Showing posts with label MIM. Show all posts
Showing posts with label MIM. Show all posts

उत्तर प्रदेशात आजही गुंडा राज ? डॉ परवेज अशरफी





उत्तर प्रदेशात आजही गुंडा राज ? डॉ परवेज अशरफी


अहमदनगर- उत्तर प्रदेशात निवडणुकीचा रणसंग्राम चालू असून सर्व पक्षांनी आपले उमेदवार मैदानात उतरविले आहे. त्यात हैदराबाद येथून महाराष्ट्र, बिहार चा प्रवास करत उत्तर प्रदेशात आपले पक्षाला बळकट करण्यासाठी आलेले एम आय एम ही आपली पूर्ण ताकत लावत आहे. भागीदारी परिवर्तन मोर्चाचे माद्य्यमातून उत्तर प्रदेशची जनतेला तिसरा परयाय देयासाठी एक प्रयत्न करण्यात आले आहे. मेरठ येथे आपले पक्षाचे उमेदवाराचा प्रचार करून खासदार ओवेसी आपल्या काफिल्या सोबत दिल्लीला रवाना झाले. मेरठ दिल्ली टोल नाक्यावर काही समाजकंटकने खासदार ओवेसी यांच्यावर गोळ्या झाळून हल्ला केला. त्यात ओवेसी आणी त्यांचे सहकारी बचावले. याचा निषेध पूर्ण देशात व्यक्त करण्यात येत आहे. अहमदनगर मध्ये ही एम आय एम जिल्हाध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांच्या नेतृत्वाखाली निषेध नोंदवण्यात आले.यावेळी डॉ परवेज अशरफी यांनी सांगितले की खा.ओवेसी यांच्यावर झालेला हल्ला हा खूप निंदनिय आहे. उत्तर प्रदेशात जर पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष व ४ वेळेचे खासदार सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचा काय?. या घटनेमुळे योगी सरकार जे आपले भाषणात गुंडा राज संपल्याचा दावा करत आहे ते खोटे असल्याचे दिसते. असद साहेबांची लोकप्रियता पाहून विरोधी पक्षाच्या नेतेंना आपल्या पाया खलीची जमीन सरकल्याचे दिसते. ज्या उत्तर प्रदेश मद्य्ये देशाचे गृह मंत्री आपल्या भाषणात सांगतात की बाहुबली संपले, त्याच प्रदेशात हल्ले होतात.

सरकार कडे खासदार ओवेसी आणि खासदार इम्तियाज जलील यांना हल्ले मागचा मास्टरमाईंड शोधून काढण्याची विनंती केली आहे. यावेळी एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी, जिल्हा महासचिव हाजी जावेद शेख, जिल्हा उपाध्यक्ष मुफ्ती अल्ताफ, शहर अध्यक्ष सरफराज जहागीरदार,कार्याध्यक्ष मतीन शेख, महासचिव फिरोज शेख, शहर युवा अध्यक्ष अमीर खान, महासचिव इम्रान शेख, विध्यार्थी शहर अध्यक्ष सनाउल्लाह तांबटकर, डॉ सादीक, शाह फैसल, हाफिज उमेर, आयनुल शेख, फहीम शेख, तौसीफ इनामदार, बशीर शेख, आदी. उपस्तीत होते.



मुस्लिम स्वतंत्र सेनानींचा महाविकास आघाडी सरकारला इतका द्वेष का ? डॉ परवेज अशरफी

 

मुस्लिम स्वतंत्र सेनानींचा महाविकास आघाडी सरकारला इतका द्वेष का ? डॉ परवेज अशरफी

महविकास आघाडी सरकार आल्या नंतर प्रश्सन तर्फे राष्ट्रिय महापुरुष, थोर व्यक्ती, राष्ट्रीय दिन संदर्भात एक परिपत्रक निघतो त्यात भारत देशाला स्वतंत्र मिळवण्यासाठी व स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलना अबुल कलाम आझाद यांचे नाव सरकारने वगळे आहे. मागील तीन वर्षांपासून विविध संघटना सरकारला निवेदन देऊन या विषया कडे लक्ष केंद्रित करत आहे. परंतु दर वर्षी सरकार दुर्लक्ष करून परिपत्रकात स्वतंत्र सैनिक मौलाना अबुल कलाम आझाद यांचा नाव वगळत आहे. मौलाना यांचा नाव थोर पुरुषांच्या यादीतून जाणून बुजून वगळण्यात आले असल्याचे किंवा मुस्लीम स्वतंत्र सेनानी यांची जनतेला माहिती न व्हावी या हेतूने षडयंत्र केले असल्याचे आरोप एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी महाविकास आघाडी सरकारवर केले. 


