आधुनिक शिक्षण व समाज- Education

आधुनिक शिक्षण व समाज:

मुस्लिम समुदायाला मागासलेपणाची कीड लागली आहे.हा समाज शैक्षणिक,आर्थिक,राजकीय व सामाजिक दृष्ट्या मागास आहे.या समुदायाच्या मागासलेपणाला कारणीभूत असलेल्या कारणांची मीमांसा करतो तेव्हा सर्वांसाठी शैक्षणिक मागासलेपणा कारणीभूत असल्याचे दिसून येते. कोणत्याही समुदायाच्या उन्नती प्रगती समाजाचे शिक्षण हे महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असते जो समाज शिक्षण घेऊन प्रगल्भ होतो तो समाज प्रगतीपथावर असतो.

शिक्षण हे एक मूलभूत गरज झाली आहे लोक शिक्षण घेऊन पुढे जात असताना माझा समाज मागे राहतो त्यामुळे माझ्या समाजाच्या पिढीचे भविष्य काय असेल याची चिंता होणे सहाजिक आहे.

स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांहून अधिक काळ लोटला तरी मुस्लिम बांधवांच्या सामाजिक,आर्थिक,राजकीय व शैक्षणिक परिस्थितीत काहीच बदल झाला नाही दिवसेंदिवस ही स्थिती गंभीर होत आहे.अनेक आयोगाने आपल्या अहवालात या समुदायाच्या स्थितीबाबत सरकारला सूचित केले तरी येथील व्यवस्थेने या समुदायासाठी  काहीच केले नाही.समाजालाही लागलेली मागासलेपणाची कीड नष्ट तर होऊ शकत नाही परंतु कमी नक्कीच करता येऊ शकेल .सध्या समाजात आर्थिक विषमता शैक्षणिक मागासलेपण आहे. मुस्लिम समाज शिक्षणापासून वंचित राहिला आहे यासाठी घरची आर्थिक स्थिती ही कारणिभूत आहे.कोणत्याही समाजाच्या प्रगतीमध्ये शिक्षण हे महत्त्वपूर्ण मार्ग आहेत जो समाज शिक्षणाचे महत्त्व जाणून शिक्षण घेतो तो प्रगतीपथावर असतो. समाजात मजुरदारवर्ग जास्त असल्याने शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध होत नाही सरकारची जबाबदारी तर आहे परंतु समाजातील श्रीमंत व बुद्धिजीवी वर्ग ने शिक्षणासाठी जागरूकता निर्माण करावी. खरे तर समाजातीलश्रीमंत लोकांची  जबाबदारी आहे की आपल्या परिसरातील गरिब परंतु हुशार मुलांना शिक्षणासाठी मदत करावी. समाजात अनेक अनाथ, निराश्रित,अपंग, मुले आहेत यांची जबाबदारी ही घेणे गरजेचे ठरते. समाजाच्या  द्यनिय स्थितिचे वर्णन 2005 मध्ये न्यायमूर्ती राजेंद्र सच्चर यांनी आपल्या कमिशनच्या शिफारिशीत केले व आपल्या शिफारशीने सरकारला समाजाच्या दयनीय स्थिती बाबत सूचना केली होती व या समुदायाच्या उन्नतीसाठी उपाययोजना अमलात आणाव्या परंतु पंधरा वर्षानंतर ही कोणत्याही सरकारने या शिफारशीकडे लक्ष दिले नसल्याने या समुदायाच्या स्थिती सुधारना झाली नाही उलट  स्थिती खूप बिकट झालेली आहे. या समाजाला आज आरक्षणाची गरज कारण या समुदायातील बहुसंख्यक लोकांकडे उत्पन्नाचे साधनच नाही. या समुयाचे जिवणमांन उचांवण्यासाठी व इरांच्या बरोबरीला आण्यासाठी शिक्षणात व नोकरीत राखीव जागांची तरतूद करणे गरजेचे आहे.

शिक्षणात मागास असल्याने सर्व श्रेत्रात मागास झाले.

शिक्षणाचे महत्व खरेतर आम्हाला समजलेच नाही.समाजाने शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलावा.

