Showing posts with label Ahmednagar. Show all posts
Showing posts with label Ahmednagar. Show all posts

ती तरणी, २४ वर्षीय अनाथ मुलगी रस्त्यावर, त्यात मनोरुग्ण!


 ती तरणी, २४ वर्षीय अनाथ मुलगी रस्त्यावर, त्यात मनोरुग्ण!

रस्त्यावर फिरणा-या त्या अनाथ मनोरुग्ण मुलीला 'मानवसेवा' प्रकल्पाचे मायेचे छत!


मनावर पडलेला ताण आणि कोणतेही भान नसलेली एक २४ वर्षीय तरुणी अहमदनगर शहरात फिरत होती. या अनाथ तरुणीची माहिती आणि परिस्थिती अहमदनगर महिला व बालविकास विभागाच्या 'वन स्टॉप सेंटर' कडून श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांना मिळाली. श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून रस्त्यावर फिरणा-या बेघर, अनाथ, निराधार मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी अरणगाव (मेहराबाद) येथे मानवसेवा प्रकल्प कार्यरत आहे. आणि रस्त्यावर फिरणा-या या अनाथ मनोरुग्ण मुलीला 'मानवसेवा' प्रकल्पाने दाखल करुन मायेचे छत दिले.

‘मी समाजाला नकोशी असणारी, एक अनाथ मुलगी आहे’त्या २४ वर्षीय तरुणीने मानवसेवा प्रकल्पात दाखल होताच हंबरडा फोडला. आत्महत्याच्या विचारांनी या तरुणींची पावलं मृत्यूच्या दरीकडे वळत होती. मात्र संस्थेच्या स्वयंसेवकांनी या मुलीला मानसिक आधार देत समुपदेशन केले. नवजीवनाच्या आशा निर्माण केल्या. मानसोपचार तज्ञ डॉ. अनय क्षीरसागर, डॉ. सुरेश घोलप यांच्या मार्गदर्शनाने या तरुणीवर उपचार सुरु करण्यात आले आहेत.

*सहायः समसुखदुःखः ॥*


*मानवसेवा प्रकल्प*

९०११७७२२३३

पहिले अपात्र नंतर पात्र कसे? खंडपीठाचा दणका

 दि.17 जुन 2021



आधी अपात्र नंतर पात्र ठरलेले स्विकृत नगरसेवकांना खंडपीठाची नोटीस : 13 जुलैला होणार सुनावणी


अहमदनगर - महापालिकेने स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्त केलेल्या पाचजणांच्या निवडी बेकायदेशीर असून, या नियुक्त्यांमध्ये निकषांचे पालन झालेले नसल्याचा दावा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेत करण्यात आला आहे. नगरचे सामाजिक कार्यकर्ते शेख शाकीरभाई यांनी ही याचिका दाखल केली असून, खंडपीठाने राज्याच्या प्रधान सचिवांसह मनपाचे महापौर, आयुक्त, नवे स्वीकृत नगरसेवक असे मिळून नऊ जणांना नोटीसा काढल्या आहेत. याची सुनावणी 13 जुलैला रोजी होणार आहे. 


स्थानिक स्वराज्य संस्थांतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी बाबतच्या शासनाच्या निकषानुसार मनपाने पाचही स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी केल्या नसल्याचा दावा याचिकाकर्ते शेख यांनी केला आहे. महाराष्ट्र महानगरपालिका (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) नियम 2012 चे नियम 4 (क) ते 4 (छ) नुसार पालिका प्रशासनाचे विशेष ज्ञान असणारी व्यक्तीनाम निर्देशित पालिका सदस्याच्या पदासाठी उमेदवार म्हणून नामनिर्देशित केली जाण्यासपात्र आहे. वैद्यकीय व्यवसायी, शिक्षण तज्ज्ञ, सनदी लेखापरीक्षक, अभियांत्रिकी पदवीधारक,अभिवक्ता, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, महानगरपालिकेचे सहायक आयुक्त, समाजकल्याणकार्यात गुंतलेल्या अशासकीय संघटनेचे पदाधिकारी यांची नियुक्ती नामनिर्देशितसदस्य म्हणून करता येईल, असे या निकषात स्पष्ट केले गेले आहे. 


पण मनपाने केलेल्या सर्व पाचही नियुक्त्या केवळ समाजकल्याण कार्यात गुंतलेल्या अशासकीय संघटनेचे पदाधिकारी याच एकमेव निकषात केल्या आहेत. त्यामुळे अन्य निकषांचे पालन झालेले नाही, असे म्हणणे शेख यांनी याचिकेत मांडले आहे. तसेच दि. 28 डिसेंबर 2018 रोजी महापौरांची निवड झाल्यानंतर त्यांनी घेतलेल्या पहिल्याच महासभेत स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती करणे बंधनकारक असताना व तसा प्रस्ताव नगरसचिव कार्यालयाने 23 जानेवारी 2019 रोजी महापौर वाकळे यांच्याकडे सादर केला. प्रस्तावानंतर त्यानुसार कार्यवाही झाली नाही. तब्बल 1 वर्षाने म्हणजे 3 जानेवारी 2020 रोजी महापौरांनी फेरप्रस्ताव सादर करण्याचे आदेश नगर सचिवांना दिले व त्यांनी त्याच दिवशी तसा फेरप्रस्ताव सादर केला. त्यानुसार 10 जानेवारी 2020 रोजी महासभा बोलावण्यात आली होती. या सभेसाठी शेळके, आढाव, शेटीया, आंधळे व बाबासाहेब गाडळकर यांचे प्रस्ताव आले होते. पण तत्कालीन आयुक्त व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पाचही प्रस्ताव निकषात बसत नसल्याने त्यांच्या नियुक्तीची शिफारस महासभेस केली नाही. महासभेने पाचही उमेदवाराचें अर्ज अमान्य करुन फेटाळले.


महापालिकेचे विद्यमान महापौर बाबासाहेब वाकळे यांनी 1 ऑक्टोबर 2020 रोजी मनपाचे पाच स्वीकृत नगरसेवक म्हणून संग्राम शेळके व मदन आढाव (दोन्ही शिवसेना), विपुल शेटिया व राजू कातोरे (दोन्ही राष्ट्रवादी) व रामदास आंधळे (भाजप) यांची नियुक्ती केली आहे. पण ही नियुक्ती स्वीकृत सदस्य निवडीसाठीच्या निकष व नियमानुसार झाली. तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे मनपा आयुक्तपदाचा असलेला पदभार हा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्याकडे आल्यावर स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा फेरप्रस्ताव नगर सचिवांनी 10 जून 2020 रोजी महापौर कार्यालयास सादर केला व त्यानंतर 1 ऑक्टोबर रोजी महासभेचे आयोजन करण्यात आले होते. या महासभेत शेळके, आढाव, शेटिया व आंधळे यांचे जुनेच प्रस्ताव मंजूर झाले. तसेच गाडळकर (मयत) झाल्याने यांच्याऐवजी कातोरे यांचा नवा प्रस्तावमंजूर होऊन या पाचजणांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या महासभेने अपात्र ठरवलेल्या पाच सदस्यांना नंतरच्या महासभेने पात्रठरवून त्यांची निवड केल्याने याविरोधात तसेच मनपा आयुक्तांवर शिस्तभंग कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्रधान सचिवांकडे शेखर यांनी तक्रार दाखलकेली होती. विद्यमान महापौर बाबासाहेब वाकळे यांनी आपले कर्तव्य पार पाडण्यात दिरंगाई केल्याने त्यांचे मनपा सदस्यत्व पदावरून अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. स्वीकृत नगरसेवक नियुक्तीची महासभा होण्या आधी 29सप्टेंबर 2020 रोजी तत्कालीन आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी मनपातील पक्षीय गटनेत्यांची बैठक घेऊन स्वीकृत नगरसेवक नियुक्तीबाबत त्यांची मते जाणून घेतली होती. मात्र, या बैठकीस शिवसेनेच्या गटनेत्या रोहिणी शेंडगे यांच्याऐवजी त्यांचे पती संजय शेंडगे तसेच काँग्रेसच्या गटनेत्या सुप्रिया जाधव यांच्याऐवजी त्यांचे पती धनंजय जाधव उपस्थित होते. गटनेत्यांनाच या बैठकीसउपस्थित राहण्याचा अधिकार असल्याने त्यांच्या पतींशी केलेली चर्चाही बेकायदेशीर आहे,असाही आक्षेप शेख यांनी या याचिकेत घेतला आहे. त्यावर प्रधान सचिवांनी मनपा आयुक्तांकडून अहवालही मागवला होता. पण राज्यसरकारकडून या प्रकरणात गंभीर दखल घेतली जात नसल्याने अखेर शेख यांनीखंडपीठात याचिका दाखल केली आहे.


पण नियमबाह्य झालेल्या या नियुक्त्या रद्द करून दोषींवर कारवाई करण्याकडे शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने अखेर शेख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. त्याची सुनावणी 15 जुन रोजी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती आर. व्ही. घुगे यांच्या समोर झाली. न्यायालयाने 9 जणांना नोटीसा काढल्या आहेत. याचीकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड.नितीन गवारे यांनी बाजु मांडली. त्यांना सहायक म्हणून अ‍ॅड.एस.व्ही. सलगर व अ‍ॅड.झेड. ए. फारुकी यांनी काम पाहिले. या प्रकरणाच्या प्राथमिक सुनावणीत सरकारच्यावतीने अ‍ॅड.एस.जे.कार्लेकर यांनी काम पाहिले. ख़ंडपीठाने या प्रकरणी राज्याच्या प्रधान सचिवांसह मनपा आयुक्त,मनपाचे नगरसचिव, महापौर तसेच स्वीकृत नगरसेवक शेळके, आढाव, शेटिया, कातोरे व आंधळे यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 13 जुलैपर्यंत ते सादर करण्याची मुदत आहे. 



शेख शाकीरभाई

शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणे गरजेचे- अलतमश जरिवाला

अहमदनगर युवा फाऊंडेशनच्यावतीने स्थापना दिन साजरा




 नगर- आज अनेक शहरांची स्थापना कधी झाली, कोणी वसवले हे माहित नाही, परंतु अहमदनगर शहराची स्थापना कधी व कोणी केली याची इतिहासात नोंद असल्याने गेल्या 500 पेक्षा जास्त वर्षाच्या अहमदनगर शहराचा स्थापना दिवस साजरा होतो ही ऐतिहासिक बाब आहे. त्या काळी अहमदनगर शहराची गणना जगातील मोजक्याच शहराबरोबर करण्यात येत असत. इतके वैभवशाली असे अहमदनगर होते. काळाच्या ओघात अनेक स्थित्यांतरे पाहिलेल्या अहमदनगर शहरातील सर्व इतिहासिक वास्तूंचे जतन करणे गरजेचे आहे. हा ऐतिहासिक ठेवा पुढील पिढीला माहिती होण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाची गरज आहे. त्यासाठी आम्ही पुरातन विभागाशी संपर्क करून या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी प्रयत्न करु. तसेच अहमदनगर शहराचे संस्थापक अहमद निजामशहा यांच्या कबरीवर जाणारा रस्ता करण्यासाठीही पाठपुरावा करू, असे प्रतिपादन अहमदनगर युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अलतमश जरीवाला यांनी केले.

