Showing posts with label FARMER. Show all posts
Showing posts with label FARMER. Show all posts

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

 


     जिल्हाधिकारी यांचेसाठी मार्गदर्शक सूचना

      देशांचा कणा मानला जाणारा तो शेतकरी. विदर्भ मराठवाडा यामध्ये. अवेळी अवकाळी पडणारा पाऊस दुष्काळ.  ओला दुष्काळ व पाणीटंचाई कोरडा दुष्काळ. शेतीसाठी लागणारे बि बियाणे. रासायनिक खते. शेतीची मशागत मेहनत. यासाठी लाखो रुपये खर्च येतो आणि निसर्गावर अवलंबून असणारा शेतकरी कर्जात बुडत आहे. त्यामुळे. आज हजारो शेतकऱ्यांनी. कर्जाला कंटाळून अखेर आत्महत्या केल्या. वेळोवेळी शेतकरी न्याय देण्यासाठी आंदोलने. फक्त मतदान आल्यावर नेते पुढारी यांना शेतकऱ्यांची आठवण होते आणि मग आंदोलन संपले की पुन्हा शेतकरी डोक्याला हात लावून केविलवाणा चेहरा करून शेताकडे व आभाळाकडे बघतो आहे. शासनाने या सर्व गोष्टींचा विचार करून विविध योजना चालू केल्या त्यातील महत्त्वाची योजना म्हणजे " महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९" चालू करण्यात आली आणि मा जिल्हाधिकारी यांना ही योजना राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या

     # तपशील#

(१) योजनेचे उद्दिष्ट

(२) योजनेचे वैशिष्ट्य

   अ. योजनेचा निकष

   ब. अपात्रता 

(३) कार्यपद्धती

(४) जिल्हास्तरीय समितीची रचना व कार्यपद्धती

(५) जिल्हाधिकारी व इतर संलग्न विभागाची भूमिका

    (१) योजनेचे उद्दिष्ट 

* शेतकऱ्यांना खरीप  २०२० या हंगामात कर्ज घेण्यासाठी पात्र करणे

* सुमारे ३० लाख शेतकऱ्यांना अल्प मुदत पीक कर्ज मिळण्यासाठी सक्षम करणे

    (२) योजनेचे निकष

* अल्प मुदत पीक कर्ज/ हंगामी पीक कर्ज व किसान क्रेडिट कार्डचे योजनेअंतर्गत

*. पुनर्गठित कर्ज / मध्यम मुदत कर्जात रुपांतरीत अल्प मुदत पीक कर्ज

*. यामध्ये सोनं तारण पीक कर्जाचा अंतर्भाव करण्यात आलेला नाही

* अल्प मुदत पीक कर्ज

   (१) दि ०१/०४/२०१५ ते ३१/०३/२०१९ या कालावधीत वितरित केलेलें कर्ज

    (२) दि ३०/०९/२०१९ अखेर थकित ( मुद्दल+ व्याज ) व परतफेड न केलेली कर्ज

* ‌पुनगरगठित कर्ज

(१) दि. ०१/०४/२०१५ ते. ३१/०३ / २०१९ या कालावधीत वितरित केलेलें अल्प मुदत पीक कर्ज

(२) तसेच दि ३१/०३/२०१९ अखेर मध्यम मुदत कर्जात रुपांतरीत कर्ज

(३) वरिल कर्जाचे दि. ३०/०९/२०१९ अखेर थकित ( मुद्दल + व्याज मिळून ) आणि परतफेड न झालेले हप्ते

(४) दि ३०/०९/२०१९ अखेर मुद्दल व व्याजासह केवळ रु २ लाख या मर्यादेपर्यंत थकित व परतफेड न झालेले अल्प मुदत पीक कर्ज खाते पात्र असतील

     # योजनेचे अपात्र व्यक्ति #

* आजी/माजी / राज्य मंत्री/ राज्य सभा  सदस्य / विधानसभा व विधानपरिषद सदस्य

* केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी व कर्मचारी ( रु २५०००. पेक्षा जास्त मासिक वेतन असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून

*. राज्य शासनाच्या सार्वजनिक उपक्रमाचे अधिकारी व कर्मचारी ( महावितरण.  परिवहन मंडळ.  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ इ ) आणि अनुदानित संस्थांचे अधिकारी व कर्मचारी ( रु २५००० पेक्षा जास्त मासिक वेतन असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून) 

* शेती बाह्य उत्पन्नातून आयकर भरणारया व्यक्ति 

* रु २५००० पेक्षा जास्त मासिक निवृत्ती वेतन घेणारे व्यक्ति ( माजी सैनिक वगळून) 

* खालील संस्थांचे अध्यक्ष/ उप अधक्ष. / संचालक व अधिकारी ( रु २५००० पेक्षा जास्त मासिक वेतन असणारे) 

