Showing posts with label Education. Show all posts
Showing posts with label Education. Show all posts

शिक्षणाच्या धनावर बसलेले साप

 

शिक्षणाच्या धनावर बसलेले साप 

              प्रसार हे आपल्यापुढे आज मोठे आवाहन आहे. शिक्षणाने प्रगती साधता येते. शिक्षणाने माणूस सुसंस्कृत बनतो. आपल्या भोवतीच्या जगात जास्त आत्मविश्वासाने वावरू शकतो. औपाचारिक शालेय शिक्षण आणि मग तांत्रिक किंवा पदवी शिक्षण यांची सर्वांसाठीच आवश्यकता आहे. पण आपल्या देशात निरक्षर लोकांची संख्या मोठी आहे. शिवाय अर्धवट शाळा शिकून शिक्षण थांबलेली खूप मुलं मुली आहेत. त्यामुळे शिक्षणाशी संबंधित असा पहिला प्रश्न म्हणजे सर्वांना साक्षर कसे करता येईल. ? ‌तयासाठी. गावोगाव शाळा काढण्याचे प्रयत्न केले जातात गरिब मुलांना सवलती आणि सुविधा पुरविल्या जातात. तसेच सरकारी शाळांमध्ये मोफत हक्काचे शिक्षण सोय असते. पौढ साक्षर मोहिमेच्या द्वारे पौढानाही साक्षर करण्याचे प्रयत्न केले जातात. तरीही आज आपला समाज एकतृतियांश समाजातील मुल मुली निरक्षरच आहेत म्हणजे शिक्षणाची सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली पाहिजे दुसरा प्रश्न म्हणजे शाळेत येणारा मुलगा मुलगी शेवटपर्यंत शाळेत शिक्षण घेण्यासाठी राहीला पाहिजे. आठरा विश्व दारिद्र्य यामुळे दोन चार वर्ष शिक्षण घेऊन मधोनच शाळा सोडणारे विद्यार्थी संख्या जास्त असते. गरिबी असल्यामुळे घरांचा खर्च पालनपोषण कमी पडते यामुळे या मुलांना लहानसहान कामांना लावलें जाते. त्यामुळे अशा मुलांची शाळा सुटते. यामुळे पहिल्या इयत्तेत शिकणारा विद्यार्थी चौथी पर्यंत टिकत नाही. यामुळे आपली शिक्षण व्यवस्था गाळणी किंवा फिनेलसारखी आहे. असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. प्राथमिक शाळेपेक्षा माध्यमिक शाळेत मुलांची संख्या वारंवार कमी होत आहे. यामुळे पुढील शिक्षण घेणा-या मुलांची संख्या त्याहून कमी असते. या परस्थिती मुळे शिक्षणाच्या पुरेसा परिणाम दिसून येत नाही. उच्च शिक्षण किंवा वैद्यकीय. अभियांत्रिकी शिक्षण. घेणारे मुलांची संख्या मर्यादितच राहते. 

        २०२० रोजी कोरोना सारख्या महाभयंकर महामारी संकटाने थैमान घातले आणि बघताबघता गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये टाळेबंदी जारी करण्यात आली. जगण्यासाठी कमविणारा व्यक्ती जीवाच्या भीतीने घरातच अडकून पडला त्यामुळे हातात पैसा नाही त्यामुळे त्यांच्या वर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. शासनाने मुलांचे आरोग्य टिकविण्यासाठी सर्व शासकीय निमशासकीय शाळा कॉलेज विद्यालये महाविद्यालये उच्च विद्यालये सर्व बंद करण्याचे आदेश दिले. आणि सर्व शिक्षण संस्था बंद झाल्या. मुलांचे शिक्षणाचे नुकसान होण्यास सुरुवात झाली. शासनाने व शिक्षण संस्थांनी मुलांना शिक्षण घेण्यासाठी आॅनलाइन शिक्षण पध्दती अमलात आणली. यासाठी नेट. अॅनडराईड मोबाईल गरजेचे आहेत. शहरांत ही अडचण आली नाही पण ग्रामीण भागात नेट नाही त्यामुळे बर्याच मुलांचे शिक्षणाचे नुकसान झाले. घरची परिस्थिती बेताची हालाखीची असल्यामुळे कामी पालकांना आपल्या मुलांना महागडे मोबाईल घेता आले नाही त्यामुळे मुलांचे शिक्षण नुकसान झाले ते वेगळं आणि काही मुलांनी आत्महत्या सुध्दा केल्या असे बरेच प्रसंग आपण वृतमानपत्र. दुरदशन. दुरध्वनी. यावर पाहीलया वाचल्या आरे वाईट झाले यापेक्षा वेगळी आपली प्रतिक्रिया नव्हती 

              काॅलेज महाविद्यालय विद्यालय उच्च विद्यालये यांनी शासनाने व पुणे युनिव्हर्सिटी यांच्या कडून आदेश जारी करण्यात आला होता की सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यातील शिवाजी विद्यापीठ महाविद्यालयातील कोरोना काळात जारी टाळेबंदी काळात सर्व शाळा कॉलेज विद्यालये महाविद्यालये उच्च विद्यालये सर्व बंद होती त्यावेळी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी. ज्यांनी आपल्या शिक्षण घेण्याच्या ठिकाणी प्रवेश घेण्यापेक्षा. २०२०/२१ गुणदर्शन. जिमखाना.ग्रंथालय क्रिडा. वैद्यकीय मदत. हाॅसटेल. मेस. असा कोणताही लाभ घेतलेला नाही त्याची कोणतीही भरमसाठ मनमानी पद्धतीने फी भरून घेऊ नका असा आदेश दिला होता ज्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांचेकडे २०२०/२१ ची थकीत असणारी प्रलंबित शुल्काची रक्कम भरण्यासाठी हप्त्याची सवलत देण्यात यावी प्रयोगशाळा व ग्रंथालय यामध्ये ५०/टक्के सवलत देण्यात यावी. २०१९/२०२०. उन्हाळी सत्र मार्च २०२० चया आक्टेबर अथवा नोव्हेंबर मध्ये आयोजित परीक्षांमध्ये कैरी फारववरड पध्दतीने निकाल जाहीर करण्यात आले होते अशा मुलांच्या अभ्यासक्रमाच्या २०/ टक्के परिक्षा शुल्क महाविद्यालय. अधिविभाग. विद्यापीठ. यांनी फी परत करावयाची आहे खेडेगावात शाळया जिल्हा परिषद शाळा रिकाम्या असताना शहरांमध्ये मात्र शाळा प्रवेश हीच एक समस्या आहे शहरांमध्ये काही प्रसिद्ध पावलेल्या. नावाजलेल्या शाळा असतात. तेथे प्रवेश मिळविण्याची सर्वांची धडपड असते. आज सुध्दा टाळेबंदी जारी होण्याचे संकेत आहेत तरीसुद्धा पालकांच्या कडून. प्रति विद्यार्थी. काॅलेज फी ७० हजार. आणि हाॅसटेल १५ हजार. जेवण महिन्याला ३५०० रूपये प्रमाणे पैसे भरुन घेतले जातात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुल शाळा कॉलेज विद्यालये महाविद्यालये उच्च विद्यालये मध्ये राहतात ते फक्त दोन ते तीन महिने म्हणजे समजा एका शाळा कॉलेज विद्यालये महाविद्यालये उच्च विद्यालये मध्ये अडीच ते तीन हजार विद्यार्थी शिकत असतील तर एका विद्यार्थ्यांकडून १ लाख रूपये प्रमाणे सर्व शिक्षण फी वसूल केली जाते तर तीन हजार विद्यार्थी यांचें पैसै झाले किती. म्हणजे कोणीतरी म्हणलं आहे शिक्षण क्षेत्र सर्वात मोठें दोन नंबर आहे कोणताही टॅक्स नाही. कोणताही आयकर नाही. उलट शासन अनुदान देत आहे. म्हणजे ज्या ज्या जिल्ह्यात असणारी शिक्षण संस्था ह्या राजकारणी लोकांच्या आहेत. आणि शिक्षण विद्येची देवता यांच्याच घरांत विना चुंबळीच पाणी भरत आहे हे खरे आहे. 

            सोलापूर जिल्ह्यात अशी सर्व शासकीय निमशासकीय खाजगी शाळा कॉलेज विद्यालये महाविद्यालये उच्च विद्यालये केवळ उच्च शिक्षण देण्याचे आश्वासन देऊन प्रत्येक विषयांचा आॅनलाइन तास घेतला जातो त्याला सुद्धा प्रति विषय १५ हजार फी आकारली जात आहे. म्हणजे. यशदा कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी पुणे यांनी काही दिवसांपूर्वी एक निर्णय जारी केला होता की आॅनलाइन पध्दतीने शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी यांना पैसै द्यावे लागणार म्हणजे एका बाजूने मोबाईल कंपन्या यांनी वाढलेले रिचार्ज चे दर आणि एका बाजूला शिक्षण संस्था ऑनलाईन मार्गाने लुटत आहे म्हणजे शिक्षण घेणे आज अवघड झाले आहे सोलापूर सारख्या ग्रामीण दुर्गम भागात शिक्षणाच्या नावाखाली होणारी लूट शाळा कॉलेज विद्यालये महाविद्यालये उच्च विद्यालये यांच्याकडून पालकांना होणारा आर्थिक मानसिक त्रास. पालकांना दिली जाणारी हीन वागणूक मग तुमचा मुलगा मुलगी घेवून जावा आमच्याकडून कोणतीही फी ची रक्कम आम्ही परत देवू शकत नाही. आमच्या शिक्षकांचे पगार कशा पद्धतीने द्यायचे. मग आपणापुढे मोठा प्रश्न आहे तो म्हणजे दरवर्षी कोट्यवधी रुपये गोळा करतात हे शिक्षण संस्था वाले काय कोण कोणत्या राजकारणी लोकांना लाच देत काय ? शासनाला विहित रक्कम दिली जाते का ? यांना कोण विचारत आहे का ? सोलापूर जिल्हाधिकारी झोपलेत का ? सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत आणि कोठे आहेत कुणाला माहीत आहे का ? या लुटीला आळा कोण आणि केव्हा घालणार ? म्हणजे पुढील पिढी शिक्षणा शिवाय अडाणी अशिक्षित राहणार कां ? 

          शिक्षणात सुध्दा सरकार वर्गवारी करत आहे. ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे शिक्षण घ्या म्हणजे कामगारांचा मुलगा कामगारांचं. वकिल डॉ इंजिनिअर याची मुल वरच्या स्तरावर राहणार का ? गरिबांसाठी सरकारी शाळा आणि श्रीमंतांसाठी दर्जेदार खाजगी शाळा अशीच जणू विभागणी झालेली आहे. त्यामुळे सर्वांना समान हक्काचे शिक्षण संधी कशी मिळवून द्यायची हाही एक प्रश्न आहे. सरकारी शाळेच्या तुलनेने शैक्षणिक सोयी. विविध संधी. क्रिंडागणे. वैगरे बाबतीत खाजगी शाळा सरस असल्याने येथे शिकणारया मुलांचा फायद्याचं होतो. पण सरकारला संख्यात्मक दृष्टीने शिक्षणाची सुविधा जास्तीत जास्त लोकांना उपलब्ध करून देणयावरच सर्व खर्च करावा लागतो. 

