शिक्षण धनिकांचे गुलाम आहे?

 


शिक्षण धनिकांचे गुलाम आहे?

      . 2020 रोजी कोरोना सारखे महामारी भयंकर संकटाने सर्वत्र थैमान घातले. गाडीला घुणा लागावा तसा सर्व मानवी जीवन विस्कळीत झाले. कोरोना सारख्या महाभयंकर महामारी संकटापासून वाचण्यासाठी शासनाने लाॅकडाऊन जारी केला. सर्वसामान्य माणूस. हातावर चे पोट असणारे कामगार. नोकरवर्ग. फळें फुले भाजीपाला विक्री करणारे. बांधकाम कामगार. वडापाव गाडी. चायनिज असे विविध रस्त्यांवर व्यवसाय करणारे टाळेबंदी काळात अडचणीत आले. लहान सहान कंपन्या. लहान उद्योग. मोठ्या कंपन्या. यातील कामगार बेरोजगार होऊन गावाकडे आले गावात सुध्दा त्यांना म्हणावी अशी वागणूक मिळाली नाही. एस टी कामगार. घरकाम करणाऱ्या महिलां. पापड लोणची चटण्या तयार करणारे बचत गट पॅसेंजर वडाप करणारे वाहनं चालक आणि मालक. मालवाहतूक करणारे वाहन चालक व मालक. यांनी बॅंकेकडून कर्ज काढून हप्त्यावर घेतलेली वाहने टाळेबंदी काळात जागयावरच उभी राहिली. एस टी कामगार व यांना सुध्दा टाळेबंदी काळात आपली हक्काची नोकरी सोडून घरांत बसावें लागलें इतर वाहनं व्यवसाय करणारे यांनी मिळेल ते काम केले ज्यांना हे जमलं नाही त्यांनी आपली व आपल्या कुटुंबाची उपासमारीची वेळ बिकट वेळ बघून त्यांना हे सर्व बघावले नाही आणि त्यांनी आत्महत्या सारखें मार्ग निवडले आणि आपलीं जीवन यात्रा संपवली किती वाईट आहे 

              कोरोना काळात वरिल प्रकारा पेक्षा जास्त भयानक प्रकार आणि आपणांस व आपल्या मुलांना अंधारात घालणारा काळ म्हणजे शाळा बंद शिक्षण थांबले. विद्यार्थी यांचें मोठे नुकसान होण्यास सुरुवात झाली. कोरोना पासून भावी पिढी वाचावी यासाठी शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. शासनाने पुन्हा अजून एक निर्णय घेतला तो म्हणजे आॅनलाइन शिक्षण घेण्याचा. मग काय ग्रामीण भागात असणार्या शाळा व विद्यालये विद्यार्थी यांना मोबाईल रेंज चा त्रास सहन करावा लागला. ग्रामीण भागात लाईट अनियमितता आॅनलाइन तास असतील त्यावेळी लाईट असेलच असे नाही. लाईट नाही म्हणजे मोबाईल चार्जिंग नाही. आपलं मुलं शिकाव अशी प्रत्त्येक पालकांची इच्छा असते. ग्रामीण भागात अशी काही कुटुंब आहेत की रोज कामाला गेल्याशिवाय घरात चूल पेटत नाही त्यांच्या मुलांना कुठला अॅनडराॅइड मोबाईल. घरातील मंडळी त्या मुलांची समजूत काढत. पण शिक्षण आॅनलाइन आहे माझा अभ्यास पुढे जाईल या मानसिकतेतून. काही मुलांनी मोबाईल साठी आत्महत्या केल्याचे प्रकार आपण वृतमानपत्रात बघतो वाचतो. काय अपराध केला होता त्या पालकांनी ग्रामीण भागात शहरी भागात शाळा कॉलेज विद्यालये महाविद्यालये उच्च शिक्षण देणारी विद्यापीठ. यात समोर बसून शिक्षण घेणारे विद्यार्थी. यांना काय मोबाईलची गरज कधी पडली नाही. शहरात आज अनेक मुलांच्या कडे मोबाईल आहेत कारणं घरची परिस्थिती चांगली असते आई वडील नोकरीला असतात त्यामुळे त्यांना जास्त त्रासाचा विषय नाही. मोबाईल रिचार्ज वेळेवर मिळतो. ग्रामीण भागातील लोकांची प्रस्थिती बेताची असते त्यामुळे मोबाईल रिचार्ज साठी पैसे सुध्दा नसतात त्यावेळी घरातील बाजार थांबवून मुलांच्या आॅनलाइन शिक्षणासाठी मोबाईल रिचार्ज करणारे पालक मी बघितले आहेत. नेमकं काय आहे षडयंत्र. मोबाईल कंपन्या आणि सरकार यांच काय साटंलोटं आहे का ? कारण सर्व नोंदणी अर्ज. बॅंक खात्यातील व्यवहार. अस सर्व आत्ता आपण न जाता मोबाईल वरून आपण घर बसल्या करु शकतो. म्हणजे सर्व आॅनलाइन मोबाईल शिवाय होणार नाही त्यामुळे मोबाईल कंपन्या बरोबर सरकारने करार केला आहे काय अशी शंका आली आहे 

            आज दिड वर्ष झाले तरीही शिक्षण व्यवस्थेत सुधारणा झाली नाही अजून सुद्धा महिन्याला चारसे पाचसे रुपये मोबाईल रिचार्ज आॅनलाइन शिक्षण घेण्यासाठी आजपर्यंत किती पैसे आपण मोबाईल रिचार्ज चया नावाखाली घालवले असतील. त्यांचा काय हिशोब आहे का? पैसे गेले वाईट वाटत नाही पण शाळेत मिळणारे शिक्षकाने शिकविलेले शिक्षण मुलांना कळत नाही मग मोबाईल वर आॅनलाइन पध्दतीने शिक्षण घेणारी मुलं काय शिकली असतील. ज्यांचे पालक शिक्षित आहे ते आपल्या मुलांचा अभ्यास घेतील पण ज्याचे पालक अडाणी अशिक्षित आहे त्यांना मोबाईल सुध्दा पकडता येत नाही आपला मुलगा मोबाईल वर काय शिकतो काय करतो काय कळणार त्या पालकांना म्हणजे आॅनलाइन पध्दतीने मिळवणारे शिक्षण मोठ्यांच्या मुलांना हुशार करणारं आणि गोरगरीब मुलांना अडाणी ठेवणारं काय असा मोठा प्रश्न पालकांच्या पुढं उभा आहे. 

          शासनाला जाग आली आणि शासनाने एक दिवस निर्णय जाहीर केला ८/१० /१२ ह्या सुरू करण्याचा मुलांना पालकांना आनंद झाला. एवढ्या दिवसांच्या प्रतिक्षे नंतर आपण शाळेत जाणार जुणे मित्र मैत्रिणी भेटणार. शाळेत खेळायला मिळणार. आॅनलाइन शिक्षण घेताना होणारें जागरण त्यामुळे लवकर उठण्याची बिघडलेली वेळ पुन्हा मूळ पदावर येणार. शारीरिक हालचाल. शारीरिक व्यायाम. शारीरिक बौद्धिक मानसिक तयारी ही फक्त शाळेतच होते मुलांचे एकामेकासोबत मनमोकळेपणाने बोलने. मुलांचं काही बौद्धिक खेळ मेंदूला आणि शरिराला झटकून जाग करणारं असतं मुल दिड वर्ष रोज मोबाईल समोर बसून मानसिक कमकुवत झाली आहेत. शाळा सुरू करताना शाळेची स्वच्छता निर्जंतुकीकरण करून घ्यावे मुलांना रोगांपासून संरक्षणासाठी पाठ देणे गरजेचे आहे. ज्या मुलांचे कोरोना काळात घरातील कोणताही व्यक्ति दगावणे असे काही नुकसान झाले असेल तर त्याबद्दल त्यांना सारखी आठवण करून तुमचे पालक पाव्हणं कोरोनाने मृत्यू पावले आहेत हे. काहीजण स्थलांतरित परस्थिती मुळे झाले आहेत. बोलू नये त्यामुळे त्या मुलांना मानसिक ताण त्रास होईल असे कोणतेही कृत्य करु नये तशी सक्त ताकीद देण्यात यावी 

              शाळा सुरू होण्याचा आपणांस पालक शिक्षक यांना व विद्यार्थी यांना आनंद झाला आहे. परंतु चालू झालेल्या शाळा तशाच चालू राहवया यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयतण करणे गरजेचे आहे. आणि हे काम शाळा शिक्षक करतील पण तेवढ्याने भागणार नाही. मुलांची वाहतूक व्यवस्था. यांनी सुध्दा काळजी घेणे गरजेचे आहे. पालकांनी मुलांना शाळेत सोडणयास यावे. कारणं दिड वर्षांनंतर चालू होणारी शाळा मुलांना आवडलं का नाही त्यामुळे आपण मुलांना शाळेत सोडणे याची जबाबदारी घेणे गरजेचे आहे   

      शासनाने परवा २०२१ ला एक शासन निर्णय जारी केला आहे त्यानुसार शालेय मुलांची फी साठी अडवणूक करु नका असे स्पष्ट निर्देश दिले आहेत पण त्यात सक्ती करु नका असाही आदेश दिला आहे. म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की फी माफ केली जाणार आहे. आम्ही इस्लामपूर पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी यांचीशी चर्चा केली असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जर शाळांनी फी माफ केली तर त्या शाळेत शिकवण्याचे काम करणारे शिक्षक यांचा पगार कसा भागणार ? मग जिल्हा परिषद पंचायत समिती यांचे निर्देश नुसार चालणार्या १/८ पर्यंत शाळा यामधील शिक्षक कायमस्वरूपी नोकरिवर आहेत त्यांचा पगार शासन देतय ना ? मग फी माफ केली तर बिघडत नाही 

          याउलट उच्च शिक्षण देणारी विद्यापीठ काॅलेज महाविद्यालय विद्यालय. यातील परिक्षा काळ जवळ येण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे या सर्व शालेय खाजगी सरकारी शालेय संस्थांनी. लाईट बील. घरफाळा पानपट्टी यांवर जसे इतर कर लावलें जातात तसा प्रकार चालू केला आहे. म्हणजे परिक्षा फी. कमी आणि लॅबररी कर. इंटरनेट कर फाॅरम भरण्याची फि काॅलेज मध्ये लागणारी सर्व स्टेशनरी बाहेरुन आणावी लागते. एवढेच काय पण रिझल्ट सुध्दा बाहेर नेट कॅफे मधून काढावा लागतो. अशा एक नाही अनेक मार्गाने विद्यार्थी आणि पालक यांना लुटायच चालू आहे. आत्ता सर्व पालक यांनी एकत्र येऊन या लुटीबाबत आवाज उठवण्याची गरज आहे. विद्यार्थी यांनी आपणं भरत असलेल्या कोणत्याही फी बाबत पावती घ्यावी. 

