Showing posts with label गुलाम. Show all posts
Showing posts with label गुलाम. Show all posts

शिक्षण धनिकांचे गुलाम आहे?

 


शिक्षण धनिकांचे गुलाम आहे?

      . 2020 रोजी कोरोना सारखे महामारी भयंकर संकटाने सर्वत्र थैमान घातले. गाडीला घुणा लागावा तसा सर्व मानवी जीवन विस्कळीत झाले. कोरोना सारख्या महाभयंकर महामारी संकटापासून वाचण्यासाठी शासनाने लाॅकडाऊन जारी केला. सर्वसामान्य माणूस. हातावर चे पोट असणारे कामगार. नोकरवर्ग. फळें फुले भाजीपाला विक्री करणारे. बांधकाम कामगार. वडापाव गाडी. चायनिज असे विविध रस्त्यांवर व्यवसाय करणारे टाळेबंदी काळात अडचणीत आले. लहान सहान कंपन्या. लहान उद्योग. मोठ्या कंपन्या. यातील कामगार बेरोजगार होऊन गावाकडे आले गावात सुध्दा त्यांना म्हणावी अशी वागणूक मिळाली नाही. एस टी कामगार. घरकाम करणाऱ्या महिलां. पापड लोणची चटण्या तयार करणारे बचत गट पॅसेंजर वडाप करणारे वाहनं चालक आणि मालक. मालवाहतूक करणारे वाहन चालक व मालक. यांनी बॅंकेकडून कर्ज काढून हप्त्यावर घेतलेली वाहने टाळेबंदी काळात जागयावरच उभी राहिली. एस टी कामगार व यांना सुध्दा टाळेबंदी काळात आपली हक्काची नोकरी सोडून घरांत बसावें लागलें इतर वाहनं व्यवसाय करणारे यांनी मिळेल ते काम केले ज्यांना हे जमलं नाही त्यांनी आपली व आपल्या कुटुंबाची उपासमारीची वेळ बिकट वेळ बघून त्यांना हे सर्व बघावले नाही आणि त्यांनी आत्महत्या सारखें मार्ग निवडले आणि आपलीं जीवन यात्रा संपवली किती वाईट आहे 

              कोरोना काळात वरिल प्रकारा पेक्षा जास्त भयानक प्रकार आणि आपणांस व आपल्या मुलांना अंधारात घालणारा काळ म्हणजे शाळा बंद शिक्षण थांबले. विद्यार्थी यांचें मोठे नुकसान होण्यास सुरुवात झाली. कोरोना पासून भावी पिढी वाचावी यासाठी शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. शासनाने पुन्हा अजून एक निर्णय घेतला तो म्हणजे आॅनलाइन शिक्षण घेण्याचा. मग काय ग्रामीण भागात असणार्या शाळा व विद्यालये विद्यार्थी यांना मोबाईल रेंज चा त्रास सहन करावा लागला. ग्रामीण भागात लाईट अनियमितता आॅनलाइन तास असतील त्यावेळी लाईट असेलच असे नाही. लाईट नाही म्हणजे मोबाईल चार्जिंग नाही. आपलं मुलं शिकाव अशी प्रत्त्येक पालकांची इच्छा असते. ग्रामीण भागात अशी काही कुटुंब आहेत की रोज कामाला गेल्याशिवाय घरात चूल पेटत नाही त्यांच्या मुलांना कुठला अॅनडराॅइड मोबाईल. घरातील मंडळी त्या मुलांची समजूत काढत. पण शिक्षण आॅनलाइन आहे माझा अभ्यास पुढे जाईल या मानसिकतेतून. काही मुलांनी मोबाईल साठी आत्महत्या केल्याचे प्रकार आपण वृतमानपत्रात बघतो वाचतो. काय अपराध केला होता त्या पालकांनी ग्रामीण भागात शहरी भागात शाळा कॉलेज विद्यालये महाविद्यालये उच्च शिक्षण देणारी विद्यापीठ. यात समोर बसून शिक्षण घेणारे विद्यार्थी. यांना काय मोबाईलची गरज कधी पडली नाही. शहरात आज अनेक मुलांच्या कडे मोबाईल आहेत कारणं घरची परिस्थिती चांगली असते आई वडील नोकरीला असतात त्यामुळे त्यांना जास्त त्रासाचा विषय नाही. मोबाईल रिचार्ज वेळेवर मिळतो. ग्रामीण भागातील लोकांची प्रस्थिती बेताची असते त्यामुळे मोबाईल रिचार्ज साठी पैसे सुध्दा नसतात त्यावेळी घरातील बाजार थांबवून मुलांच्या आॅनलाइन शिक्षणासाठी मोबाईल रिचार्ज करणारे पालक मी बघितले आहेत. नेमकं काय आहे षडयंत्र. मोबाईल कंपन्या आणि सरकार यांच काय साटंलोटं आहे का ? कारण सर्व नोंदणी अर्ज. बॅंक खात्यातील व्यवहार. अस सर्व आत्ता आपण न जाता मोबाईल वरून आपण घर बसल्या करु शकतो. म्हणजे सर्व आॅनलाइन मोबाईल शिवाय होणार नाही त्यामुळे मोबाईल कंपन्या बरोबर सरकारने करार केला आहे काय अशी शंका आली आहे 