               सर्वांना शिक्षण मिळावे. हे आपले उद्दिष्ट आहे. पण शिक्षण कसे मिळावं. किती मिळावे. कोणाला उच्च शिक्षण मिळावे. वैगरे मुद्दे वादग्रस्त आहेत. म्हणूनच प्रौढ शिक्षणावर पैसे खर्च करावेत की प्राथमिक शाळांवर की उच्च शिक्षणावर असा प्रश्न उद्भवतो. शिकू इच्छिणारे वाढती संख्या आणि अपुरया सुविधा यामुळे तणाव निर्माण होतात. शिक्षणा बद्दलचा मुख्य प्रश्न आहे तो सरकारी शिक्षण आणि खाजगी शिक्षण यांच्या प्रमाणाचा. पूर्वप्राथमिक शिक्षण खाजगीच असते. पण सरकारी शाळांना सरकार अनुदान देते व त्यांच्यावर नियंत्रण ठेवते. त्यांच्या म्हणजे शासन सरकार बरोबर खाजगी शाळाही असतात. त्याच संस्था बहुतेक वेळा इंग्रजी उच्च शिक्षण देणारया असतांत. भरमसाठ फी घेऊन तेथे शिक्षण दिले जाते. त्यामुळे पैसे वाले. राजकारणी. सावरकर. अशा उच्चवर्णीय लोकांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय होते. यामुळे उच्च शिक्षण हे खाजगी असू नये असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे. अभियांत्रिकी व व्यवसायिक. डॉ. वकिल. इंजिनिअर. यांसारखे शिक्षण देणारया संस्था सरकारी निमसरकारी संस्थांमध्ये मर्यादित विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो आणि दिला जातो कारण तेवढी फी भरण्याची आपली तयारी नसते. त्यामुळे आत्ता उच्च शिक्षणाच्या खाजगीकरणाचा विचार प्रबळ होऊ लागला आहे. त्यातून गुणवत्ता. फी वाढ. शाळा कॉलेज विद्यालये महाविद्यालये उच्च विद्यालये यांची फी चया नावाखाली भरमसाठ वसुली. असे प्रश्न निर्माण होतात. पण जास्तीत जास्त मुलांना हे आकर्षक अभ्यासक्रम पूर्ण करता यावे म्हणून अशा खाजगीकरणाचा उपाय सुचवला आहे.

      समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

शिक्षण धनिकांचे गुलाम आहे?

 


शिक्षण धनिकांचे गुलाम आहे?

      . 2020 रोजी कोरोना सारखे महामारी भयंकर संकटाने सर्वत्र थैमान घातले. गाडीला घुणा लागावा तसा सर्व मानवी जीवन विस्कळीत झाले. कोरोना सारख्या महाभयंकर महामारी संकटापासून वाचण्यासाठी शासनाने लाॅकडाऊन जारी केला. सर्वसामान्य माणूस. हातावर चे पोट असणारे कामगार. नोकरवर्ग. फळें फुले भाजीपाला विक्री करणारे. बांधकाम कामगार. वडापाव गाडी. चायनिज असे विविध रस्त्यांवर व्यवसाय करणारे टाळेबंदी काळात अडचणीत आले. लहान सहान कंपन्या. लहान उद्योग. मोठ्या कंपन्या. यातील कामगार बेरोजगार होऊन गावाकडे आले गावात सुध्दा त्यांना म्हणावी अशी वागणूक मिळाली नाही. एस टी कामगार. घरकाम करणाऱ्या महिलां. पापड लोणची चटण्या तयार करणारे बचत गट पॅसेंजर वडाप करणारे वाहनं चालक आणि मालक. मालवाहतूक करणारे वाहन चालक व मालक. यांनी बॅंकेकडून कर्ज काढून हप्त्यावर घेतलेली वाहने टाळेबंदी काळात जागयावरच उभी राहिली. एस टी कामगार व यांना सुध्दा टाळेबंदी काळात आपली हक्काची नोकरी सोडून घरांत बसावें लागलें इतर वाहनं व्यवसाय करणारे यांनी मिळेल ते काम केले ज्यांना हे जमलं नाही त्यांनी आपली व आपल्या कुटुंबाची उपासमारीची वेळ बिकट वेळ बघून त्यांना हे सर्व बघावले नाही आणि त्यांनी आत्महत्या सारखें मार्ग निवडले आणि आपलीं जीवन यात्रा संपवली किती वाईट आहे 

              कोरोना काळात वरिल प्रकारा पेक्षा जास्त भयानक प्रकार आणि आपणांस व आपल्या मुलांना अंधारात घालणारा काळ म्हणजे शाळा बंद शिक्षण थांबले. विद्यार्थी यांचें मोठे नुकसान होण्यास सुरुवात झाली. कोरोना पासून भावी पिढी वाचावी यासाठी शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. शासनाने पुन्हा अजून एक निर्णय घेतला तो म्हणजे आॅनलाइन शिक्षण घेण्याचा. मग काय ग्रामीण भागात असणार्या शाळा व विद्यालये विद्यार्थी यांना मोबाईल रेंज चा त्रास सहन करावा लागला. ग्रामीण भागात लाईट अनियमितता आॅनलाइन तास असतील त्यावेळी लाईट असेलच असे नाही. लाईट नाही म्हणजे मोबाईल चार्जिंग नाही. आपलं मुलं शिकाव अशी प्रत्त्येक पालकांची इच्छा असते. ग्रामीण भागात अशी काही कुटुंब आहेत की रोज कामाला गेल्याशिवाय घरात चूल पेटत नाही त्यांच्या मुलांना कुठला अॅनडराॅइड मोबाईल. घरातील मंडळी त्या मुलांची समजूत काढत. पण शिक्षण आॅनलाइन आहे माझा अभ्यास पुढे जाईल या मानसिकतेतून. काही मुलांनी मोबाईल साठी आत्महत्या केल्याचे प्रकार आपण वृतमानपत्रात बघतो वाचतो. काय अपराध केला होता त्या पालकांनी ग्रामीण भागात शहरी भागात शाळा कॉलेज विद्यालये महाविद्यालये उच्च शिक्षण देणारी विद्यापीठ. यात समोर बसून शिक्षण घेणारे विद्यार्थी. यांना काय मोबाईलची गरज कधी पडली नाही. शहरात आज अनेक मुलांच्या कडे मोबाईल आहेत कारणं घरची परिस्थिती चांगली असते आई वडील नोकरीला असतात त्यामुळे त्यांना जास्त त्रासाचा विषय नाही. मोबाईल रिचार्ज वेळेवर मिळतो. ग्रामीण भागातील लोकांची प्रस्थिती बेताची असते त्यामुळे मोबाईल रिचार्ज साठी पैसे सुध्दा नसतात त्यावेळी घरातील बाजार थांबवून मुलांच्या आॅनलाइन शिक्षणासाठी मोबाईल रिचार्ज करणारे पालक मी बघितले आहेत. नेमकं काय आहे षडयंत्र. मोबाईल कंपन्या आणि सरकार यांच काय साटंलोटं आहे का ? कारण सर्व नोंदणी अर्ज. बॅंक खात्यातील व्यवहार. अस सर्व आत्ता आपण न जाता मोबाईल वरून आपण घर बसल्या करु शकतो. म्हणजे सर्व आॅनलाइन मोबाईल शिवाय होणार नाही त्यामुळे मोबाईल कंपन्या बरोबर सरकारने करार केला आहे काय अशी शंका आली आहे 

            आज दिड वर्ष झाले तरीही शिक्षण व्यवस्थेत सुधारणा झाली नाही अजून सुद्धा महिन्याला चारसे पाचसे रुपये मोबाईल रिचार्ज आॅनलाइन शिक्षण घेण्यासाठी आजपर्यंत किती पैसे आपण मोबाईल रिचार्ज चया नावाखाली घालवले असतील. त्यांचा काय हिशोब आहे का? पैसे गेले वाईट वाटत नाही पण शाळेत मिळणारे शिक्षकाने शिकविलेले शिक्षण मुलांना कळत नाही मग मोबाईल वर आॅनलाइन पध्दतीने शिक्षण घेणारी मुलं काय शिकली असतील. ज्यांचे पालक शिक्षित आहे ते आपल्या मुलांचा अभ्यास घेतील पण ज्याचे पालक अडाणी अशिक्षित आहे त्यांना मोबाईल सुध्दा पकडता येत नाही आपला मुलगा मोबाईल वर काय शिकतो काय करतो काय कळणार त्या पालकांना म्हणजे आॅनलाइन पध्दतीने मिळवणारे शिक्षण मोठ्यांच्या मुलांना हुशार करणारं आणि गोरगरीब मुलांना अडाणी ठेवणारं काय असा मोठा प्रश्न पालकांच्या पुढं उभा आहे. 

          शासनाला जाग आली आणि शासनाने एक दिवस निर्णय जाहीर केला ८/१० /१२ ह्या सुरू करण्याचा मुलांना पालकांना आनंद झाला. एवढ्या दिवसांच्या प्रतिक्षे नंतर आपण शाळेत जाणार जुणे मित्र मैत्रिणी भेटणार. शाळेत खेळायला मिळणार. आॅनलाइन शिक्षण घेताना होणारें जागरण त्यामुळे लवकर उठण्याची बिघडलेली वेळ पुन्हा मूळ पदावर येणार. शारीरिक हालचाल. शारीरिक व्यायाम. शारीरिक बौद्धिक मानसिक तयारी ही फक्त शाळेतच होते मुलांचे एकामेकासोबत मनमोकळेपणाने बोलने. मुलांचं काही बौद्धिक खेळ मेंदूला आणि शरिराला झटकून जाग करणारं असतं मुल दिड वर्ष रोज मोबाईल समोर बसून मानसिक कमकुवत झाली आहेत. शाळा सुरू करताना शाळेची स्वच्छता निर्जंतुकीकरण करून घ्यावे मुलांना रोगांपासून संरक्षणासाठी पाठ देणे गरजेचे आहे. ज्या मुलांचे कोरोना काळात घरातील कोणताही व्यक्ति दगावणे असे काही नुकसान झाले असेल तर त्याबद्दल त्यांना सारखी आठवण करून तुमचे पालक पाव्हणं कोरोनाने मृत्यू पावले आहेत हे. काहीजण स्थलांतरित परस्थिती मुळे झाले आहेत. बोलू नये त्यामुळे त्या मुलांना मानसिक ताण त्रास होईल असे कोणतेही कृत्य करु नये तशी सक्त ताकीद देण्यात यावी 

              शाळा सुरू होण्याचा आपणांस पालक शिक्षक यांना व विद्यार्थी यांना आनंद झाला आहे. परंतु चालू झालेल्या शाळा तशाच चालू राहवया यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयतण करणे गरजेचे आहे. आणि हे काम शाळा शिक्षक करतील पण तेवढ्याने भागणार नाही. मुलांची वाहतूक व्यवस्था. यांनी सुध्दा काळजी घेणे गरजेचे आहे. पालकांनी मुलांना शाळेत सोडणयास यावे. कारणं दिड वर्षांनंतर चालू होणारी शाळा मुलांना आवडलं का नाही त्यामुळे आपण मुलांना शाळेत सोडणे याची जबाबदारी घेणे गरजेचे आहे   

