८८० : हरिजनांसाठी नगरपालिकेची शाळा सुरू.

इ. स. नोव्हेंबर १८८४ : शेतकी (कृषी) अवजारांचे, जनावरांचे, घोड्यांचे,  कॉटन मार्केट येथे प्रदर्शन.

इ. स.१८८७ : मिशनऱ्यांचे प्रयत्नाने अहमदनगर कॉलेजची स्थापना.

इ. स १८९०: कापड बाजार विभागाची निर्मिती.

इ. स. जानेवारी १८९३ : राजकीय हेतूने लिबरल क्लब ची स्थापना.

इ. स २५ नोव्हेंबर १८९३ : हिंदी राष्ट्रीय सभा (काँग्रेस) अध्यक्ष सर हियुम साहेब यांची अहमदनगरला भेट.

इ. स १८९४ : पांजरपोळ संस्था स्थापन. संस्थापक पाशुभाई भाटे.

इ. स १८९९ : प्लेगची साथ सुरू.

इ. स १९००- १९०१ : कॉलराची साथ जोरावर.

इ. स १९०६ : वैद्य श्री गंगाधर शास्त्री गुणे यांच्या प्रयत्नाने आयुर्वेदाष्रम वनौषधी शाळा स्थापन.

इ. स १९०७ : सनातन धर्म सभेची स्थापना. 

इ. स.१९०९ - १० : सिटीसर्वे चे काम पूर्ण झाले.

इ. स १० एप्रिल १९१० : अर्बन सेंट्रल को-ऑपरेटिव बँकची स्थापना.

इ. स. १९९१ : अहमदनगर म्युनिसिपल सर्वेंट्स को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

इ. स.१९९३ : अनाथ विद्यार्थी गृहा ची स्थापना.

इ. स.१९९३ : हिंदी सेवा मंडळाची स्थापना. बाळासाहेब देशपांडे, नानासाहेब देवचक्के, सम.म. बोरकर.

इ. स १९१६ : अमेरिकन मिशन गर्ल्स हायस्कूल सुरू.

इ. स.१९१६ : स्वतः काम प्रशिक्षणासाठी उद्योग मंदिर स्थापना.

इ.स. १९१७ २४ एप्रिल - आयुर्वेद महाविद्यालय स्थापन संस्थापक वैद्य प.गो.  गुणे शास्त्री.

इ. स.१९१८ : टाऊन प्लॅनिंग  शहरास लागू झाला.

इ स. १९१९ : अहमदनगर प्रायमरी टीचर्स को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड स्थापन.

इ. स १९२० २० ऑगस्ट : नगर पोस्टल रिविजन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड स्थापन.

इ. स.१९२१ : अहमदनगर राष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन होऊन त्याच वर्षी राष्ट्रीय पार्क शाळेची सुरुवात झाली. संस्थापक दादा चौधरी, चिंचोळकर.

इ. स. १९२२ : करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज वस्तीगृह सुरू.

इ. स. १९२२ : मराठा जिल्हा प्रसारक समाज शिक्षण संस्था स्थापन.

इ. स. १९२३ : स्कूल बोर्डाची स्थापना.

इ. स. १९२३ १४ ऑगस्ट : कै. बाळासाहेब देशपांडे धर्मार्थ दवाखाना. प्रसूतिगृह स्थापना.

इ. स. १९२४ : जैन बोर्डिंग सुरू.

इ. स. १९२४ : अहमदनगर ज्युडिशियल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड स्थापना.

इ. स १९२४ : हिंदी सेवा मंडळाचे मोहन मुद्रा मंदिर (छापखाना /प्रेस) सुरू.

इ. स १९२६-२७ : महात्मा गांधी यांची अहमदनगर ला भेट. त्यांच्या भव्य सत्कार.

इ. स.१९२७ : अहमदनगर डिस्ट्रिक्ट लोकल बोर्ड को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सुरू.

इ. स.१९२७ : क्षय आणि देवीची सात जोरावर.

इ. स.१९२८ : अहमदनगर वाडयोपासक मंडळ रे टिळक, कै. दत्ता कवीबुवा, नानासाहेब मिरीकर यांच्या सहभागाने स्थापन.

इ. स १९३० : अहमदनगर तालुका डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड चालू.

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357dइ. स. मे १९३१ : स्टेशन रोड वर इलेक्ट्रिक सप्लाय कंपनी लिमिटेड चालू.

इ. स. १९३२ : अहमदनगर मध्ये वीज आली.

इ. स. १९३३ : यशवंतराव त्रिंबकराव उर्फ काकासाहेब मिरीकर यांनी अहमदनगर इतिहास हा ग्रंथ लिहिला.

इ. स. १९३३ : आयुर्वेद फार्मसी प्रायव्हेट लिमिटेड सुरू.

इ. स. १९३३ : फ्रेंड्स ऑफ डी डिस्प्रेड लीग (दलित दोस्त दल) यांची भाई सत्ता यांच्या सहकार्याने सुरुवात.

इ. स. १९३३ : जानकीबाई आपटे यांची हरिजन वस्तीत मुलींची शाळा सुरू.

इ. स. १३ जून १९३३ : गांधी मैदान येथे मुलींची पहिली मोठी शाळा सुरू.

इ. स. ६ जानेवारी १९३५ : अहमदनगर महिला मंडळ स्थापन.

इ. स.१९३५-३६ : डॉ बाबू राजेंद्रप्रसाद यांची अहमदनगरला भेट

इ. स.१९३६-३७ : स्वातंत्र्यवीर बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर यांच्या अहमदनगरला भेट.

इ. स. १९३९ : महिला को-ऑपरेटिव भंडार लिमिटेड स्थापन.

इ. स. १९३९ : महाराष्ट्रातील 24 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अहमदनगर येथे स्थानिक वडमयोपसक मंडळांचे सहकार्याने संपन्न झाले. स्वागत अध्यक्ष रा. ब. ग. देशमुख, अध्यक्ष म.म. द. वा. पोतदार.

इ. स. १९३९ : एक मिशनरी दवाखान्याचे बूथ हॉस्पिटल नावाने नामांतर बूथ हॉस्पिटल सुरू.

इ. स. १९३९ : सिरत कमिटीचे अँग्लो उर्दू स्कूल स्थापन.

