Showing posts with label DR PARVEZ ASHRAFI. Show all posts
Showing posts with label DR PARVEZ ASHRAFI. Show all posts

बंदी असतांना गुटखा येतो कुठून ? - डॉ परवेज अशरफी

 

बंदी असतांना गुटखा येतो कुठून ? - डॉ परवेज अशरफी

एम आय एम ने केली सी आय डी चौकशीची मागणी


अहमदनगर - अहमदनगर एम.आय.डी.सी. येथे एका इसमाच्या शेतात पत्र्याचे शेड येथे छापा टाकून गुटका, मावा, सुगंधी पदार्थ असे वेग वेगळ्या प्रकारचे बंदी असलेले करोडो किंमतीचे गुटका छापा टाकून पकडण्यात आले. पोलीस प्रशासनाने केलेल्या कामाचा कौतुक करावे तितके थोडे आहे.सध्या युवा पिढी गुटका मावा सिगारेट चे आहारी गेले असुन एक वेळेस जेवायला भेटले नाही तरी चालेल परंतु गुटका मावा मिळालाच पाहिजे, त्यासाठी काहीही करण्याची तयारी या व्यसणी माणसाची झाली आहे. तरुण पिढी व्यसनामुळे बरबाद होत असल्याने महाराष्ट्रात गुटखा बंदी कायदा अमलात आहे. आणि पूर्ण महाराष्ट्रात गुटखा, मावा, सुगंधी पदार्थ असे अनेक व्यसनाचे पदार्थ महाराष्ट्र सरकार ने विक्रीस बंदी घातली. त्याच बरोबर गुटका मावा विक्री करतांना कोणी आढळला तर त्यांच्यावर भारतीय दंड कलम नुसार गुन्हा दाखल करण्याची तरतूद करण्यात आली.परंतु तरी देखील महाराष्ट्रात दर रोज करोडो रुपयांचा व्यसनी गुटका मावा येत आहे. त्याचा जिवंत उद्हारण म्हणजे अहमदनगर येथे करोडो किमतीचा मावा गुटखा सुगंधी पदार्थ एकच छाप्यात मिळणे. एका छाप्यात जर करोड रकमे पेक्षा जास्त व्यसनी पदार्थ मिळाली असेल तर दर रोज फक्त अहमदनगर येथे करोडो रकमेचा मावा गुटखा सरास विकला जात आहे. तर पूर्ण महाराष्ट्रात एका दिवसात अब्जो रकमेचा गुटका मावा विकला जात असेल. महाराष्ट्र गुटखा बंदी असताना करोडो रुपयाचा गुटका येतो कोठुन आणि पूर्ण राज्यच्या जिल्हा जिल्ह्यात कसा पोहोच केला जातो? असा प्रश्न एम आय एम जिल्हाध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी उपस्थीत केला आहे.

मुख्यमंत्री यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे लिहिले आहे की, कच्चा प्रक्रिया न केलेल्या तंबाखुची व सुपारीची चव आणि घडण आकर्षक नसल्याने, तंबाखू आणि सुपारीमध्ये विषेश प्रकारचे स्वादिष्ट किंवा सुगंधी अपमिश्रीत मिश्रित केल्यामुळे आकर्षण वाढते. त्यामुळे या पदार्थ मोठ्या प्रमाणात मुलांना व जनतेला आकर्षित करत आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात व्यसन लागत वाढली आहे. याच्या खाणाऱ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. आणि भावी पिढ्यांच्या शरीरावर परिणाम होत आहे. हे पदार्थ आरोग्यासाठी घातक असल्याने अन्न सुरक्षा व मानक ( संदुष्क, विष व अवशेष ) विनिमय २०२१, अन्न सुरक्षा व मानके ( अन्न पदार्थाचा दर्जा व अन्न मिश्रक पदार्थ) विनिमय २०२१, अन्न सुरक्षा व मानके ( विक्रीवर प्रतिबंध व निर्बंध ) विनिमय २०२१ या अन्वय प्रतिबंध घालण्यात आले आहे. प्रतिबंध असतांना सुद्धा करोडोचा गुटखा महाराष्ट्रात दर रोज कोणत्या मार्गाने येतो, व कसे प्रत्येकाला पाहिजे तितका मिळतो ? या गुटखा माव्याचे कुठे कुठे साठवण केली जाते ? या गुटखा खरिदी विक्रीत कोण कोणाचा आणि किती किती हिस्सेदारी आहे ? याची चौकशी करणे खूप गरजेचे आहे. महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणत गुटखा विक्री होत आहे, या गुटखा आयातीत कोणती शक्ती आपली ताकत लावत आहे? याची चौकशी करणे गरजेचे आहे.महाराष्ट्रात गुटका बंदी असताना गुटख्याची आयात दुसऱ्या राज्यातून होत आहे. आणि योग्य ठिकाणी पोहोच होत आहे. या सगळ्या मागे राजकीय नेते, शासनातील मोठ्या पदावर बसलेले अधिकारी यांचा समावेश असल्याची शक्यता नाकारता येत नाही. 

एम आय एम जिल्हाध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी सांगितले की अहमदनगर येथे एका ठिकाणची माहिती मिळाल्याने करोडो किमतीचा गुटखा जप्त करण्यात आले. सर्वात महत्वाचे म्हणजे सदर कामगिरी ही पोलीस प्रशासनाने केली. यात अन्न व औषध प्रशासन यांना बरोबर घेतले नाही. यामुळे काही प्रश्न निर्माण झाले आहे. अन्न व औषध प्रशासन यांना सदर घटनेची माहिती देण्यात आली नव्हती का ? जर देण्यात आली होती तर अन्न व औषध प्ररशासनातील एक हि अधिकारी उपस्थित का नव्हता? जिल्ह्यात बंदी असलेला साठ कोणाच्या मदतीने येतो व कसे वाटप होते. याची चौकशी करणे गरजेचे आहे. 

निवेदनाच्या माध्यमातून मुख्य मंत्री साहेबांना विनंती करण्यात आली आहे की सदर प्रकरणाची सी आय डी मार्फत चौकशी करावी. आणि हा विषारी गुटखा महाराष्ट्रात आयात करण्या साठी मदत करणारे राजकीय नेते, प्रशासनातील अधिकारी, यांची हकीकत जनते समोर अणावी. त्याच बरोबर अहमदनगर येथे पकडण्यात आलेल्या करोडो रकमेचा गुटखा मावा याचीही चौकशी करावी की इतक्या मोठ्या प्रमाणात शहरात गुटखामावा येतो आणि सरास विकला जातो याचाच अर्थ या लोकांना राजकीय आणि प्रशासनातील अधिकारीची मदत असण्याची शक्यता आहे.

