Showing posts with label Dr Babasaheb Ambedkar. Show all posts
Showing posts with label Dr Babasaheb Ambedkar. Show all posts

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण

 

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण

        मूलभूत हककासंबधीचया तरतुदीवर सर्वात मोठा गहजब करण्यात आला आहे १३! वया कलमास अनेक अपवाद ठेवून मूलभूत हक्कांचा गाभाच खाण्यात आला आहे. अशी टीका करण्यात येते. टिकाकाराना वाटते की मूलभूत हक्क हे अनिर्बंध असल्याशिवाय मूलभूत होऊ शकत नाही. याबाबत ते अमेरिकेच्या घटनेचा आधार घेतात. असे म्हणले जाते की अमेरिकेच्या बिल आॅफ राईट्स मध्ये असलेल्या हक्कांवर बंधने नसल्यामुळे ते खरया अर्थाने मूलभूत आहेत. ही टीका गैरसमजुती वर आधारलेली आहे. असे म्हणताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना दुःख होते. मूलभूत हक्क व सामान्य हक्क यामध्ये फरक दर्शविताना जी टीका केली जाते ती रास्त नाही. मूलभूत हक्क हे अनिर्बंध हक्क आहेत असे म्हणणे बरोबर नाही. मूलभूत हक्क व इतर सामान्य हक्क यातील खरा फरक असा आहे की सामान्य हक्क हे करार मदाराने प्राप्त होतात तर मूलभूत हक्क राष्ट्राचा कृपेने मिळतात यामुळे त्या हक्कांवर राष्ट्रांस निर्बंध ठेवता येत नाही

            अमेरिकेतील मूलभूत हक्क अनिर्बंध स्वरूपाचे आहेत असे म्हणणे चुकीचे आहे अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे परिशीलन केल्यास हे सहज दिसून येईल घटना मसुद्यातील कलम १३ समर्थनार्थ सुप्रीम कोर्टाचा एक निकाल उद्धृत केल्यास भरपूर कल्पना येईल. गिटलो विरुद्ध न्युयॉर्क या खटल्यात. गुन्हेगारांची अराजकता या कायद्याचा सनदशीर बद्दलचा प्रश्न उद्भवला होता. हिंसेचा प्रकार करणार्या वरील कायद्यान्वये शिक्षा ठरलेली आहे त्यावेळी सुप्रीम कोर्ट म्हणते

        घटनेनुसार दिलेल्या भाषणं स्वातंत्र्य आणि लेखन स्वातंत्र्य हे अनिर्बंध पणे भाषणं करण्याचा अथवा बेजबाबदार प्रकाशन प्रसिद्ध करण्याचा परवाना होऊ शकत नाही. फार दिवसांपासून हे तत्व प्रस्थापित झालेले आहे भाषण स्वातंत्र्य दुरूपयोग करण्याचे व दुरूपयोगामुळे ओढविणार या शिक्षेपासून संरक्षण मिळण्याचे लाईन्स हे मूलभूत हक्क देऊ शकत नाही 

          यास्तव अमेरिकेतील मूलभूत हक्क अनिर्बंध आहेत व मसुद्यातील हक्क निर्बंध आहेत हे म्हणणे चुकीचे आहे

          असा युक्तिवाद केला जातो की जर मूलभूत हक्कांवर काही बंधने ठेवावयाची असतील तर खुद्द ती घटनेचेच ठेवावीत परंतु घटना अशी बंधने ठेवणार नसेल तर परस्थिती नुसार ती बंधने ठेवण्याचे कार्य न्यायालयाकडे सोपवावे या युक्तिवादास अमेरिकन घटनेचा आधार घेतला जातो. अमेरिकन घटनेचा हा विपर्यास आहे असे मला वाटते अमेरिकन घटनेत असे काही एक नाही सभा संमेलनात एकत्रित येणयासंबधी हक्का खेरीज कोणत्याच मूलभूत हक्कांवर खुद्द घटनेने बंधने टाकलेली नाहीत त्याचप्रमाणे मूलभूत हक्कांवर निर्बंध ने. ठेवण्यास न्यायालयाला मोकळीक ठेवली आहे. हे म्हणणेही बरोबर नाही. ही बंधने टाकण्याचा अधिकार कांग्रेसचा म्हणजे विधिमंडळाचा आहे. अमेरिकन घटनेत ज्या वेळी प्रथमच मूलभूत हक्क समाविष्ट केले त्या वेळी ते अनिर्बंध होतें. लवकरच अमेरिकेनं कांग्रेसला हे दिसून आले की मूलभूत हक्कांवर मर्यादा ठेवणें अत्यावश्यक आहे. अशा मर्यादा टाकणे हे कितपत सनदशीर आहे हे ठरविण्याचे प्रश्न ज्या वेळी सुप्रीम कोर्टापुढे आला त्या वेळी असा युक्तिवाद करण्यात आला की मूलभूत हक्कांवर मर्यादा घालण्याचा अधिकार घटनेने कांग्रेसला दिलेला नाही त्यावेळी बंदोबस्ताचया अधिकारांचे नवे तत्व सुप्रीम कोर्टाने शोधून काढले व अनिर्बंध मूलभूत हक्कांचा पुरस्कार करणारे म्हणणे हाणून पाडले सुप्रीम कोर्टाचे म्हणणे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भाषणात पुढीलप्रमाणे मांडले आहे

        जे कोणी भाषण स्वातंत्र्याचा दुरुपयोग करुन जनतेची नितीमत्ता खराब करतील जनतेच्या कल्याणाच्या आड येतील गुन्हेगारी उत्तेजन देतील अगर शांततेचा भंग करतील त्यांना शासन करण्याचा अधिकार राष्ट्रास आहे राज्याच्या बंदोबस्तासाठी सुप्रीम कोर्टास हा अधिकार वापरावा लागत असून याबद्दल कोणास आक्षेप घेता येणार नाही

             घटना मसुद्यात हा मार्ग पत्करलेला नाही मूलभूत हक्क अनिर्बंध ठेवून सुप्रीम कोर्टाकडे धावणयाऐवजी थेट हिदसरकार यांनाच नियंत्रण ठेवण्याचा अधिकार दिलेला आहे एकूण अमेरिकन घटनेत तसेच सदर मसुद्यात मूलभूत हक्क अनिर्बंध नाहीत

        मूलभूत हक्कांचा जोडून मार्गदर्शक तत्वे समिविषट केली आहेत. पार्लमेंट री लोकशाहीसाठी तयार केलेल्या घटनेतील हे अभिनव वैशिष्ट्य आहे. अशा तर्हेचे वैशिष्ट्य फक्त आयरिश सटेटचया घटनेत सापडू शकेल मार्गदर्शनाच्या तत्वावर देखील टीका झालेली आहे असे म्हणण्यात येतं की ही तत्वे म्हणजे केवळ सदिच्छा आहेत त्यांच्या पाठिमागे सत्ता नाही ही टीका अर्थहीन आहे

       मार्गदर्शनाच्या तत्वावर कायदेशीर अधिकार नाही असे कोणी म्हणत असल्यास ते मी मान्य करतो परंतु त्यांना कसलाच अधिकार नाही हे मी कबूल करणार नाही ब्रिटिश सरकार आपल्या साम्राज्यातील वसाहतीतीचया गव्हर्नर जनरल व गव्हर्नरांना ज्याप्रमाणे आदेशपत्र देत असेल त्याप्रमाणे या मार्गदर्शक तत्त्वांची योजना आहे हिंदूंच्या प्रेसिडेंटला व गव्हर्नरांना उधेशून ही मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत एका विशिष्ट पक्षास सत्तेवर आरूढ करण्यासाठी हिंदची घटना तयार केलेला नाही सत्ता कोणाच्या हाती असावी हे जनताच ठरवेवील मात्र राज्य करतयानी लोकशाहीच्या कसोट्यांवर उतरले पाहिजे याचा अर्थ असा की जे कोणी सत्ताधारी बनतील त्यांना आपल्या लहरीप्रमाणे ति वापरता येणार नाही राज्यसत्ता वापरतांना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन त्यांनी केले पाहिजे राज्यकर्ते यांच्या हातून या तत्वाचा भंग झाल्यास त्याबद्दलचा जाब त्यांना कोर्टापुढे द्यावा लागणार नाही हे खरे तथापि मतदारांपुढे त्याचा जाब द्यावाच लागेल ज्या वेळी खरया लोककल्याणाचा पक्ष राजसत्ता काबीज करण्याची धडपड करील त्या वेळी या तत्वाचे महत्व कळून येईल

      मार्गदर्शनाच्या तत्वामागे कोणतीही शक्ति नाही म्हणून त्यांचा समावेश घटनेत करु नये असे म्हणणे रास्त नाही घटनेमध्ये कोणते स्थान त्यांना द्यावे याबाबत फारतर मतभेद होतील. ज्या कलमांच्या पाठिमागे शक्ति नाही त्यांची अडचण घटनेमध्ये करून ठेवणे बरे नव्हे हे मी कबूल करतो