इ. स. १९४१ : द सारडा बिल्डींग अँड ओईल मिल, सावेडी रस्ता येथे सुरू.

इ स. १९४२ : अहमदनगर रिमांड होम संस्था स्थापन.

इ स. १९४२ : अहमदनगर किल्ल्या मध्ये काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचे शंकरराव देव, पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल कलाम आझाद, सरदार वल्लभाई पटेल, आचार्य देव, बॅरिस्टर असिफ अली, मेहमूद साहब वगैरे राजकीय पुढारी म्हणून ब्रिटिश सरकारकडून ठेवण्यात आले.

इ स. १४ ऑक्टोबर १९४३ : बालिकाश्रम इमारत पूर्ण, बालिकाश्रम सुरू.

इ.स. १९४३ जे.एस.रानडे, मुथा फाटक, रुस्तमजी हातीदास, ताम्हणकर गुरुजी, डॉ आपटे यांच्या प्रयत्नाने अहमदनगर संगीत कला मंडळाची स्थापना.

इ. स.१४ जून १९४३ : ग. ज. चितांबर यांच्या अथक प्रयत्नांनी कन्या विद्या मंदिराची स्थापना.

इ. स.१९४३ : नगर को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर्स स्टोअर्स ची स्थापना.

७ ऑगस्ट १९४३ : आजच्या वाडिया पार्क भागात वृक्षारोपण दिन साजरा.

इ. स. १९४४ : इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा सुरू.

इ स १९४४ : पंडित नेहरूंची अन्य नेत्यांचा अहमदनगर किल्ल्यातून सुटका. ह्याच कैदेत असताना पंडितजींनी जगप्रसिद्ध डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहून पूर्ण केला.

इ. स १९४४ : मौलाना आझाद यांची अहमदनगर किल्ल्यातून सुटका झाली. ह्या कैदेत असताना जत प्रसिद्ध गुबार ए खातिर या ग्रंथ लिहिला.

इ. स. १९४४ : दा. पं. आपटे, निसाळ, बाळासाहेब भारदे यांच्या प्रयत्नाने अहमदनगर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कार्य सुरू.

इ. स १९४५ : श्रीरामपूर तालुका अस्तित्वात. अहमदनगर जिल्ह्यातील तालुका निर्मिती प्रक्रिया पूर्ण.

इ. स १९४५ : उर्दू अँग्लो स्कूलचे हायस्कूल झाल्या. चांद सुलतान हायस्कूल सुरू.

इ. स.१९४५ : भारत नाट्यसेवा संस्थापन.

इ. स.१९४६ : चित्रपट टीकाकार संघ स्थापन.

इ. स १९४७ : भिकुसा यामास क्षत्रिय विडी कारखाना सिन्नर ची शाखा सुरू.

इ. स १९४७ : प्रायमरी ट्रेनिंग महाविद्यालयाची सुरुवात.

इ. स १८ जून १९४७ : दि रोटरी क्लब स्थापन.

इ. स १५ ऑगस्ट १९४७ : भारताच्या या स्वतंत्र दिनाच्या फत्ते बुरुजावर आचार्य नरेंद्र देव यांच्या हस्ते ध्वजारोहण समारोह संपन्न.

इ. स १९४७ : अहमदनगर महाविद्यालय पुन्हा सुरू झाले.

इ. स १ डिसेंबर १९४७ : सिद्धी बाग येथे बाबावाडी सुरू.

इ. स १९४८ : अहमदनगर एक्स सर्विसमेन ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह सोसायटी सुरू.

इ. स १९४८ : राष्ट्रभाषा सेवा संघ स्थापन.

इ. स १९४८ : ग्रामोद्योग प्रचिती लिमिटेड ची सुरुवात.

इ. स.१९४८ : होमगार्ड संघटना कार्याची सुरुवात.

१ जून १९४८ : अहमदनगर- पुणे -अहमदनगर मार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची सेवा (एसटी) श्री सरोष  इमरानी यांच्या हस्ते सुरू पुण्याहून श्री बाबुराव सणस यांनी सुरू केल.

१२ जुलाई १९४८ : भारत बालवीर गाईड संस्था स्थापन.

२० जानेवारी १९४९ : अहमदनगर मधील राष्ट्रीय यांचे डांबरीकरण सुरू झाले.

५ नोव्हेंबर १९५० : भारत स्काऊट गाईड असोसिएशनची स्थापना.

इ. स. मार्च १९५१ : अहमदनगर जिल्हा पत्रकार संघातर्फे महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषदेचे अकरावी अधिवेशन अहमदनगर येथे संपन्न.

इ. स मे १९५१ : श्री. ल.को.कुलकर्णी व हेमराज बोरा यांनी अथक परिश्रम घेऊन अहमदनगर विषयावरील अहमदनगर डिरेक्टरी हा ग्रंथ लिहून संपादित करून प्रकाशित केला.

इ. स १६ जानेवारी १९५२ : इंजिनियर्स बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर्स यांची बिल्डिंग सेंटरची स्थापना.

इ. स.११ मे १८५२ : अहमदनगर मध्ये दुपारी १२ वाजता व रात्री ९.३० वाजता दररोज घडविण्यात येणारी तोफ बंद केली गेली. त्याऐवजी दररोज पहाटे ५ वाजता रात्री ८.३० वाजता अहमदनगर नगरपालिकेतर्फे भोंगे (सायरन)  वाजने सुरू झाले.

१ मे १९५३ : स्वतंत्र भारताचे पहिले महामंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांची दुष्काळग्रस्त अहमदनगरल भेट.

२८ डिसेंबर १९५४ : अहमदनगर पालिका शतसावंत सरिक  महोत्सव संपन्न.

स्त्रोत : 

मखदूम उर्दू - स्वातंत्र्य चाळवलीतील मुस्लीम हुतात्म्यांचे अपूर्ण यादी.  