जे आरोपी पकडले गेले ते या धंद्यातील प्यादे असल्याने मुख्य आरोपी किंवा सूत्रधार अजून हाताला लागलेले नसल्याचे व प्रकरणाची योग्य चौकशी केली तर यात महाराष्ट्रातील प्रतिष्ठित उद्यागपती, नागरिक ज्यांचे राजकीय संबंध आहे, राजकारणातील नेते, प्रशासनातील अधिकारी यांचा संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एम आय एम जिल्हाध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी मुख्य मंत्री यांना सी आय डी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

मुस्लिम स्वतंत्र सेनानींचा महाविकास आघाडी सरकारला इतका द्वेष का ? डॉ परवेज अशरफी

 

मुस्लिम स्वतंत्र सेनानींचा महाविकास आघाडी सरकारला इतका द्वेष का ? डॉ परवेज अशरफी

महविकास आघाडी सरकार आल्या नंतर प्रश्सन तर्फे राष्ट्रिय महापुरुष, थोर व्यक्ती, राष्ट्रीय दिन संदर्भात एक परिपत्रक निघतो त्यात भारत देशाला स्वतंत्र मिळवण्यासाठी व स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलना अबुल कलाम आझाद यांचे नाव सरकारने वगळे आहे. मागील तीन वर्षांपासून विविध संघटना सरकारला निवेदन देऊन या विषया कडे लक्ष केंद्रित करत आहे. परंतु दर वर्षी सरकार दुर्लक्ष करून परिपत्रकात स्वतंत्र सैनिक मौलाना अबुल कलाम आझाद यांचा नाव वगळत आहे. मौलाना यांचा नाव थोर पुरुषांच्या यादीतून जाणून बुजून वगळण्यात आले असल्याचे किंवा मुस्लीम स्वतंत्र सेनानी यांची जनतेला माहिती न व्हावी या हेतूने षडयंत्र केले असल्याचे आरोप एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी महाविकास आघाडी सरकारवर केले. 


एम आय एम तर्फे निवेदनाचे पत्र मा. मुख्य मंत्री यांना मेल व अहमदनगर जिल्हा अधिकारी यांच्या माद्यमातून दिले. निवेदनात पुढे लिहिले आहे की भारताच्या स्वतंत्रता साठी अनेक थोर पुरुषांनी आपले योगदान दिले आहे त्यात मुस्लीम समाज ही त्यांच्या खांदे ला खांदा लाऊन लढत होता. राजधानी दिल्ली येते गेले तर आपणास इंडिया गेट येथे ९२ हजार स्वतंत्र सेनानी यांचे नाव कोरलेले दिसेल त्यात ६२ हजार नावे फक्त मुस्लीम स्वतंत्र सेनानी यांचे आहे. मुस्लिम समाज हा भारताचा एक अंग आहे कोणी कितीही प्रयत्न केले तरी मुस्लिमांना बाजूला करने आणि मुस्लीम समाजाचे योगदानाला दुर्लक्ष करणे शक्य होणार नाही. एम आय एम तर्फे मा. जिल्हा अधिकारी साहेब मार्फत महाराष्ट्राचे मुख्य मंत्री यांना विनंती करण्यात आली की त्यांनी परिपत्रकात बदल करून भारताचे पाहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचे नाव समाविष्ट करावे आणी जर हे शक्य नसेल किंवा मौलाना अबुल कलाम आझाद यांना थोर पुरुष,स्वतंत्र सेनानी महाविकास आघाडी मानत नसेल तर तसे खुलेआम जाहीर करावे.निवेदनात एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी,जावेद शेख जिल्हा महासचिव, मुफ्ती अल्ताफ जिल्हा उप-अध्यक्ष, तौसीफ मणियार शिर्डी लोकसभा अध्यक्ष, शह्नावज तांबोळी - विध्यार्थी जिल्हा अध्यक्ष, अमीर खान - शहर युवा अध्यक्ष, इम्रान शेख - युवा शहर उपाध्यक्ष, बशीर शेख प्रवक्ता सनाउल्लाह तांबटकर - विद्यार्थी शहर अध्यक्ष आदींचे सह्या आहेत.

अन्यथा न्यायालयात जाणार - डॉ परवेज अशरफी

अन्यथा न्यायालयात जाणार - डॉ परवेज अशरफी

अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी खासगी व शासकीय कार्यालयात आणि विद्यालय, महाविद्यालय, रेशन दुकानात सरकारी आदेश असल्याचे भासून लसीकरण सक्तीचा करत आहे. या अनुषंगाने एम आय एम जिल्हाध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी मा. जिल्हाधिकारी साहेबांना लसीकरण सक्तीचा करता येणार नसल्याचे विविध उच्च न्यायालयाचे आदेश व भारत सरकारचे आरोग्य व परिवार मंत्रालयाचे लेखी पत्राचे हवाले देत लसीकरण सक्तीचा करू नाहीत. अशी विनंती केली. परंतु मा. जिल्हाधिकारी यांनी लसीकरण सक्तीचा करणार नसल्याचे परंतु शासकीय कार्यालयात लसीकरण नसेल तर प्रवेश देणार नसल्याचे सांगितले.

त्या मुळे खासगी कर्यालात्यात, विद्यालय, महाविद्यालयात, राशन दुकान, महामार्ग, येथे शासकीय अधिकारी लसीकरण बाबत विचारणा करीत, त्यांना लसीकरण घ्या नाहीतर दुकान उघडता येणार नाही. विद्यालयात व महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही. असे सांगत आहे, यामुळे सामान्य जनतेला वेठीस धरण्याचे काम करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. शासकीय कार्यालय हे सामान्य जनते साठीच असते त्यालाच इंग्रजी मध्ये "It is for the people and by the people" जर शासकीय कार्यालयात जनतेला परवानगी नसेल तर त्या कार्यालयाचा उपयोग काय? असा प्रश्न एम आय एम जिल्हाध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी उपस्थित केला. मा. जिल्हाधिकारी साहेबांनी घटने विरोधातला आदेश मागे घेणे व सामान्य जनतेचा मानसिक छळ थांबवण्याची विनंती केली आहे. सामान्य जनतेचे मौलिक अधिकाराचे हणन होत असेल तर मा. जिल्हाधिकारी विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे एम आय एम जिल्हाध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी सांगितले.

