Showing posts with label makdoom. Show all posts
Showing posts with label makdoom. Show all posts

मखदुम सोसायटीच्यावतीने मिर्जा गालिब जयंती साजरी - MIRZA GALIB

शायर समाजात घडणार्‍या घडामोडींवरील भाष्य आपल्या कवितेतून मांडतो

- डॉ.कमर सुरुर


अहमदनगर - शायर हा आपल्या शायरीतून फक्त प्रेम, प्रियसी, शराब, मैखाना अशाच गोष्टीचा उहापोह करतो हा जनसामान्यांचा समज आहे. हे एकदम चुकीचे आहे. आजच नाही तर जुन्या काळापासून आपण अभ्यास केला तर सर्व शायरांनी मनुष्याच्या जीवनात घडणार्‍या व समाजात घडणार्‍या घडामोडींवरील भाष्य आपल्या कवितेतून मांडले आहे. मिर्जा गालिब यांच्याबाबत विचार केला तर त्यांनी स्वतंत्र्यपूर्ण काळात देशातील स्थितीवर, लोकांच्या समस्यांवर शायरी केली. पण लोकांनी त्यांच्या फक्त प्यार, मोहब्बत, शराबच्या शायरीलाच जास्त पसंत केल्यामुळे त्यांच्याकडे त्याच दृष्टीकोणातून पाहण्यात येऊ लागले. खरं तर मिर्जा गालिब यांनी जीवनातील प्रत्येक बाबींवर आपल्या कवितेच्या माध्यमातून वास्तव मांडले आहे, असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या सहसचिव उर्दू कवियत्री डॉ.कमर सुरुर यांनी केले.

मखदुम सोसायटी व अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्यावतीने मिर्जा गालिब यांच्या जयंतीनिमित्त गोविंदपुरा येथील मखदुम कार्यालयात शेरीनशिस्तचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन डॉ.कमर सुरुर बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हूणन उर्दू कवियित्री नफिसा हया होत्या.



नफिसा हया यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना त्यांनी मिर्जा गालिब फक्त प्रेमावर नसून त्या मागची गालिब यांनी जी भुमिका मांडायची होती ती त्यांनी सविस्तर मांडली. रसिकांनीही त्यास पसंती देत यांचे कौतुक केले.

 या नशिस्तमध्ये डॉ.कमर सुरुर, सलिम यावर, नफिसा हया यांनी आपल्या शायरी सादर केल्या. तर सलिम यावर यांनी मिर्जा गालिब यांचे ‘हजारों ख्वाहिशे ऐसी की हर ख्वाहींश पे दम निकले...’ ही गजल गाऊन सादर केली.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार आबीद दुलेखान यांनी मानले. 


AHMEDNAGAR : It is a common misconception that a poet writes only about love, sweetheart, alcohol and liquor in his poetry. This is completely wrong. If we study not only today but also from ancient times, all the poets have given their commentary on the happenings in human life and the happenings in the society through their poems. If you think about Mirza Ghalib, he wrote poetry on the situation in the country and the problems of the people during the independence period. But people started looking at him from the same point of view as they only liked his love, love, alcohol poetry. In fact, Mirza Ghalib has presented the reality of every aspect of life through his poetry, asserted Dr. Kamar Surur, Joint Secretary, Urdu Poetry, Ahmednagar District Urdu Literary Council.
On behalf of Makhdoom Society and Ahmednagar District Urdu Literary Council, a sherin discipline was organized at Makhdoom's office in Govindpura on the occasion of Mirza Ghalib's birthday. Dr. Kamar Surur was speaking from the chair on this occasion. The chief guest was Urdu poetess Nafisa. While expressing her thoughts, Nafisa Haya explained in detail the role that Mirza Ghalib wanted to play not only in love but also in the role that Ghalib wanted to play. Fans also appreciated it.
Dr. Kamar Surur, Salim Yavar and Nafisa Haya presented their poetry in this Nashisht. Salim Yavar sang Mirza Ghalib's ghazal 'Hazaron Khwahishe Aisi Ki Har Khwahinsh Pe Dum Nikle ...'.
The program was moderated and thanked by Abid Dulekhan.


