Showing posts with label ARTILCES. Show all posts
Showing posts with label ARTILCES. Show all posts

महातमा फुल्यांच्या विचारांची फुलबाग फुलवा - MUZAFFAR SAYYED

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

 महातमा  फुल्यांच्या विचारांची फुलबाग फुलवा 



 "विषारी ते वेद, अज्ञान्या डसती
 बिळात पळती, सर्पावत"

हा म. फुले ह्या महाकवीचा, मराठी आधुनिक कवितेच्या जनकाचा *'अखंड'* आहे. ही रचना अभंगासारखी वाटत असली तरी हा अभंग नाही. भक्तीचे स्तोम माजवून बहुजनांना वेडे करण्याचा म. फुलेंचा दुष्ट विचार नव्हता. त्यांनी जाणिवपूर्वक आपण सामाजिक आशयाची कविता (अखंड) लिहित आहोत, हे दाखवून दिले. आकाशातील कवितेला म. फुल्यांनी जमिनीवर आणले. त्यांनी माणसांची, माणसांसाठी व माणुसकीची प्रथम कविता मराठीत लिहिली. मराठी कवितेला आशय व अभिव्यक्तीच्या दोन्ही अंगाने आधुनिक साज चढविला. वरील त्यांचा एकच *'अखंड'* स्पष्टीकरणासाठी पुरेसा आहे.

म. फुल्यांनी वेद संस्कृतीवर प्रखर हल्ले चढविले. ब्राह्मण वर्गाने ज्या वेदांना पुजनीय मानले, वेदांच्या आधारे चातुर्वर्ण्यव्यवस्था प्रस्थापित केली त्या वेदांनाच म. फुले यांनी केवळ नाकारले नाही तर त्यांना विषारी सर्पाची उपमा दिली. वेदांमध्ये जातियतेचे, विषमतेचे विष भरलेले आहे. ब्राह्मण वर्ग ज्या वेदांचे भांडवल करुन हजारो वर्षे देशातील बहुजनांवर राज्य करीत होता, त्या त्यांच्या जगण्याच्या भांडवलालाच म. फुल्यांनी विषारी साप म्हणावे, यालाच क्रांती म्हणतात.

म. फुल्यांनी १९ व्या शतकात येथील विषारी व्यवस्थेविरुद्ध युद्ध पुकारले होते. येथील ब्राम्हणांनी धर्माचा दुरुपयोग केला, धंदा केला व बहुजनांना गुलाम करुन वागविले म्हणून त्यांनी ब्राम्हणांवर जहरी टीका केली. तशी ती करणे काळाची गरज होती. कोणी तरी हे करणे गरजेचेच होते. फुल्यांनी तो धीटपणा दाखविला, म्हणून फुले आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार ठरतात.

सन १८१८ साली पेशवाई बुडाली. पुण्याच्या शनिवार वाड्यावर ब्रिटिशांचा ध्वज फडकला. पेशवाई बुडाली याचे दु:ख महाराष्ट्रातील ब्राम्हणांना होणे स्वाभाविकच होते. पण पुरा महाराष्ट्र आनंदित झाला होता. ब्रिटिशांची गुलामगिरी सुरु झाल्याने महाराष्ट्र आनंदीत झाला नव्हता तर पेशव्यांच्या अमानुष गुलामगिरीतून मुक्तता झाली म्हणून महाराष्ट्राने आनंदोत्सव साजरा केला होता. तरीही धार्मिक - सांस्कृतिक गुलामीत महाराष्ट्र अडकूनच पडलेला होता. अशा काळात म्हणजे पेशवाईचा अंत झाल्यानंतर सन १८२७ मध्ये म. फुले ह्या युगपुरुषाचा जन्म झाला.

महाराष्ट्रात धर्मसत्तेचा प्रभाव जीवनातील सर्वच क्षेत्रावर पडलेला होता. त्या धर्माची उपनामे पहा............................

१) पत्नी धर्म

२) सेवक धर्म

३) राज धर्म

४) कुल धर्म

५) वर्ण धर्म

६) व्यवसाय धर्म

 १) पत्नी धर्म :- महिला ही गुलामच होती. मनुस्मृतीने तिला पुरुषांच्या तुरुंगात कैद करुन ठेवलेले. पत्नीने नवऱ्याची मरेपर्यंत सेवा करायची, हा पत्नीधर्म अस्तित्वात होता. तिने नवऱ्याला पतीदेव म्हणायचे. येथील ब्राह्मण संस्कृतीने स्त्रीला कायमची गुलाम केले होते.

म. फुल्यांनी प्रचलित धर्माचा अर्थच बदलून टाकला. हीच त्यांची क्रांती होती. स्त्रीला पुरुषांइतकेच स्थान असले पाहिजे, हा स्त्री - पुरुष समानतेचा सिध्दांन्त महाराष्ट्रात प्रथम फुल्यांनी मांडला. महाराष्ट्रात बोलके सुधाकर खूप झाले. ते सर्वच ब्राह्मण वर्गातले होते. ब्राह्मण समाज सुधारकांची समाज - सुधारणा आपल्या घराबाहेर असायची, घरात नसायची. समाजसुधारक आगरकरांची पत्नी कुठे होती ? न्या. रानड्यांची पत्नी कुठे होती ? यांची तर कुणाला नावेही माहीत नाहीत. परंतु म. फुल्यांच्या पत्नीचे म्हणजे सावित्रीमाईचे नाव आजही अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे. म. फुल्यांनी प्रथम आपल्या पत्नीलाच शिकवून स्त्री - शिक्षणाचा प्रारंभ केला. सावित्रीमाई शिकल्या व शिक्षिका झाल्या.महाराष्ट्रातील आद्य शिक्षिकेचा मान त्यांनाच द्यावा लागतो. ज्या ब्राह्मण समाजातील काही महिलांची नावे सतत आज पुढे केली जातात, आम्ही विचारतो सावित्रीमाई नसत्या तर ह्या कुठे असत्या ? सावित्रीमाई नसत्या तर पंडिता रमाबाई, आनंदीबाई जोशी, काशीबाई कानेटकर, लक्ष्मीबाई टिळक, दुर्गा भागवत ह्या महिला निर्माणच झाल्या नसत्या. पत्नीधर्म सांभाळत चुली फुंकत राहिल्या असत्या व मुलांचे लेंढार सांभाळत राहिल्या असत्या.