        काही टीकाकार म्हणतात केंद्र सरकार भलतेच मजबूत आहे तर काहीजण बोलतात सरकार यापेक्षाही दणकट झाले पाहिजे आमच्या मसुद्यात दोहोंचा मध्य साधला आहे केंद्र सरकार यांना अधिक सत्ता असू नये असे तुम्ही कितीही म्हणाला तरी सरकार बळकट झाल्याशिवाय राहणार नाही आधुनिक जगातील परिस्थिति अशी आहे की केंद्र सरकार बलवत्तर अपरिहार्य आहे. अमेरिकेच्या फेडरल सरकारची वृद्धि कशी झाली हे आपण लक्षात ठेवणयाजोगे आहे. घटनेनुसार अमेरिकन फेडरल सरकारला मर्यादित अधिकार होते. तरिपण सरकारने आपले पूर्वीचे क्षेत्र एवढे वाढविले आहे की त्यामुळे घटक राज्ये गिळांकृत झालेली आहेत हल्लीच्या परिस्थितीचा हा परिणाम आहे. हिंद सरकार वर देखील नव्या परिस्थितीचा परिणाम होऊन ते अधिक अधिक भक्कम झाल्याशिवाय राहणार नाही. केंद्र सरकारच्या या प्रवृततीस आपण आळा घातला पाहिजे. त्यांचे वजन व शक्ति समसमान राहीली पाहिजे. नाहि तर जास्त वजनामुळे ते कोलमडून पडण्याचा प्रसंग यावयाचा

          केंद्र सरकार आणि प्रांत यांचें एक प्रकारचें व केंद्र सरकार आणि संस्थाने यांचें दुसरया प्रकारचें घटनात्मक संबंध ठेवलाबधदल आमच्या मसुद्यावर टीका केली जाते. संस्थांनानी हिंद सरकारच्या सर्व खात्याचा स्विकार करावा. अशी त्यांच्यावर सकति नाही परराष्ट्र संबंध. संरक्षण. दळणवळण. एवढ्या खात्या पुरती सकति आहे. कंकरट लिसटही स्विकारण्याची सकति संस्थांना वर नाही सवताची घटना समिती बोलावून त्यांना आपापली घटना तयार करण्याचे स्वातंत्र्य आहे. असे स्वातंत्र्य असणे दुर्दैवी व. असमर्थनीय गोष्ट आहे. या गोष्टी मुळे खुद्द संस्थानाच्या प्रगतीला धोका पोहोचेल. केंद्र सरकारला आपली सत्ता सर्व ठिकाणी सारखी वापरता येणार नाही. अशी सत्ता असून नसल्यासारखी आहे. युद्धजन्य काळात या घोटाळ्यामुळे राष्ट्रांवर कठिण प्रसंग गुदरलयाशिवाय राहणार नाही. यातून अंत्यंत अनिष्ट गोष्ट ही की संसथानाना आपले सैन्य ठेवण्याची मुभा घटना मसुद्यात अन्वये ठेवलेली आहे. ही तरतुद अंत्यंत प्रतिगामी व धोकेबाज असून त्यामुळे हिंदचे तुकडे होतील आणि केंद्र सरकार उखडले जाईल असे मला वाटते. मसुदा कमिटीचे संस्थांना संबंधीत तरतूद मोठ्या आनंदाने लिहिली आहे. अशातला भाग नाही. प्रांत व संस्थाने यांचें केंद्र सरकारशी असणारे घटनात्मक संबंध सुसूत्रता असावी. आशी मसुदा कमिटीची फार इच्छा होती. दुर्दैव असे की याबाबतीत कमिटीस काहीच सुधारणा करता आली नाही

      घटना मसुद्याचा पहिल्या कलमात हिंदचे वर्णन. युनियन आॅफ स्टेटस. राजयसंघ असे केले आहे त्यासंबंधी काहीजण टीका करतात फेडरेशन ऑफ स्टेटस असे हिंदचे वर्णन असावयास पाहिजे असे त्यांचे म्हणणे पडते एकतंत्री राज्यपद्धती असलेल्या दक्षिण आफ्रिकन राज्याचे वर्णन युनियन म्हणून केले आहे. हे खरे आहे. पण कॅनडाचे फेडरेशन असूनही त्यास युनियन म्हणूनच संबोधण्यात येते तेव्हा हिंदचे वर्णन युनियन म्हणून केल्याचे भाषेच्या संप्रदायास काही बाधा येते असे नव्हे. युनियन हा शब्द बुध्दी पुरसकर वापरलेला आहे हे ध्यानात घेतले पाहिजे. कॅनडा या घटनेत युनियन हा शब्द का वापरला आहे हे मी सांगू शकतो. मसुदा कमिटीस ही गोष्ट स्पष्ट करावयाची होती की हिंद सरकार हे फेडरल असले तरी प्रांतीय राज्याचा करार मदारामुळे ते स्थापन झालेले नाही. अर्थात कोणत्याही प्रांतीय सरकारास हिंदपासून फुटून निघण्याचा अधिकार नाही. जरी कारभाराविषयी सोयीसाठी देशांचे विभाग पाडले असले तरी देश एक. लोक एक आणि घटनाही एकच आहे. घटक राज्यांना फेडरल सरकारातून फुटून निघण्याचा अधिकार नाही हे प्रस्थापित करण्याकरिता अमेरिकेनं लोकांना यादवी युद्ध खेळावे लागले. यास्तव वरील गोष्ट निर्विवाद पणे कळावी मसुदा कमिटीने युनियन शब्दांची योजना केली आहे

            घटनेतील दुरुस्ती विषयक जी कलमे आहेत त्यावरही कडाडून टीका करण्यात आलेली आहे घटनेत दुरुस्ती घडवून आणणे कठीण आहे कसे म्हटले जाते. काही वर्षांपर्यंत तरी घटनेत साध्या मूजाॅरिटीने दुरुस्ती करता यावी. असेही सुचविण्यात आले आहे. सांप्रतची घटना समिती पौढ मतदान द्वारे निवडणून येणार्या भावी लोकसभेत तो अधिकार नाकारला आहे. अशीही टीका झालेली आहे या टीकाना कोणताही आधार नाही असे मी स्पष्ट पणे म्हणतो अमेरिकेनं व आॅसटेलिया घटनांकडे पाहिल्यास हे दिसून येईल की हिंद घटनेत दुरुस्ती घडवून आणणे सोपे आहे जनमताचा कौल वैगैरेसारखी पध्दती घटना मसुद्यात ठेवलेली नाही केंद्र व प्रांतीय विधिमंडळाच्या हाती घटना दुरुस्ती सत्ता ठेवलेली आहे केवळ दोनच बाबतीत प्रांतीय विधिमंडळाच्या संमतीची अट ठेवलेली आहे घटनेतील बाकी दुरुस्ती लोकसभाच करणार आहे दुरुस्ती संबंधीत एकच अट आहे आणि ती ही की प्रत्येक सभागृहातील हजर असलेल्या व मत देणार या सदस्यांच्या २/३ संख्येने आणि एकूण सदस्यांच्या बहुसंख्येने ही करावी यापेक्षा सोपी पध्दती शोधून काढणे कठीण आहे

              सध्याची घटना समिती व भावी लोकसभा यांच्या दर्जा तील फरक लक्षात न घेतल्यास बराच गोंधळ निर्माण झाला आहे. सध्या घटना समितीस पक्षपाती हेतू नाहीत ब-यापैकी व कार्यक्षम घटना बनविणयापलिकडे तिला काही साधवायचे नाही. एखादे विशिष्ट बिल पास करून घ्यावयाचे आहे या हेतूने घटनेचे कोणतेही कलम लिहिलेले नाही भावी लोकसभा घटनेमध्ये दुरुस्ती करणारं असेल तर पक्षीय दृष्टी राहीलं एखादे बिल पास करण्याच्या हेतूनेच भावी लोकसभेतील एखाद्या पक्ष घटनेत दुरुस्ती मागेल अशा पध्दतीने असेल तर सध्याच्या घटना समितीस तसा काहीच पक्षीय हेतू नाही 

      मार्गदर्शक तत्त्वांतून भविष्यात भारतीय समाज अर्थव्यवस्था कशी असावी याचे चित्र रेखाटले आहे. या आदर्शाची उभारणी करण्यासाठी सरकारने झटावे अशी अपेक्षा केली आहे. गेल्या चार दशकातील अनुभवात असे प्रयत्न करताना व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच होतो असे लक्षात आले आहे. या दोन्हीत संतुलन राखण्याचा प्रयत्न घटना दुरुस्तीतून व न्यायालयीन निवाडयातून केलेला दिसतो. तथापि मार्गदर्शक तत्वाच्या दिशेने झालेली प्रगती लक्षणीय नाही. आदर्श लोककल्याणकारी राज्य फार दूरवर आहे

              समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

डॉ बाबासाहेब आंबेडकर तुम्ही पुन्हा जन्माला या. Dr B.R Ambedkar



              महाड सत्याग्रह. काळाराम मंदिरात प्रवेश सत्याग्रह. दीक्षाविधी सोहळा. आणि दलित राजकीय प्रवाह गिरणी कामगार संप तेलंगणा अथवा बंगालमधील तेबाध लढा ( १९४७) या या घटनांशी जशी अस्मिता निगडित झाली आहे तशीच भारतातील दलित जातींची अस्मिता हि महाड येथील चवदार तळयावरील सत्याग्रह (१९२७) नाशिकचा काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह (१९३०) व नागपूर येथील दीक्षाविधी सोहळा या घटनांशी निगडीत झाल्याचे दिसून येते प्रचलित राजकारणाच्या संदर्भात सर्वच दलित नेते किंवा दलितांच्या वतीने राजकारणात उतरलेली मंडळी या तीन प्रेरक घटनांचा निर्देश आपापल्या राजकीय शक्तिचा बांधणीसाठी करताना दिसून येतो आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांनाही या घटना आणि दलित अस्मिता यांच्यातील परस्पर नाते पूर्णतः समजलेले असावेे >

         १९२७ साली बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचे रणशिंग फुंकले आणि अस्पृश्य वर्गास स्वताच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करण्याचा मंत्र दिला अस्पृश्याना सार्वजनिक. पाणवठे. विहीरी. तळी. खुली करण्यासंबंधीचा सी के बोले. यांचा ठराव मुंबई सरकारने मान्य केला होता पण तो अमलात येत नाही म्हणून बोले यांनी १९२६ साली त्या विषयांचा दुसरा प्रस्ताव पुन्हा मांडला दरम्यान १९२४ साली महाड नगरपालिकेने तेथील तळे अस्पृश्यांना खुले असल्याचे जाहीर केले होते तथापि अस्पृश्यानी आपला हक्क बजावला नव्हता त्यामुळे महाडला होणा-या बहिष्कृत. हितकारिणीसभेचया परिषदेच्या निमित्ताने बाबासाहेब आंबेडकरांनी समतेच्या लढ्याचे रणशिंग फुंकणयाचे ठरविले २०/ मार्च १९२७ रोजी त्यांच्याच नेतृत्वाखाली अनेक अस्पृश्य मिरवणुकीने चवदार तळ्यावर गेले व त्यांनी तेथे आपला पाणी वापराचा हक्क शाबीत केला पण या अस्पृश्य वर्गाच्या कृत्याने सवर्ण यांचीही माथी भडकली व त्यांनी महाड सत्याग्रही त्यांचेवर हल्ला केला दलित आणि सवर्ण यांच्यात दंगल उसळली दलित वर्गाच्या संघर्षात्मक राजकारणाची ही नांदी ठरली या सत्याग्रहाचा भावार्थ खुद्द बाबासाहेब यांनी स्पष्ट केला त्यांच्या मते महाडला चवदार तळ्यावर सत्याग्रही गेले ते केवळ पाणी पिण्यासाठी नव्हे इतरांप्रमाणे अस्पृश्य हाडामासाचे हिंदू आहेत हे त्यांना आग्रहाने मांडायचे होते म्हणून त्यांनी ही कृती केली होती म्हणजे मानवी हक्कांसाठी हा लढा होता त्यामुळे तो सत्याग्रह समतेची मुहूर्त मेढ ठरली या सत्याग्रहाने हिंदू समाजव्यवस्थेतील जाति जन्य विषमतेच्या मर्मावर बोट ठेवले व दलितांच्या मनुष्य तत्वांची प्रस्थापना केली दलित वर्गाच्या राजकीय जागृतीच्या संदर्भात या सत्याग्रहाचे मोल विशेष ठरले

            चवदार तळयापाठोपाठ १९३० साली नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेशाची चळवळही दलित अस्मितेच्या राजकारणाचे स्फूर्तिस्थान ठरल्याने दिसून १९२७ पाहूनच सार्वजनिक हिंदू देवालयात अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या जातींच्या लोकांना सपृशयाइतकेच समान अधिकार असावेत अशा मागण्या करण्यात वारंवार येवू लागल्या होत्या त्यातून अस्पृश्यांना मंदिर प्रवेशाची चळवळी सुरू झाल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथील काळाराम मंदिरात प्रवेश करण्यासाठी २/ मार्च १९३० रोजी सत्याग्रह करण्याचे ठरले आणि तसा तो झालाही अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांमधील सवाभिमान जागवून त्यांना संघटित करण्याचे फार कार्य महाड आणि नाशिक येथील सत्याग्रहामुळे झाले या निमित्ताने सपृशयानी चालविलेल्या जुलमाविरूधद दंड थोपटून उभे राहण्याची हिंमत दलितांनी दाखवली अस्पृश्य स्त्रियाही या लढ्यात उतरल्या होत्या माणूस म्हणून जगण्याचा सर्वांचाच हक्क समान आहे हे तत्व अस्पृश्यांच्या या लढयानी स्पष्ट केले एक संघटित शक्ती म्हणून दलित वर्गाच्या उद्याची नांदीही याच लढयानी दिली

               १९५६ साली बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे लाखो अस्पृश्य बांधवासमवेत हिंदू धर्माचा त्याग केला आणि बुद्ध धर्माची दीक्षा घेतली दलित राजकारण इतिहासातील ही एक फार मोठी घटना घडली हिंदू समाजातील विषमतेवर व अस्पृश्यांच्या अमानुष रुढीवर आंबेडकर यांनी केलेले घणाघाती आघात होता धर्मांतरामुळे हिंदू समाजाची असहिष्णुता व अपरिवर्तनीयता पुन्हा एकवार स्पष्ट झाली पण त्याच बरोबर दलित जातीना वेगळी अस्मिता प्राप्त झाली प्रज्ञा. करुणा. समतेवर आधारित बुद्ध धर्माचा अस्पृश्य वर्गाकडून झालेला स्विकार हा एक नव्या नैतिक व्यवस्थेकडे जाण्यासाठी महत्वाचे पाऊल ठरले दलित मुक्ती लढ्यात एक विश्वात्मक परिणाम प्राप्त झाले दलित मुक्तिचा संघर्ष हा मानवी मुक्तिचा यतनांची पूरवशरत असल्याची जाण या लढ्याच्या नेतृत्वाने आपालयाला दिला अशा रितीने महाड सत्याग्रह काळाराम मंदिर प्रवेश बुध्द धर्माचा सामूहिक स्विकार ह्या घटनांतून दलित अस्मिता प्रकट होते या तिन्ही घटनांच्या समृतीतून आपणास एका नव्या राजकीय प्रवाहाचया साक्षात्कार होतो आपल्या राजकीय मानसिकतेचा बराच मोठा भाग या घटनांनी व्यापला असल्याचे दिसून येते

              नजिकच्या इतिहासाकडे नजर टाकताच आणखीही अशा कितीतरी घटना पृथक राजकीय अस्मितेची निगडित झाल्याचे दिसून येईल उदा. गेल्या दशकातील अतिरेक्यांना विरुद्ध केलेलीं सुवर्ण मंदिरातील लष्करी कारवाई आॅपरेशन ब्लू स्टार ही घटना शीख अस्मितेच्या राजकारणाशी अशीच गेली आहे तसेच रामजन्मभूमीचा लढा हिंदूत्व वादी राजकारणाशी अतूट जोडलेला गेलेला आहे हिंदू अस्मिता जागी करण्याच्या संदर्भात या लढ्याचे महत्व वेगळे सांगायची गरज नाही संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही हौतात्म्य पावलेल्या एकशेपाच मराठी माणसांची स्मृती महाराष्ट्राच्या प्रादेशिक अस्मितेशी अशीच निगडित झाली आहे तात्पर्य ऐतिहासिक घटना भिन्न भिन्न राजकीय अस्मितेचा परिपोष करीत असतात व त्याद्वारे आपलीं राजकीय मानसिकता घटविली जाते

           माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क देणारे. कामगार संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगार यांच्यासाठी कायदेशीर भविष्य निर्वाह योजना. सामाजिक सुरक्षा कायदा. राजकीय प्रणाली. आर्थिक विकास नियोजन. महिलांना समान वेतन किमान वेतन सुरक्षा कायदा. सर्व शासकीय क्षेत्रातील कामकाज कसे करावे कसे चालावे. राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणांस अनमोल अशी शिकवण दिली आहे त्यावर आज आपण व आपला देश चालला आहे 