      शासनाने परवा २०२१ ला एक शासन निर्णय जारी केला आहे त्यानुसार शालेय मुलांची फी साठी अडवणूक करु नका असे स्पष्ट निर्देश दिले आहेत पण त्यात सक्ती करु नका असाही आदेश दिला आहे. म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की फी माफ केली जाणार आहे. आम्ही इस्लामपूर पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी यांचीशी चर्चा केली असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जर शाळांनी फी माफ केली तर त्या शाळेत शिकवण्याचे काम करणारे शिक्षक यांचा पगार कसा भागणार ? मग जिल्हा परिषद पंचायत समिती यांचे निर्देश नुसार चालणार्या १/८ पर्यंत शाळा यामधील शिक्षक कायमस्वरूपी नोकरिवर आहेत त्यांचा पगार शासन देतय ना ? मग फी माफ केली तर बिघडत नाही 

          याउलट उच्च शिक्षण देणारी विद्यापीठ काॅलेज महाविद्यालय विद्यालय. यातील परिक्षा काळ जवळ येण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे या सर्व शालेय खाजगी सरकारी शालेय संस्थांनी. लाईट बील. घरफाळा पानपट्टी यांवर जसे इतर कर लावलें जातात तसा प्रकार चालू केला आहे. म्हणजे परिक्षा फी. कमी आणि लॅबररी कर. इंटरनेट कर फाॅरम भरण्याची फि काॅलेज मध्ये लागणारी सर्व स्टेशनरी बाहेरुन आणावी लागते. एवढेच काय पण रिझल्ट सुध्दा बाहेर नेट कॅफे मधून काढावा लागतो. अशा एक नाही अनेक मार्गाने विद्यार्थी आणि पालक यांना लुटायच चालू आहे. आत्ता सर्व पालक यांनी एकत्र येऊन या लुटीबाबत आवाज उठवण्याची गरज आहे. विद्यार्थी यांनी आपणं भरत असलेल्या कोणत्याही फी बाबत पावती घ्यावी. 

          मुल शाळेत जातात त्यांच्याबरोबर घरात रानात. नोकरिवर असणारे आपले पालक यांची स्वप्ने घेऊन आपण शाळेत जात असतो पण आज शिक्षण फक्त पैसा असणारे विद्यार्थी यांचेच आहे कारणं आपले पालक गरिब असल्यामुळे फी भरु शकत नाहीत त्यातच स्पर्धा परीक्षा वर्गाच्या व परिक्षा पूर्व शिक्षण या नावाखाली अनेक ठिकाणी अॅकेडमी यांचें प्रत्त्येक गावात पेव फुटले आहे त्यांनी २०२० मध्ये जानेवारी महिन्यात फी भरून घेतलीं आणि मार्च महिन्यापासून टाळेबंदी जारी झाली आणि सर्व अॅकेडमी बंद पडल्या. मात्र एकाही मुलांची फी मागे देण्यात आली नाही मग महाराष्ट्र मध्ये अशा किती अॅकेडमी असतील आणि २०२१ मध्ये सुद्धा तसाच प्रकार बघायला मिळत आहे म्हणजे लाखों रुपये मिळविण्याचा एक वेगळ्याच फंडा आहे. त्यातच उच्च शिक्षण ग्रामीण भागात उपलब्ध नसल्याने या भागातील मुले शहरात होस्टेलमध्ये राहून शिक्षण घेतात आज ज्या शाळा कॉलेज विद्यालये महाविद्यालये आहेत त्यांचेच होस्टेल आहे म्हणजे शिक्षणाची आणि होसटेलची मिळून सर्व फी लाखांच्या घरात आहे त्यांचा सुध्दा असाच प्रकार आहे जानेवारी मध्ये पैसे भरुन घ्यायचे आणि मार्च मध्ये शाळा बंद म्हणजे पालकांनी पैसे भरुन सुध्दा मुल घरातच आहेत आणि आत्ता यांनी पुढील वर्षाचे अॅडमिशन घेण्यासाठी पालकांच्या कडे तगादा लावला आहे. म्हणजे शिक्षणा पेक्षा फक्त पैसा मिळविणे हा एक महत्वाचा उद्देश या सर्वांचा आहे आपणांस काहीतरी करण्याची गरज आहे

    समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

इतिहास किती विक्रुत कराल ?

 इतिहास किती विक्रुत कराल ?



 मुस्लिम राजवट व समानता 

हिंदू मुस्लिम यांचे धार्मिक आचार - विचार जरी भिन्न होते तरी त्यांनी कधी एकमेकांचा द्वेष केला नाही व याला पुरावा म्हणून शेकडो उदाहरणे देता येतील - प्रसिद्ध इतिहासकार डॉ. ईश्वरी प्रसाद.

सद्य परिस्थितीचा विचार केला तर एक गोष्ट चटकन लक्षात येईल की, आज देशापुढे अनेक बिकट प्रश्न उभे आहेत परंतु काही स्वार्थी व राजकारणी लोकसत्ता हस्तगत करण्यासाठी तर काही आपली सत्ता टिकवण्यासाठी जातीयतेचा आधार घेत आहेत. देशातील शांत व पवित्र वातावरण सतत तापत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आधीच दारिद्र्य, उपासमारी, विघटनवादी शक्तींनी देशाला पछाडले आहे व त्यातच भर म्हणून मशिद, मंदिर या वादाला ज्वालामुखीचे रुप देण्याचे दुष्ट प्रकार सुरु आहेत.

इतिहासाचा विपर्यास केला जात आहे. अशाच काही गोष्टींवर प्रकाश टाकणारे हे विचार भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या 'हिंदुस्तान का मुस्तकबिल' या प्रसिद्ध पुस्तकातून वेचणेत आले आहेत.

'हर शाख पे उल्लू बैठा है, अन्जामें गुलिस्ताँ क्या होगा'

अशी सध्या स्थिती आहे. डॉ. बाबूंच्या लिखाणातून आम्ही काही धडा घेऊ हीच अपेक्षा. 

ज्याकाळी भारतात मुस्लिम बादशाहचा अंमल होता त्या काळाचे एक ठळक वैशिष्ट्य हे आहे की, त्या वेळेस धार्मिक द्वेषाचे, जातीद्वेषाचे किटाणू समाजात मुळीच नव्हते. मुस्लीम राजवटीत अधिपत्याखाली असलेल्या प्रदेशात हिंद व हिंदू राज्यांच्या अंमलाखाली असलेल्या क्षेत्रात हिंदू, मुस्लिम दोन्ही समाज एकोप्याने, सलोख्याने सुखनैवपणे जीवन जगत होते. प्रसिद्ध इतिहासकार डॉ. ईश्वरी प्रसाद आपल्या 'तारीखे हिंद' या पुस्तकात लिहितात की, 'हिंदु - मुस्लिम यांचे धार्मिक आचार - विचार जरी भिन्न होते तरी त्यांनी एकमेकांचा द्वेष केला नाही की असूया बाळगली नाही. याला पुरावा म्हणून शेकडो उदाहरणे देता येतील. जसे मुस्लिम बादशहांनी हिंदूंना व हिंदू राजांनी मुसलमानांना आपल्या क्षेत्रात त्यांच्या धार्मिक स्थळांना, मंदिरांना दिलेल्या देणग्या, जहांगिऱ्या दिल्याचे पुरावे आजही अस्तित्वात आहेत. ज्या लोकांना इतिहास विषयी आवड आहे किंवा जे सत्य शोधण्याचा प्रयत्न करणारे आहेत. अशा इतिहासप्रेमी मंडळींना दक्षिण भारताच्या इतिहासात अशा घटना पदोपदी आढळतील. ज्या आदिलशाही व कुतुबशाही घराण्यांनी हिंदूंच्या कित्येक धार्मिक स्थळांना मोठमोठ्या जहांगिऱ्या व देणग्या बहाल केल्याचा उल्लेख सापडतो. खुद्द मलाच माहीत असलेली दोन उदाहरणे इथे नमूद करतो. क्षेत्र गया येथील बुद्ध महंत यांना प्रदान केलेला मोठा जमीनजुमला की ज्याचे वार्षिक उत्पन्न लाखाहून जास्त आहे. ही देणगी त्या महंताला दिली होती. दिल्लीच्या महंमदशाह याने त्याचबरोबर एका फर्मानद्वारे 'मस्तीपूर ताखय्या' नावाचे गाव महंत लालगीर यांना देण्यात आले. महंत लालगीर हे बौध्दधर्माचे उपदेशक व पंडितही होते. त्याचप्रमाणे 'दरभंगा' येथील विस्तृत व भव्य असा जमीन - जुमला जो बहुधा भारतातील सर्वात मोठा जमीन जुमला गणला जातो. तो सम्राट अकबराने तत्कालीन ब्राह्मण महाराज, अधिराज यांच्या पूर्वजांना त्यांच्या विद्ववत्तेवर खूष होऊन बहाल केला होता.

ज्ञानाची ओढ आपल्या प्रजेत निर्माण करण्याकरिता 'शेरशाह याने आपल्या हिंदू प्रजेस त्यांच्या शैक्षणिक संस्थांना आर्थिक सहाय्य देऊन शिक्षणाला उत्तेजन दिले. (मुस्लिम रोल इन इंडिया) अशाच प्रकारे मुस्लिम बादशहांनी अन्य धर्मियांना दिलेली समानतेची वागणूक ही सुद्धा उल्लेखनीय आहे. याचे उदाहरण म्हणून डॉ. सय्यद महामूद यांनी माझ्याशी चर्चा करताना म्हटले होते की, 'काश्मीरचे सुलतान जैनुल आबिदीन यांनी अमरनाथ व शारदादेवीच्या मंदिराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकरिता कित्येक विश्रांतीग्रुहे उभारुन येणाऱ्या यात्रेकरुंसाठी त्यांच्या खाण्यापिण्याची उत्तम सोय उपलब्ध करुन दिली. त्याचप्रमाणे नजिबाबदच्या पठाणांचा १७८० मध्ये हरिद्वार वर सत्ता होती. तेव्हा पठाण नवाबांने हरिद्वारेस येणाऱ्या हिंदू यात्रेकरुंसाठी त्यांच्या सुखसोयींकरिता भव्य अशा धर्मशाळा आजतागायत असून त्यांचा ताबा हिंदूंकडेच आहे. १५८८ मध्ये गुरु अर्जुनदेव यांनी अम्रुतसरला एक तलाव खोदून त्याचवर्षी पूजा - अर्चेकरिता मंदिरांची स्थापना केली. या मंदिराचा पाया मियाँ मीर उर्फ बालपिर या मुस्लिम विद्वानाच्या हस्ते रचण्यात आला आहे. हे या मंदिराचे खास वैशिष्ट्य आहे.