 २) सेवक धर्म :- आपल्याशिवाय सर्वच जातीचे लोक आपले सेवक आहेत, त्यांनी आपली सेवा केली पाहिजे, असे दंडक धर्मग्रंथात ब्राम्हणांनी लिहून ठेऊन *'सेवक धर्म'* बहुजनांवर लादला. क्षत्रियांना त्यांनी आपले रक्षण करण्यास सांगितले. तो त्यांचा *'सेवक-धर्म'* . वैश्यांना व्यापार करायला लावून आपली मिरचीची (संसाराची) सोय ब्राम्हणांनी करुन ठेवली. क्षत्रिय राजांना सुध्दा आपल्या सेवेची ब्राम्हणांविषयीची कर्तव्ये लिहून ठेवली आणि ८५ टक्के बहुजन समाजाला शुद्र अतिशुद्रांच्या यादीत टाकून त्यांना तर गुलामच केले. म. फुल्यांनी हे 'ब्राम्हणांचे कसब' ओळखले व ह्याच नावाचा ग्रंथ लिहून जगासमोर ठेवला. ब्राम्हणांचा *'सेवक धर्म'* नाकारण्याचे बहुजनांना म. फुल्यांनी जाहीर आवाहनच केले.

३) राजधर्म :- राजाने राजा म्हणून राज्य करताना स्वबुध्दीने राज्यकारभार करु नये. धर्मग्रंथात म्हटले आहे त्याच पध्दतीने राजाने राज्यकारभार करावा, हे सर्व दंडक हुशार ब्राम्हणांनी धर्मग्रंथात लिहून ठेऊन राजांनाही गुलाम केले.

महाराष्ट्रात ब्राम्हणांच्या धर्मसत्तेचा अंमल जो हजारो वर्षे चालू होता, तो प्रथम फुल्यांच्या लक्षात आला नि त्यांनी धर्मसत्तेविरुध्द युध्दच पुकारले. म. फुल्यांनी देव - भक्त यांच्या मधील ब्राह्मण नामक दलाल नाकारला. ही फार मोठी क्रांती होती. फुल्यांची क्रांती आजही बहुजन वर्गाला अजिबात कळली नाही. आजही बहुजन वर्गाचे ब्राम्हणांशिवाय पान हालत नाही. प्रत्येक धार्मिक विधीसाठी त्यांना ब्राम्हणच लागतो. देवळातील पुजारी, सत्य नारायणाची पूजा करणारा भटजी, लग्न लावणारा भटजी हाच खरा दलाल असल्याचे म. फुले उघडपणे सांगायचे व ह्या दलालांना दूर ठेवा, असेही बेधडकपणे बोलायचे, लिहायचे. धर्माच्या ठेकेदारांचा ठेकाच त्यांनी नाकारला. हीच त्यांची क्रांती होती.

म. फुल्यांनी कधीही देवाला देव म्हटले नाही. त्यांनी विश्वनिर्मात्या निसर्गाला *'निर्मिक'* म्हटले. *'निर्मिक'* हा शब्द खूप जाणीवपूर्वक त्यांनी निर्माण केला. परंतु ब्राम्हणांनी येथील ९० टक्के लोकांच्या डोक्यात ३३ कोटी देव इतके फिट करुन ठेवलेत की ते कधीच डोक्याबाहेर जाणारच नाहीत. क्रांतिकारकांचा पराभव करण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. देव संकल्पना येथील लोकांच्या मनाच्या पाटीवरुन पुसलीच जाणार नाही. हिंदूधर्म सत्तेचा अंमल अबाधित आहे. दररोज एक मंदिर भारतात बांधले जाते. मंदिरे ही ब्राम्हणांची पैसे कमविण्याची बाजारपेठ आहे. धंदा तेजीत आहे. संत रामदासांनी महाराष्ट्रात मंदिरे बांधण्याची मोहिम सुरु केली. आध्यात्माचा धंदा खरा तर त्यांनीच तेजीत आणला. ह्या धार्मिक बाजारपेठेचा पहिला व्यापारी रामदासच होते. त्यांना पक्के माहित असावे की, येथे धर्मवेडे लोकच जास्त आहेत, तेच आपले गिऱ्हाईक आहेत. त्यांनी श्लोक रचले. त्यातून समाजाला सज्ञान करण्याऐवजी अज्ञानीच ठेवले. ते म्हणायचे, *'जगी सर्व सुखी असा कोण आहे ?'* 

आजही लोकांना हा प्रश्न खरा वाटतो. म. फुल्यांचा यावर आक्षेप होता. ते म्हणत असत की, जगात कोणी सुखी नाही असा जगाविषयी, जीवनाविषयी तुच्छतेचा व नकारात्मक भाव रामदासांनी सांगून बहुजनांची बौद्धिक फसवणूक केली. जगात कोणीच सुखी नाही, असे सांगताना रामदासांना असेही सांगायचे आहे की, जगात सर्वच दु:खी आहेत, तुम्हीही दु:खातच राहा. म. फुल्यांनी रामदासांचा सुखाचा चुकीचा सिध्दांतच नाकारला. ही त्यांची क्रांती होती. पण त्यांच्या क्रांतीचा अर्थ आजही बहुजनांना कळला नाही. फुल्यांना लोक विसरले. रामदास घराघरात जीवंत आहेत. कोणी धर्माधिकारी नावाच्या माणसाने बैठका नावाचा प्रकार सुरु केला. अवघा महाराष्ट्र वेडा झालाय. लोक कामंधामं सोडून बैठकांना जातात. त्या बैठकीत रामदास शिकविला जातो. रामदास अवतारी पुरुष होता, असे बिंबवले जाते. रामदासाचा दासबोध घराघरात हळद-अबीर-गुलाल-फुलांनी पुजला जातो. ब्राम्हणांचा आध्यात्मिक धंदा आजही जोरात चालू आहे. येथे क्रांतिकारक म. फुले वेडे ठरले. कोणालाच म. फुले नको आहेत. आज ज्यांना म. फुले जीवंत ठेवायचे असेल त्यांनी घराघरात म. फुल्यांचा *'ब्राम्हणांचे कसब'* ग्रंथ ठेवावा. त्याचे पारायण करावे. रामदासांचे श्लोक म्हणण्याऐवजी म. फुल्यांचे *'अखंड'* वाचावेत. ते अखंड खंड न पाडता वाचावेत. म. फुल्यांचे *' त्रुतीय रत्न'* नाटक रंगभूमीवर आणा. ते नाटक बहुजन वर्गातील प्रत्येक स्त्री - पुरुषांनी पाहावे. पुन्हा पुन्हा पहावे. फुल्यांची विचारांची फुलबाग फुलवा, इतकीच आपणा सर्वांना प्रार्थना.

मुजफ्फरभाई सय्यद

कार्याध्यक्ष

अ. भा. साहित्य कलामंच

 ९९६०३२५०५७

वाचा - 

महात्मा फुल्यांनी पैगंबरांवर लिहिलेला पोवाडा - MAHATMA PHULE...

सूल्तान_महमूद_ग़ज़नवी - Mahemood Gajnavi.....

मोगलांचा शासनकाळ व प्रजा - Muzaffar Sayyed .....

इतिहास किती विक्रुत कराल ?....

