Showing posts with label CAMP. Show all posts
Showing posts with label CAMP. Show all posts

पॉप्युलर फ्रन्टच्या रक्तदान शिबीरात 82 जणांचे रक्तदान

 


युवकांनी रक्तदान चळवळीत मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे -रियाज़ सैय्यद

अहमदनगर - रक्त हे कोणत्याही फॅ क्टरीत तयार होत नसल्याने त्याची गरज भासल्यास मनुष्यालाच रक्तदान करावे लागते. एखाद्या रुग्णाला रक्ताची आवश्यकता भासल्यास त्यास ते वेळेत मिळणे गरजेचे असते. यासाठी युवकांनी रक्तदान करुन या चळवळीत सहभागी झाले पाहिजे. अत्याधुनिक उपचार पद्धतीने रक्ताचे विघटन होत असल्याने एका रक्तदात्याचा अनेकांना फायदा होत असल्याने या पुण्यकार्यात सहभागी झाले पाहिजे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया च्यावतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमामुळे इतरांनाही रक्तदानाची प्रेरणा मिळणार आहे, अशा उपक्रमाची समाजाला गरज आहे, असे प्रतिपादन पॉप्युलर फ्रंटचे रियाज सैय्यद यांनी केले.

कोरोनाच्या आजारामुळे सध्या रक्तदान शिबिरे व रक्तदात्यांची फार कमतरता होत असून शासनाने रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या वतीने मौलाना आझाद रोड येथील मिसगर डायग्नोस्टिक सेंटर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. याप्रसंगी कार्यक्रमास अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून रक्तदान केले.

यावेळी शेख हुजेफा म्हणाले, आज प्रत्येकाचे जीवनमान धावपळीचे झाले आहे, त्यामुळे रस्ते अपघाताबरोबरच इतरही अनेक कारणांनी रक्ताची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर भासत असते. अशा परिस्थिती प्रत्येकाने कर्तव्य म्हणून वर्षभरातून एकदातरी रक्तदान करुन आपले सामाजिक दायित्व पार पाडले पाहिजे. आपणही समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून रक्तदान करणे जरुरी आहे, असेही त्यांनी सांगितले.

या उपक्रमाचे समाजातून कौतुक होत आहे. सर्व रक्त संकलन करणारे व रक्तदात्यांचे शेख हुजैफा यांनी आभार मानले.

या रक्तदान शिबिरात रक्त संकलनाचे कार्य जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढी व अर्पण ब्लड बँकेने केले. या शिबिरात 82 जणांनी रक्तदान केले. सामाजिक उपक्रम करताना पाप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे वतीने कोवीडच्या काळात निराधार अनाथ लोकांचे अंतिम संस्कार ही केले.


अगर है शौक़े सफ़र तो हमारे साथ चलो,। नहीं है मौत का डर तो हमारे साथ चलो ! CORONA 19

अगर है शौक़े सफ़र तो हमारे साथ चलो,।
नहीं है मौत का डर तो हमारे साथ चलो !


पुणे -

        मूलनिवासी मुस्लीम मंचच्या कार्यकर्त्यांना असे वाटते की, आपण जे काम करीत आहोत त्यातून आपल्याला पुण्यमिळेल, सवाब मिळेल. माणुसकीचे नाते जपता येईल, असे विचार घेऊन ते कार्य करीत आहेत. त्यांच्या कुटुंबाचा त्यांना पाठिंबा आहे. मंचने जेव्हा दहन, दफनच्या कार्यास सुरूवात केली,बातम्या येऊ लागल्या तेव्हा जवळचे मित्र त्यांना पाहिल्या नंतर बोलत नव्हते. असे कार्य करू नये, असा सल्ला देत होते, कुटुंबाची आठवण करून देत होते. मदत तर नव्हती, उपदेश होते. मंचचे कार्यकर्ते त्यांच्याकडे दुर्लक्ष करून सकारात्मक विचार करून लोकांना मदत करीत होते. प्रसंगी स्वत:च्याखिशातील पैसे खर्च करून काम करीत होते. असेच काम पुढेही करण्याचे ठरविले आहे. लॉक- डाऊन मुळे कार्यकर्त्यांचीही परिस्थिती कठीणच आहे तरीही त्यांचा आत्मविश्वास आहे. भारत माझा देश आहे, भारतातील सर्वजण माझे बांधव आहेत या विश्वासाने मूलनिवासी मुस्लीम मंच व त्यांच्या सहकारी संस्था कार्य करीत आहेत._ 