'सजानराव' हे औरंगजेब कालीन इतिहासकार. त्यांनी लिहिलेल्या ' खुलास्ते तवारीख' मधील दोन - तीन घटनांचा येथे उल्लेख करणे अत्यावश्यक आहे. या ग्रंथात सजानराव लिहितात, 'दिपादाल' हे गाव कलानूरच्या जवळ आहे. त्याच गावी प्रसिद्ध औलिया शाह शम्सुद्दीन दरबारी रह. यांची मजार आहे. शाह शम्सुद्दीन हे एक सत्पुरुष होते. त्यांनी हिंदू - मुस्लीम भेद न करता सर्व धर्मियांना समानतेचा उपदेश केला. त्यांच्या शिष्यगणात सर्वधर्मी लोकांचा भरणा होता. 'दिपाली' नावाच्या एका हिंदू शिष्याची श्रद्धा शाहबाबांवर इतकी जबरदस्त बसली होती की पुढे चालून शाहसाहेबांचा पट्टशिष्य होण्याचा बहुमान त्यासच मिळाला. शाहबाबांच्या म्रुत्युनंतर दर्ग्याची देखभाल करण्याचे कार्य दिपावलीवरच येऊन पडले. यावर काही मुस्लिमांनी आक्षेप घेतला परंतु औरंगजेब आलमगिरच्या सत्तेने तो आक्षेप धुडकावून दिला व दिपाली यालाच त्या दर्ग्याचा कर्तुम कर्तुम म्हणून घोषित केले. अशाच प्रकारे ओरंगजेबकालीन दोन देणगी स्वरुपाच्या फर्मानाकडे आपण नजर टाकूया. ज्यामध्ये एक फर्मान प्रसिद्ध नाथांच्या मंदिरातील पुजाऱ्यांच्या पक्षात असून दुसरे गिरधर वल्द जगजीवन (राहणार. बस्ती बनारस) तसेच जधो मिश्र (रा. महेशपूर परगणा हवेली) आणि पंडित निहालचंद्र मिश्र या नावाने आहे. वर नमूद केलेल्या तिन्ही महंतांना जहांगिऱ्या प्रदान करण्याचा आदेश या फर्मानात दिलेला असून या जहांगिऱ्या बहाल केल्या औरंगजेबांनी. त्याचबरोबर नगदी १०० रुपयांची देणगी म्हणून श्री. कल्याणदास मिश्र (सुलतान) यांनाही देण्यात आली.

परमधर्मीविषयी आदरपूर्व द्रुष्टीकोन बाळगणारा सुलतान महमंद यांचा तर हटकून उल्लेख करावासा वाटतो. सुलतान महमंद यांने तर ११५३ मध्ये उज्जैन येथील महाकाली देवीच्या मंदिरातील दिवा सतत प्रज्वलित रहावा यासाठी आपल्या मोदी खान्यातून दररोज ४ शेर शुध्द तूप पुरविण्याची व्यवस्था केली होती. भिन्न धर्मियांना समानतेची वागणूक मिळावी, देशातील एकता टिकावी म्हणून न्यायदानाच्या बाबतीत पक्षपाती भूमिका न घेता त्या त्या धर्मानुसार प्रजेस योग्य न्याय मिळावा अशी तळमळ बाळगणारा बाबर व त्याचे म्रुत्यूपत्र आजही आम्हास इतिहासात आढळतो, ज्याचा या ठिकाणी उल्लेख करणे प्रसंगानुरुप होईल. बाबर आपल्या म्रुत्यूपत्रात आपल्या पुत्रास ( हुमायून) उपदेशितो की, 'प्रिय पुत्रा हिंदुस्थानातील लोक भिन्न, भिन्न पंथात विभागलेले आहेत. त्यांचे सर्वश्रेष्ठ अल्लाह) शतशः आभार मान की, त्याने तुला या लोकांचा राजा बनविले. आता तुझे हे कर्तव्य आहे की, आपल्या मनातून धार्मिक द्वेष पुसून टाक व प्रत्येक धर्मानुयायांचा न्याय कर अन् न्यायही असा करावा की, राजा प्रजेवर व प्रजा राजावर खूष राहील. केव्हाही कोणत्याच धर्माच्या अनुयायांचे त्यांच्या धार्मिक स्थळांचे अवमूल्यन करु नकोस व भिन्न भिन्न विचारांच्या लोकांना एकत्र येण्याची संधी उपलब्ध करुन दे जेणेकरुन विश्वास, एकता, सलोखा निर्माण होईल. (मोरखायकमजमादिल अव्वल ९३५ हिजरी, बाबर की वसियत) या भाषांतराची एक प्रत डॉ. बालक्रुष्ण, प्रिन्सिपाँल राजाराम काँलेज, कोल्हापूर यांच्याकडे होती. संदर्भ (दै. सर्चलाईट दि. ३० मे १९२६)

वरील निवडक विचार भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या 'हिंदुस्तान का मुस्तकबिल' या प्रसिद्ध पुस्तकातून वेचणेत आले असून डॉ. बाबूंनी या ग्रंथाची निर्मिती भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी केली होती. क्रुपया वाचकांनी याची नोंद घ्यावी

         "का आळ खंजीरावर 

          घेता तुम्ही खुनाचा

          का वाटतो तुम्हाला

          तो सोयरा असावा"

 मुजफ्फरभाई सय्यद

 कार्याध्यक्ष

 अ. भा. साहित्य कलामंच

 ९९६०३२५०५७

वाचा -

शाह वजीहउद्दीन मिन्हाजी - FREEDOM FIGHTER ...

विद्यापीठाची स्थापना व टिपूंचे ग्रंथालय - Tipu Sultan...

मुस्लिम आरक्षणाचे वास्तव - MUSLIM RESERVATION...

सियासत और मुसलमान - AIMIM INDIA ...

मौलाना हसरत मोहानी - Indian Freedom Fighter ...

धर्मनिरपेक्ष, सहिष्णू, अमर शहिद टीपू सुलतान (रह.) - HAZRAT TIPU SULTAN R.

 धर्मनिरपेक्ष, सहिष्णू, अमर शहिद टीपू सुलतान (रह.)


देश -

ह. टीपू सूलतान र. हा अत्यंत धार्मिक व्रुत्तीचा होता. याच बरोबर तो पूर्वग्रह दोषापासून दूर आणि अत्यंत सहिष्णू व्रुत्तीचा होता. हि गोष्ट सर्व न्यायनिष्ठ इतिहासकारांनी मान्य केलेली आहे. पूर्वग्रह दोष बाळगणाऱ्या इतिहासकारांनी याबाबतची सुलतान टीपूची बदनामी करण्याचा खूप आटापिटा केलेला आहे. भारतातील हिंदू मुसलमानांमध्ये फूट पाडावी व आपली सत्ता कायम टिकवावी अशी इंग्रजांची कुटील नीती होती ही गोष्ट तर जगप्रसिद्ध आहे. म्हैसूरच्या कणाकणात अमर शहिद टीपू सुलतानच्या धार्मिक सहिष्णुतेचे पुरावे आजही अस्तित्वात आहेत. हल्ली तर प्रवास करणे इतके सोपे झाले आहे की ज्याला सत्य जाणून घ्यायचे आहे तो प्रत्येक मनुष्य म्हैसुरात जाऊन टीपू सुलतानच्या धार्मिक सहिष्णुतेचे आपल्या डोळ्यांनी दर्शन घेऊ शकतो.

म्हैसूर राज्यात प्रवेश करताच सर्वप्रथम ज्या इमारती आपल्या अस्तित्वाची चोहिकडे ठळकपणे जाणीव करुन देतात त्या म्हणजे हिंदूची प्राचीन मठ व मंदिरे या होत. यापैकी काही तर हजार वर्षाच्याही पूर्वी बांधलेली आहेत. टीपू सुलतान जर द्वेष बाळगणारा असता तर सदरहू मंदिरे नामशेष करणे त्याला सहज शक्य होते परंतु याच्या अगदी उलट या मंदिरांना त्याने जहांगिऱ्या व इनाम दिलेले आहेत. यासंबंधीची शाही फर्माने व सनदा अद्यापही सदरहू मंदिरात उपलब्ध आहेत. सत्य शोधणाऱ्यांसाठी त्या लाभदायी ठरु शकतात.

श्रीरंगापट्टनम टीपू सुलतानच्या राजधानीचे शहर पुष्कळांनी पाहिले असेलच. प्रतिवर्षी दूरदूरहून हजारोंच्या संख्येत लोक ते पाहण्यासाठी येतच असतात. श्रीरंगपट्टनम रेल्वे स्थानकाच्या बाहेर पडताक्षणीच दोन भव्य मंदिरांवर पर्यटकांची द्रुष्टी खिळून राहते. या मंदिराच्या अगदी जवळच टीपू सुलतानचा राजमहल होता. त्यांच्या महालाच्या पाठीमागे अगदी लागून दुसरे एक भव्य मंदिर आहे. बंगलोरात देखील टीपूच्या महालाला लागून एक लहान मंदिर अद्यापही उभे आहे तसेच म्हैसूर प्रदेशातील श्रीनगरी, वेल्लूर, नजनगड, अल्सुर, बंगलुर इ. ठिकाणी अशीच कित्येक शतकांपूर्वी बांधलेली मंदिरे अद्यापही डौलाने उभी आहेत. या मंदिरातही टीपूने 'वतने' व 'इनाम' दिलेले आहेत. या मंदिरातील स्वामी व आचारींबद्दल त्याच्या मनात नितांत आदर होता. याबाबत बोलके पुरावे व प्रमाण आजही म्हैसूर राज्यातील पुरातन विभागात सुरक्षित आहेत.

म्हैसुरच्या पुरातन विभागाच्या अहवालाबाबत इ. स. १९१६ यात लिहिले आहे. श्रीनगरीच्या मठात नवाब हैदर अलीचे तीन पुत्र व टीपू सुलतानची तीस पत्रे व फर्मान मिळवली आहेत. सदरहून पत्र व फर्मानात हिजरी सणाबरोबरच स्वत: सुलतानने निर्माण केलेला मौलदी सनदी लिहिलेला आहे. इतर पत्रांच्याविरुध्द ज्यांच्यात सुलतानचे नाव प्रथम लिहिले जात असे. सुलतान श्रीनगरी मठाच्या शंकराचार्याचे नाव व मायने प्रथम लिहिले आहेत. स्वतः च्या नावाबरोबर त्याने कोणताच किताब व मायना लिहिलेला नाही. या पत्रापैकी बहुतेक पत्र म्हैसूरच्या तिसऱ्या युध्दातील घटनांवर प्रखरपणे प्रकाश टाकतात. काही पत्रे श्रीनगरी मठातील शंकराचार्यांनी लिहिलेल्या पत्राच्या उत्तरात लिहिलेली आहेत.

म्हैसुरच्या तिसऱ्या युद्धात इंग्रज निजाम व पेशवे तिन्हींनी टीपूवर हल्ला चढविला होता. पेशवाई सैन्य भाऊंच्या तैनातीत होते. सदरहून सैन्याने इतर सर्व प्रदेशात लूटमार आणि विनाश तर पसरविलाच परंतु श्रीनगरीसारखे स्थळही त्यांच्या हातून वाचू शकले नाही. शंकराचार्यांनी टीपू सुलतानला लिहिले की पेशवाई सैन्याने श्रीनगरातील मठ लुटून उध्दवस्त केला आहे. शारदा देवतेची मूर्ती देखील आपल्या जागेतून उखडून फेकून टाकली आहे. मठातील हत्ती व घोडे इत्यादी सर्व मराठी सैन्याने लुटून नेले आहे. 