          मुल शाळेत जातात त्यांच्याबरोबर घरात रानात. नोकरिवर असणारे आपले पालक यांची स्वप्ने घेऊन आपण शाळेत जात असतो पण आज शिक्षण फक्त पैसा असणारे विद्यार्थी यांचेच आहे कारणं आपले पालक गरिब असल्यामुळे फी भरु शकत नाहीत त्यातच स्पर्धा परीक्षा वर्गाच्या व परिक्षा पूर्व शिक्षण या नावाखाली अनेक ठिकाणी अॅकेडमी यांचें प्रत्त्येक गावात पेव फुटले आहे त्यांनी २०२० मध्ये जानेवारी महिन्यात फी भरून घेतलीं आणि मार्च महिन्यापासून टाळेबंदी जारी झाली आणि सर्व अॅकेडमी बंद पडल्या. मात्र एकाही मुलांची फी मागे देण्यात आली नाही मग महाराष्ट्र मध्ये अशा किती अॅकेडमी असतील आणि २०२१ मध्ये सुद्धा तसाच प्रकार बघायला मिळत आहे म्हणजे लाखों रुपये मिळविण्याचा एक वेगळ्याच फंडा आहे. त्यातच उच्च शिक्षण ग्रामीण भागात उपलब्ध नसल्याने या भागातील मुले शहरात होस्टेलमध्ये राहून शिक्षण घेतात आज ज्या शाळा कॉलेज विद्यालये महाविद्यालये आहेत त्यांचेच होस्टेल आहे म्हणजे शिक्षणाची आणि होसटेलची मिळून सर्व फी लाखांच्या घरात आहे त्यांचा सुध्दा असाच प्रकार आहे जानेवारी मध्ये पैसे भरुन घ्यायचे आणि मार्च मध्ये शाळा बंद म्हणजे पालकांनी पैसे भरुन सुध्दा मुल घरातच आहेत आणि आत्ता यांनी पुढील वर्षाचे अॅडमिशन घेण्यासाठी पालकांच्या कडे तगादा लावला आहे. म्हणजे शिक्षणा पेक्षा फक्त पैसा मिळविणे हा एक महत्वाचा उद्देश या सर्वांचा आहे आपणांस काहीतरी करण्याची गरज आहे

    समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

मेल्यानंतरचे अधिकार

 


मेल्यानंतरचे अधिकार

             माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे. हि मानव अधिकारची सर्वात सोपी व सर्वाधिक उत्तम आशय असणारी व्याख्या आहे. कोणत्याही ठिकाणी कोणत्याही वेळी जर माणूस माणसाशी माणसाप्रमाणे वागत नसेल तर त्या ठिकाणी मानव अधिकारांचे हणन होताना दिसते. हे आपणं पक्के ध्यानात ठेवले पाहिजेत. "जगा आणि जगू द्या"हे मानवी मुल्य आहे. मानव अधिकार कार्यकर्त्याने मानव अधिकार याची माहिती प्रबोधन करणे गरजेचे आहे. "सन्मानाने जगा आणि सन्मानाने जगू द्या" असे थोडे विस्ताराने लक्षात ठेवले पाहिजे. आपल्या कामांचे क्षेत्र किती व्यापक व सखोल यांची जाणीव होईल. माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत म्हणजेच भ्रूण. बालपण. महिला. स्त्रिया कामगार. श्रमिक. शेतकरी. सामाजिक न्याया पासून वंचित असे. अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती आदिवासी. अल्पसंख्याक. अलपभाषिक आणि साधन संपत्ती यापासून वंचित लोक यांच्या अन्न वस्त्र निवारा शिक्षण व आरोग्य यासाठी मानवी अधिकार आपणांस मोठ्याप्रमाणात जागृत करतो. 

            संविधानात जीवंत माणसासाठी तरतूद आहे पण मेल्यानंतर काय. ? मेलेल्या माणसाला एखाद्या मृतदेहालाही असे कायदेशीर अधिकार असतांत काय? जीवंत माणसाला ज्या प्रमाणे कायदेशीर अधिकार असतांत तसेच अधिकार मृत माणसालाही असतांत ९ मे पासून गंगा यमुना या नद्यांमध्ये हजारों मृतदेह तरंगताना दिसतायत. आत्तापर्यंत जवळपास दोन हजार मृतदेह गंगेत सांपडले आहेत. हे सर्व मृतदेह कोरोना बाधित होतें काय ? तसे म्हणनं स्थानिक म्हणने आहे. हे मृतदेह संक्रमित लोकांचे नाहीत असेही राज्यातले अधिकारी व कर्मचारी सांगत होते पण मुळातच ते आले कोठून. ते कोरोना संक्रमित आहेत की नाही याबाबतची कसलीही ठोस माहिती अधिकारी यांचेकडे नव्हती. 

       अनेक आंतरराष्ट्रीय कायद्यातही ही तरतूद करण्यात आली आहे जीनिवहा करार हा त्यादृष्टीने मृतांचा अधिकाराविषयी बोलणारा पहिला कायदा म्हणावा लागेल. या कायद्यातील कलम १६ नुसार युध्दात मेलेल्या सैनिकांचे संरक्षण करण्यासाठी सगळ्यांनी पुढाकार घ्यायला शिवाय २००५ ला स्वीकारलेल्या मानवाधिकार ठरावातही मेलेल्या माणसांना सन्मानाने हाताळण्याचे महत्व अधोरेखित करण्यात आली आहे. मृतदेहाच्या कुटुंबाची मागणी असेल त्याप्रमाणे त्याच योग्य व्यवस्थापन झाल पाहिजे मृतदेह योग्य पध्दतीने समाजाच्या नियमांनुसार. धर्माच्या रितीरिवाज प्रमाणे विघटित झाला पाहिजे हेहि या ठरावाच्या तिस-या कलमात सांगितले आहे. नैसर्गिक आपत्तीत मानवाधिकार कसे पाळायचे याबद्दल सांगितले आहे. मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तिची ओळख पटेल असे नियोजन व्यवस्थापन केले पाहिजे. आपघात. जसे वाहन अपघात. पाण्यात बुडवून मृत्यू. भाजून मृत्यू. ढिगारयाखाली सापडून मृत्यू. खून. आत्महत्यांचे मृतदेह. अशा विविध कारणानें मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तिंना सन्मानाने बाहेर काढून योग्य पध्दतीने धर्माच्या नियमानुसार पुरायला व दहन देण्यात यावे.  

          एकदया मृत्यू पावलेल्या व्यक्तिला सन्मान मिळाला पाहिजे असे सुप्रिम कोर्टाचा आदेश आहे त्या आदेशानुसार मृतदेहाची विल्हेवाट अंत्यसंस्कार झाले पाहिजेत हे सुप्रीम कोर्टाने केसमध्ये सांगितले आहे. सन्मानाने जगण्याचा अधिकार मृत व्यक्तिलाही लागू होतों राज्याने मृत व्यक्तिचे योग्य व्यवस्थापन करून मृतदेहाला सन्मान दिलाच पाहिजे. मृत्यू अपघाती असेल तर अपघात कसा झाला. अपघातांचे कारणं काय. खून कसा झाला. मरणाच कारण काय विषारी औषध घेवून मृत्यू झाला काय. पोसपमॅटिन. एखाद वैज्ञानिक संशोधन. डॉ शिकणारयासाठी आणि कायद्याप्रमाणे एखाद्या दुसऱ्या माणसाच जीव वाचवण्यासाठी मृतदेहाच जतन करता येत. अस सुप्रीम कोर्टाने या निकालात म्हणलं आहे २००२ चया सुप्रीम कोर्टाचे निकालानुसार आजारी आणि बेघर व्यक्तिचे ही त्यांच्या धर्मानुसार अंत्यसंस्कार झालेच पाहिजेत 

          संविधानात कलम मृतांसाठी २०२० मध्ये मद्रास हायकोर्टानं दिलेला निकाल तो असा होतो की एका डाॅकटरचा कोरोनाने मृत्यू झाला होता शेजारी पाजारी यांनी त्यांना पाहण्यास गर्दि केली होती डाॅ कुटुंबीयांना मृतांचे अंत्यविधी करायला विरोध केला तेव्हा न्यायमुर्ती एम सत्यनारायण आणि एम निर्मल कुमार यांच्या खंडपीठाने संविधातल कलम २१ मध्ये मृतांचे योग्य पध्दतीने अंतिम संस्कार करण हेही येत असा निर्वाळा देण्यात आला होता. शिवाय भारतीय दंड संहिता सेकसन २९७ चा संदर्भ दिला आहे. या सेक्शन मध्ये २९७ प्रमाणे व्यक्तिला पुरणयाचया ठिकाणी अतिक्रमणे दहन दफन भूमी रस्ते अतिक्रमण करण गुन्हा मानला जातो. कोणत्याही उपासना स्थानी किंवा कोणत्याही दफन करण्याच्या जागी अंत्यसंस्कार पार पाडण्यासाठी किंवा मृतांच्या अवशेषांचे जतन करणार ठिकाण म्हणून राखून ठेवलेल्या जागी कोणत्याही प्रकारे अतिक्रमण करेल किंवा कोणत्याही मानवी शवाची कशाही प्रकारे अप्रतिष्ठा करेल किंवा अंत्यसंस्कार पार पाडण्यासाठी कोणत्याही प्रकारे व्यत्यय आणेल त्याला एका वर्षांपर्यंत कोणत्याही एका प्रकारच्या कारावासाची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा. अस सेक्शन सांगत आहे अशाच पध्दतीने आय पी सी. चे सेक्शन ४०४ सेक्शन ४९९ आणि सेक्शन ५०३ ही मृतांच्या सन्मानाविषयी आपणांस माहीती सांगतात. सेक्शन ४०४ प्रमाणे मृत व्यक्तिच्या मालमत्तेचा चुकिचा वापर केला जाऊ शकत नाही. सेक्शन ४९९ प्रमाणे मृत व्यक्तिची बदनामी. अवहेलना करणं हा अमानवीय प्रकार आहे. मृतांचे नातेवाईक या सेकशनचया आधारे गुन्हा दाखल करू शकतात ५०३ प्रमाणे नातेवाईकांना मृतांची बदनामी करण्यासाठी धमकावने हाही अमानवीय गुन्हा मानला जातो 

            कायदेभंगाबधदल दोषी व्यक्तीला कायदेशीर तरतूदीनुसार नयायीक प्रकिया व यंत्रणांच्या माध्यमातून योग्य ते शासन झालेच पाहिजे. हे अगदी खरे आहे परंतु अपराधी व्यक्तिचे ही दंड शक्ती कडून मानवीय हणण मुळीच होऊ नये समाजात नेहमी सबल घटक दुर्बल घटकांवर अन्याय करतात त्यांचे आर्थिक मानसिक शोषण करतात शोषणाच्या प्रकिरयेत व्यक्तिचा अधिकार व हक्काचे हनन होते. मग व्यक्तिची प्रतिष्ठा बळी दिली जाते तसे माणसांचे हकक व प्रतिष्ठा नाकारली की जीवंत माणूस गुलाम बनतो मग गुलामाचे आर्थिक सामाजिक व राजकीय शोषन करणे फार सोपे जाते. 

      आज वैद्यकीय सेवा देणारे देवदूत हे आपल्या कामाला काळीमा लागणारे कार्य करत आहेत ते म्हणजे उपचार जीवंत माणसांवर केले जातात मेलेल्या माणसांवर नाही. मेलेल्या माणसाला सन्मानाने अंत्यविधी व. प्रत्त्येक धर्माच्या चाली रिती प्रमाणे करणे आपले परम कर्तव्य आहे 

    निषेध नको निलंबन नको निर्णय द्या

       समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

निषेध नको निलंबन नको निर्णय द्या

 


निषेध नको निलंबन नको निर्णय द्या

    आपण लोकशाही राज्यात आहोत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. मुक्त पणे आपण फिरतो बोलतो नागरिक स्वातंत्र्य आपल्यावर अन्याय झाला तर त्यासाठी न्याय मिळवणे आणि त्यासाठी विविध माध्यमातून उठाव बंद आंदोलन मोर्चा उपोषण निषेध या माध्यमातून आपण आपला आपल्यावर झालेल्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी राग द्वेष व्यक्त करत असतो. आपल्याला शासनाने विविध सेवा सुविधा योजना उपलब्ध व्हावी यासाठी शासनाने विविध कार्यालये निर्माण केली आहेत. विविध कल्याणकारी योजना कल्याणकारी कायदे. आणि ते सक्षम राबविण्यासाठी विविध जनहित कायदे आणि सर्वात मोठा आधार आहे तो म्हणजे संविधानाचा. आहे आज आपण आपले जीवन शासकीय व्यवस्था ही सगळी संविधानावर अवलंबून आहे त्याप्रमाणे सर्वजण आपले काम करताना दिसत आहेत 

            अज्ञान"अंतयवाद "अंधश्रद्धा"गरिबी" जातीयवाद"बंडखोरी"अन्याय "प्रादेशिक अस्मिता" सावकारी"जात"धर्म"वर्ण"फुटिरता"निरक्षरता"राजकीय शिक्षण"दहशतवाद"भ्रष्टाचार गुन्हेगारी"गुंडगिरी"महिला अत्याचार "देशनिषटा"विकलांग विरोध"लोकसंख्या"महगाई"बेरोजगारी"विज्ञान आणि तंत्रज्ञान"नागरिक स्वातंत्र्य"अनुसूचित जाती जमाती"भटक्या विमुक्त जाती"इतर मागासवर्गीय"आदिवासी"संघटित असंघटित"व्यापारी आणि औद्योगिक"विकासवादि पर्यावरणवादी"समतावादी"समरतवादि"अतिरेकी"नक्षलवादी"घुसखोरी"अल्पसंख्याक"बहुसंख्यांक"पांढरपेशा व बहुजनसमाज"हरिजन आणि दलित"किसान आणि कामगार"तेलंगणा लढा"महाडसतयाग्रह "दांडी यात्रा"१८५७ उठाव"जालियनवाला बाग हत्याकांड"रंग निवडणूक चिन्ह राष्ट्रीय चिन्ह"समतेचा हक्क"धार्मिक स्वातंत्र्य" शैक्षणिक व स्वातंत्र्याचा हक्क"सवैधानिक उपाययोजनांचा हक्क"प्रसार माध्यमे" लोकशाही"राजेशाही"निजामशाही"उदारमतवादी शासनपदधदती"समाजवादी प्रारुप"अक्षर निष्ठा"केंद्रिकरण"विकेंद्रीकरण"सामाजिक आर्थिक राजनैतिक"न्याय विचार"सुरक्षा दले"आंदोलन चळवळ"मनोविज्ञान"प्रवास वाहतूक"शासकीय"पाणी पुरवठा"कामगार विभाग"बांधकाम विभाग"महसूल विभाग" पुरवठा विभाग" ग्रामपंचायत"पंचायत समिती"जिल्हा परिषद"जिल्हाधिकारी" राज्यसभा"विधानसभा" राज्य आणि केंद्र" वरील क्षेत्राशी आपला केंव्हा ना केव्हातरी संबंध येतोच आपण आपले दुःख अन्याय मांडण्यासाठी निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज इत्यादी मार्गाचा अवलंब करतो 

