मोगलांचा शासनकाळ व प्रजा - Muzaffar Sayyed

जो चुप रहेगी जुबाने खंजर
लहू पुकारेगा आस्तिका 



मोगलांचा शासनकाळ व प्रजा

ज्या वेळी भारतात मोगलांचा अंमल होता. त्यावेळी धार्मिक सहिष्णुता कशी होती हे आपणास पुढील गोष्टीवरुन कळून येईल. मोगलांच्या काळात शिल्पकलेला फारच महत्व होते. याचेच उदाहरण म्हणून आपण आज मोगल कालीन अनेक वास्तू शिल्प पाहतो. मोगल काळात झालेला शिल्प कलेचा विकास आपण प्रथम पाहू. 

या शिल्पकलेकडे लक्ष वळविले तर यात हिंदू आणि मुसलमान दोन्हीची मिश्रकला असल्याने द्रुष्टीस पडते. हिंदु परंपरेने कल्पनाप्रिय होते तर मुसलमान वास्तवता प्रिय. दोघांच्या विचारसरणी व सवयी वेगवेगळ्या होत्या परंतु जेव्हा ते दोघे परस्परांजवळ आले तेव्हा दोघांच्या संस्कृतीमध्ये एक मनमोहक सामंजस्य निर्माण झाले. हे सामंजस्य मुसलमानांच्या अनेक सुंदर इमारतींच्या रचनेत स्पष्टपणे प्रकट होते आणि अशा प्रकारे हिंदुस्थानच्या सौंदर्यात मोठी भर पडत गेली. ग्वाल्हेरचा महाल, व्रुंदावनचे मंदिर, विजापूरचा गोलघुमट व दिल्लीचा लालकिल्ला इत्यादी याच मिश्र शिल्पकलेची जिवंत स्म्रुतिचिन्हे होत. प्रसिद्ध लेखक डॉ. आबिद हुसैन जामअली यांच्या कथनानुसार हे किल्ले आणि महाल हिंदु आणि मुस्लिम रचना शैलीमधील समन्वय यांची प्रतीक होत. (कौमी तहजीबका मसला', प्रुष्ठ - १४८)

बंगालचे प्रसिद्ध इतिहासकार डॉ. सरजदुनाथ सरकार यांनी या सुवर्णकाळाची समिक्षा करताना लिहिले आहे. 'मुसलमान बादशहांच्या त्या उपकरणांना कसे बरे विसरुन जाता येईल त्यांच्या शुद्ध मनाचे आणि त्यांच्या देशप्रेमाचे पुरावे आहेत. त्यांनी हिंदुस्थानला आपला देश मानले. ते देशाच्या कल्याण, प्रगती व खुशालीने प्रफुल्लित होत असत. त्यांनी विशेषतः देशाला सजविण्यात फार मोठा वाटा उचलला. उत्तम रस्ते बनविले, वार्ता पोचविण्याचे खाते स्थापन केले. जागोजागी चौका उभारल्या, हिंदुस्थानाच्या कानाकोपऱ्यात सुंदर सुंदर उद्याने लावली. प्रजेच्या प्रवास, मनोरंजन व आरोग्यासाठी उत्तम व्यवस्था केली. बेरोजगारी समाप्त करण्यासाठी जागोजागी उद्योगकेंद्रे उघडली व प्रत्येक समाजाला प्रगतीची सुवर्णसंधी उपलब्ध करुन दिली. इस्लामी राज्यात श्रीमंत, गरीब, उच्च - नीच यासारखे भेदभाव नाममात्र होते. मोगल बादशहांनी अस्पृश्यांच्या उत्थानासाठीआणि त्यांना विद्येच्या आभूषणाने सुशोभित करण्यासाठी योग्य व्यवस्था केली आणि त्यांना राज्यकारभारामध्ये समाविष्ट केले.' अशाच प्रकारे एक अन्यविद्वान अँडव्होकेट श्री. तेज बहादूर सिन्हा यांनी 'मुसलमानांनी हिंदुस्थान आणि हिंदू धर्मात ऐक्य निर्माण केले' या मथळ्याने लिहिलेल्या एका लेखात लिहितात.

'मुसलमान बादशहांच्या प्रयत्नाने ब्राम्हणांचा धर्म गुप्त पडद्यातून बाहेर निघाला. वेदाबरोबरच सर्व ग्रंथांचे फारसी भाषेत भाषांतर झाले. जे वाचून हिंदूंमधील सुशिक्षित वर्गाला आपल्या धर्माविषयी ज्ञानप्राप्त झाले. भगवान क्रुष्ण व प्रभू रामाच्या परंपरा रुजल्या. या संदर्भात तत्कालीन गरजांची पूर्तता सुध्दा संत तुळसीदास आणि भक्त सूरदास यांनी मुसलमानांच्याच राज्यकाळात केली व देशात पसरलेल्या सामान्य जणांपैकी एका मोठ्या वर्गात धार्मिक समन्वयाची भावना निर्माण केली. 