 सेडिशन कमिटी रिपोर्ट 

रोल ऑफ ऑनर - के सी घोष

हुज हु ऑफ इंडिया मात्रीअर्स खंड १,२,३ संपादक - डॉ पी एन चोप्रा

HISTORY OF FREEDOM FOGHTER MOVEMENT OF CARE - T V KRUSHNAN

THE RIN STRIKE - A GROUP OF VITIMISED RATING

नव विद्रोह  कॅप्टन बी.दत्ता

COMMUNIST MARTOURS - COMMITTE OF COMMUNIST PARTY OF INDIA 

SUNIL BENARGEE, ABDUL RAZZAK KHAN AND ABDUL BADUD WRITTEN ARTICLES



वाचा - 





ग्रामपंचायत चुनाव मे तिसरे पॅनल की तयारी - MAHARASHTRA GRAMPANCHYAT ELECTION

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

 ग्रामपंचायत चुनाव मे तिसरी आघाडी की तयारी 


महाराष्ट्र - 

महाराष्ट्र मे लगबग १४००० से ज्यादा ग्रामपंचायत के चुनाव  जनवरी २०२१ मे होने जा रहे है. ग्रामपंचायत चुनाव मे प्रस्तापित और घराणेशाही से चलते आ रहे ग्रामपंचायत सदस्य और सरपंच को बडा झटका लगने वाला है. इस बार ग्रामपंचायत चुनाव मे प्रस्तापित को छोड युवा पिढी तिसरी आघाडी की तयारी कर रही है. हमेशा ये देखने मे आया है कि सालोसाल ग्रामपंचायत मे राज करनेवाले नेता अपनी खुर्सी छोडणे के लिये तयार नही है. 

युवा पिढी ये समज नही पा रही है की आखिर पुराने लोग नए को मौका क्यो नही देना चाहते है?  

अपने घरके, अपने रिश्तेदारके,  अपने नजदीक के, आर्थिक बाजू सक्षम लोगो कोही उमेदवारी देणे का रिवाज को युवापिढी तोडणा चाहते  है. सालोसाल वही चेहरे देखकर सामान्य जनता और विशेषता युवा विरोध में उतरने की तयारी कर रहे है. 

आपस मे कितना भी विरोध होने के बावजूद ग्रामपंचायत के चुनाव मे समजौत कर सत्ता काबीज करणेका यह खेल को बंद करने के लिए एक तिसरा पर्याय की कोशिष चल रही है. घराणेशाही और पैसो की लालाच से परहे एक नया इतिहास रचने के लिए और प्रस्थापीत को अपनी खूर्सी से बाजू कर नये लोगोको मौका देने की कोशिशने जोर पकडा है.

अब देखना है कि ग्रामपंचायत की जनता पुराने लोगो के मुकाबले नये लोगो को और युवापिढी को कितना पसंद करती है? 

जिस तरह युवा पिढी हर जगह  तिसरा पर्याय की कोशिष कर रही है और प्रस्तापित लोगो के विरोध में नया पर्याय खडे कर रही है ऐसा लगता है महाराष्ट्र मे ग्रामपंचायत चुनाव मे एक बडा बदलाव देखने को मिलेगा.

इस बार महाराष्ट्र के चुनाव में प्रस्थापित काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना, भाजप के विरोध में एम आय एम, वंचित बहुजन आघाडी, और काफी छोटे-छोटे दल चुनावी मैदान में अपने उमेदवार उतारणे वाले है.

ग्रामपंचायत मे  दो पॅनल हमेशा देखने मे आते है और आपसी समजौता करके ग्रामपंचायत सदस्य पद आपसमे  बाट लेते है. लेकिन इस बार प्रस्तापित को चूनाव आसान नही नजर आ रहा है. प्रस्तापित को अपनी सत्ता टीकाने के लिये एडिका जोर लगाना पडेगा. 


वाचा - 

१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान भाग ३ - Indian Muslim Freedom Fighter..

एम आय एम - पश्चिम बंगाल के १०० सीट पर है नजर - AIMIM West Bengal...

काँग्रेस को एक मुस्तफा नही हुआ बरदाश? Anta Kota Rajasthan Congress....

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग २ INDIAN MUSLIMS FREEDOM FIGHTER ....

१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान भाग ३ - Indian Muslim Freedom Fighter


 १८५७ च्या उठावमध्ये  भारतीय मुस्लीम  स्त्रियांचा योगदान



ब्रिटिशांनी चालविलेल्या या अन्याय शोषणाच्या विरोधात भारताच्या वेगवेगळ्या भागात ब्रिटिशविरोधी असंतोष वेळोवेळी सैनिक उठावाच्या रुपाने प्रकट होत गेला. 


वेल्लोर मधील उठाव १८०६

बराकपूर १८२४

फिरोजपुर १८२४

त्यापाठोपाठ झालेल्या सातव्या बंगाल घोड दलाचा ६४  रेजिमेंट चा उठाव, 

२२ व्ही एन आय १८४९

६६ वी एन आय १८५०

३८ व्ही एन आय १८५२

बरेली चा उठाव १८१६

कोळ्याचे बंड १८३१ -३२

कांगडा राज्याचा विरोध १८४८

संथालचा उठाव १८५५ - ५६

या सर्व असंतोषाच्या मागे राजकीय आर्थिक प्रशासकीय सामाजिक स्वरूपाची व्यापक करणे होती. खदखदत असलेल्या या असंतोषाचा स्फोट होऊन १८५७ चे वादळ निर्माण झाले ज्याने भारतातील ब्रिटिश साम्राज्याच्या मुळांना जबरदस्त धक्का दिला होता.
१८५७ पूर्वीची ही बंडे संख्येने कमी असली तरी त्यांचे परिणाम मर्यादित होते. उदासीन जनता व शस्त्रसामग्री मर्यादित असल्यामुळे हे उठाव यशस्वी झाले नाही. परंतु यश येवो न येवो त्यांची राजवट खपून घ्यायची नाही या वृत्तीतूनच ही बंडे घडून आलेली आपणास दिसून येतात. आपल्या मर्यादांची तुटपुंजा साधन सामुग्रीची व मनुष्यबळाची कल्पना असतानाही पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांनीही मर्दुमकी गाजविल. इतिहास घडविला. विविध स्वरूपाची व्यक्तिमत्वे असलेल्या या स्त्रिया आपल्या स्वराज्यासाठी संघर्ष करताना जिवाची बाजी लावताना आपणास दिसून येतात. पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनीही या उठावात भाग घेऊन त्यांनी प्रामुख्याने संदेश पाठविणे फरारी घोषित झालेल्या क्रांतीकारकांना आश्रय देणे, जेवण पुरविणे जखमी क्रांतीकारांची शुश्रूषा करणे एवढेच नव्हे तर हातात शस्त्र घेऊन त्यांनी या उठावाचे नेतृत्व ही केल्याचे आपणास दिसून येते
पण यातील काही स्त्रियांची नावे काळाच्या ओघात दुर्लक्षित राहिली. या दुर्लक्षित स्त्रियांना इतिहासात पुन्हा प्रस्थापित करणे त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा शोध घेणे सध्याच्या परिस्थितीत आवश्यक आहे. या उठाव यातील स्त्रीयांचे योगदान निश्चित महत्वपूर्ण आहे म्हणूनच या स्त्रियांचे योगदान स्पष्ट करणे हा या लेखाचा उद्देश.

