१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान
ब्रिटिशांनी चालविलेल्या या अन्याय शोषणाच्या विरोधात भारताच्या वेगवेगळ्या भागात ब्रिटिशविरोधी असंतोष वेळोवेळी सैनिक उठावाच्या रुपाने प्रकट होत गेला.
वेल्लोर मधील उठाव १८०६
बराकपूर १८२४
फिरोजपुर १८२४
त्यापाठोपाठ झालेल्या सातव्या बंगाल घोड दलाचा ६४ रेजिमेंट चा उठाव,
२२ व्ही एन आय १८४९
६६ वी एन आय १८५०
३८ व्ही एन आय १८५२
बरेली चा उठाव १८१६
कोळ्याचे बंड १८३१ -३२
कांगडा राज्याचा विरोध १८४८
संथालचा उठाव १८५५ - ५६
या सर्व असंतोषाच्या मागे राजकीय आर्थिक प्रशासकीय सामाजिक स्वरूपाची व्यापक करणे होती. खदखदत असलेल्या या असंतोषाचा स्फोट होऊन १८५७ चे वादळ निर्माण झाले ज्याने भारतातील ब्रिटिश साम्राज्याच्या मुळांना जबरदस्त धक्का दिला होता.
१८५७ पूर्वीची ही बंडे संख्येने कमी असली तरी त्यांचे परिणाम मर्यादित होते. उदासीन जनता व शस्त्रसामग्री मर्यादित असल्यामुळे हे उठाव यशस्वी झाले नाही. परंतु यश येवो न येवो त्यांची राजवट खपून घ्यायची नाही या वृत्तीतूनच ही बंडे घडून आलेली आपणास दिसून येतात. आपल्या मर्यादांची तुटपुंजा साधन सामुग्रीची व मनुष्यबळाची कल्पना असतानाही पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांनीही मर्दुमकी गाजविल. इतिहास घडविला. विविध स्वरूपाची व्यक्तिमत्वे असलेल्या या स्त्रिया आपल्या स्वराज्यासाठी संघर्ष करताना जिवाची बाजी लावताना आपणास दिसून येतात. पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनीही या उठावात भाग घेऊन त्यांनी प्रामुख्याने संदेश पाठविणे फरारी घोषित झालेल्या क्रांतीकारकांना आश्रय देणे, जेवण पुरविणे जखमी क्रांतीकारांची शुश्रूषा करणे एवढेच नव्हे तर हातात शस्त्र घेऊन त्यांनी या उठावाचे नेतृत्व ही केल्याचे आपणास दिसून येते.
पण यातील काही स्त्रियांची नावे काळाच्या ओघात दुर्लक्षित राहिली. या दुर्लक्षित स्त्रियांना इतिहासात पुन्हा प्रस्थापित करणे त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा शोध घेणे सध्याच्या परिस्थितीत आवश्यक आहे. या उठाव यातील स्त्रीयांचे योगदान निश्चित महत्वपूर्ण आहे म्हणूनच या स्त्रियांचे योगदान स्पष्ट करणे हा या लेखाचा उद्देश.
बेगम हजरत महल -
भारतीय स्वातंत्र्य संग्रामात जे नाव प्रामुख्याने पुढे येते ते म्हणजे बेगम हजरत महल यांचे. नवाब वाजिद अली शहा बरोबर विवाह करण्यापूर्वी ती एक नर्तकी होती. विवाहानंतर ती एक सन्मानित बेगम झाली. ती इतकी सुंदर आणि आकर्षक होती की नवाब तिला महकपरी असे संबोधित असे. या उठावातील त्यांचे कार्य हे वाखाणण्यासारखे आहे. अवधच्या नवाबाची ही पत्नी विलक्षण शमते वाली महिला होती जिने स्वातंत्र्यसंग्राम मध्ये खूपच अग्रगण्य अशी भूमिका निभावली. आपल्या अल्पवयीन पुत्र बिज्रिस कद्र याला प्रतिनिधी बनविले. त्याला आपल्या पतीचा उत्तराधिकारी घोषित केला. त्यांनी लखनऊच्या रक्षणासाठी सक्रिय सहभाग घेतला आणि सतत आपल्या सैनिकांमध्ये त्या सामील असत. जेव्हा इंग्रजांनी अवध वर पुन्हा विजय प्राप्त केला तेव्हा बेगम हजरत महल ने नेपाळमध्ये शरण घेतले आणि आपल्या मुलाचे अधिकार सोडण्यास नकार दिला. त्यांच्या या उठावयातील कार्याचे मूल्यमापन करताना अशा राणी व्होरा "महिला और स्वराज्य" या त्यांच्या ग्रंथात म्हणतात "बेगम हजरत महल निव्वळ बहादूर महिलांमध्ये एक होत्या ज्या आपल्या हुशारीने संघटक क्षमतेने आणि रनकुशलते मुळे आपल्या अंतिम श्वासापर्यंत इंग्रजांची डोकेदुखी बनल्या होत्या."