वाचा - 

ऐतिहासिक अहमदनगर काही घटना काही आठवणी - Historical Ahmednagar....

अहमदनगर महानगर पालिकेने भोंग्याचा वापर करावे - डॉ परवेज अशरफी -AIMIM AHMEDNAGAR...

अहमदनगर सरोज टॉकिज बॉमबस्फोट - Saroj Bomb Blast...

१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान भाग ३ - Indian Muslim Freedom Fighter....

उर्दू साहित्यात कमर कोकणी व प्रा. खलील मुजफ्फर यांचे मोठे योगदान- सलीम खान

मगदूम सोसायटीतर्फे कमर कोकणी व प्रा. खलील मुजफ्फर यांच्या आठवणींना उजाळा



अहमदनगर- भूतकाळात अहमदनगर मध्ये उर्दू साहित्यात काम करणारे भरपूर माणसे होती. ज्यांनी भरपूर कार्य केले व त्यांच्या मागे साहित्यात काम करणारी नवी माणसे तयार केली. ज्यामुळे आज ती माणसे साहित्यात काम करत आहे. पण येणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाच्या काळात उर्दू साहित्य काम करणारी माणसं फार कमी होत आहे. त्यासाठी सध्या कार्यरत असणाऱ्या साहित्यकांनी नवीन पिढीला उर्दू साहित्याकडे आकर्षित करण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन उर्दू साहित्यिक व कवी सलीम खान यांनी केले.

       मखदूम सोसायटीच्या वतीने अहमदनगरचे दिवंगत उर्दू साहित्यकार व कवी कमर कोकणी व प्राध्यापक खलील मुजफ्फर यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्थानिक कवींचा मुशायरा रहमत सुलतान सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कवी सलीम खान, माजी प्राचार्य कादिर सर, सुफी गायक पवन नाईक, अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या सहसचिव डॉ. कमर सुरूर, रुग्णमित्र नादिर खान, कमरुद्दिन शेख, खालील चौधरी, मुस्कान असोसिएशनचे अध्यक्ष शफकत सय्यद आदी उपस्थित होते.

    पुढे बोलताना सलीम खान म्हणाले की कमर कोकणी हे व्यवसायाने टेक्स्टाईल कॉन्ट्रक्टर होते. पण त्यांना उर्दू भाषेची आवड असल्यामुळे वेगवेगळ्या साहित्यिक संघटनांच्या माध्यमातून ऊर्दू साहित्या साठी कार्य केले. त्याचप्रमाणे प्रा.खलील मुजफ्फर यांना तर अनेक भाषांवर प्रभुत्व होते. पण त्यांना उर्दू भाषेची फार आवड होती. म्हणून त्यांनी मराठी साहित्यातील नामवंत साहित्यिकांचे लेखनाचे उर्दूत भाषांतर केले होते. त्यांच्या या कामाला अनेक साहित्यिकांनी भरभरून कौतुक केले होते. व त्यांनी अनेक मराठी साहित्यकारांच्या पुस्तकांची व नावांची यादीही सादर केली. त्याचप्रमाणे कादिर सर व पवन नाईक यांनीही दिवंगत साहित्यकां बद्दल आपले मनोगत व्यक्त केले.

     यावेळी झालेल्या मुशायरा मध्ये बिलाला अहमद, अ.रशिद कुरेशी, शरीफ खान, मुशताक सर,अँड. मन्सूर जागीरदार, सलीम खान, डाँ. कमर सुरूर, नफिसा हया, आसिफ सर, हबीब पेंटर, मुन्नवर हुसेन यांनी आपल्या रचना सादर केल्या. या संपूर्ण कार्यक्रमाचा फेसबुक लाईव्ह थेट प्रक्षेपण ही करण्यात आला. ज्याला शेकडो रसिकांनी त्याचा आनंद घेतला.