संविधान भारताचा आत्मा आहे -Shahid Shaikh

 संविधान भारताचा आत्मा आहे - शाहीद शेख

    


     भारतीय संविधानाचे शिल्पकार क्रांतिनायक डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ ला मनुस्मृती जाहिरपणे जाळली आणि २६ जानेवारी १९५० रोजी या मनुस्मृतीला भारतीय संविधान हा पर्याय दिला.

   जगभरातील लोकशाही राष्ट्रांचा अभ्यास करून त्या त्या राष्ट्रांतील लोकशाही सरासरी पातळी मोजणारा स्वीडनमधील व्ही-डेन या जगविख्यात संशोधन संस्थेचा अहवाल नुकताच प्रकाशित झाला आहे.

"व्ही-डेन" ही स्वीडनमधील

गोथेनबर्ग या विद्यापीठातील एक संशोधक शाखा असून,२०११ पासून ही संस्था लोकशाही राष्ट्रांतील नागरिकांचे हक्क,अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा अभ्यास करते आहे.या संस्थेच्या अहवालाची जागतिक पातळीवर गंभीरतापूर्वक दखल घेतली जाते; मात्र आपल्या देशातील मुख्य प्रवाहातल्या माध्यमांनी या अहवालाकडे डोळेझाक केल्याने सामाजिक आणि राजकीय पातळीवर चर्चाच झाली नाही.अहवालातील निष्कर्ष धक्कादायक असून,त्याची सुरवातच प्ररसारमाध्यमांपासून होते,म्हणून कदाचित माध्यमांनी हा अहवाल दुर्लक्षिला असू शकतो.

   बरे असो, ही एक जाणिवपूर्वक मोहक अशी चाल आहे ज्याचे सत्तारूढ वर्णवर्चस्ववादी सारथी आहेत.

  सम्राट अशोकाचा नातू बृहद्रथ ! इ.पू १८५ मध्ये पुष्यमित्र शुंग या ब्राम्हणाने बुध्द धम्माचा विनाश करण्यासाठी मौर्य सम्राट बृहद्रथाचा वध केला आणि ब्राम्हणी सत्ता प्रस्थापित केली.डाॅ.आंबेडकर यांनी स्वच्छंदपणे सांगितले आहे की इ.स.पू १७० ते इ.स.पू १५० या काळात सुमती भार्गवाने मनुस्मृतीची रचना केली आणि आपल्या राज्याचा कायदा म्हणून पुष्पमित्र शुंगाने या मनुस्मृतीला मान्यता प्राप्त करून दिली.डाॅ.आंबेडकर यांनी म्हटले आहे की- " The code known as Manu Smirti was promulgated by Pushyamitra as embodying the principles of Brahmnic Revolution against Buddhist state of the Mauryas"

याचा अर्थ बुध्दाच्या अनुशासनानुसार 

चालणा-या मौर्य साम्राज्याच्या विरूध्द पुष्यमित्राने ब्राम्हणवादाची सांस्कृतिक सत्ता प्रस्थापित करण्यासाठी मनुस्मृतीचा आपल्या राज्याचे धर्मशास्त्र म्हणूनच केवळ नव्हे तर समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र म्हणूनही पुरस्कार केला.

  आज अमेरिका आणि भारत या दोन बलशाली राष्ट्रांतही लोकशाहीच्या -हासाला आरंभ झाला असून,गेल्या चार-पाच वर्षात नागरी स्वातंत्र्याचा संकोच होत आहे.असा "व्ही-डेन" चा अहवालाचा निष्कर्ष आहे उदा.नागरी समाजाच्या हक्कांसाठी,आदिवासींच्या उत्थनासाठी काम करणा-या शेकडो स्वयंसेवी संस्थांची मुस्कटदाबी करण्यात आली आहे, सेवाभावी काम करणा-या संस्थांवर आजवर धर्मांतरांचा आरोप ठेवण्यात येत होता,मात्र तो सिद्ध न झाल्याने 'फेरा' कायद्याचा बडगा उगारून या संस्थांना परदेशातून मिळणारा निधीच गोठवून टाकण्यात आला,दुसरीकडे नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी आवाज उठविणा-यांना अर्बन नक्षलवादी ठरवले गेले.मानवधिकारांसाठी काम करणा-यांवर सरकारी कामात हस्तक्षेप केल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावरही खटले भरले गेले.

  राष्ट्रवादाच्या नावाखाली सुरू झालेली बहुसंख्याकांची धार्मिक कट्टरता,जम्मू-काश्मीरातील जनतेला विश्वासात न घेता करण्यात आलेले त्रिभाजन,बहुमताच्या जोरावर करण्यात आलेले कायदे ,प्रसारमाध्यमांवर अंकुश अशा उदाहरणांची जंत्री या अहवालात आहे.

   अंधभक्तांनो ब्रिटनमधल्या इकाॅनाॅमिस्ट इंटेलिजन्स युनिट या कंपनीने अहवालात म्हटले आहे की,भारताचा लोकशाही इंडेक्स दहा अंकांनी घसरल्याचे म्हटले आहे.याचाच अर्थ असा की,भारताची वाटचाल सदोष लोकशाहीकडे सुरू असल्याचा इशाराही आहे.म्हणून आज संविधानावर अप्रत्यक्षरित्या घाव घालण्यात येत असून ही वाटचाल हुकुमशाही कडे जात आहे याचे सर्वोत्तम साधार व उदाहरण घ्यावयाचे झाल्यास २ वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जनतेसमोर येऊन स्पष्टोक्ती केली की," या देशाची लोकशाही संकटात आहे'.याहून आश्चर्यचकित बाब काय असू शकते?

  डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्माण केले आज ती बदल्याची चाल ही जाणीवपूर्वक एका विशिष्ट समूहाकडून केली जात आहे म्हणून आपल्याला संविधान वाचवणारे हात निर्माण करणे गरजेचे आहे.

   या विविधतेने नटलेल्या भारताला विनाशकारी हुकुमशाहीला रोखण्याचे सामर्थ्य मनुस्मृती मध्ये नसून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या पवित्र संविधानात आहे.

 डाॅ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की " आम्ही जे मनुस्मृतीचे वाचन केले आहे त्यावरून आमची अशी खात्री आहे की,या ग्रंथात शुद्र जातीचा निंदा करणारी,त्यांचा उपमर्द करणारी; कुटाळ उत्पत्तीचा कलंक त्यांच्या माथी मारणारी व त्यांच्याविषयी समाजात अनादर वाढविणारी वचने ओतप्रोत भरलेली आहेत.त्यात धर्माची धारणा नसून,धर्माची विटंबना आहे; आणि समतेचा मागमूस नसून,अस्मितेची धुळवड घातली आहे.स्वयंनिर्णयाचे तत्व प्रस्थापित करावयास निघालेल्या सुधारणावादी यांस असला ग्रंथ कधीच मान्य होणे शक्य नाही व तो अस्पृश्य वर्गासही मान्य नाही एवढेच दर्शविण्याकरिता महाड येथे त्याचा होळी करून ती खाक करण्यात आली( संदर्भ:- रिडल्स इन हिंदूइझम खंड ४)

  यावरून मनुस्मृतीपेक्षा कैक पटीने संविधान श्रेष्ठ आहे.