  अहमदनगर शहराच्या 531 वा स्थापना दिनानिमित्त शहराचे संस्थापक अहमद निजाम शाह याांच्या कबरीवर अहमदनगर युवा फाउंडेशनच्या वतीने चादर अर्पण करून दुआ करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजूभाई जहागिरदार, अहमदनगर काँग्रेस अल्पसंख्यक विभागाचे शहर अध्यक्ष अज्जूभाई शेख, सामाजिक कार्यकर्ते रशीदभाई खान, अहमदनगर युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अलतमश जरीवाला, अ‍ॅड.अशरफ शेख, टिपू सुलतान सेनेचे अध्यक्ष सय्यद शाहफैसल, आर्कि. फिरोज शेख, सीए अमित डोंगरे, जनार्धन मुत्याल, रोहित अंदे, इतिहास पुरातन विभागचे जगदीश माळी, सतीश भुसारी, रेहान व नबिहा फ़िरोज़ शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलतांना अलतमश जरीवाला म्हणाले की अहमदनगर शहराला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. त्या काळी या शहराची इतकी भरराट झाली होती की व्यापार, कला, राजेशाहीची चर्चा संपुर्ण जगभर होत. एक आधुनिक व वैभवशाली शहर म्हणून ओळख होती. शहराचा इतिहास सुरुवातीपासूनच रोमांचकारी राहिलेला आहे. अनेक देशी-विदेशी इतिहासकारांनी अहमदनगर शहराचे वर्णन आपल्या ग्रंथात केले आहे. अशा शहराचा आपण अभिमान बाळगला पाहिजे व ऐतिहासिक ठेवा असलेल्या या वास्तूंचे जतन केले पाहिजे, असे आवाहन केले.

 यावेळी जगदीश माळी, राजूभाई जहागिरदार, अज्जूभाई शेख, सय्यद शाहफैसल आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्तविकात अ‍ॅड.अशरफ शेख यांनी शहराची स्थापना व इतिहासातील महत्वांच्या घटना सांगितले. राजूभाई जहागिरदार यांनी आभार मानले.

-------

समाजवादी पक्षाने केली जिल्हा अधिकारी साहेबांना ही मागणी - Ahmednagar Samajwadi party


 समाजवादी पार्टीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन. रमज़ान ईद व अक्षयतृतीया निम्मित अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सकाळी 7 ते 12 परवानगी देण्यात यावी - अजीम राजे. 


 अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र हा सध्या कोरोना च्या दुसऱ्या लाटेतील भयंकर परिस्थितितुन जात असून अश्या परिस्थितीतून जात आहे व अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाच्या उद्रेक पायला मिळत आहे या परिस्थिति मध्ये मुस्लिम समाजाचा पवित्र रमज़ान महीना संपन्न होत असून शेवट चे 4 दिवस उरले आहे येत्या 14 तारखेला रमज़ान ईद व अक्षयतृतीया ह्या सणा निम्मित प्रशासनाच्या नियमाचे पालन करीत अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 12 चालु ठेवण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व महानगरपालिकेचे आयुक्त यांना देण्यात आले यावेळी समाजवादी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष अजीम राजे समवेत राजु जहागिरदार, राजेंद्र गायकवाड, मुन्ना भाई, जहीर सय्यद, मोहम्मद हुसैन, शफी खान, तौसिफ शेख आदि उपस्थित होते रमज़ान ईदला शीरखुर्मा साठी लागणाऱ्या किराना सामान व अन्य वस्तु साठी प्रशासनाने काही प्रमाणात अत्यावश्यक दुकानाना सूट द्यावी जेणे करुण नागरिकांना ईद व अक्षय तृतीया साठी लागणाऱ्या किराना खरेदी करता येईल व उत्साह ने रमज़ान ईद व अक्षयतृतीया दोन्ही सण घरच्या घरी साजरी करता येईल 

मागच्या वर्षी कोरोनाच्या महामारीत मुस्लिम बांधवानी साध्या पद्धतीने घरी ईद साजरी केली होती तसेच यावर्षीही घरी ईद साजरी करण्यात येत असून परंतु ईद साठी लागणाऱ्या डायफ्रूट व किराना सामानसाठी अत्यावश्यक दुकाने सकाळी 7 ते 12 चालू ठेवण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

इस्लाम जगत व शिकवण: नजीर शेख Islamic Teaching....

सरकारने पत्रकारांना तातडीने फ्रंट लाईन वर्करचा दर्जा दयावा - हाजी इर्शादभाई...

सर्व खासगी रुग्णालयात महात्मा फुले योजना अंतर्गत मोफत उपचार करण्याचे आदेश द्या - डॉ परवेज अशरफी AIMIM Ahmednagar...

आपण व पोलीसांची भूमिका - We and Police...

शेख सरांचे रुपात मला विठ्ठलाचे दर्शन झाले. - संदीप दंडवते Oxygen shortage


 

एक स्वानुभव शेअर करतोय.

पाच दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या नाट्य संघातील एका मुलीचे वडील कोरोनामुळे नगरमधील एका हॉस्पिटलला ऍडमिट होते. त्यांची कंडिशन नाजूक होती. आम्ही सर्व मित्र मिळून इंजेक्शन व इतर बाबतीत शक्य तेवढी मदत करत होतो पण त्यादिवशी रात्री 10.30 वाजता तिचा फोन आला की 'हॉस्पिटलने ऑक्सिजन संपणार असल्याने पेशंट दुसरीकडे हलवायला सांगितलंय'. माझी मदत होईल म्हणून तिने खूप अपेक्षेने फोन केला होता पण काय करावं मला कळत नव्हतं. मी कॉन्टॅक्ट मधील सर्व हॉस्पिटलला फोन केला पण कुठेच जागा नसल्याचं आणि काही हॉस्पिटलमधून असेच पेशंट दुसरीकडे हलवण्यात येत असल्याचं कळलं. आता काय होणार या विचाराने मला तर घामचं फुटला होता. 


मी तडक हॉस्पिटलला गेलो. तिथे त्या दोघी बहिणी जिवाच्या आकांताने दुसऱ्या कुठल्या हॉस्पिटलला जागा मिळतेय का पाहत होत्या. हॉस्पिटलने तर दोन्ही हात वर केले होते. या सगळ्यात एक विचार डोक्यात घोळत होता की इथे आपल्यासारखी परिस्थिती असलेले आणखी पेशंट असतीलचं ते काय सोय पाहताहेत आधी पाहूयात मग निर्णय घेऊयात.

थोड्याच वेळात लक्षात आले की ऑक्सिजनवर असलेले सात ते आठ पेशंट असून, त्यात 3 पेशंट असे आहेत की ज्यांचं ऑक्सिजन काढलं की ते जास्तीत जास्त दोन तासच जगू शकतील. त्यात आमचंही पेशंट होतं.

आमच्या पेशंटसाठी आम्ही तिघे होतो आणि एका मुस्लिम बाईसाठी पाच ते सात मुस्लिम मुले व एक पन्नास वर्षे वयाचा शेख सर म्हणून व्यक्ती होता. 

हे शेख सर शिक्षक असून ती पेशंट त्यांची सख्खी बहिण होती. तिसऱ्या पेशंटसाठी मात्र कुणीच आले नव्हते. एवढ्या वेळात पेशंट दुसरीकडे हलवणे शक्य नाही हे सर्वांनाच कळून चुकले होते. मग एकच पर्याय शिल्लक होता तो म्हणजे कुठून तरी ऑक्सिजन उपलब्ध करून देणे. पण कुठून? 


त्यावेळेला रात्रीचे 11 वाजले होते आणि केवळ 3 तास पुरेल एवढा ऑक्सिजन होता. आम्ही हातावर हात ठेवून विचार करत असताना ती मुले मात्र याला-त्याला फोन करत, हात जोडत टाक्यांची व्यवस्था करत होती, कधी मोपेड कधी कार घेऊन मोकळ्या टाक्या घेऊन जात होती आणि कुठून-कुठून एकेक टाकी गोळा करत आणत होती. 16 ते 21 वयोगटातील मुले असतील ती, पण त्यांनी अक्षरशः जीवाचा खुळखुळा केला होता. सिलेंडर साठी नगर शहराच्या कोपऱ्या न कोपऱ्यात धावत होती. हे पाहून आपण काही करू शकत नाही याची मला लाज वाटली, मी पण माझे कॉन्टॅक्ट वापरले पण हाती एकहि टाकी लागली नाही. पण यांनी मात्र पहाटे 1 पर्यंत 5 टाक्या म्हणजे आणखी दोन तास जगण्याची सोय केली होती. शहरातील एका ऑक्सिजन प्रोव्हाईडरने पहाटे 2 पर्यंत टँकर येणार असल्याच सांगितलं होतं म्हणजे जास्तीत जास्त पहाटे 4 पर्यंत ऑक्सिजन हॉस्पिटलला पोहचणार होता म्हणजे आम्हाला पहाटे 4 पर्यंत पेशंट जगवायचे होते. पण कसे?


त्या मुलांमधील 4 मुले सहा मोकळ्या टाक्या घेऊन ऑक्सिजन साठी एम आय डी सी ला गेले. तोपर्यंत आम्ही मोकळ्या होत आलेल्या ऑक्सिजनच्या टाक्या आणि पेशंटचे श्वास मोजत होतो. Midc ला गेलेल्या मुलांनी इकडे खूप गर्दी असल्याने आणखी 1 तास लागत असल्याचं फोनवरून सांगितलं. त्यात जो टँकर येणार होता तो कुठेतरी फेल झाल्याने सकाळी 11 पर्यंत तरी ऑक्सिजन मिळणार नव्हता. म्हणजे किमान दीड-दोन तास तरी पेशंट ऑक्सिजन शिवाय राहणार होते. आकड्यांचा एवढा खेळ मी माझ्या आयुष्यात कधीच खेळला नव्हतो. 

आता मात्र मी घाबरलो होतो. भीती ऑक्सिजन पेक्षा माणुसकीची वाटायला लागली होती. ज्यांनी टाक्या उपलब्ध केल्यात त्यांनी त्यांचंच पेशंट जगवायचं ठरवलं तर? हा विचार डोक्यात यायला आणि कानावर जीवघेणे शब्द पडायला एकच वेळ झाली. शेख सरांच्या कानाशी हॉस्पिटलमधीलच एक व्यक्ती लागला आणि 'सगळ्या टाक्या तुमच्याच पोरांनी आणल्यात त्यामुळे तुमचं पेशंट वाचवायच पहा' अस सुचवू लागला'. हे ऐकून माझ्या तर काळजाचा ठोकाच चुकला. अस झालं तर सगळं संपणार होतं. situation चं अशी होती की तीन मरण्यापेक्षा एक वाचवलं असतं तर कुणाचीही काहीचं हरकत आली नसती. त्यावर दुसऱ्या क्षणी शेख सर त्याला म्हणाले की "माझ्याकडून अस पाप घडणार नाही... माणुसकी मारण्यापेक्षा माणसं मेलेली कधी पण चांगलं. अस केलं तर माझा अल्लाह मला कधीच माफ करणार नाही, उलट आपल्यामुळे एक-दोघांचा जीव वाचत असलं तर यासारखं पुण्य नाही". पहाटे 3 वाजून 9 मिनिटांनी मला शेख सरांच्या रुपात माझा विठ्ठल दिसत होता. मला नवस-सावस, उपास-तपास, जपजाप्य, व्रत वैकल्य न करता देवदर्शन झाले होते. कधीही दगडाच्या मूर्तीसमोर न जोडले गेलेले माझे हात इथे आपोआप जोडले गेले होते. शेख सर पुढे म्हणाले की ' कुणाला काही नाही होणार सगळे मिळून प्रयत्न करूयात'.