याचे उत्तर टीपू सुलतानने मोहरब्बानी ३० इ. स.१७९१ ला खालीलप्रमाणे दिले आहे. आमच्या मुलुखावर हल्ला चढवून जे आमच्या रयतेला छळीत आहेत त्या शत्रुंना आम्ही शिक्षा करीत आहोत. आपण सार त्याग केलेले विभूती आहात म्हणून शत्रूंचा नाश व्हावा यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करणे आपले व मंदिरातील इतर ब्राम्हणांचे कर्तव्य आहे. जेणेकरुन देश सुरक्षित व रयत सुखी आणि आनंदित रहावी.

दुसऱ्या एका पत्रात स्वामीजींनी सुलतानला लिहिले होते की त्यांना अन्य एका ठिकाणी मुक्काम हलविणे भाग पडले आहे. तसेच पेशव्यांच्या सैन्यांनी मंदिरात शिरुन ब्राम्हणांना ठार व जखमी केले आहे. शिवाय मंदिरातील सर्व मालमत्ता लुटून नेली आहे. म्हणूनच सरकारच्या मदतीशिवाय शारदादेवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणे शक्य नाही यांच्या उत्तरात सुलतानने लिहिले पवित्र स्थळांचे अनादर करताना देखील जे लोक नाहीत या कलियुगात क्वचितच आपली कडू फळे मिळतील. लोक वाईट क्रुत्य हसत हसत करतात परंतु त्यांची कडू फळे रडत रडत चाखतील. शंकराचार्यांशी द्रोह म्हणजेच स्वतःचे वंश निर्मूलन करणे होय.  

या पत्रासह टीपू सुलतानने एक आज्ञापत्रही नगरप्रमुखाच्या नावाने पाठविले होते. त्यात त्या प्रमुखाला हुकूम दिलेला होता की दोनशे राहती अशरफी रोख व दोनशे राहती किंमतीचे खाद्यान तुरंत स्वामीजींच्या सेवेत पाठविले जावेत. सदरहून पत्रात सुलतानने स्वामीजींना लिहिले होते.

'इनामी गावामधून वस्तूंची गरज असेल ती घेण्याचा आपणास अधिकार आहे. पाठविलेली रक्कम आणि अन्नपदार्थातून शारदादेवतेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना ब्राम्हणांना भोजन दिले जावे व आमच्या शत्रूंच्या विनाशासाठी प्रार्थना केली जावी.

आणखीन एक सुलतानचे पत्र 'आपण पाठविलेला प्रसाद आणि शाली मिळाल्या आहेत. आपल्या उपयोगासाठी एक शालजोडी व देवीच्या मूर्तीसाठी वस्त्रे पाठविली जात आहेत. 

जाकरी महिन्यात सुलतानने आणखी एक पत्र लिहिले आहे. त्यात स्वामीजींना कळविले आहे की 'त्यांच्या खास स्वामीसाठी एक हत्ती पाठविला जात आहे. याच पत्रात टीपूने आपल्या अधिकाऱ्यांच्या नावे जे आज्ञापत्र लिहिले होते त्याची नक्कलही जोडलेली होती. त्या आज्ञापत्रात बजावले गेले होते की स्वामीजींच्या शिष्यांवर बाहेर येण्या जाण्या संबंधी कोणतेही बंधन घातले जाऊ नये.'

हैदरी महिन्यातील एका नोंदीवरुन कळते कि स्वामीजींनी मठातील दोन विशिष्ट पूजाविधी पार पाडण्यासाठी सुलतानकडे आर्थिक सहाय्य मागितले होते. सदरहून पूजा ४८ दिवसांपर्यंत दररोज होणार होती. सुलतानने त्या विधीला मदत करण्याचे मान्य केले होते. त्यानुसार त्याने नगर प्रमुखाला आज्ञा जारी केली की श्रीनगरी पाहून व्यवस्था परिपूर्ण करण्यात स्वामीजींशी सहकार्य करावे. हैदरी महिन्यात स्वामीजींना देखील टीपू सुलतानने एक पत्र लिहिले की 'आपल्या इच्छेनुसार पूजेच्या काळात दररोज सहस्त्र ब्राह्मण भोजनासाठी व रोख रक्कम देण्यासाठी नगर प्रमुखाला हुकूम दिलेला आहे.'

दीनी महिन्यातील चार नोंदी आजही मंदिरात मौजूद आहेत. त्यापैकी पहिल्या नोंदीत नगरप्रमुख महमंद रजाखानला आदेश मिळाला आहे की पूजेच्या काळात विशिष्ट व्यवस्था ठेवावी जेणेकरुन खोडसाळ लोकांकडून मठाच्या कामकाजात बाधा येऊ नये. आणखीन एका नोंदीत टीपूने कळविले आहे की शारदा देवतेच्या मूर्तीसाठी एक पालखी व स्वामीजींच्या वापरासाठी दुसरी एक पालखी चोबदार फकीर महमंद समवेत पाठविली जात आहे.

तर जाकिरी महिन्यातील एका नोंदीत लिहिले आहे की लबाडी टोळीच्या हल्ल्यापासून मंदिर सुरक्षित ठेवण्यासाठी पायदलातील सैनिकांना मंदिराच्या रक्षणासाठी नियुक्त केले आहे. लंबाडी जंगलात राहणारी एक हिंदूजात आहे जिला 'सगाली' असेही म्हटले जाते. याच मंदिरात आणखीन एक नोंद आहे त्यात नगर जिल्हाप्रमुख सय्यद महंमद याला टीपूने लिहिले आहे 'स्वामीजी समुद्र स्नानासाठी जाणार आहेत त्यांना प्रवासात सर्व गरजेच्या वस्तू पुरविल्या जाव्यात.' टीपू सुलतानची धार्मिक सहिष्णुता दाखविणारे असे कितीतरी पुरावे आजही जिवंत आहेत. रब्बानी महिन्यातील एका नोंदीवरुन हे जास्तच स्पष्ट होते. रब्बानी महिन्यात सुलतानाने स्वामीजींना कळविले आहे की त्यांच्या उपयोगासाठी दोन चांदीच्या चिनूर पाठविलेल्या आहेत असे वाटते की स्वामीजींनी सुलतानला विनंती करताना अशी इच्छा दर्शवली होती की ते स्वत: पर्रशुराम भाऊकडे जाऊन पेशवाई सैन्याने मठातील सर्व लुटून नेलेली मालमत्ता परत करण्याची त्यांना विनंती करतील. याच्या उत्तरात टीपूने स्वामीजींना रहदारीचा परवाना देताना सर्व अधिकाऱ्यांना लिहिले आहे की स्वामीजींना प्रवासातील सर्व प्रकारच्या सवलती व गरजेच्या सर्व वस्तू उपलब्ध करुन दिल्या जाव्यात. याच पत्रात टीपूने स्वामीजींच्या उपयोगासाठी शाली, हत्ती, नौबत, नगारा आणि झेंडा पाठविल्याचा उल्लेख केला आहे. या सर्व वस्तू त्याने स्वामीजींना आपल्याकडून भेट म्हणून दिल्या होत्या. 

अशाच एका अहवालावर नजर टाकली असता हे स्पष्ट होते की स्वामीजी पुण्याला पोहोचले व पर्रशुराम भाऊच्या त्यांनी गाठी भेटी घेतल्या. परंतु त्यांना यश मिळाले नाही म्हणून त्यांना तेथे जास्त काळ रहावे लागले. यामुळेही टीपू सुलतानने त्यांना एक पत्र लिहिले हे पत्र 'रजी' महिन्यातील असून प्लेट क्र. ७०, ३ यात आज ही सुरक्षित आहे त्यात तो लिहितो

'आपण जगत गुरु आहात. जगाच्या कल्याणासाठी आपण नेहमी उपासमग्न असता. ज्या देशात आपल्यासारख्या पवित्र विभूतीचे अस्तित्व असेल त्या देशात ईश्वरक्रुपा वास करते. चांगली वर्षा व उत्तम पिके येतात. एका परक्या देशात इतका दिर्घकाळ थांबण्याची आपणास गरज काय ? आपले काम लवकर आटोपून स्वदेशात परत यावे. 

अशाच प्रकारच्या रब्बानी महिन्यातील एका पत्रात सुलतान टीपूने स्वामीजींना कळविले आहे. 'आपल्या आदेशानुसार धर्मशाळेत ब्राम्हणांना भोजन दिले जात आहे. आपल्या सुखपतेसंबंधी वेळोवेळी कळवीत रहावे. 

इ. स. १७९८ मध्ये स्वामीजींनी कळविले आहे की ते पुण्याहून परत येणार आहेत त्याच्या उत्तरात टीपूने आपल्या अधिकाऱ्यांना आदेश जारी केला आहे "वाटेत स्वामीजींना गरजेच्या वस्तू पुरविल्या जाव्यात व त्यांचा मान व प्रतिष्ठेचा आदर केला जावा." 

या आणखीन एका पत्रात सुलतानने स्वामीजींना विनंती केली आहे की राजधानीत येऊन दर्शन देण्याची क्रुपा करावी. आतापर्यंत जे काही लिहिले गेले आहे ते श्रीनगरीच्या मठाशी संबंधित आहे. सदरहू मंदिर संपूर्ण दक्षिण भारत आणि म्हैसुरात अत्यंत पवित्र व शुभ मानले जाते. येथील स्वामी बव्हंशी राजांचे धार्मिक नेते समजले जातात. हिंदूंचे वैभवशाली राज्य विजय नगर येथील राज्यांचे धार्मिक नेते याच मठातील ब्राह्मण स्वामी होते. टीपू सुलतान सदरहू मंदिर व त्यातील स्वामींशी कशा प्रकारे वागला आहे याचे बोलके पुरावे वर उल्लेखित सर्व ऐतिहासिक नोंदी व अहवाल सादर करीत आहोत. हे पुरावे अद्यापही मंदिरात सुरक्षित आहेत त्याचप्रमाणे टीपूच्या राज्यातील इतर सर्व मंदिरात देखील अशाच प्रकारचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. 

याशिवाय टिपू सुलतानची धार्मिक सहिष्णुता आणि त्याच्या उदारतेचे उदाहरण यापेक्षा मोठे अन्य कोणते असू शकते की सरकारी नोकरीत त्याने मुसलमानांबरोबरच हिंदूंनादेखील मोठमोठे हुद्दे दिले होते. पुर्निया ज्याचे नाव मीर सादीक प्रमाणेच लहान लहान मुलांच्याही तोंडात आहे त्याच्या राज्याचा दिवान होता. श्रीरंगपट्टनम आणि बंगलूर येथील किल्ल्यांना राज्यात अनन्यसाधारण महत्त्व होते. या किल्ल्याचे प्रमुख किशनराव व शताबराय होते. पोस्ट विभागाचा प्रमुख अजयश्याम होता. याशिवाय टीपूच्या राज्यातील सैन्य व शासकीय यादी पडताळली गेली तर कळविण्यात येईल की हिंदू अधिकाऱ्यांची संख्याही मुसलमान अधिकाऱ्यांच्या संख्येपेक्षा काही कमी नव्हती. ग्राम व खेड्यांचे शानभोग सर्वचे सर्व ब्राह्मण होते तसेच पाटील एक तर ब्राह्मण किंवा इतर हिंदू जातीचेच असत. 