     तीन टक्के माकडे आर्यवंशीय घोड्यावरून भारतात आहे हे खरे पण जर का संविधानास मानले नाही तर गाढवारून तुम्हांला जिकढून आलात तिकडे पाठविण्यात येईल हे तितकेच खरे.

प्रा.शाहिद शेख

वाचा -

ओवेसी ने दि अमीत शाह को खुली चूनौती....

सूल्तान_महमूद_ग़ज़नवी....

मोगलांचा शासनकाळ व प्रजा....

एम आय एम महाराष्ट्रातील सर्व निवणुका....







डॉ कुणाल खरात होंगे एम आय एम के उमिदवार - AIMIM Election Dr Kunal Kharat

पदवीधर मतदार संघ मराठवाडा एम आय एम के उमिदवार होंगे डॉ कुणाल खरात 


औरंगाबाद -
 महाराष्ट्र के कई विधान परिषद की जगाह पर मतदान होना हैं. मराठवाडा पदवीधर विधान परिषद पर चूनाव होने है. सभी पार्टी अपने उमिदवार मैदान मे उतारणे की तैयारी कर रही है. बिहार की सफलता के बाद अब एम आय एम महाराष्ट्र विधान परिषद चूनावमे अपनी ताकत अजमाने वाली है. 
मराठवाडा पदवीधर चूनाव मे एम आय एम महाराष्ट्र विद्यार्थी परदेश अध्यक्ष डॉ कुणाल खरात को अपना उमिदवार घोषीत किया हैं. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील सहाब और प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी साहाब ने बैठक बुलाकर ये एलन किया है की औरंगाबाद विधानपरिषद पदवीधर चुनाव मे अब एम आय एम अपना उमिदवार देणे वाले है.
हाल्ही मे एम आय एम की बैठक औरंगाबाद के कार्यालय मे हुई जिसमे प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील, प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफ्फर कादरी, विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष डॉ कुणाल खरात, औरंगाबाद एम आय एम नगरसेवक और कार्यकर्ते हजारो की तदात मे मौजुद थे.

वाचा-


शिक्षण दिवस के मौकेपर मौलाना आझाद का बयान - MAULANA AZAD

 भारत के पहेले शिक्षण मंत्री - मौलाना अबुल कलाम आझाद 

देश -

    ये स्पीच है मौलाना अबुल कलाम आज़ाद की. जो 1947 में बकरीद के मौके पर दिल्ली की जामा मस्जिद में दी गई. उन्होंने आज़ादी मिलने पर मुसलमानों को उस वक़्त ख़िताब किया. लेकिन उनकी ये बातें पढ़कर ऐसा लगता है जैसे अभी के लिए कही हैं. 

    अबुल कलाम 11 नवंबर 1888 को सऊदी अरब के मक्का में पैदा हुए थे. 22 फ़रवरी 1958 को इस दुनिया से रुखसत हो गए. इस स्पीच (बयान) को अमेरिकन स्कॉलर चौधरी मोहम्मद नईम ने उर्दू में तहरीर किया है. आप इसे हिंदी में पढ़िए. और हर मुसलमान को पढ़नी चाहिए. जो हालत आजतक मुसलमानों के बने हुए हैं वो खुद के बनाये हुए हैं. ये स्पीच बताती है कि जब तक हम खुद को नहीं बदलेंगे, कुछ नहीं हो सकता. चाहे कितनी ही सच्चर रिपोर्टें आती रहें. नेता आते रहें. कोई फर्क नहीं पड़ेगा. तो पढ़िए और सोचिए.  

    मेरे अज़ीज़ो! आप जानते हैं कि वो कौनसी ज़ंजीर है जो मुझे यहां ले आई है. मेरे लिए शाहजहां की इस यादगार मस्जिद में ये इज्तमा नया नहीं. मैंने उस ज़माने में भी किया. अब बहुत सी गर्दिशें बीत चुकी हैं. मैंने जब तुम्हें ख़िताब किया था, उस वक्त तुम्हारे चेहरों पर बेचैनी नहीं इत्मीनान था. तुम्हारे दिलों में शक के बजाए भरोसा था. आज जब तुम्हारे चेहरों की परेशानियां और दिलों की वीरानी देखता हूं तो भूली बिसरी कहानियां याद आ जाती हैं.

    तुम्हें याद है? मैंने तुम्हें पुकारा और तुमने मेरी ज़बान काट ली. मैंने क़लम उठाया और तुमने मेरे हाथ कलम कर दिए. मैंने चलना चाहा तो तुमने मेरे पांव काट दिए. मैंने करवट लेनी चाही तो तुमने मेरी कमर तोड़ दी. हद ये कि पिछले सात साल में तल्ख़ सियासत जो तुम्हें दाग़-ए-जुदाई दे गई है. उसके अहद-ए शबाब (यौवनकाल, यानी शुरुआती दौर) में भी मैंने तुम्हें ख़तरे की हर घड़ी पर झिंझोड़ा. लेकिन तुमने मेरी सदा (मदद के लिए पुकार) से न सिर्फ एतराज़ किया बल्कि गफ़लत और इनकारी की सारी सुन्नतें ताज़ा कर दीं. नतीजा मालूम ये हुआ कि आज उन्हीं खतरों ने तुम्हें घेर लिया. जिनका अंदेशा तुम्हें सिरात-ए-मुस्तक़ीम (सही रास्ते ) से दूर ले गया था.

    सच पूछो तो अब मैं जमूद (स्थिर) हूं. या फिर दौर-ए-उफ़्तादा (हेल्पलेस) सदा हूं. जिसने वतन में रहकर भी गरीब-उल-वतनी की जिंदगी गुज़ारी है. इसका मतलब ये नहीं कि जो मक़ाम मैंने पहले दिन अपने लिए चुन लिया, वहां मेरे बाल-ओ-पर काट लिए गए या मेरे आशियाने के लिए जगह नहीं रही. बल्कि मैं ये कहना चाहता हूं. मेरे दामन को तुम्हारी करगुज़ारियों से गिला है. मेरा एहसास ज़ख़्मी है और मेरे दिल को सदमा है. सोचो तो सही तुमने कौन सी राह इख़्तियार की? कहां पहुंचे और अब कहां खड़े हो? क्या ये खौफ़ की ज़िंदगी नहीं. और क्या तुम्हारे भरोसे में फर्क नहीं आ गया है. ये खौफ तुमने खुद ही पैदा किया है.