   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसिफ सर यांनी केले. तर आभार आबीद दुलेखान यांनी मांनले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शफकत सय्यद, तारीक शेख, सलीम खान व मगदूम सोसायटीच्या सर्व सदस्यांनी भरपूर परिश्रम घेतले.

वाचा -

24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन विशेष - विलास जगदाळे ....

ओबीसी, व्ही.जे., एन.टी. चा अहमदनगर मध्ये जनमोर्चा - OBC,VJ,NT MORCHA ...

१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान भाग ३ - Indian Muslim Freedom Fighter...

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग २ INDIAN MUSLIMS FREEDOM FIGHTER ...

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग १ MUSLIMS INDIAN FREEDOM FIGHTER ....

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग १ MUSLIMS INDIAN FREEDOM FIGHTER

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -  



  • अख्तर अली - जन्म कपुरथाळा, पंजाब, कपुरथाळा पायदळात सुभेदार , भारतीय राष्ट्रीय लष्करात दुसर्या गुरीला पलटणीत कॅप्टन म्हणून प्रवेश युद्धात कामी आले. 

 

  • अल्लाहुदिन - तलाव, जी. रोहटक , हरियाणा येथे जन्म, मोतीबक्ष चा मुलगा, जाट पलटणीत सैनिक, भारतीय राष्ट्रीय लष्करात तिसर्या गुरीला पलटणीत सैनिक महणून प्रवेश, युद्धात शहीद झाले.

 

  • अल्ताफ हुसेन - जन्म रायपुर खुर्द, जी. अमृतसर, पंजाब येथे. भारतीय सैन्यात सैनिक होते. नंतर भारतीय राष्ट्रीय लष्करात बहादूर गटात सैनिक म्हणून प्रवेश, ब्र्हम्देशातील युद्धात शहीद.


  • बशीर अहमद  - जन्म बहाली, जी. रोहटक हरयाणा,  भारतीय लष्करात जाट पलटणीत हवालदार, भारतीय राष्ट्रीय लष्करात तिसऱ्या गुरीला पलटणीत लेफ्टनंट   म्हणून प्रवेश, कलेवा युद्धात शहीद.

  

  • चिराग दिन - जन्म बडेंधे , जी. लुधियाना, पंजाब, ब्रह्मदेशात भारतीय लष्करात प्रवेश, युद्धात शहीद.

 

  • चिराग खान - जन्म कहना, जी.कपूरथळा, पंजाब मलायात भारतीय राष्ट्रीय लष्करात प्रवेश, युद्धात शहीद.

 

  • फतेह खान - जन्म रोहटक , हरियाणा भारतीय लष्करात जाट पलटणीत सैनिक, भारतीय  राष्ट्रीय लष्करात सिंगापूर येथे सामील. तिसऱ्या गुरीला पलटणीत सेवा. ब्रिटीश सेनेशी युद्ध, जीगरकाचा येथील युद्धात शहीद.

 

  • फतेह मोहम्मद - जन्म शेरपूर जी. होशियारपूर , पंजाब भारतीय लष्करात हवालदार कारकून, मलायातील भारतीय राष्ट्रीय लष्करात सामील, युद्धात शहीद

 

  • गुलामनबी -  जन्म हरमाबाद, जी. गुरुदासपूर, पंजाब, ब्र्हम्देशातील भारतीय राष्ट्रीय लष्करात प्रवेश, ब्रीटीशांकडून अटक. बिहारी कॅम्प मध्ये तुरुंगवास, फेब्रुवारी १९४४ मध्ये मृत्यु.

 

  • इरशाद अली - जन्म बिगाणा , जी. रोहटक हरियाणा. भारतीय लष्करात सैनिक. भारतीय राष्ट्रीय लष्कराच्या पहिल्या गुरीला पलटणीत सैनिक म्हणून प्रवेश युद्धात शहीद.