              वैद्यकीय सेवा ही ईश्वर सेवा मानली जाते मानव मग तो कोणीही असो दोघाजवळच आपले हात जोडतो. एक देवासमोर जीवन मागण्यांसाठी आणि डॉ समोर तेच जीवन वाचविण्यासाठी. पण आज. सर्वत्र वैद्यकीय बाजार झाला आहे. शासनाने रुग्ण हक्क सनद तयार केली आहे गोरगरीब जनतेला वैद्यकीय उपचार करण्यासाठी पैशांची मदत व्हावी यासाठी विविध वैद्यकीय जीवनदायी योजना राबविण्यात येतात. आज कोणत्याही दवाखान्यात रुग्ण हक्क सनद लावली जात नाही.सनदे प्रमाणे. वैद्यकीय उपचार निवडायचा अधिकार. वैद्यकीय उपचार दर.मेडिकल औषध घेण्याचा अधिकार. असे विविध रुग्ण सनदे प्रमाणे आपले हक्क आहेत आज ज्या दवाखान्यात उपचार घ्यायचा आहे औषध मनमानी दराने त्यांच्याच मेडिकल मध्ये घ्यावे लागते. पेशंटला फरक पडत नसेल तर दुसरीकडे दवाखान्यात हालवणे आपला हक्क आहे होणारें दवाखान्याचे बिल कसे झाले हे सुद्धा विचारणे. पेशंट प्रकृतीची चौकशी करणे  

            आज वैद्यकीय सेवेच्या नावाखाली मोठ मोठे दवाखाने टोलेजंग इमारती गोरगरीब जनतेला लूटून मिळविल्या आहेत. दवाखान्यात पेशंट अॅडमिट केल्यावर वैद्यकीय उपचार करण्यासाठी किती खर्च येईल कोणत्या औषधांचा दर काय आहे. कोणत्या उपचारासाठी किती खर्च येतो. विविध वैद्यकीय योजनांची माहिती सांगणारे. मदतनीस दवाखान्यात आहेत का? दरपत्रक लावले आहे का? 

                आपल्या जिल्ह्यात डॉ प्रकरणे आपणांस नविन नाहीत. रोज दवाखान्यात रुग्णांना लुटले जाते खाजगी दवाखाने सोडा सरकारी दवाखान्यात सुध्दा डॉ वेळेवर येत नाहीत औषध पुरवठा नाही बाहेरुन औषध आणण्यासाठी प्रेशर आणलें जाते. सरकारी दवाखान्यात वैद्यकीय सेवा बजावित असणारे डॉ यांचे बाहेर दवाखाने आहेत सरकारी दवाखान्यात उपचार घेण्यासाठी येणारे पेशंट यांना आपल्या दवाखान्यात येण्याचा सल्ला देतात. म्हणजे पगार शासनाचा आणि काम स्वताच असच सर्वत्र चालू आहे 

             वरील प्रमाणे सर्व प्रकार आपण रोज वाचतो बघतो विविध ठिकाणी डॉ मनमानी कारभाराला कंटाळून विविध संघटना सामाजिक संघटना सेवाभावी संस्था सामाजिक कार्यकर्ते हे वेळोवेळी आंदोलने बंद मोर्चे उपोषण करतात. यामागचा उद्देश एवढाच असतो की या समाजातील समाजांचे समाजकंटक डॉ यांना शासन व्हावे पण आपली प्रशासन व्यवस्था एवढी ढिसाळ आहे की अशा डॉ यांना वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहे. समाजांचा रोश बघून अशा डॉ लोकांना तात्पुरते निलंबित केले जाते. आणि तो डाॅ सरकारी दवाखान्यातील असला तर त्याचा पगार चालू असतो. खाजगी दवाखाने परवाना रद्द झाला असला तरी दवाखाना रासरोस पणे चालू असतो. जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम केले जात आहे. 

                आपल्या सर्वांना माझे एवढेच सांगणे आहे. मुद्दा कोणताही असू द्या. जर त्यासाठी तुम्हाला आंदोलन मोर्चा उपोषण करायची वेळ आली तर. शासनाकडे मागणी करा की. निषेध करणार नाही. निलंबन होऊ देणार नाही निर्णय द्या. नाहीतर अशा नराधमांना पोलिस यांच्या ताब्यात देण्यापेक्षा हे सर्वजण जनतेचे आरोपी आहेत कारणं शासनाने काही गमावले नाही सर्वसामान्य माणसाने आपला पैसा आणि माणूस गमावला आहे त्यामुळे हे जनतेचे अपराधी आहेत यांना जनतेच्या ताब्यात द्या जनता त्यांचा न्यायनिवाडा करील. आणि आपला न्याय आपणच मिळविल.कोरोना काळात डॉ यांनी आपणास दिलेली वागणूक आपण विसारलो नाही. रक्त लघवी. एक्सरे. रिपोर्ट नाही तपासणी नाही. औषध अंगावर टाकणे. हाडांच्या रुग्णांसाठी ताप थंडीचे औषध. काही जणांनी तर दवाखाने सुध्दा बंद केले होते. काही ठिकाणी मृत व्यक्ती वर सुध्दा उपचार करून पैसे उकळले म्हणजे "मडयाचया टाळूवरचे लोणी सुध्दा खाणयासारखा प्रकार घडला " कोरोना सारख्या महाभयंकर महामारी संकटांत प्रत्येकाला जीवनाची भीती वाटायला लागली आणि प्रत्येकानं आयुर्विमा केला आणि मोठ मोठ्या विमा कंपन्या अधिकच आर्थिक माया गोळा करून अधिकच मोठ्या झाल्या म्हणजे चारिही बाजूने सर्वसामान्य माणसांचे शोषण केले गेले 

          आजच निर्णय करा कोणत्याही बाबतीत आंदोलन मोर्चा उपोषण करून आपण उपाशी राहून शासनाला व समाजाला काही फरक पडणार नाही त्यामुळे सर्व समाजाने समाजातील समाजसेवक यांनी निषेध करणार नाही निलंबन होऊ देणार नाही आम्हाला निर्णय द्या एवढीच मागणी करा

            समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

अडाणी अडाणी - शिक्षित बेरोजगार

 


अडाणी अडाणी

                   आपल्या प्रगत लोकशाहीत राजकीय विचारवंत भारतीय लोकशाहीला निरक्षराची लोकशाही म्हणले तर वावगे ठरणार नाही.  भारतीय मतदार याला मतदान करताना मतदाराला उमेदवारांचे नाव वाचता येत नाही.  उमेदवारांच्या निशाणी वरून मतदार आपल्या उमेदवारांना मत देणारी अडाणी लोक आपल्याकडे आहेत. उदा हिमाचल प्रदेशातील असंख्य मतदारांनी स्वताच्या हातांवर शिकके मारून कोरया मतपत्रिका पेटीत टाकणारे मतदार. निरक्षरते मुळे अडाणी अशिक्षित राहून गेले. आपणास स्वातंत्र्य मिळून ७२ वर्षात आज फारसा बदल झालेला नाही. स्वतंत्र भारताचे प्रजा सत्ताक स्वातंत्र्यानंतर आज आपले मतदार नागरिक उमेदवारांचे नाव वाचता येईल एवढे सुध्दा शिक्षित झालेले नाहीत. आणि आपण त्यांना शिक्षित होऊ दिले नाही. ही आजची वस्तुस्थिती आहे. याचा अर्थ असा होतो की स्वतंत्र भारताला आज एवढी सुध्दा साक्षरता आणता आली नाही. एके काळी भारतातील अडाणी निरक्षरते बद्दल जागतिक बँकेने एक इशारा दिला होता तो आज आपणांस खरा होताना दिसत आहे तो म्हणजे "भारत देश "ज्या दिवशी विसाव्या शतकातून एकविसाव्या शतकात पदार्पण करिल त्या दिवशी म्हणजे इ सन २०१० साली जगाच्या पाठीवर जेवढे निरक्षर असतील त्यांच्यापैकी ५४.८/ टक्के निरक्षर लोक एकट्या भारतात असतील 

              आपली शिक्षण व्यवस्था पोकळ आहे कारणं जिल्हा परिषद शाळा बंद झाल्या हायस्कूल. विद्यालय महाविद्यालय. काॅलेज. तंत्रज्ञान शिक्षण. अभियांत्रिकी शिक्षण. इंजिनिअर. डॉ. वकील. एम पी सी स्पर्धा परीक्षा. अॅकेडमी. अशी विविध शिक्षण व्यापार करणारी संस्था स्थापन झाली. त्यामुळे गोरगरीब जनतेच्या शिक्षण आवाक्याच्या बाहेर गेले. पैसा असणारे. उच्च शिक्षण घेऊन मोठ्या मोठ्या पदावर गेले. गोरगरीब लोकांची मुल. पोटासाठी व आपल्या घराची प्रस्थिती बेताची यामुळे मिळेल ते काम करून अर्थार्जन करायला लागले आणि मोठ मोठ्या नेते पुढारी बगलबच्चे यांची मुल उच्च शिक्षण घेऊन गोरगरीब जनतेच्या मुडकयावर बसले आणि राज करायले लागलें योजना सर्वांना हक्काचे मोफत शिक्षण. शिष्यवृत्ती योजना आरक्षणाचे बाहुल. हे सर्व फसव आहे. गोरगरीब जनतेची चेष्टा लावली आहे या कुचकामी धोरणामुळे आज सुध्दा भारत इतर देशांत निरक्षरते मध्ये सर्वात पुढे आहे 

            स्वातंत्र्यानंतर भारतापुढे लोकशाही राज्याच्या निरक्षरतेची समस्या होती. ही समस्या आत्ता आपणांस आव्हान ठरलें आहे. आजच्या शिक्षणव्यवस्था प्राथमिक शिक्षणाकडे दुर्लक्ष झालेले दिसते. आज उच्च शिक्षणाच्या नावाखाली शिक्षणावर मोठा खर्च होताना दिसत आहे. त्यामुळे नजिकच्या भविष्यात निरक्षरतेचा प्रश्न सुटेल अशी अशा बाळगणे व्यर्थ ठरणार आहे. एकीकडे प्रौढ शिक्षण धडक कार्यक्रम चालू केला आहे. पण ज्यांना पोटभर अन्न मिळविण्यासाठी दिवसभर प्रचंड श्रम करावे लागतात त्यांना शिक्षण घेण्यासाठी वेळ मिळणार का ? मोठे आव्हान आहे रेशनकार्ड सर्वे बोगस झाल्याचा परिणाम आपणांस शिक्षणावर सुध्दा झालेला दिसतो.  लाभार्थी वार्यावर. झोपडीत राहणारे केशरी शिधापत्रिका धारक. बंगले शेती शासकीय नोकर अंत्योदय अन्न सुरक्षा योजनेत.  तुम्हाला अशिक्षित ठेवायचे आहे कारणं तुम्ही शिकला तर अधिकारी व कर्मचारी यांच्या डोक्याला ताप

              भारतात राजरघटेनाचा अंमल सुरू झाल्यानंतर दहा वर्षांच्या काळात. ४५/ वया कलमानुसार वयोगट ६/१४ पर्यंत सर्व मुला मुलींना सकतिचे आणि मोफत शिक्षण देण्याच्या राज्य प्रयत्न करील.  असे सांगण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र ह्या गोष्टीची अंमलबजावणी फारशी झाले नाही का राजकारणी तेढामुळे झाली नाही. कारणं मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी न करणार्या सरकारच्या विरोधात नागरिक न्यायालयात दाद मागू शकत नाही म्हणजे एका बाजूला आपल्यासाठी शिक्षण योजना आणि त्याची अंमलबजावणी होतं नाही म्हणून आपण कोणाकडे दाद मागायची   ब्रिटिश काळात व राजवटीत कारकून वर्गाची गरज असायचीच त्यावेळी त्यांना कारकून होण्याइतपत शिक्षण दिले जात होते. म्हणजे ज्याचा आपणास वापर करून घेत येईल त्याला तेवढेच शिक्षण द्यायचे. म्हणजे आपल्या मुलांना गवंडी वायरिंग मॅकेनिक. सुतार लोहार अशा विविध व्यवसाय शिकून फक्त शारीरिक कष्ट करायचे का ? ब्रिटिशांनी कलकत्ता मद्रास तेथे उच्च शिक्षण देणारी विद्यापीठ स्थापन केली. परंतु त्यामुळे सुध्दा निरक्षरता संपुष्टात आणण्यासाठी ठोस भूमिका घेतली नाही. उलट प्राथमिक शिक्षण देणारया शाळांबाबत त्याचे काटकसरीचे धोरणं होतं. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक स्वयंसेवी संस्थांनी अनेक अडचणी वर मात करून प्राथमिक शाळा चालविलया. बोर्ड ऑफ एज्युकेशन. १८४६ मधील अहवालात पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथील शाळा दरमहा ३५० रुपये खर्च होतो म्हणून बंद करण्यात आल्याची नोंद आहे. हा प्राथमिक शिक्षणावरील अल्पसा खर्चही ब्रिटिश राज्यकर्त्यांना उधळपट्टी वाटतं होती. स्वातंत्र्यानंतर साक्षरता वाढविण्यासाठी उपयुक्त असलेल्या प्राथमिक शिक्षणाची प्रचंड हेळसांड झाली. 