            आज दिड वर्ष झाले तरीही शिक्षण व्यवस्थेत सुधारणा झाली नाही अजून सुद्धा महिन्याला चारसे पाचसे रुपये मोबाईल रिचार्ज आॅनलाइन शिक्षण घेण्यासाठी आजपर्यंत किती पैसे आपण मोबाईल रिचार्ज चया नावाखाली घालवले असतील. त्यांचा काय हिशोब आहे का? पैसे गेले वाईट वाटत नाही पण शाळेत मिळणारे शिक्षकाने शिकविलेले शिक्षण मुलांना कळत नाही मग मोबाईल वर आॅनलाइन पध्दतीने शिक्षण घेणारी मुलं काय शिकली असतील. ज्यांचे पालक शिक्षित आहे ते आपल्या मुलांचा अभ्यास घेतील पण ज्याचे पालक अडाणी अशिक्षित आहे त्यांना मोबाईल सुध्दा पकडता येत नाही आपला मुलगा मोबाईल वर काय शिकतो काय करतो काय कळणार त्या पालकांना म्हणजे आॅनलाइन पध्दतीने मिळवणारे शिक्षण मोठ्यांच्या मुलांना हुशार करणारं आणि गोरगरीब मुलांना अडाणी ठेवणारं काय असा मोठा प्रश्न पालकांच्या पुढं उभा आहे. 

          शासनाला जाग आली आणि शासनाने एक दिवस निर्णय जाहीर केला ८/१० /१२ ह्या सुरू करण्याचा मुलांना पालकांना आनंद झाला. एवढ्या दिवसांच्या प्रतिक्षे नंतर आपण शाळेत जाणार जुणे मित्र मैत्रिणी भेटणार. शाळेत खेळायला मिळणार. आॅनलाइन शिक्षण घेताना होणारें जागरण त्यामुळे लवकर उठण्याची बिघडलेली वेळ पुन्हा मूळ पदावर येणार. शारीरिक हालचाल. शारीरिक व्यायाम. शारीरिक बौद्धिक मानसिक तयारी ही फक्त शाळेतच होते मुलांचे एकामेकासोबत मनमोकळेपणाने बोलने. मुलांचं काही बौद्धिक खेळ मेंदूला आणि शरिराला झटकून जाग करणारं असतं मुल दिड वर्ष रोज मोबाईल समोर बसून मानसिक कमकुवत झाली आहेत. शाळा सुरू करताना शाळेची स्वच्छता निर्जंतुकीकरण करून घ्यावे मुलांना रोगांपासून संरक्षणासाठी पाठ देणे गरजेचे आहे. ज्या मुलांचे कोरोना काळात घरातील कोणताही व्यक्ति दगावणे असे काही नुकसान झाले असेल तर त्याबद्दल त्यांना सारखी आठवण करून तुमचे पालक पाव्हणं कोरोनाने मृत्यू पावले आहेत हे. काहीजण स्थलांतरित परस्थिती मुळे झाले आहेत. बोलू नये त्यामुळे त्या मुलांना मानसिक ताण त्रास होईल असे कोणतेही कृत्य करु नये तशी सक्त ताकीद देण्यात यावी 