त्यानंतर दोन तासात आम्ही 12 टाक्या मिळवल्या. ती मुलं आणि शेख सर गरज पडली की अजूनही ऑक्सिजन साठी त्याच तडफेने पळताहेत.

आज यांच्या प्रयत्नामुळे तेथील सगळे पेशंट वाचलेत शिवाय बऱ्यापैकी रिकव्हर होत आहेत.

आजही बातम्या वाचतोय कि कुठल्या तरी शहनवाज नावाच्या व्यक्तीने स्वतःची गाडी विकून लोकांना चार हजार ऑक्सिजन सिलेंडर पुरवले. 

कोणी तरी अहमद आणि त्याचा भाऊ एक वर्षापासून कोरोनाने मृत्यू पावलेले मृतदेह स्मशानात जाळताहेत. जिथे सख्खे नाक मुरडतात तिथे हे दोघे अख्खेच्या अख्खे उभे असतात.

आणि जातीत विष पेरणारा दंगे घडवणारा तो कुठला दल आणि ती कुठली सेना आणि कुठला संघ... 

विष पेरण्यात तुम्ही थोडे फार जिंकला असाल पण माणुसकी पुढे तुम्ही सपशेल हरलात...!


- संदीप दंडवते, अहमदनगर यांच्या फेसबुक टाईमलाईन वरून 

(पोस्ट दिनांक -26 एप्रिल 2021)

वारस नोंद चा कायदा - ....

अहमदनगर येथील ऑक्सिजन प्लांटला लिक्वीड पुरवण्यासाठी एम आय एम चे मुख्य मंत्रीना पत्र - डॉ परवेज अशरफी AIMIM Ahmednagar...

मुलीने केली आईची अंतिम इच्छा पूर्ण- Last wish of mother...

कामगार वर्ग - working sector...

नगरसेवक झोपले आयुक्तचा दालनात- Ahmednagar Corporation

 मुकुंदनगर मधील नागरी समस्या सोडविण्याची मागणी 

आयुक्तांच्या दालनात झोपा काढू आंदोलन   

समस्या न सुटल्यास बजेटच्या सभेमध्ये आत्मदहन करण्याचा इशारा.           



अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर प्रभाग 3 मधील पिण्याच्या पाणीचा प्रश्‍न गंभीर बनला असून, या भागात नागरिकांना दोन ते चार दिवासाआड पाण्याचे वितरण होत आहे. पाणी प्रश्‍नासह घनकचरा, ड्रेनेजलाईन, बंद पथदिवे व रस्त्यांच्या प्रलंबीत कामे मार्गी लावण्याची मागणी नगसेवक आसिफ सुलतान यांनी मनपा आयुक्त शंकर गोरे यांना निवेदनाद्वारे केली होती सदर प्रश्‍न न सुटल्यास आयुक्तांच्या दालनात झोपा काढू आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला होता त्यामुळे आज झोपा काढा आंदोलन करण्यात आले.

मुकुंदनगर प्रभाग 3 मध्ये दोन ते चार दिवासाआड पाण्याचे वितरण होत असून, याला वितरण व्यवस्थेवरील दोष कारणीभूत आहे. लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. आगामी महिन्यात पवित्र रमजानचे उपास सुरू होणार असून, सदर परिसर मुस्लिम बहुल भाग असल्याने या भागात वेळेवर नियमीत पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. या भागातील प्रामुख्याने नशेमन कॉलनी, इशरद पार्क, छोटी मरियम मस्जिद, जीशान कॉलनी, एन.एम. गार्डन परिसर, सी.आय.व्ही. सोसायटी, नम्रता कॉलनी, सहारा सिटी, मेहराज मस्जिद परिसर, दर्गा दायरा, शहाशरीफ पार्क, संजोगनगर, दगडी चाल, अमर कॉम्प्लेक्स, अमन कॉलनी, अभिलाषा कॉलनी, हिना पार्क, हुसेनी कॉलनी, सहाजी पार्क, बिहारी चाल, कौसर बाग, दरबार कॉलनी, मोठी मरियम मस्जिद परिसर, अलमास पार्क, बजाज कॉलनी, इक्रा स्कूल परिसर व बरेच ठिकाणी पाण्याचा पुरवठा व्यवस्थित होत नाही. यामध्ये फेज टू पाण्याची पाईप लाईनचे काम 95 टक्के पूर्ण झाले आहे. पाण्याची उंच टाकी बांधून आठ वर्ष झाली आहे. फेज टू चे राहिलेले काम लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना नवीन पाईपलाईन मधून नळ कनेक्शन देण्यात यावे. पाण्याची टाकी स्वच्छ करून निर्जंतुकीकरण करून त्यातून पाण्याचे वाटप करण्यात यावे व प्रभागांमधील वॉल मॅनचा वेळ वाया जाणार नाही अशी व्यवस्था करण्यात यावी. तसेच वितरण व्यवस्थेचे दोष दूर करण्यासाठी कामगारांची संख्या वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे.

प्रभाग भौगोलिकदृष्ट्या मोठा असून, या भागात 35 ते 40 हजार लोकसंख्या राहत आहे. त्याप्रमाणे येथे कर्मचारींचे मनुष्यबळ अत्यंत कमी आहे. स्वच्छता कर्मचारी कमी असल्याने प्रभाग पुर्णपणे स्वच्छ होत नाही. या समस्यांचा कायमस्वरूपी निदान होणे गरजेचे आहे. त्यासाठी झाडू कामगारांची संख्या वाढवण्यात यावी, कामगारांना छोटे कचरा गाड्या उपलब्ध करून देण्यात यावे, घंटागाडीची संख्या वाढवण्यात यावी. या भागांमध्ये ड्रेनेजलाईन तुंबून रस्त्यावरुन घाण पाणी वाहत असल्याने प्रभागातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी चेंबरची झाकणे तुटलेली आहे. ड्रेनेजचे पाईप खचले असून ते दुरुस्त करून नवीन लाईन टाकण्यात यावी. प्रभागात काही ठिकाणी पथदिवे नसून व काही ठिकाणी बंद पडले आहे. परिणामी अंधारामुळे मोकाट कुत्र्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असून, अनेकवेळा अपघातही होत आहे. तरी बंद पथदिवे दुरुस्त करावे. शासनाकडून भुयारी गटार योजना मंजूर असून, ती त्वरीत कार्यान्वीत करण्याची मागणी देखील निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. महापालिका नागरी सेवा देण्यास असमर्थ ठरत आहे मुकुंद नगर मधील नागरी समस्या न सुटल्यास बजेट ची सर्वसाधारण ची सभा होणार आहे त्यामध्ये नगरसेवक आसिफ सुलतान यांनी आत्मदहन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

वाचा -

मुंबईतील नामांकित पंचतारांकित हॉटेलवर कारवाई -FDA...

वासिम रिझवी विरोधात कोपरगावात एम आय एम तर्फे निवेदन - AIMIM ...

खाद्यतेलात भेसळ करणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता पथकाचा छापा - FDA MUMBAI...

आमचं गाव आमचा विकास - Village Development...

निराधार मातेला दिला मानासेवाने आधार - MANAVSEVA PROJECT

 पुणे शहरात फुटपाथवर फिरणारी निराधार माता मानवसेवा प्रकल्पात दाखल




पुणे येथील बोट क्लब रोड बंडगार्डन परिसरात एक निराधार मानसिक विकलांग माता थंडीने कुडकुडत फुटपाथवर फिरत होती. ही बाब पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी यांच्या निदर्शनास आली. पुणे महानगरपालिकेने या महिलेबाबत कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन पुणे यांना कळविले. या निराधार मातेच्या सुरक्षिततेचा आणि संरक्षणाचा प्रश्न समोर येताच कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री दिलीप शिंदे, महिला पोलीस उपनिरिक्षक सौ. मनिषा टुले, प्रदिप देवकुळे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील अरणगाव (मेहराबाद) येथील रस्त्यावरील निराधार माता-भगिनीं व बंधुच्या पुनर्वसनासाठी कार्य करणा-या *मानवसेवा* प्रकल्पाचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांच्याशी चर्चा केली. दिलीप गुंजाळ व त्यांच्या स्वयंसेवक टीमने कोणत्याही प्रश्नांच्या जंजाळात न पडता *आज बुधवार दि. १०/०२/२०२१* रोजी या उपेक्षित मातेला मानवसेवा प्रकल्पात दाखल करुन घेत मायेचा आधार दिला. या मातेवर मानसोपचार तज्ञ डाॅ. अनय क्षीरसागर, डॉ. सुरेश घोलप यांच्या मार्गदर्शनाने उपचार सुरु केले आहे. या निराधार मातेला दाखल करतेवेळी पुणे येथून कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनचे महिला पोलीस उपनिरिक्षक सौ.मनिषा टुले, पोलीस नाईक संगिता गवारी, जयश्री ढोमे, सामाजिक कार्यकर्ते प्रदिप देवकुळे, प्रतिक महामुनी, स्वाती डिबळे उपस्थित होते. समुपदेशन,पुनर्वसनाकरीता मानवसेवा प्रकल्पाचे स्वयंसेवक अनिता मदणे, प्रसाद माळी, राहुल साबळे अशोक मदणे, सुशांत गायकवाड, सोमनाथ बर्डे, नितीन बर्डे, स्वप्नील मधे, कृष्णा बर्डे, अजय दळवी, सिराज शेख परिश्रम घेत आहेत.  

•••••••••••••••••••••••••••

*मानवसेवा प्रकल्प* 

(मन व घर हरवलेल्या मानसांच हक्काच घर)

द्वारा - *श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ*

☎ (०२४१) २४२९९४२ 

📱९०११७७२२३३ /९११२०५९१९१ / ९११२०४९१९१

वाचा -

Covid-१९ च्या वाढत्या संसर्गामुळे अन्न व औषध प्रशासने घेतला हा निर्णय - FDA ...

कामगार आणि हडताल A . Munde ...

गुलाम. मजूर. कामगार ...

लोकशाही आणि घराणेशाही....

