जागतिक दयाळू दिन - World Kindness Day

 13November                  🌎

 World Kindness Day      जागतिक दयाळू दिन      🌏


_जागतिक दयाळू दिन हा १९९८ सालापासून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. या दिनाची संकल्पना जागतिक दयाळू चळवळीतून निर्माण झाली. यामध्ये ऑस्ट्रेलिया, थायलंड, अमेरिका, इंग्लंड यांसारख्या देशांचा पुढाकार होता. सर्व लोकांनी एकत्र यावे,माणुसकी जपावी, हिंसात्मक कृत्यांना आळा बसावा अशा उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती आपापल्या कामात व्यस्त असतो.आपण आपल्या जगात इतके हरवलेले असतो की आसपास काय चालूआहे याचे, कित्येकदा आपल्याला भान नसते. आपण इतंराशी कसे वागतो याकडे आपण कधीच लक्ष देत नाही. अनेकांना विविध प्रकारचे ताणतणाव असतात. त्यामुळे चिडचिड पणाची वृत्ती वाढत आहे._

परंतु काय हे आपल्याला माहीत आहे का की सुमारे 1400 वर्षा पूर्वीच ही शिकवण नुसत्या उपदेशाने नव्हे तर पूर्णत्वाने स्वतः अंगीकृत करून समस्त मानव जातीला प्रेम, बंधुत्व, दया , कृपा, करुणा भेदभावचा विरोध , कल्याणाचा मार्ग एक व्यक्ति दाखवून गेली ? 

कोण होते ते ?

काय आहे ती शिकवण ....?


हे पैगंबर !(मुहम्मदसल्ललाहू अलैहि व सल्लम .) आम्ही तर तुम्हाला जगवासियांसाठी कृपा बनवून पाठविले आहे 

दिव्य कुरआन (21:107)_


पहा! तुम्हा लोकांजवळ एक पैगंबर आला आहे जो खुद्द तुम्हा पैकीच आहे. तुम्हाला नुकसान पोहचणे त्याला जड वाटते. तुमच्या कल्याणाचा तो इच्छुक आहे. श्रद्धावंतांसाठी तो प्रेमळ आणि दयाळू आहे.

दिव्य कुरआन (9:128)_

ईश्वराच्या एकत्वावर आणि आपल्या भविष्यकालीन जीवनावर ज्याचा विश्वास आहे अर्थात जो खरा मुसलमान आहे त्याने *आपल्या अतिथीचा सत्कार करावा.

जेव्हा केव्हा बोलशील तेव्हा खरेच बोल.वचन दिले की ते निक्षून पाळ. विश्वासघात करू नकोस. व्यभिचार करू नकोस. पवित्र राहा. अपवित्र वासना धरू नकोस. आपल्या मारत्या हातांना आवर.* ज्यांना पाहिल्या बरोबर ईश्वराची आठवण होते तेच ईश्वराचे उत्तम सेवक होत._

ईश्वराच्या एकत्वावर ज्याचा विश्वास आहे आणि पारलौकिक जीवनावर ज्याचा विश्वास आहे अर्थात जो खरा मुसलमान आहे *त्याने जे श्रेय असेल तेच बोलावे,अन्यथा मौन पाळावे.

ईश्वराच्या एकत्वावर आणि पारलौकिक जीवनावर ज्याचा विश्वास आहे अर्थात जो खरा मुसलमान आहे त्याने आपल्या शेजाऱ्याला दुखापत करता कामा नये.


क्षुधिताला जेवू घाल. आजाऱ्याचा समाचार घे आणि एखादा कैदीअन्यायाने डांबला गेला असेल तर त्याला मुक्त कर. मुसलमान असो की नसो,जो म्हणून रंजला गांजला असेल, त्याला मदत कर.

 

मुसलमान आपल्या वैभव काळात ईश्वराचेआभार मानतो; आणि संकट कालात तो ईश्वरी इच्छेला मान तुकवितो.

स्वत:च्या परिवारात ज्याचा स्वभाव सर्वांना अति प्रिय असतो तोच अगदी पूर्ण मुसलमान होय.

आपल्या ताब्यात आल्या नंतरही दुखापत करणाऱ्या माणसाला जो क्षमा करतो त्याचा, ईश्वरा जवळ सर्वाधिक आदर होतो.