लसीकरण च्या नावाखाली सामान्य जनतेची पिळवणूक - डॉ परवेज अशरफी

 

लसीकरण च्या नावाखाली सामान्य जनतेची पिळवणूक - डॉ परवेज अशरफी


अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यात व शहरात मा. जिल्हाधिकारी यांच्या इख्त्यारीत असलेल्या कार्यालया मार्फत असे तोंडी आदेश काढण्यात आले आहे की ज्या व्यक्तीने कोविड लस घेतली नाही त्या व्यक्तीला पगार मिळणार नाही, त्यंना सरकारी सुविधाचा लाभ घेता येणार नाही, त्याच बरोबर पेट्रोल पण मिळणार नाही. याचाच अर्थ सामान्य जनतेला लस घेण्यासाठी मजबूर किंवा सक्ती करण्याचा षड्यंत्र काही कार्यालय करीत असल्याचे दिसून आले. केंद्र सरकारच्या माद्यमातून आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालय, दिल्ली यांनी माहितीच्या अधिकारात अशी माहिती दिली आहे की कोविड लस घेणे अनिवार्य नसून सावैच्छिक आहे. जनसूचना अधिकारी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भोपाळ यांनी RT-PCR TEST स्वैच्छिक असल्याची माहिती दिली आहे.

त्याच बरोबर मेघालय उच्च न्यायालय, शिलोंग, गुव्हाटी उच्च न्यायालय, गुजरात उच्च न्यायालय ,मणिपूर उच्च न्यायालय,,इम्फाल यांनी लसीकरण साठी असे कोणतेही आदेश देण्यास मनाई केली आहे. ज्यामुळे सामान्य जनतेचे भारतीय संविधानाने दिलेल्या मौलिक अधिकारचे हणन होईल. लसीकरण न केलेल्या व्यक्तींना त्यांच्या मुल सुविधा पासून वंचित ठेवणारे आदेश म्हणजे भारतीय संविधान आर्टिकल १४,१९,२१ चे हणन करणे. भारतातील प्रत्यक नागरिकाला वैधकीय उपचार निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे. असे निवेदनाचे पत्र एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी साहेब यांना दिले. असंवैधानिक आदेश देणार्यावर कारवाही करण्याची विनंती करण्यात आली 

 

आरक्षण मुस्लिमांचा अधीकार - खा. इम्तियाज जलील



आरक्षण मुस्लिमांचा अधीकार - खा. इम्तियाज जलील

२०१४ साली महाराष्ट्रातील काँग्रेस - राष्ट्रवादी सरकार ने मुस्लिमांना ५ % आरक्षण देण्याची घोषणा केली परंतु आज पर्यंत मुस्लिम आरक्षण देण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आले नाही. जेव्हा निवडणुका येत्या तेव्हा मुस्लिमांना आरक्षणाचे गाजर दाखून मत घेण्यात आले परंतु आज पर्यंत मुस्लीम आरक्षण बाबत ब्र शब्द काडण्यात कोणीही तयार नाही. मुस्लीम आरक्षण हा तर मुस्लिमांचा अधीकार असुन ते मुस्लिमांना मिळालाच पाहिजे अशे वक्तव्य एम आय एम प्रदेश अध्यक्ष तथा औरंगाबाद चे खासदार इम्तियाज जलील यांनी अहमदनगर एम आय एम टीम शी चर्चा करतांना सांगितले. २७ नोव्हेंबर रोजी मुस्लीम आरक्षण साठी पूर्ण महाराष्ट्रातून तिरंगा रॅली मुंबई पर्यंत काढण्यात येणार असून सर्वांनी ही लढाई आपली समजून तिरंगा रॅलीत शामील होण्याचे आव्हान खा. इम्तियाज जलील यांनी केले. अहमदनगर जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी आश्वासन दिले की  मुस्लीम आरक्षण साठी पूर्ण अहमदनगर जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून तिरंगा रॅलीत शामिल होणार आहे त्यासाठी आम्ही पूर्ण जिल्ह्यात जागो जागी बैठक घेत आहे व नागरिकांना मुस्लीम आरक्षणाची गरज आणि फायदे समजून सांगत आहे. खा. इम्तियाज जलील यानी पक्षाचे काम जोमाने चालू ठेवा व काही अडचण आल्यास संपर्क साधण्याचे सांगितले. यावेळी अहमदनगर एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी, जिल्हा महासचिव हाजी जावेद शेख, शिर्डी लोकसभा अध्यक्ष तोसिफ मनियार, औरंगाबाद युवा जिल्हा अध्यक्ष मुंशी पटेल, नगरसेवक कलीम बागवान, जिल्हा सह- सचिव फय्याज कुरेशी, शेवगाव तालुका अध्यक्ष युसुफ शेख, कोपरगाव तालुका अध्यक्ष जावेद पटेल, जामखेड तालुका अध्यक्ष जाकिर काजी, श्रीरामपुर तालुका अध्यक्ष शकील शेख, कर्जत तालुका अध्यक्ष डॉ अन्सार शेख, अजीज व्होरा,उबैद बागवान, राहुरी तालुका अध्यक्ष नविद बागवान, रहाता तालुकाध्यक्ष समीर बेग, श्रीरामपुर शहर अध्यक्ष शहाबाज शेख, संगमनेर शहर अध्यक्ष दानिश मिर्जा, आदी उपस्थित होते.



महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तयारीला लागा : धर्मराज साळवे

 