          १९५० ते १९८५ ह्या सुमारे पस्तीस वर्षाच्या प्रदिर्घ कालावधीत प्राथमिक शिक्षणाची वाढ फक्त तीन पट झाली माध्यमिक शिक्षणाची वाढ पाचपट झाली तर उच्च व शिक्षणाची वाढ ९ पट झाली प्राथमिक शिक्षणावरील खर्च ५६/ टक्के वरून २१ टक्क्यांपर्यंत घसरला. आपल्या आत्तापर्यंत सातही पंचवार्षिक योजनांचा आढावा घेतल्यास प्राथमिक व शिक्षणाची हेळसांड अधिक स्पष्ट होईल.  पहिल्या पंचवार्षिक योजनेत प्राथमिक शिक्षणावर ५६/ टक्के रक्कम खर्च करण्यात आली.  परंतु त्यानंतर प्रत्त्येक योजनेत खर्चाची ही टक्केवारी कमी होत जाऊन सातव्या पंचवार्षिक योजनेत हे प्रमाण २९ टक्के घसरले म्हणजे. शासकीय धोरणाने प्राथमिक शिक्षणाकडे म्हणजे पर्यायाने साक्षरतेकडे दुर्लक्ष केले हे स्पष्ट झाले. स्वातंत्र्यानंतर ब्रिटिशांच्या शैक्षणिक धोरणांची ही  अप्रतक्ष पणे री ओढली जात आहे. 

                प्राथमिक शिक्षणाची ही हेळसांड होताना उच्च शिक्षणावर मात्र अफाट पैसा खर्च होत आहे. आज शासनाच्या तिजोरीवर सर्वाधिक ताण उच्च शिक्षणाच्या खर्चाचा आहे.  हया उच्च शिक्षणातून शिक्षित झालेल्या हजारो युवकांना रोजगाराची संधी हमी नाही. ते बेकार आहेत. रोज हजारो इंजिनिअर पदवी घेऊन बाहेर पडत आहेत. पदवीप्रमाणे काम नाही ते आज बांधकामांवर पाणी मारणे अशी कामे करत आहेत मग उच्च शिक्षणाचा काय उपयोग देशातील नोंदणी झालेल्या साडेतीन कोटी बेकारापैकी दिड कोटी बेकार शालांत परिक्षेच्या पुढील शिक्षण घेतलेले आहेत. दरवर्षी नोंदणी होणारें बेकार संख्या २५/३० लाखांनी वाढत आहे उच्च शिक्षण घेऊन बेकारी आहे व प्राथमिक व शिक्षणाची हेळसांड निरक्षरता आहे. म्हणजे सुशिक्षित बेरोजगार बेकार व त्याच्याबरोबर निरक्षराची संख्या प्रचंड वाढत आहे. आज हे प्रश्न लोकशाही राज्यपद्धती साठी गंभीर आहेत त्याने आत्तापर्यंत उग्र स्वरूप धारण केले आहे 

          आज एकही राजकीय पक्ष आपल्या जाहिरनामयात निरक्षरता संपविण्यासाठी कार्यक्रम आखलेला मी तर पाहीला नाही. ही गोष्ट नमूद करण्यासारखी आहे. सध्याचे राजकीय पक्षाचे स्वरूप त्याची धोरणे विचारात घेता ते अशा प्रश्नांना काहीच महत्व देत नाहीत. ह्याविषयी शंका नाही. त्यामुळे भविष्यात निरक्षरता राहणार आहे हे स्पष्ट आहे.  निरक्षरता संपविण्यासाठी राजकीय लोकांची इच्छा नाही. व ती पूर्णत्वास नेणारे धोरणं नाही. म्हणजे मतें मिळवून सत्ता मिळविणे. बंद आंदोलन मोर्चा यासाठी अशा बेरोजगार तरुणांना निवडते जाते आणि पोलिस केस यांच्यावर येथे आणि यांचे पूर्ण आयुष्य बेकार होते. एवढेच राजकीय पक्षाचे धोरण असू नये  जनतेचे प्रबोधन करुन जागृत जनमत तयार करण्यासाठी देशातील सर्व जनता शिक्षित सुशिक्षित बनविने हे सुद्धा राजकीय पक्षाचे काम आहे 

          आज विविध स्पर्धा परीक्षा पास झालेले विद्यार्थी यांना भरती होण्याचे कोणताच मार्ग सरकारने ठेवला नाही त्यामुळे आपणांस व आपल्या पालकांना आज मोठा मानसिक ताण त्रास होत आहे 

        समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

justify;">९८९०८२५८५९

रेशन माझा हक्क

 


    रेशन माझा हक्क 

अन्न सुरक्षा कायदा २०१३ हा कायदा गोरगरीब अनाथ अपंग जेष्ठ नागरिक. विधवा. निराधार. भूमीहीन. शेतमजूर. आर्थिक दृष्ट्या दुर्बल. परगावाहून. परराज्यातून. येणारे कामगार. व समाजातील अनेक दुर्बल घटकांना. चांगलें स्वच्छ. व सकस अन्न धान्य मिळावे यासाठी रेशन दुकान ही संकल्पना अमलात आणली. सर्वांना पुरेसे रास्त भावात सवलतीच्या दरात निवडक अन्न धान्य वितरण करणे ही रेशन दुकानदार याची जबाबदारी आहे. पण आज सर्वात मोठें दोन नंबर हे पुरवठा विभागात होत आहे. अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम वार्यावर. अपंगांसाठी वेगळी शिधापत्रिका हा निर्णय सुध्दा धूळखात पडला आहे. दारिद्रय रेषेखालील कुटुंबांच्या नावाखाली. सदन लोकांची संख्या जास्त आहे. २००५ नंतर आज पर्यंत दारिद्र्य रेषेचा सर्वे आज १६ वर्षे झाली तरी झाला नाही. दर पाच वर्षांनी. शासनाने गांभीर्याने हा सर्वे करणे गरजेचे होते. पण आज गोरगरीब जनतेला अंत्योदय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळत नाही. आज अंत्योदय अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी महिन्याला मिळणारा ३५ किलो रेशन सोडून प्रति महिना प्रति व्यक्ती पाच किलो प्रमाणे तांदूळ मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यात. प्रधान लाभार्थी कुटुंब यांना सुध्दा सवलतीच्या दरात अन्न धान्य वितरण होत आहे. पण केशरी शिधापत्रिका धारकांना कोणत्याही योजनेत सहभागी केले जात नाही. 

      केशरी शिधापत्रिका धारकांना शासनाने परवा निर्णय दिला आहे तो म्हणजे एक किलो तांदूळ व एक किलो गहू असा वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातसुद्धा पळवाट आहे ती म्हणजे उपलब्धतेनुसार वितरण केले जाईल. म्हणजे १००/ पैकी १६ जणांना अन्न धान्य वितरण करण्यात येणार आहे. म्हणजे एका बाजूला. गरज नसताना वाटप केले जात आहे आणि एका बाजूला भूक असूनसुद्धा वाटप केले जात नाही 

     बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर चे वतीने आम्ही उठाव करणार आहोत की केशरी शिधापत्रिका धारकांना. नोव्हेंबर पर्यंत मोफत अन्न धान्य वितरण करा अन्यथा सर्व शिधापत्रिका धारकाचे अन्न धान्य वितरण थाबवा. रेशन दुकानला कुलपे घाला. अशीच मागणी. सर्वांनी आपल्या गावात तालुका जिल्हा. जिथे पुरवठा विभाग आहे तेथें करा. ग्रामीण भागातील लोकानी. आपल्या गावात ग्रामपंचायती कडे ही मागणी अर्ज निवेदन या माध्यमातून करा. आमची युनियन सर्वोतोपरी आपणांस मदत करेल. 

*रेशनिंगचे नियम –* 

आपण वाचा दुसऱ्याला सांगा,आपली अडचण आम्हाला सांगा,आम्ही तिचे निरसन करू,आपले नाव गुप्त ठेवले जाईल

अध्यक्ष अहमद मुंडे इस्लामपूर

९८९०८२५८५९


● रॉकेल/घासलेट पहिल्‍या पंधरवड्यात न घेतल्‍यास महिना अखेरपर्यंत घेता येते. हप्‍ता बुडत नाही.


● बीपीएल् व अंत्‍योदयचे धान्‍य गेल्‍या महिन्‍यात न घेतल्‍यास पुढच्‍या महिन्‍यातही घेता येते.


● बीपीएल् व अंत्‍योदयचे धान्‍य महिन्‍यात 4 हप्‍त्‍यातही घेता येते.


● रेशनवर घेतलेल्‍या वस्‍तूंची पावती मिळालीच पाहिजे. पावतीवर रेशन दुकानाचा क्रमांक असतो.


● एका दिवशी एकच पावती फाडता येते असा नियम नाही.


● ज्‍या व जेवढ्या वस्‍तू हव्‍या असतील. तेवढ्याच वस्‍तू आपण घेऊ शकतो. इतर गोष्‍टी घेतल्‍याशिवाय रॉकेल मिळणार नाही असे दुकानदार म्‍हणू शकत नाही.


● रेशनकार्ड स्‍वतःकडे ठेवून घेण्‍याचा किंवा ते रद्द करण्‍याचा अधिकार दुकानदाराला नाही.


● रेशन दुकान रोज सकाळी 4 तास व सायंकाळी 4 तास उघडे असलेच पाहिजे. आठवडी बाजाराच्‍या दिवशी उघडे असले पाहिजे. आठवड्यातून एकदाच दुकान बंद ठेवता येते. रेशन दुकान जर आठवड्यातून एक दिवसाहून अधिक दिवस बंद रहात असेल तर त्या बंद दुकानाची छायाचित्रे / चलचित्रे तारीख वेळे सहित http://mahafood.gov.in/pggrams/ या ऑनलाईन लिंकवर अपलोड करावीत. सिद्धता पडताळून दुकानदारावर तात्काळ कारवाई होते.


● रेशन दुकानात लोकांना स्‍पष्‍टपणे वाचता येईल असा महिती फलक असला पाहिजे. या फलकावर दुकानाची वेळ, सुटीचा दिवस, दुकान क्रमांक, तक्रार वही उपलब्‍ध असल्‍याची नोंद, रेशन कार्यालयाचा पत्‍ता व फोन, रेशनकार्ड संख्‍या, भाव व देय प्रमाण उपलब्‍ध कोटा ही माहिती असणे अनिवार्य असते. त्या सोबतच गाव व तालुका स्तरावरील रेशन दक्षता समिती मधील पदाधिकारी चे नाव व संपर्क क्रमांक असलेले फलक दर्शनी भागात लावणे अनिवार्य असते.


● बीपीएल, अंत्‍योदय व अन्‍नपूर्णा लाभार्थ्‍यांची यादी दुकानात लावलेली असते.