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आपले व्रुत्तपत्र 'यंग इंडिया' यात टीपू सुलतानला वाहिलेल्या आदरांजलीत लिहिले आहे. 'टिपू सुलतान स्वावलंबी सत्ताधीश होता. परंतु आपले जमाखर्च अरबी भाषेत ठेवण्यास हिंदू सावकारांना भाग पाडावे असे विचार त्याच्या मनात कधी आले नाहीत. याउलट त्याने आपल्या राष्ट्रीय भाषेत शंकराचार्यांच्या पत्रांची उत्तरे देताना त्यांच्याकडे तोस्पयेची विनंती आणि आपल्या देशाचे भले व सर्व जगाच्या कल्याणासाठी प्रार्थनेची इच्छा केली होती. कारण पुण्यशीलांच्या पायगुणामुळे पाऊस पडतो व पिके उत्तम येतात. हे पत्र सुवर्ण अक्षरांनी लिहिण्याजोगे आहे. टिपूने हिंदू मंदिरासाठी अत्यंत उदारतेने जायदादी धर्मदाय केल्या आहेत. खुद्द टिपूच्या महालाभोवती श्री व्यंकट रामण्णा श्रीनिवास आणि श्रीरंगनाथाच्या मंदिराचे अस्तित्व सुलतानच्या उदारव्रुत्ती आणि धार्मिक सहिष्णुतेचे पुरावे आहेत. यावरुन हे सिध्द होते की शहिद टिपू सुलतान यापेक्षा श्रेष्ठ राष्ट्रीय हुतात्मा कुणी दुसरा सापडणे नाही. अल्लाहची उपासना करताना हिंदूंच्या पूजेतील घंटा निनादामुळे तो कधी त्रासला जात नव्हता. टीपूचे हे दिव्य वचन आम्हीदेखील स्मरणात ठेवले पाहिजे. 

'दोन दिवस सिंहाप्रमाणे जगणे हे कुत्र्यांच्या दोनशे वर्षाच्या जगण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. 'हे अल्लाह' युध्दाचे हे ढग ज्यांच्यातून आमच्या शिरावर रक्त ठिबकत असावे. मानहानी व निर्लज्जतेने जगण्यापेक्षा मरण पत्करणे शतपट बेहत्तर आहे.' 

अमर शहीद शेरे हिंद टिपू सुलतान (रह.) यांचा हा आम्हास संदेश . 

मुजफ्फरभाई सय्यद

कार्याध्यक्ष

अ. भा. साहित्य कलामंच

९९६०३२५०५७


वाचा - 

मुस्लिम आरक्षणाचे वास्तव - MUSLIM RESERVATION...

मराठवाड्यातील पहिले बॅरिस्टर- उमर कमाल फारुकी 1st barrister...


शिष्यवृत्ती परिक्षेत तन्मय आडेप राज्यात तृतीय - Ahmednagar scholarship

 शिष्यवृत्ती परिक्षेत तन्मय आडेप राज्यात तृतीय







अहमदनगर -

महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे यांच्यावतीने फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इ. 5 वी परिक्षेत अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचा विद्यार्थी तन्मय दत्तात्रय आडेप याने 94.44 टक्के गुण मिळवून राज्यात तृतीय येण्याचा मान मिळविला आहे. 

 चि.तन्मय यास शाळेतील शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. दत्तात्रय व सौ.रेणुका आडेप यांचा मुलगा आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. 


वाचा -

मन सुन्न करणारी घटना...

मराठवाड्यातील पहिले बॅरिस्टर- उमर कमाल फारुकी...

जागतिक दयाळू दिन - World Kindness Day..



मराठवाड्यातील पहिले बॅरिस्टर- उमर कमाल फारुकी 1st barrister

मराठवाड्यातील पहिले बॅरिस्टर उमर कमाल फारुकी



औरंगाबाद : लंडन येथे बॅरिस्टरचे शिक्षण घेत असलेल्या उमर कमाल फारुकी हे जागतिकस्तरावरील लिंकनझीन स्टुडंट्स असोसिएशनच्या प्रतिनिधीपदासाठी झालेल्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. भारताचे माजी दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यानंतर हा बहुमान उमर फारुकी यांना मिळाला आहे.


मराठवाड्यातील पहिले बॅरिस्टर

लंडनच्या लॉ युनिर्व्हसिटीतून यापूर्वी बॅ. ए.आर.अंतुले, सोमनाथ चटर्जी, मार्गारेट थॅचर, टोनी ब्लेअर, असदोद्दीन ओवेसी यांच्या सारख्या दिग्गजांनी बॅरिस्टरची पदवी मिळवली आहे. बॅरिस्टर पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात उमर फारुकी हे शिक्षण घेत आहेत. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर बॅरिस्टरची पदवी मिळविणारे ते मराठवाड्यातील पहिले व्यक्ती ठरतील.

वाचा -

जागतिक दयाळू दिन..

ऑल इंडिया मुस्लिम OBC ऑर्गनायझेशनच्या महासचिव पदी- हाजी इर्शादभाई..

शिक्षण दिवस के मौकेपर मौलाना आझाद का बयान...

शिक्षण दिवस के मौकेपर मौलाना आझाद का बयान - MAULANA AZAD

 भारत के पहेले शिक्षण मंत्री - मौलाना अबुल कलाम आझाद 

देश -

    ये स्पीच है मौलाना अबुल कलाम आज़ाद की. जो 1947 में बकरीद के मौके पर दिल्ली की जामा मस्जिद में दी गई. उन्होंने आज़ादी मिलने पर मुसलमानों को उस वक़्त ख़िताब किया. लेकिन उनकी ये बातें पढ़कर ऐसा लगता है जैसे अभी के लिए कही हैं. 

    अबुल कलाम 11 नवंबर 1888 को सऊदी अरब के मक्का में पैदा हुए थे. 22 फ़रवरी 1958 को इस दुनिया से रुखसत हो गए. इस स्पीच (बयान) को अमेरिकन स्कॉलर चौधरी मोहम्मद नईम ने उर्दू में तहरीर किया है. आप इसे हिंदी में पढ़िए. और हर मुसलमान को पढ़नी चाहिए. जो हालत आजतक मुसलमानों के बने हुए हैं वो खुद के बनाये हुए हैं. ये स्पीच बताती है कि जब तक हम खुद को नहीं बदलेंगे, कुछ नहीं हो सकता. चाहे कितनी ही सच्चर रिपोर्टें आती रहें. नेता आते रहें. कोई फर्क नहीं पड़ेगा. तो पढ़िए और सोचिए.  

    मेरे अज़ीज़ो! आप जानते हैं कि वो कौनसी ज़ंजीर है जो मुझे यहां ले आई है. मेरे लिए शाहजहां की इस यादगार मस्जिद में ये इज्तमा नया नहीं. मैंने उस ज़माने में भी किया. अब बहुत सी गर्दिशें बीत चुकी हैं. मैंने जब तुम्हें ख़िताब किया था, उस वक्त तुम्हारे चेहरों पर बेचैनी नहीं इत्मीनान था. तुम्हारे दिलों में शक के बजाए भरोसा था. आज जब तुम्हारे चेहरों की परेशानियां और दिलों की वीरानी देखता हूं तो भूली बिसरी कहानियां याद आ जाती हैं.

    तुम्हें याद है? मैंने तुम्हें पुकारा और तुमने मेरी ज़बान काट ली. मैंने क़लम उठाया और तुमने मेरे हाथ कलम कर दिए. मैंने चलना चाहा तो तुमने मेरे पांव काट दिए. मैंने करवट लेनी चाही तो तुमने मेरी कमर तोड़ दी. हद ये कि पिछले सात साल में तल्ख़ सियासत जो तुम्हें दाग़-ए-जुदाई दे गई है. उसके अहद-ए शबाब (यौवनकाल, यानी शुरुआती दौर) में भी मैंने तुम्हें ख़तरे की हर घड़ी पर झिंझोड़ा. लेकिन तुमने मेरी सदा (मदद के लिए पुकार) से न सिर्फ एतराज़ किया बल्कि गफ़लत और इनकारी की सारी सुन्नतें ताज़ा कर दीं. नतीजा मालूम ये हुआ कि आज उन्हीं खतरों ने तुम्हें घेर लिया. जिनका अंदेशा तुम्हें सिरात-ए-मुस्तक़ीम (सही रास्ते ) से दूर ले गया था.

    सच पूछो तो अब मैं जमूद (स्थिर) हूं. या फिर दौर-ए-उफ़्तादा (हेल्पलेस) सदा हूं. जिसने वतन में रहकर भी गरीब-उल-वतनी की जिंदगी गुज़ारी है. इसका मतलब ये नहीं कि जो मक़ाम मैंने पहले दिन अपने लिए चुन लिया, वहां मेरे बाल-ओ-पर काट लिए गए या मेरे आशियाने के लिए जगह नहीं रही. बल्कि मैं ये कहना चाहता हूं. मेरे दामन को तुम्हारी करगुज़ारियों से गिला है. मेरा एहसास ज़ख़्मी है और मेरे दिल को सदमा है. सोचो तो सही तुमने कौन सी राह इख़्तियार की? कहां पहुंचे और अब कहां खड़े हो? क्या ये खौफ़ की ज़िंदगी नहीं. और क्या तुम्हारे भरोसे में फर्क नहीं आ गया है. ये खौफ तुमने खुद ही पैदा किया है.

    अभी कुछ ज़्यादा वक़्त नहीं बीता, जब मैंने तुम्हें कहा था कि दो क़ौमों का नज़रिया मर्ज़े मौत का दर्जा रखता है. इसको छोड़ दो. जिनपर आपने भरोसा किया, वो भरोसा बहुत तेज़ी से टूट रहा है, लेकिन तुमने सुनी की अनसुनी सब बराबर कर दी. और ये न सोचा कि वक़्त और उसकी रफ़्तार तुम्हारे लिए अपना वजूद नहीं बदल सकते. वक़्त की रफ़्तार थमी नहीं. तुम देख रहे हो. जिन सहारों पर तुम्हार भरोसा था. वो तुम्हें लावारिस समझकर तक़दीर के हवाले कर गए हैं. वो तक़दीर जो तुम्हारी दिमागी मंशा से जुदा है.

    अंग्रेज़ों की बिसात तुम्हारी ख्वाहिशों के ख़िलाफ़ उलट दी गई. और रहनुमाई के वो बुत जो तुमने खड़े किए थे. वो भी दगा दे गए. हालांकि तुमने सोचा था ये बिछाई गई बिसात हमेशा के लिए है और उन्हीं बुतों की पूजा में तुम्हारी ज़िंदगी है. मैं तुम्हारे ज़ख्मों को कुरेदना नहीं चाहता और तुम्हारे इज़्तिराब (बेचैनी) में मज़ीद इज़ाफा करना मेरी ख्वाहिश नहीं है. लेकिन अगर कुछ दूर माज़ी (पास्ट) की तरफ पलट जाओ तो तुम्हारे लिए बहुत से गिरहें खुल सकती हैं.