      आपले कुटुंब. जात. धर्म. भाषा. आणि वर्ग. यातून आपली सामाजिक पार्श्वभूमी सिध्द होतें ही पार्श्वभूमी आपले हितसंबंध निर्धारित करित असतें सहाजिकच भिन्न सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तिचे हितसंबंधही भिन्न असतात एकादी ऐतिहासिक घटना ज्या हितसंबंधांना मुखर करते ते आपल्या हितसंबंधासी मिळतेजुळते असतील तर त्या घटनेचे प्रेरकतव आपल्या लेखी अधिक असते याउलट संबंधित नसलेल्या घटना आपल्याला फारशा प्रेरणा देऊ शकत नाही मराठी भाषिक या नात्याने संयुक्त महाराष्ट्र चळवळ मराठी माणसाला जितकी प्रेरणा देईल. असे आपणास वाटते पण आज जात अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती व नवबौद्ध अशी वर्गवारी यावर आज राजकारणाचा डोलारा उभा केला जातो प्रत्त्येक योजना जातीच्या वर्गवारीत अडकून पडली आहे म्हणजे जात आपल्या देशाच्या आई आहे 

     शिका संघटित व्हा संघर्ष करा 

शिकवन आज पुस्तकावर राहिली आहे कायदा कलम सुरक्षा खुंटीला अडकवण्यात आलीं आहे गुन्हेगार मोकळे फिरतात आणि निरपराध सजा शिक्षा भोगत आहे एका सहिने गाव वाडी गल्ली तालुका जिल्हा राज्य देश बंद होतों याचा अर्थ असा होतो की वाटचाल हुकूमशाही पद्धतीने चालू आहे 

      म्हणून म्हणतो डॉ बाबासाहेब आंबेडकर तुम्ही पुन्हा जन्माला या. 

        समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर


माहिती अधिकार कलम (२) - RTI section 2...

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

समाजपयोगी विद्यार्थी घडवणारा प्राध्यापक डॉ साईनाथ शेटोड: ...

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३...

डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जीवन घटनाक्रम आणि कार्यकर्तृत्व - Dr Babasaheb Ambedkar

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357d

 डॉ बाबासाहेब आंबेडकर : जीवन घटनाक्रम आणि कार्यकर्तृत्वाचा चे काही आठवणी 



१४ एप्रिल १८९१ : सुभेदार रामजी व श्रीमती भिमाबाई आंबेडकर या मातापित्यांचे चौदावे अपत्य. ( जन्मस्थळ : महू इंदोर जवळ मध्य प्रदेश) 

१८९६ : माता भिमाबाई यांचा मृत्यू.

नोव्हेंबर १९०० : गवर्नमेंट व्हर्णा क्युलर (मराठी) शाळा सातारा मध्ये प्रवेश.

एप्रिल १९०६ : श्री भिकू वालंगकरांची कन्या रमाबाई बरोबर विवाह.

जानेवारी १९०८ : मुंबई विद्यापीठाची मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण.

डिसेंबर १९१२ :  यशवंतराव या पुत्राचा जन्म.

जानेवारी १९१३ : बी. ए उत्तीर्ण ( पर्शियन व इंग्रजी विषय घेऊन)

फेब्रुवारी १९१३ : वडील सुभेदार रामजी यांचा मृत्यू.

जुलै १९१३ : बडोद्याचे सयाजीराव महाराज यांची शिष्यवृत्ती प्राप्त, न्यूयॉर्क विश्वविद्यालय कोलंबिया येथे राज्यशास्त्र (विभागात) उच्चशिक्षणासाठी प्रवेश. 

१९१५ : अर्थशास्त्र हा मुख्य विषय व समाजशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान, राज्य नीतिशास्त्र हे दुय्यम विषय घेऊन उत्तीर्ण.

मे १९१६ : "भारतातील जाती" या विषयावर प्रा. गोल्डनविजर यांचे समोर प्रबंध वाचन. हासले पुढे प्रकाशित झाला. हे  डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले पुस्तक.

१९१६ : नॅशनल डिव्हीडंट ऑफ इंडिया या शीर्षकाखाली पीएच. डी.

जून १९१६ : लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या विख्यात संस्थेत ( इंग्लंडमध्ये) पुन्हा विशेष अभ्यासासाठी प्रवेश.

जून १९१७ : कोलंबिया विद्यापीठाची पी एच डी प्राप्त तेव्हापासून डॉक्टर ही पदवी बाबासाहेबांना प्राप्त झाली आहे. 

जून १९१७ : एम एस सी अर्थशास्त्र ही लंडनची पदवी मिळवून भारतात.

१९१७ : बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचे संस्थानात मिलिटरी सेक्रेटरी या पदावर नियुक्ती. बाबासाहेबांची संस्थानात भावी काळात अर्थमंत्री पदावर नेमणूक महाराजांना करावयाची होती. परंतु बाबासाहेब अस्पृश्य समाजातील असल्याने कार्य व्यवहारातील इतर लोकांनी बाबासाहेबांशी गैरवर्तन केल्यामुळे स्वाभिमानी बाबासाहेबांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. 

१९१७ : "भारतातील अत्यल्प शेती धोरण व त्यावर उपाय" या विषयावर पुस्तक प्रकाशित केले.

१९१८ : साऊथबरो कमिशन हे सार्वत्रिक मताधिकार याबाबत भारतात आले असता त्यापुढे मत अधिकाराबद्दल साक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मते अस्पृश्यांसाठी विभक्त मतदार संघ निर्माण करावयास पाहिजे होते. कमिशने त्यांचे म्हणणे स्वीकारले आहे.

१९१८ नोवेंबर : मुंबईतील सिडनहॅम कॉलेजात अर्थशास्त्र या विषयाचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती.

जानेवारी १९२० : "मूकनायक" हे दलितांचे पहिले साप्ताहिक मराठीमधून प्रकाशित.

सप्टेंबर १९२० : लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये पुढच्या अभ्यासासाठी व बॅरिस्टर च्या अभ्यासा साठी लंडनला (इंग्लंडला) दाखल.

जून १९२१ : "प्रोविन्शियल डिसेंट्रलाइजेशन ऑफ इम्पेरियल फायनान्स इन ब्रिटीश इंडिया" या विषयावर प्रबंध सादर हो तो स्वीकारला गेला. एम एस सी अर्थशास्त्र लंडन ही पदवी प्राप्त.

१९२२ - २३ : बॉन विद्यापीठ जर्मनी येथे अर्थशास्त्र शिक्षणासाठी काही महिने व्यतीत केले.

मार्च १९२३ : "प्रॉब्लेम ऑफ डी रुपी" या विषयावरील प्रबंध यामुळे डी.एस.सी. बॉन विद्यापीठाची पदवी प्राप्त.

१९२३ : बॅरिस्टर ग्रेज इन पदवीप्राप्त.

एप्रिल १९२३ : भारतात आगमन अजून पासून मुंबई उच्च न्यायालयात वकिली प्रारंभ. तेथेसुद्धा जातीयतेचा कडवट अनुभव.




जुलै १९२४ : दलित वर्गाच्या व्यापक हितासाठी "बहिष्कृत हितकारणी सभा" या संस्थेची मुंबईत स्थापना.

१९२५ : "ब्रिटीशकालीन भारतात प्रांतीय अर्थव्यवस्थेचा विकास" या विषयावरील महत्त्वाचे पुस्तक प्रकाशित.

१९२६ : भारतीय मुद्रा (रुपिया) या विषयावर रॉयल कमिशन ( हिल्टन यंग) पुढे साक्ष.

१९२६ : मुंबई प्रांतातील प्रांतिक मंडळाचे सभासद म्हणून सरकारने नेमणूक केली.

मार्च १९२७ : चवदार तळ्याचा महाड प्रसिद्ध संग्राम अस्पृश्यांना सार्वजनिक तळ्यातील पाणी पिण्याचा अधिकार आहे हे दाखविण्यासाठी पहिला सत्याग्रह. दलित चळवळीतील आंदोलनाचे हे पहिले पाहूल.

एप्रिल १९२७ : "बहिष्कृत भारत" पाक्षिकाचे प्रथम प्रकाशन "समाज समता संघाची" स्थापना.

मे १९२८ : सायमन कमिशन समोर अस्पृश्यांना विभक्त मतदारसंघ कशासाठी पाहिजे त्यावर आग्रही प्रतिपादन.

जून १९२८ : गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध काय ते विषयाचे प्राध्यापक.

मार्च १९३० : "जनता" साप्ताहिक सुरु.

सप्टेंबर १९३२ : ब्रिटन पंतप्रधान मॅक्डोनाल्ड यांनी "कम्युनल अवॉर्ड" जाहीर करून विभक्त मतदारसंघांची मागणी अशांत पूर्ण केली होती. यावर निषेध म्हणून गांधींचे प्रांतिक उपोषण. गांधींचे प्राण वाचून अस्पृश्य वरील भावी संकट टाळावे या हेतूने डॉ बाबासाहेबांनी "पुणे करारावर" स्वाक्षरी केली व संयुक्त मतदारसंघात मान्यता दिली.