बेगम हजरत महल -

भारतीय स्वातंत्र्य संग्रामात जे नाव प्रामुख्याने पुढे येते ते म्हणजे बेगम हजरत महल यांचे. नवाब वाजिद अली शहा बरोबर विवाह करण्यापूर्वी ती एक नर्तकी होती. विवाहानंतर ती एक सन्मानित बेगम झाली. ती इतकी सुंदर आणि आकर्षक होती की नवाब तिला महकपरी असे संबोधित असे. या उठावातील त्यांचे कार्य हे वाखाणण्यासारखे आहे. अवधच्या नवाबाची ही पत्नी विलक्षण शमते वाली महिला होती जिने स्वातंत्र्यसंग्राम मध्ये खूपच अग्रगण्य अशी भूमिका निभावली. आपल्या अल्पवयीन पुत्र बिज्रिस कद्र याला प्रतिनिधी बनविले. त्याला आपल्या पतीचा उत्तराधिकारी घोषित केला. त्यांनी लखनऊच्या रक्षणासाठी सक्रिय सहभाग घेतला आणि सतत आपल्या सैनिकांमध्ये त्या सामील असत. जेव्हा इंग्रजांनी अवध वर पुन्हा विजय प्राप्त केला तेव्हा बेगम हजरत महल ने नेपाळमध्ये शरण घेतले आणि आपल्या मुलाचे अधिकार सोडण्यास नकार दिला. त्यांच्या या उठावयातील कार्याचे मूल्यमापन करताना अशा राणी व्होरा "महिला और स्वराज्य" या त्यांच्या ग्रंथात म्हणतात "बेगम हजरत महल निव्वळ बहादूर महिलांमध्ये एक होत्या ज्या आपल्या हुशारीने संघटक क्षमतेने आणि रनकुशलते मुळे आपल्या अंतिम श्वासापर्यंत इंग्रजांची डोकेदुखी बनल्या होत्या."

अझिझन -

अझिझान या कानपूरच्या एका कलावंतीन होत्या. त्यांच्या १८५७ च्या उठावातील सहभागा विषयी सर जॉर्ज ट्रेविलियन , नानासाहेब पेशव्यांचे चरित्रकार आनंद स्वरुप तसेच नानकचंद यांनी गौरव पर लिहिले आहे. बेगम आलियाने जसे स्त्रियांचे पथक उभारले होते तसेच अजिझन या कलावंतीन नेही स्त्रियांचे पथक तयार केले होते. पुरुष वेश धारण करून झाशीच्या राणी प्रमाणे करणे हि घोड्यावर स्वार होऊन समशेर चालवीत असे. तसेच त्यांनी घरोघर जाऊन अनेक स्त्रियांना या पथकात दाखल करून घेतले होते. डॉ सुंदर लाल हे इतिहासकार त्यांच्या भारत मे अंग्रेजी राज या ग्रंथ यांच्याबाबत म्हणतात की "शस्त्रसज्ज घोड्यावर स्वार होऊन शहराच्या रस्त्यावर आणि सैनिकांच्या छावणीमध्ये फिरत असत. कधी त्या रस्त्यावरील थकलेल्या आणि जखमी झालेल्या सैनिकांना दूध आणि भाकरी वाटत असेल आणि कधी इंग्रजांच्या किल्ल्याच्या बरोबर भिंतीखाली लढणाऱ्या लोकांना धीर देत असत."

बेगम जीनत महल -

दिल्लीच्या बादशहा बहादूरशहा जफर यांची जीनत महल ही आवडती बेगम होती. विद्रोही सैनिक ज्या वेळी दिल्लीत गेले त्यावेळी त्यांनी बहादूर शा सह क्रांतिकारी सैनिकांचे नेतृत्व स्वीकारण्याची विनंती केली. परंतु वृद्धावस्था आणि रिकाम्या खजिना यामुळे प्रारंभी यांनी नेतृत्व करण्यास नकार दिला पण याच वेळेस बेगम बोलली ही वेळ गझल गाऊन मन रमण्याची नाही. विठूर येथून निरोप घेऊन देशभक्त सैनिक आले आहेत. आज पूर्ण भारताचे लक्ष दिल्लीवर आणि आपल्यावर लागले आहे असे ठणकावून सांगितले होते. बेगम  जीनत महाल बरोबरच कवियत्री कन्या बस्ती बेगम ही उठावात सहभागी झाली होती.

बेगम आलिया -

१८५७ च्या उठावात राणी लक्ष्मीबाई खेरीज बेगम आलियाच्या नेतृत्वाखाली शस्त्रसज्ज स्त्रियांचे पथक होत. या स्त्रिया शत्रूच्या हालचालींची बातमी काढण्यात पटाईत होत्या. रणनीती आणि डावपेज याबाबत तिची समज जबरदस्त होती पण १८५७ च्या उठावात नेत्यांमधील मतभेदांमुळे पुढे जेव्हा विसंवाद निर्माण झाला आणि ते एक दिलाने लढेना झाले तेव्हाही बेगम आलिया चा अखेरपर्यंत लढण्याचा निर्धार अभंग राहिला. १८५७ च्या उठावाचे संबंधी अनेक इंग्रज इतिहासकारांनी ग्रंथ प्रसिद्ध केले आहेत त्यापैकी त्यांच्या ग्रंथाचा अहवाल अनेकदा दिला आहे. त्या मेलेसन ने म्हंटले आहे, "आयोध्या ने जितका निश्चयात्मक दीर्घकालीन लढा दिला तितका भारतातील दुसऱ्या कोणत्याही भागने दिला नाही, या दीर्घकाळ चाललेल्या झुंजीत पराभव होणार असे दिसू लागल्यावर ही ज्यांनी शरण जाण्यापेक्षा मरण पत्करले त्यामध्ये बेगम आलिया ही एक होती."