एम आय एम तर्फे निवेदनाचे पत्र मा. मुख्य मंत्री यांना मेल व अहमदनगर जिल्हा अधिकारी यांच्या माद्यमातून दिले. निवेदनात पुढे लिहिले आहे की भारताच्या स्वतंत्रता साठी अनेक थोर पुरुषांनी आपले योगदान दिले आहे त्यात मुस्लीम समाज ही त्यांच्या खांदे ला खांदा लाऊन लढत होता. राजधानी दिल्ली येते गेले तर आपणास इंडिया गेट येथे ९२ हजार स्वतंत्र सेनानी यांचे नाव कोरलेले दिसेल त्यात ६२ हजार नावे फक्त मुस्लीम स्वतंत्र सेनानी यांचे आहे. मुस्लिम समाज हा भारताचा एक अंग आहे कोणी कितीही प्रयत्न केले तरी मुस्लिमांना बाजूला करने आणि मुस्लीम समाजाचे योगदानाला दुर्लक्ष करणे शक्य होणार नाही. एम आय एम तर्फे मा. जिल्हा अधिकारी साहेब मार्फत महाराष्ट्राचे मुख्य मंत्री यांना विनंती करण्यात आली की त्यांनी परिपत्रकात बदल करून भारताचे पाहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचे नाव समाविष्ट करावे आणी जर हे शक्य नसेल किंवा मौलाना अबुल कलाम आझाद यांना थोर पुरुष,स्वतंत्र सेनानी महाविकास आघाडी मानत नसेल तर तसे खुलेआम जाहीर करावे.निवेदनात एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी,जावेद शेख जिल्हा महासचिव, मुफ्ती अल्ताफ जिल्हा उप-अध्यक्ष, तौसीफ मणियार शिर्डी लोकसभा अध्यक्ष, शह्नावज तांबोळी - विध्यार्थी जिल्हा अध्यक्ष, अमीर खान - शहर युवा अध्यक्ष, इम्रान शेख - युवा शहर उपाध्यक्ष, बशीर शेख प्रवक्ता सनाउल्लाह तांबटकर - विद्यार्थी शहर अध्यक्ष आदींचे सह्या आहेत.

लसीकरण च्या नावाखाली सामान्य जनतेची पिळवणूक - डॉ परवेज अशरफी

 

लसीकरण च्या नावाखाली सामान्य जनतेची पिळवणूक - डॉ परवेज अशरफी


अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यात व शहरात मा. जिल्हाधिकारी यांच्या इख्त्यारीत असलेल्या कार्यालया मार्फत असे तोंडी आदेश काढण्यात आले आहे की ज्या व्यक्तीने कोविड लस घेतली नाही त्या व्यक्तीला पगार मिळणार नाही, त्यंना सरकारी सुविधाचा लाभ घेता येणार नाही, त्याच बरोबर पेट्रोल पण मिळणार नाही. याचाच अर्थ सामान्य जनतेला लस घेण्यासाठी मजबूर किंवा सक्ती करण्याचा षड्यंत्र काही कार्यालय करीत असल्याचे दिसून आले. केंद्र सरकारच्या माद्यमातून आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालय, दिल्ली यांनी माहितीच्या अधिकारात अशी माहिती दिली आहे की कोविड लस घेणे अनिवार्य नसून सावैच्छिक आहे. जनसूचना अधिकारी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भोपाळ यांनी RT-PCR TEST स्वैच्छिक असल्याची माहिती दिली आहे.