१९३२ - ३४ : संविधान सुधारणा संबंधी संसदेच्या संयुक्त समितीचे सभासद.

मे १९३५ : रमाबाई आंबेडकर यांचा मृत्यू.

जून १९३५ : गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचे प्रिन्सिपल म्हणून नियुक्ती.

डिसेंबर १९३५ : "जात पात" तोडक मंडळ लाहोरच्या परिषदेला अध्यक्ष म्हणून आमंत्रण.

१९३६ : "जाती पद्धतीचे उच्चाटन" यावर गाजलेले अध्यक्ष भाषण त्यांना सादर करण्यास "जात पात तोळख मंडळ" या संयोजक संस्थेने परवानगी दिली नाही. त्यावर गांधींनी हरिजन साप्ताहिक प्रचंड टीका केली. त्यावर डॉक्टरांनी सडेतोड उत्तर दिले.

ऑगस्ट १९३६ : स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना.

जानेवारी १९३७ : मुंबई प्रांतिक सभेत सभासद म्हणून निवड निवडून आलेत.

जानेवारी १९३९ : काळे स्मृती व्याख्यानमाला पुण्याचे गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या प्रसिद्ध संस्थेमार्फत केली जात होती. तेथे भाषणात १९३५  च्या स्वातंत्र्याच्या सरकारी योजनेवर टीकेची झोड.

एप्रिल १९४२ : गव्हर्नर च्या दिल्ली कार्यकारणी परिषदेचे मजूर सदस्य म्हणून नेमणूक.

डिसेंबर १९४२ : कॅनडामध्ये पॅसिफीक रिलेशन्स परिषदेत "गांधी आणि अस्पृश्यांची मुक्ति" या विषयावर एक निबंध सादर केला. जो १९४३ मध्ये पुस्तक रूपाने प्रकाशित झाला.

जानेवारी १९४३ : 'गांधीजी व रानडे' या विषयावर न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या १०१ या जन्मदिनी दिनाच्या निमित्ताने झालेल्या समारंभात भाषण दिले. पुढे पुस्तकरूपाने प्रसिद्ध 'शॉर्ट ऑन पाकिस्तान' या पुस्तकाचे प्रकाशन.

जून १९४५ : गांधी व काँग्रेसने अस्पृश्यांसाठी काय केले? या शीर्षकाचे पुस्तक प्रसिद्ध.

एप्रिल १९४५ : पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना.

एप्रिल १९४६ : सिद्धार्थ कॉलेज मुंबई उद्घाटन.

जुलै १९४६ : व्हॉईसरॉय कौन्सिल सदस्यत्वाचा राजीनामा (बाबासाहेब बंगाल कॉन्स्टिट्यूशन सदस्य म्हणून निवडून गेले होते. परंतु भारत पाकिस्तान विभाजन निश्चित झाल्यावर सर्व सभासदांनी राजीनामा दिला, त्यात डॉ बाबासाहेबांनी सुद्धा राजीनामा दिला.) त्यानंतर मुंबई विधिमंडळ काँग्रेस पक्षाने विधिमंडळात डॉ. जयकर यांच्या राजीनाम्यामुळे रिकामी झालेली जागा डॉ बाबासाहेबांना दिली डॉ बाबासाहेब विधिमंडळाचे सभासद झाले. 

सप्टेंबर १९४६ : अस्पृश्यांच्या हीत संबंधाचे स्वतंत्र भारतात रक्षण करण्यासाठी काय केले पाहिजे यावर इंग्लंडच्या कॅबिनेट मिशन ने चुका केल्या होत्या. आपले याबाबतचे मत सांगण्यासाठी डॉ बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली लंडनला शिष्टमंडळ रवाना.

ऑक्टोबर १९४६ : अस्पृश्य पूर्वी कोण होते ? हे पुस्तक प्रसिद्ध केले.

मार्च १९४७ : शासन आणि अल्पसंख्यांक या विषयावर अल्पसंख्यांकाचे मूलभूत अधिकार संरक्षण याबाबत एक टिपणी सादर.

ऑगस्ट १९४७ : पंडित नेहरू च्या अंतरिम सरकार मध्ये कायदा मंत्री म्हणून सामील, घटना समितीच्या ग्राफ्टिंग समितीचे सदस्य.

एप्रिल १९४८ : कृष्णराव बी. कबीर यांच्या मुलीबरोबर शारदा कबीर यांच्याशी विवाह.

ऑक्टोबर १९४८ : भाषा व प्रांतिक रचना कमिशन पुढे (धर कमिशन) डॉ बाबासाहेबांनी महाराष्ट्र भाषावर प्रांत रचनेत त्यांचे स्वरूप यावर निवेदन दिले.

नोव्हेंबर १९४८ : 'मसुदा समितीचे अध्यक्ष' या नात्याने घटनेच्या मसुदा अंतरिम लोकसभेचे पुढे सादर केला.

जून १९५० : मिलिंद महाविद्यालय, औरंगाबाद स्थापना.

डिसेंबर १९५० : जागतिक बौद्ध परिषद, कोलंबो प्रतिनिधी.

फेब्रुवारी १९५१ : हिंदू कोड बिल लोकसभेत मांडले.

९ मे १९५१ : जनतेच्या  प्रतिनिधित्वाचे बिल (निवडणुकीचा कायदा)

जुलै १९५१ : "भारतीय बौद्ध जनसंघ" ची स्थापना.

https://www.amazon.in/gp/product/B08G896B5S/ref=as_li_tl?ie=UTF8&tag=jpnews786-21&camp=3638&creative=24630&linkCode=as2&creativeASIN=B08G896B5S&linkId=2fb3ed0d185aea3df8fe7d30e11507f8सप्टेंबर १९५१ : 'बुद्ध उपासना पाठ' या पुस्तकांचे संकलन केले.

डिसेंबर १९५१ : हिंदू कोड बिलाला काँग्रेसने संपूर्ण पाठिंबा दिला होता पण सनातन्यांच्या विरोधामुळे काँग्रेसला माघार घ्यावी लागली. या कारणाने तसेच इतर मतभेदांमुळे डॉ आंबेडकरनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. 

मे १९५२ : राज्यसभा सदस्य म्हणून नियुक्ती, त्याआधी मुंबईतील लोकसभा निवडणुकीत विजयी होऊ शकले नाही.

मे १९५२ : कोलंबिया विद्यापीठाच्या (अमेरिका) द्वी शताब्दी समारंभानिमित्त एल. एल. डी सन्मानाने दिली.

मे १९५३ : सिद्धार्थ कॉलेज - मुंबई कॉमर्स अर्थशास्त्र विभागाचे उद्घाटन लोकसभेच्या पोटनवडणुकीसाठी अर्ज भरला.

डिसेंबर १९५४ : जागतिक बौद्ध परिषद (रंगून) येथे प्रतिनिधी.

मे १९५५ : भारतीय बौद्ध महासभेची स्थापना.

डिसेंबर १९५५ : भाषावर प्रांतरचना संबंधी संयुक्त महाराष्ट्र बाबत ठाम मत मांडले.

जून १९५६ : सिद्धार्थ लॉ कॉलेज चे उद्घाटन.

१४ ऑक्टोबर १९५६ : नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.

१५ ऑक्टोबर १९५६ : नागपूर दीक्षा भूमीवर भाषण देले.

१५ नोव्हेंबर १९५६ : काठमांडू नेपाळ येथील चौथ्या जागतिक बौद्ध परिषदेत भाषण.

६ डिसेंबर १९५६ : महापरिनिर्वाण

१४ एप्रिल १९९० : मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान.

ॲड. निर्मलकुमार सूर्यवंशी लिखित संविधानाचे अंतरंग या पुस्तकातून.


वाचा - 

अहमदनगर किला - AHMEDNAGAR FORT ...

मुस्लिम धर्मीयांची चौकशी करून जात प्रमाणपत्र द्या! उच्च न्यायालय - Mumbai High court...

ऐतिहासिक अहमदनगर काही घटना काही आठवणी - Historical Ahmednagar ...

१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान भाग ३ - Indian Muslim Freedom Fighter....

महातमा फुल्यांच्या विचारांची फुलबाग फुलवा - MUZAFFAR SAYYED

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

 महातमा  फुल्यांच्या विचारांची फुलबाग फुलवा 



 "विषारी ते वेद, अज्ञान्या डसती
 बिळात पळती, सर्पावत"

हा म. फुले ह्या महाकवीचा, मराठी आधुनिक कवितेच्या जनकाचा *'अखंड'* आहे. ही रचना अभंगासारखी वाटत असली तरी हा अभंग नाही. भक्तीचे स्तोम माजवून बहुजनांना वेडे करण्याचा म. फुलेंचा दुष्ट विचार नव्हता. त्यांनी जाणिवपूर्वक आपण सामाजिक आशयाची कविता (अखंड) लिहित आहोत, हे दाखवून दिले. आकाशातील कवितेला म. फुल्यांनी जमिनीवर आणले. त्यांनी माणसांची, माणसांसाठी व माणुसकीची प्रथम कविता मराठीत लिहिली. मराठी कवितेला आशय व अभिव्यक्तीच्या दोन्ही अंगाने आधुनिक साज चढविला. वरील त्यांचा एकच *'अखंड'* स्पष्टीकरणासाठी पुरेसा आहे.

