विद्यापीठाची स्थापना व टिपूंचे ग्रंथालय
इतिहास -
मध्ययुगीन काळात शिक्षण हे राजपरिवार आणि अति श्रीमंत वर्गापुरते मर्यादित होते . समाजातील कनिष्ठवर्गीय अपवादात्मक परिस्थितीत शिक्षण घेत. राज दरबारातील अधिकारी आणि उच्च सैनिकी अधिकारी यांच्या कुटुंबीयांनाच शिक्षण सहजतेने मिळत असे. भारतातील इतिहासात काही मोजक्या राजकर्त्यांनी सामान्य रयतेच्या शिक्षणाची व्यवस्था केली होती. अशा राजकर्त्यात टिपू सुलतानाचे नाव अग्रभागी आहे.
टिपूंनी राज्यातील जनतेला शिक्षण मिळावे यासाठी विद्यापीठाची स्थापना केली होती.
सल्तनत ए खुदादादमध्ये निरक्षरांचे प्रमाण अधिक होते. त्यासाठी टिपूने श्रीरंगपट्टणम येथे "जामिआ-अल्-अमूर" या नावाने एक विद्यापीठ स्थापन केले. धार्मिक सामाजिक आणि विविध कलांचे तेथे शिक्षण दिले जात होते. यासाठी तज्ज्ञ शिक्षकांची नेमणूक करण्यात आली होती.
टिपू सुलतान ग्रंथप्रेमी होते. श्रीरंगपट्टणमच्या राजमहालात त्यांचे व्यक्तिगत ग्रंथालय होते. त्या ग्रंथालयात राजकीय, सामाजिक,आर्थिक,सैनिकी शास्त्र,युद्ध शास्त्र,कला,व्यापारी आणि प्रवासवर्णनावर आधारित ग्रंथ होते. त्यांची संख्या तब्बल १ हजार ८८९ इतकी होती. इ.स १७९९ मध्ये टिपू सुलतान शाहिद झाल्यानंतर इंग्रिजांनी त्यांचे राजमहाल लुटून टिपूच्या ग्रंथालयातील पुस्तके ताब्यात घेतल्यानंतर ती पुस्तके कोलकात्याला पाठवली. तेथे फोर्ट विल्यम महाविद्यालय आणि एशियाटिक सोसायटीत ती पुस्तके ठेवण्यात आली.
इ.स १८०३ मध्ये फोर्ट विल्यम महाविद्यालय बंद पडल्यानंतर ही पुस्तके केंब्रिज आणि ऑक्सफर्ड विद्यापीठात पाठवण्यात आली.
इ.स १८०९ मध्ये चार्ल्स स्टुअर्स याने टिपूंच्या ग्रंथालयाविषयी Descripective Catlogue of The Oriental Library of The Late Tipu Sultan of Mysore
या नावाने एक पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यात त्याने टिपूंच्या ग्रंथालयातील काही पुस्तकांची विषयवार सूची दिली आहे.
संदर्भ:- सल्तनत-ए-खुदादाद, लेखक सरफराज अहमद
*टिपू सुलतान ग्रंथालय*
*डेक्कन मराठी*
वाचा -
धर्मनिरपेक्ष, सहिष्णू, अमर शहिद टीपू सुलतान (रह.)...
No comments:
Post a Comment