एम आय एम मेडिया प्रमुख पदी सुफीयान शेख - AIMIM

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357d

 

श्रीरामपूर - अहमदनगर 

महाराष्ट्र बरोबर एम आय एम चा विस्तार अता पूर्ण देशात होत असल्याने प्रस्तापितानंची डोके दुखी वाडली आहे. अहमदनगर जिल्हा मागे राहिलेला नाही नुकतेच झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत एम आय एम ने जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांच्या नेतृत्व खाली ग्राम पंचायत सदस्य निवडून आले. एम आय एम ला मानणारा वर्ग दिवसेन दिवस वाडत आहे. श्रीरामपूर तालुक्यात एम आय एम बरोबर युवा पिढी जुडत आहे. श्रीरामपूर शहराची बैठक नुकतीच पार पडली त्यात नवीन पदाधिकारी यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आले. यावेळी शहर मेडिया प्रमुख पदी सुफीयान शेख यांची वर्णी लागली. 
बैठक चे अध्यक्ष स्थानी एम आय एम श्रीरामपूर तालुका अध्यक्ष शकील शेख होते. शकील शेख यांनी अद्याक्षीय भाषणात सांगितले की एम आय एम पक्ष हा सद्या चर्चेचा विषय आहे.पक्ष दिवसेन दिवस वाडत असून जिल्ह्यात जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांच्या नेतृत्वात कार्यरत आहे. प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील साहेब आणी प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी साहेब यांच्या आदेशाने अहमदनगर जिल्ह्यात हि पक्ष बंदानीचे काम जोरात चालू आहे. लवकरच जिल्हा अध्यक्ष यांचा दौरा होणार असून श्रीरामपूर तालुक्याची पुढची रणनीती आखण्यात येईल.
सुफीयान शेख यांनी नियुक्ती झाल्या बद्दल सर्वांचे आभार मानले. या वेळी श्रीरामपूर तालुका अध्यक्ष शकील शेख, शहर अध्यक्ष युनुस शेख , शहर उपअध्यक्ष अमोल रुपटक्के , शहर सह सलाकार किरन शरनागते, मोहसीन‌ शेख , नदिम ईनामदार , खालीद पठान , शफीक शेख , अरबाज शेख आदी उपस्थित होते।

वाचा - 



अहमदनगर की निज़ाम शाही....….AHMEDNAGAR NIZAM SHAHI

 अहमदनगर की निज़ाम शाही....….

अहमदनगर -

अहमद निज़ामशाह का असल नाम मलिक अहमद था। वह कुछ वर्षों तक बहमनी वंश के सुल्तान महमूद के अधीन पूना के निकट जुन्नर के हाकिम रहे।

वह बीदर के दक्खिनी मुसलमानों के दल के नेता निज़ामुल मुल्क बहरी के बेटे थे। अपने पिता की मृत्यु के बाद मलिक अहमद ने बहमनी राज्य के आख़िरी सुल्तान महमूद (1482-1518 ई.) को हराकर अपने स्वतन्त्र राज्य की स्थापना की और अपनी राजधानी का नाम अहमदनगर रखा।

उन्होंने अपना नाम अहमद निज़ामशाह और अपने राजवंश का नाम निज़ामशाही रखा। 1499 ई. में उन्होंने देवगिरी अथवा दौलताबाद क़िले को जीतकर उस पर अपना अधिकार कर लिया और इस प्रकार अपने राज्य को मज़बूत बनाया।

उन्होंने 1506 ई. तक राज्य किया। उसकी मृत्यु 1508 ई. में हुई।


अहमदनगर के प्रमुख शासक...


बुरहान निजामशाह – मलिक अहमद की मृत्यु के बाद उनका सात वर्षीय पुत्र बुरहान शासक बना। सौभाग्य से उसे मुकम्मल खाँ दक्किनी के रूप में एक योग्य प्रधानमंत्री प्राप्त हुआ। अहमद नगर के सुल्तानों में बुरहान पहलेे शासक थे जिसने निजामशाह की उपाधि धारण की।


हुसैन निजामशाह – इनके शासन काल को दक्कन के इतिहास में एक युगांतकारी युग के रूप में स्वीकार किया जाता है। 1562ई. में बीजापुर के आदिशाह, गोलकुण्डा के इब्राहीम कुतुबशाह और विजयनगर के रामराय की संयुक्त सेनाओं ने अहमद नगर पर आक्रमण किया। इस सैनिक मोर्चे का निर्माता विजयनगर का रामराय था। इन संयुक्त सेनाओं ने आम तौर पर अहमदनगर के निवासियों और विशेष रूप से मुसलमानों को बुरी तरह लूटा। हुसैन निजामशाह 1565ई. में विजयनगर के विरुद्ध मुस्लिम संघ में सम्मिलित था।


मुर्तजा निजामशाह – यह हुसैन निजामशाह के उत्तराधिकारी थे। इनके शासनकाल में मुगलों ने पहली बार अहमदनगर पर आक्रमण किया।

बुरहान- यह मुगल सम्राट अकबर के दरबार में बंधक था। इसे बीजापुर के सुल्तान इब्राहीम आदिलशाह द्वितीय द्वारा पराजित होना पङा । दूसरी सबसे बङी विफलता इसकी यह थी कि कि यह पुर्तगालियों से चौल को पुनर्विजित नहीं कर सका।ऐतिहासिक ग्रंथों के संदर्भ में उसके शासन काल में बुरहान – ए – मआसिर नामक ऐतिहासिक ग्रंथ की रचना हुई।


चाँदबीबी- इनका विवाह बीजापुर के शासक अली आदिलशाह के साथ हुआ था। अपने पति की मृत्यु के बाद वह पुन: अहमदनगर वापस लौट आयी और अहमदनगर की राजनीति में बङी स्मरणीय भूमिका का निर्वाह किया। बुरहान की मृत्यु के बाद उसका पुत्र इब्राहीम शासक बना जिसने केवल चार माह तक ही शासन किया। इस काल में अहमदनगर की स्थिति अत्यंत विवाद ग्रस्त थी, क्योंकि निजामशाही अमीर वर्ग के चार गुटों द्वारा दावेदारों ने गद्दी के लिए अपने दावे प्रस्तुत किये जिसमें एक का समर्थन मियाँ मंझू (दक्कनी) ने किया और दूसरे पक्ष का चाँदबीबी ने किया। जब मियाँ मंझू ने अपने समर्थन की स्थिति संकटग्रस्त देखी तो उसके मुगल सम्राट अकबर के पुत्र मुराद को अपनी सहायता के लिए आमंत्रित किया। इस आमंत्रण के प्रत्युत्तर में मुराद ने अपनी सेनाओं सहित अहमद नगर की ओर प्रस्थान किया। चाँदबीबी ने बहादुरी के साथ अहमदनगर के प्राचीर की रक्षा की। किन्तु अंत में उसे मुगलों से समझौता करना पङा तथा बरार क्षेत्र मुगलों को समर्पित कर दिया।




मलिक अंबर – अहमदनगर की स्वतंत्रता के लिए संघर्ष के नाटक के अगले दृश्य का नायक मलिक अंबर था जो मूलत: एक अबीसीनियाई दास था, जिसे तीन बार दासता से मुक्त किया जा चुका था और बाद में वह अहमदनगर का एक प्रमुख वजीर बन गया। उसने मुर्तजा द्वितीय को सुल्तान घोषित किया और स्वयं अहमदनगर की कमान संभाली। उसने मुगलों के सम्मुख नतमस्तक न होने का संकल्प लिया था। मलिक अंबर अहमदनगर को केन्द्र बनाकर छापामार युद्ध प्रणाली के द्वारा मुगल प्रदेशों पर बार-2 आक्रमण किये। मुगलों के विरुद्ध उसका यह प्रतिशोध काफी लंबे सलय तक चलता रहा, किन्तु 1617 तथा 1621ई. में वह खुर्रम के हाथों पराजित हुआ। मलिक अंबर ने दक्षिण में टोडरमल की भूमि व्यवस्था के आधार पर रैय्यतबाङी (जाब्ती प्रणाली) व्यवस्था लागू की तथा भूमि को ठेके (इजारा) पर देने की प्रथा को समाप्त कर दिया। अंत में 1633ई. में मुगल सम्राट शाहजहाँ ने अहमदनगर को मुगल साम्राज में मिला लिया.

फिरोज शेख 

07272204782

(अहमदनगर महाराष्ट्र)

वाचा -

तर माझ्या कार्यालयावर उचलून आणा- खा.इम्तियाज जलील AIMIM Maharashtra...

जर माझ्या जिवाचे काही बरे - वाईट झाल्यास जबाबदारी पोलिस व इतर प्रशासनाची - हाजी इर्शादभाई...

तर हे सरकार इतरांना काय न्याय देणार - डॉ. परवेज अशरफी AIMIM MAHARASHTRA ...

एम आय एम ची अहमदनगर जिल्ह्यात शानदार एंट्री - AIMIM AHMEDNAGAR MAHARASHTRA...

तर माझ्या कार्यालयावर उचलून आणा- खा.इम्तियाज जलील AIMIM Maharashtra

 

विजबील वसूली विरोधात एमआयएम आक्रमक, केले बेधडक धरणे आंदोलन…!

औरंगाबाद -

 महावितरणच्या वतीने थकीत विज ग्राहकांची वसूली सुरु करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात व्यवसाय बंद होते तरीही अव्वाचे सव्व विजबील सामान्य नागरिकांना देण्यात आले. लॉकडाऊनच्या काळातील वीजबीलमाफी करण्याची घोषणा महाआघाडी सरकारच्या मंत्र्यांनी केली. विजबील वसूलीच्या विरोधात एमआयएम आक्रमक झाली आहे. थकीत वीजबिल वसूली थांबवण्यात यावी. शेतकऱ्यांचे कृषी पंपांचे विजजोडणी खंडीत करु नये. लावलेले विजबील माफ करण्यात यावे. लॉकडाऊनच्या काळातील विजबील कमी करावे. या मागणीसाठी खा.इम्तियाज जलील, प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गफ्फार कादरी, जिल्हाध्यक्ष समीर साजिद, शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी यांच्या नेतृत्वाखाली महाविरणच्या मुख्य कार्यालयासमोर बेधडक धरणे आंदोलन करण्यात आले. महावितरणच्या अधिका-यांना आपल्या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी एम आय एम प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील, प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी, नासेर सिद्दीकी, शेख अहेमद, जमीर अहेमद कादरी, विकास एडके, अरुण बोर्डे, हाजी इसाक खान, जगन्नाथ उगले, काकसाहेब काकडे, फेरोज खान, अबुल हसन हाशमी, रफत यारखान, मुनशी पटेल, वाजिद जागिरदार, अब्दुल अजिम इन्कलाब, जिशान देशमुख, आवेज दुर्रानी आदी उपस्थित होते.

खासदार इम्तियाज जलील यांनी आपले मत मांडताना सांगितले की...

ग्रामीण भागातील ४२ लाख ग्राहकांचे २०१५ ते २०२० पर्यंत ४५ हजार कोटी थकीत विद्युत विजबील माफ केले. औरंगाबाद शहरातील प्रती महीना विजबिलापोटी महावितरणला ५४ कोटीचे उत्पन्न मिळते मग लॉकडाऊनच्या काळातील तीन महीन्याचे विद्युत बील माफ करण्यास शासनाची काय हरकत आहे. राज्य शासनाने सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी विशेष पँकेज द्यावे अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. थकीत विजबील वसूलीसाठी महावितरणचे कर्मचारी विजेचे कनेक्शन तोडण्यासाठी आल्यास त्यांना उचलून माझ्या कार्यालयात आणा असा संतप्त इशारा त्यांनी दिला.





वाचा - 

जर माझ्या जिवाचे काही बरे - वाईट झाल्यास जबाबदारी पोलिस व इतर प्रशासनाची - हाजी इर्शादभाई...

तर हे सरकार इतरांना काय न्याय देणार - डॉ. परवेज अशरफी AIMIM MAHARASHTRA ..

एम आय एम ची अहमदनगर जिल्ह्यात शानदार एंट्री - AIMIM AHMEDNAGAR MAHARASHTRA...