म. फुल्यांनी वेद संस्कृतीवर प्रखर हल्ले चढविले. ब्राह्मण वर्गाने ज्या वेदांना पुजनीय मानले, वेदांच्या आधारे चातुर्वर्ण्यव्यवस्था प्रस्थापित केली त्या वेदांनाच म. फुले यांनी केवळ नाकारले नाही तर त्यांना विषारी सर्पाची उपमा दिली. वेदांमध्ये जातियतेचे, विषमतेचे विष भरलेले आहे. ब्राह्मण वर्ग ज्या वेदांचे भांडवल करुन हजारो वर्षे देशातील बहुजनांवर राज्य करीत होता, त्या त्यांच्या जगण्याच्या भांडवलालाच म. फुल्यांनी विषारी साप म्हणावे, यालाच क्रांती म्हणतात.

म. फुल्यांनी १९ व्या शतकात येथील विषारी व्यवस्थेविरुद्ध युद्ध पुकारले होते. येथील ब्राम्हणांनी धर्माचा दुरुपयोग केला, धंदा केला व बहुजनांना गुलाम करुन वागविले म्हणून त्यांनी ब्राम्हणांवर जहरी टीका केली. तशी ती करणे काळाची गरज होती. कोणी तरी हे करणे गरजेचेच होते. फुल्यांनी तो धीटपणा दाखविला, म्हणून फुले आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार ठरतात.

सन १८१८ साली पेशवाई बुडाली. पुण्याच्या शनिवार वाड्यावर ब्रिटिशांचा ध्वज फडकला. पेशवाई बुडाली याचे दु:ख महाराष्ट्रातील ब्राम्हणांना होणे स्वाभाविकच होते. पण पुरा महाराष्ट्र आनंदित झाला होता. ब्रिटिशांची गुलामगिरी सुरु झाल्याने महाराष्ट्र आनंदीत झाला नव्हता तर पेशव्यांच्या अमानुष गुलामगिरीतून मुक्तता झाली म्हणून महाराष्ट्राने आनंदोत्सव साजरा केला होता. तरीही धार्मिक - सांस्कृतिक गुलामीत महाराष्ट्र अडकूनच पडलेला होता. अशा काळात म्हणजे पेशवाईचा अंत झाल्यानंतर सन १८२७ मध्ये म. फुले ह्या युगपुरुषाचा जन्म झाला.

महाराष्ट्रात धर्मसत्तेचा प्रभाव जीवनातील सर्वच क्षेत्रावर पडलेला होता. त्या धर्माची उपनामे पहा............................

१) पत्नी धर्म

२) सेवक धर्म

३) राज धर्म

४) कुल धर्म

५) वर्ण धर्म

६) व्यवसाय धर्म

 १) पत्नी धर्म :- महिला ही गुलामच होती. मनुस्मृतीने तिला पुरुषांच्या तुरुंगात कैद करुन ठेवलेले. पत्नीने नवऱ्याची मरेपर्यंत सेवा करायची, हा पत्नीधर्म अस्तित्वात होता. तिने नवऱ्याला पतीदेव म्हणायचे. येथील ब्राह्मण संस्कृतीने स्त्रीला कायमची गुलाम केले होते.

म. फुल्यांनी प्रचलित धर्माचा अर्थच बदलून टाकला. हीच त्यांची क्रांती होती. स्त्रीला पुरुषांइतकेच स्थान असले पाहिजे, हा स्त्री - पुरुष समानतेचा सिध्दांन्त महाराष्ट्रात प्रथम फुल्यांनी मांडला. महाराष्ट्रात बोलके सुधाकर खूप झाले. ते सर्वच ब्राह्मण वर्गातले होते. ब्राह्मण समाज सुधारकांची समाज - सुधारणा आपल्या घराबाहेर असायची, घरात नसायची. समाजसुधारक आगरकरांची पत्नी कुठे होती ? न्या. रानड्यांची पत्नी कुठे होती ? यांची तर कुणाला नावेही माहीत नाहीत. परंतु म. फुल्यांच्या पत्नीचे म्हणजे सावित्रीमाईचे नाव आजही अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे. म. फुल्यांनी प्रथम आपल्या पत्नीलाच शिकवून स्त्री - शिक्षणाचा प्रारंभ केला. सावित्रीमाई शिकल्या व शिक्षिका झाल्या.महाराष्ट्रातील आद्य शिक्षिकेचा मान त्यांनाच द्यावा लागतो. ज्या ब्राह्मण समाजातील काही महिलांची नावे सतत आज पुढे केली जातात, आम्ही विचारतो सावित्रीमाई नसत्या तर ह्या कुठे असत्या ? सावित्रीमाई नसत्या तर पंडिता रमाबाई, आनंदीबाई जोशी, काशीबाई कानेटकर, लक्ष्मीबाई टिळक, दुर्गा भागवत ह्या महिला निर्माणच झाल्या नसत्या. पत्नीधर्म सांभाळत चुली फुंकत राहिल्या असत्या व मुलांचे लेंढार सांभाळत राहिल्या असत्या.

 २) सेवक धर्म :- आपल्याशिवाय सर्वच जातीचे लोक आपले सेवक आहेत, त्यांनी आपली सेवा केली पाहिजे, असे दंडक धर्मग्रंथात ब्राम्हणांनी लिहून ठेऊन *'सेवक धर्म'* बहुजनांवर लादला. क्षत्रियांना त्यांनी आपले रक्षण करण्यास सांगितले. तो त्यांचा *'सेवक-धर्म'* . वैश्यांना व्यापार करायला लावून आपली मिरचीची (संसाराची) सोय ब्राम्हणांनी करुन ठेवली. क्षत्रिय राजांना सुध्दा आपल्या सेवेची ब्राम्हणांविषयीची कर्तव्ये लिहून ठेवली आणि ८५ टक्के बहुजन समाजाला शुद्र अतिशुद्रांच्या यादीत टाकून त्यांना तर गुलामच केले. म. फुल्यांनी हे 'ब्राम्हणांचे कसब' ओळखले व ह्याच नावाचा ग्रंथ लिहून जगासमोर ठेवला. ब्राम्हणांचा *'सेवक धर्म'* नाकारण्याचे बहुजनांना म. फुल्यांनी जाहीर आवाहनच केले.

३) राजधर्म :- राजाने राजा म्हणून राज्य करताना स्वबुध्दीने राज्यकारभार करु नये. धर्मग्रंथात म्हटले आहे त्याच पध्दतीने राजाने राज्यकारभार करावा, हे सर्व दंडक हुशार ब्राम्हणांनी धर्मग्रंथात लिहून ठेऊन राजांनाही गुलाम केले.

महाराष्ट्रात ब्राम्हणांच्या धर्मसत्तेचा अंमल जो हजारो वर्षे चालू होता, तो प्रथम फुल्यांच्या लक्षात आला नि त्यांनी धर्मसत्तेविरुध्द युध्दच पुकारले. म. फुल्यांनी देव - भक्त यांच्या मधील ब्राह्मण नामक दलाल नाकारला. ही फार मोठी क्रांती होती. फुल्यांची क्रांती आजही बहुजन वर्गाला अजिबात कळली नाही. आजही बहुजन वर्गाचे ब्राम्हणांशिवाय पान हालत नाही. प्रत्येक धार्मिक विधीसाठी त्यांना ब्राम्हणच लागतो. देवळातील पुजारी, सत्य नारायणाची पूजा करणारा भटजी, लग्न लावणारा भटजी हाच खरा दलाल असल्याचे म. फुले उघडपणे सांगायचे व ह्या दलालांना दूर ठेवा, असेही बेधडकपणे बोलायचे, लिहायचे. धर्माच्या ठेकेदारांचा ठेकाच त्यांनी नाकारला. हीच त्यांची क्रांती होती.