              शाळा सुरू होण्याचा आपणांस पालक शिक्षक यांना व विद्यार्थी यांना आनंद झाला आहे. परंतु चालू झालेल्या शाळा तशाच चालू राहवया यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयतण करणे गरजेचे आहे. आणि हे काम शाळा शिक्षक करतील पण तेवढ्याने भागणार नाही. मुलांची वाहतूक व्यवस्था. यांनी सुध्दा काळजी घेणे गरजेचे आहे. पालकांनी मुलांना शाळेत सोडणयास यावे. कारणं दिड वर्षांनंतर चालू होणारी शाळा मुलांना आवडलं का नाही त्यामुळे आपण मुलांना शाळेत सोडणे याची जबाबदारी घेणे गरजेचे आहे   

      शासनाने परवा २०२१ ला एक शासन निर्णय जारी केला आहे त्यानुसार शालेय मुलांची फी साठी अडवणूक करु नका असे स्पष्ट निर्देश दिले आहेत पण त्यात सक्ती करु नका असाही आदेश दिला आहे. म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की फी माफ केली जाणार आहे. आम्ही इस्लामपूर पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी यांचीशी चर्चा केली असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जर शाळांनी फी माफ केली तर त्या शाळेत शिकवण्याचे काम करणारे शिक्षक यांचा पगार कसा भागणार ? मग जिल्हा परिषद पंचायत समिती यांचे निर्देश नुसार चालणार्या १/८ पर्यंत शाळा यामधील शिक्षक कायमस्वरूपी नोकरिवर आहेत त्यांचा पगार शासन देतय ना ? मग फी माफ केली तर बिघडत नाही 

          याउलट उच्च शिक्षण देणारी विद्यापीठ काॅलेज महाविद्यालय विद्यालय. यातील परिक्षा काळ जवळ येण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे या सर्व शालेय खाजगी सरकारी शालेय संस्थांनी. लाईट बील. घरफाळा पानपट्टी यांवर जसे इतर कर लावलें जातात तसा प्रकार चालू केला आहे. म्हणजे परिक्षा फी. कमी आणि लॅबररी कर. इंटरनेट कर फाॅरम भरण्याची फि काॅलेज मध्ये लागणारी सर्व स्टेशनरी बाहेरुन आणावी लागते. एवढेच काय पण रिझल्ट सुध्दा बाहेर नेट कॅफे मधून काढावा लागतो. अशा एक नाही अनेक मार्गाने विद्यार्थी आणि पालक यांना लुटायच चालू आहे. आत्ता सर्व पालक यांनी एकत्र येऊन या लुटीबाबत आवाज उठवण्याची गरज आहे. विद्यार्थी यांनी आपणं भरत असलेल्या कोणत्याही फी बाबत पावती घ्यावी. 