 

  • जमालउद्दीन - जन्म मैनवन जी. कपूरथळा, पंजाब. कपूरथळापायदळात सैनिक, भारतीय राष्ट्रीय लष्कराच्या दुसऱ्या  गुरीला रेजिमेंट मध्ये नाईक म्हणून प्रवेश इंफाळजवळील युद्धात शहीद.

 

  • फातमअली - जन्म पट्टण , जी. हिस्सार, हरियाणा फरीदखान मुलगा, ब्र्हम्देशात भारतीय राष्ट्रीय लष्कराच्या शामील. तिसऱ्या गुरीला पलटणीत नाईक म्हणून सेवा. युद्धात शहीद.

 

  • ख़ुशी महमद - जन्म भंद्री, जी.लुधियाना, पंजाब. शांघाय प्लीस (चीन) मध्ये पोलीस,भारतीय राष्ट्रीय लष्कराच्या एस.एस.गटात सामील. ब्र्हम्देश सरहद्दीवरील युद्धात शहीद.

 

  • लालखान - जन्म माघल, जी. झेलम, पंजाब. मलयात भारतीय राष्ट्रीय लष्कराच्या सामील, युद्धात शहीद.

 

  • मोहंमद अन्वर - जन्म नुरपूर, जी. झेलम, पंजाब भारतीय राष्ट्रीय लष्करात शीख पलटणीत हवालदार, १९४२ ला सिंगापूरला १९४५ मध्ये ब्रह्मदेशातील अराकन टेकड्यांवरील युद्धात शहीद.

 

  • मोहंमद बनारस- जन्म बसाली जी. रावळपिंडी , पंजाब मलायात भारतीय लष्करात सामील, दुसऱ्या गुरीला पलटणीत लेफ्टनंट म्हणून सेवा. युद्धात शहीद.

 

  • मोहंमद शफी - जन्म पुट्टी जी.लाहोर, पंजाब मलायातील भारतीय राष्ट्रीय लष्कराच्या सामील दुसर्या गुरीला पलटणीत हवलदार म्हणून सेवा, इंफाळ जवळ युद्धात शहीद.

 

  • मोहंमद दोन -  जन्म काला कालन, जी. सियालकोट, पंजाब मलायात भारतीय लष्करात शामिल. युद्धात शहीद.

 

  • मोहंमद उमरखान -  जन्म निगाना , जी. रोह्टक , हरियाणा. नजर मोहंमदचा मुलगा. भारतीय लष्करातील जाट पलटणीत सैनिक, सिंगापूरच्या भारतीय राष्ट्रीय लष्करात प्रवेश, तिसऱ्या गुरीला पलटणीत हवालदार म्हणून सेवा युद्धात शहीद.

 

  • मोहंमद याकुब - जन्म कासीर जी. हजारा , वायव्य सरहद प्रांत मलायात भारतीय राष्ट्रीय लष्करात शामील. युद्धात शहीद.

 

  • मोहंमद युसुफ - जन्म इब्राहीम जैर जी. कोहट. वायव्य सरहद प्रांत भारतीय राष्ट्रीय लष्करात सैनिक. १९४२ मध्ये भारतीय राष्ट्रीय लष्करात शामील. पहिल्या बहादूर गटात सेवा, इंफाळ नजीकच्या युद्धात वीरगती.

 

  • नबी बक्ष - जन्म मैनवेन, जी. कपूरथाळा, पंजाब कपूर था ळा पायदळात नाईक, १९४२ साली मलायात भारतीय राष्ट्रीय लष्करात शामिल. दुसऱ्या गुरीला पलटणीत सेवा, इंफाळ जवळील युद्धात वीरगती.

 

  • नूर हुसेन -  जन्म कानी, कॅबेल्पूर पंजाब १९४२ साली भारतीय राष्ट्रीय लष्करात मलायात प्रवेश, नोव्हेंबर १९४४ ला सिंगापूर येथे युद्धात शहीद.