म. फुल्यांनी कधीही देवाला देव म्हटले नाही. त्यांनी विश्वनिर्मात्या निसर्गाला *'निर्मिक'* म्हटले. *'निर्मिक'* हा शब्द खूप जाणीवपूर्वक त्यांनी निर्माण केला. परंतु ब्राम्हणांनी येथील ९० टक्के लोकांच्या डोक्यात ३३ कोटी देव इतके फिट करुन ठेवलेत की ते कधीच डोक्याबाहेर जाणारच नाहीत. क्रांतिकारकांचा पराभव करण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. देव संकल्पना येथील लोकांच्या मनाच्या पाटीवरुन पुसलीच जाणार नाही. हिंदूधर्म सत्तेचा अंमल अबाधित आहे. दररोज एक मंदिर भारतात बांधले जाते. मंदिरे ही ब्राम्हणांची पैसे कमविण्याची बाजारपेठ आहे. धंदा तेजीत आहे. संत रामदासांनी महाराष्ट्रात मंदिरे बांधण्याची मोहिम सुरु केली. आध्यात्माचा धंदा खरा तर त्यांनीच तेजीत आणला. ह्या धार्मिक बाजारपेठेचा पहिला व्यापारी रामदासच होते. त्यांना पक्के माहित असावे की, येथे धर्मवेडे लोकच जास्त आहेत, तेच आपले गिऱ्हाईक आहेत. त्यांनी श्लोक रचले. त्यातून समाजाला सज्ञान करण्याऐवजी अज्ञानीच ठेवले. ते म्हणायचे, *'जगी सर्व सुखी असा कोण आहे ?'* 

आजही लोकांना हा प्रश्न खरा वाटतो. म. फुल्यांचा यावर आक्षेप होता. ते म्हणत असत की, जगात कोणी सुखी नाही असा जगाविषयी, जीवनाविषयी तुच्छतेचा व नकारात्मक भाव रामदासांनी सांगून बहुजनांची बौद्धिक फसवणूक केली. जगात कोणीच सुखी नाही, असे सांगताना रामदासांना असेही सांगायचे आहे की, जगात सर्वच दु:खी आहेत, तुम्हीही दु:खातच राहा. म. फुल्यांनी रामदासांचा सुखाचा चुकीचा सिध्दांतच नाकारला. ही त्यांची क्रांती होती. पण त्यांच्या क्रांतीचा अर्थ आजही बहुजनांना कळला नाही. फुल्यांना लोक विसरले. रामदास घराघरात जीवंत आहेत. कोणी धर्माधिकारी नावाच्या माणसाने बैठका नावाचा प्रकार सुरु केला. अवघा महाराष्ट्र वेडा झालाय. लोक कामंधामं सोडून बैठकांना जातात. त्या बैठकीत रामदास शिकविला जातो. रामदास अवतारी पुरुष होता, असे बिंबवले जाते. रामदासाचा दासबोध घराघरात हळद-अबीर-गुलाल-फुलांनी पुजला जातो. ब्राम्हणांचा आध्यात्मिक धंदा आजही जोरात चालू आहे. येथे क्रांतिकारक म. फुले वेडे ठरले. कोणालाच म. फुले नको आहेत. आज ज्यांना म. फुले जीवंत ठेवायचे असेल त्यांनी घराघरात म. फुल्यांचा *'ब्राम्हणांचे कसब'* ग्रंथ ठेवावा. त्याचे पारायण करावे. रामदासांचे श्लोक म्हणण्याऐवजी म. फुल्यांचे *'अखंड'* वाचावेत. ते अखंड खंड न पाडता वाचावेत. म. फुल्यांचे *' त्रुतीय रत्न'* नाटक रंगभूमीवर आणा. ते नाटक बहुजन वर्गातील प्रत्येक स्त्री - पुरुषांनी पाहावे. पुन्हा पुन्हा पहावे. फुल्यांची विचारांची फुलबाग फुलवा, इतकीच आपणा सर्वांना प्रार्थना.

मुजफ्फरभाई सय्यद

कार्याध्यक्ष

अ. भा. साहित्य कलामंच

 ९९६०३२५०५७

वाचा - 

महात्मा फुल्यांनी पैगंबरांवर लिहिलेला पोवाडा - MAHATMA PHULE...

सूल्तान_महमूद_ग़ज़नवी - Mahemood Gajnavi.....

मोगलांचा शासनकाळ व प्रजा - Muzaffar Sayyed .....

इतिहास किती विक्रुत कराल ?....

संविधान भारताचा आत्मा आहे -Shahid Shaikh

 संविधान भारताचा आत्मा आहे - शाहीद शेख

    


     भारतीय संविधानाचे शिल्पकार क्रांतिनायक डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ ला मनुस्मृती जाहिरपणे जाळली आणि २६ जानेवारी १९५० रोजी या मनुस्मृतीला भारतीय संविधान हा पर्याय दिला.

   जगभरातील लोकशाही राष्ट्रांचा अभ्यास करून त्या त्या राष्ट्रांतील लोकशाही सरासरी पातळी मोजणारा स्वीडनमधील व्ही-डेन या जगविख्यात संशोधन संस्थेचा अहवाल नुकताच प्रकाशित झाला आहे.

"व्ही-डेन" ही स्वीडनमधील

गोथेनबर्ग या विद्यापीठातील एक संशोधक शाखा असून,२०११ पासून ही संस्था लोकशाही राष्ट्रांतील नागरिकांचे हक्क,अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा अभ्यास करते आहे.या संस्थेच्या अहवालाची जागतिक पातळीवर गंभीरतापूर्वक दखल घेतली जाते; मात्र आपल्या देशातील मुख्य प्रवाहातल्या माध्यमांनी या अहवालाकडे डोळेझाक केल्याने सामाजिक आणि राजकीय पातळीवर चर्चाच झाली नाही.अहवालातील निष्कर्ष धक्कादायक असून,त्याची सुरवातच प्ररसारमाध्यमांपासून होते,म्हणून कदाचित माध्यमांनी हा अहवाल दुर्लक्षिला असू शकतो.

   बरे असो, ही एक जाणिवपूर्वक मोहक अशी चाल आहे ज्याचे सत्तारूढ वर्णवर्चस्ववादी सारथी आहेत.

  सम्राट अशोकाचा नातू बृहद्रथ ! इ.पू १८५ मध्ये पुष्यमित्र शुंग या ब्राम्हणाने बुध्द धम्माचा विनाश करण्यासाठी मौर्य सम्राट बृहद्रथाचा वध केला आणि ब्राम्हणी सत्ता प्रस्थापित केली.डाॅ.आंबेडकर यांनी स्वच्छंदपणे सांगितले आहे की इ.स.पू १७० ते इ.स.पू १५० या काळात सुमती भार्गवाने मनुस्मृतीची रचना केली आणि आपल्या राज्याचा कायदा म्हणून पुष्पमित्र शुंगाने या मनुस्मृतीला मान्यता प्राप्त करून दिली.डाॅ.आंबेडकर यांनी म्हटले आहे की- " The code known as Manu Smirti was promulgated by Pushyamitra as embodying the principles of Brahmnic Revolution against Buddhist state of the Mauryas"

याचा अर्थ बुध्दाच्या अनुशासनानुसार 

चालणा-या मौर्य साम्राज्याच्या विरूध्द पुष्यमित्राने ब्राम्हणवादाची सांस्कृतिक सत्ता प्रस्थापित करण्यासाठी मनुस्मृतीचा आपल्या राज्याचे धर्मशास्त्र म्हणूनच केवळ नव्हे तर समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र म्हणूनही पुरस्कार केला.

  आज अमेरिका आणि भारत या दोन बलशाली राष्ट्रांतही लोकशाहीच्या -हासाला आरंभ झाला असून,गेल्या चार-पाच वर्षात नागरी स्वातंत्र्याचा संकोच होत आहे.असा "व्ही-डेन" चा अहवालाचा निष्कर्ष आहे उदा.नागरी समाजाच्या हक्कांसाठी,आदिवासींच्या उत्थनासाठी काम करणा-या शेकडो स्वयंसेवी संस्थांची मुस्कटदाबी करण्यात आली आहे, सेवाभावी काम करणा-या संस्थांवर आजवर धर्मांतरांचा आरोप ठेवण्यात येत होता,मात्र तो सिद्ध न झाल्याने 'फेरा' कायद्याचा बडगा उगारून या संस्थांना परदेशातून मिळणारा निधीच गोठवून टाकण्यात आला,दुसरीकडे नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी आवाज उठविणा-यांना अर्बन नक्षलवादी ठरवले गेले.मानवधिकारांसाठी काम करणा-यांवर सरकारी कामात हस्तक्षेप केल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावरही खटले भरले गेले.

  राष्ट्रवादाच्या नावाखाली सुरू झालेली बहुसंख्याकांची धार्मिक कट्टरता,जम्मू-काश्मीरातील जनतेला विश्वासात न घेता करण्यात आलेले त्रिभाजन,बहुमताच्या जोरावर करण्यात आलेले कायदे ,प्रसारमाध्यमांवर अंकुश अशा उदाहरणांची जंत्री या अहवालात आहे.