    अभी कुछ ज़्यादा वक़्त नहीं बीता, जब मैंने तुम्हें कहा था कि दो क़ौमों का नज़रिया मर्ज़े मौत का दर्जा रखता है. इसको छोड़ दो. जिनपर आपने भरोसा किया, वो भरोसा बहुत तेज़ी से टूट रहा है, लेकिन तुमने सुनी की अनसुनी सब बराबर कर दी. और ये न सोचा कि वक़्त और उसकी रफ़्तार तुम्हारे लिए अपना वजूद नहीं बदल सकते. वक़्त की रफ़्तार थमी नहीं. तुम देख रहे हो. जिन सहारों पर तुम्हार भरोसा था. वो तुम्हें लावारिस समझकर तक़दीर के हवाले कर गए हैं. वो तक़दीर जो तुम्हारी दिमागी मंशा से जुदा है.

    अंग्रेज़ों की बिसात तुम्हारी ख्वाहिशों के ख़िलाफ़ उलट दी गई. और रहनुमाई के वो बुत जो तुमने खड़े किए थे. वो भी दगा दे गए. हालांकि तुमने सोचा था ये बिछाई गई बिसात हमेशा के लिए है और उन्हीं बुतों की पूजा में तुम्हारी ज़िंदगी है. मैं तुम्हारे ज़ख्मों को कुरेदना नहीं चाहता और तुम्हारे इज़्तिराब (बेचैनी) में मज़ीद इज़ाफा करना मेरी ख्वाहिश नहीं है. लेकिन अगर कुछ दूर माज़ी (पास्ट) की तरफ पलट जाओ तो तुम्हारे लिए बहुत से गिरहें खुल सकती हैं.

    एक वक़्त था कि मैंने हिंदुस्तान की आज़ादी का एहसास दिलाते हुए तुम्हें पुकारा था. और कहा था कि जो होने वाला है उसको कोई कौम अपनी नहुसियत (मातम मनाने वाली स्थिति) से रोक नहीं सकती. हिंदुस्तान की तक़दीर में भी सियासी इंक़लाब लिखा जा चुका है. और उसकी गुलामी की जंजीरें 20वीं सदी की हवाएं हुर्रियत से कट कर गिरने वाली हैं. और अगर तुमने वक़्त के पहलू-बा-पहलू क़दम नहीं उठाया तो फ्यूचर का इतिहासकार लिखेगा कि तुम्हारे गिरोह ने, जो सात करोड़ मुसलमानों का गोल था. मुल्क की आज़ादी में वो रास्ता इख्तियार किया जो सफहा हस्ती से ख़त्म हो जाने वाली कौमों का होता है. आज हिंदुस्तान आज़ाद है. और तुम अपनी आंखों से देख रहे हो वो सामने लालकिला की दीवार पर आज़ाद हिंदुस्तान का झंडा शान से लहरा रहा है. ये वही झंडा है जिसकी उड़ानों से हाकिमा गुरूर के दिल आज़ाद कहकहे लगाते थे.

    ये ठीक है कि वक़्त ने तुम्हारी ख्वाहिशों के मुताबिक अंगड़ाई नहीं ली बल्कि उसने एक कौम के पैदाइशी हक़ के एहतराम में करवट बदली है. और यही वो इंकलाब है, जिसकी एक करवट ने तुम्हें बहुत हद तक खौफजदा कर दिया है. तुम ख्याल करते हो तुमसे कोई अच्छी शै (चीज़) छिन गई है और उसकी जगह कोई बुरी शै आ गई है. हां तुम्हारी बेक़रारी इसलिए है कि तुमने अपने आपको अच्छी शै के लिए तैयार नहीं किया था. और बुरी शै को अपना समझ रखा था. मेरा मतलब गैरमुल्की गुलामी से है. जिसके हाथों तुमने मुद्दतों खिलौना बनकर जिंदगी बसर की. एक वक़्त था जब तुम किसी जंग के आगाज़ की फिक्र में थे. और आज उसी जंग के अंजाम से परेशान हो.आखिर तुम्हारी इस हालत पर क्या कहूं. इधर अभी सफर की जुस्तजू ख़त्म नहीं हुई और उधर गुमराही का ख़तरा भी दर पेश आ गया.

    मेरे भाई मैंने हमेशा सियासत की ज्यादतियों से अलग रखने की कोशिश की है. कभी इस तरफ कदम भी नहीं उठाया. क्योंकि मेरी बातें पसंद नहीं आती. लेकिन आज मुझे जो कहना है उसे बेरोक होकर कहना चाहता हूं. हिंदुस्तान का बंटवारा बुनियादी तौर पर गलत था. मज़हबी इख्तिलाफ़ को जिस तरह से हवा दी गई उसका नतीजा और आसार ये ही थे जो हमने अपनी आंखों से देखे. और बदकिस्मती से कई जगह पर आज भी देख रहे हैं.

    पिछले सात बरस के हालात दोहराने से कोई फायदा नहीं. और न उससे कोई अच्छा नतीजा निकलने वाला है. अलबत्ता मुसलमानों पर जो मुसीबतों का रैला आया है वो यक़ीनन मुस्लिम लीग की ग़लत क़यादत का नतीजा है. ये सब कुछ मुस्लिम लीग के लिए हैरत की बात हो सकती है. मेरे लिए इसमें कुछ नई बात नहीं है. मैं पहले से ही इस नतीजे का अंदाजा था.

    अब हिंदुस्तान की सियासत का रुख बदल चुका है. मुस्लिम लीग के लिए यहां कोई जगह नहीं है. अब ये हमारे दिमागों पर है कि हम अच्छे अंदाज़-ए-फ़िक्र में सोच भी सकते हैं या नहीं. इसी ख्याल से मैंने नवंबर के दूसरे हफ्ते में हिंदुस्तान के मुसलमान रहनुमाओं को देहली में बुलाने का न्योता दिया है. मैं तुमको यकीन दिलाता हूं. हमको हमारे सिवा कोई फायदा नहीं पहुंचा सकता.

    मैंने तुम्हें हमेशा कहा और आज फिर कहता हूं कि नफरत का रास्ता छोड़ दो. शक से हाथ उठा लो. और बदअमली को तर्क (त्याग) दो. ये तीन धार का अनोखा खंजर लोहे की उस दोधारी तलवार से तेज़ है, जिसके घाव की कहानियां मैंने तुम्हारे नौजवानों की ज़बानी सुनी हैं. ये फरार की जिंदगी, जो तुमने हिजरत (पलायन) के नाम पर इख़्तियार की है. उसपर गौर करो. तुम्हें महसूस होगा कि ये ग़लत है.