 

  • ताज मोहंमद - जन्म गोजरगड नुरकेल जी. मर्दन, वायव्य सरहद प्रांत भारतीय लष्करात हवालदार. १९४२ साली सिंगापूर भारतीय राष्ट्रीय लष्करात सामील. पहिल्या बहादूर गटात सेकंद लेफ्टनंट म्हणून सेवा. ब्रिटिशांनी कैद करून भारतात आणला. लखनौला १९४६ साली मृत्यू.

 

  • जहूर अहमद - जन्म जहूर मुखलिअन जी. शेखुपुरा, पंजाब मलायात भारतीय राष्ट्रीय लष्करात प्रवेश. ब्र्हम्देसतील सार्हद्द्तील ब्रिटीश फौजांशी युद्ध. १९४३ मध्ये ब्रिटिशांनी पकडून भारतात आणला. लष्करी खटला देहांताची शिक्षा, २३ ऑगस्ट १९४३ ला फाशी.               

 स्त्रोत : 

मखदूम उर्दू - स्वातंत्र्य चाळवलीतील मुस्लीम हुतात्म्यांचे अपूर्ण यादी.  

 सेडिशन कमिटी रिपोर्ट 

रोल ऑफ ऑनर - के सी घोष

हुज हु ऑफ इंडिया मात्रीअर्स खंड १,२,३ संपादक - डॉ पी एन चोप्रा

HISTORY OF FREEDOM FOGHTER MOVEMENT OF CARE - T V KRUSHNAN

THE RIN STRIKE - A GROUP OF VITIMISED RATING

नव विद्रोह  कॅप्टन बी.दत्ता

COMMUNIST MARTOURS - COMMITTE OF COMMUNIST PARTY OF INDIA 

SUNIL BENARGEE, ABDUL RAZZAK KHAN AND ABDUL BADUD WRITTEN ARTICLES

   

वाचा -

मौलाना मुहम्मद अली ज़ौहर - Indian Freedom Fighter....

लव जिहाद पर उच्च न्यायालय का निर्णय -love jihad...

बाबरी मस्जिद शहादत- Babri masjid by Firoz Shaikh...

Guru Nanak : पैगम्बर मुहम्मद ﷺ साहब के बारे में, गुरु नानक जी के सुनहरे विचार....

मोगलांचा शासनकाळ व प्रजा - Muzaffar Sayyed...

मतदार यादीत दुरुस्तीची सरकारची विशेष मोहीम - ELECTION VOTER LIST

विशेष मोहिमे अंतर्गत होणार दुरुस्ती  



नवीन मतदारांचे नाव समाविष्ट होणार 

मतदार यादीत नाव नसेल तर हीच संधी 

नावाची दुरुस्ती करता येईल 

सर्व चुकीची दुरुस्ती करता येणार 

राज्य -  जिल्ह्याच्या मतदार यादीत जिल्हा प्रशासनाद्वारे महिला व युवक मतदार नोंदणीची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. मतदार यादीत १ हजार पुरुषांच्या तुलनेत महिलांची नावे अवघी ९२३ आहेत. त्यामुळे महिलांची नावे मतदार यादीत नोंदवण्यासाठी प्रत्यक गावातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व महिला बचत गट सदस्य महिलांना जबाबदारी देण्यात आली आहे. याचबरोबर १८ ते १९ वर्षे वयोगटातील युवा पिढीला मतदार नोंदणी होण्यासाठी या विद्यार्थीची जबाबदारी  शिक्षण घेत असलेल्या शाळा-महाविद्यालयांच्या प्राचार्यांवर देण्यात आली आहे. १ जानेवारी २०२१ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या युवा, महिला यांचे  मतदार यादीत नोंदवण्याचे काम या मंडळींना करावे अशे आदेश देण्यात आले. 

