संविधान भारताचा आत्मा आहे -Shahid Shaikh

 संविधान भारताचा आत्मा आहे - शाहीद शेख

    


     भारतीय संविधानाचे शिल्पकार क्रांतिनायक डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ ला मनुस्मृती जाहिरपणे जाळली आणि २६ जानेवारी १९५० रोजी या मनुस्मृतीला भारतीय संविधान हा पर्याय दिला.

   जगभरातील लोकशाही राष्ट्रांचा अभ्यास करून त्या त्या राष्ट्रांतील लोकशाही सरासरी पातळी मोजणारा स्वीडनमधील व्ही-डेन या जगविख्यात संशोधन संस्थेचा अहवाल नुकताच प्रकाशित झाला आहे.

"व्ही-डेन" ही स्वीडनमधील

गोथेनबर्ग या विद्यापीठातील एक संशोधक शाखा असून,२०११ पासून ही संस्था लोकशाही राष्ट्रांतील नागरिकांचे हक्क,अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा अभ्यास करते आहे.या संस्थेच्या अहवालाची जागतिक पातळीवर गंभीरतापूर्वक दखल घेतली जाते; मात्र आपल्या देशातील मुख्य प्रवाहातल्या माध्यमांनी या अहवालाकडे डोळेझाक केल्याने सामाजिक आणि राजकीय पातळीवर चर्चाच झाली नाही.अहवालातील निष्कर्ष धक्कादायक असून,त्याची सुरवातच प्ररसारमाध्यमांपासून होते,म्हणून कदाचित माध्यमांनी हा अहवाल दुर्लक्षिला असू शकतो.

   बरे असो, ही एक जाणिवपूर्वक मोहक अशी चाल आहे ज्याचे सत्तारूढ वर्णवर्चस्ववादी सारथी आहेत.

  सम्राट अशोकाचा नातू बृहद्रथ ! इ.पू १८५ मध्ये पुष्यमित्र शुंग या ब्राम्हणाने बुध्द धम्माचा विनाश करण्यासाठी मौर्य सम्राट बृहद्रथाचा वध केला आणि ब्राम्हणी सत्ता प्रस्थापित केली.डाॅ.आंबेडकर यांनी स्वच्छंदपणे सांगितले आहे की इ.स.पू १७० ते इ.स.पू १५० या काळात सुमती भार्गवाने मनुस्मृतीची रचना केली आणि आपल्या राज्याचा कायदा म्हणून पुष्पमित्र शुंगाने या मनुस्मृतीला मान्यता प्राप्त करून दिली.डाॅ.आंबेडकर यांनी म्हटले आहे की- " The code known as Manu Smirti was promulgated by Pushyamitra as embodying the principles of Brahmnic Revolution against Buddhist state of the Mauryas"

याचा अर्थ बुध्दाच्या अनुशासनानुसार 

चालणा-या मौर्य साम्राज्याच्या विरूध्द पुष्यमित्राने ब्राम्हणवादाची सांस्कृतिक सत्ता प्रस्थापित करण्यासाठी मनुस्मृतीचा आपल्या राज्याचे धर्मशास्त्र म्हणूनच केवळ नव्हे तर समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र म्हणूनही पुरस्कार केला.

  आज अमेरिका आणि भारत या दोन बलशाली राष्ट्रांतही लोकशाहीच्या -हासाला आरंभ झाला असून,गेल्या चार-पाच वर्षात नागरी स्वातंत्र्याचा संकोच होत आहे.असा "व्ही-डेन" चा अहवालाचा निष्कर्ष आहे उदा.नागरी समाजाच्या हक्कांसाठी,आदिवासींच्या उत्थनासाठी काम करणा-या शेकडो स्वयंसेवी संस्थांची मुस्कटदाबी करण्यात आली आहे, सेवाभावी काम करणा-या संस्थांवर आजवर धर्मांतरांचा आरोप ठेवण्यात येत होता,मात्र तो सिद्ध न झाल्याने 'फेरा' कायद्याचा बडगा उगारून या संस्थांना परदेशातून मिळणारा निधीच गोठवून टाकण्यात आला,दुसरीकडे नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी आवाज उठविणा-यांना अर्बन नक्षलवादी ठरवले गेले.मानवधिकारांसाठी काम करणा-यांवर सरकारी कामात हस्तक्षेप केल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावरही खटले भरले गेले.