     हिंदूंचे दहन केलेल्यांची काही उदाहरणे 

        डॉ. प्रतिभा मोरेश्वर भोळे मराठीतील सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत मानाचे स्थान असणाऱ्या ज्येष्ठ गायिका जोत्स्ना भोळे यांची नात प्रतिभा मोरेश्वर भोळे यांचे १ सप्टेंबर, २०२० रोजी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल,पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या सुप्रसिद्ध अंध कवयिती होत्या व अंधांसाठी त्यांनी भरीव कार्य केले. प्रतिभा भोळे अंध असल्यामुळे साहित्य क्षेत्रात स्थान मिळविण्यासाठी त्यांना फार मोठा संघर्ष करावा लागला. तसेच अंध व दिव्यांगनां साठी काम करणारी स्वयं- -सेविका म्हणून त्या सर्वपरिचित होत्या. त्यांच्या कार्याची दखल घेऊन शासकीय व खाजगी संस्थांमार्फत अनेक पुरस्कार प्रदान केले होते. त्यांचा मित्र परिवार मोठा होता आणि नातेवाईकांचा गोतावळा मोठा होता. परंतु अखेरच्या क्षणी, त्यांच्या पती शिवाय त्यांच्या जवळ कोणीच नव्हते. प्रतिभा भोळेंच्या मृत्यूनंतर अंतिम संस्कार करण्यासाठी जवळचे मित्र,नातेवाईक कोरोनामुळे येण्यास तयार नव्हते. प्रतिभा भोळे यांचे पती सुनिल परमार यांनी मूलनिवासी मुस्लीम मंचाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला.अवघ्या वीस मिनिटात कार्यकर्ते मदतीसाठी पोहोचले. प्रेतासंबंधी आवश्यक ते कागदपत्रे पूर्ण करून, प्रेत दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल कडून आपल्या ताब्यात घेतले. पतीला सोबत घेऊन पुण्यातील नवी पेठ येथील वैकुंठ स्मशान भूमीत हिंदू रितीरिवाजा प्रमाणे अंत्यसंस्कार केले.डॉक्टरप्रतिभा भोळे यांचा अंत्यसंस्कार आमच्या हातून होणे हे आमच्या साठी भाग्याचे लक्षण आहे असे आम्ही मानतो, असे मूलनिवासी मुस्लीम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार व त्यांचे सहकारी साबीर शेख तोपखाना, जमीर मोमीन, मौलाना शकील शेख,साबिर सय्यद,दानिश खान, अमजद शेख यांनी व्यक्त केले.

   वाचा -

एम आय एम और ध्रुवीकरण - AIMIM and Polarization ..

एम आय एम हरेगाव अध्यक्ष पदी अविनाश वाहुळ- AIMIM Ahmednagar

एम आय एम उंदिरगाव अध्यक्ष पदी अमीर शेख - AIMIM Ahmednagar..

मखदुम सोसायटी च्या वतीने मौलाना आजाद यांना अभिवादन - Makdoom Society

मौलाना आझाद शिक्षण विस्ताराचे जनक -शाहिद काझी 



अहमदनगर :- भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना आझाद यांनी देशाची शैक्षणिक प्रगती व तरुणांना प्रशिक्षणाच्या गरजा लक्षात घेऊन त्यांनी शैक्षणिक धोरण आखले. शिक्षणाला राष्ट्रीय प्रवाहाचे साधन म्हणून त्यांनी अंमलात आणले. व त्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती होऊन शिक्षणाचे दारे सर्वांसाठी खुली झाली. त्यामुळे शिक्षण विस्ताराचे जनक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते, असे प्रतिपादन शाहिद काझी यांनी केले.

 मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या 132 व्या जयंती व राष्ट्रीय शिक्षण दिना निमित्त मखदुम सोसायटी, अल करम सोसायटी, मुस्कान असोसिएशन व अहमदनगर सोशल फाऊंडेशन ट्रस्टच्यावतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी राहिल शेख,अमीन शेख, सैफ शेख,नादिर खान,अँड. अमीन धाराणी, नईम सरदार, आदि उपस्थित होते.

 पुढे बोलताना शाहीद काझी म्हणाले, शिक्षणाचे महत्व विशद करतांना संसदेत मौलाना आझाद म्हणाले होते की, देशाचे अंदाजपत्रकात शिक्षणाला महत्वाचे स्थान देणे गरजेचे आहे. अन्न, वस्त्रानंतर शिक्षणाचा क्रम लावला पाहिजे. त्यांचे असे मत होते की, देशाच्या पंचवार्षिक योजनेचा हेतू केवळ शेती, उद्योग, वीज, दळणवळणाची साधने यांची प्रगती एवढाच असू नये तर देशाच्या नवीन पिढीची जडण घडण योग्य प्रकारे होण्यासाठी शिक्षणाकडेही तेवढेच लक्ष दिले पाहिजे. म्हणूनच सुरुवातीच्या काळात देशाचे शैक्षणिक बजेट दोन कोटीचे होते. ते 1958 साली 30 कोटींचे झाले. शैक्षणिक विकासासाठी त्यांनी ठोस पाऊले उचलली. अनेक नविन शैक्षणिक संस्था निर्माण करुन विकसित केल्या.