स्वातंत्र्य लढ्यातील मुस्लिमांचे योगदान - 
संकलन सोमनाथ रामचंद्र देशकर

संदर्भ - १८५७ च्या उठावातील स्त्रियांचा सहभाग
लेखक - डॉक्टर विनोद बोरसे 
कार्यकारी संपादक - डॉ अनिल कठारे
कंधारपूर - इतिहास संशोधन त्रेमासिक



वाचा -



भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग २ INDIAN MUSLIMS FREEDOM FIGHTER

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग 

१९२१ असहकार आणि खिलाफत चळवळी



अब्दुल्लाह खलिफा - 

जन्म -                      १८८५ मालेगाव, जी नाशिक, महाराष्ट्र.  
वडिलांचे नाव -         खुदाबक्षचा मुलगा. 
शिक्षण           -          सातव्या इयत्ती पर्यंत, 
सहभाग  -                 विणकर खिलाफत चळवळ संघटित करणाऱ्या सैनिक नेत्यांपैकी एक, 
दारूच्या दुकानावरील पीकेटिंग मध्ये  भाग. त्यावेळी पोलिस हस्तक्षेप आणि लोकांनी हिंसाचार केला. 
एका पोलिसाचा मृत्यू, अटक, तीन वर्ष कारावास.  पोलिसांच्या अत्याचारामुळे ऑगस्ट १८२१ माध्य विसापूर अहमदनगर जेलमध्ये मृत्यू.


अब्दुल करीम गुलाम जिलानी - 

जन्म -                     हलगीचर धाका ( पूर्व बंगाल )आत्ता बांगलादेश येते २० ऑक्टोबर १९०४ रोजी जन्म, 
वडिलांचे नाव -     चौधरी गुलाम मोहम्मद चा मुलगा, 
सहभाग -              १९२१  च्या असहकार,  १९३०  च्या सविनय कायदेभंग चळवळी मध्ये सहभाग, 
अटक ढाका जेलमध्ये १० फेब्रुवारी १९३२ मध्ये मृत्यू.

अब्दुल गफूर मोहम्मद -

जन्म -                  मालेगाव जि. नाशिक, महाराष्ट्र १८८३ मध्ये जन्म, 
वडिलांचे नाव -     शकूर मोमिन चा मुलगा
शिक्षण -                 प्राथमिक शाळे पर्यंत शिक्षण, पैलवान
सहभाग -              १९२१  मध्ये असहकार चळवळ सहभाग खिलाफत चळवळ संघटित करणारे सैनिक    नेत्यांपैकी एक. दारूच्या गुत्त्यावर पिकेटिंग मध्ये सहभाग, पोलिसांचा हस्तक्षेप आणि गोळीबार त्यामुळे लोकांनी हिंसाचार केला. एक पोलीस ठार , अटक, दंगल व खून करणे अशा  आरोपाखाली मृत्युदंड १८ जानेवारी १९२३  फाशी.

इस्राईल अल्लारखा     -

जन्म -          मालेगाव जि.नाशिक महाराष्ट्र येथे १८९२ मध्ये जन्म,
शिक्षण -       प्राथमिक शाळेपर्यंत शिक्षण, नोकरी
सहभाग -      १९२१  असहकार चळवळ, खिलाफत चळवळ संघटित करणाऱ्या स्थानिक नेत्यांपैकी एक. दारूच्या गुत्त्यावर पिकेटिंग मध्ये सहभाग, पोलिसांचा हस्तक्षेप आणि गोळीबार त्यामुळे लोकांनी हिंसाचार केला. एक पोलीस ठार, अटक, दंगल व खून करणे अशा आरोपाखाली फाशीची शिक्षा पुण्याच्या येरवडा तुरुंगात ६ जुलै १९२२ ला फाशी.

मोहम्मद हुसेन हाजी मद्दू -

जन्म -                  मालेगाव जि. नाशिक महाराष्ट्र येथे जन्म १८८६ साली. 
वडिलांचे नाव -     मड्डू  शेठ चा मुलगा 
शिक्षण -              पाचवीपर्यंत शिक्षण, कापड व्यापारी
सहभाग -              १९२१  मध्ये खिलाफत चळवळीत भाग २५ एप्रिल १९२१ मध्ये अटक १९२२  मध्ये पोलीस अत्याचाराने ठाण्याच्या जन्ममृत्यू.

मोहम्मद भिकारी - 

जन्म -                 मालेगाव जि. नाशिक महाराष्ट्र येथे १८८९ साली जन्म, 
वडिलांचे नाव -  भिकारीचा मुलगा
शिक्षण -          सातवीपर्यंत शिक्षण
सहभाग -          १९२१ च्या असहकार चळवळीत कृतिशील सहभाग, दारूच्या गुत्त्यावर पिकेटिंग मध्ये भाग पोलिसांचा हस्तक्षेप गोळीबार त्यामुळे लोकांनी हिंसाचार केला,  एक पोलिस ठार, खून व दंगल या आरोपाखाली अटक फाशीची शिक्षा झाली येरवडा जेलमध्ये ६ जुलै १९२२ फाशी.

सुलेमान शाह - 

जन्म -                  मालेगाव जि. नाशिक महाराष्ट्र येथे १८७४ साली जन्म
वडिलांचे नाव -  रोजन मुलांनीचा  मुलगा
शिक्षण -              आठवीपर्यंत शिक्षण, हॉटेल मालक
सहभाग -              १९२१  च्या असहकार चळवळीत सहभाग मालेगाव खिलाफत चळवळ संघटित केले    दारूच्या गुत्त्यावर पिकेटिंग  मध्ये भाग पोलिसांचा हस्तक्षेप गोळीबार त्यामुळे लोकांनी  हिंसाचार केला एक पोलिस ठार, दंगल करणे या आरोपाखाली अटक फाशीची शिक्षा पुण्याच्या येरवडा जेलमध्ये ६ जुना १९२२ रोजी फाशी.

अब्दुल रसूल - 

जन्म -                  सोलापूर महाराष्ट्र येथे १९१० साली जन्म
वडिलांचे नाव -      कुरबान हुसेन चा मुलगा
सहभाग -             कामगार संघटनेतील कार्यकर्ता सनिवय कायदेभंग चळवळीत भाग, १९३०  ला पोलीस    ठाण्यावर झालेल्या हल्ल्यात सहभागी, दंगल व खून केल्याचा आरोप फाशीची शिक्षा पुण्याला १२ जनवरी १९३१ रोजी फाशी.

