शायर समाजात घडणार्या घडामोडींवरील भाष्य आपल्या कवितेतून मांडतो
- डॉ.कमर सुरुर
अहमदनगर - शायर हा आपल्या शायरीतून फक्त प्रेम, प्रियसी, शराब, मैखाना अशाच गोष्टीचा उहापोह करतो हा जनसामान्यांचा समज आहे. हे एकदम चुकीचे आहे. आजच नाही तर जुन्या काळापासून आपण अभ्यास केला तर सर्व शायरांनी मनुष्याच्या जीवनात घडणार्या व समाजात घडणार्या घडामोडींवरील भाष्य आपल्या कवितेतून मांडले आहे. मिर्जा गालिब यांच्याबाबत विचार केला तर त्यांनी स्वतंत्र्यपूर्ण काळात देशातील स्थितीवर, लोकांच्या समस्यांवर शायरी केली. पण लोकांनी त्यांच्या फक्त प्यार, मोहब्बत, शराबच्या शायरीलाच जास्त पसंत केल्यामुळे त्यांच्याकडे त्याच दृष्टीकोणातून पाहण्यात येऊ लागले. खरं तर मिर्जा गालिब यांनी जीवनातील प्रत्येक बाबींवर आपल्या कवितेच्या माध्यमातून वास्तव मांडले आहे, असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या सहसचिव उर्दू कवियत्री डॉ.कमर सुरुर यांनी केले.
मखदुम सोसायटी व अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्यावतीने मिर्जा गालिब यांच्या जयंतीनिमित्त गोविंदपुरा येथील मखदुम कार्यालयात शेरीनशिस्तचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन डॉ.कमर सुरुर बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हूणन उर्दू कवियित्री नफिसा हया होत्या.
नफिसा हया यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना त्यांनी मिर्जा गालिब फक्त प्रेमावर नसून त्या मागची गालिब यांनी जी भुमिका मांडायची होती ती त्यांनी सविस्तर मांडली. रसिकांनीही त्यास पसंती देत यांचे कौतुक केले.
या नशिस्तमध्ये डॉ.कमर सुरुर, सलिम यावर, नफिसा हया यांनी आपल्या शायरी सादर केल्या. तर सलिम यावर यांनी मिर्जा गालिब यांचे ‘हजारों ख्वाहिशे ऐसी की हर ख्वाहींश पे दम निकले...’ ही गजल गाऊन सादर केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार आबीद दुलेखान यांनी मानले.
वाचा -
ऐतिहासिक अहमदनगर काही घटना काही आठवणी - Historical Ahmednagar....
अहमदनगर महानगर पालिकेने भोंग्याचा वापर करावे - डॉ परवेज अशरफी -AIMIM AHMEDNAGAR...
अहमदनगर सरोज टॉकिज बॉमबस्फोट - Saroj Bomb Blast...
१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान भाग ३ - Indian Muslim Freedom Fighter....