          मुल शाळेत जातात त्यांच्याबरोबर घरात रानात. नोकरिवर असणारे आपले पालक यांची स्वप्ने घेऊन आपण शाळेत जात असतो पण आज शिक्षण फक्त पैसा असणारे विद्यार्थी यांचेच आहे कारणं आपले पालक गरिब असल्यामुळे फी भरु शकत नाहीत त्यातच स्पर्धा परीक्षा वर्गाच्या व परिक्षा पूर्व शिक्षण या नावाखाली अनेक ठिकाणी अॅकेडमी यांचें प्रत्त्येक गावात पेव फुटले आहे त्यांनी २०२० मध्ये जानेवारी महिन्यात फी भरून घेतलीं आणि मार्च महिन्यापासून टाळेबंदी जारी झाली आणि सर्व अॅकेडमी बंद पडल्या. मात्र एकाही मुलांची फी मागे देण्यात आली नाही मग महाराष्ट्र मध्ये अशा किती अॅकेडमी असतील आणि २०२१ मध्ये सुद्धा तसाच प्रकार बघायला मिळत आहे म्हणजे लाखों रुपये मिळविण्याचा एक वेगळ्याच फंडा आहे. त्यातच उच्च शिक्षण ग्रामीण भागात उपलब्ध नसल्याने या भागातील मुले शहरात होस्टेलमध्ये राहून शिक्षण घेतात आज ज्या शाळा कॉलेज विद्यालये महाविद्यालये आहेत त्यांचेच होस्टेल आहे म्हणजे शिक्षणाची आणि होसटेलची मिळून सर्व फी लाखांच्या घरात आहे त्यांचा सुध्दा असाच प्रकार आहे जानेवारी मध्ये पैसे भरुन घ्यायचे आणि मार्च मध्ये शाळा बंद म्हणजे पालकांनी पैसे भरुन सुध्दा मुल घरातच आहेत आणि आत्ता यांनी पुढील वर्षाचे अॅडमिशन घेण्यासाठी पालकांच्या कडे तगादा लावला आहे. म्हणजे शिक्षणा पेक्षा फक्त पैसा मिळविणे हा एक महत्वाचा उद्देश या सर्वांचा आहे आपणांस काहीतरी करण्याची गरज आहे

    समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

गुलाम. मजूर. कामगार

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

गुलाम. मजूर. कामगार



                 शब्द एक सारखे असले तरी यांचा अर्थ भयानक व अंगावर काटा आणणारा आहे याचे वर्गीकरण आर्थिक परिस्थिती नुसार श्रीमंत. गरिब. असे ढोबळ वर्गीकरण तर आहेच परंतु त्यातही वयसायपरतवे. शेतकरी. शेतमजूर कुशल. अकुशल कामगार अशी वर्गवारी देखील आहे. शहरी व ग्रामीण. सुशिक्षित. अशिक्षित. असा भेद देखील अनेक वेळा महत्वाचा असतो महिला पुरुष उच्च कनिष्ठ दर्जा देण्याची वृत्ती आपल्या विचारात खोलवर धृढ झालेली आहे यांच्या जोडीला प्रादेशिक. अहंकार आणि राजकीय मतभेद आहेतच थोडक्यात म्हणजे सामाजिक. आर्थिक. सांस्कृतिक. व राजकीय. अंगानी आपण व आपला समाज विभागलेला आहे या विभागलेल्या सर्व गटाचे सर्व व्यक्तिचे रास्त न्याय. आणि लोकशाही हितसंबंध. जपत जपत अंतिम आपल्याला स्वातंत्र्य. समता. बंधुता. व सामाजिक न्याय. यावर आधारलेला एकात्मिक राजकीय समाज निर्माण करावयाचा आहे वरिल प्रकारचया सर्व मतभेदाचा विचार न करता आपण सर्वांनी समाजांचे पाईक म्हणून माणसाला. माणूस म्हणून कसे जगता व जगविता येईल इकडे लक्ष दिले पाहिजे