अहमदनगर : संघटित राहण्याला खूप महत्त्व आहे. पक्षाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी संघटीत राहून समाजातील गोरगरीब, तळागाळातील नागरिकांसाठी काम करायचे आहे. तसेच महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, असे प्रतिपादन ए. आय. एम. आय. एम. चे पश्चिम महाराष्ट्रातील प्रवक्ते धर्मराज साळवे यांनी केले. खासदार व प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील, प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गफ्फार कादरी यांच्या सूचनेनुसार ते नुकतेच नगर येथे आले होते. येथील शासकीय विश्रामगृहावर पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीत साळवे बोलत होते. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अकील मुजावर यांनी याबाबत एक समितीची स्थापना करून त्या समितीतील पदाधिकाऱ्यांना अहमदनगर येथे पाठवले होते. अहमदनगर येथे होणाऱ्या यापुढील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी तयारी करावी तसेच वारंवार वरिष्ठांशी चर्चा करावी. कार्यकर्त्यांना याबाबत वरिष्ठ पातळीवर सहकार्य केले जाईल, असेही या समितीतील शब्बीर शाह यांनी म्हटले आहे. यावेळी एम. आय. एम. अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष डॉ. परवेज अशरफी यांनी साळवे व शाह यांचा सत्कार करून त्यांचे स्वागत केले. तसेच वर्षभरातील संघटनेच्या माध्यमातून केलेल्या कामांचा अहवाल सादर केला. याप्रसंगी डॉ. परवेज अशरफी म्हणाले की, येणाऱ्या महानगरपालिका तसेच जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या नगरपालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू आहे. जिल्ह्यात कार्यकर्त्यांचे संघटन मजबूत करण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. समाजातील गोरगरीब नागरिकांच्या अडचणी सोडविण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून सुरू आहे. शिवाय, संघटनेच्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी शासन दरबारी निवेदनाच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस पक्ष संघटना मजबूत होत आहे. खासदार असदुद्दीन ओविसी यांना मानणारा युवा वर्ग पक्षासोबत जुळत आहे, असेही डॉ. परवेज अशरफी यांनी सांगितले. शेवटी साळवे व शाह यांनी अहमदनगर येथे डॉ. परवेज अशरफी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या कामांबाबत समाधान व्यक्त केले. तसेच सर्वांनी डॉ. अशरफी यांना पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही साळवे यांनी केले.यावेळी 

पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते साळवे, शब्बीर शाह, एम. आय. एम. जिल्हाध्यक्ष डॉ. परवेज अशरफी, जिल्हा महासचिव जावेद शेख, मुफ्ती अल्ताफ अहमदनगरी, शेवगाव तालुका अध्यक्ष युसुफ शेख, शहर युवा अध्यक्ष अमीर खान, जामखेड तालुका अध्यक्ष जाकिर काझी, कर्जत तालुका अध्यक्ष डॉ. अन्सार शेख, राहुरी तालुका अध्यक्ष नविद बागवान, समाजसेवक उबैद बागवान, शहर युवा प्रवक्ता बशीर शेख शहर युवा महासचिव इम्रान हुसेन आदी उपस्थित होते. डॉ. परवेज अशरफी यांनी उपस्थितांचे आभार मानले.


एम आय एम शेवगाव शहर अध्यक्ष पदी कलीम पठाण तर तालुका महासचिव पदी अन्वर शेख यांची निवड

 


एम आय एम ज्या प्रकारे बॅरिस्टर खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण देशात स्वतःचा अस्तित्व निर्माण करीत आहेत त्याच प्रकारे महाराष्ट्रातही महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील व प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी यांच्या नेतृत्वात पूर्ण महाराष्ट्रात पक्ष मजबूत होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातही एम आय एम पक्ष प्रत्येक तालुक्यात कार्यरत आहे. पक्ष मजबूत करण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशाने काही फेर बदल करण्यात येणार असून एम आय एम शेवगाव तालुका महासचिव पद अन्वर शेख यांना तर शेवगाव शहर अध्यक्ष पद कलीम पठाण यांना देण्याचा निर्णय घेण्यात आले. नियुक्ती पत्र औरंगाबादचे एम आय एमचे नगरसेवक हाजी इसाक खान साहेब यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी हाजी इसाक खान यांनी नव निर्वाचित पदाधिकारी यांचे अभिनंदन करून पक्ष मजबूत करण्यासाठी आहोरत्र मेहनत करण्याचे सांगितले. काम करत असताना अनेक अडचणी येत असतात त्यामुळे पक्षाचे काम करायचे नाही असे होत नाही. एम आय एम जिल्हा अध्यक्ष यांनी अभिनंदन करत सांगितले की महाराष्ट्र सह अहमदनगर मध्येही पक्ष मजबूत होत आहे त्यामुळे विरोधक हैराण झाले आहे. तरुण पिढी पक्षात प्रवेश करीत आहे पक्ष मजबूत होत आहे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकात पक्ष आपले उमिदवार रिंगणात उत्रविनार आहे . यावेळी जिल्हा महासचिव हाजी जावेद शेख व मुफित अल्ताफ यांचेही भाषण झाले. नवनिर्वाचित सदस्यांचा सर्वांनी अभिनंदन केले. व येणाऱ्या काळात शेवगाव तालुक्यात एम आय एम पक्षाचे प्रतिनिधी सर्व जागी दिसतील असे आश्वासन शेवगाव तालुका अध्यक्ष युसुफ शेख यांनी दिले. यावेळी औरंगाबादचे नगरसेवक हाजी इसाक खान साहेब, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी, जिल्हा महासचिव हाजी जावेद शेख, मुफ्ती अल्ताफ अहमदनगरी, शेवगाव तालुका अध्यक्ष युसुफ शेख, शहर युवा अध्यक्ष आमीर खान, शेवगाव तालुका अध्यक्ष अनिस सय्यद, शाहनवाज तांबोळी, मोसीन खान आदी उपस्थिती होते.

रविवारी मोफत नेत्र व मोतीबिंदू तपासणी शिबीर

 




रविवारी मोफत नेत्र व मोतीबिंदू तपासणी शिबीर

 नगर - आनंदऋषीजी नेत्रालय व मिसगर डायग्नॉस्टिक सेंटरच्यावतीने रविवार दि.18 जुलै 2021 रोजी सकाळी 10 ते 2 पर्यंत मिसगर लायब्ररी, मौलाना आझाद रोड, दाणे डबरा, अहमदनगर येथे मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे माहिती युनूसभाई तांबटकर यांनी दिली.

या शिबीरामध्ये डोळ्यांचे नंबर तपासून उच्च दर्जाचे चष्मे कमी किमतींत दिले जाणार असून, ज्यांना तपासणी मध्ये मोतीबिंदू आढळल्यास बिनटाक्याची शस्त्रक्रिया 2200 रुपयांमध्ये औषधे व लेन्सच्या खर्चासह तसेच फेको पद्धतीने शस्त्रक्रिया 5700 रुपयांत औषधे व लेन्स खर्चासह आनंदऋषीजी नेत्रालयात केली जाणार आहे, असे डॉ. परवझ अशरफी यांनी सांगितले.

 तरी या शिबीराचा जास्तीत जास्त गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन मिसगर डायग्नॉस्टिक सेंटरच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी मो.9158153030, 9273675333 या नंबरवर संपर्क साधावा.







नगरसेवक झोपले आयुक्तचा दालनात- Ahmednagar Corporation

 मुकुंदनगर मधील नागरी समस्या सोडविण्याची मागणी 

आयुक्तांच्या दालनात झोपा काढू आंदोलन   

समस्या न सुटल्यास बजेटच्या सभेमध्ये आत्मदहन करण्याचा इशारा.           



अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर प्रभाग 3 मधील पिण्याच्या पाणीचा प्रश्‍न गंभीर बनला असून, या भागात नागरिकांना दोन ते चार दिवासाआड पाण्याचे वितरण होत आहे. पाणी प्रश्‍नासह घनकचरा, ड्रेनेजलाईन, बंद पथदिवे व रस्त्यांच्या प्रलंबीत कामे मार्गी लावण्याची मागणी नगसेवक आसिफ सुलतान यांनी मनपा आयुक्त शंकर गोरे यांना निवेदनाद्वारे केली होती सदर प्रश्‍न न सुटल्यास आयुक्तांच्या दालनात झोपा काढू आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला होता त्यामुळे आज झोपा काढा आंदोलन करण्यात आले.

मुकुंदनगर प्रभाग 3 मध्ये दोन ते चार दिवासाआड पाण्याचे वितरण होत असून, याला वितरण व्यवस्थेवरील दोष कारणीभूत आहे. लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. आगामी महिन्यात पवित्र रमजानचे उपास सुरू होणार असून, सदर परिसर मुस्लिम बहुल भाग असल्याने या भागात वेळेवर नियमीत पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. या भागातील प्रामुख्याने नशेमन कॉलनी, इशरद पार्क, छोटी मरियम मस्जिद, जीशान कॉलनी, एन.एम. गार्डन परिसर, सी.आय.व्ही. सोसायटी, नम्रता कॉलनी, सहारा सिटी, मेहराज मस्जिद परिसर, दर्गा दायरा, शहाशरीफ पार्क, संजोगनगर, दगडी चाल, अमर कॉम्प्लेक्स, अमन कॉलनी, अभिलाषा कॉलनी, हिना पार्क, हुसेनी कॉलनी, सहाजी पार्क, बिहारी चाल, कौसर बाग, दरबार कॉलनी, मोठी मरियम मस्जिद परिसर, अलमास पार्क, बजाज कॉलनी, इक्रा स्कूल परिसर व बरेच ठिकाणी पाण्याचा पुरवठा व्यवस्थित होत नाही. यामध्ये फेज टू पाण्याची पाईप लाईनचे काम 95 टक्के पूर्ण झाले आहे. पाण्याची उंच टाकी बांधून आठ वर्ष झाली आहे. फेज टू चे राहिलेले काम लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना नवीन पाईपलाईन मधून नळ कनेक्शन देण्यात यावे. पाण्याची टाकी स्वच्छ करून निर्जंतुकीकरण करून त्यातून पाण्याचे वाटप करण्यात यावे व प्रभागांमधील वॉल मॅनचा वेळ वाया जाणार नाही अशी व्यवस्था करण्यात यावी. तसेच वितरण व्यवस्थेचे दोष दूर करण्यासाठी कामगारांची संख्या वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे.

प्रभाग भौगोलिकदृष्ट्या मोठा असून, या भागात 35 ते 40 हजार लोकसंख्या राहत आहे. त्याप्रमाणे येथे कर्मचारींचे मनुष्यबळ अत्यंत कमी आहे. स्वच्छता कर्मचारी कमी असल्याने प्रभाग पुर्णपणे स्वच्छ होत नाही. या समस्यांचा कायमस्वरूपी निदान होणे गरजेचे आहे. त्यासाठी झाडू कामगारांची संख्या वाढवण्यात यावी, कामगारांना छोटे कचरा गाड्या उपलब्ध करून देण्यात यावे, घंटागाडीची संख्या वाढवण्यात यावी. या भागांमध्ये ड्रेनेजलाईन तुंबून रस्त्यावरुन घाण पाणी वाहत असल्याने प्रभागातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी चेंबरची झाकणे तुटलेली आहे. ड्रेनेजचे पाईप खचले असून ते दुरुस्त करून नवीन लाईन टाकण्यात यावी. प्रभागात काही ठिकाणी पथदिवे नसून व काही ठिकाणी बंद पडले आहे. परिणामी अंधारामुळे मोकाट कुत्र्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असून, अनेकवेळा अपघातही होत आहे. तरी बंद पथदिवे दुरुस्त करावे. शासनाकडून भुयारी गटार योजना मंजूर असून, ती त्वरीत कार्यान्वीत करण्याची मागणी देखील निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. महापालिका नागरी सेवा देण्यास असमर्थ ठरत आहे मुकुंद नगर मधील नागरी समस्या न सुटल्यास बजेट ची सर्वसाधारण ची सभा होणार आहे त्यामध्ये नगरसेवक आसिफ सुलतान यांनी आत्मदहन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

वाचा -

मुंबईतील नामांकित पंचतारांकित हॉटेलवर कारवाई -FDA...

वासिम रिझवी विरोधात कोपरगावात एम आय एम तर्फे निवेदन - AIMIM ...

खाद्यतेलात भेसळ करणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता पथकाचा छापा - FDA MUMBAI...

आमचं गाव आमचा विकास - Village Development...

वासिम रिझवी विरोधात कोपरगावात एम आय एम तर्फे निवेदन - AIMIM

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

मुस्लिम लोकांची धार्मिक भावना दुखावल्या बद्दल तकरार


दि. ११ / ०३ / २०२१ रोजी लखनऊ उत्तरप्रदेश येथे राहणारे शिय्या वक्फ बोर्डाचे माझी अध्यक्ष वसीम रिजवी यांनी मा. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखिल करुन इस्लाम धर्माची सर्वात पवित्र धर्मग्रंथ कुराणामध्ये बदल करुन त्याच्यात असलेले आयता मधुन एकुण २६ आयत वळण्यात यावी अशी मागणी केली. आशा आहे की , सुप्रीम कोर्ट याची ही याचिका ऑडमीट न करता ते फेटाळून लावतील, पण वसीम रिजवी यांनी याचिका दाखल केल्यानंतर माध्यमांना बोलतांना कुराण व मुसलामानांचे तीन खलिफा विरुध्द अनेक खोटे बिनबुडाचे अरोप लावले. मुख्यतः त्याने सांगितले की, कुराण हे आतंकवादची शिकवण देतो व इस्लामचे सुरुवातीचे तीन खलिफा यांनी ताकतीचा प्रयोग करुन इस्लामचा फैलाव केला. कुराणामुळे मुसै युवक आतंकवादाकडे वळत आहे वगैरे वसिम रिजवी यांनी दिलेले मिडीया मुलाकात  हे सर्वत्र पसरलेले आहे. व वक्तव्य मुळे मुस्लिम धर्म मानणारे लोकांचे धार्मिक भावना दुखावलेले आहेत व इतर समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम वसिम रिजवी यांनी केलेले आहे. कोपरगाव येथील सर्व मुस्लीम समाज व एम आय एम तर्फे तहेसिलदार साहेबांना निवेदन देऊन कारवाहीची मागणी केली आहे. यावेळी एम आय एम जिल्हा उपाध्यक्ष तौसीफ मनियार, तालुका उपाध्यक्ष  वाजीद मनियार व इतर मान्यवर उपस्तीत होते.