नव्या मतदारांचे नाव समाविष्ट करणे, दुबार नोंदणी असलेल्या मतदारांची तसेच मृत व्यक्तींची व स्थलांतरित व्यक्तींची नावे वगळण्याचा मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रम जिल्हा निवडणूक अधिकारी-जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी हाती घेतला आहे. जिल्ह्याची जुनी मतदार यादी प्रसिद्ध करून त्यात जे दुरुस्ती असतील त्यासाठी नागरिकांनी अर्ज भरून द्यायचे आहे.

जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघांतील ३ हजार ७२२ मतदान केंद्रांवर विशेष सुविधा केली गेली आहे. या मतदान केंद्रावर प्रत्येकी एक बीएलओ म्हणजे ३ हजार ७२२ बीएलओ व ३५४ बीएलओ सुपरवायझर नियुक्त केले गेले आहेत. या मोहिमेत राजकीय पक्षाने आपले प्रतिनिधी नेमून केंद्र प्रतीन्धीला सहकार्य करण्याचे आव्हान करण्यात आले. आहे. सदर दुरुस्तीचा कार्यक्रम १५ डिसेम्बर पर्यंत सुरु राहणार असून नागरिकांनी मतदान यादीत काही चुकले असेल तर ती दुरुस्ती करण्याचे आव्हान करण्यात आले आहे. आलेल्या हरकती आणी सूचनाच्या आधारे १५ जानेवारीला २०२१ रोजी अंतिम मतदान यादी प्रसिद्ध करण्यात येईल 

वाचा -

अन्न व औषध प्रशासने केली मोठी कारवाही - Food and Drugs..

मन सुन्न करणारी घटना...!- Manavseva..

डॉ धर्मराज सुरोसे यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड - shevgaon ...



एम आय एम अशोकनगर अध्यक्ष पदी समीर शेख - AIMIM Ahmednagar

एम आय एम अशोकनगर अध्यक्ष पदी समीर शेख


श्रीरामपूर - अहमदनगर

एम आय एम श्रीरामपूर तालुक्याची बैठक अशोक नगर येथे घेण्यात आली. अशोक नगर अध्यक्ष पदा बाबत चर्चा करण्यात आली. बैठकीत एक मताने समीर शेख यांची निवड करण्यात आली. एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांच्या आदेशाने व जिल्हा उपाध्यक्ष यांच्या मार्गर्शनाखाली व एम आय एम श्रीरामपूर तालुका अध्यक्ष शकील शेख यांच्या अध्यक्षतखाली अशोक नगर येथे समीर शेख यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. त्याच बरोबर अशोक नगर कार्यकारणी जाहीर करण्यात आली. कार्यकारणी अशोक नगर अध्यक्ष समीर शेख, उपाध्यक्ष अय्युब शेख,  सचिव मनोज सूभास काळे,   सहसचिव  जमिल  शेख  कार्यअध्यक्ष सागर रमेस मगरे , खजिंनदार अरबाज निजाम पठान मेडिया प्रमूख सोहेल रऊफ शेख अशोक नगर प्रसिधी प्रमुख अनिल रगूनाथ जगधने , सल्लागार आजिम यासीन पठान,  सह सल्लगार रमेस शंकर गागूर्ड्   संगठक अल्ताफ यूनूस सय्यद

यावेळी  तालुका अध्यक्ष शकील भाई शेख तालुका उपाध्यक्ष यूनूस भाई शेख  शहर अध्यक्ष यूनुस भाई शेख शहर उपाध्यक्ष आमोल रूपट्के  शहर सचिव नावेद पटेल शहर सलागार शाहरुख मन्सूरी  व  पक्षाचे कार्यकर्ता उपस्थित होते


वाचा -

एम आय एम उंदिरगाव अध्यक्ष पदी अमीर शेख ...

एम आय एम हरेगाव अध्यक्ष पदी अविनाश वाहुळ...

ओवेसी का समर्थन क्यो करती है युवा पिढी?...

एम आय एम मानोरी गाव अध्यक्ष पदी शाहरुख शेख...

एम आय एम मानोरी विद्यार्थी अध्यक्ष पदी सोहेल शेख यांची निवड...