त्याच बरोबर मेघालय उच्च न्यायालय, शिलोंग, गुव्हाटी उच्च न्यायालय, गुजरात उच्च न्यायालय ,मणिपूर उच्च न्यायालय,,इम्फाल यांनी लसीकरण साठी असे कोणतेही आदेश देण्यास मनाई केली आहे. ज्यामुळे सामान्य जनतेचे भारतीय संविधानाने दिलेल्या मौलिक अधिकारचे हणन होईल. लसीकरण न केलेल्या व्यक्तींना त्यांच्या मुल सुविधा पासून वंचित ठेवणारे आदेश म्हणजे भारतीय संविधान आर्टिकल १४,१९,२१ चे हणन करणे. भारतातील प्रत्यक नागरिकाला वैधकीय उपचार निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे. असे निवेदनाचे पत्र एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी साहेब यांना दिले. असंवैधानिक आदेश देणार्यावर कारवाही करण्याची विनंती करण्यात आली 

 

आरक्षण मुस्लिमांचा अधीकार - खा. इम्तियाज जलील



आरक्षण मुस्लिमांचा अधीकार - खा. इम्तियाज जलील

२०१४ साली महाराष्ट्रातील काँग्रेस - राष्ट्रवादी सरकार ने मुस्लिमांना ५ % आरक्षण देण्याची घोषणा केली परंतु आज पर्यंत मुस्लिम आरक्षण देण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आले नाही. जेव्हा निवडणुका येत्या तेव्हा मुस्लिमांना आरक्षणाचे गाजर दाखून मत घेण्यात आले परंतु आज पर्यंत मुस्लीम आरक्षण बाबत ब्र शब्द काडण्यात कोणीही तयार नाही. मुस्लीम आरक्षण हा तर मुस्लिमांचा अधीकार असुन ते मुस्लिमांना मिळालाच पाहिजे अशे वक्तव्य एम आय एम प्रदेश अध्यक्ष तथा औरंगाबाद चे खासदार इम्तियाज जलील यांनी अहमदनगर एम आय एम टीम शी चर्चा करतांना सांगितले. २७ नोव्हेंबर रोजी मुस्लीम आरक्षण साठी पूर्ण महाराष्ट्रातून तिरंगा रॅली मुंबई पर्यंत काढण्यात येणार असून सर्वांनी ही लढाई आपली समजून तिरंगा रॅलीत शामील होण्याचे आव्हान खा. इम्तियाज जलील यांनी केले. अहमदनगर जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी आश्वासन दिले की  मुस्लीम आरक्षण साठी पूर्ण अहमदनगर जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून तिरंगा रॅलीत शामिल होणार आहे त्यासाठी आम्ही पूर्ण जिल्ह्यात जागो जागी बैठक घेत आहे व नागरिकांना मुस्लीम आरक्षणाची गरज आणि फायदे समजून सांगत आहे. खा. इम्तियाज जलील यानी पक्षाचे काम जोमाने चालू ठेवा व काही अडचण आल्यास संपर्क साधण्याचे सांगितले. यावेळी अहमदनगर एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी, जिल्हा महासचिव हाजी जावेद शेख, शिर्डी लोकसभा अध्यक्ष तोसिफ मनियार, औरंगाबाद युवा जिल्हा अध्यक्ष मुंशी पटेल, नगरसेवक कलीम बागवान, जिल्हा सह- सचिव फय्याज कुरेशी, शेवगाव तालुका अध्यक्ष युसुफ शेख, कोपरगाव तालुका अध्यक्ष जावेद पटेल, जामखेड तालुका अध्यक्ष जाकिर काजी, श्रीरामपुर तालुका अध्यक्ष शकील शेख, कर्जत तालुका अध्यक्ष डॉ अन्सार शेख, अजीज व्होरा,उबैद बागवान, राहुरी तालुका अध्यक्ष नविद बागवान, रहाता तालुकाध्यक्ष समीर बेग, श्रीरामपुर शहर अध्यक्ष शहाबाज शेख, संगमनेर शहर अध्यक्ष दानिश मिर्जा, आदी उपस्थित होते.