 यावेळी शेर अली शेख म्हणाले, 1923 साली अवघ्या 35 व्या वर्षी ते काँग्रेस पक्षाचे सर्वात तरुण अध्यक्ष बनले. धारासना सत्याग्रहाचे ते प्रमुख क्रांतीकारक होते. पुढे 1940-45 या काळात सलग सहा वर्षे ते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहिले. त्यांच्याच काळात 1942 चे अंग्रेजो भारत छोडो ही चळवळ उभी राहिली. स्वातंत्र्यासाठी एकूण साडे सात वर्षे त्यांनी कारावास भोगला. स्वातंत्र्य लढ्यात सर्वाधिक काळ कारावास भोगण्याचा उच्चांक त्यांच्या नावावर आहे. त्यांच्या आयुष्यातील सरासरी आठवड्यातील एक दिवस कारावासात गेला आहे. 

 कार्यक्रमाचे प्रास्तविक आबीद दुलेखान यांनी तर सूत्रसंचालन तौसिफ तांबोली यांनी केले. आभार सैय्यद समीर यांनी मानले.

वाचा - 

अलकरम सोसायटीतर्फे मौलाना आझाद जयंतीनिमित्त मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर...

लायनेस क्लब च्या वतीने मानवसेवा येथे फराळ भेट...

मौलाना मुहम्मद बाकीर भारत देश के पहले शहीद पत्रकार ....

फ्रांस राष्ट्रपती मेक्रोन का अहमदनगर मे निषेध...

https://www.profitablecpmnetwork.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

अलकरम सोसायटीतर्फे मौलाना आझाद जयंतीनिमित्त मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर- EYE CHECKUP CAMP

सामाजिक उपक्रमांमुळे राष्ट्रीय एकात्मतेला बळ मिळते -डॉ.रफिक सय्यद



 अहमदनगर -देशाच्या स्वतंत्र्यासाठी समाजातील प्रत्येक घटकांनी आपल्या जीवनाचा बलिदान देऊन या देशाला स्वातंत्र मिळवून दिले व स्वतंत्र्यानंतर जसाजसा काळ पुढे जात आहे व येणारी नवीन पिढला स्वातंत्र्यासाठी बलिदान देणार्या विषयी गांभिर्य राहिलेले नाही हे दिसून येते. अशावेळी स्वतंत्र्य सेनानी भारतरत्न मौलाना आझाद यांच्या जयंती निमित्ताने सप्ताहाचे आयोजन करुन वेगवेगळे उपक्रम राबविल्याने या उपक्रमांमध्ये समाजातील सर्व घटकांना सामिल करुन घेऊन ते पार पारडणे. अशा उपक्रमांमुळेच राष्ट्रीय एकात्मतेला खर्‍या अर्थाने बळ मिळते, असे प्रतिपादन डॉ.रफिक सय्यद यांनी केले.

         मखदुम सोसायटीच्यावतीने स्वातंत्र्यसेनानी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आजाद यांच्या जयंतीनिमित्त कौमी एकता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अलकरम सोशल अ‍ॅण्ड एज्युकेशनल सोसायटीच्यावतीने अल-करम मॅटरनिटी हॉस्पिटल येथे आनंदऋषीजी नेत्रालय व फिनिक्स फौंडेशनच्या सहकार्याने मोफत रक्तगट, सर्वरोग निदान तपासणी व सवलतीच्या दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ.रफिक सय्यद, डॉ.रेश्मा चेडे, डॉ.संतोष चेडे, डॉ.रिवाजन अहेमद शब्बीर, डॉ.परवेझ अशरफी, डॉ.जहीर मुजावर, नईम सरदार, फिनिक्सचे जालिंदर बोरुडे आदि मान्यवर उपस्थित होते.

         

यावेळी सुशिल गाडेकर, मिश्रीलाल पटवा यांनी नेत्रतपासणी केली तर राहिल शेख, अमिन शेख यांनी रक्तगट तपासणी केली. प्रास्तविक आबीद दुलेखान यांनी केले . सूत्रसंचालन सय्यद समीर यांनी केले तर आभार तौसिफ तांबोळी यांनी मानले. शिबीर यशस्वीतेसाठी शोएब शेख, इम्रान शेख, शहानवाज तांबोळी, शेरअली शेख, तौसिफ तांबोळी, सय्यद समीर आदिंसह पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.

वाचा -

अब सारा गुस्सा ओवेसी पर?...

शिक्षण दिवस के मौकेपर मौलाना आझाद का बयान....

मौलाना मुहम्मद बाकीर भारत देश के पहले शहीद पत्रकार...