    एक वक़्त था कि मैंने हिंदुस्तान की आज़ादी का एहसास दिलाते हुए तुम्हें पुकारा था. और कहा था कि जो होने वाला है उसको कोई कौम अपनी नहुसियत (मातम मनाने वाली स्थिति) से रोक नहीं सकती. हिंदुस्तान की तक़दीर में भी सियासी इंक़लाब लिखा जा चुका है. और उसकी गुलामी की जंजीरें 20वीं सदी की हवाएं हुर्रियत से कट कर गिरने वाली हैं. और अगर तुमने वक़्त के पहलू-बा-पहलू क़दम नहीं उठाया तो फ्यूचर का इतिहासकार लिखेगा कि तुम्हारे गिरोह ने, जो सात करोड़ मुसलमानों का गोल था. मुल्क की आज़ादी में वो रास्ता इख्तियार किया जो सफहा हस्ती से ख़त्म हो जाने वाली कौमों का होता है. आज हिंदुस्तान आज़ाद है. और तुम अपनी आंखों से देख रहे हो वो सामने लालकिला की दीवार पर आज़ाद हिंदुस्तान का झंडा शान से लहरा रहा है. ये वही झंडा है जिसकी उड़ानों से हाकिमा गुरूर के दिल आज़ाद कहकहे लगाते थे.

    ये ठीक है कि वक़्त ने तुम्हारी ख्वाहिशों के मुताबिक अंगड़ाई नहीं ली बल्कि उसने एक कौम के पैदाइशी हक़ के एहतराम में करवट बदली है. और यही वो इंकलाब है, जिसकी एक करवट ने तुम्हें बहुत हद तक खौफजदा कर दिया है. तुम ख्याल करते हो तुमसे कोई अच्छी शै (चीज़) छिन गई है और उसकी जगह कोई बुरी शै आ गई है. हां तुम्हारी बेक़रारी इसलिए है कि तुमने अपने आपको अच्छी शै के लिए तैयार नहीं किया था. और बुरी शै को अपना समझ रखा था. मेरा मतलब गैरमुल्की गुलामी से है. जिसके हाथों तुमने मुद्दतों खिलौना बनकर जिंदगी बसर की. एक वक़्त था जब तुम किसी जंग के आगाज़ की फिक्र में थे. और आज उसी जंग के अंजाम से परेशान हो.आखिर तुम्हारी इस हालत पर क्या कहूं. इधर अभी सफर की जुस्तजू ख़त्म नहीं हुई और उधर गुमराही का ख़तरा भी दर पेश आ गया.

    मेरे भाई मैंने हमेशा सियासत की ज्यादतियों से अलग रखने की कोशिश की है. कभी इस तरफ कदम भी नहीं उठाया. क्योंकि मेरी बातें पसंद नहीं आती. लेकिन आज मुझे जो कहना है उसे बेरोक होकर कहना चाहता हूं. हिंदुस्तान का बंटवारा बुनियादी तौर पर गलत था. मज़हबी इख्तिलाफ़ को जिस तरह से हवा दी गई उसका नतीजा और आसार ये ही थे जो हमने अपनी आंखों से देखे. और बदकिस्मती से कई जगह पर आज भी देख रहे हैं.

    पिछले सात बरस के हालात दोहराने से कोई फायदा नहीं. और न उससे कोई अच्छा नतीजा निकलने वाला है. अलबत्ता मुसलमानों पर जो मुसीबतों का रैला आया है वो यक़ीनन मुस्लिम लीग की ग़लत क़यादत का नतीजा है. ये सब कुछ मुस्लिम लीग के लिए हैरत की बात हो सकती है. मेरे लिए इसमें कुछ नई बात नहीं है. मैं पहले से ही इस नतीजे का अंदाजा था.

    अब हिंदुस्तान की सियासत का रुख बदल चुका है. मुस्लिम लीग के लिए यहां कोई जगह नहीं है. अब ये हमारे दिमागों पर है कि हम अच्छे अंदाज़-ए-फ़िक्र में सोच भी सकते हैं या नहीं. इसी ख्याल से मैंने नवंबर के दूसरे हफ्ते में हिंदुस्तान के मुसलमान रहनुमाओं को देहली में बुलाने का न्योता दिया है. मैं तुमको यकीन दिलाता हूं. हमको हमारे सिवा कोई फायदा नहीं पहुंचा सकता.

    मैंने तुम्हें हमेशा कहा और आज फिर कहता हूं कि नफरत का रास्ता छोड़ दो. शक से हाथ उठा लो. और बदअमली को तर्क (त्याग) दो. ये तीन धार का अनोखा खंजर लोहे की उस दोधारी तलवार से तेज़ है, जिसके घाव की कहानियां मैंने तुम्हारे नौजवानों की ज़बानी सुनी हैं. ये फरार की जिंदगी, जो तुमने हिजरत (पलायन) के नाम पर इख़्तियार की है. उसपर गौर करो. तुम्हें महसूस होगा कि ये ग़लत है.

    अपने दिलों को मज़बूत बनाओ और अपने दिमागों को सोचने की आदत डालो. और फिर देखो ये तुम्हारे फैसले कितने फायदेमंद हैं. आखिर कहां जा रहे हो? और क्यों जा रहे हो? ये देखो मस्जिद की मीनारें तुमसे उचक कर सवाल कर रही हैं कि तुमने अपनी तारीख के सफ़हात को कहां गुम कर दिया है? अभी कल की बात है कि यही जमुना के किनारे तुम्हारे काफ़िलों ने वज़ू (नमाज़ से पहले मुंह हाथ धोने का प्रोसेस) किया था. और आज तुम हो कि तुम्हें यहां रहते हुए खौफ़ महसूस होता है. हालांकि देल्ही तुम्हारे खून की सींची हुई है.

     अज़ीज़ों! अपने अंदर एक बुनियादी तब्दीली पैदा करो. जिस तरह आज से कुछ अरसे पहले तुम्हारे जोश-ओ-ख़रोश बेजा थे. उसी तरह से आज ये तुम्हारा खौफ़ बेजा है. मुसलमान और बुज़दिली या मुसलमान और इश्तआल (भड़काने की प्रक्रिया) एक जगह जमा नहीं हो सकते. सच्चे मुसलमान को कोई ताक़त हिला नहीं सकती है. और न कोई खौफ़ डरा सकता है. चंद इंसानी चेहरों के गायब हो जाने से डरो नहीं. उन्होंने तुम्हें जाने के लिए ही इकट्ठा किया था. आज उन्होंने तुम्हारे हाथ में से अपना हाथ खींच लिया है तो ये ताज्जुब की बात नहीं है. ये देखो तुम्हारे दिल तो उनके साथ रुखसत नहीं हो गए. अगर अभी तक दिल तुम्हारे पास हैं तो उनको अपने उस ख़ुदा की जलवागाह बनाओ.

    मैं क़लाम में तकरार का आदी नहीं हूं लेकिन मुझे तुम्हारे लिए बार-बार कहना पड़ रहा है. तीसरी ताक़त अपने घमंड की गठरी उठाकर रुखसत हो चुकी है. और अब नया दौर ढल रहा है. अगर अब भी तुम्हारे दिलों का मामला बदला नहीं और दिमागों की चुभन ख़त्म नहीं हुई तो फिर हालत दूसरी होगी. लेकिन अगर वाकई तुम्हारे अंदर सच्ची तब्दीली की ख्वाहिश पैदा हो गई है तो फिर इस तरह बदलो, जिस तरह तारीख (इतिहास) ने अपने को बदल लिया है. आज भी हम एक दौरे इंकलाब को पूरा कर चुके, हमारे मुल्क की तारीख़ में कुछ सफ़हे (पन्ने) ख़ाली हैं. और हम उन सफ़हो में तारीफ़ के उनवान (हेडिंग) बन सकते हैं. मगर शर्त ये है कि हम इसके लिए तैयार भी हो.

    अज़ीज़ों, तब्दीलियों के साथ चलो. ये न कहो इसके लिए तैयार नहीं थे, बल्कि तैयार हो जाओ. सितारे टूट गए, लेकिन सूरज तो चमक रहा है. उससे किरण मांग लो और उस अंधेरी राहों में बिछा दो. जहां उजाले की सख्त ज़रुरत है.

    मैं तुम्हें ये नहीं कहता कि तुम हाकिमाना इक्तेदार के मदरसे से वफ़ादारी का सर्टिफिकेट हासिल करो. मैं कहता हूं कि जो उजले नक्श-ओ-निगार तुम्हें इस हिंदुस्तान में माज़ी की यादगार के तौर पर नज़र आ रहे हैं, वो तुम्हारा ही काफ़िला लाया था. उन्हें भुलाओ नहीं. उन्हें छोड़ो नहीं. उनके वारिस बनकर रहो. और समझ लो तुम भागने के लिए तैयार नहीं तो फिर कोई ताक़त तुम्हें नहीं भगा सकती. आओ अहद (क़सम) करो कि ये मुल्क हमारा है. हम इसी के लिए हैं और उसकी तक़दीर के बुनियादी फैसले हमारी आवाज़ के बगैर अधूरे ही रहेंगे.

    आज ज़लज़लों से डरते हो? कभी तुम ख़ुद एक ज़लज़ला थे. आज अंधेरे से कांपते हो. क्या याद नहीं रहा कि तुम्हारा वजूद ख़ुद एक उजाला था. ये बादलों के पानी की सील क्या है कि तुमने भीग जाने के डर से अपने पायंचे चढ़ा लिए हैं. वो तुम्हारे ही इस्लाफ़ थे जो समुंदरों में उतर गए. पहाड़ियों की छातियों को रौंद डाला.आंधियां आईं तो उनसे कह दिया कि तुम्हारा रास्ता ये नहीं है. ये ईमान से भटकने की ही बात है जो शहंशाहों के गिरेबानों से खेलने वाले आज खुद अपने ही गिरेबान के तार बेच रहे हैं. और ख़ुदा से उस दर्जे तक गाफ़िल हो गये हैं कि जैसे उसपर कभी ईमान ही नहीं था.

    अज़ीज़ों मेरे पास कोई नया नुस्ख़ा नहीं है वही चौहदा सौ बरस पहले का नुस्ख़ा है. वो नुस्ख़ा जिसको क़ायनात का सबसे बड़ा मोहसिन (मोहम्मद साहब) लाया था. और वो नुस्ख़ा है क़ुरान का ये ऐलान, ‘बददिल न होना, और न गम करना, अगर तुम मोमिन (नेक, ईमानदार) हो, तो तुम ही ग़ालिब होगे.’

    आज की सोहबत खत्म हुई. मुझे जो कुछ कहना था वो कह चुका, लेकिन फिर कहता हूं, और बार-बार कहता हूं अपने हवास पर क़ाबू रखो. अपने गिर्द-ओ-पेश अपनी जिंदगी के रास्ते खुद बनाओ. ये कोई मंडी की चीज़ नहीं कि तुम्हें ख़रीदकर ला दूं. ये तो दिल की दुकान ही में से अमाल (कर्म) की नक़दी से दस्तयाब (हासिल) हो सकती हैं.

वस्सलाम अलेक़ुम!

फिरोज शेख 

(अहमदनगर महाराष्ट्र्र)


पढीये -

महाराष्ट्र के बाद अब बिहार मे एम आय एम की धूम..

मौलाना मुहम्मद बाकीर भारत देश के पहले शहीद पत्रकार....

आधुनिक शिक्षण व समाज...

अमेरिका की वोट गिनती ...

जामियाचे प्राध्यापक इमरान अली देशातले एक नंबर वैज्ञानिक....

मौलाना हसरत मोहानी ....