● वरीलपैकी कोणतीही गोष्‍ट आपल्‍या गावातल्‍या रेशनदुकानात होत नसेल, तर ताबडतोब लेखी तक्रार नोंदवा. जर गावातील रेशन दुकानदार धाक/धमकी दाखवत दांडगेशाही करून तक्रार करण्यास मज्जाव करत असेल तर त्रासलेल्या ग्राहकांनी गुप्तता राखून एकत्रितपणे लेखी अर्जावर आपली नावे आणि सही करून तो रजिस्टर पोस्टाने तहसिल कार्यालयाला पाठवा. तसेच दुकानातच तक्रारवही ठेवलेली असते. ती वही मागा आणि त्‍यात आपली तक्रार लिहून त्‍याखाली नाव, पत्‍ता, सही/अंगठा करा. जर दुकानदाराने ही वही दिली नाही, तर तहसिलदाराकडे वही न देण्‍याची तक्रार करा. तक्रारवही न देणे हा अदखलपात्र गुन्‍हा म्‍हणून तहसिलदार कारवाई करतात. तक्रारवहीत पाच तक्रारी नोंदल्‍या, की दुकानदाराला 15 हजार रूपये दंड होतो.


दुकानावर देखरेख करण्‍यासाठी ग्राम पंचायतीची दक्षता समिती असते. या समितीत जागरूक तरुणांनी सहभागी झाले पाहिजे. ग्रामसभेत या समितीविषयी चर्चा करा. गरज असेल, तर समिती बदला. ही समिती दुकानावर धाड घालू शकते. गैरप्रकार असतील, तर दुकानाला टाळेही लावू शकते. तलाठी या समितीचा सदस्‍य सचिव असतो.


आपण आपल्या गावात रेशन दुकानातुन रेशन घेतो. परंतु रेशन दुकानदार आपल्याला पावती मात्र देत नाही. म्हणुन

महाराष्ट् शासनाने लोकांना त्यांच्या पावत्या या ऑनलाईन देखील पाहता येण्यासाठी खालील वेबसाईट चालु केलेली आहे. आपण त्या वेबसाईटवर जाऊन आपला RC नंबर जो आपण रेशन घेताना बायोमेट्रीक साठी येतो तो नंबर टाकावा. महाराष्ट् सरकारने जनतेस आवाहन केलेले आहे आपण खालील वेबसाईट वर जाऊन आपले रेशनकार्ड वरील धान्य चेक करावे.


आपले रेशनकार्ड चेक करण्यासाठी खालील लिंक वर RC नंबर जो आपण रेशन घेताना बायोमेट्रीक साठी येतो तो नंबर टाकुन आपण आपली पावती प्राप्त करु शकतो. या साईटवर जाऊन आपल्या कार्डावर एका व्यक्तिमागे किती धान्य आपल्याला मिळण्याचा अधिकार आहे आणि दुकानदार किती देतो याची आपणास ऑनलाईन माहिती मिळते.


https://mahaepos.gov.in/SRC_Trans_Int.jsp


रेशन दुकानदारांचा FPS ID चेक करण्यासाठी खालील लिंक वर पहावे. किंवा आपल्या पावतीवर देखील आयडी असतो.


https://mahaepos.gov.in/FPS_Trans_Abstract.jsp


रेशन दुकानदारानी शासनाकडुन किती माल घेतला हे खालील लिंक वर पहावे


https://mahaepos.gov.in/FPS_Status.jsp


रेशनदुकानदारा विरुध्द तक्रार देण्यासाठी खालील लिंक वर पहावे.


http://mahafood.gov.in/pggrams/


वरील वेबसाईट ही शासनाची अधिकृत आहे. जास्तीत जास्त लोकांना आपले रेशन कार्ड चेक करुन घ्यावे. व अशा रेशन दुकानदाराच्या तक्रारी सार्वजनिक वितरण तक्रार निवारण प्रणाली नि:शुल्क क्रमांक 1800-22-4950 व 1967 तसेच ई-मेल: helpline.mhpds.gov.in पाठवावा. असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासनाकडुन करण्यात आलेले आहे.....


*महत्वपुर्ण_माहिती*

*स्वस्त धान्य दुकानातील धान्य दर..!*

*गहू - २ रू. किलो*

*तांदूळ- ३ रू. किलो* 

*साखर - २० रू . किलो*

*चनादाळ- ४५ रू. किलो*

*तुरदाळ- ५५ रू. किलो*

*उडीद दाळ - ४४ रू किलो*

*घासलेट (रॉकेल #केरोसीन ) - २४:५० ( चोवीस रपये पन्नास पैसे लीटर )*

(टिप :- संबंधी आपल्य‍ा क्षेत्रातील जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी यांचा कडून वरील दर / किंमत खात्री करुन घ्यावी. )

            जर दुकानदार तुमच्या कडून या पेक्षा जास्त दर घेत असेल व तुम्हाला माल (रेशन) घेतल्याची पावती देत नसेल तर स्थानिक #पोलीस_ठाणे (स्टेशन) ला जाऊन तक्रार दाखल करू शकता..!

*चोरांना खुलेआम आपली लूट करण्याची संधी देवू नका...!*

सदरील दर हे चालू दर आहेत याची नोंद घ्यावी..! 

          जागा ग्राहक जागा ! आता माल (रेशन) घेतल्यास त्याची पावती मागून घ्या. देत नसेल तर पोलीसात तक्सक्रार करा,तसेच *आम्हाला कळवा...आपलाच संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रूग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन कृती समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

मोर्चा मोर्चा - इतना भुका हू सहाब के धोका भी खा लेता है

 


मोर्चा मोर्चा

              आपल्या घरातील वातावरण. कुटुंबाची रचना यांचा आपल्या राजकीय आणि सामाजिककरण यांच्याशी घनिष्ठ संबंध असतो. याचा अर्थ घरात आई-वडील आपल्याला राजकारण समजावून सांगतात असे नाही पण "अधिकार" या गोष्टी विषयी आपली मते कुटुंबातील अनुभवांवर अवलंबून असतात. कारणं कुटुंबात आपण आपल्या अधिकारांचा दिर्घकाळ अगदी जवळून अधिकारांचा अनुभव घेत असतो. आपली कुटुंबव्यवस्था ही वर्चस्व प्रधान आहे. वडीलधाऱ्याचे कर्त्या पुरुषाचे वर्चस्व घरातलयावर असते आपली या वर्चस्वाबददल भावना काय असतें ? सामान्यपणे वडीलधाऱ्या व्यक्ति पुढे आपण नमतो. पण त्यातूनच आपल्या मनात बंडखोरीची भावना वाढीस लागते. ती व्यक्त होतें असे नाही. पुढे या कौटुंबिक अनुभवांची परिणती मोठेपणी आपल्या राजकीय स्वभावात येते. उदा आज्ञापालनासाठी. आपली तयारी. बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी बंडखोरी किंवा विरोध. भावना आपल्या मनात पुरेशी खोलवर घर करून बसते आणि राजकारणात ती क्वचितच उफाळून येते. मग सत्ता. मनमानी पद्धतीने कारभार करण्यासाठी आपण कोणत्याही स्तराला जाण्यास तयार असतो. 

              मोर्चा हा सर्वसामान्य माणसाला आपल्यावर आपल्या समाजावर. झालेल्या अन्यायाच्या विरोधात मोर्चा काढण्याचा अधिकार आहे. पण आपल्या स्वार्थासाठी आज आपली ताकद दाखविणे. माझ्या मागे एवढी जनता आहे हे दाखवण्यासाठी आज शक्तिप्रदर्शन करण्यासाठी गोरगरीब जनता. बांधकाम कामगार. आशा वर्कर्स. कंपन्या कामगार. यांना एक पटेल असे गाजर दाखवून त्यांना यात सहभागी करण्यात येते. निदर्शने मोर्चे यांचा अनुभव लहान-मोठ्या शहरांत राहणा-या लोकांना येतो. कारणं ज्यावेळी मोर्चा रस्त्यावरुन जातो घोषणा देत रस्त्याने एखादा मोर्चा जायला लागला की आजूबाजूने बघ्याची गर्दि जमते त्यांना मोर्चाबददल कुतूहल वाटत. घोषणा फलक यांच्यामुळे मोर्चेवाले कोण आहेत ते कळते त्यांचे म्हणने काय आहे याचीही थोडीफार कल्पना येते. मुख्य म्हणजे आपले म्हणने मांडण्यासाठी रस्त्यावर उतरलेले लोक हे विसरतात की जेव्हा मोर्चा काढला जातो आणि तो जर एखाद्या नेत्यांचा असेल किंवा संघटना सेवाभावी संस्था युनियन यांचा असेल तर त्यांना त्या मोर्चा वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आपले पोलिस बांधव संरक्षण देतात. हे परम कर्तव्य माणून हे काम केले जाते. हे सर्व झाले मोर्चा काढणारे आणि त्यात सामिल होणारें यांचेसाठी. त्याच रस्त्यावरून जाणाऱ्या सर्वसामान्य जनतेच काय. कारण रस्ता रोको आंदोलन असेल किंवा मोर्चा असेल तर तासन तास रस्ते अडविले जातात. त्यावेळी सर्वसामान्य जनतेत. शाळेला जाणारी मुले. नोकरी साठी जाणारे लोक. काॅलेज महाविद्यालय. अनेक शिकवणी. कोर्स साठी जाणारे तरुण. डबेवाले. रिक्षा चालक. एस टी सेवा. मालवाहतूक पॅसेंजर वाहतूक. दवाखान्यात जाणारया आशा वर्कर्स. डॉ. यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. सर्वांत वाईट काय असेल तर ज्यावेळी मोर्चा रस्ता रोको. चालू असेल त्यावेळी त्या रस्त्यावर वाहनांची गर्दी निर्माण होते. आणि त्यातच जर एकादि. अॅमबुलनस अडकून पडली आहे त्यात अतिदक्षता जीवन मरणाच्या दारात असणारा पेशंट असेलतर. त्याच्या जीवनाचा. कोण विचार सुध्दा करत नाही.जर अशावेळी त्यात असणारा पेशंट जर एकधयाचया घरचा कर्ता पुरुष असेल आणि अशा मोर्चा वेळी निर्माण झालेल्या. वाहन गर्दि मुळें त्याला दवाखान्यात नेण्यास उशीर झाला आणि त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या मृत्यू होण्यासाठी कारणीभूत असणारे हे मोर्चा काढणारे यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि मृत्यू पावलेल्या कुटुंबातील सदस्यांना योग्य तो आर्थिक मोबदला देण्यात यावा. शासनाने अशी तरतूद करण्याची गरज आहे. बघा किती टक्के मोर्चे कमी होतील. सर्वसामान्य नावाखाली आपली भाकरी मोर्चा या माध्यमातून भाजून घेणारयाना निश्चित चाफ बसेल. दगडफेक. वाहनांची जाळपोळ. आत्मदहन व बंद आंदोलन मोर्चा उपोषण यावेळी होणा-या शासकीय सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले तर सदर हे सर्व घडवून आणणारे. सदर संघटना सेवाभावी संस्था युनियन व अन्य राजकीय सामाजिक. यातील सदस्यांवर सदर नुकसानभरपाई वसूल करण्यात यावी 

            आपले म्हणने मांडण्यासाठी मोर्चे मिरवणुका हा मार्ग असल्याचे लोकांच्या लक्षात येते. मोर्चाने जाऊन आपण आपली मागणी मागू शकतो किंवा कोणाचा तरी निषेध करत असतात आपल्याला जे म्हणायचं आहे ते सर्वांनी मिळून शांततेच्या मार्गाने मांडले तर त्याचा परिणाम होतो. आपल्या मागणीकडे सर्वांचे लक्ष वेधून घेता येते मोर्चे निदर्शने हा आपले विचार व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. ती एक राजकीय कृती आहे. हे अशा प्रसंगातून आपल्या लक्षात येते तुम्ही शहरात राहणारे असाल तर आणखी एक घटना तुम्हाला माहीत असेलच ती म्हणजे"धरणे" एखाद्या गोष्टीचा निषेध म्हणून पाचपन्नास माणसं दिवसभर एका जागी बैठक मारुन बसतात त्याला "धरणे धरुन बसने " असा शब्द प्रयोग प्रचलित आहे. साधारणपणे मोठ्या चौकात किंवा सरकारी कार्यालयापुढे असे " धरणे" धरले जाते बंद. हरताळ. या गोष्टी आपल्या सर्वांचा परिचय असतो. प्रत्त्येक चळवळीत असे अनेक मार्ग चोखाळले जातात. आपले म्हणने मान्य होत नाही म्हणून गावकरी एखाद्या मंत्र्याला गावात प्रवेश नाकारतात. किंवा घेराव घालतात कधी हमरसते वाहतुकीला बंद करतात. रेल्वे अडविणे. या मार्गाचा ही अवलंब केला जातो " सत्याग्रह" हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे हेही तुम्ही अनुभवाने शिकला असाल एखाद्या मागणीसाठी चळवळ उभी करताना जरुर तर शासनाने घातलेले निर्बंध मोडणे आणि त्याबद्दल होणारी शिक्षा सविकारणे असे साधारण सत्याग्रहाचे स्वरूप असतें या सर्व प्रकारांचा चळवळीच्या वेळी उपयोगी केला जातो शहरवासीयांना बंद. मोर्चे. धरणे. हे मार्ग जास्त व परिचयाचे असतात तर लहान गावात राहणा-या लोकांना गावबंदी. घेराव. रस्ता रोको. यांचा जवळून परिचय असतो. शिवाय उपोषण हे राजकीय चळवळीत प्रभावशाली हत्यार म्हणून वापर केला जातो. तुम्ही या कृतीमध्ये कधी सहभागी झाला नसलात तरि त्या पाहिलेल्या ऐकलेल्या नक्किच असतील. या कृतीमुळे आपल्याला राजकारणातील वादग्रस्त प्रदर्शनाचे आकलन होते आणि राजकीय वाद कसे व्यक्त होतात यांचीही आपणांस कल्पना येते. 