एम आय एम शेवगाव शहर अध्यक्ष पदी कलीम पठाण तर तालुका महासचिव पदी अन्वर शेख यांची निवड

 


एम आय एम ज्या प्रकारे बॅरिस्टर खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण देशात स्वतःचा अस्तित्व निर्माण करीत आहेत त्याच प्रकारे महाराष्ट्रातही महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील व प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी यांच्या नेतृत्वात पूर्ण महाराष्ट्रात पक्ष मजबूत होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातही एम आय एम पक्ष प्रत्येक तालुक्यात कार्यरत आहे. पक्ष मजबूत करण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशाने काही फेर बदल करण्यात येणार असून एम आय एम शेवगाव तालुका महासचिव पद अन्वर शेख यांना तर शेवगाव शहर अध्यक्ष पद कलीम पठाण यांना देण्याचा निर्णय घेण्यात आले. नियुक्ती पत्र औरंगाबादचे एम आय एमचे नगरसेवक हाजी इसाक खान साहेब यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी हाजी इसाक खान यांनी नव निर्वाचित पदाधिकारी यांचे अभिनंदन करून पक्ष मजबूत करण्यासाठी आहोरत्र मेहनत करण्याचे सांगितले. काम करत असताना अनेक अडचणी येत असतात त्यामुळे पक्षाचे काम करायचे नाही असे होत नाही. एम आय एम जिल्हा अध्यक्ष यांनी अभिनंदन करत सांगितले की महाराष्ट्र सह अहमदनगर मध्येही पक्ष मजबूत होत आहे त्यामुळे विरोधक हैराण झाले आहे. तरुण पिढी पक्षात प्रवेश करीत आहे पक्ष मजबूत होत आहे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकात पक्ष आपले उमिदवार रिंगणात उत्रविनार आहे . यावेळी जिल्हा महासचिव हाजी जावेद शेख व मुफित अल्ताफ यांचेही भाषण झाले. नवनिर्वाचित सदस्यांचा सर्वांनी अभिनंदन केले. व येणाऱ्या काळात शेवगाव तालुक्यात एम आय एम पक्षाचे प्रतिनिधी सर्व जागी दिसतील असे आश्वासन शेवगाव तालुका अध्यक्ष युसुफ शेख यांनी दिले. यावेळी औरंगाबादचे नगरसेवक हाजी इसाक खान साहेब, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी, जिल्हा महासचिव हाजी जावेद शेख, मुफ्ती अल्ताफ अहमदनगरी, शेवगाव तालुका अध्यक्ष युसुफ शेख, शहर युवा अध्यक्ष आमीर खान, शेवगाव तालुका अध्यक्ष अनिस सय्यद, शाहनवाज तांबोळी, मोसीन खान आदी उपस्थिती होते.

इंधनाच्या करात २५ टक्के कपात करा - डॉ परवेज अशरफी

इंधनच्या करात कपात करण्यासाठी एम आय एम ने केली मागणी - डॉ परवेज अशरफी

अहमदनगर - १८.०६.२०२१

  सध्या जसे जीवन जगण्यासाठी किराणा व भाजीपाला गरजेचे आहे तसेच सध्याच्या काळात पेट्रोल व डीझेल हे सामान्य जनतेचे गरज बनली आहे. पेट्रोल व डीझेल चे भावने सध्या शतक केले असल्याने सामान्य जनतेचे आर्थिक व्यवस्था खूप बिकट झाली आहे. एकी कडे कोरोना महामारी आणी दुसरी कडे इंधन दरवाढ यामुळे प्रत्यक वस्तू महाग झाली आहे. सदर दर वाढी केंद्र व राज्य शासनाने विचारात घेतले तर कमी होऊ शकत. केंद्र व राज्य शासनाने एकमताने ठरवले तर दर एका दिवसात कमी होऊ शकतात. त्याचे मूळ कारण मंजे केंद्र शासन पेट्रोल मागे $ ३३ प्रती लिटर तर डीझेल मागे $ ३२ प्रती लिटर कर आकारते त्याच प्रमाणे राज्य शासन पेट्रोल मागे २२ टक्के तर डीझेल मागे २२ टक्के कर आकारते. केंद्र व राज्य सरकारने जर २५ टक्के करात कपात केले तर सामान्य जनतेला मोटा दिलासा मिळेल असे निवेदनाचे पत्र एम आय एम प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील साहेब व प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी साहेब यांच्या आदेशाने पूर्ण महाराष्ट्रात स्थानिक अधिकारी मार्फत मा. केंद्रीय सचीव , पेट्रोलियम विभाग, न्यू दिल्ली व मा. सचिव, विक्रीकर विभाग, महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र यांना देण्यात आले. अहमदनगर मध्ये एम आय एम तर्फे जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा अधिकारी, अहमदनगर यांना निवेदन देण्यात आले यावेळी डॉ परवेज अशरफी यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की सध्या सामान्य जनतेची आर्थिक परीस्तीती खूप खालावली आहे. कोरोना महामारी चालू असतांना केंद्र सरकार ने पेट्रोल व डीझेल दर वाढीचे निर्णय घेऊन सामान्य जनतेला आर्थिक संकटात टाकले आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारने एकमताने निर्णय घेतले व पेट्रोल व डीझेल चे कर २५ टक्केने कमी केले तर सामान्य जनतेला थोडातरी दिलासा मिळेल. आम्ही अशे पत्र आमच्या प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील साहेब व प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी साहेब यांच्या आदेशाने पूर्ण महाराष्ट्रात देत आहे. यावेळी एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी, जिल्हा महासचिव हाजी जावेद, मुफ्ती अल्ताफ अहमदनगरी, नगरसेवक आसिफ सुलतान,विध्यार्थी जिल्हा अध्यक्ष शहनवाज तांबोळी, युवा शहर अध्यक्ष अमीर खान,मोहम्मद शेख,शौकत पिंजारी,तौसीफ इनामदार, इम्ररा शेख, ऑलऑल इंडिया युथ फेडरेशन शहर अध्यक्ष फिरोज शेख, आरिफ सय्यद,समीर बेग आदीं उपस्थित होते.

