संविधान लिहिल्या नंतर डॉ आंबेडकरांच्या डोळ्यात आले अश्रु- Indian Constitution

संविधान म्हणजे भारताचा आत्मा 



विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान 395 कलमाचे का लिहले ??  394 किंवा 396 कलमाचे का लिहले नाहीत? तर त्याला कारण महात्मा फुले हे गुरू कारणीभूत आहेत ते कसे ?? तर महात्मा फुले यांनी बहुजन समाजाला शिक्षण ज्या पुण्यातील भिडे वाडयातून दिले ; शाळा चालू केले ; त्या शाळेचा क्रमांक 395 होता ; त्याची व आपल्या गुरूविषयी कृतज्ञता म्हणून संविधान 395 कलमाचे लिहले


संविधानाच्या या मसूदा समितीवर सात लोकांची निवड करण्यात आली होती त्यापैकी दोघांनी राजीनामा दिला ,एकाचा मृत्यू झाला,एक विदेशात गेला , एकाची तब्येत ठीक नव्हती,एक राजकारणात अडकला. त्यामुळे मसुदा समिती अध्यक्ष या म्हणून संविधान लिहण्याची सर्वस्वी जबाबदारी बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर येवून पडलीय व ती त्यांनी समर्थपणे एकट्यानेच पार पाडली म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर हे "संविधानाचे शिल्पकार" आहेत.


संविधानाची सुरूवात कशी करावी ? यावरून वाद चालू होता. त्यात मौलाना हसरत मोहानी म्हणून लागले की संविधान "अल्लाहच्या "नावाने सुरू करावे. पंडीत मालवीय म्हणाले की; "ओम नम शिवाय" यां नावाने सुरू करा एच :पी :कामत म्हणाले की -"ईश्वर "नावाने सुरू करा. मग शेवटी बाबासाहेब आंबेडकर म्हणाले " लोक" नावाने सुरू करा. यावर मतदान झाले  आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ६८ मते पडली तर देवाच्या नावाने ४१ मते पडलीय. संविधानाची सुरुवात "आम्ही भारताचे लोक " या नावाने झाली .


संविधानाचा कच्चा मसूदा डॉ बाबासाहेब आंबेडकर घरी लिहत बसले होते. त्या वेळी बॅ: पंजाबराव देशमुख हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी आले. यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचे स्वागत केले.तसेच संविधानाचा लिहत असलेला कच्चा मसूदा बॅ: पंजाबराव देशमुख यांना दाखवून म्हणाले ; "की दादा यावर थोडी नजर मारा व काही सूचना असतील तर सूचवा " मी थोडयावेळात येतो" असे म्हणून बाबासाहेब बाहेर गेले. परत आले तर बॅ देशमुख यांच्या डोळ्यात अश्रू पाहून डॉ बाबासाहेब म्हणतात की दादा तुम्ही का रडताय ? यावर देशमुख यांनी सांगितले की बाबासाहेब " माझ्या मराठा कुणबी समाजाच्या आरक्षणाची तरतूद करा " हे सांगण्यासाठी बाबासाहेब मी तुमच्याकडे आलो होतो. पण तुम्ही किती महान आहात की मी येण्याच्या अगोदरच तुम्ही तो मसूदा तयार करून ठेवलाय ; यामुळे मला आनंदाश्रू आवरत नाहीत.


महात्मा फुले यांनी असे भाकित केले होते की ज्या वेळी बहुजन समाज मनुवादी धर्मग्रंथ वाचेल त्यादिवशी तो जाळल्याशिवाय राहणार नाही. पहा बाबासाहेबानी मनुस्मृती नावाचा विकृत ग्रंथ जाहीरपणे जाळला व फुलेचा विश्वास खरा केला व फुले यांनी म्हटले होते की दुसरा राजग्रंथ निर्माण करेल मग तो राजग्रंथ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहून पूर्ण केला.

अमेरिकेतील कोलंबिया विदयापीठाने एक अहवाल तयार केला की त्या कालेजमधे शिकुन गेलेल्या 200 वर्षाच्या इतिहासात जगात सर्वात विदवान कोण ? त्यांनी जाहीर केले होते की जगात डाॅ :बाबासाहेब आंबेडकर हे विश्वरत्न विद्वान आहेत. 

कोलंबिया विद्यापीठाच्या मैदानात बाबासाहेब आंबेडकर यांचा ब्रांझ धातूचा पुतळा बनविला आहे व त्यात खाली लिहले होते की "SYMBOL OF KNOWLEDGE "

तेथील कुलगूरूच्या कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आहे व खाली लिहिले आहे की "आम्हाला गर्व आहे की आमच्या काॅलेजमधे शिकून गेलेला आमचा विद्यार्थी एका देशाचा संविधान शिल्पकार ठरला "

नेल्सन मंडेला म्हणतात की भारताकडून घेण्यासारखा एकच गोष्ट ती म्हणजे डॉ आंबेडकर यांनी लिहलेले संविधान.संविधान लिहून पूर्ण झाल्यानंतर एका पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला की डाॅ बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला संविधान लिहताना काही अडचण येत होती का ? यावर बाबासाहेब आंबेडकर यांनी लगेच उत्तर दिले, की माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य उभे होते म्हणून मला अडचण आली नाही "

डॉ बाबासाहेब म्हणाले की संविधान कितीही चांगलेच असूद्या पण राबवणारे हात वाईट असेल तर ते संविधान कुचकामी ठरते. म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांच्या हताश मनाचा मानबिंदू म्हणजे संविधान.

संविधान लिहून झाल्यावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या डोळ्यात अश्रू आले त्या वेळी तेथील पत्रकाराने विचारले की बाबासाहेब तुम्ही मनासारखे संविधान लिहून तुम्ही नाराज का आहात ? यावर डॉ बाबासाहेब आंबेडकर त्या पत्रकाराला उत्तर देताना सांगितले की ;" मी बहुजनाच्या कल्याणाचा जाहीरनामा लागू करण्यासाठी ज्यांच्या हातात देत आहे ते लोक माझे बहुजन नाहीत " मला यांच्यावर विश्वास बसत नाही की ते संविधान जशाच्या तसे लागू करतील.

वाचा -

खासगीकरण का? .....

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या