मखदुम सोसायटी च्या वतीने मौलाना आजाद यांना अभिवादन ...



मोफत नेत्र, रक्तगट सर्व रोग तपासणी व अल्पदरात मोतीबिंदू शास्त्क्रिया शिबीर - Health Checkup Camp

 भारतरत्न मौलाना आझाद जयंतीनिमित्त

मोफत नेत्र, रक्तगट सर्व रोग तपासणी व अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन


अहमदनगर- भारतरत्न स्वातंत्र्यसेनानी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त मखदुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी व अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या वतीने कौमी एकता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहू. यामध्ये अल करम सोशल अंड एज्युकेशन सोसायटी, फिनिक्स फाउंडेशन तर्फे व आनंदऋषीजी नेत्रालया च्या सहकार्याने बुधवार दिनांक 11 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी अकरा ते दुपारी दोन पर्यंत रामचंद्र खुंट येथील अल करम मॅटर्निटी हॉस्पिटल किंग्जगेटरोड इंगळे मेडिकल च्या मागे अहमदनगर मोफत रक्तगट व नेत्र तपासणी तसेच अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया तर पन्नास टक्के दरात सर्व रक्त तपासण्या केले जाणार आहे. तर प्रसूतीच्या मोफत तपासणी करून सवलतीच्या दरात प्रसूती केली जाईल. असे मखदुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान यांनी कळविले आहे.

तरी या संधीचा गरजूंनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा व अधिक माहितीसाठी 

तौफिक तांबोळी यांच्याशी 98 60 70 80 16 या नंबर वर संपर्क करुन किंवा समक्ष नांव नोंदणी करावी.

वाचा - 

मौलाना मुहम्मद बाकीर भारत देश के पहले शहीद पत्रकार...

अमेरिका की वोट गिनती ..

जामियाचे प्राध्यापक इमरान अली देशातले एक नंबर वैज्ञानिक ...


ईद चे औचित्य साधून मुस्लिम समाजाच्या वतीने ग्रामीण रुग्णालयास ऑक्सिजन सिलेंडर साठी रोख रकमेची मदत वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली बांगर यांच्याकडे केली सुपूर्त. Eid e Milad

ईद निमित्त मुस्लीम समाजाने केली ग्रामीण रुग्णालयाला मदत

ईद चे औचित्य साधून मुस्लिम समाजाच्या वतीने ग्रामीण रुग्णालयास ऑक्सिजन सिलेंडर साठी रोख रकमेची मदत वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली बांगर यांच्याकडे केली सुपूर्त.



श्रीगोंदा ( प्रतिनिधी ) इस्लाम धर्माचे संस्थापक , प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती श्रीगोंद्यात ही आपापल्या घरी साजरी करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जुलूस , शोभायात्रा न काढता अत्यंत साधेपणाने ईद साजरी करण्यात आली. मात्र सध्याच्या कोरोनाच्या महामारीच्या काळात रुग्णांना रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने सामाजिक बांधिलकी समजून तालुक्यातील मुस्लिम बांधव व सहयोग फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला. ६५ जणांनी आपले रक्त दान केले. अहमदनगर येथील अर्पण रक्तपेढीने हे रक्त संकलन केले.
पैगंबर जयंती च्या पवित्र व आनंदाच्या दिवशी हे शिबिर घेण्यात आल्याने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर व मजहर सय्यद यांनी देखील रक्तदान करून पुण्य पदरात पाडून घेतले व आपला रक्तदानाचा हक्क बजावला.


अजिम जकाते , निसार हकीम , अस्लम शेख , लियाकत तांबोळी , देशमुख , मोहन भिंताडे , इरफान पिरजादे , शकुर शेख , इरफान काझी , अल्ताफ शेख , खालील पठाण , सद्दाम जकाते , मुजफ्फर कुरेशी , इरफान कुरेशी , अयाज कुरेशी , अर्शद शेख , सतीश सूद्रिक , प्रविण शेलार , मुजाहिद शेख , रियाज तांबोळी , जैद आतार , अब्दुल रहीम जकाते , जावेद शेख , आदींसह ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच ५ युवकांनी प्लाझा डोनेट करण्याची तयारी दर्शविल्याने रक्तपेढीने त्यांची तपासणी केली आहे.


डॉ. अरुण रोडे यांनी रक्तदान शिबिरास भेट देऊन या चांगल्या उपक्रमाचे कौतुक करत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या तर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली बांगर यांनी ईद - ए - मिलाद निमित्त मुस्लिम बांधवांनी देऊ केलेल्या मदतीच्या या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत करून सर्व मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा दिल्या. वसीम जमादार यांच्यासह सहयोग फाऊंडेशन चे सर्व सदस्य यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

वाचा -



सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या