तर हे सरकार इतरांना काय न्याय देणार - डॉ. परवेज अशरफी AIMIM MAHARASHTRA

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

 तर हे सरकार इतरांना काय न्याय देणार - डॉ. परवेज अशरफी





     जे सरकार आपल्या सहकारी पक्षातील प्रदेश उपाध्यक्ष हाजी इर्शादभाई यांना अद्याप न्याय देऊ शकले नाही ते सरकार सर्वसामान्य जनतेस काय न्याय देणार? अशी टिका व प्रश्न एमआयएम पक्षाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष डॉ. परवेज अशरफी यांनी केला आहे. 

        नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राजुरी ता. जुन्नर येथील एका वक़्फ़ नोंदणीकृत धार्मिक ट्रस्ट ने बेकायदेशीरपणे सदर निवडणुकीसाठी संस्थेच्या अध्यक्षा नावे उमेदवारी अर्ज मागवून घेऊन संस्थेची उमेदवार निवड समिती स्थापन करुन सदर समितीस उमेदवार निवडण्याचे व बाद करण्याचे असंविधानीक अधिकार देण्यात आले. जर इच्छुकांनी समितीचा निर्णय डावलुन लोकशाही पद्धतीने निवडणूक अधिकार्याकडे अर्ज दाखल केला तर त्याचेवर जमाती मार्फत कारवाई करण्याची धमकी देण्यात आली. सदर प्रकरण लिखित स्वरूपात उपलब्ध असूनही राज्य सरकार मतांचे राजकारण करून संविधान व लोकशाही विरोधी कृत्य करणाऱ्या, संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे हनन करणाऱ्या व जात पंचायत अनुकूल धमकी देऊन संविधान व लोकशाहीस आव्हान देणाऱ्या व्यक्तींविरोधात चौकशी करून त्यांचेवर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष हाजी इर्शादभाई यांनाच जर महा विकास आघाडी सरकार न्याय देऊ शकत नसेल तर सर्व सामान्य जनतेचे काय? अशी प्रखर टिका डॉ. परवेज अशरफी यांनी केली आहे. 

        सदर प्रकरण हे संविधान विरोधी व लोकशाही साठी घातक असून मानवाधिकारांचे हनन करणारे आहे. अधिकारांचा दुरोपयोग करून संबधित कार्यकारी मंडळाने जात पंचायत अनुकूल परिस्थिति निर्माण केल्याचे सिद्ध होते. सदर व्यक्तीं विरोधात सरकार ने लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी डॉ. परवेज अशरफी यांनी केली आहे.