* जिल्हा मध्यवर्ती बँका. / नागरि सहकारी बँक /सहकारी साखर कारखाने / सहकारी दूध संघ /सहकारी सूत गिरणी / कृषी उत्पन्न बाजार समिती 

 # प्रमुख वैशिष्ट्य#

* आधार क्रमांक निश्चित करण्याचा मूलभूत घटक

* प्रति लाभार्थी रु २ लाख पर्यंत लाभ

* एकापेक्षा अधिक अर्ज खाते असलेल्या व एकापेक्षा अधिक बॅंकेचे कर्ज खाते असलेल्या लाभार्थ्यांना सर्व कर्ज मिळून रु २ लाख या मर्यादेपर्यंत लाभ मिळणार

* खालील बॅंकांनी दिलेल्या अल्प मुदत पीक कर्ज योजनेसाठी पात्र

* राष्ट्रीय कृत बॅंका / खाजगी बँका/ग्रामीण बॅंका / जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक/ वि का स संस्था ( जिमस बॅंका मार्फत)

* वि का स संस्था ( सवनिधी)

     # कार्यपद्धती #

* योजनांची घोषणा

* पात्रता /अर्हता दिनांक/ लाभाची रक्कम/अपवरजन/अपात्र यादी/योजना प्रकिया /आधार/प्रामाणिकरण

  # प्रसिद्धी #

* रेडिओ/दुरचित्रवाणी /वृत्तपत्र/मॅसेज मोहीम/समाज माध्यम 

    # व्यापारी बॅंका #

* आधार संलग्न नसलेल्या कर्जदार यादी तयार करणे / पोर्टल आधार संलग्न कर्ज खाती यादी अपलोड करणे /उर्वरित खाते आधार संलग्न करून अपलोड करणे

     # वि का स संस्था#

* आधार संलग्न नसलेल्या कर्ज खाते यादी तयार करणे/ कर्ज खाती तपासणी/ ले प करणे /आधार लिंक अपलोड करणे / उर्वरित खाते आधार संलग्न करून अपलोड करणे 

     # जिल्हा स्तरीय समितीची रचना आणि कार्यपद्धती#


*. जिल्हाधिकारी / मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद /जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी/ जि म स बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी /व्यवस्थापक अग्रणी बँक/ जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था

* पोर्टल द्वारे प्राप्त तक्रारी दाखल घेणे /जिल्हा स्तरीय समिती पोर्टल लाॅग ईन करून आॅनलाइन तक्रार पाहणे

/आॅनलाइन तक्रार.  / आधार क्रमांक न जुळणे /कर्ज खात्यातील रक्कम न जुळणे

* आॅफलाईन तक्रार

बॅंकेने अपलोड न केलेले कर्ज खाते 

    # जिल्हाधिकारी व इतर संलग्न विभागाची भूमिका# जिल्हाधिकारी यांचे कार्य

खालील बाबींची खात्री करणे

*. योजनेतील मुद्द्यांची तपशीलवार प्रसिध्दी करणे

* आधार संलग्न न झालेल्या खातेदारांची यादी गावनिहाय प्रसिद्ध करणे

* योजनेच्या अंमलबजावणीत सक्रिय सहभाग घेण्याबाबत क्षेत्रीय यंत्रणेचे प्रबोधन करणे

* विविध पातळीवर योजनेच्या प्रगतीचे /अंमलबजावणी संनियंत्रण करणे 

* कर्ज खाते आधार संलग्नीकरण

* बॅंकांकडून कर्ज खाते माहिती अपलोड करणे

* आधार प्रमाणीकरण

* कालमर्यादेत तक्रार निवारण

* आपले सरकार सेवा केंद्र आवश्यक सुविधा सह सुरू असल्याची खात्री करणे

* जिल्ह्यातील यंत्रणा व आपले सरकार सेवा केंद्र चालक यांचें प्रशिक्षण व प्रबोधन करणे 

   # जिल्हाधिकारी चेक लिस्ट#

* बॅंका व वि का स संस्थांकडून आधार संलग्न न झालेली कर्ज खात्याची यादी प्राप्त करून घेणे