    अपने दिलों को मज़बूत बनाओ और अपने दिमागों को सोचने की आदत डालो. और फिर देखो ये तुम्हारे फैसले कितने फायदेमंद हैं. आखिर कहां जा रहे हो? और क्यों जा रहे हो? ये देखो मस्जिद की मीनारें तुमसे उचक कर सवाल कर रही हैं कि तुमने अपनी तारीख के सफ़हात को कहां गुम कर दिया है? अभी कल की बात है कि यही जमुना के किनारे तुम्हारे काफ़िलों ने वज़ू (नमाज़ से पहले मुंह हाथ धोने का प्रोसेस) किया था. और आज तुम हो कि तुम्हें यहां रहते हुए खौफ़ महसूस होता है. हालांकि देल्ही तुम्हारे खून की सींची हुई है.

     अज़ीज़ों! अपने अंदर एक बुनियादी तब्दीली पैदा करो. जिस तरह आज से कुछ अरसे पहले तुम्हारे जोश-ओ-ख़रोश बेजा थे. उसी तरह से आज ये तुम्हारा खौफ़ बेजा है. मुसलमान और बुज़दिली या मुसलमान और इश्तआल (भड़काने की प्रक्रिया) एक जगह जमा नहीं हो सकते. सच्चे मुसलमान को कोई ताक़त हिला नहीं सकती है. और न कोई खौफ़ डरा सकता है. चंद इंसानी चेहरों के गायब हो जाने से डरो नहीं. उन्होंने तुम्हें जाने के लिए ही इकट्ठा किया था. आज उन्होंने तुम्हारे हाथ में से अपना हाथ खींच लिया है तो ये ताज्जुब की बात नहीं है. ये देखो तुम्हारे दिल तो उनके साथ रुखसत नहीं हो गए. अगर अभी तक दिल तुम्हारे पास हैं तो उनको अपने उस ख़ुदा की जलवागाह बनाओ.

    मैं क़लाम में तकरार का आदी नहीं हूं लेकिन मुझे तुम्हारे लिए बार-बार कहना पड़ रहा है. तीसरी ताक़त अपने घमंड की गठरी उठाकर रुखसत हो चुकी है. और अब नया दौर ढल रहा है. अगर अब भी तुम्हारे दिलों का मामला बदला नहीं और दिमागों की चुभन ख़त्म नहीं हुई तो फिर हालत दूसरी होगी. लेकिन अगर वाकई तुम्हारे अंदर सच्ची तब्दीली की ख्वाहिश पैदा हो गई है तो फिर इस तरह बदलो, जिस तरह तारीख (इतिहास) ने अपने को बदल लिया है. आज भी हम एक दौरे इंकलाब को पूरा कर चुके, हमारे मुल्क की तारीख़ में कुछ सफ़हे (पन्ने) ख़ाली हैं. और हम उन सफ़हो में तारीफ़ के उनवान (हेडिंग) बन सकते हैं. मगर शर्त ये है कि हम इसके लिए तैयार भी हो.

    अज़ीज़ों, तब्दीलियों के साथ चलो. ये न कहो इसके लिए तैयार नहीं थे, बल्कि तैयार हो जाओ. सितारे टूट गए, लेकिन सूरज तो चमक रहा है. उससे किरण मांग लो और उस अंधेरी राहों में बिछा दो. जहां उजाले की सख्त ज़रुरत है.

    मैं तुम्हें ये नहीं कहता कि तुम हाकिमाना इक्तेदार के मदरसे से वफ़ादारी का सर्टिफिकेट हासिल करो. मैं कहता हूं कि जो उजले नक्श-ओ-निगार तुम्हें इस हिंदुस्तान में माज़ी की यादगार के तौर पर नज़र आ रहे हैं, वो तुम्हारा ही काफ़िला लाया था. उन्हें भुलाओ नहीं. उन्हें छोड़ो नहीं. उनके वारिस बनकर रहो. और समझ लो तुम भागने के लिए तैयार नहीं तो फिर कोई ताक़त तुम्हें नहीं भगा सकती. आओ अहद (क़सम) करो कि ये मुल्क हमारा है. हम इसी के लिए हैं और उसकी तक़दीर के बुनियादी फैसले हमारी आवाज़ के बगैर अधूरे ही रहेंगे.

    आज ज़लज़लों से डरते हो? कभी तुम ख़ुद एक ज़लज़ला थे. आज अंधेरे से कांपते हो. क्या याद नहीं रहा कि तुम्हारा वजूद ख़ुद एक उजाला था. ये बादलों के पानी की सील क्या है कि तुमने भीग जाने के डर से अपने पायंचे चढ़ा लिए हैं. वो तुम्हारे ही इस्लाफ़ थे जो समुंदरों में उतर गए. पहाड़ियों की छातियों को रौंद डाला.आंधियां आईं तो उनसे कह दिया कि तुम्हारा रास्ता ये नहीं है. ये ईमान से भटकने की ही बात है जो शहंशाहों के गिरेबानों से खेलने वाले आज खुद अपने ही गिरेबान के तार बेच रहे हैं. और ख़ुदा से उस दर्जे तक गाफ़िल हो गये हैं कि जैसे उसपर कभी ईमान ही नहीं था.

    अज़ीज़ों मेरे पास कोई नया नुस्ख़ा नहीं है वही चौहदा सौ बरस पहले का नुस्ख़ा है. वो नुस्ख़ा जिसको क़ायनात का सबसे बड़ा मोहसिन (मोहम्मद साहब) लाया था. और वो नुस्ख़ा है क़ुरान का ये ऐलान, ‘बददिल न होना, और न गम करना, अगर तुम मोमिन (नेक, ईमानदार) हो, तो तुम ही ग़ालिब होगे.’

    आज की सोहबत खत्म हुई. मुझे जो कुछ कहना था वो कह चुका, लेकिन फिर कहता हूं, और बार-बार कहता हूं अपने हवास पर क़ाबू रखो. अपने गिर्द-ओ-पेश अपनी जिंदगी के रास्ते खुद बनाओ. ये कोई मंडी की चीज़ नहीं कि तुम्हें ख़रीदकर ला दूं. ये तो दिल की दुकान ही में से अमाल (कर्म) की नक़दी से दस्तयाब (हासिल) हो सकती हैं.

वस्सलाम अलेक़ुम!

फिरोज शेख 

(अहमदनगर महाराष्ट्र्र)


पढीये -

महाराष्ट्र के बाद अब बिहार मे एम आय एम की धूम..

मौलाना मुहम्मद बाकीर भारत देश के पहले शहीद पत्रकार....

आधुनिक शिक्षण व समाज...

अमेरिका की वोट गिनती ...

जामियाचे प्राध्यापक इमरान अली देशातले एक नंबर वैज्ञानिक....

मौलाना हसरत मोहानी ....

अर्णब गोस्वामी का नाम सूसाईड नोटमे रहने के बावजुद क्यो नही किया था गिरफ्तार...- ARNAB GOSWAMI ARREST

नाम रहने के बावजुद क्यो नही किया गिरफ्तार ?