वाचा - 




एम आय एम ची अहमदनगर जिल्ह्यात शानदार एंट्री - AIMIM AHMEDNAGAR MAHARASHTRA

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

एम आय एम ची अहमदनगर जिल्ह्यात शानदार एंट्री


अहमदनगर - 


पुर्ण महाराष्ट्रात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत सर्वच पक्षांनी आपले उमिदवार रिंगणात उतरवले होते. काँग्रेस राष्ट्रवादी सेना भाजप बरोबर प्रदेशातील अनेक राजकीय पक्षांनी उमेदवार दिले होते. एम आय एम ने महाराष्ट्रात आपला पक्ष मजबूत करण्यासाठी सर्व निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याने ग्रामपंचायत निवडणूकित ही एन्ट्री केली. एम आय एम पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांच्या तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील व प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असून. अहमदनगर जिल्ह्याची कमान डॉ परवेज अशरफी यांच्या हातात आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एम आय एम ने आपले ६ उमेदवार दिले होते त्यापैकी ४ उमेदवारांनी विजय नोंदविला आहे. शेवगाव व श्रीरामपूर तालुक्यात एम आय एम ने आपले उमेदवार उतरविले होते. शेवगाव तालुक्यात ५ तर श्रीरामपूर तालुक्यात १ उमेदवार देऊन एम आय एम आपली सुरुवात केली होती. त्या पैकी ३ शेवगाव मधून तर १ श्रीरामपुर तालुक्यातून निवडून आल्याने एम आय एम ने अहमदनगर जिल्ह्यात शानदार एंट्री केली असल्याचे दिसते. निवडून आलेल्या उमेदवारांना एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी अभिनंदन केले व शेवगाव तालुका अध्यक्ष युसुफ शेख आणि श्रीरामपुर तालुका अध्यक्ष शकील शेख यांचा ही अभिनंदन केले. 

ज्या प्रकारे पूर्ण देशात एम आय एम ला चांगला प्रतिसाद मिळत आहे त्याच प्रकारे ग्राम पंचायत निवडणूक पहाता एम आय एम आता गावा गावात पोहोचत असल्याचे दिसते.

निवडून आल्या नंतर एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेब, प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील साहेब, प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफ्फर कादरी साहेब यांना देताच सर्वांनी एम आय एम अहमदनगर टीमचा अभिनंदन केले.

येणाऱ्या काळात एम आय एम अहमदनगर जिल्ह्यातील होणाऱ्या नगर परिषद, नगर पालिका, जिल्हा परिषद निवडणुकी कडे आपला लक्ष केंद्रित करणार असल्याचे एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी एका पत्रकारांशी बोलतांना सांगितले.




वाचा -

ती दिवस- रात्र रस्त्यावर फिरत होती - Manavseva Project...

शिष्यवृत्ती आणि विद्यार्थी - अहमद मुंडे...

संविधान व लोकशाही विरोधी कृत्य सहन करणार नाही - हाजी इर्शादभाई , Pune...

चुकीची माहिती देऊ नका - खासदार इम्तियाज जलील AIMIM MP IMTIYAZ JALIL....

अखिलेश यादव यांच्यावर ओवैसी यांची टीका, म्हणाले- त्यांची भिती हाच आमचा विजय AIMIM-SP

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357d

अखिलेश यादव यांच्यावर ओवैसी यांची टीका, म्हणाले- त्यांची भिती हाच आमचा विजय



लखनऊ: बिहारमध्ये विधानसभेच्या पाच जागा जिंकल्यानंतर आत्मविश्वास वाढलेल्या असदुद्दीन ओवैसी यांनी आता आपलं लक्ष उत्तर प्रदेशवर केंद्रीत केलंय. समाजवादी पक्षाचा गड मानल्या जाणाऱ्या आजमगडचा त्यांनी दौरा केला. या दरम्यान त्यांनी अखिलेश यादव यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, "कुणी काहीही म्हणो, आम्ही या ठिकाणी पूर्ण ताकदीने लढणार आहे. आम्हाला भाजपची बी टीम म्हणणारे घाबरले आहेत. त्यांना वाटणारी भिती हाच आमचा विजय आहे." आजमगड हा समाजवादी पक्षाचा गड मानला जातोय. या ठिकाणाहून समाजवादी पक्षाचे मुलायमसिंह यादव लोकसभेवर निवडून गेले होते. आजमगडमध्ये मुस्लिमांची संख्या मोठी असून या ठिकाणच्या मुस्लिम मतांच्या दिशेवरुनच पूर्व उत्तर प्रदेशातील मुस्लिम मतांची दिशा ठरते असं म्हटलं जातं.