शिष्यवृत्ती आणि विद्यार्थी - अहमद मुंडे

 असुन फायदा नसून खोळांबा 

अल्पसंख्याक योजना व शिष्यवृत्ती



            (१) प्री मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना

अल्पसंख्याक कार्य मंत्रालय भारत सरकार पुरस्कृत योजना आहे सदर योजना राज्यात शालेय शिक्षण विभागातर्फे राबविण्यात येते या योजनेअंतर्गत शासकीय अथवा खाजगी १ली ते १० वी पर्यंत शिक्षण घेणा-या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते सदर योजनेअंतर्गत पात्र ठरविण्यासाठी विद्यार्थ्यांचया पालकाचे उत्पन्न १लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे मागील वर्षी ५०/टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे

सदर अर्ज आॅनलाइन पध्दतीने करणे आवश्यक आहे

(२) पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना

सदर योजना अल्पसंख्याक मंत्रालय व भारत सरकार यांचेकडून राबविली जाते उच्च तंत्रज्ञान तंत्रशिक्षण विभागातर्फे. उच्च संचणालय पुणे यांचेमार्फत राबविण्यात येते ११वी १२वी किंवा समकक्ष अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते सदर योजना पात्र ठरविण्यासाठी वार्षिक उत्पन्न २ लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे विद्यार्थ्याने मागील वर्षी ५०/टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेलें असावेत

(३) मेरीट कम मिन्स् शिष्यवृत्ती

     सदर योजना अल्पसंख्याक कार्य मंत्रालय भारत सरकार पुरस्कृत असून राज्यांमध्ये ती उच्च व तंत्रशिक्षण तांत्रिक शिक्षण व व्यवसाय शिक्षण या विभागात शिक्षण घेणा-या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते सदर योजनेअंतर्गत पात्र ठरविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न २-५० लाखा पेक्षा कमी असणे आवश्यक आहे विद्यार्थ्याने मागील वर्षी ५०/टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेले असावेत

(४) व्यावसायिक शिक्षण शिष्यवृत्ती योजना

        उच्च व्यावसायिक व इयत्ता बारावीच्या नंतर सर्व अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेणाऱ्या राज्यातील गुणवत्ताधारक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना उच्च व्यावसायिक व १२वी नंतर सर्व अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेणाऱ्या राज्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचया कुटुंबाची मिळणार या वार्षिक उत्पन्न मर्यादा २-५० लाखावरुन ६ लाख करण्यात आली आहे

(५) मदरशांमध्ये शिकत असलेल्या विविध वयोगटातील विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पारंपारिक धार्मिक शिक्षणाबरोबर विज्ञान. गणित. समाजशास्त्र. हिंदी. मराठी. इंग्रजी. व उर्दू. या विषयांचे शिक्षण देणे तसेच मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये प्रवेश घेणा-या इयत्ता ९वी १०वी ११वी व १२ वी यातील आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे जेणेकरून त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत व रोजगार क्षमतेत वाढ होऊन त्यांचा आर्थिक स्तर सुधारणे

(६) अल्पसंख्याक बहुल शाळांना अनुदान

      धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी बहुल शासन मान्य खाजगी अनुदानित /विना अनुदानित/ कायम विनाअनुदानित शाळा कनिष्ठ महाविद्यालये औधोगिक प्रशिक्षण संस्था व दिवयांग (अपंग ) शाळांमध्ये पायाभूत सुविधा सोयी पुरविण्यासाठी अनुदान योजना

(७) विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह (केंद्र व राज्य )

    विद्यार्थिनींसाठी वसतीगृह (केंद्र व राज्य) अल्पसंख्याक समाजातील मुलीना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मा न्या सचचर समितीने केलेल्या शिफारशीनुसार अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठी वसतीगृहे सुरू करणे हि शिफारस असून त्याअनुषंगाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृहे बांधण्यात येत आहे

(८) मौलाना आझाद मोफत शिकवणी व संबंध योजना

(९) मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजना

कर्ज मर्यादा. २-५० लाखांपर्यंत

      व्याजदर फक्त ३/टक्के

       १००/टक्के कर्ज

परतफेड. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यांपासून पुढील ५ वर्ष शैक्षणिक कर्ज योजना तसेच राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास महामंडळाचा शैक्षणिक कर्ज योजना या मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत राबविण्यात येतात याची सविस्तर माहिती मंडळ कार्यालयात मिळेल कर्ज मर्यादा वाढवून ५ लाख करण्यात आली आहे

(१०) राजीव गांधी शिक्षण कर्ज योजना

कर्ज मर्यादा. दोन लाख पन्नास हजार 

  व्याजदर फक्त ३/टक्के

१००/टक्के कर्ज

परतफेड शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यांपासून पुढील ५. वर्षे 

        पात्रता

अर्जदार अल्पसंख्याक समाजातील असावा मुस्लिम. शिख. पारशी. बुध्दीषट व जैन. समाजाचा 

             समावेश

अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा 

वयोमर्यादा १ते ३२ वर्ष

कुटुंबातील वार्षिक उत्पन्न शहरी भागात. रुपये. १/०३/०००पेक्षा कमी ग्रामीण भागात ८१००० पेक्षा कमी

       राजीव गांधी शैक्षणिक कर्ज योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

विहित नमुन्यातील अर्ज

अल्पसंख्याक असल्याचा पुरावा

आधार कार्ड /इलेक्शन कार्ड/ बॅंक पासबुक झेरॉक्स /पॅन कार्ड /यापैकी एक

अर्जदार व जामिनदार आधार कार्ड/इलेक्शन कार्ड /पारपतरक /बॅंक पासबुक /वाहन लायसन्स /पॅन कार्ड /पैकी एक

उत्पन्न प्रमाणपत्र

कुटुंब नावे तहसिलदार/तलाठी /यांचा उत्पन्न दाखला /शासकीय/खाजगी /क्षेत्रतातील कर्मचारी असल्यास फाॅरम १६

(११) मराठी भाषा फौंडेशन वर्ग योजना

राज्यातील अमराठी शाळांमध्ये इयत्ता ८वी९वी१०वी इयत्तेत शिकत असलेल्या अल्पसंख्याक लोकसमूहातील मुला मुली साठी मराठी भाषा फौंडेशन वर्ग योजना सुधारित स्वरुपात राबविण्याबाबत 

   आज अलिकडे अल्पसंख्याक कार्यशाळा. अल्पसंख्याक मेळावे. अल्पसंख्याक हक्क व अधिकार. नियोजन. जिल्ह्यात अल्पसंख्याक अध्यक्ष आपल्या वाहनांना आपल्या अध्यक्ष पदाच्या मोठ्या मोठ्या पाट्या लावून फिरतात एक वेळ अशी आली कि अल्पसंख्याक दिन आॅनलाइन पध्दतीने साजरा करण्यात आला प्रत्त्येक जण आपापल्या राजकीय वर्तुळात या अल्पसंख्याक समाजातील लोकांचा कसा वापर करता येईल याकडे जादा लक्ष आहे

          अल्पसंख्याक समाजा बद्दल जर कोणाला कळवाळा असेल तर त्यांनी एकाच काम करा ते म्हणजे अल्पसंख्याक असल्याचा पुरावा देणे हि अट रद्द करा जुना समाज अडाणी होता कागदाची किंमत त्यांना त्यावेळी कळली नाही त्यामुळे ६० वर्षाचा पुरावा मिळणे शक्यच नाही 

          अल्पसंख्याक योजनेअंतर्गत शिक्षणासाठी कर्ज योजना आहे पण त्या योजनेचा कर्ज पुरवठा मंडळाने करणे गरजेचे आहे कारण मंडळाने जर कर्ज प्रकरणे मंजूर केली तरि बॅंका हि प्रकरणे निकाली काढत नाही त्यात विनाकारण अटि घालून कर्ज प्रकरणे बाद केले जाते नाहि तर मग बॅंक मॅनेजर यांना टक्केवारी दिली तरच कर्ज प्रकरणाला मंजुरी मिळते किती वाईट आहे बघ

               वरील प्रमाणे समाजसेवा उठाव बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको प्रचार प्रसार प्रसिध्दी वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी विविध गाव तालुका जिल्हा राज्य देश यातून पदाधिकारी नेमणे आहे तरी इच्छुक व्यक्ति तरुण यांनी संपर्क साधावा

     संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अन्न धान्य सुरक्षा रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

९८९०८२५८५९

माहिती अधिकार

आपण जर एखाद्या शासकीय आॅफिस मध्ये माहिती अधिकार दाखल केला असेल तर त्या संदर्भात असणारि माहिती हि त्या कार्यालयाच्या लेटर हेड वर देणे बंधनकारक आहे अशी माहिती मिळत नसेल तर कार्यालय दिरंगाई वरिष्ठांकडे तक्रार दाखल करा


वाचा - 

डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जीवन घटनाक्रम आणि कार्यकर्तृत्व - Dr Babasaheb Ambedkar...

कशी नशिबाने थट्टा मांडली - मानवसेवा प्रकल्प ....

अहमदनगर किला - AHMEDNAGAR FORT ...

चुकीची माहिती देऊ नका - खासदार इम्तियाज जलील AIMIM MP IMTIYAZ JALIL....


ती दिवस- रात्र रस्त्यावर फिरत होती - Manavseva Project

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

रस्त्यावरच दिवस-रात्र काढणा-या २४ ‌वर्षीय बेघर, 

निराधार तरुणीला मानवसेवा प्रकल्पाचा आधार.



जळगाव जिल्ह्यातील अमळनेर परिसरात एक २४ ‌वर्षाची तरुणी रस्त्यावर दिवस-रात्र फिरत होती. मानसिक भान नसल्यामुळे सर्व नाती विस्कटली, आयुष्याची पुर्ण लक्तरी उडाली. अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री संजय पाटील यांनी समाजसेवी संस्थांचे मार्गदर्शक मा. प्रा. श्री अविनाश मुंडके सर यांना कळविले. मुंडके सर यांनी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांना या तरुणीबाबत माहिती दिली. एक एअर होस्टेज मानसिक ताण-तणावातून सर्व काही हरपून वेदनांच ओझं घेवून आयुष्य जगत होती. रस्त्यावर दिवस-रात्र काढणा-या या निराधार मनोरुग्ण तरुणीला दिलीप गुंजाळ यांनी दि. १३/०१/२०२१ रोजी संस्थेच्या मानवसेवा प्रकल्पात दाखल करुन घेत मायेचा आधार दिला. मानसोपचार तज्ञ डॉ. अनय क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने उपचार सुरु केले आहे. सध्या मानवसेवा प्रकल्पात ४० बेघर, निराधार मनोरुग्ण माता-भगिनीं व बंधु उपचार घेत असल्याची माहिती प्रकल्प समन्वयक राहुल साबळे यांनी दिली. या बेघर तरुणीला दाखल करुन घेणेसाठी आणि उपचार देखभालीसाठी संस्थेचे स्वयंसेविका अनिता मदणे, कोमल कांबळे, समुपदेशक सुशांत गायकवाड, सोमनाथ बर्डे, सिराज शेख, स्वप्नील मधे, नितीन बर्डे, अजय दळवी, कृष्णा बर्डे, प्रसाद माळी, अशोक मदणे हे पुढाकार घेत आहेत.