    शासकीय आॅफिस मध्ये आज ग्रामपंचायत. पंचायत समिती. जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका तहसिलदार कार्यालय प्रांत आॅफिस. वन विभाग. जलसंधारण विभाग. महावितरण कंपन्या. महसूल विभाग. जिल्हाधिकारी कार्यालय. कामगार विभाग. विविध संस्था. राजकीय सामाजिक विभाग. आर्थिक विभाग.पुरवठा. विभाग माहिती अधिकार अशा एक नाही अनेक विभागांत. लोकांनी आपली निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज स्मरण पत्र. विविध विषयांचे पत्र व्यवहार केले आहेत आपल्या नागरि सनद मध्ये कोणता पत्र व्यवहार किती दिवसात निकाली काढायचा आहे यांच्या सूचना देऊन सुध्दा. काही शासकीय व इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी कामात कामचुकार पणा करत आहेत त्यामुळे आजही. प्रत्त्येक विभागातील असे विविध पत्र व्यवहार जर काढले तर लाखोंच्या पटीत निघतील. या अधिकारी व कर्मचारी यांच्या गलथान कारभारामुळे सर्वसामान्य जनता मोर्चे आंदोलने हे मार्ग निवडत आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेचे शोषण इतर पक्षगार करत आहेत. त्यामुळे विविध शासन निर्णय शासन काढत आहे तर असा एक शासन निर्णय शासनाने काढला पाहिजे की वेळेत ज्या अधिकारी व कर्मचारी यांनी पत्रव्यवहार निकालात काढला नाही. त्यांना आर्थिक दंड म्हणून अर्ज पत्रव्यवहार दाखल करणार्या व्यक्तिला एक ठराविक रक्कम कामात कुचराई केल्याबद्दल देण्यात यावी. म्हणजे यांच्या पगाराला कात्री लागल्याशिवाय हे आपले काम वेळेत करणार नाहीत. यामुळे मोर्चे निघणार नाहीत. ज्या कारणांमुळे मोर्चा काढण्यात आला आहे ज्या विभागामुळे ही परस्थिती निर्माण झाली आहे त्याची सर्व नुकसान भरपाई संबंधित विभागांवर घालण्यात यावी 

            समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

वृक्षारोपण एक फॅशन

 


वृक्षारोपण एक फॅशन

          "वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे ". एक मुल एक वृक्ष " "वृक्ष दिंडी " असे विविध प्रकारचे बोध वाक्ये आपल्याला वाचायला आणि ऐकायला एकदम बरी वाटतात. 

          प्राचिन काळात मूबलक जमीन भरपूर पाऊस होता त्यामुळे मोठ मोठी वृक्षांची घनदाट जंगल आपणांस आज पुस्तकात वाचायला आणि बघायला मिळतात. आपल्याला आज ज्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे त्याला आपणच कारणीभूत आहोत. आपल्या इच्छा आकांक्षा वाढल्या लोकसंख्या वाढली राहण्यास जागा कमी पडायला लागली म्हणून आपण आपला मोर्चा जंगलाकडे वळविला. मोठ्या प्रमाणात जंगलतोड केली. लोकसंख्या वाढल्यामुळे वाढते औद्योगिकीकरण एम आय डी सी. विविध केमिकल कंपन्या. कारखानदारी. धुराडयातून बाहेर पडणारा विषारी वायू यामुळे जनजीवन विस्कळित झाले. वृक्ष भरपूर होते त्यामुळे वातावरण स्वच्छ होतें आणि जशी झाडांची कत्तल सुरू झाली तशी वातावरणात आॅकसीजन कमतरता जाणवायला लागली. कोरोना काळात लोक आॅकसिजन साठी मोठ्याप्रमाणात मरायला लागली. काही घरांत मेली काही तडफडून मेली. आपण केलेल्या कामाची पोचपावती आपणांस या रुपात मिळाली. एका बाजूला सरकार वृक्षतोड थांबवा. म्हणत आहे आणि एकाबाजूला कारखाने केमिकल कंपनी व विविध ठिकाणी बाॅयलर साठी लागणारे लाकूड याच वृक्षतोडीमुळे उपलब्ध होत आहे याला काय म्हणायचं. म्हणजे एका बाजूला वृक्षारोपण करून फॅशन साठी फोटो सूट करायचे आणि एका बाजूने भयानक वृक्षतोड करायचीच. झाड आपणास. औषधी वनस्पती. रक्षण करण्यासाठी. भरण पोषण शेतीचे. वातावरण मध्ये समतोल राखण्यासाठी जनावरांना चारा. जळाऊ लाकूड. इत्यादी माध्यमांतून आपणांस वृक्ष आपले पालक होऊन रक्षण करत असतात 

          अखेर ५ जून २०२१ उजाडला. तो म्हणजे वृक्षारोपण करण्यासाठी नेमलेला दिवस वृक्षारोपण करण्यासाठी आपणाकडे कारणें बरिच असतात. वृक्षारोपण दिन म्हणून. वाढदिवस. स्मृती दिनानिमित्त. कार्यक्रमात भेट म्हणून देण्यासाठी. नामांकित व्यक्ती नेते पुढारी यांची मनधरणी करण्यासाठी. एक मुल एक झाड म्हणून. मोकळे भूखंड मोफत हस्तांतर करण्यासाठी. अशी एक नाही अनेक कारणें आपणांस वृक्षारोपण करण्यासाठी वापरली जातात हे आपण बघतो

           वृक्षारोपण दिवस निश्चित केला जातो. मांडव. घातला जातो. रस्त्याच्या कडेला विधुत वाहिन्यांच्या बरोबर खाली वृक्षारोपण करण्यासाठी जागा निवडली जाते. एक नामांकित व्यक्तीच्या. वडील आई. फेडरेशन यांच्या. स्मृती दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात येथे. खड्डे काढण्यासाठी माणूस. बिगर पैशांचा. झाड बिगर पैशाची. शासन दरवर्षी ३३ कोटी वृक्षलागवड करण्याचे ध्येय प्रत्येकाला देण्यात येथे. त्या प्रमाणे नियोजन केले जाते का ? कार्यक्रमाच्या ठिकाणी बरिच मंडळी नेत्यांचे प्रमुख पाहुणे यांची वाट पाहत असतात. आणि एक वेळ पाहुणे येतात आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष होतो. भाषण. मनोगत. सत्कार सोहळे. पार पडतात. नेता खड्ड्याजवळ जातो मग त्याच्या हातात झाड आणून दिले जाते. पाण्याची बादली जवळ असते नेता खड्ड्यात झाड सोडतो त्या झाडांची पिशवी सुध्दा काढलेली नसते. माती झाकून एक झाड लावलें जाते. आणि मग चालू होतों फोटो सेकसन. प्रत्येकजण त्या झाडाला हात लावून फोटो काढतो. आणि सर्वजण कार्यक्रमाच्या ठिकाणाहून निघून जातात. पाऊस असतो झाड जगतात का मरतात याकडे कोणीही मागें वळून पाहत नाही. खड्डा असतो पण तेथे झाड नसते. वृक्षारोपण केल्यावर त्या झाडांचे संवर्धन रक्षण करणे हे सुद्धा आपले काम आहे. वृक्षारोपण कार्यक्रमात लावण्यात आलेली झाडे. जगत नाहीत कारण त्यांना रस्त्यावरील जनावरे. गाढव. शेळ्या. खाऊन टाकतात. आणि त्यातून काही झाड जगली तर ती बरोबर विधुतवाहिनी खाली असल्यामुळे. तारांना अडचण होते म्हणून वायरमन लोक प्रत्त्येक मंगळवारी तोडतात त्यांना वाढून दिलें जातं नाही मग वृक्षारोपण करून काय फायदा झाला. ज्याप्रमाणे वृक्षारोपण करताय तसेच त्यांना जागविण्याचा प्रयत्न करु नका. तर आपली जबाबदारी म्हणून त्याला वाहून घ्या. आपल्या मुलाप्रमाणे झाडांचे संगोपन करा. आपल्या मुलांचे संगोपन आपण फॅशन म्हणून करतं नाही तर आपले परम कर्तव्य म्हणून पार पाडत असतो

                बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर यांनी २०/७/२०१९ रोजी इस्लामपूर शहरात करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात लावण्यात आलेल्या झाडांची संगोपन करण्याची आमच्या युनियनला जबाबदारी द्या अशी मागणी केली होती. पण त्यात सुध्दा राजकारण आल आणि हजारो लावलेली झाडे. खड्डे तिथेच राहिले पण त्यात झाड नव्हती. अशा विविध संस्था सेवा संस्था. संघटना. समाजसेवक. आहेत की कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता झाडांसाठी आपले जीवन समर्पित करणारे आहेत. 

      वृक्ष जगवा पर्यावरण वाचवा. हे घोषवाक्य ध्यानात घेवून. वृक्षारोपण करा. हजार झाडे लावण्यापेक्षा शंभर दोनशे लावा आणि तेवढीच जगवा. वर्षाच्या वर्षाला. सर्वे करुन आपण झाड लावली किती आणि त्यातली आपण जगवली किती याचा अभ्यास करा. 

              "चिपको आंदोलन " आठवा. आदिवासी लोकांसारखे झाडांवर प्रेम करा. वृक्षतोड करताना विरोध करण्यासाठी स्वता झाडाला मिठी मारली आणि आम्हाला आगोदर कापा आणि झाड नंतर कापा. ही तयारी फॅशन करण्यासाठी किंवा दिखावा करण्यासाठी नव्हती तर खरेखुरे झाडांवर असणारे प्रेम होते

       समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

घोड्याचा चष्मा -A Munde

 


घोड्याचा चष्मा

             सरळ आणि एका रेषेत चालणे फक्त आणि फक्त समोरचं बघणे आपल्या आजूबाजूला काय चाललंय. आपण काय करायला पाहिजे. ही मानसिकता संपने. "सर्वांचं होईल ते माझे होईल " माझ मला हुईना बाकिच बघायला मला कुठ वेळ आहे. आपलं झालं नव्ह का मग बाकिचे काही बघायचे काम नाही. असे मत आज सर्व सामान्य माणूस नव्हे तर शासकीय क्षेत्रात झाले आहे. आज आपलं मत आपला विचार बदलण्याची गरज आहे. 