अखिलेश यादव यांच्यावर ओवैसी यांची टीका, म्हणाले- त्यांची भिती हाच आमचा विजय

बिहार निवडणुकीनंतर एआयएमआयएम,असदुद्दीन ओवैसी यांनी आपला मोर्चा आता उत्तर प्रदेशकडे वळवला असून ते राज्यातील महत्वाच्या मुस्लिम नेत्यांच्या भेटी घेत आहेत. समाजवादी पक्षाने  त्यांच्यावर भाजपची 'बी टीम' म्हणत टीका केलीय.

अखिलेश यादव यांच्यावर ओवैसी यांची टीका, म्हणाले- त्यांची भिती हाच आमचा विजय


लखनऊ: बिहारमध्ये विधानसभेच्या पाच जागा जिंकल्यानंतर आत्मविश्वास वाढलेल्या असदुद्दीन ओवैसी यांनी आता आपलं लक्ष उत्तर प्रदेशवर केंद्रीत केलंय. समाजवादी पक्षाचा गड मानल्या जाणाऱ्या आजमगडचा त्यांनी दौरा केला. या दरम्यान त्यांनी अखिलेश यादव यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, "कुणी काहीही म्हणो, आम्ही या ठिकाणी पूर्ण ताकदीने लढणार आहे. आम्हाला भाजपची बी टीम म्हणणारे घाबरले आहेत. त्यांना वाटणारी भिती हाच आमचा विजय आहे." आजमगड हा समाजवादी पक्षाचा गड मानला जातोय. या ठिकाणाहून समाजवादी पक्षाचे मुलायमसिंह यादव लोकसभेवर निवडून गेले होते. आजमगडमध्ये मुस्लिमांची संख्या मोठी असून या ठिकाणच्या मुस्लिम मतांच्या दिशेवरुनच पूर्व उत्तर प्रदेशातील मुस्लिम मतांची दिशा ठरते असं म्हटलं जातं.

असदुद्दीन ओवैसी हे केवळ आठच तास या भागाच्या दौऱ्यावर होते. पण त्यांच्या या दौऱ्याने उत्तर प्रदेशचे राजकारण तापलं आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका लक्षात घेता या भागातल्या मुस्लिम मतांवर औवेसींची नजर आहे. या ठिकाणी औवेसींनी कोणतेही भाषण दिलं नाही पण त्यांना जो राजकीय संदेश द्यायचा होता तो त्यांनी दिल्याचं सांगण्यात येतंय.

उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक पुढच्या वर्षी होणार आहे. एकूण 403 सदस्यांची संख्या असणाऱ्या विधानसभेत भाजपचे बहूमत आहे. योगी आदित्यनाथ यांचे नेतृत्व हे आक्रमक हिंदुत्ववादी स्वरुपाचे आहे. त्यामुळे मुस्लिम मतांचे ध्रृवीकरण करण्यावर औवेसी यांचा भर असल्याचं सांगण्यात येतंय.

पूर्व उत्तर प्रदेशातील अनेक मतदारसंघात मुस्लिम मतांची संख्या ही 20 ते 40 टक्के इतकी आहे. आतापर्यंत ही मते समाजवादी पक्षाच्या पारड्यात पडायची. आता या मतांवर असदुद्दीन ओवैसी यांची नजर आहे. त्यामुळे या परिसरावर औवेसी यांनी लक्ष केंद्रीत केल्याचं सांगण्यात येतंय.

बिहारप्रमाणे उत्तर प्रदेशातही ओवैसी यांनी लहान पक्षांचा गट बनवला असून त्याचे नाव आहे संकल्प मोर्चा. यात ओम प्रकाश राजभर, बाबू सिंह कुशवाह आणि भीम आर्मीचे चंद्रशेखर या नेत्यांचा समावेश आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील 100 विधानसभा मतदारसंघ असे आहेत की ज्यामध्ये मुस्लिम मते निर्णायक ठरतात. समाजवादी, बसप आणि कॉंग्रेसला आतापर्यंत मिळत असलेली ही मते आता एमआयएमच्या पारड्यात पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाने उत्तर प्रदेशातील मुस्लिम मतांवर लक्ष केंद्रीत केल्यानंतर समाजवादी पक्षाने त्यांच्यावर नेहमीप्रमाणे भाजपची 'बी टीम' म्हणून टीका केली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना असदुद्दीन ओवैसीनी सांगितलं की टीका करणाऱ्यांना वाटत असलेली भिती हाच आमचा विजय आहे.