*मानवसेवा प्रकल्प*

(मन व घर हरवलेल्या मानसांच हक्काचं घर)

द्वारा- *श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ*

☎ (०२४१) २४२९९४२

📱 ९०११७७२२३३ / ९११२०४९१९१ / ९११२०५९१९१





वाचा - 

अखिलेश यादव यांच्यावर ओवैसी यांची टीका, म्हणाले- त्यांची भिती हाच आमचा विजय AIMIM-SP..

संविधान व लोकशाही विरोधी कृत्य सहन करणार नाही - हाजी इर्शादभाई , Pune....

चुकीची माहिती देऊ नका - खासदार इम्तियाज जलील AIMIM MP IMTIYAZ JALIL...

डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जीवन घटनाक्रम आणि कार्यकर्तृत्व - Dr Babasaheb Ambedkar...


कशी नशिबाने थट्टा मांडली - मानवसेवा प्रकल्प

 कशी नशिबाने थट्टा मांडली




"त्या" अर्धनग्न मातेला मानवसेवेच्या मायेने झाकले

अहमदनगर :- १० जानेवारी २०२१

चिखलाने माखलेले केस, मानसिक भान हरवून नुसती बडबड, अंगावर फाटके कपडे, संपुर्ण शरीराची किळसवाणी अवस्थेतील एक निराधार महिला बुरुडगाव रोड, साळुंके मळा परीसरात फिरत होती. या महिलेची अवस्था पाहून श्री स्वप्नील कुलकर्णी सर आणि श्री समीर बोरा सर यांनी निराधार मानसिक विकलांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणा-या श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांना whatsapp द्वारे माहिती दिली. आज रविवार दि. १०/०१/२०२१ रोजी संस्थेचे स्वयंसेवक राहुल साबळे, सुशांत गायकवाड, अनिता मदणे, सोमनाथ बर्डे, कृष्णा बर्डे, अजय दळवी, स्वप्नील मधे, चंदा मावशी हे प्रत्यक्ष बुरुडगाव रोडवर जावून या निराधार मानसिक विकलांग महिलेची सुशृषा करुन उपचार व पुनर्वसनाकरीता श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या“मानवसेवा”प्रकल्पात दाखल करुन आधार दिला. मानसोपचार तज्ञ डॉ. अनय क्षीरसागर हे या महिलेवर उपचार करीत आहेत. 

अहमदनगर - मैला बालों वाली एक बेघर महिला, होश खो बैठी, फटे कपड़े, बदहवास बदन बड़ागांव रोड के सालुंके माला इलाके में घूम रही था। इस महिला की स्थिति को देखकर, श्री स्वप्निल कुलकर्णी सर और श्री समीर बोरा सर ने श्री अमृतवाहिनी ग्राम विकास मंडल के संस्थापक दिलीप गुंजल को सूचित किया, जो व्हाट्सएप के माध्यम से मानसिक रूप से विकलांगों के पुनर्वास के लिए काम कर रहे हैं। आज रविवार है। 10/01/2021 को, संगठन के स्वयंसेवकों राहुल सेबल, सुशांत गायकवाड़, अनीता मदने, सोमनाथ बर्डे, कृष्णा बर्डे, अजय दलवी, स्वप्निल माधे, चंदा मावे ने सीधे बुरडगाँव रोड पर जाकर इस बेसहारा मानसिक रूप से विकलांग महिला की देखभाल की। "मानव सेवा" परियोजना में दाखिल करके समर्थित। मनोचिकित्सक डॉ अनय क्षीरसागर इस महिला का इलाज कर रहे हैं।

मानवसेवा हीच, ईश्वर सेवा!

•••••••••••••••••••••••••

मानवसेवा प्रकल्प

(मन व घर हरवलेल्या मानसांच हक्काच घर)

द्वारा - *श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ*

☎ (०२४१) २४२९९४२

📱 ९०११७७२२३३, ९११२०४९१९१, ९११२०५९१९१




वाचा - 

गुटखा मावा बंदीवर सर्व उच्च न्यायालयाचा आदेश- Gutkha,Mawa, Banned...

पूर्व सैनिक ने ISI को दी थीं भारतीय सेना की खुफिया सूचनाएं, टेरर फंडिग के मिले सबूत...

मुस्लिम क्रांतिकारक मौलवी भाग ४ - Muslim Indian Freedom Fighter ....

महिलांनी आपल्या आरोग्याबाबत जागरुक राहिले पाहिजे - डॉ.रेश्मा चेडे...

गुजरात राज्यातील हरवलेल्या वृद्ध महिलेला मानवसेवा प्रकल्पामुळे पुन्हा मिळाले कुटुंब - manavseva project ....


अहमदनगर किला - AHMEDNAGAR FORT

 #_I_love_Ahmednagar





          अहमदनगर के पास भिंगार नदी पर स्थित एक किला है। यह अहमदनगर सल्तनत का मुख्यालय था। 1803 में, इसे दूसरे एंग्लो-मराठा युद्ध के दौरान अंग्रेजों द्वारा लिया गया था। इसे ब्रिटिश राज के दौरान जेल के रूप में इस्तेमाल किया गया था। वर्तमान में, किला भारतीय सेना के बख्तरबंद कोर के प्रशासन के अधीन है।


प्रमुख विशेषताएं

1803 में अहमदनगर किला दिखने में गोल था, जिसमें चौबीस गढ़, एक बड़ा गेट, और तीन छोटे सैली पोर्ट थे। यह एक हिमनद था, कोई ढंका हुआ रास्ता नहीं; एक खाई, दोनों तरफ पत्थर के साथ, लगभग 18 फीट (5.5 मीटर) चौड़ी, 9 फीट (2.7 मीटर) पानी के साथ चारों ओर, जो केवल स्कार्प के शीर्ष के 6 या 7 फीट (2.1 मीटर) तक पहुंच गया था; चारों ओर लंबे नरकट उग आए। बरम केवल एक गज चौड़ा था। प्राचीर काले हेवन पत्थर का था; चूनम में ईंट का पैरापेट, और दोनों एक साथ ग्लेशिस की शिखा से दिखाई देते थे जो कि एक क्षेत्र-अधिकारी के तम्बू के ध्रुव के समान ऊंचा होता था। गढ़ सभी लगभग 1 ⁄2 फीट ऊंचे थे; वे गोल थे। उनमें से एक ने आठ बंदूकों को बारबेट पर रखा, जो पूर्व की ओर इशारा करते थे; बाकी सभी में जिंगी था, [वर्तनी की जांच करें] प्रत्येक में चार। 1803 में प्रत्येक गढ़ में दो बंदूकें दिखाई दीं, और कहा गया कि किले में 200 घुड़सवार तैयार किए जाएंगे।

किले के पश्चिम में एक गनशॉट अहमदनगर का पेटा था। किले के मुख्य द्वार ने पेटा का सामना किया, और पुरुषों के लिए एक छोटे से अर्धवृत्त और कई छोटे टावरों के साथ एक छोटे से अर्ध-वृत्ताकार कार्य द्वारा बचाव किया गया था। खाई के ऊपर एक लकड़ी का पुल था, जिसे युद्ध के समय में निकाला जा सकता था, लेकिन यह एक ड्रॉब्रिज नहीं था। यह बताया गया था कि पुल के रूप में एक लोहे का गर्त, उस पर या उसके समर्थकों पर रखा जा सकता है, और लकड़ी का कोयला या अन्य कंबस्टिबल्स के साथ भरा जा सकता है, जिसे दुश्मन के संपर्क में आने के रूप में प्रज्वलित किया जा सकता है।

एक छोटी नदी उत्तर की ओर से आई थी, जो कि पेटा के पश्चिम की ओर गोल थी, और किले के दक्षिण की ओर चली गई। किले के बीच में उत्तर की ओर से एक नाला भी गुजरता है, जो भिंगार नामक एक शहर और पूर्व की ओर बंदूक की नोक पर आता है और नदी में समा जाता है। एक संभावित रक्षात्मक कमजोरी, भिंगार के करीब और पूर्व में एक छोटी पहाड़ी या बढ़ती जमीन थी, जहाँ से घेराबंदी की गई तोपों से गोली मारकर किले तक पहुँचा जा सकता था।

पहाड़ियों से दो नल या ढंके हुए एक्वाडक्ट्स उत्तर की ओर एक मील या उससे अधिक की दूरी से गुजरे और पेटा और कस्बे की आपूर्ति करते थे, और फिर किले में, खाई के नीचे या उसके नीचे तक चले जाते थे, जिसमें अपशिष्ट गिर जाता था।

सैली बंदरगाहों से खाई के पार कोई मार्ग नहीं था, और खाई के ऊपर एक्वाडक्ट्स का कोई हिस्सा दिखाई नहीं दिया। ऊपर उल्लिखित नाले में खड़ी बैंक थीं और किले के 60 गज के भीतर से गुजरती थीं; भिंगार से जलमार्ग इसके नीचे से गुजरा। नाले पर कोई पुल या एक प्रमुख क्रॉसिंग पॉइंट भी नहीं था और इसलिए किले और भिंगार शहर के बीच कोई स्पष्ट रूप से परिभाषित मार्ग नहीं था।

पेटा और किले के आसपास कई छोटे पैगोडा और मस्जिद थे, लेकिन उन कस्बों की तुलना में किले और भिंगार के बीच या किले के पास बिल्कुल भी नहीं था।

इतिहास

िले का निर्माण मलिक अहमद निज़ाम शाह प्रथम (जिनके नाम पर अहमदनगर शहर के नाम पर किया गया था) ने 1427 में किया था। [उद्धरण वांछित] वह निज़ाम शाही वंश का पहला सुल्तान था और उसने पड़ोसी से आक्रमणकारियों के खिलाफ शहर की रक्षा के लिए किला बनवाया था। इदर [प्रशस्ति पत्र की जरूरत] शुरू में यह मिट्टी से बना था, लेकिन प्रमुख किलेबंदी 1559 में हुसैन निजाम शाह के तहत शुरू हुई। चार साल लग गए और आखिरकार 1562 में समाप्त हो गया। [उद्धरण वांछित] 1596 में, चांद बीबी रानी ने मुगल आक्रमण को सफलतापूर्वक विफल कर दिया, लेकिन जब अकबर ने 1600 में फिर से हमला किया तो किला मुगलों के पास चला गया।

औरंगजेब की मृत्यु 20 फरवरी 1707 को 88 वर्ष की आयु में अहमदनगर किले में हुई थी। औरंगजेब की मृत्यु के बाद, यह किला 1724 में निज़ामों को, 1759 में मराठों को और बाद में 1790 में सिंधियाओं को दे दिया गया। मराठा साम्राज्य में अस्थिरता की अवधि के बाद माधवराव द्वितीय की मृत्यु, दौलत सिंधिया का किला और उसके आसपास का क्षेत्र उसके पास था। 1797 में, उन्होंने नाना फडणवीस को पेशवा राजनयिक को अहमदनगर किले में कैद कर दिया।

1803 में द्वितीय आंग्ल-मराठा युद्ध के दौरान, आर्थर वेलेस्ली ने मराठा सेनाओं को हराया और ईस्ट इंडिया कंपनी किले के कब्जे में आ गई।




आधुनिक युग

किले को अहमदनगुर किले के रूप में जाना जाता था और ब्रिटिश राज द्वारा एक जेल के रूप में इस्तेमाल किया गया था और यहीं से जवाहरलाल नेहरू, अबुल कलाम आज़ाद, सरदार पटेल और भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के नौ अन्य सदस्यों को छोड़ दिया गया था जब वे भारत छोड़ दिए गए थे। भारत का संकल्प। [४] [५] जवाहरलाल नेहरू ने अपनी लोकप्रिय पुस्तक-डिस्कवरी ऑफ इंडिया- लिखी थी, जबकि उन्हें अहमदनगर किले में कैद किया गया था। [२] [५] [६] उसी समय के दौरान, कांग्रेस नेता, मौलाना अबुल कलाम आज़ाद ने भी अपने प्रशंसित "ग़ुबार-ए-ख़ातिर" (Sallies of Mind) (उर्दू: اربار طاطر) को संकलित किया, जिसे उर्दू साहित्य में "उपनिवेशवादी निबंध" का सबसे अच्छा उदाहरण माना जाता है। ।

वर्तमान में, किला भारतीय सेना के बख्तरबंद कोर के प्रशासन के अधीन है।

फिरोज शेख 

(अहमदनगर महाराष्ट्र)


वाचा -

गुटखा मावा बंदीवर सर्व उच्च न्यायालयाचा आदेश- Gutkha,Mawa, Banned

पूर्व सैनिक ने ISI को दी थीं भारतीय सेना की खुफिया सूचनाएं, टेरर फंडिग के मिले सबूत...