वाचा -

महिला आर्थिक विकास - A. MUNDE ...

खाद्यतेलात भेसळ करणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता पथकाचा छापा - FDA MUMBAI...

आमचं गाव आमचा विकास - Village Development...

ओबीसी जनगणना काळाची गरज...

सामान्य जनतेचा थोडातरी आर्थिक विचार करा - डॉ परवेज अशरफी AIMIM

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2



 


पुर्ण जगात कोरोना महामारी मुळे मागील मार्च २०२० पासून अचानक लॉक डाऊन लागल्याने व त्यानंतर पूर्ण देशातील जनतेची आर्थिक परिस्थिती खालावली. नोकरी करणारा असो किंवा व्यापार करणार असो, रोजंदारीवर काम करणारा असो किंवा ठेकेदार पदत्ती ने काम करणारा असो सर्वांना कमी किंवा जास्त प्रमाणात आर्थीक नुकसान झाले आहे. कोरोना काळात प्रशासनाने काही सक्तीचे नियमाची अमल बजावणी केली होती व सद्या ही करत आहे. परंतु सामान्य जनतेने नियमाचा पालन करावे यासाठी त्यांना कायम आर्थिक दंड,फी आकारणे हे कोणता न्याय आहे? प्रशासन सामान्य जनतेला लुटायची कोणतीही जागा सोडत नसल्याचे एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी सांगितले.

अहमदनगर जिल्हा अधिकारी यांनी काडलेल्या आदेशा विरोधात एम आय एम तर्फेनिवेदन देण्यात आले आहे. निवेदनात प्रशासनाने मास्क न वापरल्यास ₹५००/- दंड चा आदेश परत घेण्याची मागणी केली आहे. निवेदनात लिहले आहे की एकीकडे प्रशासन सामान्य जनतेची मदत करीत असल्याचे दाखवते व दुसरी कडे नियमाच्या नावावर सामान्य जनतेची आर्थिक लूट करीत आहे. सद्या कोरोना ची दुसरी लाट येत असल्यामुळे प्रशासनाने काही नियम सक्तीचे केले आहे. त्यात जनतेने मास्क चा वापर केला नाही तर त्यांना रू १००/- दंड नियम बदलून ₹५००/- दंडाची पावती केली आहे. आदेश देताना सामान्य जनतेचा आर्थिक नुकसान होइल याची पूर्ण दखल घेतली असल्याचे डॉ परवेज अशरफी यांनी सांगितले. या आदेशामुळे सर्वात जास्त आर्थिक झळ सामान्य जनतेला बसणार आहे. सामान्य जनता एक वर्षापासून कोरोना मुळे पहिलेच आर्थिक संकटात आहे त्यात या आदेशने जनतेला अजून आर्थिक संकट दिले.

आदेश फक्त सामान्य जाणते साठी आहे की सर्व अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना साठी याचा खुलासा कर्णयची मागणी देखील करण्यात आली आहे. मास्क ना वापरणे असो, गाडी जपती असो, नियमाच्या नावावर फक्त आणि फक्त सामान्य जनतेला धारेवर धरत असल्याचे दिसते. निवेदनावर एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी, जिल्हा महासचिव जावेद शेख, नगरसेवक असिफ सुलतान, मुफ्ती अल्ताफ, विद्यार्थी जिल्हा महासचिव शहेबाज शेख, विध्यार्थी जिल्हा सचीव शहेबाज शेख,मास शहर अध्यक्ष अमीर खान, सलमान खान, आरीफ शेख, समीर बेग फिरोज शेख आदींचे सह्या आहेत.

वाचा -

लोकशाही आणि घराणेशाही...

एम आय एम मेडिया प्रमुख पदी सुफीयान शेख - AIMIM ...

निराधार मातेला दिला मानासेवाने आधार - MANAVSEVA PROJECT...

चिपको आंदोलन -अ. मुंडे ...

एम आय एम मेडिया प्रमुख पदी सुफीयान शेख - AIMIM

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357d

 

श्रीरामपूर - अहमदनगर 

महाराष्ट्र बरोबर एम आय एम चा विस्तार अता पूर्ण देशात होत असल्याने प्रस्तापितानंची डोके दुखी वाडली आहे. अहमदनगर जिल्हा मागे राहिलेला नाही नुकतेच झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत एम आय एम ने जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांच्या नेतृत्व खाली ग्राम पंचायत सदस्य निवडून आले. एम आय एम ला मानणारा वर्ग दिवसेन दिवस वाडत आहे. श्रीरामपूर तालुक्यात एम आय एम बरोबर युवा पिढी जुडत आहे. श्रीरामपूर शहराची बैठक नुकतीच पार पडली त्यात नवीन पदाधिकारी यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आले. यावेळी शहर मेडिया प्रमुख पदी सुफीयान शेख यांची वर्णी लागली. 
बैठक चे अध्यक्ष स्थानी एम आय एम श्रीरामपूर तालुका अध्यक्ष शकील शेख होते. शकील शेख यांनी अद्याक्षीय भाषणात सांगितले की एम आय एम पक्ष हा सद्या चर्चेचा विषय आहे.पक्ष दिवसेन दिवस वाडत असून जिल्ह्यात जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांच्या नेतृत्वात कार्यरत आहे. प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील साहेब आणी प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी साहेब यांच्या आदेशाने अहमदनगर जिल्ह्यात हि पक्ष बंदानीचे काम जोरात चालू आहे. लवकरच जिल्हा अध्यक्ष यांचा दौरा होणार असून श्रीरामपूर तालुक्याची पुढची रणनीती आखण्यात येईल.
सुफीयान शेख यांनी नियुक्ती झाल्या बद्दल सर्वांचे आभार मानले. या वेळी श्रीरामपूर तालुका अध्यक्ष शकील शेख, शहर अध्यक्ष युनुस शेख , शहर उपअध्यक्ष अमोल रुपटक्के , शहर सह सलाकार किरन शरनागते, मोहसीन‌ शेख , नदिम ईनामदार , खालीद पठान , शफीक शेख , अरबाज शेख आदी उपस्थित होते।

वाचा - 



जर माझ्या जिवाचे काही बरे - वाईट झाल्यास जबाबदारी पोलिस व इतर प्रशासनाची - हाजी इर्शादभाई

 जर माझ्या जिवाचे काही बरे - वाईट झाल्यास जबाबदारी पोलिस व इतर प्रशासनाची - हाजी इर्शादभाई



       राजुरी ता. जुन्नर येथे धार्मिक संस्थे कडून झालेल्या संविधान - लोकशाही विरोधी व जात पंचायत धमकी प्रकरणात माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या जीवितास व होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी संबंधित संस्थेचे कार्यकारी मंडळ, पोलिस व इतर प्रशासनाची असेल असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष हाजी इर्शादभाई यांनी केले आहे. 