मखदुम सोसायटी च्या वतीने मौलाना आजाद यांना अभिवादन - Makdoom Society

मौलाना आझाद शिक्षण विस्ताराचे जनक -शाहिद काझी 



अहमदनगर :- भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना आझाद यांनी देशाची शैक्षणिक प्रगती व तरुणांना प्रशिक्षणाच्या गरजा लक्षात घेऊन त्यांनी शैक्षणिक धोरण आखले. शिक्षणाला राष्ट्रीय प्रवाहाचे साधन म्हणून त्यांनी अंमलात आणले. व त्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती होऊन शिक्षणाचे दारे सर्वांसाठी खुली झाली. त्यामुळे शिक्षण विस्ताराचे जनक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते, असे प्रतिपादन शाहिद काझी यांनी केले.

 मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या 132 व्या जयंती व राष्ट्रीय शिक्षण दिना निमित्त मखदुम सोसायटी, अल करम सोसायटी, मुस्कान असोसिएशन व अहमदनगर सोशल फाऊंडेशन ट्रस्टच्यावतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी राहिल शेख,अमीन शेख, सैफ शेख,नादिर खान,अँड. अमीन धाराणी, नईम सरदार, आदि उपस्थित होते.

 पुढे बोलताना शाहीद काझी म्हणाले, शिक्षणाचे महत्व विशद करतांना संसदेत मौलाना आझाद म्हणाले होते की, देशाचे अंदाजपत्रकात शिक्षणाला महत्वाचे स्थान देणे गरजेचे आहे. अन्न, वस्त्रानंतर शिक्षणाचा क्रम लावला पाहिजे. त्यांचे असे मत होते की, देशाच्या पंचवार्षिक योजनेचा हेतू केवळ शेती, उद्योग, वीज, दळणवळणाची साधने यांची प्रगती एवढाच असू नये तर देशाच्या नवीन पिढीची जडण घडण योग्य प्रकारे होण्यासाठी शिक्षणाकडेही तेवढेच लक्ष दिले पाहिजे. म्हणूनच सुरुवातीच्या काळात देशाचे शैक्षणिक बजेट दोन कोटीचे होते. ते 1958 साली 30 कोटींचे झाले. शैक्षणिक विकासासाठी त्यांनी ठोस पाऊले उचलली. अनेक नविन शैक्षणिक संस्था निर्माण करुन विकसित केल्या.

 यावेळी शेर अली शेख म्हणाले, 1923 साली अवघ्या 35 व्या वर्षी ते काँग्रेस पक्षाचे सर्वात तरुण अध्यक्ष बनले. धारासना सत्याग्रहाचे ते प्रमुख क्रांतीकारक होते. पुढे 1940-45 या काळात सलग सहा वर्षे ते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहिले. त्यांच्याच काळात 1942 चे अंग्रेजो भारत छोडो ही चळवळ उभी राहिली. स्वातंत्र्यासाठी एकूण साडे सात वर्षे त्यांनी कारावास भोगला. स्वातंत्र्य लढ्यात सर्वाधिक काळ कारावास भोगण्याचा उच्चांक त्यांच्या नावावर आहे. त्यांच्या आयुष्यातील सरासरी आठवड्यातील एक दिवस कारावासात गेला आहे. 

 कार्यक्रमाचे प्रास्तविक आबीद दुलेखान यांनी तर सूत्रसंचालन तौसिफ तांबोली यांनी केले. आभार सैय्यद समीर यांनी मानले.

वाचा - 

अलकरम सोसायटीतर्फे मौलाना आझाद जयंतीनिमित्त मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर...

लायनेस क्लब च्या वतीने मानवसेवा येथे फराळ भेट...

मौलाना मुहम्मद बाकीर भारत देश के पहले शहीद पत्रकार ....

फ्रांस राष्ट्रपती मेक्रोन का अहमदनगर मे निषेध...

https://www.profitablecpmnetwork.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या