 

मुंबई - अन्वय नाईक सुसाईड नोट मे  तीन व्यक्ती के नाम का उल्लेख है. मे २०१८ से अभी तक इन तीनो पर कोई कारवाही नही हुई. महाराष्ट्र पोलीस ने आज कारवाही करने के बाद नाईक के परिवार ने आभार व्यक्तकर सलाम किया. एक पत्रकार परिषद मे नाईक के परिवार ने आपनी भावना व्यक्त करते हुए कहा  इंटिरियर डिझायनर नाईक इनके आत्महत्या के मामलेमे रिपब्लिक टीव्ही चेनल के संपादक अर्णव गोस्वामी को हिरासत मे  लिया है.

        परिवार वालो ने पत्रकार परिषद लेकर कहा की मेरे पिताजी और मेरी दादीने ५ मी २०१८ को आत्महत्या की और पिताजीने सुसाईड नोट मे जीन तीन व्यक्ती का जिक्र किया उन्मेसे अर्णव गोस्वामी एक है. इतने दिनोसे हम कारवाही की मांग कर रहे थे  लेकीन इतने दिनो तक कारवाही क्यो नही हुई. सुशांत राजपूत मामले मे गोस्वामी कोई सुसाईड नोट नही रहेने के बावजुद आवाज उठाई लेकीन मेरे पिताजी के नोट मे नाम रहेने के बाद भी ये मामला इतने दिनो तक दबाए रहा .ऐसा आरोप नाईक इनकी बेटी आज्ञा नाईक ने किया. नाईक की पत्नी अक्षता नाईक ने कहा अगर गोस्वामी और वो दो व्यक्ती मेरे पती के पैसे दे देते तो आज वो जिंदा रहते. अर्णव गोस्वामी ने दुसरो को हुमारे खिलाफ भडकाते है की आप लोग भी इन्हे पैसे ना  दे.

रिपब्लिक स्टुडियो हा अन्वय नाईक यांचा शेवटचा प्रोजेक्ट होता.

पोलीसने अर्णव गोस्वामी पर और एक गुन्हा की नोंद की है . महाराष्ट्र पोलीस ने अर्णव गोस्वामी पर सरकारी कामोमे दखल देनेका मामला भी दर्ज किया है.

आपको बता दे की २०१८ मे  महाराष्ट्र मे भाजप की सरकार थी 

वाचा - 

अर्णब गोस्वामी मामलेमे पत्रकार संघटना सच के साथ...

अर्णब गोस्वामी को किया गिरफ्तार

अहमदनगर पाणी पुरवठा विस्कळित....

संविधान लिहिल्या नंतर डॉ आंबेडकरांच्या डोळ्यात आले अश्रु- Indian Constitution

संविधान म्हणजे भारताचा आत्मा 



विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान 395 कलमाचे का लिहले ??  394 किंवा 396 कलमाचे का लिहले नाहीत? तर त्याला कारण महात्मा फुले हे गुरू कारणीभूत आहेत ते कसे ?? तर महात्मा फुले यांनी बहुजन समाजाला शिक्षण ज्या पुण्यातील भिडे वाडयातून दिले ; शाळा चालू केले ; त्या शाळेचा क्रमांक 395 होता ; त्याची व आपल्या गुरूविषयी कृतज्ञता म्हणून संविधान 395 कलमाचे लिहले


संविधानाच्या या मसूदा समितीवर सात लोकांची निवड करण्यात आली होती त्यापैकी दोघांनी राजीनामा दिला ,एकाचा मृत्यू झाला,एक विदेशात गेला , एकाची तब्येत ठीक नव्हती,एक राजकारणात अडकला. त्यामुळे मसुदा समिती अध्यक्ष या म्हणून संविधान लिहण्याची सर्वस्वी जबाबदारी बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर येवून पडलीय व ती त्यांनी समर्थपणे एकट्यानेच पार पाडली म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर हे "संविधानाचे शिल्पकार" आहेत.


संविधानाची सुरूवात कशी करावी ? यावरून वाद चालू होता. त्यात मौलाना हसरत मोहानी म्हणून लागले की संविधान "अल्लाहच्या "नावाने सुरू करावे. पंडीत मालवीय म्हणाले की; "ओम नम शिवाय" यां नावाने सुरू करा एच :पी :कामत म्हणाले की -"ईश्वर "नावाने सुरू करा. मग शेवटी बाबासाहेब आंबेडकर म्हणाले " लोक" नावाने सुरू करा. यावर मतदान झाले  आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ६८ मते पडली तर देवाच्या नावाने ४१ मते पडलीय. संविधानाची सुरुवात "आम्ही भारताचे लोक " या नावाने झाली .


संविधानाचा कच्चा मसूदा डॉ बाबासाहेब आंबेडकर घरी लिहत बसले होते. त्या वेळी बॅ: पंजाबराव देशमुख हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी आले. यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचे स्वागत केले.तसेच संविधानाचा लिहत असलेला कच्चा मसूदा बॅ: पंजाबराव देशमुख यांना दाखवून म्हणाले ; "की दादा यावर थोडी नजर मारा व काही सूचना असतील तर सूचवा " मी थोडयावेळात येतो" असे म्हणून बाबासाहेब बाहेर गेले. परत आले तर बॅ देशमुख यांच्या डोळ्यात अश्रू पाहून डॉ बाबासाहेब म्हणतात की दादा तुम्ही का रडताय ? यावर देशमुख यांनी सांगितले की बाबासाहेब " माझ्या मराठा कुणबी समाजाच्या आरक्षणाची तरतूद करा " हे सांगण्यासाठी बाबासाहेब मी तुमच्याकडे आलो होतो. पण तुम्ही किती महान आहात की मी येण्याच्या अगोदरच तुम्ही तो मसूदा तयार करून ठेवलाय ; यामुळे मला आनंदाश्रू आवरत नाहीत.


महात्मा फुले यांनी असे भाकित केले होते की ज्या वेळी बहुजन समाज मनुवादी धर्मग्रंथ वाचेल त्यादिवशी तो जाळल्याशिवाय राहणार नाही. पहा बाबासाहेबानी मनुस्मृती नावाचा विकृत ग्रंथ जाहीरपणे जाळला व फुलेचा विश्वास खरा केला व फुले यांनी म्हटले होते की दुसरा राजग्रंथ निर्माण करेल मग तो राजग्रंथ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहून पूर्ण केला.

अमेरिकेतील कोलंबिया विदयापीठाने एक अहवाल तयार केला की त्या कालेजमधे शिकुन गेलेल्या 200 वर्षाच्या इतिहासात जगात सर्वात विदवान कोण ? त्यांनी जाहीर केले होते की जगात डाॅ :बाबासाहेब आंबेडकर हे विश्वरत्न विद्वान आहेत. 