            संबंधित धार्मिक संस्थेच्या जबाबदार व्यक्तींनी शुक्रवार ता. २२ जानेवारी २०२१ रोजी पुन्हा एकदा माझ्या अनुपस्थितीत बेकायदेशीरपणे जात पंचायत घेऊन लोकांना खोटी माहिती देऊन व दिशाभूल  करून माझ्या विरोधात लोकांच्या भावना भडकाऊन शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. समाजाची काही चूक अथवा भूमिका नसतानाही धार्मिक संस्थेचे पदाधिकारी त्यास वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करीत आहेत. या सर्व प्रकारातून माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. माझे गावात एकच घर असून तेथे माझे कोणतेही नातेवाईक नाहीत. पोलिस प्रशाननाने अजून कोणतीही करवाई केलेली नाही. पोलिस प्रशासनाने वेळीच दखल घेतली असती तर शुक्रवारी झालेली जात पंचायत झालीच नसती अशी माहिती हाजी इर्शादभाई यांनी दिली. 

       सदर संविधान - लोकशाही व जात पंचायत विरोधी प्रकरणास महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून प्रसार माध्यमातून सहकार्य करीत आहेत. तृप्तीताई देसाई, अशोक धनगांवकर, डॉ. परवेज अशरफी, अॅड. सुमीत साबळे, अशोक अल्हाट, अलीम वजीर पटेल, भीम आर्मी तसेच अनेक मान्यवरांनी प्रत्यक्षात भेटून पाठिंबा दिला असल्याची माहिती हाजी इर्शादभाई यांनी दिली आहे. 

       सदर प्रकरण संविधान - लोकशाही विरोधी व जात पंचायतीचे असून देखिल प्रशासन कोणतीही भूमिका घेत नसल्याने हाजी इर्शादभाई यांनी आश्चर्य व्यक्त करून संबंधितांवर  कारवाई करण्याची मागणी केली आहे.

वाचा -

तर हे सरकार इतरांना काय न्याय देणार - डॉ. परवेज अशरफी AIMIM MAHARASHTRA ...

मानवाधिकरांचे हनन म्हणजेच संविधानद्रोह - अलिम वजिर पटेल..

एम आय एम ची अहमदनगर जिल्ह्यात शानदार एंट्री - AIMIM AHMEDNAGAR MAHARASHTRA..

संविधान व लोकशाही विरोधी कृत्य सहन करणार नाही - हाजी इर्शादभाई , Pune..

तर हे सरकार इतरांना काय न्याय देणार - डॉ. परवेज अशरफी AIMIM MAHARASHTRA

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

 तर हे सरकार इतरांना काय न्याय देणार - डॉ. परवेज अशरफी





     जे सरकार आपल्या सहकारी पक्षातील प्रदेश उपाध्यक्ष हाजी इर्शादभाई यांना अद्याप न्याय देऊ शकले नाही ते सरकार सर्वसामान्य जनतेस काय न्याय देणार? अशी टिका व प्रश्न एमआयएम पक्षाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष डॉ. परवेज अशरफी यांनी केला आहे. 

        नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राजुरी ता. जुन्नर येथील एका वक़्फ़ नोंदणीकृत धार्मिक ट्रस्ट ने बेकायदेशीरपणे सदर निवडणुकीसाठी संस्थेच्या अध्यक्षा नावे उमेदवारी अर्ज मागवून घेऊन संस्थेची उमेदवार निवड समिती स्थापन करुन सदर समितीस उमेदवार निवडण्याचे व बाद करण्याचे असंविधानीक अधिकार देण्यात आले. जर इच्छुकांनी समितीचा निर्णय डावलुन लोकशाही पद्धतीने निवडणूक अधिकार्याकडे अर्ज दाखल केला तर त्याचेवर जमाती मार्फत कारवाई करण्याची धमकी देण्यात आली. सदर प्रकरण लिखित स्वरूपात उपलब्ध असूनही राज्य सरकार मतांचे राजकारण करून संविधान व लोकशाही विरोधी कृत्य करणाऱ्या, संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे हनन करणाऱ्या व जात पंचायत अनुकूल धमकी देऊन संविधान व लोकशाहीस आव्हान देणाऱ्या व्यक्तींविरोधात चौकशी करून त्यांचेवर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष हाजी इर्शादभाई यांनाच जर महा विकास आघाडी सरकार न्याय देऊ शकत नसेल तर सर्व सामान्य जनतेचे काय? अशी प्रखर टिका डॉ. परवेज अशरफी यांनी केली आहे. 

        सदर प्रकरण हे संविधान विरोधी व लोकशाही साठी घातक असून मानवाधिकारांचे हनन करणारे आहे. अधिकारांचा दुरोपयोग करून संबधित कार्यकारी मंडळाने जात पंचायत अनुकूल परिस्थिति निर्माण केल्याचे सिद्ध होते. सदर व्यक्तीं विरोधात सरकार ने लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी डॉ. परवेज अशरफी यांनी केली आहे.