इस्लाम धर्म हा शिक्षणाचे महत्त्व सांगतो "इकरा" हा शब्द शिका असून नेहमी शिकण्यासाठी प्रोत्साहन देणारा असूनही आज समाज त्यावर अंमलबजावणी करीत नाही. समाजाची बहुतांश लोकांची मुलांना शिकवण्याची व उच्च शिक्षण देण्याची कुवत नसते परंतु परिस्थिती हे कारण ठरत नाही दुसरी बाब मुस्लीम समाजाचे उर्दू भाषेचे शिक्षण घेण्याचा आहे. उर्दू भाषेतून शिक्षण घेण्याचा अट्टहास लयास कारणीभुत ठरत आहे. या अध:पतनास शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टीकोण ही आहे. उर्दू भाषेतून शिक्षण घेण्याचा अट्टहास करणारयानी वास्तविकता लक्षात घेतली पाहिजे.जरी उर्दू भाषेतून शिक्षण घेत असालतरी ते शिक्षण दर्जेदार असावे येथे स्थानिक व इंग्रजी भाषा दर्जेदार शिकवली जावी. फक्त उर्दू माध्यमातून शिक्षण घेतले व उर्दू आली तर तुमचे शिक्षण सफल होत नाही . इंग्रजी व मराठी ही यायला हव्या. शिक्षण  कौशल हे जिवणात उपयोग करण्यासाठी या भाषेतून शिक्षण व या भाषांत प्रभुत्व असावे.

आजच्या स्पर्धा  युगात स्थानिक भाषा व इंग्रजी या भाषेला महत्त्व आहे प्रत्येक सरकारी नोकरी प्रत्येक स्पर्धा परीक्षा    ही मराठी व इंग्रजी भाषेत आहे. मराठी व इंग्रजी भाषा व्याकरण यानां अन्यसाधारण महत्व आहे. बदलत्या जगा सोबत बदल स्वीकार केला पाहिजे. मराठी भाषा ही जर दूर्लक्षीत झाली तर शिक्षणाला अर्थ नाही.

आमचे जे मुल उर्दू भाषेतून शिक्षण घेतात तेथे मराठी, इंग्रजी दुर्लक्षित होवू नये. जर दूर्लक्षीत झाली व शिक्षण घेऊन जरी मुलगा पुढे गेलात तरी इंग्रजी व मराठी या स्पर्धा परीक्षांत राहणार. जर मराठीत व्यक्त होता येत नसेल तर आजच्या स्पर्धेच्या युगात तो टिकणार कसा. मुस्लिम बहूल क्षेत्रात इंग्रजी माध्यम व सेमी यात जरी मुलगा शिक्षण घेत असला तरी मराठी दुर्लक्षित होत आहे.आपल्या समाजातील श्रीमंताची मराठी दुर्लक्षित झाली तरी तो विविध माध्यमातून इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवून पुढे तो इंजिनीअर डॉक्टर होतो परंतु गरीब व मध्यमवर्गीय यांच्या मुलाचे काय? कामगारांच्या मुलांना स्पर्धेत टिकायचे असल्यात मराठी येणे गरजेचे आहे. उर्दू, मराठी, इंग्रजी या भाषात प्रभुत्व भेटल्या शिवाय आमची मुले स्पर्धत टिकणार नाही. याच बरोबर

मुस्लिम समाजाचे शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा केवळ नोकरीसाठी नाही तर आपण जो व्यवसाय करतो त्यात शिक्षण कौशल्यांचा फायदा होतो.कष्टकरी कामगारांची मुल असल्याने काम करत शिक्षण घ्यावे फावल्या समयी अभ्यास करावा. शिक्षण कौशल विकास करावा . वडिलांनी ही शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.दोन वेळच्या अन्नाची जुळवाजुळव करत असताना शिक्षण घेण्यासाठी अडचण येतात परंतु ही नविन पिढी शिक्षीत झाली पाहजे . याला व्यक्त होता आले पाहिजे.समाजाची बाजू मांडण्यासाठी तयार झाले पाहिजे.

शिक्षणातून उद्या लाखो  विद्वान तत्वज्ञानी तयार होतील. आधुनिक शिक्षा नवयुगाचे प्रवर्तक नवयुग स्वीकारल्याशिवाय व मराठी इंग्रजी व उर्दू यांचा समन्वय साधून जोपर्यंत येथील समुदाय शिक्षण घेत नाही तो पर्यंत  

तर्क, विवेक ,चिकित्सक विचार तो आत्मसात करणार नाही.

तो पर्यंत समाज मागासच राहणार.

दिवसातील दोन तास धार्मिक शिक्षण घेण्यासाठी खर्च करावे. शिक्षकाना योग्य मोबदला द्यावा हे

धार्मिक शिक्षण अरबी व उर्दू  भाषेतून मस्जिदीतून घावे.धार्मिक विद्वान तत्वज्ञानी व्हावे अलिम,हाफीज, मुफ्ती व्हावे. इस्लाम धर्म समजावे लोकांना समजून सांगावे.

परंतु विज्ञान, कला, वाणिज्य, गणित हे मराठी व इंग्रजी माध्यमातून घ्या

नजीर शेख, नांदेड

9561991736

वाचा-

जामियाचे प्राध्यापक इमरान अली देशातले एक नंबर वैज्ञानिक...

खासगीकरण का? ...

आरक्षणा बाबत सरकारने सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा...

मुस्लिम समाजास राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण हाच एकमेव पर्याय - हाजी इर्शादभाई...

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या