अझिझन -
अझिझान या कानपूरच्या एका कलावंतीन होत्या. त्यांच्या १८५७ च्या उठावातील सहभागा विषयी सर जॉर्ज ट्रेविलियन , नानासाहेब पेशव्यांचे चरित्रकार आनंद स्वरुप तसेच नानकचंद यांनी गौरव पर लिहिले आहे. बेगम आलियाने जसे स्त्रियांचे पथक उभारले होते तसेच अजिझन या कलावंतीन नेही स्त्रियांचे पथक तयार केले होते. पुरुष वेश धारण करून झाशीच्या राणी प्रमाणे करणे हि घोड्यावर स्वार होऊन समशेर चालवीत असे. तसेच त्यांनी घरोघर जाऊन अनेक स्त्रियांना या पथकात दाखल करून घेतले होते. डॉ सुंदर लाल हे इतिहासकार त्यांच्या भारत मे अंग्रेजी राज या ग्रंथ यांच्याबाबत म्हणतात की "शस्त्रसज्ज घोड्यावर स्वार होऊन शहराच्या रस्त्यावर आणि सैनिकांच्या छावणीमध्ये फिरत असत. कधी त्या रस्त्यावरील थकलेल्या आणि जखमी झालेल्या सैनिकांना दूध आणि भाकरी वाटत असेल आणि कधी इंग्रजांच्या किल्ल्याच्या बरोबर भिंतीखाली लढणाऱ्या लोकांना धीर देत असत."
बेगम जीनत महल -
दिल्लीच्या बादशहा बहादूरशहा जफर यांची जीनत महल ही आवडती बेगम होती. विद्रोही सैनिक ज्या वेळी दिल्लीत गेले त्यावेळी त्यांनी बहादूर शा सह क्रांतिकारी सैनिकांचे नेतृत्व स्वीकारण्याची विनंती केली. परंतु वृद्धावस्था आणि रिकाम्या खजिना यामुळे प्रारंभी यांनी नेतृत्व करण्यास नकार दिला पण याच वेळेस बेगम बोलली ही वेळ गझल गाऊन मन रमण्याची नाही. विठूर येथून निरोप घेऊन देशभक्त सैनिक आले आहेत. आज पूर्ण भारताचे लक्ष दिल्लीवर आणि आपल्यावर लागले आहे असे ठणकावून सांगितले होते. बेगम जीनत महाल बरोबरच कवियत्री कन्या बस्ती बेगम ही उठावात सहभागी झाली होती.
बेगम आलिया -
१८५७ च्या उठावात राणी लक्ष्मीबाई खेरीज बेगम आलियाच्या नेतृत्वाखाली शस्त्रसज्ज स्त्रियांचे पथक होत. या स्त्रिया शत्रूच्या हालचालींची बातमी काढण्यात पटाईत होत्या. रणनीती आणि डावपेज याबाबत तिची समज जबरदस्त होती पण १८५७ च्या उठावात नेत्यांमधील मतभेदांमुळे पुढे जेव्हा विसंवाद निर्माण झाला आणि ते एक दिलाने लढेना झाले तेव्हाही बेगम आलिया चा अखेरपर्यंत लढण्याचा निर्धार अभंग राहिला. १८५७ च्या उठावाचे संबंधी अनेक इंग्रज इतिहासकारांनी ग्रंथ प्रसिद्ध केले आहेत त्यापैकी त्यांच्या ग्रंथाचा अहवाल अनेकदा दिला आहे. त्या मेलेसन ने म्हंटले आहे, "आयोध्या ने जितका निश्चयात्मक दीर्घकालीन लढा दिला तितका भारतातील दुसऱ्या कोणत्याही भागने दिला नाही, या दीर्घकाळ चाललेल्या झुंजीत पराभव होणार असे दिसू लागल्यावर ही ज्यांनी शरण जाण्यापेक्षा मरण पत्करले त्यामध्ये बेगम आलिया ही एक होती."
स्वातंत्र्य लढ्यातील मुस्लिमांचे योगदान -
संकलन सोमनाथ रामचंद्र देशकर
संदर्भ - १८५७ च्या उठावातील स्त्रियांचा सहभाग
लेखक - डॉक्टर विनोद बोरसे
कार्यकारी संपादक - डॉ अनिल कठारे
कंधारपूर - इतिहास संशोधन त्रेमासिक
वाचा -
No comments:
Post a Comment