          अज्ञान/ अंत्ययवाद/अंधश्रद्धा /गरिबी/जातीयवाद/बंडखोरी /अन्याय/प्रादेशिक अस्मिता /वैचारिक भिननता /जात/ धर्म /वर्ण/फुटिरता/निरक्षरता/ राजकीय शिक्षण/ दहशतवाद/ भ्रष्टाचार/गुंडगिरी/ विकलांग विरोध/ लोकसंख्या/ महागाई /बेरोजगारी/ महिला अत्याचार/ देशनिषटा/ देशद्रोही/ धरणे/ बंधारे/ कालवे/ रस्ते/ वीजपुरवठा/ पाणी पुरवठा/  शासकीय/ अन्न धान्य पुरवठा विभाग/ कामगार विभाग/बांधकाम विभाग/ महसूल विभाग/ शिक्षण/आरोग्य/विमा/विज्ञान आणि तंत्रज्ञान/ नागरि स्वातंत्र्य/ अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती इतर मागासवर्गीय/ आदिवासी/ संघटित असंघटित कामगार/ व्यापार आणि औद्योगिक/ विकासवादी पर्यावरणवादी/ समतावादी समरसवादी/ अतिरेकी नक्षलवादी/ घुसखोरी/अल्पसंख्याक आणि बहुसंख्यांक) पांढरपेशा व बहुजनसमाज/ हरिजन आणि दलित/किसान कामगार/ गिरणी संप/ तेलंगणा लढा/ महाड सत्याग्रह/ दांडी यात्रा/ काळाराम प्रवेश/वंगभग चळवळ/१८५७ चा उठाव/जालियनवाला बाग हत्याकांड/ रंग/ निवडणूक चिन्ह/ राष्ट्रीय चिन्ह/ राष्ट्रध्वज/ समतेचा हक्क/स्वातंत्र्याचा हक्क/ शोषनाविरोधी हक्क/धार्मिक स्वातंत्र्य/ शैक्षणिक व सामाजिक/ सवैधानिक उपाययोजना/ प्रसार माध्यमे/ व्यवस्था/लोकशाही/ राजेशाही/ घराणेशाही/निजामशाही/ उदारमतवादी शासनपदधदती/ समाजवादी प्रारुप/ अक्षर निष्ठा/ व केंद्रिकरण आणि विकेंद्रीकरण/सामाजिक आर्थिक/ राजनैतिक/न्याय विचार/ विश्वास श्रद्धा/ अंधश्रद्धा/ सुरक्षा दले/ आंदोलन/ चळवळ/मनोविज्ञान/प्रवास वाहतूक/ बंद/ मोर्चे/ उपोषण/ सत्याग्रह/ माहीतीचा अधिकार / व्यसनमुक्ती/ बालमजुरी बंद/ लोककला/ 

            वरील प्रमाणे सर्व विषय मांडण्याचे कारणं आहे की. आपल्या आजूबाजूला बरेच असे प्रकार घडतात उदा. छेडछाड प्रकरण.  मारामाऱ्या. अपहरण. लुट. मग ती शासनाच्या अधिकारी व कर्मचारी यांचेकडून असो किंवा इतर कोणाकडून असो आपण आवाज उठविण्याची गरज आहे पण आपल्याला आज अशी सवय लावली आहे लागली आहे त्याकडे दुर्लक्ष करा. मी माझे कुटुंब आणि मी ही मानसिकता तयार झाली आहे.  छेडछाड करणारे मोठ्याने हसत असतात आणि पिडीत मुलगी मदतीसाठी हाक मारत असते आपण पुढे जात नाही कारण छेडछाड करणारे कोणत्या नेत्यांच्या पुढार्यांचे बगलबच्चे आहेत कोण त्यांच्या तोंडाला लागणार.  शेजारी होणारी भांडणे सोडवायला सुध्दा आपण जात नाही. खासगी सावकारी संबंधित आपण आवाज उठवत नाही. रेशन दुकानदार. भाजीवाले. किराणा दुकानदार. ग्राहकांना डबल भावात जीवनावश्यक वस्तू विकतात आणि मोठा आर्थिक नफा मिळवता आपण आवाज उठवतो का ? नाही कारणं आपण घोड्याचा चष्मा घातला आहे

              कोणत्याही समाजामध्ये सामाजिक राजकीय आर्थिक सांस्कृतिक इत्यादी स्वरूपाच्या विविध समस्यांकडे पाहण्याचे भिन्न भिन्न मत प्रवाह तयार केले आहेत त्यातूनच व्यक्ति आणि वयकतिगटात संघर्ष निर्माण होऊन लोकांमध्ये फुट पाडण्याचे काम राजकारणी यांनी केलं आहे.  पारंपारिक राजकारणाच्या चौकटीत महिला पर्यावरण.  विज्ञान आणि तंत्रज्ञान. आरोग्य. अंधश्रद्धा. इत्यादी संदर्भात समसयाचाच फारसा गंभीरतेने. पूर्वी कधी विचार झाला नाही.  राजकीय पक्षाचे लक्ष केवळ निवडणुका सत्ता संपादन.  याकडे लक्ष आहे.  म्हणजे आपण आवाज उठवावा का नाही.  कारणं आपणाला याच काही देनघेण नाही.  आपण घोड्याचा चष्मा घालून सर्व काही पुढचं बघतो. बाजूंचे बघायला आपणास वेळ कुठ आहे

            २०२० ला एक महामारी संकट आलं आणि गाडीला घुणा लागावा तसा माणवी जीवनाला घुणा लागला सर्व काही जनजीवन विस्कळित झाले.  महामारी संकटापासून वाचण्यासाठी शासनाने टाळेबंदी पुकारली आणि गोरगरीब जनता शेतकरी बांधकाम कामगार.  फळें फुले भाजीपाला विक्री करणारे.  वडापाव गाडी.  चायनिज.  हाॅटेल. रेस्टॉरंट.  घरकाम करणाऱ्या महिला.  पापड लोणची चटण्या तयार करणार्या महिला.  वडाप करणारे वाहन वाले.   मालवाहतूक करणारे वाहन मालक चालक.   एस टी कामगार.  विविध कंपन्यांचे कामगार बेरोजगार झाले.  अशा विविध ठिकाणचे कामगार टाळेबंदी काळात घरातच अडकून पडले त्यामुळे त्यांच्या हाताला काम नाही त्यामुळे हातात पैसा नाही त्यामुळे त्यांच्या वर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली ही आलेली बिकट वेळ काही कुटुंब कर्त्ये पालनपोषण करणारे. यांना आपल्या कुटुंबाची उपासमारीची पाळी बघविली नाही. त्यांनी आत्महत्या सारखें मार्ग निवडले आणि आपलीं जीवन यात्रा संपवली. शासन म्हणतंय तेव्हा टाळेबंदी आहे पेशंट येथे वाढले येथे कमी झाले. शासनाच्या मनात येईल तेव्हा शासन टाळेबंदी जारी करत आहे आणि मनात येईल तेव्हा उठवत असे. आपणांस आवाज उठविण्यासाठी बाजूंचे दिसताच नाही कारणं आपण घोड्याचा चष्मा घातला आहे. सर्वांचे होईल ते माझे होईल. हा विचार मनात खोलवर बसला आहे. 

             समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज इत्यादी दाखल करणारे सवताचे मुद्दे घेऊन भांडत नाहीत. समाजातील समाजावर व्यक्तिवर विविध मागण्यासाठी करत असतात. उपोषणाला बसणारे. त्यात त्यांचं हीत कमी असते पण समाजांचा विचार जास्त असतो. त्यामुळे आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये निवेदन उपोषण विविध मागणी अर्ज दाखल करणार या व्यक्तिच्या मागे खंबीरपणे उभे राहणे आपलेच काम आहे आपण अस काय करतो का ? नाही कारणं आपण सर्वांनी घोड्याचा चष्मा घातला आहे आपल्याला आपल्या पुरते दिसते बाजूंचे दिसत नाही आणि आपणं बघत नाही ही आपली मानसिकता आहे

                बांधकाम कामगार नोंदणीच्या नावाखाली विविध संघटना युनियन सेवाभावी संस्था हे कामगारांचे आम्ही हितचिंतक असल्याचा आव आणतात पण त्यातूनच दलाल एजंट बांधकाम कामगारांना लुटत आहेत  एम पी सी स्पर्धा परीक्षा पास झालेले विद्यार्थी. २०१७ पासून व्यायाम करत आहेत पोलिस भरती.  शासकीय क्षेत्रातील. भरती  निघेल. आपण आपल्या आई वडिलांच्या साठी काही तरी करु अशी मानसिकता आहे पण आज अशी काही मुले आहेत त्यांचे वय आत्ता सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे निघून गेले आहे. वय जास्त झाल्यामुळे लग्न होत नाही. नोकरी नाही भिक मागू शकत नाही.  भरती आहे म्हणून वेळोवेळी भरतीसाठी आॅनलाइन अर्ज केले आहेत एका अर्जाचा खर्च सहासे रुपये धरला तर माझ्या अंदाजे कमीत कमी दहा लाख मुले भरतीसाठी उतरणार होती मग. ६००+ १० दहा लाख किती झाले एवढे पैसे गेले कुठे सर्वांना नुकसान भरपाई मिळते मग या एम पी सी स्पर्धा परीक्षा पास झाले ज्यांनी आॅनलाइन पध्दतीने अर्ज केले ती रक्कम व्याजासह परत द्यायला हवी. मी माझे मत मांडले आहे मला माहित आहे आपण सर्वजण आवाज उठवणार नाही कारण आपण सर्वांनी घोड्याचा चष्मा घातला आहे. आत्ता तरी जाग व्हा नाहीतर

          राजकारणी आणि अर्थकारण करणारे एवढेच सुखी राहणार आहेत. शासनाला खरोखरच जनता जगवायची आहे तर. एक किलो तांदूळ एक किलो गहू देण्यापेक्षा. जनतेची कर्जे माफ करा. नाहीतर कमीत कमी त्या रककमेचे व्याज तरी माफ करण्याच धाडस तुमच आहे ते बघा.  आपण असेच मरणार आहोत. विद्यार्थी.  शेतकरी. कामगार. आणि सर्वसामान्य माणूस.  आत्महत्याच करणारं आणि मरणार कारणं.  टाळेबंदी काळात. सर्वकाही चालू आहे बंद आहे ते कामगारांचे काम भयानक महगाई. यामुळे एक वेळ अशी येईल की आपली घर दार शेती. हे अर्थकारण करणारे लिहून घेणारं. कारणं त्यांचे कर्ज आहे त्याचे व्याज सुध्दा भरायला आपल्याला जमणार नाही. आणि हेंच पुढचे आपले आणि आपल्या मुलांचे भविष्य आहे.  मुलाला नोकरी नाही म्हणून आई वडील मरणार मुलीचे लग्न होत नाही म्हणून आई वडील मनात झुरणार. एकंदरीत चारी बाजूने सर्वसामान्य जनता मरणार आत्ता तरी घोड्याचा चष्मा उतरा आणि जागे व्हा.  आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी. आपल्या मुलाच्या साठी. आपल्या समाजासाठी. आपले कर्तव्य म्हणून घोड्याचा चष्मा उतरा. नाहीतर आपण जन्माला येवून आपले जीवन गुलामगिरीत गेल काय तोंड दाखवणार. माझ कामच आहे लिहणयाच कारणं वेळ आली आहे तशी. तुम्हाला विचार करायचा आहे 

        समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांचेकडे?

अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांचेकडे



            भारताच्या संविधानाने सर्वांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे परंतु दलित आणि आदिवासी भटके विमुक्त. अनुसूचित जाती जमाती. यांच्या हक्काचे उल्लंघन व राजकारण होताना आपणास दिसतें. या गोष्टींना प्रतिबंध घालण्यासाठी देशातील अनुसूचित जाती जमाती लोकांना संरक्षण देण्यासाठी १९८९ साली अत्याचार प्रतिबंधक कायदा अंमलात आणला. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली या कायद्याची समिती व कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीला दरवर्षी केंद्राला अहवाल सादर करावा लागतो. प्रत्त्येक जिल्ह्यात ही समिती कार्य करत आहे. त्यांचे अधक्ष जिल्हाधिकारी असतांत तर समिती मध्ये इतर कार्यकर्ते म्हणून दलित चळवळीचे कार्यकर्ते. सरकारी वकील यांची नियुक्ती केली जाते. या समितीच्या माध्यमातून अत्याचार प्रतिबंधक अंतर्गत दाखल प्रकरणे निकाली काढली जातात. व त्यांना प्रोत्साहन अनुदान देणे आदी कामे पार पाडली जातात. तक्रारदारांनी अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार दाखल प्रकरणे नोंदवून घेणे. व त्यांचा योग्य रीतीने तपास करणे. याचे अधिकार पोलिस उपनिरीक्षक यांना आहेत. या कायद्यात अनेक त्रुटी असल्याने अत्याचार प्रतिबंधक प्रकरणे पोलिस स्टेशनला दाखल होत आहेत. मात्र शिक्षेचे प्रमाण कमी असल्यामुळे. माणसांवर म्हणावा तसा दबाव नाही. या कायद्याची अंमलबजावणी करण्याची व त्याबद्दल जनजागृती समुपदेशन. मनात असणारी सर्वसामान्य माणसाची भीती नष्ट करण्याची आज गरज आहे. याची सर्व जबाबदारी पोलिसांच्या शिरावर आहे त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिये नंतर संबधिताला शिक्षा लागू शकते.  