कोलंबिया विद्यापीठाच्या मैदानात बाबासाहेब आंबेडकर यांचा ब्रांझ धातूचा पुतळा बनविला आहे व त्यात खाली लिहले होते की "SYMBOL OF KNOWLEDGE "

तेथील कुलगूरूच्या कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आहे व खाली लिहिले आहे की "आम्हाला गर्व आहे की आमच्या काॅलेजमधे शिकून गेलेला आमचा विद्यार्थी एका देशाचा संविधान शिल्पकार ठरला "

नेल्सन मंडेला म्हणतात की भारताकडून घेण्यासारखा एकच गोष्ट ती म्हणजे डॉ आंबेडकर यांनी लिहलेले संविधान.संविधान लिहून पूर्ण झाल्यानंतर एका पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला की डाॅ बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला संविधान लिहताना काही अडचण येत होती का ? यावर बाबासाहेब आंबेडकर यांनी लगेच उत्तर दिले, की माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य उभे होते म्हणून मला अडचण आली नाही "

डॉ बाबासाहेब म्हणाले की संविधान कितीही चांगलेच असूद्या पण राबवणारे हात वाईट असेल तर ते संविधान कुचकामी ठरते. म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांच्या हताश मनाचा मानबिंदू म्हणजे संविधान.

संविधान लिहून झाल्यावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या डोळ्यात अश्रू आले त्या वेळी तेथील पत्रकाराने विचारले की बाबासाहेब तुम्ही मनासारखे संविधान लिहून तुम्ही नाराज का आहात ? यावर डॉ बाबासाहेब आंबेडकर त्या पत्रकाराला उत्तर देताना सांगितले की ;" मी बहुजनाच्या कल्याणाचा जाहीरनामा लागू करण्यासाठी ज्यांच्या हातात देत आहे ते लोक माझे बहुजन नाहीत " मला यांच्यावर विश्वास बसत नाही की ते संविधान जशाच्या तसे लागू करतील.

वाचा -

खासगीकरण का? .....

खासगीकरण का? COMPANY PRIVATIZATION

खासगीकरण का? 



      भारतीय संविधानच्या आर्टिकल २१,३७,३८,३९ आणी ३०० मुळे केंद्र सरकारला खासगीकरण करणे शक्य नाही व खासगीकरण वर कोणताही कायदा बनवू शकत नाही. सरकार जर संविधानाचा उलंघन करत खासगीकरण साठी मनाप्रमाणे कायदा बनवते तर सरकार न्यायालयात टिकू शकत नाही. फक्त न्यायालयात योग्य न्याय झाले तर संविधानाचा उलंघन देशद्रोह चा अपराध मानला जाईल आणि यासाठी आजीवन कारावास ची शिक्षा आहे यामुळे सरकार भंग होण्याची शक्यता आहे. 
आज चांगली शिक्षा प्राप्त केलेले नागरिकांचे मुलेही खासगीकरण मुळे भांडवलदार कडे ५-७ हजार ची नोकरी करत आहे. संविधान सभेत या विषयावर सविस्तर चर्चा झाली होती की देशात प्रायव्हेट सेक्टर तयार केले पाहिजे की पब्लिक सेक्टर म्हणजेच सरकारी सेक्टर. सभेत पूर्ण चर्चा होऊन नंतर संविधान निर्मात्याने हा निर्णय घेतला की देशात विषमता आहे आणि विषमतला दूर करण्यासाठी पब्लिक सेक्टर म्हणजेच सरकारी सेक्टर तयार केले जाईल. 
        संविधान निर्मात्यांची सहमतीने झाली की आर्टिकल ३७, ३८, ३९ मद्येपण सरकारी सेक्टरला प्रोत्साहन देणे आणि अश्या कोणत्याही प्रकारची निती बनवू नाहीत ज्यामुळे खासगीकरणाला  प्रोत्साहन किंवा फायदा मिळेल. संविधानात अशी व्यवस्था करण्यात आली आहे की सरकार असा कोणतीच निती बनवणार नाही ज्यामुळे देशातील अधिक संपत्ती काही मोजक्या भांडवलदारांच्या हाती जमा होईल. 
        या नंतर संविधान चे ४२वे संशोधन आले ज्याला माननीय सर्वूच्च न्यायालयात आव्हान करण्यात आले याला गोरखनाथ कसे च्या नावाने ओळखले जाते यात भी न्यायालयाने हेच सांगितले आहे की देशातील विषमता दूर करण्यासाठी खासगीकरण ऐवजी सरकारी सेक्टरला प्रावधान देण्यात यावे. एवढेच नाही तर इंदिरा सहानी च्या निर्णयाने माननीय सर्वोच्च न्यायाल ने संविधानाचे या आर्टिकल ला जनहित साठी व्यापक मानत संविधानात या  आर्टिकल मुळे केंद्र सरकार कोणताही असा कायदा बनवण्यास असमर्थ आहे हे देशात १३५ करोड जनतेच्या विरोधात असेल आणि मोजक्या भांडवलदारला याचा फायदा होईल. संविधानात खासगीकरणाला नाकारले आहे. परंतु सरकारी सेक्टरला खासगी हातात विकत आहे आआणी  या परिस्थितीत भारताचे खासगी कारखाने विदेशी कंपनी खरिदी करू शकती यामुळे देश गुलाम होण्याची  शक्यता नाकारता येत नाही. आर्टिकल ३०० चा भी उलंघन होत आहे आणि विश्व बॅंक चा अनेक अहवालात स्पष्ट झाले आहे की खासगीकरण मुळे देशात विषमता जास्त पसरेल. खासगी वव्यापार मध्ये नागरिकांना पूर्ण वेतन मिळणार नाही आणी कार्माचारीन कडून  जास्त वेळ काम करून घेतले जाईल आणी पेंशन आणी आरोग्य सारखे मूलभूत सेवा पासुन कर्मचाऱ्यांना वंचीत ठेवले जाईल. 
हेच सरकारी सेक्टर मध्ये पेंशन , भविष्य निधी, व आरोग्य सुविधा आणी विमा सारख्या अनेक सुविधा मिळतील.
त्याच बरोबर काम करण्याचे तास ठरवलेले आहे. 


        खासगी शेत्रात कोणत्याही प्रकारची गारंटीगरांठी नाही. कर्मचर्यांना भांडवलदाराची चाकरी करावी लागते या उलट संविधानाने बेगारी प्रतेला प्रतिबंध घातले आहे. खासगीकरणामुळे बेगारी प्रथा परत लागू होण्याची शक्यता आहे जे सन १९४७ च्या पहिले होती. तेव्हा संविधानाची कमतरता होती. त्यावेळी सरकारी शेत्र विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आले. आणी आज देशात सर्व काही असतांना सरकारी सेक्टारला कौडीच्या भावात विकुन भांडवलदाराच्या हाती देण्यात येत आहे जे संविधानाच्या विरुद्ध आहे उलंघन होत आहे. सामान्य जनतेच्या जीवनाबरोबर खेळले जात आहे.


वाचा - 

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या