मुस्लिम क्रांतिकारक मौलवी भाग ४ - Muslim Indian Freedom Fighter ...

मुस्लिम धर्मीयांची चौकशी करून जात प्रमाणपत्र द्या! उच्च न्यायालय - Mumbai High court....

मुस्लिम क्रांतिकारक मौलवी भाग ४ - Muslim Indian Freedom Fighter


 

नवाब अमीर खान (१७६८-१८३४) :

नवाब अमीर खान टोक संस्थानिकाचे संस्थापक आणि राज्यकर्ते होते. वडिलांचे नाव मोहम्मद हयात खान आणि आजोबांचे नाव ताले मोहम्मद खान होते. ताले मोहम्मद खान, मुगल राजा मोहम्मद शहा च्या काळात सरहद पासून रुहेल खंडाच्या ठिकाणी आले. 

अमीर खानचा जन्म १७६८ मध्ये संबल जिल्हा मुरादाबाद मध्ये झाला. आमीर खान हे खूप बहाद्दूर आणि निडर होते. त्यांनी मराठा सरदार यशवंतराव होळकर च्या साथीने अनेक मोहिमावर जाऊन विजय मिळविला होता. सन १८१७ पर्यंत ते इंग्रजांच्या विरुद्ध राहून अनेक वेळा त्यांच्याविरुद्ध युद्धात इंग्रजांना पाणी पाजले होते. पण ६ जानेवारी १८१८ला इंग्रजाबरोबर त्यांना नाईलाजाने तह करावा लागला या तहानुसार मिर खान यांना टॉक संस्थानिकाचा राजा मानण्यात आले. या तहाच्या अगोदर सय्यद अहमद शहीद सात वर्षापर्यंत त्यांच्या सेनेमध्ये होते. सप्टेंबर १८३४ ला आमीर खान यांचा मृत्यू झाला.

नवाब सिराजउद्दौला ला इंग्रजा विषयी खूप गुरूंना होती. त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या किल्ले आणि फॅक्टरीवर कब्जा करून कलकत्त्यामध्ये इंग्रजांना जगणे दुससहाय्य करून सोडले होत. २३ जून १७५७ ला प्लासीच्या मैदानात इंग्रजाबरोबर युद्ध झाले. मीर जाफर सारख्या गद्दाराला मुळे लवकरच त्यांना अटक झाली आणि २ जुलाई १७५७ ला सर्वांसमोर त्यांची हत्या केली गेली.

बहादुर शहा जफर (१७७५-१८६२)

अबू जफर सिराजुद्दीन मोहम्मद बहादुर शहा जफर मोगल साम्राज्याचे शेवटचे बादशाह होते. हाफिज मोहम्मद इब्राहिम आणि कारी मोहम्मद खलील इ. शिक्षकांकडून धार्मिक शिक्षण घेतले. सय्यद जलालुद्दीन हैदर आणि मीर इब्राहीम आली यांच्याकडून लिहायला व वाचायला शिकले. याव्यतिरिक्त धनुष्य चालवणे, तलवारबाजी, निशानेबाजी,आणि घोडेस्वारीमध्ये हि प्राविण्य मिळवले होते. २८ सप्टेंबर १८३७ ला दुसरा अकबर शहा यांच्या मृत्यूनंतर दिल्लीच्या गादीवर विराजमान झाले. १८५७ च्या स्वतंत्र संग्राम आपल्याच झेंड्याखाली लढला गेला. स्वातंत्र्यसंग्रामात इंग्रजांचा विजय झाला. २१ सप्टेंबर १८५७ ला हुमायु च्या कबरीजवळून बहादुर शहा जफर ला अटक केली गेली. युवराजांची हत्या केली गेली होती आणि यांच्याविरुद्ध  द्रोहाचा गुन्हा दाखल केला गेला.२७ जानेवारी १८५८ ला कोर्टाची कारवाई सुरू झाली व ९ मार्च १८५८ ला निकाल देण्यात आला. त्यांना देश सोडण्यास सांगण्यात आले व राणी जीनत महल आणि मुलगा जवान बक्तच्या बरोबर त्यांना रंगूला पाठवण्यात आले. ६०० रू महिना त्यांना ठरवून देण्यात आला होता. ज्याला बहादुर शहा जफर ने घेण्यास नकार दिला आणि राहिलेले चार वर्ष एकदम हलाखीत आणि गरिबीत काढले व त्यातच ७ नोव्हेंबर १८६२ ला त्यांना मृत्यूने कवटाळले.


मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी 

मौलाना चा जन्म १८३२ मध्ये सहारनपुर जिल्ह्यातील नानोता गावात झाला. १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी मोठ्या हिरीरीने भाग घेतला आणि शामली च्या जवळ इंग्रजांच्या विरुद्ध जो मोर्चा तयार झाला होता त्याचे नेतृत्व मौलाना मोहम्मद कासिम नानोत्वी यांनीच केले होते. युद्धात इंग्रजांचा विजय झाला आणि मौलाना यांच्याविरुद्ध अटक वॉरंट निघाले. बक्षिसाची घोषणा करण्यात आली पण इंग्रज पोलीस खूप प्रयत्न नंतरही त्यांना अटक करू शकले नाही. दोन वर्षापर्यंत असेच गावात शहरात भुमिगत राहिले.

मौलाना नानोत्वी एक ज्ञानी संपादक होते. रोजगारावर त्यांनी कित्येक पुस्तकांचे प्रकाशन केले होते. शिक्षणाचा प्रसार करण्यात अग्रेसर होते.दारुल उलूम देवबंद सारखे मोठे मोठे मदरसे शिक्षण संस्था उभ्या केल्या व त्यामधूनच त्यांनी खूप प्रमाणात स्वातंत्र्य चळवळीसाठी मोठा युवक वर्ग उभा केला होता.१५ एप्रिल १८८० ला त्यांचा मृत्यू झाला.


मौलाना फरिदुद्दिन देहलवी - शहीद १८५७ 

मौलाना फरिदुद्दिन त्यावेळेचे खूप मोठे धर्मोपदेशक होते. त्यांना बहादुर शहा जफर यांनी जामा मजीत मध्ये धर्मोपदेश  देण्यासाठी नियुक्ती केले होते. त्यांनी  १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतला होता. इंग्रजांच्या विरुद्ध च्या लढ्याच्या फतव्यावर त्यांची सुद्धा स्वाक्षरी होत. स्वातंत्र्य संग्रामाच्या आदेशानंतर एकेदवशी इंग्रजांची सेना त्यांच्या घरात घुसली आणि त्यांना शहीद करण्यात आले.


मौलाना किफायत आली काकी शहीद

शहीद १८५८ मौलाना किफायत आली काकी खानदान चे वारस होते. मुरादाबाद ला ते रहात होते. १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी हिरीरीने भाग घेतला. नवाब मुजददिन उर्फ नवाब मज्जू खानच्या स्वातंत्र्य राज्यात ते कायदा मंत्री होते. जेव्हा मुरादाबाद वर नवाब यांचे रामपूर ला वर्चस्व कायम झाले तर इंग्रजांच्या विरुद्ध लढ्याच फतवा जारी केला आणि या फतव्याला दुसऱ्या ठिकाणी सुद्धा पोहोचविले. २५ ऑक्टोबर १८५० ला मुरादाबाद वर परत इंग्रजांचा कब्जा झाला आणि ३० एप्रिल १८५८ ला त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांना फासावर लटकवण्यात आले. मौलाना काकीला मुरादाबाद च्या जेलच्या बाहेर जमा झालेल्या लोकांसमोर फाशी देण्यात आली आणि तेथेच त्यांना दफन करण्यात आले. 


शैखुल हिंद मौलाना महमूद हसन देवबंदी - 

शैखुल हिंद मौलाना मोहम्मद हसन देवबंदी एक मोठे धार्मिक विद्वान, तर्कशास्त्र, प्राविण्य, धर्मोपदेशक, मार्गदर्शक आणि स्वातंत्र्यसंग्रामातील चळवळीचे अग्रणीचे नेते होते. 

स्वातंत्र्याच्या संग्रामातील मोलाचे योगदान उल्लेखनीय आहे. मौलानांनी स्वातंत्र्यसंग्रामाला सुरुवात त्यावेळेस केली ज्यावेळेस इंडियन नॅशनल काँग्रेस अस्तित्वात सुद्धा नव्हती. १८७८ मध्ये त्यांनी "अंजुमन तम्रतुतर्तिब" स्थापन करून स्वातंत्र्यासाठी संघर्ष सुरू केला. १९०९ मध्ये जमियातुल अन्सार, १९१६ मध्ये रेशमी रुमाल चळवळ या नावाने स्वातंत्र्याच्या चळवळ सुरू करून क्रांतिकारकांना जोडून प्रोत्साहन दिले.

इंग्रजांना देश सोडण्यासाठी एक अशी सुनियोजित योजना तयार केली होती की ती जर यशस्वी झाली असती तर पूर्ण जगातील इंग्रजांचे वर्चस्व समाप्त झाले असते. मौलाना यांच्या या आंदोलनाचा प्रसार भारतातून रशिया जर्मनी तुर्की अफगाणिस्तानात आणि अरब देशापर्यंत झाला होता.पण दुर्दैव हे की वेळेपूर्वीच गुपित फुटले आणि स्वातंत्र्याच्या क्रांतिकारी जेलमध्ये बंद केले गले.

मौलाना मोहम्मद हसन यांना त्यांचे चार सोबत त्यांचं मक्का शहरात अटक करण्यात आली आणि मिश्र (इजिप्त) च्या आणि मालाच्या तुरुंगात बंद करण्यात आले. तीन वर्ष जेल मध्ये राहिल्यानंतर १९२० ला त्यांना भारतात आणण्यात आले. ३० नोवेंबर १९२० ला दीर्घ आजाराने त्यांचा मृत्यू झाला.