  राष्ट्रवादाच्या नावाखाली सुरू झालेली बहुसंख्याकांची धार्मिक कट्टरता,जम्मू-काश्मीरातील जनतेला विश्वासात न घेता करण्यात आलेले त्रिभाजन,बहुमताच्या जोरावर करण्यात आलेले कायदे ,प्रसारमाध्यमांवर अंकुश अशा उदाहरणांची जंत्री या अहवालात आहे.

   अंधभक्तांनो ब्रिटनमधल्या इकाॅनाॅमिस्ट इंटेलिजन्स युनिट या कंपनीने अहवालात म्हटले आहे की,भारताचा लोकशाही इंडेक्स दहा अंकांनी घसरल्याचे म्हटले आहे.याचाच अर्थ असा की,भारताची वाटचाल सदोष लोकशाहीकडे सुरू असल्याचा इशाराही आहे.म्हणून आज संविधानावर अप्रत्यक्षरित्या घाव घालण्यात येत असून ही वाटचाल हुकुमशाही कडे जात आहे याचे सर्वोत्तम साधार व उदाहरण घ्यावयाचे झाल्यास २ वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जनतेसमोर येऊन स्पष्टोक्ती केली की," या देशाची लोकशाही संकटात आहे'.याहून आश्चर्यचकित बाब काय असू शकते?

  डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्माण केले आज ती बदल्याची चाल ही जाणीवपूर्वक एका विशिष्ट समूहाकडून केली जात आहे म्हणून आपल्याला संविधान वाचवणारे हात निर्माण करणे गरजेचे आहे.

   या विविधतेने नटलेल्या भारताला विनाशकारी हुकुमशाहीला रोखण्याचे सामर्थ्य मनुस्मृती मध्ये नसून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या पवित्र संविधानात आहे.

 डाॅ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की " आम्ही जे मनुस्मृतीचे वाचन केले आहे त्यावरून आमची अशी खात्री आहे की,या ग्रंथात शुद्र जातीचा निंदा करणारी,त्यांचा उपमर्द करणारी; कुटाळ उत्पत्तीचा कलंक त्यांच्या माथी मारणारी व त्यांच्याविषयी समाजात अनादर वाढविणारी वचने ओतप्रोत भरलेली आहेत.त्यात धर्माची धारणा नसून,धर्माची विटंबना आहे; आणि समतेचा मागमूस नसून,अस्मितेची धुळवड घातली आहे.स्वयंनिर्णयाचे तत्व प्रस्थापित करावयास निघालेल्या सुधारणावादी यांस असला ग्रंथ कधीच मान्य होणे शक्य नाही व तो अस्पृश्य वर्गासही मान्य नाही एवढेच दर्शविण्याकरिता महाड येथे त्याचा होळी करून ती खाक करण्यात आली( संदर्भ:- रिडल्स इन हिंदूइझम खंड ४)

  यावरून मनुस्मृतीपेक्षा कैक पटीने संविधान श्रेष्ठ आहे.

     तीन टक्के माकडे आर्यवंशीय घोड्यावरून भारतात आहे हे खरे पण जर का संविधानास मानले नाही तर गाढवारून तुम्हांला जिकढून आलात तिकडे पाठविण्यात येईल हे तितकेच खरे.

प्रा.शाहिद शेख

वाचा -

ओवेसी ने दि अमीत शाह को खुली चूनौती....

सूल्तान_महमूद_ग़ज़नवी....

मोगलांचा शासनकाळ व प्रजा....

एम आय एम महाराष्ट्रातील सर्व निवणुका....







No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या