अहमद सरुर - 

जन्म -             बालगड जिल्हा होळी पश्चिम बंगाल
सहभाग -         १९३० सालच्या सनिवय  कायदेभंग चळवळीच्या वेळी सत्याग्रहात भाग, अटक,  तुरुंगवास व तुरुंगात मृत्यू


 स्त्रोत : 

मखदूम उर्दू - स्वातंत्र्य चाळवलीतील मुस्लीम हुतात्म्यांचे अपूर्ण यादी.  

 सेडिशन कमिटी रिपोर्ट 

रोल ऑफ ऑनर - के सी घोष

हुज हु ऑफ इंडिया मात्रीअर्स खंड १,२,३ संपादक - डॉ पी एन चोप्रा

HISTORY OF FREEDOM FOGHTER MOVEMENT OF CARE - T V KRUSHNAN

THE RIN STRIKE - A GROUP OF VITIMISED RATING

नव विद्रोह  कॅप्टन बी.दत्ता

COMMUNIST MARTOURS - COMMITTE OF COMMUNIST PARTY OF INDIA 

SUNIL BENARGEE, ABDUL RAZZAK KHAN AND ABDUL BADUD WRITTEN ARTICLES


वाचा - 




भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग १ MUSLIMS INDIAN FREEDOM FIGHTER

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -  



  • अख्तर अली - जन्म कपुरथाळा, पंजाब, कपुरथाळा पायदळात सुभेदार , भारतीय राष्ट्रीय लष्करात दुसर्या गुरीला पलटणीत कॅप्टन म्हणून प्रवेश युद्धात कामी आले. 

 

  • अल्लाहुदिन - तलाव, जी. रोहटक , हरियाणा येथे जन्म, मोतीबक्ष चा मुलगा, जाट पलटणीत सैनिक, भारतीय राष्ट्रीय लष्करात तिसर्या गुरीला पलटणीत सैनिक महणून प्रवेश, युद्धात शहीद झाले.

 

  • अल्ताफ हुसेन - जन्म रायपुर खुर्द, जी. अमृतसर, पंजाब येथे. भारतीय सैन्यात सैनिक होते. नंतर भारतीय राष्ट्रीय लष्करात बहादूर गटात सैनिक म्हणून प्रवेश, ब्र्हम्देशातील युद्धात शहीद.


  • बशीर अहमद  - जन्म बहाली, जी. रोहटक हरयाणा,  भारतीय लष्करात जाट पलटणीत हवालदार, भारतीय राष्ट्रीय लष्करात तिसऱ्या गुरीला पलटणीत लेफ्टनंट   म्हणून प्रवेश, कलेवा युद्धात शहीद.

  

  • चिराग दिन - जन्म बडेंधे , जी. लुधियाना, पंजाब, ब्रह्मदेशात भारतीय लष्करात प्रवेश, युद्धात शहीद.

 

  • चिराग खान - जन्म कहना, जी.कपूरथळा, पंजाब मलायात भारतीय राष्ट्रीय लष्करात प्रवेश, युद्धात शहीद.

 

  • फतेह खान - जन्म रोहटक , हरियाणा भारतीय लष्करात जाट पलटणीत सैनिक, भारतीय  राष्ट्रीय लष्करात सिंगापूर येथे सामील. तिसऱ्या गुरीला पलटणीत सेवा. ब्रिटीश सेनेशी युद्ध, जीगरकाचा येथील युद्धात शहीद.

 

  • फतेह मोहम्मद - जन्म शेरपूर जी. होशियारपूर , पंजाब भारतीय लष्करात हवालदार कारकून, मलायातील भारतीय राष्ट्रीय लष्करात सामील, युद्धात शहीद

 

  • गुलामनबी -  जन्म हरमाबाद, जी. गुरुदासपूर, पंजाब, ब्र्हम्देशातील भारतीय राष्ट्रीय लष्करात प्रवेश, ब्रीटीशांकडून अटक. बिहारी कॅम्प मध्ये तुरुंगवास, फेब्रुवारी १९४४ मध्ये मृत्यु.

 

  • इरशाद अली - जन्म बिगाणा , जी. रोहटक हरियाणा. भारतीय लष्करात सैनिक. भारतीय राष्ट्रीय लष्कराच्या पहिल्या गुरीला पलटणीत सैनिक म्हणून प्रवेश युद्धात शहीद.

 

  • जमालउद्दीन - जन्म मैनवन जी. कपूरथळा, पंजाब. कपूरथळापायदळात सैनिक, भारतीय राष्ट्रीय लष्कराच्या दुसऱ्या  गुरीला रेजिमेंट मध्ये नाईक म्हणून प्रवेश इंफाळजवळील युद्धात शहीद.

 

  • फातमअली - जन्म पट्टण , जी. हिस्सार, हरियाणा फरीदखान मुलगा, ब्र्हम्देशात भारतीय राष्ट्रीय लष्कराच्या शामील. तिसऱ्या गुरीला पलटणीत नाईक म्हणून सेवा. युद्धात शहीद.

 

  • ख़ुशी महमद - जन्म भंद्री, जी.लुधियाना, पंजाब. शांघाय प्लीस (चीन) मध्ये पोलीस,भारतीय राष्ट्रीय लष्कराच्या एस.एस.गटात सामील. ब्र्हम्देश सरहद्दीवरील युद्धात शहीद.

 

  • लालखान - जन्म माघल, जी. झेलम, पंजाब. मलयात भारतीय राष्ट्रीय लष्कराच्या सामील, युद्धात शहीद.

 

  • मोहंमद अन्वर - जन्म नुरपूर, जी. झेलम, पंजाब भारतीय राष्ट्रीय लष्करात शीख पलटणीत हवालदार, १९४२ ला सिंगापूरला १९४५ मध्ये ब्रह्मदेशातील अराकन टेकड्यांवरील युद्धात शहीद.

 

  • मोहंमद बनारस- जन्म बसाली जी. रावळपिंडी , पंजाब मलायात भारतीय लष्करात सामील, दुसऱ्या गुरीला पलटणीत लेफ्टनंट म्हणून सेवा. युद्धात शहीद.

