पिडीत माता व आठ महिन्यांचे बाळ ‘मानवसेवा’प्रकल्पात
तारुण्यात असताना लोकांच्या वाईट नजरेने मनाला किती किळसवाणे वाटते, शरीराला किती भोके पडतात हे बाईच जीणं आल्याशिवाय कळणार नाही. समाजात वासनांध वृत्ती आणखी विकोपाला गेली आहे की इथे तर दोन अडीच वर्षांच्या मुलींवर सुद्धा बलात्कार होऊन खून पडतात. तिथे २९-३० वयाच्या तरुणीची काय अवस्था असेल? दुर्दैवाने मनोरुग्ण महिलांच्या बाबतीत सुद्धा हेच घडते. हे अनेक वेळा आपण ऐकतो. अशा पिडीत माता भगिनींसाठी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचा 'मानवसेवा' प्रकल्प चोवीस तास कार्यरत आहे.
दि. १५ डिसेंबर २०२० ची सायंकाळची वेळ डोक्यावर कपड्याचे गाठोडे, अंगावर मळकटलेल्या चिंध्या, कडेवर ७ ते ८ महिन्याचे बाळ घेवून वेड लागलेली (अंदाजित २९ वर्षाची) तरुणी रस्त्यावरच जीणं जगत फिरत होती. सारखी बडबड करीत होती. थंडी, गारठ्याने उललेलं ते बाळ घेवून उघड्यावरचं अरणगाव ते केडगाव ही कडं ते ती कडं येरझ-या मारत होती. हे विदारक चित्र दिसताच गावाकडून परतणा-या अनिता मदणे व अशोक मदणे यांनी पीडित, बेघर, निराधार मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणारे श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांना कळविले.
दिलीप गुंजाळ यांनी मानवसेवा प्रकल्पाचे समन्वयक राहुल साबळे, नितीन बर्डे आणि महिला स्वयंसेवक मनिषा ठोसरे, कोमल कांबळे यांना पाठवून विचारपुस केली. परंंतु नाव, गाव, पत्ता काहीच समजले नाही. आणि त्या मातेने देखील काहीच सांगितले नाही. अखेर त्या मातेला आठ महिन्याच्या बाळासह दि. १५/१२/२०२० रोजी ‘मानवसेवा’ प्रकल्पात दाखल करुन मायेचा आधार दिला. मन व घर हरवलेल्या या निराधार मातेवर डाॅ. अनय क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने उपचार सुरु केले आहे. सध्या प्रकल्पात ३६ माता-भगिनीं व बंधु उपचार घेत आहेत.
मानवसेवा हीच, ईश्वर सेवा!
मानवसेवा प्रकल्प
(मन व घर हरवलेल्या मानसांच घर)
द्वारा- श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ
☎ (०२४१) २४२९९४२
📱 ९०११७७२२३३
वाचा -
मुस्लिम आरक्षणाचे वास्तव - Muslim Reservation...
भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग १ MUSLIMS INDIAN FREEDOM FIGHTER ...