                 गुलाम हा शब्द आपण स्वातंत्र्य मिळायच्या आधी मोगल गुलामगिरीत होतो. २५० वर्ष. आणि नंतर ब्रिटिश कालखंडात १५० वर्षे. भोगली आहेतः माणसाला गुलाम म्हणून वागविले जाण्याचा प्रसंग देखील आपल्याला थक्क करून सोडणारा आहे जनावरांचा बाजार भरावा तसा त्यावेळी मजूर विक्री साठी बाजार भरत असत माणसाची बोली लावली जात असे तब्येत चांगली असणारे गुलाम शेतात काम करण्यासाठी घरात घरकाम करण्यासाठी. जनावरें गुरे चारणे. तेलाचे घाणे ओढणे बैलाप्रमाणे काम शेणघाण काढणे संडास साफ करणे. करण्यासाठी असे गुलाम विकत घेतले जात होते अनेक अशी कामे होती की आपण त्याचा विचार सुध्दा करू शकत नाही हि वेळ आपल्यावर आली ती आपल्या फुटिरतेचया भावनेमुळे आपणच या सर्वाला जबाबदार आहोत बराच काळ लोटला आणि बर्याच परीश्रमा आपल्या देशहिताचा विचार करणार्या लोकांच्या. तन मन धन याचाच नाही तर आपल्या संसाराची होळी केली आणि एकवेळ आपण स्वातंत्र्य दिनाच्या नावाने मोकळा श्वास घेतला तोपर्यंत गुलामगिरीत असणारे लोक त्यांना गुलामगिरीतून मुक्ति मिळाली

            गुलाम या नावाला नवीन कापड बदलाव तसं मजूर हे नवीन नाव मिळाले त्यावेळी बांधकाम क्षेत्र आत्ता एवढे व्यापक नव्हतं लोक ज्यांच्याकडे शेती जादा आहे गावात जो इतरांपेक्षा मोठा आहे त्यांच्यात सर्व कुटुंब आपली व आपल्या कुटुंबाची दोन वेळचे जेवण कसंबसं मिळावं म्हणून काम करण्यास जात होते खेडेगावात लोकसंख्या वाढत निघाली काम करणारे जास्त झाले काम कमी पडायला सुरुवात झाली स्वातंत्र्य मिळाले आणि काही वर्षांत ग्रामपंचायत राजची स्थापना झाली मग सरपंच उपसरपंच सदस्य टीम तयार झाली शासनाने लोकांची परस्थिती बिकट आहे हे ध्यानात घेवून महात्मा गांधी स्वयंरोजगार योजना. ग्रामीण भागातील लोकांना संजीवनी म्हणून चालू करून दिली यात कोंबडी पालन शेळी मेंढी पालन. रोपवाटीका. जनावरांचे गोठे बांधकाम. गोबरगॅस बांधणे. अशी विविध कामे लोकांच्या हाताला रोजगार देण्याचे काम करत होते रोजगार हमी योजना धर्तीवर जाॅब कार्ड. चालू करण्यात आले १५ दिवसांच्या वर रोजगार उपलब्ध नसेल तर रोजगार भत्ता म्हणून मजूरांना पगार देणे बंधनकारक करण्यात आले काळ बदलत गेला आणि शिक्षण व्यवस्था थोड्याफार प्रमाणात सुरू झाली होती शिकलेली लोक रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करण्यास समर्थ नव्हते ग्रामपंचायत राज स्थापन झाले होते सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामसेवक तलाठी यांनी हि बाब शासनाच्या लक्षात आणून दिली आणि गावागावात मजूर सहकारी सोसायट्या या नावाने मजूरांना हक्काचे काम मिळणारे व्यासपीठ तयार झाले मजूर सोसायट्यांचे माध्यमातून अल्प भूधारक. मिळेल ते काम करणारे कामगार यांना शासन विना अनामत रक्कम भरता गटर समाजमंदिर पाण्याची टाकी रस्ते विकास महामंडळ कामे देणे बंधनकारक आहे पण झाले उलटेच मजूर सोसायट्या मध्ये नावासाठी फक्त मजूर हे नावच राहिले आणि नेते व त्यांचे बगलबच्चे यांनीच या सोसायटीत नावे मोठी मोठी टेंडर घेण्यास सुरुवात केली मजूर नावालाच उरला आज बघा सोसायटी मजूरांचया नावांवर पण एकही मजूर त्यात सभासद नाही दिनदयाळ मागासवर्गीय. या नावाने चालू असणार्या विविध संस्था यात खरोखर एकही वरिल प्रमाणे कोणी नाही याला कारणीभूत आहे ती आपली प्रशासन व्यवस्था हे सर्व वेगळंच होण्यास सुरुवात झाली मग मजूर नाव जरा व किळसवाणे वाटायला लागलं आणि मग एक वेगळ अस नाव आलं ते म्हणजे सुशिक्षित कामगार असं