* योजनेच्या. जाहिराती साहित्य प्राप्त करणे

* प्रसिध्दी टिम

* आवश्यकता भासल्यास आधार नोंदणी सुविधा निर्माण करणे

* आपले सरकार सेवा केंद्र कार्यान्वित करणे

* माहिती अपलोड झाल्याची अथवा प्रलबिंत असल्याची सद्यस्थिती तपासणे

* यादी प्रसिद्ध करण्यासाठी ठिकाण व सुविधा निश्चित करणे

*आधार प्रामाणिकरणासठी कॅम्प/ शिबिर आयोजित करणे

        समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

अ.भा. किसान कामगार समन्वय समितीच्या वतीने मार्केटयार्ड चौकात रास्ता रोको

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

अ.भा. किसान कामगार समन्वय समितीच्या वतीने मार्केटयार्ड चौकात रास्ता रोको



आंदोलकांना अटक 


 देशव्यापी बंद मध्ये सहभाग

अहमदनगर (प्रतिनिधी)- शेतकरीविरोधी असलेल्या तीन नव्या कृषी विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्ली येथे मागील दहा दिवसापासून सुरु असलेल्या आंदोलनाची केंद्रातील भाजप सरकार दखल घेत नसल्याने मंगळवारी (दि. 8 डिसेंबर) रोजी शहरातील मार्केटयार्ड चौकात नगर-पुणे महामार्गावर अ.भा. किसान कामगार समन्वय समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तर भारत बंद मध्ये सहभागी होत तातडीने शेतकरी विरोधी असलेले कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करण्यात आली. रास्ता रोको करणार्‍या आंदोलकांना पोलीसांनी अटक केली.  

 देशव्यापी बंद मध्ये सहभागी होत अ.भा. किसान कामगार समन्वय समितीच्या वतीने मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. यावेळी भाजप सरकार विरोधात तीव्र निदर्शने करुन घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, भाकपचे राज्य सहसचिव अ‍ॅड.कॉ. सुभाष लांडे, आयटकचे अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर, बहिरनाथ वाकळे, अंबादास दौंड, किसान सभेचे विकास गेरंगे, रामदास वागस्कर, सतीश पवार, सिटूचे कॉ. महेबुब सय्यद, संताराम लोणकर, सतीश भूस, सुभाष कांबळे, सरकारी कर्मचारी संघटनेचे सुभाष तळेकर, रावसाहेब निमसे, फिरोज़ शैख, विलास पेद्राम, पीस फाऊंडेशनचे अर्शद शेख, अब्दुल रहेमान, शिक्षक संघटनेचे भाऊसाहेब थोटे, विडी कामगार युनियनच्या भारती न्यालपेल्ली, रेणुका अंकाराम, संध्या मेढे, नंदू डहाणे, सुभाष कांबळे, अशोक बाबर, अजय दिघे, विजय केदारे, संतोष गायकवाड, दत्ताभाऊ वडवणीकर आदि सहभागी झाले होते.

अ‍ॅड. सुभाष लांडे म्हणाले की, दिल्ली येथे सुरु असलेले आंदोलन हे राजकीय पक्षाचे नसून सर्वसामान्य शेतकर्‍यांचे आहे. हे आंदोलन दडपण्यासाठी दलालांचे भाजप सरकार चुकीचे आरोप करुन शेतकर्‍यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे. आंदोलनात फुट पाडण्याचा सरकारचा प्रयत्न फसला असून, हे काळे कायदे मागे घेण्यासाठी देशातील शेतकर्‍यांच्या भावना तीव्र आहेत. केंद्रात असलेले भांडवलशाही पुरस्कृत सरकार सर्वसामान्य कामगार व शेतकर्‍यांना देशोधडीस लावत असल्याचा आरोप त्यांनी केला. अविनाश घुले यांनी केंद्र सरकारने मंजूर केलेले कायद्याच्या तरतुदी अत्यंत घातक आहे. यामुळे शेतकरी, हमाल, मापाडी देशोधडीला लागणार आहे. मार्केट कमिटी बरखास्त करण्याची यामध्ये असलेली तरतुदीमुळे हमाल, मापाडी उघड्यावर येणार आहे. कोणताही विचार न करता हुकुमशाही पध्दतीने हे कायदे शेतकर्‍यांवर लादण्यात आले आहे. कोणत्याही पक्ष अथवा शेतकरी संघटनेची मागणी नसताना हे चुकीचे कायदे माथी मारण्याचे काम सरकार करीत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच इतर प्रमुख पदाधिकार्‍यांनी आपल्या भाषणात भाजप सरकारवर निशाना साधून, केंद्रातील भाजप सरकार मोजक्या भांडवलदारांच्या हितासाठी चुकीचे निर्णय घेत असल्याचा आरोप केला.       

या देशव्यापी बंद मध्ये संघटनेशी संलग्न युनियन, शेतकरी, कामगार, सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर, अंगणवाडी सेविका, मनपा कर्मचारी, आशा-गटप्रवर्तक, विडी कामगार, पतसंस्था कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, बाजार समिती, हमाल-मापाडी संघटना सहभागी झाले होते. 

वाचा - 

लव जिहाद पर उच्च न्यायालय का निर्णय -love jihad..

डॉ बाबासाहेब आंबेडकर - मुजफ्फर सय्यद....

बाबरी मस्जिद शहादत- Babri masjid by Firoz Shaikh...

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या