मौलाना उबेदउल्ला सिंधी (१८७२-१९४४) 

इन्कलाब चळवळीचे अग्रणी होते. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी २४ वर्षापर्यंत लागोपाठ एका देशातून दुसऱ्या देशात जाऊन प्रयत्न करीत राहिले. विविध शिक्षकांकडून शिक्षण घेतल्यानंतर उच्च शिक्षणासाठी देव बंदला आले आणि तेथे मौलाना गंगोही कडून ज्ञान प्राप्त केला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शेखुल हिंद यांनी स्वातंत्र्य चळवळीच्या आणि ध्येयाचे गुपित सांगून सदस्य बनवून सिंध प्रांतात पाठवले. तेथे ज्ञानदाना बरोबर स्वातंत्र्याच्या चळवळीचे काम वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केले. सन १९१४ मध्ये विश्व युद्ध भडकल्या नंतर शेखुल हिंदच्या आदेशाने काबूलला गेले आणि इंग्रजी राजवटीच्या विरुद्ध इस्लामी देशांची एकजूट करण्याचे प्रयत्न केले आणि स्वतंत्र भारताची पायाभरणी केली व यासाठी विभिन्न देशाचा दौरा केला. भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी मॉस्को पर्यंत गेले. पण शेखुल हिंदीचे स्वातंत्र्याची चळवळ अपयशी ठरली आणि त्यांना देश सोडण्याचा आदेश जारी करण्यात आला देशात ज्या ज्या लोकांना अटक झाली त्यांना काही वर्षानंतर सोडून देण्यात आले. परंतु मौलानांची हद्दपारी रद्द झाली नाही. १९३७ ला त्यांच्यावरील बंदी उठवण्यात आली आणि २४ वर्षानंतर आपल्या मातृभूमीवर पाय ठेवला काही दिवस दिल्लीला राहिले आणि मग लाहोरला गेले. २ ऑगस्ट १९४४ ला त्यांचा मृत्यू झाला.


मौलाना सय्यद हुसेन अहमद मदनी १८७९ - १९५७

शैखुल इस्लाम मौलाना सय्यद हुसेन अहमद मदनी यांचा जन्म १९७९ ला बांगर मऊ जिल्हा उन्नाव मध्ये झाला. हजरत शैखुल हिंद च्या मृत्यूनंतर समाजाचे नेतृत्वाची जबाबदारी त्यांच्यावर आल्यावर त्यांनी यशस्वी करून त्यांची उद्देश पूर्ती केली. मौलाना सय्यद मदनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी चार वेळा जेल मध्ये शिक्षा भोगली आणि खूप यातना सहन केल्या. त्यांनी सर्व मिळून एकंदर सात वर्ष तुरुंगात घालविले, ५ सप्टेंबर १९५७ ला देवबद मध्ये त्यांचा मृत्यू झाला.


मौलाना बरकतुल्लाह भोपाली १८६२-१९२७

मौलाना बरकतुल्लाह भोपाली स्वातंत्र्यलढ्यातील एक मोठे लढवय्ये भोपाल राज्याचे तत्कालीन प्रधानमंत्री, गदर पार्टीचे संस्थापक आणि शैखुल  हिंद द्वारा चालवलेल्या चळवळीचे सेनापती होते. १८६२ मध्ये भोपाळमध्ये जन्म झाला. काही दिवस मुंबईमध्ये राहून इंग्रजीचे शिक्षण घेतले. १८९० मध्ये इंग्लंडला गेले. तेथून त्यांच्यावर देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी प्रयत्न मिळाली आणि त्यामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिले आणि स्वातंत्र्यप्राप्तीच्या प्रयत्नात त्यांनी अनेक देशांचा दौरा केला. युरोप आणि आशिया च्या कानाकोपऱ्यात पोहोचले. लंडन, अमेरिका, तुर्की, फ्रान्स, जर्मनी, डेनमार्क, जपान, रशिया, अफगाणिस्थान आणि अरब देशांचे ३६ वर्षापर्यंत लागोपाठ दौरे केले. जीवनातील सर्वात जास्त काळ त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत घालवला. २७ सप्टेंबर १९२७ ला त्यांचा मृत्यू झाला.





मुफ्ती किफायतुल्लाह १८७५ - १९५२

भारताचे प्रसिद्ध मुफ्ती आणि भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाचे सरसेनापती होते. विचारक मार्गदर्शक धर्मापदेशक शायर गणितज्ञ राजनीती तज्ञ आणि क्रांतिकारी लढवय्ये होते. मुफ्ती किफायतुल्लाह, शहाजहाँपूरच्या एका गरीब परिवारात जन्म झाला. वयाच्या २२ व्या वर्षी एक गरीब परिवारातील युवक शैखुल हिंद च्या बरोबर राहून स्वातंत्र्य चळवळीचा भाग बनला. हजरत गंगोही च्या मार्गदर्शनात पुढील वाटचाल केली. १९१७ मध्य स्वातंत्र्यासाठी " अंजुमन अआनत नजर बंदाने इस्लाम" नावाची संघटना उभी केली. जमियात उलमा ए हिंद च्या स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिका होती. २० वर्षापर्यंत जमियतचे अध्यक्ष होते. स्वातंत्र्यचळवळीत अनेकदा जेल जावे लागले.


मौलाना मुहम्मद अली जोहर १८७८-१९३१

मोहम्मद अली जोहर भारतातील एक महान व्यक्ती व महत्त्वाचे नाव आहे. जे इंग्रजी मधील एक जबरदस्त लेखक उर्दूचे प्रसिद्ध शायर आणि निडर व्यक्ती परिपक्व राजनीती तज्ञ आणि स्वातंत्र्याच्या लढाईतील सेनापती होते. मोहम्मद अली जोहर चा जन्म १० डिसेंबर १८७८ ला रामपूर उत्तर प्रदेश मध्ये झाला. प्राथमिक शिक्षण बरेली हायस्कूल येथे झाले. उच्च शिक्षणासाठी प्रथम अलिगड विश्वविद्यालयात आणि नंतर ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी ला गेले. मौलाना अब्दुल बारी फिरंगी महली कडून मार्गदर्शन लाभले. मदरसा निजामीयां मधून मौलाना ची डिग्री प्राप्त केली आणि मिस्टर च्या ऐवजी मौलाना च्या नावाने प्रसिद्ध झाले. 

ते स्वातंत्र्य चळवळीचे महान योद्धा व क्रांतिकारी होते. स्वातंत्र्य संग्रामातील आपल्या कार्याला तोड नव्हती. मौलानांनी इंग्रजी साप्ताहिक कॉम्रेड आणि उर्दू दैनिक वृत्तपत्र हमदर्द च्या माध्यमातून स्वातंत्र्य आंदोलनाला नवे वळण दिले.


मौलाना अबुल कलाम १८८८-१९५८

इमामुल हिंद मौलाना अबुल कलाम आझाद भारताचे एक महान सुपुत्र स्वातंत्र्य चळवळीचे सरसेनापती आणि एक महान हरहुन्नरी व्यक्तिमत्व होते. १७ ऑगस्ट १८८८ रोजी मक्का शहरात जन्म झाला. वडिलांचे नाव खैरुद्दिन होते जे एक प्रसिद्ध धर्मोपदेशक होते. कला आणि संस्कृती वर प्रभुत्व होते. त्यांच्या भाषणात एक प्रकारची जादू होती.

आपल्या भाषणाने आणि लेखणीने हजारो-लाखच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत जागविली. त्यांचे वृत्तपत्र अल हिलाल ने देशाच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्याच्या बिगुल वाजवला. १९१५ मध्य आपल्या राजनीतिक कार्यामुळे बंगाल सरकारने त्यांना हद्दपार करून रांचीमध्ये नजरबंद केले. त्यानंतर स्वातंत्र्याच्या लढाईत अनेक वेळा अटक होत राहिली. मौलानांनी जवळ-जवळ १६ वर्ष तुरुंगात शिक्षा भोगली.

सुरुवातीला जमियात उलमा ए हिंद वर्किंग कमिटीचे सदस्य होते. लाहोरमधील मुख्य अधिवेशन १९२१ आणि कराची चे अधिवेशन १९३१ मध्य कांग्रेस पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते. स्वातंत्र्यापूर्वी सात वर्ष काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वात " अंग्रेज भारत छोडो" quit India movement 1942 आंदोलन चालवले होते. स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले शिक्षण मंत्री झाले.मौलानांच्या राजकीय धार्मिक आणि ज्ञानावर इतके लिहिले गेले आहे की ते सर्व एकत्र केले की कित्येक पुस्तके तयार होतील. सन १९५८ मध्ये मौलानांचा मृत्यू झाला.



मौलाना शौकत अली १८७३-१९३३

मौलाना शौकत अली खिलाफत चळवळीचे महत्त्वाचे नेते. अंजुमने खुद्दामे काबा चे संस्थापक. मौलाना मोहम्मद अली जोहर च मोठे भाऊ होते. १० मार्च १८७३ तुझा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण बरेली च्या हायस्कूलमध्ये झाले. मुस्लीम युनिव्हर्सिटी अलिगड मधून १८८९ का बी. ए पास झाले. ग्रॅज्युएट झाल्यानंतर सरकारी नोकरी केली. सर आगाखान चे खाजगी सेक्रेटरी सुद्धा होते. देश सेवेसाठी नंतर सर्व सोडून दिले. स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला प्रथम ३० मे १९१५ ला अटक झाली. डिसेंबर १९१९ ला सुटका झाली, नंतर खिलाफत चळवळीच्या बाबत प्रसिद्ध कराचीच्या खटल्यात दोन वेळा तुरुंगवास भोगला. आपल्या सोबतया बरोबर दोन वर्ष करायची जेलमध्ये होते. त्याच वेळी दोन्ही भाऊ अली बंधू च्या नावाने प्रसिद्ध झाले.

शौकत अलींच्या समाज सेवेला पाहून त्यांचे गुरु व धर्मोपदेशक मार्गदर्शक मौलाना अब्दुल बारी फिरंगी महली यांनी मौलाना ची मानाची पदवी प्रदान केली आणि त्यानंतर मौलाना च्या नावाने प्रसिद्ध झाले. २६ नोव्हेंबर २९३३ ला दिल्लीमध्ये मृत्यू झाला. जामा मस्जिद च्या पूर्वी कडील दरवाज्याच्या जवळील छोट्या  मस्जिद च्या आवारात दफन करण्यात आले.

संदर्भ - भारतीय स्वतंत्रता आंदोलन और मुसलमान

कांती विशेष अंक ४ ऑक्टोबर २०१५ 

वाचा - 

मुस्लिम धर्मीयांची चौकशी करून जात प्रमाणपत्र द्या! उच्च न्यायालय - Mumbai High court....

चीनी नायलॉन मांजा विकणाऱ्या व्यापारीवर कारवाही का होत नाही? डॉ परवेज अशरफी .....

मखदुम सोसायटीच्यावतीने मिर्जा गालिब जयंती साजरी - MIRZA GALIB....

ऐतिहासिक अहमदनगर काही घटना काही आठवणी - Historical Ahmednagar ....

१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान भाग ३ - Indian Muslim Freedom Fighter...

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या