आपल्यावर भीक मागण्याची पाळी न येता कुटुंबाचे पालन- पोषण करता यावे आणि *शेजाऱ्या- पाजाऱ्यांना मदत करता यावी या उद्देशाने आणि न्याय नीतीने जो ऐहिक धनसंपत्ती मिळविण्याची इच्छा करतो, त्याचाच ईश्वरा जवळ सर्वाधिक आदर होतो.

ज्याचा म्हणून ईश्वरावर आणि पारलौकिक जीवनावर विश्वास आहे अर्थात जो खरा मुसलमानआहे त्याने आपल्या अतिथींचाआदर केलाच पाहिजे.* ज्याचा म्हणून ईश्वरावर आणि पारलौकिक जीवनावर विश्वास आहे, *त्याने कधीही आपल्या शेजाऱ्यांना त्रास देता कामा नये. जो खरा मुसलमान आहे त्याच्या तोंडातून नेहमी चांगले शब्दच बाहेर पडले पाहिजेत; अन्यथा त्याने बोलू नये हेच उत्तम.

कोणाच्याही कीर्तीला धक्कालावणे हे मुसलमानाला सर्वथा अशोभनीय आहे. त्याने कोणालाही शाप देणे अयोग्य आहे.त्यानेकोणालाही शिव्या देणे अयोग्य आहे. आणि गर्विष्ठपणे बोलणे हे कोणाही मुसलमानाला न शोभणारे आहे.

आपल्या बांधवाला मदत करा. मग तो अत्याचारी असो की अत्याचार झालेला असो.*“पण तो अत्याचारी असेल तर आम्ही त्याला कशी बरे मदत करावी?” मुहंमद पैगंबर म्हणाले, “अत्याचारी माणसाला त्याच्या अत्याचारा पासून परावृत्त करणे किंवा त्याला रोखणे हीच त्याला केलेली खरी मदत होय._

जो लहानांशी प्रेमळ पणे वागत नाही आणि वृद्धांच्या कीर्तीचा आदर करीत नाही तो आपल्यातला नाही म्हणून समजावे. जो न्याय्य गोष्टीचा आदेश देत नाही आणि जो अन्याय्य गोष्टीचा विरोध करीत नाही तो आपल्यातला नाही म्हणून समजावे.

अनाथ बालकालाही जेथे लाभ होतो ते पूर्ण मुसलमान मुसलमानाचे सर्वोत्तम घर समजावे. आणि अनाथ बालकालाही जेथे वाईट रीतीने वागविले जाते ते मुसलमानाचे निकृष्टतम घर जाणावे.

जो स्वत: पोटभर खातोआणि शेजाऱ्याला उपाशी ठेवतो तो काही पूर्ण मुसलमान नव्हे कितीही धर्मकर्मे केली म्हणून त्यांनी काही शिव्या देण्याच्या जिव्हा दोषाचा परिहार होत नाही. जीभ आणि अंत:करण ही घाणेरडी असे पर्यंत कोणीही मनुष्य मुसलमान होऊ शकत नाही.

आपल्या कामवासना जिंकून जो पारितोषिकाची आशाधरतो तो मनुष्य शहाणा व समजदार होय. आणि आपल्या कामवासनांचे जो अनुसरण करतो आणि त्या तशाच कायम ठेवून जो ईश्वरा जवळ क्षमायाचना करतो तो मूर्ख होय.

तुमच्या पैकी जो स्वभावाने सगळ्यात चांगला असेल तोच खरोखर मला सर्वांहून अधिक प्रिय होईलआणि पुनरुत्थानाच्या दिवशी त्यालाच माझ्याजवळ निकटतम आसन प्राप्त होईल आणि तुमच्यापैकी जो वाचाळ असेल, चुरुचुरू बोलत असेल व बढाई मारीतअसेल तो मला सर्वांहून अधिक अप्रिय होईल, आणि पुनरुत्थानाच्या दिवशी त्याला माझ्यापासून अगदी दूर बसविण्यात येईल. मित्र म्हणाले, "हे ईश्वराच्या प्रेषिता, बढाई कोण मारतो?” ते म्हणाले , *“गर्विष्ठ."