                बांधकाम क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली आणि शासनाला मदत करील असा बांधकाम व्यावसायाने भरारी घेतली लोकांच्या हाताला भरपूर काम उपलब्ध झाले यामुळे गौण खनिज उत्खनन यात सुध्दा मोठी उलथापालथ झाली नद्या डोंगर यावर भस्मासूर राक्षसा प्रमाणे मोठ्या मोठ्या मशिनरी बसल्या डोंगर सपाट झाले नद्यांमधील वाळू उपसत उपसत माती सुध्दा यांनी उपसली विट भट्टी नदी कडची माती काढून नदी गावा पर्यंत आली आणि दरवर्षी महापूर नुकसान होण्यास सुरुवात झाली याला आपण जबाबदार आहोत

          कामगारांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन एप्रिल. १९२१ मध्ये मुंबईत पहिलें कामगार कार्यालय स्थापन झाले त्याची व्याप्ती पाच विभागांत करण्यात आली यावर अधिकार व कामगार कायदे कल्याणकारी योजना बांधकाम कामगारांना आपले हक्क समजण्यासाठी ८/३/२००० रोजी नागरि सनद तयार करण्यात आली त्यानुसार समान वेतन किमान वेतन सुरक्षा कायदा विमा संरक्षण अशा २७ कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या त्यासाठी १८/६०/ वयोगटातील व्यक्तींना अंशदान रक्कम भरून नोंदणी साठी हक्क देणेत आला कामगार संख्या वाढली आणि बांधकाम विभागासी कोणताही संबंध नसलेले लोक बांधकाम कामगार संघटना नावांची दुकाने निर्माण झाली कामगार नोंदणी नावाखाली कामगार लूट सुरू झाली सायकली वर असणारे कामगार संघटना स्थापन करून अगदी थोड्या दिवसात लाखोंचे मालक झाले याला कामगार नोंदणी आॅफिस मधील अधिकार व कर्मचारी हे सुद्धा या कामगार हितचिंतक लोकांना सामिल आहेत कामगारांना विविध योजना मिळवून देण्याच्या आमिषाने फसवणूक आर्थिक लूट चालूच आहे 

             याचाच अर्थ असा होतो की गुलाम या शब्दाचा अजून कामगारावरील शाप गेला नाही पोटासाठी राबणारा गुलामच होता आणि अजून आहे गरिब. गरजू. व्यसनी. अडाणी. आहे म्हणून सर्वांनी याला लूटायचा घाट घातला आहे का कामगारातला खासदार आमदार ग्रामपंचायत सदस्य या कोणत्याही शासकीय क्षेत्रात कामगार नाही कारण आम्हाला चालत नाही कामगार जन्माला आला कामगार म्हणून मरायचे ते निसहाय म्हणून 




       समाजसेवा व बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन मागणी अर्ज तक्रार अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी विविध गाव तालुका जिल्हा राज्य देश यातून पदाधिकारी नेमणे आहे तरी इच्छुक व्यक्ति तरुण यांनी खालील नंबरवर संपर्क साधावा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

९८९०८२५८५९

वाचा -

आत्ता वाचणार वेळ आणि पैसा - MONEY AND TIME SAVING ....

उघड्यावरचे खाद्य पदार्थ आणि आपले आरोग्य - Food ..

आजची शिक्षणपद्धती आणि आपण- education

शासनाचा सर्वात मोठा निर्णय...

AMAZING MOBILES SHOP NOW

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या