वाचा - 




एम आय एम ची अहमदनगर जिल्ह्यात शानदार एंट्री - AIMIM AHMEDNAGAR MAHARASHTRA

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

एम आय एम ची अहमदनगर जिल्ह्यात शानदार एंट्री


अहमदनगर - 


पुर्ण महाराष्ट्रात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत सर्वच पक्षांनी आपले उमिदवार रिंगणात उतरवले होते. काँग्रेस राष्ट्रवादी सेना भाजप बरोबर प्रदेशातील अनेक राजकीय पक्षांनी उमेदवार दिले होते. एम आय एम ने महाराष्ट्रात आपला पक्ष मजबूत करण्यासाठी सर्व निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याने ग्रामपंचायत निवडणूकित ही एन्ट्री केली. एम आय एम पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांच्या तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील व प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असून. अहमदनगर जिल्ह्याची कमान डॉ परवेज अशरफी यांच्या हातात आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एम आय एम ने आपले ६ उमेदवार दिले होते त्यापैकी ४ उमेदवारांनी विजय नोंदविला आहे. शेवगाव व श्रीरामपूर तालुक्यात एम आय एम ने आपले उमेदवार उतरविले होते. शेवगाव तालुक्यात ५ तर श्रीरामपूर तालुक्यात १ उमेदवार देऊन एम आय एम आपली सुरुवात केली होती. त्या पैकी ३ शेवगाव मधून तर १ श्रीरामपुर तालुक्यातून निवडून आल्याने एम आय एम ने अहमदनगर जिल्ह्यात शानदार एंट्री केली असल्याचे दिसते. निवडून आलेल्या उमेदवारांना एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी अभिनंदन केले व शेवगाव तालुका अध्यक्ष युसुफ शेख आणि श्रीरामपुर तालुका अध्यक्ष शकील शेख यांचा ही अभिनंदन केले. 

ज्या प्रकारे पूर्ण देशात एम आय एम ला चांगला प्रतिसाद मिळत आहे त्याच प्रकारे ग्राम पंचायत निवडणूक पहाता एम आय एम आता गावा गावात पोहोचत असल्याचे दिसते.

निवडून आल्या नंतर एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेब, प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील साहेब, प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफ्फर कादरी साहेब यांना देताच सर्वांनी एम आय एम अहमदनगर टीमचा अभिनंदन केले.

येणाऱ्या काळात एम आय एम अहमदनगर जिल्ह्यातील होणाऱ्या नगर परिषद, नगर पालिका, जिल्हा परिषद निवडणुकी कडे आपला लक्ष केंद्रित करणार असल्याचे एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी एका पत्रकारांशी बोलतांना सांगितले.




वाचा -

ती दिवस- रात्र रस्त्यावर फिरत होती - Manavseva Project...

शिष्यवृत्ती आणि विद्यार्थी - अहमद मुंडे...

संविधान व लोकशाही विरोधी कृत्य सहन करणार नाही - हाजी इर्शादभाई , Pune...

चुकीची माहिती देऊ नका - खासदार इम्तियाज जलील AIMIM MP IMTIYAZ JALIL....

मुकुंदनगर पाण्याची टाकीचे काय? - डॉ परवेज अशरफी - Ahmednagar Corporation

मुकुंदनगर पाण्याची टाकीचे काय ? - डॉ परवेज अशरफी


अहमदनगर -

गेल्या १० वर्षा पासून अहमदनगर येथील फेज २ चे काम रखडले आहे. जेव्हा विचारणा केली तर ६ महिन्यात पूर्ण होईल अशे उत्तर देण्यात येतात परंतु १० वर्षानंतर ही फेज २ चालू न झाल्याने या मागचे कारण समजून घेणे गरजेचे आहे. जवळ जवळ पूर्ण शहरात फेज २ ची पाईप लाईन पूर्ण झालेली असून ती चालू का करत नाही हा प्रशन सामान्य जनतेला पडत आहे.

महानगर पालिके समोर मुकुंदनगर भाग आहे जो महापालिके हद्दीत असून सुद्दा महापालिकेचे सुविधा पासून वंचित आहे. पिण्याचे पाण्याचा प्रश्न असो, की गटारीचा असो, किंवा रस्त्याचा. कोणताही महानगर पालिकेचा काम दिलेल्या वेळात एक ही ठेकेदारांनी केलेला दिसून आले नाही. पाऊसच्या महिन्यात मुकुंदनगर वासीयांच्या घरात पाऊसाचा आणी गटारीचा पाणी शिरतो. तक्रार केली तर पालिके कडे मानस उपलब्द नसतात, असले तर एक किंवा दोन माणसावर सर्व काम सोडून दिलेले असते जे अशक्य नाही.

मुकुंदनगर भागात १५ वर्षा पूर्वी एक पाण्याची टाकी बांधण्यात आली. त्याचा फायदा आज तागायत सामान्य नागरिकांना झाले नाही. लोक प्रतिनिधी बदलले, आमदार , खासदार बदलले परंतु एकानेही मुकुंदनगर भागातील पाण्याची टाकी चालू करून मुकुंदनगर वासियांना सुरळीत पाणी पुरवटा होईल असे काम केलेले दिसत नाही.

लोक प्रतिनिधींना भरगोस मतांनी निवडून दिले परंतु आज पण मुकुंदनगर मुलभूत गर्जे पासून वंचित आहे. अशे गंभीर आरोप एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी केले. पालिका अहमदनगर मध्ये पाण्याचे टाकी उभारत असेल तर चांगली बाब आहे परंतु ज्या पाण्याचे टाक्या १० -१५ वर्षा पासून उभारून उपयोगात आणले नाही त्याचे काय ? असा प्रश्न डॉ अशरफी यांनी केला

एम आय एम तर्फे महानगर पालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात पुढे लिहिले आहे की जसे पालिका हद्दीतल नागरिक पालिकेचा कर भरतात तसेच मुकुंदनगर भागात राहणारे नागरिक भरतात. पण सोय आणी सवलत हे मुकुंदनगर भागात तुलनेने कमी असल्याचे दिसते. याचे कारण मुकुंदनगर भाग हा मुस्लीम बहुल असल्यामुळे हि वागणूक दिली जात असावी. महानगर पालिका आयुकत्ताना निवेदन देऊन अहमदनगर शहरची प्रगती साठी शहरासोबत मुकुंदनगर भागाचा विकास गरजेचे असल्याचे सांगितले.

निवेदनावर एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी, जिल्हा महासचिव हाजी जावेद शेख, जिल्हा उप अध्यक्ष मुफ्ती अल्ताफ, फिरोज शेख, मास शहर अध्यक्ष अमीर खान , आरिफ सय्यद, समीर बेग, सलमान खान आदी. सह्या आहेत.


एम आय एम सिरसगाव अध्यक्षपदी बरकत पठाण - MIM Shrirampur -Ahmednagar...

बनावट सॅनिटायझर जप्त - duplicate sanitizer...

अ.भा. किसान कामगार समन्वय समितीच्या वतीने मार्केटयार्ड चौकात रास्ता रोको....

लव जिहाद पर उच्च न्यायालय का निर्णय -love jihad...

एम आय एम बेलापूर अध्यक्षपदी मोसिन शेख - Shrirampur...

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या