 

  • मोहंमद शफी - जन्म पुट्टी जी.लाहोर, पंजाब मलायातील भारतीय राष्ट्रीय लष्कराच्या सामील दुसर्या गुरीला पलटणीत हवलदार म्हणून सेवा, इंफाळ जवळ युद्धात शहीद.

 

  • मोहंमद दोन -  जन्म काला कालन, जी. सियालकोट, पंजाब मलायात भारतीय लष्करात शामिल. युद्धात शहीद.

 

  • मोहंमद उमरखान -  जन्म निगाना , जी. रोह्टक , हरियाणा. नजर मोहंमदचा मुलगा. भारतीय लष्करातील जाट पलटणीत सैनिक, सिंगापूरच्या भारतीय राष्ट्रीय लष्करात प्रवेश, तिसऱ्या गुरीला पलटणीत हवालदार म्हणून सेवा युद्धात शहीद.

 

  • मोहंमद याकुब - जन्म कासीर जी. हजारा , वायव्य सरहद प्रांत मलायात भारतीय राष्ट्रीय लष्करात शामील. युद्धात शहीद.

 

  • मोहंमद युसुफ - जन्म इब्राहीम जैर जी. कोहट. वायव्य सरहद प्रांत भारतीय राष्ट्रीय लष्करात सैनिक. १९४२ मध्ये भारतीय राष्ट्रीय लष्करात शामील. पहिल्या बहादूर गटात सेवा, इंफाळ नजीकच्या युद्धात वीरगती.

 

  • नबी बक्ष - जन्म मैनवेन, जी. कपूरथाळा, पंजाब कपूर था ळा पायदळात नाईक, १९४२ साली मलायात भारतीय राष्ट्रीय लष्करात शामिल. दुसऱ्या गुरीला पलटणीत सेवा, इंफाळ जवळील युद्धात वीरगती.

 

  • नूर हुसेन -  जन्म कानी, कॅबेल्पूर पंजाब १९४२ साली भारतीय राष्ट्रीय लष्करात मलायात प्रवेश, नोव्हेंबर १९४४ ला सिंगापूर येथे युद्धात शहीद.

 

  • ताज मोहंमद - जन्म गोजरगड नुरकेल जी. मर्दन, वायव्य सरहद प्रांत भारतीय लष्करात हवालदार. १९४२ साली सिंगापूर भारतीय राष्ट्रीय लष्करात सामील. पहिल्या बहादूर गटात सेकंद लेफ्टनंट म्हणून सेवा. ब्रिटिशांनी कैद करून भारतात आणला. लखनौला १९४६ साली मृत्यू.

 

  • जहूर अहमद - जन्म जहूर मुखलिअन जी. शेखुपुरा, पंजाब मलायात भारतीय राष्ट्रीय लष्करात प्रवेश. ब्र्हम्देसतील सार्हद्द्तील ब्रिटीश फौजांशी युद्ध. १९४३ मध्ये ब्रिटिशांनी पकडून भारतात आणला. लष्करी खटला देहांताची शिक्षा, २३ ऑगस्ट १९४३ ला फाशी.               

 स्त्रोत : 

मखदूम उर्दू - स्वातंत्र्य चाळवलीतील मुस्लीम हुतात्म्यांचे अपूर्ण यादी.  

 सेडिशन कमिटी रिपोर्ट 

रोल ऑफ ऑनर - के सी घोष

हुज हु ऑफ इंडिया मात्रीअर्स खंड १,२,३ संपादक - डॉ पी एन चोप्रा

HISTORY OF FREEDOM FOGHTER MOVEMENT OF CARE - T V KRUSHNAN

THE RIN STRIKE - A GROUP OF VITIMISED RATING

नव विद्रोह  कॅप्टन बी.दत्ता

COMMUNIST MARTOURS - COMMITTE OF COMMUNIST PARTY OF INDIA 

SUNIL BENARGEE, ABDUL RAZZAK KHAN AND ABDUL BADUD WRITTEN ARTICLES

   

वाचा -

मौलाना मुहम्मद अली ज़ौहर - Indian Freedom Fighter....

लव जिहाद पर उच्च न्यायालय का निर्णय -love jihad...

बाबरी मस्जिद शहादत- Babri masjid by Firoz Shaikh...

Guru Nanak : पैगम्बर मुहम्मद ﷺ साहब के बारे में, गुरु नानक जी के सुनहरे विचार....

मोगलांचा शासनकाळ व प्रजा - Muzaffar Sayyed...

मौलाना मुहम्मद अली ज़ौहर - Indian Freedom Fighter

 मौलाना मुहम्मद अली ज़ौहर - Indian Freedom Fighter


"मेरे मुल्क को आज़ादी दो या मेरे कब्र के लिए मुझे दो गज जगह दे दो, यहां मै अपने मुल्क की आज़ादी लेने आया हूं।" 

1930 के लन्दन गोलमेज़ कांफ़्रेंस में ये लरज़ती आवाज़ थी मौलाना मुहम्मद अली ज़ौहर के जो आज ही के दिन 10 दिसम्बर 1878 को रामपुर यूपी में पैदा हुए।

मौलाना अली जौहर ने अपनी पढ़ाई ऑक्सफ़ोर्ड यूनिवर्सिटी से मुकम्मल की थी पढाई के बाद रामपुर स्टेट के शिक्षा निदेशक रहे 1920 में जामिया यूनिवर्सिटी की बुनियाद रखी।

गांधी जी से प्रेरित होकर मौलाना अली जौहर ने कांग्रेस जॉइन की और स्वतंत्रता आंदोलन में शामिल हो गए। 1922 में चौरी चौरा कांड में कई क्रांतिकारियों की शहादत के बाद असहयोग आंदोलन बिखर गया। इसके बाद मौलाना ने अंग्रेजी हुक़ूमत के खिलाफ हमदर्द पत्रिका निकालना शुरू कर दिया जिसकी वजह से मौलाना को जेल में डाल दिया गया जब तक जिंदा रहे कई बार जेल में डाले गए लेकिन अपनी आख़री सांस तक अंग्रेजों की खुल के मुखालफत करते रहे।

मौलाना के इतनी कुर्बानियों के बाद भी उनको भुला दिया गया कई अरसों बाद उनके नाम पे रामपुर में जौहर यूनिवर्सिटी बनी थी उस पर भी बुल्डोजर चला दिया गया।

जिस मुल्क़ के लिये मौलाना ने जेल से लेकर बीमारी तक संघर्ष किया। अगर आज का हिंदुस्तान देखते तो उसी संसद में खड़े होकर जरूर सवाल करते क्या हमने इसी हिन्दोस्तान की आज़ादी का ख्वाब देखा था? 