मौलाना मुहम्मद बाकीर भारत देश के पहले शहीद पत्रकार - MUHAMMAD BAQIR

 मौलाना मोहम्मद बाकीर (१७८० - १८५७) - 

भारत देश के पहले शहीद पत्रकार  


देश - 

मौलाना मोहम्मद बाकीर ने दिल्ली का पहला लिथो पर छपने वाला उर्दू अखबार शुरू किया था. 

१८५७ के समय उनके दिल्ली अखबार ने खुद को राष्ट्रीय मुद्दो के लिए समर्पित कर दिया था. 

१० मई १८५७ को विद्रोह का बिगुल बजने के बाद उन्होने अखबार का नाम "अखबार - उज-जफर' कर दिया था.

१४ सितम्बर को जब अंग्रेजी फौज दिल्ली के अंदर दाखील हुई, तो गिरफ्तार किये जाने वालो मे मौलाना पहले थे.

१६ सितम्बर को उनको मेजर हडसन के सामने लाया गया, जिसने उनको गोली मारने के आदेश दिए. 

इसके साथ वे देश के लिए शहीद होने वाले पहले पत्रकार बने.

Maulvi Muhammad Baqir  (1780-1857) started the first Litho printed urdu news paper of Delhi in 1837.

The newspaper "Delhi Urdu Akhbar" devoted itself completely to the Nationalist cause in the wake of the great revolt of 1857. 

After the revolt broke out on 10 May 1857 Maulana Baqir renamed the paperas "Akhbar-us-zafae" (Paper of zafar) to pay tribute to the leader of the revolt. 

When the British entered Delhi on 14 september 1857 he was among the first to be arrested. 

On 16 September he was produced before Major Hudson, who ordered to shoot him dead. 

Baqir was executed the same day, making him the first journalist to lay his life for the nation       


वाचा -

असदुद्दिन ओवेसी ने किया विरोधियो को चॅलेंज...     

आधुनिक शिक्षण व समाज......

अमेरिका की वोट गिनती ...

मौलाना हसरत मोहानी...


आधुनिक शिक्षण व समाज- Education

आधुनिक शिक्षण व समाज:

मुस्लिम समुदायाला मागासलेपणाची कीड लागली आहे.हा समाज शैक्षणिक,आर्थिक,राजकीय व सामाजिक दृष्ट्या मागास आहे.या समुदायाच्या मागासलेपणाला कारणीभूत असलेल्या कारणांची मीमांसा करतो तेव्हा सर्वांसाठी शैक्षणिक मागासलेपणा कारणीभूत असल्याचे दिसून येते. कोणत्याही समुदायाच्या उन्नती प्रगती समाजाचे शिक्षण हे महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असते जो समाज शिक्षण घेऊन प्रगल्भ होतो तो समाज प्रगतीपथावर असतो.

शिक्षण हे एक मूलभूत गरज झाली आहे लोक शिक्षण घेऊन पुढे जात असताना माझा समाज मागे राहतो त्यामुळे माझ्या समाजाच्या पिढीचे भविष्य काय असेल याची चिंता होणे सहाजिक आहे.

स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांहून अधिक काळ लोटला तरी मुस्लिम बांधवांच्या सामाजिक,आर्थिक,राजकीय व शैक्षणिक परिस्थितीत काहीच बदल झाला नाही दिवसेंदिवस ही स्थिती गंभीर होत आहे.अनेक आयोगाने आपल्या अहवालात या समुदायाच्या स्थितीबाबत सरकारला सूचित केले तरी येथील व्यवस्थेने या समुदायासाठी  काहीच केले नाही.समाजालाही लागलेली मागासलेपणाची कीड नष्ट तर होऊ शकत नाही परंतु कमी नक्कीच करता येऊ शकेल .सध्या समाजात आर्थिक विषमता शैक्षणिक मागासलेपण आहे. मुस्लिम समाज शिक्षणापासून वंचित राहिला आहे यासाठी घरची आर्थिक स्थिती ही कारणिभूत आहे.कोणत्याही समाजाच्या प्रगतीमध्ये शिक्षण हे महत्त्वपूर्ण मार्ग आहेत जो समाज शिक्षणाचे महत्त्व जाणून शिक्षण घेतो तो प्रगतीपथावर असतो. समाजात मजुरदारवर्ग जास्त असल्याने शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध होत नाही सरकारची जबाबदारी तर आहे परंतु समाजातील श्रीमंत व बुद्धिजीवी वर्ग ने शिक्षणासाठी जागरूकता निर्माण करावी. खरे तर समाजातीलश्रीमंत लोकांची  जबाबदारी आहे की आपल्या परिसरातील गरिब परंतु हुशार मुलांना शिक्षणासाठी मदत करावी. समाजात अनेक अनाथ, निराश्रित,अपंग, मुले आहेत यांची जबाबदारी ही घेणे गरजेचे ठरते. समाजाच्या  द्यनिय स्थितिचे वर्णन 2005 मध्ये न्यायमूर्ती राजेंद्र सच्चर यांनी आपल्या कमिशनच्या शिफारिशीत केले व आपल्या शिफारशीने सरकारला समाजाच्या दयनीय स्थिती बाबत सूचना केली होती व या समुदायाच्या उन्नतीसाठी उपाययोजना अमलात आणाव्या परंतु पंधरा वर्षानंतर ही कोणत्याही सरकारने या शिफारशीकडे लक्ष दिले नसल्याने या समुदायाच्या स्थिती सुधारना झाली नाही उलट  स्थिती खूप बिकट झालेली आहे. या समाजाला आज आरक्षणाची गरज कारण या समुदायातील बहुसंख्यक लोकांकडे उत्पन्नाचे साधनच नाही. या समुयाचे जिवणमांन उचांवण्यासाठी व इरांच्या बरोबरीला आण्यासाठी शिक्षणात व नोकरीत राखीव जागांची तरतूद करणे गरजेचे आहे.

शिक्षणात मागास असल्याने सर्व श्रेत्रात मागास झाले.

शिक्षणाचे महत्व खरेतर आम्हाला समजलेच नाही.समाजाने शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलावा.

इस्लाम धर्म हा शिक्षणाचे महत्त्व सांगतो "इकरा" हा शब्द शिका असून नेहमी शिकण्यासाठी प्रोत्साहन देणारा असूनही आज समाज त्यावर अंमलबजावणी करीत नाही. समाजाची बहुतांश लोकांची मुलांना शिकवण्याची व उच्च शिक्षण देण्याची कुवत नसते परंतु परिस्थिती हे कारण ठरत नाही दुसरी बाब मुस्लीम समाजाचे उर्दू भाषेचे शिक्षण घेण्याचा आहे. उर्दू भाषेतून शिक्षण घेण्याचा अट्टहास लयास कारणीभुत ठरत आहे. या अध:पतनास शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टीकोण ही आहे. उर्दू भाषेतून शिक्षण घेण्याचा अट्टहास करणारयानी वास्तविकता लक्षात घेतली पाहिजे.जरी उर्दू भाषेतून शिक्षण घेत असालतरी ते शिक्षण दर्जेदार असावे येथे स्थानिक व इंग्रजी भाषा दर्जेदार शिकवली जावी. फक्त उर्दू माध्यमातून शिक्षण घेतले व उर्दू आली तर तुमचे शिक्षण सफल होत नाही . इंग्रजी व मराठी ही यायला हव्या. शिक्षण  कौशल हे जिवणात उपयोग करण्यासाठी या भाषेतून शिक्षण व या भाषांत प्रभुत्व असावे.

आजच्या स्पर्धा  युगात स्थानिक भाषा व इंग्रजी या भाषेला महत्त्व आहे प्रत्येक सरकारी नोकरी प्रत्येक स्पर्धा परीक्षा    ही मराठी व इंग्रजी भाषेत आहे. मराठी व इंग्रजी भाषा व्याकरण यानां अन्यसाधारण महत्व आहे. बदलत्या जगा सोबत बदल स्वीकार केला पाहिजे. मराठी भाषा ही जर दूर्लक्षीत झाली तर शिक्षणाला अर्थ नाही.

आमचे जे मुल उर्दू भाषेतून शिक्षण घेतात तेथे मराठी, इंग्रजी दुर्लक्षित होवू नये. जर दूर्लक्षीत झाली व शिक्षण घेऊन जरी मुलगा पुढे गेलात तरी इंग्रजी व मराठी या स्पर्धा परीक्षांत राहणार. जर मराठीत व्यक्त होता येत नसेल तर आजच्या स्पर्धेच्या युगात तो टिकणार कसा. मुस्लिम बहूल क्षेत्रात इंग्रजी माध्यम व सेमी यात जरी मुलगा शिक्षण घेत असला तरी मराठी दुर्लक्षित होत आहे.आपल्या समाजातील श्रीमंताची मराठी दुर्लक्षित झाली तरी तो विविध माध्यमातून इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवून पुढे तो इंजिनीअर डॉक्टर होतो परंतु गरीब व मध्यमवर्गीय यांच्या मुलाचे काय? कामगारांच्या मुलांना स्पर्धेत टिकायचे असल्यात मराठी येणे गरजेचे आहे. उर्दू, मराठी, इंग्रजी या भाषात प्रभुत्व भेटल्या शिवाय आमची मुले स्पर्धत टिकणार नाही. याच बरोबर

मुस्लिम समाजाचे शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा केवळ नोकरीसाठी नाही तर आपण जो व्यवसाय करतो त्यात शिक्षण कौशल्यांचा फायदा होतो.कष्टकरी कामगारांची मुल असल्याने काम करत शिक्षण घ्यावे फावल्या समयी अभ्यास करावा. शिक्षण कौशल विकास करावा . वडिलांनी ही शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.दोन वेळच्या अन्नाची जुळवाजुळव करत असताना शिक्षण घेण्यासाठी अडचण येतात परंतु ही नविन पिढी शिक्षीत झाली पाहजे . याला व्यक्त होता आले पाहिजे.समाजाची बाजू मांडण्यासाठी तयार झाले पाहिजे.

शिक्षणातून उद्या लाखो  विद्वान तत्वज्ञानी तयार होतील. आधुनिक शिक्षा नवयुगाचे प्रवर्तक नवयुग स्वीकारल्याशिवाय व मराठी इंग्रजी व उर्दू यांचा समन्वय साधून जोपर्यंत येथील समुदाय शिक्षण घेत नाही तो पर्यंत  

तर्क, विवेक ,चिकित्सक विचार तो आत्मसात करणार नाही.

तो पर्यंत समाज मागासच राहणार.

दिवसातील दोन तास धार्मिक शिक्षण घेण्यासाठी खर्च करावे. शिक्षकाना योग्य मोबदला द्यावा हे

धार्मिक शिक्षण अरबी व उर्दू  भाषेतून मस्जिदीतून घावे.धार्मिक विद्वान तत्वज्ञानी व्हावे अलिम,हाफीज, मुफ्ती व्हावे. इस्लाम धर्म समजावे लोकांना समजून सांगावे.

परंतु विज्ञान, कला, वाणिज्य, गणित हे मराठी व इंग्रजी माध्यमातून घ्या

नजीर शेख, नांदेड

9561991736

वाचा-

जामियाचे प्राध्यापक इमरान अली देशातले एक नंबर वैज्ञानिक...

खासगीकरण का? ...

आरक्षणा बाबत सरकारने सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा...

मुस्लिम समाजास राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण हाच एकमेव पर्याय - हाजी इर्शादभाई...

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या