(संदर्भ - 'दावत' २२ मे १९६४)

सामाजिक सहिष्णुतेची ही श्रेष्ठ उदाहरणे होत ज्यावरुन मुसलमान शासकांच्या भावना व संवेदनशीलतेची प्रचिती घडते आणि हे लक्षात येते की, ते लोक आपल्या मुस्लिमते प्रजेच्या कल्याण, प्रगती व सुख, सम्रुध्दी तसेच त्यांच्या श्रद्धा व भावनांची किती काळजी घेत असत. अशाच प्रकारे मोगल बादशहांच्या न्याय प्रियतेची काही उज्वल उदाहरणेही पुरावा म्हणून देता येतील.

जहांगीर बादशहाचा शासनकाळ

बादशहा जहांगीरच्या शासनकाळात एकसराय (धर्मशाळा) च्या आचाऱ्याशी संगनमत करुन एक कोतवाल प्रवाशांचा माल बळजबरीने हिरावून घेत असे, जेव्हा जहांगीर बादशाहाला ही गोष्ट कळली तेव्हा त्याने आपल्या एका दरबाऱ्याद्वारे चौकशी करविली. त्या दरबारी व्यक्तीने त्या धर्मशाळेत जाऊन आचाऱ्याला विकण्यासाठी एक अंगठी दिली. जेव्हा कोतवालाला ही गोष्ट कळली तेव्हा तो धावतच आला आणि त्याने त्या दरबारी व्यक्तींवर आरोप केला. 'हे प्रवाशा ही अंगठी चोरीची आहे' प्रवाशाने आपला निर्दोषपणा व्यक्त करताना सांगितले 'हा माल माझा आहे आणि माझ्याजवळ आणखीही दागिने आहेत.' यावर कोतवालाने त्याचे सर्व दागिने बळजबरीने काढून घेतले. या घटनेनंतर जहाँगीरने कोतवालाला शिक्षा केली व त्याला कायमचे बडतर्फ केले. ( हिंदुस्थानपर मुगलिया हुकूमत प्रू. १८७)

जहाँगीरच्या काळातील न्यायाचे हे एकच उदाहरण नव्हे. फिर्याद करणाऱ्या लोकांच्या न्यायाकरिता त्यांच्या महालाची दारे नेहमीच उघडी असत. तो न्यायाच्या बाबतीत कोणत्याही कारणाची अडसर देत नसे. जेव्हा त्याच्या दरबारातील एक प्रसिद्ध सरकार अमीरखान आलमचा पुतण्या खोशिंगखानने काही सामान्य अपराधासाठी एका गरीब माणसाला ठार केले आणि ही बातमी जेव्हा जहाँगीरला कळली तेव्हा त्याने खटल्याच्या सुनावणीनंतर खोशिंगला म्रुत्युदंडाची शिक्षा ठोठावली. इतिहासकाराच्या मते जरी ही शिक्षा तरी देशहिताच्या द्रुष्टीने जहाँगिरने आपला निर्णय बदलला नाही.

आणखी एक घटना एका गरीब म्हातारी आणि बंगालच्या गव्हर्नर सैफुद्दौलाशी संबंधित आहे. एकदा सैफुद्दौला फिरावयास निघाला असताना पदाच्या अहंकारात त्याने जाणून - बुजून त्या म्हातारीच्या मुलाला हत्तीच्या पायाखाली तुडवत निघून गेला. म्हातारीच्या आक्रोशाची त्याने काही पर्वा केली नाही. बादशहाला जेव्हा हे कळले तेव्हा त्याने त्याला दोरीने बांधण्याची आज्ञा दिली. म्हातारा व म्हातारीला एका उन्मत हत्तीवर बसविले गेले व हत्तीला सैफुद्दौलाच्या अंगावरुन चालविले त्यात तो मरण पावला.

या घटने संदर्भात ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, सैफुद्दौला हा बादशहाचा बालपणाचा मित्र होता. बादशहाने आपल्या मित्राचा दफनविधी केला व दोन महिन्यापर्यंत त्याच्या म्रुत्युवर शोक व्यक्त केला. एके दिवशी बादशहाने दरबारात सांगितले 'सैफुद्दौलावर जरी माझे प्रेम होते परंतु बादशहा हा तर न्यायाच्या साखळदंडात जखडलेला असतो. त्याच्यासाठी न्याय करण्याशिवाय अन्य कोणताही उपाय नसतो.

अशाच प्रकारे शहाजहानच्या कारकिर्दीत प्रजेच्या सुरक्षिततेबद्ल विशेष लक्ष पुरविले जात असे. जेव्हा एखाद्या प्रदेशातून सैन्य जात असे तेव्हा तेथील प्रजेच्या सुरक्षिततेची संपूर्ण व्यवस्था केली जात असे. इ. स. १६३३ शहाजान सैन्यानिशी लाहोरला निघाला होता. तेव्हा त्याने तिरंदाजांना मार्गाच्या एका बाजूला आणि बंदुकधारी सैनिकांना दुसऱ्या बाजूला नेमले होते जेणेकरुन शाही फौजेने शेतीचे नुकसान करु नये. तथापि या संचलनात जी थोडी फार हानी होत असे. त्याची नुकसान भरपाई दिली जात असे. 

 मुजफ्फरभाई सय्यद

 कार्याध्यक्ष

 अ. भा. साहित्य कलामंच

 ९९६०३२५०५७

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या