तुम्हाला सहायता प्राप्त होईल हे अगदी निश्चित समजा; तुम्ही चांगले पारंगत व्हाल आणि विजय मिळवाल; तुमच्या पैकी ज्याला हे लाभले त्याने ईश्वराचे भय बाळगले पाहिजे; बुद्धिसंगत गोष्टीच आज्ञापिल्या पाहिजे; आणि चुकीच्या गोष्टींचा निषेध केला पाहिजे.

जो बुद्धिपुरस्सर माझ्या विरुद्ध खोटे सांगतो त्याला नराकाग्नीत जागा मिळेल.

लोक अवश्यमेव तुम्हाला अनुसरतील. धर्म समजून घेण्यासाठी पृथ्वीच्या सर्व विभागांतून लोक निश्चितच तुमच्याकडे येतील. अशा रीतीने ते आले म्हणजे त्यांना भलेपणाने वागायला सांगा.ईश्वराचे नाव घेऊन जो तुमच्याकडे आश्रय मागेल त्याला आश्रय द्या. आणि ईश्वराचे नाव घेऊन जो दान मागेल त्याला दान द्या. जो कोणी तुम्हाला भेटायला येईल त्याच्याशी नीट बोला. जो कोणी तुमच्यावर उपकार करील त्याची फेड उपकारानेच करा.* आणि उतराई होण्यासारखे तुमच्या जवळ काहीच नसेल तर निदान आपण त्याला भरपूर प्रतिदान दिले असे वाटे पर्यंत त्याच्या साठी ईश्वराजवळ प्रार्थना करा.

अन्यायी व अत्याचारी अधिकाऱ्यासमोर जाऊन त्याच्या अन्यायाविषयी त्याला छातीठोकपणे सांगणे हे सर्वोत्तम धर्मयुद्ध होय.

तुम्ही जर आपल्या बंधूचे स्मितवदनाने स्वागत कराल तर तो दानधर्मच होय. तुम्ही जर मानव जातीला आग्रहाने सत्कर्माचा उपदेश कराल तर तो दानधर्मच होय. कोणी निषिद्ध कर्मे करीत असल्यास त्याचा जर तुम्ही विरोध कराल तर तो दान धर्मच होय. माळरानावर,जेथे लोक बहुधा वाट चुकतात तेथे जर तुम्ही वाटसरूंना रस्ता दाखवाल तर तो तुमचा दान धर्मच होय.तुम्ही जर आंधळ्यांना मदत कराल तर तोही दानधर्मच होय.

पैगंबर म्हणाले,_ _*“कोणालाही शिवीगाळ करू नकोस. 'आणि तेव्हा पासून मी कधीही कोणाला शिवी म्हणून दिलेली नाही. स्वतंत्र माणसाला तर कधी दिली नाहीच,पणगुलामालाही दिली नाही. आणि उंटाला किंवा बकरीलाही दिली नाही. आणखी ते असे म्हणाले, “एखाद्या माणसाने जर तुला शिवी दिली आणि तुझ्या ठायी असलेल्या एखाद्या दुर्गुणावर बोट ठेवले तर त्याचा तुला माहीत असलेला दुर्गुण तू उघड करू नकोस."

ज्याच्या जवळ स्वकष्टाने मिळवलेली अल्पस्वल्प संपत्ती आहे, पण त्यातूनही शक्य तेवढे जास्त जो दुसऱ्यांना देत असतो, त्याने वाढलेली भिक्षा सर्वोत्तम भिक्षा होय.

आणि (हे पैगंबर (स.)), आम्ही तुम्हाला अखिल मानवजातीसाठी शुभवार्ता देणारा आणि सावधान करणारा बनवून पाठविले आहे, परंतु बहुतेक लोक जाणत नाहीत. 

दिव्य कुरआन (34:28)

आनंदवार्ता द्या त्या लोकांना; ज्यांनी (तुम्हावर) श्रद्धा ठेवली आहे, त्यांच्या साठी अल्लाहकडून महान कृपाप्रसाद आहे.

दिव्य कुरआन (33:47)

वाचा -

मौलाना हसरत मोहानी..

प्रेषित पैगंबर मोहम्मद सर्वांसाठी पुस्तक प्रदर्शन संपन्न...

आधुनिक शिक्षण व समाज...


No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या