वाचा -



अन्यथा शोले स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा - आसिफ सुलतान Ahmednagar

मुकुंदनगरच्या प्रभाग 3 मधील नागरी समस्या सोडविण्याची मागणी

नगरसेवक आसिफ सुलतान यांचे सर्वसाधारण सभेत महापौर व आयुक्तांना निवेदन


अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील प्रभाग क्रमांक 3 मधील नागरी समस्यांबाबत नगरसेवक आसिफ सुलतान यांनी सर्वसाधारण सभेत महापौर व आयुक्तांना निवेदन दिले. प्रभाग 3 मध्ये 35 ते 40 हजार लोकसंख्या असून, येथे पाणीपुरवठा, घनकचरा, ड्रेनेजलाईन व गटार, इलेक्ट्रिकल, बांधकाम आदी प्रलंबीत प्रश्‍नामुळे नागरी सुविधेचा बोजवारा उडाला असून, सदर प्रश्‍न तातडीने सोडविण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

प्रभाग 3 मध्ये पाण्याची गंभीर समस्या आहे. या भागात एक दिवसाआड पाणी सोडले जाते, तर काही ठिकाणी सदर भागात अनियमित दोन ते चार दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. वितरण व्यवस्थेतील दोष व कर्मचार्‍यांची कमतरता या कारणांनी पाणीपुरवठा नागरिकांना सुरळीत होत नाही. लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. फेज टू चे पाईपलाइनचे काम 90 टक्के पुर्ण झाले आहे. उर्वरीत काम पुर्ण करुन नागरिकांना फेज टू च्या लाईन मधून नळ कनेक्शन देऊन पाणी पुरवठा व्हावा. या भागात पाणीपुरवठा करणार्‍या टाकीची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करून त्यामधून पाण्याचे वाटप करण्यात यावे.

स्वच्छता कर्मचार्‍यांची संख्या कमी असल्याने सदर प्रभाता पुरेशी स्वच्छता होत नाही. परिणामी या भागात अस्वच्छता पसरुन कचर्‍याचे ढीग साचत आहे. या परिसरात मोकाट कुत्र्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असून, या भागातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा, स्वच्छतेसाठी कर्मचार्‍यांची संख्या वाढवावी, नागरिकांना कचरा डबे महापालिकेतर्फे पुरविण्यात यावे व साचलेला कचरा उचलण्यासाठी लहान कचरा गाड्या उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे. या भागात अनेक ठिकाणी ड्रेनेजलाईन तुंबून घाण पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ड्रेनेजलाईनचे फुटलेले पाईप दुरुस्त करुन त्याची दुरुस्ती व्हावी. तसेच पथदिवे बंद असल्याने परिसरात अंधकार पसरला आहे. रात्री लहान मोठे अपघात घडत आहे. तर शहरात चोर्‍याचे प्रमाण वाढत असताना पथदिवे दुरुस्त करण्यात यावे. अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाली असून, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खराब रस्त्याची देखील तातडीने दुरुस्ती व्हावी, उद्यान विकासासाठी सुचवलेल्या कामाचे प्रस्ताव मंजूर करण्यात यावे, मुकुंदनगरसाठी शासनाकडून भुयारी गटार योजना मंजूर असून त्याचे काम सुरु करावे, सदर प्रश्‍न सोडविण्यासाठी चार दिवसात आढावा बैठक घेण्याची मागणी करण्यात आली आहे. सदर मागणी मान्य न झाल्यास येत्या पंधरा दिवसात शोले स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक आसिफ सुलतान यांनी दिला आहे. 

वाचा - 

लव जिहाद पर उच्च न्यायालय का निर्णय -love jihad...

एम आय एम बेलापूर अध्यक्षपदी मोसिन शेख - Shrirampur...

एम आय एम सिरसगाव अध्यक्षपदी बरकत पठाण - MIM Shrirampur -Ahmednagar...

मुकुंदनगर पाण्याची टाकीचे काय? - डॉ परवेज अशरफी - Ahmednagar Corporation...


सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या