   अंधभक्तांनो ब्रिटनमधल्या इकाॅनाॅमिस्ट इंटेलिजन्स युनिट या कंपनीने अहवालात म्हटले आहे की,भारताचा लोकशाही इंडेक्स दहा अंकांनी घसरल्याचे म्हटले आहे.याचाच अर्थ असा की,भारताची वाटचाल सदोष लोकशाहीकडे सुरू असल्याचा इशाराही आहे.म्हणून आज संविधानावर अप्रत्यक्षरित्या घाव घालण्यात येत असून ही वाटचाल हुकुमशाही कडे जात आहे याचे सर्वोत्तम साधार व उदाहरण घ्यावयाचे झाल्यास २ वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जनतेसमोर येऊन स्पष्टोक्ती केली की," या देशाची लोकशाही संकटात आहे'.याहून आश्चर्यचकित बाब काय असू शकते?

  डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्माण केले आज ती बदल्याची चाल ही जाणीवपूर्वक एका विशिष्ट समूहाकडून केली जात आहे म्हणून आपल्याला संविधान वाचवणारे हात निर्माण करणे गरजेचे आहे.

   या विविधतेने नटलेल्या भारताला विनाशकारी हुकुमशाहीला रोखण्याचे सामर्थ्य मनुस्मृती मध्ये नसून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या पवित्र संविधानात आहे.

 डाॅ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की " आम्ही जे मनुस्मृतीचे वाचन केले आहे त्यावरून आमची अशी खात्री आहे की,या ग्रंथात शुद्र जातीचा निंदा करणारी,त्यांचा उपमर्द करणारी; कुटाळ उत्पत्तीचा कलंक त्यांच्या माथी मारणारी व त्यांच्याविषयी समाजात अनादर वाढविणारी वचने ओतप्रोत भरलेली आहेत.त्यात धर्माची धारणा नसून,धर्माची विटंबना आहे; आणि समतेचा मागमूस नसून,अस्मितेची धुळवड घातली आहे.स्वयंनिर्णयाचे तत्व प्रस्थापित करावयास निघालेल्या सुधारणावादी यांस असला ग्रंथ कधीच मान्य होणे शक्य नाही व तो अस्पृश्य वर्गासही मान्य नाही एवढेच दर्शविण्याकरिता महाड येथे त्याचा होळी करून ती खाक करण्यात आली( संदर्भ:- रिडल्स इन हिंदूइझम खंड ४)

  यावरून मनुस्मृतीपेक्षा कैक पटीने संविधान श्रेष्ठ आहे.

     तीन टक्के माकडे आर्यवंशीय घोड्यावरून भारतात आहे हे खरे पण जर का संविधानास मानले नाही तर गाढवारून तुम्हांला जिकढून आलात तिकडे पाठविण्यात येईल हे तितकेच खरे.

प्रा.शाहिद शेख

वाचा -

ओवेसी ने दि अमीत शाह को खुली चूनौती....

सूल्तान_महमूद_ग़ज़नवी....

मोगलांचा शासनकाळ व प्रजा....

एम आय एम महाराष्ट्रातील सर्व निवणुका....







संविधान लिहिल्या नंतर डॉ आंबेडकरांच्या डोळ्यात आले अश्रु- Indian Constitution

संविधान म्हणजे भारताचा आत्मा 



विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान 395 कलमाचे का लिहले ??  394 किंवा 396 कलमाचे का लिहले नाहीत? तर त्याला कारण महात्मा फुले हे गुरू कारणीभूत आहेत ते कसे ?? तर महात्मा फुले यांनी बहुजन समाजाला शिक्षण ज्या पुण्यातील भिडे वाडयातून दिले ; शाळा चालू केले ; त्या शाळेचा क्रमांक 395 होता ; त्याची व आपल्या गुरूविषयी कृतज्ञता म्हणून संविधान 395 कलमाचे लिहले


संविधानाच्या या मसूदा समितीवर सात लोकांची निवड करण्यात आली होती त्यापैकी दोघांनी राजीनामा दिला ,एकाचा मृत्यू झाला,एक विदेशात गेला , एकाची तब्येत ठीक नव्हती,एक राजकारणात अडकला. त्यामुळे मसुदा समिती अध्यक्ष या म्हणून संविधान लिहण्याची सर्वस्वी जबाबदारी बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर येवून पडलीय व ती त्यांनी समर्थपणे एकट्यानेच पार पाडली म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर हे "संविधानाचे शिल्पकार" आहेत.


संविधानाची सुरूवात कशी करावी ? यावरून वाद चालू होता. त्यात मौलाना हसरत मोहानी म्हणून लागले की संविधान "अल्लाहच्या "नावाने सुरू करावे. पंडीत मालवीय म्हणाले की; "ओम नम शिवाय" यां नावाने सुरू करा एच :पी :कामत म्हणाले की -"ईश्वर "नावाने सुरू करा. मग शेवटी बाबासाहेब आंबेडकर म्हणाले " लोक" नावाने सुरू करा. यावर मतदान झाले  आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ६८ मते पडली तर देवाच्या नावाने ४१ मते पडलीय. संविधानाची सुरुवात "आम्ही भारताचे लोक " या नावाने झाली .


संविधानाचा कच्चा मसूदा डॉ बाबासाहेब आंबेडकर घरी लिहत बसले होते. त्या वेळी बॅ: पंजाबराव देशमुख हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी आले. यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचे स्वागत केले.तसेच संविधानाचा लिहत असलेला कच्चा मसूदा बॅ: पंजाबराव देशमुख यांना दाखवून म्हणाले ; "की दादा यावर थोडी नजर मारा व काही सूचना असतील तर सूचवा " मी थोडयावेळात येतो" असे म्हणून बाबासाहेब बाहेर गेले. परत आले तर बॅ देशमुख यांच्या डोळ्यात अश्रू पाहून डॉ बाबासाहेब म्हणतात की दादा तुम्ही का रडताय ? यावर देशमुख यांनी सांगितले की बाबासाहेब " माझ्या मराठा कुणबी समाजाच्या आरक्षणाची तरतूद करा " हे सांगण्यासाठी बाबासाहेब मी तुमच्याकडे आलो होतो. पण तुम्ही किती महान आहात की मी येण्याच्या अगोदरच तुम्ही तो मसूदा तयार करून ठेवलाय ; यामुळे मला आनंदाश्रू आवरत नाहीत.


महात्मा फुले यांनी असे भाकित केले होते की ज्या वेळी बहुजन समाज मनुवादी धर्मग्रंथ वाचेल त्यादिवशी तो जाळल्याशिवाय राहणार नाही. पहा बाबासाहेबानी मनुस्मृती नावाचा विकृत ग्रंथ जाहीरपणे जाळला व फुलेचा विश्वास खरा केला व फुले यांनी म्हटले होते की दुसरा राजग्रंथ निर्माण करेल मग तो राजग्रंथ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहून पूर्ण केला.

अमेरिकेतील कोलंबिया विदयापीठाने एक अहवाल तयार केला की त्या कालेजमधे शिकुन गेलेल्या 200 वर्षाच्या इतिहासात जगात सर्वात विदवान कोण ? त्यांनी जाहीर केले होते की जगात डाॅ :बाबासाहेब आंबेडकर हे विश्वरत्न विद्वान आहेत. 

कोलंबिया विद्यापीठाच्या मैदानात बाबासाहेब आंबेडकर यांचा ब्रांझ धातूचा पुतळा बनविला आहे व त्यात खाली लिहले होते की "SYMBOL OF KNOWLEDGE "

तेथील कुलगूरूच्या कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आहे व खाली लिहिले आहे की "आम्हाला गर्व आहे की आमच्या काॅलेजमधे शिकून गेलेला आमचा विद्यार्थी एका देशाचा संविधान शिल्पकार ठरला "

नेल्सन मंडेला म्हणतात की भारताकडून घेण्यासारखा एकच गोष्ट ती म्हणजे डॉ आंबेडकर यांनी लिहलेले संविधान.संविधान लिहून पूर्ण झाल्यानंतर एका पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला की डाॅ बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला संविधान लिहताना काही अडचण येत होती का ? यावर बाबासाहेब आंबेडकर यांनी लगेच उत्तर दिले, की माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य उभे होते म्हणून मला अडचण आली नाही "

डॉ बाबासाहेब म्हणाले की संविधान कितीही चांगलेच असूद्या पण राबवणारे हात वाईट असेल तर ते संविधान कुचकामी ठरते. म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांच्या हताश मनाचा मानबिंदू म्हणजे संविधान.

संविधान लिहून झाल्यावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या डोळ्यात अश्रू आले त्या वेळी तेथील पत्रकाराने विचारले की बाबासाहेब तुम्ही मनासारखे संविधान लिहून तुम्ही नाराज का आहात ? यावर डॉ बाबासाहेब आंबेडकर त्या पत्रकाराला उत्तर देताना सांगितले की ;" मी बहुजनाच्या कल्याणाचा जाहीरनामा लागू करण्यासाठी ज्यांच्या हातात देत आहे ते लोक माझे बहुजन नाहीत " मला यांच्यावर विश्वास बसत नाही की ते संविधान जशाच्या तसे लागू करतील.

वाचा -

खासगीकरण का? .....

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या