ये भी पढिये -

मुकुंदनगर पाण्याची टाकीचे काय? - डॉ परवेज अशरफी - Ahmednagar Corporation...

लव जिहाद पर उच्च न्यायालय का निर्णय -love jihad...

Guru Nanak : पैगम्बर मुहम्मद ﷺ साहब के बारे में, गुरु नानक जी के सुनहरे विचार.....

मुस्लिमांची कट्टरता - Mujahid Shaikh ...

मुज़फ्फर अहमद उर्फ काका बाबू - INDIAN FREEDOM FIGHTER ...

शाह वजीहउद्दीन मिन्हाजी - FREEDOM FIGHTER ...


मुज़फ्फर अहमद उर्फ काका बाबू - INDIAN FREEDOM FIGHTER

 स्वतंत्रता सेनानी - मुज़फ्फर अहमद उर्फ काका बाबू



मुज़फ्फर अहमद की पैदाइश 5 अगस्त सन् 1889 को ईस्ट बंगाल (मौजूदा बांग्लादेश) के सनद्वीप गांव (नोवाखाली) में हुई थी। आप एक गरीब घराने में पैदा हुए।

कम उम्र में ही घर की ज़िम्मेदारी के साथ ही आप पढ़ाई भी करते रहे। पढ़ाई में आपकी लगन और मेहनत देखकर टीचर भी कहते थे कि काका एक दिन स्कूल का नाम ज़रूर रोशन करेगा।

आपकी कोशिशों ने आपको पहले लेखक-वक्ता और बाद में नेता बना दिया।

आपने पहली बार सन् 1906 में बंगाल-बंटवारे से आंदोलन में क़दम रखा। उस वक्त आप इन्टर में पढ़ा करते थे। तब से ब्रिटिश हुकूमत के ख़िलाफ़ लिखना और जलसों में बोलना आपका एक आम शौक हो गया।

सन् 1916 से आप बंगाल के रिवूलूशनरी ग्रुप के साथ रहने लगे थे। सन् 1919 में रोलेक्ट एक्ट के ख़िलाफ़ आपने आंदोलन में हिस्सा लिया, गिरफ्तार भी हुए, लेकिन कम उम्र को देखते हुए वार्निंग देकर छोड़ दिये गये।

बंगाल रिव्युलूशनरी ग्रुप के मुजाहेदीन के साथ रशिया से हिजरत कर बंगाल आये कम्युनिस्ट ग्रुप के साथ आपके ताल्लुक़ात इतने बढे़ कि आप खुद भी कम्युनिस्ट ख्यालों के हो गये। बंगाल में कम्युनिस्ट आंदोलन की बुनियाद रखनेवाले काका बाबू ही थे। ब्रिटिश हुकूमत हिन्दुस्तान में किसी भी तरह कम्युनिस्ट मूवमेंट को शुरू होने से रोकना चाहती थी।

इसी वजह से मुज़फ्फर अहमद को पेशावर कांस्प्रेसी केस में फंसाकर बुरी तरह टार्चर किया गया।

आपने हिम्मत से इसका मुक़ाबला किया और जब जेल से छूटकर आये तो अपनी क़लम से अंग्रेज़ी हुकूमत की पुरज़ोर मुख़ालिफ़त की।

कलम की इसी धार ने आपको सन् 1924 में फिर जेल पहुंचा दिया, जहां से सन् 1925 में रिहा हुए।

सन् 1925 से 1927 तक आप इण्डियन नेशनल कांग्रेस के भी कई ओहदों पर रहे। आप बंगाल कांग्रेस कमेटी के सूबाई सेक्रेटरी भी रहे।

सन् 1939 में जब दूसरी जंगे-अज़ीम शुरू हुई तो आपने इस जंग के खिलाफ आंदोलन चलाया और अंग्रेज़ी हुकूमत ने गिरफ़्तार कर जेल में डाल दिया।

सन् 1941 में जेल से आपकी रिहाई हुई। सन् 1942 मंे जब कांग्रेस ने अंग्रेज़ो भारत छोड़ो आंदोलन शुरू किया, तब कम्युनिस्ट पार्टी ने इसमें शामिल होने से मनाकर दिया।

फिर भी काका बाबू कांग्रेस के इस आंदोलन में शामिल हुए और फिर जेल गये।

ब्रिटिश हुकूमत से लड़ते हुए जंगे-आज़ादी के इस सपूत ने कुल सात या आठ साल जेल में बिताया, कई बार पुलिस की मार और टार्चर भी सहा।

काका बाबू सिर्फ एक राइटर, स्वतंत्रता-संग्राम-सेनानी या कम्युनिस्ट लीडर की वजह से मशहूर नहीं थे बल्कि उन्हें आम आदमी के मददगार और उसके साथ हर दुःख में खड़े रहनेवाले इंसान के तौर पर भी लोग याद करते थे।

उन्होंने आखिरी सांस 18 दिसम्बर सन् 1973 को कलकत्ता में ली।

 इतनी जंगे लड़नेवाले मुजाहिद को मुल्क आज़ाद होने के बाद भी किसी ने नहीं पूछा।

आप आख़िरी वक़्त तक लिखने-पढ़ने की आमदनी से ही अपनी ज़िन्दगी बसर करते रहे।

 संदर्भ : लहू बोलता भी है

 लेखक- सय्यद शहनवाज अहमद कादरी,

संकलन - अताउल्ला पठाण सर , महाराष्ट्र


वाचा -

दिपावली और बहादूर शाह जफर.....

क्या है ई वी एम का राझ? Is EVM can be hacked ..

शिक्षण दिवस के मौकेपर मौलाना आझाद का बयान - MAULANA AZAD...

मौलाना मुहम्मद बाकीर भारत देश के पहले शहीद पत्रकार - MUHAMMAD BAQIR...

इतिहास किती विक्रुत कराल ?...

शाह वजीहउद्दीन मिन्हाजी - FREEDOM FIGHTER ....

विद्यापीठाची स्थापना व टिपूंचे ग्रंथालय - Tipu Sultan....


सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या