        आज या अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत उद्रेक होण्यास सुरुवात झाली आहे. या कायद्यात बदल करण्याची मागणी सर्व अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती मागासवर्गीय. आदिवासी. मराठा समाज मोर्चे. अशा विविध संघटना सेवाभावी संस्था युनियन करत आहेत. हा केंद्रिय कायदा आहे. त्यामुळे सरकारला त्यात कोणतीही पळवाट काढता येणार नाही. जानेवारी २०१६ मध्ये या अत्याचार प्रतिबंधक कायद्यात बदल केला आहे. पूर्वी हा अजामीनपात्र गुन्हा होता आत्ता या खटल्यात जामीन करता येतो. अन्यायग्रस्त पिडित व साक्षीदार यांचें हक्क या नवीन चॅपटरचा समावेश करण्यात आला आहे. आणि त्याची माहिती गुन्हा दाखल करताना फिर्यादीला. देणे बंधनकारक आहे. अशा प्रकरणांचा तपास दोन महिन्यांत पूर्ण करण्याची आणि खटल दोन महिन्यांत सोपविण्याची कालमर्यादा निश्चित केली आहे. २०१७ रोजी मुख्यमंत्री यांनी नुकतीच कायद्यात सुधारणा करण्याची ग्वाही मराठा समाजाला दिली आहे. त्यामध्ये एकादा तक्रारदार अत्याचार प्रतिबंधक कायदा विषयक तक्रार करायची असेल प्रथम खातरजमा करण्यासाठी जिल्हाधिकारी निहाय. जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली एक समिती नेमली जाणार आहे. या समितीच्या माध्यमातून तक्रार घेतली जाणार आहे. लवकरच हा आदेश जारी केला जाणार आहे. मात्र हा आदेश केवळ राज्यात मर्यादित करणे शक्य नाही. केंद्राने यांवर निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यामुळे यांवर सध्या शासनाचा अभ्यास विचार चालू आहे. 

          राज्यात २०११/ते २०१६ या काळात ८/ हजार ६९८ अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार प्रकरणे घडली त्यामध्ये शिक्षा लागण्याचे प्रमाण केवळ ६.४१ टक्के आहे. काही प्रकरणे विनाकारण नेत्यांनी नोंदविला आहेत. तर काही आपला अंतर्गत हेवा धेवा काढण्यासाठी नोदविली आहेत. तर काही प्रकरणे तपास पूर्ण न झाल्याने निर्दोष केली आहेत. सांगली जिल्ह्यात १६०) अॅटाॅसिटीची प्रकरणे पोलिस स्टेशनला नोंदविला गेली आहेत. त्यापैकी त्यांचे शिक्षेचे प्रमाण केवळ दोन टक्के आहे सध्या अॅटाॅसिटी गुन्हा नोंदविताना मोठी मोठी खबरदारी घेतली जात आहे. फिर्यादीने दिलेली तक्रारींवर योग्य ती शहानिशा करूनच गुन्हा नोंद केला जात आहे. त्यामुळे या कायद्याचा दुरुपयोग करणार्यांना चाफ बसला आहे. आणि खरोखरच अन्याय झाला आहे त्यांना न्याय मिळत आहे. 

              अॅटाॅसिटी दाखल करण्याची कारणें. जातीयवाद. जातीयभावनेतून शारीरिक इजा करणे. अपमान करणे. नग्न धिंड काढणे. जमीनीचा गैरप्रकारे उपभोग घेणे. वेठबिगारी करण्यास भाग पाडणे. अतिक्रमण करणे. महिलाचा छळ. विनयभंग. लैंगिक छळ. अनुसूचित जाती व जमाती व्यक्तिच्या विरोधात गुन्हे दाखल करणे. प्रार्थना स्थळे. नदि. विहिरी. तलाव. पाणवठे. सार्वजनिक ठिकाणी येण्यास विरोध. प्रवेश नाकारणे. 

          समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठीी >

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

 


     जिल्हाधिकारी यांचेसाठी मार्गदर्शक सूचना

      देशांचा कणा मानला जाणारा तो शेतकरी. विदर्भ मराठवाडा यामध्ये. अवेळी अवकाळी पडणारा पाऊस दुष्काळ.  ओला दुष्काळ व पाणीटंचाई कोरडा दुष्काळ. शेतीसाठी लागणारे बि बियाणे. रासायनिक खते. शेतीची मशागत मेहनत. यासाठी लाखो रुपये खर्च येतो आणि निसर्गावर अवलंबून असणारा शेतकरी कर्जात बुडत आहे. त्यामुळे. आज हजारो शेतकऱ्यांनी. कर्जाला कंटाळून अखेर आत्महत्या केल्या. वेळोवेळी शेतकरी न्याय देण्यासाठी आंदोलने. फक्त मतदान आल्यावर नेते पुढारी यांना शेतकऱ्यांची आठवण होते आणि मग आंदोलन संपले की पुन्हा शेतकरी डोक्याला हात लावून केविलवाणा चेहरा करून शेताकडे व आभाळाकडे बघतो आहे. शासनाने या सर्व गोष्टींचा विचार करून विविध योजना चालू केल्या त्यातील महत्त्वाची योजना म्हणजे " महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९" चालू करण्यात आली आणि मा जिल्हाधिकारी यांना ही योजना राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या

     # तपशील#

(१) योजनेचे उद्दिष्ट

(२) योजनेचे वैशिष्ट्य

   अ. योजनेचा निकष

   ब. अपात्रता 

(३) कार्यपद्धती

(४) जिल्हास्तरीय समितीची रचना व कार्यपद्धती

(५) जिल्हाधिकारी व इतर संलग्न विभागाची भूमिका

    (१) योजनेचे उद्दिष्ट 

* शेतकऱ्यांना खरीप  २०२० या हंगामात कर्ज घेण्यासाठी पात्र करणे

* सुमारे ३० लाख शेतकऱ्यांना अल्प मुदत पीक कर्ज मिळण्यासाठी सक्षम करणे

    (२) योजनेचे निकष

* अल्प मुदत पीक कर्ज/ हंगामी पीक कर्ज व किसान क्रेडिट कार्डचे योजनेअंतर्गत

*. पुनर्गठित कर्ज / मध्यम मुदत कर्जात रुपांतरीत अल्प मुदत पीक कर्ज

*. यामध्ये सोनं तारण पीक कर्जाचा अंतर्भाव करण्यात आलेला नाही

* अल्प मुदत पीक कर्ज

   (१) दि ०१/०४/२०१५ ते ३१/०३/२०१९ या कालावधीत वितरित केलेलें कर्ज

    (२) दि ३०/०९/२०१९ अखेर थकित ( मुद्दल+ व्याज ) व परतफेड न केलेली कर्ज

* ‌पुनगरगठित कर्ज

(१) दि. ०१/०४/२०१५ ते. ३१/०३ / २०१९ या कालावधीत वितरित केलेलें अल्प मुदत पीक कर्ज

(२) तसेच दि ३१/०३/२०१९ अखेर मध्यम मुदत कर्जात रुपांतरीत कर्ज

(३) वरिल कर्जाचे दि. ३०/०९/२०१९ अखेर थकित ( मुद्दल + व्याज मिळून ) आणि परतफेड न झालेले हप्ते

(४) दि ३०/०९/२०१९ अखेर मुद्दल व व्याजासह केवळ रु २ लाख या मर्यादेपर्यंत थकित व परतफेड न झालेले अल्प मुदत पीक कर्ज खाते पात्र असतील

     # योजनेचे अपात्र व्यक्ति #

* आजी/माजी / राज्य मंत्री/ राज्य सभा  सदस्य / विधानसभा व विधानपरिषद सदस्य

* केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी व कर्मचारी ( रु २५०००. पेक्षा जास्त मासिक वेतन असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून

*. राज्य शासनाच्या सार्वजनिक उपक्रमाचे अधिकारी व कर्मचारी ( महावितरण.  परिवहन मंडळ.  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ इ ) आणि अनुदानित संस्थांचे अधिकारी व कर्मचारी ( रु २५००० पेक्षा जास्त मासिक वेतन असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून) 

* शेती बाह्य उत्पन्नातून आयकर भरणारया व्यक्ति 

* रु २५००० पेक्षा जास्त मासिक निवृत्ती वेतन घेणारे व्यक्ति ( माजी सैनिक वगळून) 

* खालील संस्थांचे अध्यक्ष/ उप अधक्ष. / संचालक व अधिकारी ( रु २५००० पेक्षा जास्त मासिक वेतन असणारे) 

* जिल्हा मध्यवर्ती बँका. / नागरि सहकारी बँक /सहकारी साखर कारखाने / सहकारी दूध संघ /सहकारी सूत गिरणी / कृषी उत्पन्न बाजार समिती 

 # प्रमुख वैशिष्ट्य#

* आधार क्रमांक निश्चित करण्याचा मूलभूत घटक

* प्रति लाभार्थी रु २ लाख पर्यंत लाभ

* एकापेक्षा अधिक अर्ज खाते असलेल्या व एकापेक्षा अधिक बॅंकेचे कर्ज खाते असलेल्या लाभार्थ्यांना सर्व कर्ज मिळून रु २ लाख या मर्यादेपर्यंत लाभ मिळणार

* खालील बॅंकांनी दिलेल्या अल्प मुदत पीक कर्ज योजनेसाठी पात्र

* राष्ट्रीय कृत बॅंका / खाजगी बँका/ग्रामीण बॅंका / जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक/ वि का स संस्था ( जिमस बॅंका मार्फत)

* वि का स संस्था ( सवनिधी)

     # कार्यपद्धती #

* योजनांची घोषणा

* पात्रता /अर्हता दिनांक/ लाभाची रक्कम/अपवरजन/अपात्र यादी/योजना प्रकिया /आधार/प्रामाणिकरण

  # प्रसिद्धी #

* रेडिओ/दुरचित्रवाणी /वृत्तपत्र/मॅसेज मोहीम/समाज माध्यम 

    # व्यापारी बॅंका #

* आधार संलग्न नसलेल्या कर्जदार यादी तयार करणे / पोर्टल आधार संलग्न कर्ज खाती यादी अपलोड करणे /उर्वरित खाते आधार संलग्न करून अपलोड करणे

     # वि का स संस्था#

* आधार संलग्न नसलेल्या कर्ज खाते यादी तयार करणे/ कर्ज खाती तपासणी/ ले प करणे /आधार लिंक अपलोड करणे / उर्वरित खाते आधार संलग्न करून अपलोड करणे 

     # जिल्हा स्तरीय समितीची रचना आणि कार्यपद्धती#


*. जिल्हाधिकारी / मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद /जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी/ जि म स बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी /व्यवस्थापक अग्रणी बँक/ जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था

* पोर्टल द्वारे प्राप्त तक्रारी दाखल घेणे /जिल्हा स्तरीय समिती पोर्टल लाॅग ईन करून आॅनलाइन तक्रार पाहणे

/आॅनलाइन तक्रार.  / आधार क्रमांक न जुळणे /कर्ज खात्यातील रक्कम न जुळणे

* आॅफलाईन तक्रार

बॅंकेने अपलोड न केलेले कर्ज खाते 

    # जिल्हाधिकारी व इतर संलग्न विभागाची भूमिका# जिल्हाधिकारी यांचे कार्य

खालील बाबींची खात्री करणे

*. योजनेतील मुद्द्यांची तपशीलवार प्रसिध्दी करणे

* आधार संलग्न न झालेल्या खातेदारांची यादी गावनिहाय प्रसिद्ध करणे

* योजनेच्या अंमलबजावणीत सक्रिय सहभाग घेण्याबाबत क्षेत्रीय यंत्रणेचे प्रबोधन करणे

* विविध पातळीवर योजनेच्या प्रगतीचे /अंमलबजावणी संनियंत्रण करणे 

* कर्ज खाते आधार संलग्नीकरण

* बॅंकांकडून कर्ज खाते माहिती अपलोड करणे

* आधार प्रमाणीकरण

* कालमर्यादेत तक्रार निवारण

* आपले सरकार सेवा केंद्र आवश्यक सुविधा सह सुरू असल्याची खात्री करणे

* जिल्ह्यातील यंत्रणा व आपले सरकार सेवा केंद्र चालक यांचें प्रशिक्षण व प्रबोधन करणे 

   # जिल्हाधिकारी चेक लिस्ट#

* बॅंका व वि का स संस्थांकडून आधार संलग्न न झालेली कर्ज खात्याची यादी प्राप्त करून घेणे

* योजनेच्या. जाहिराती साहित्य प्राप्त करणे

* प्रसिध्दी टिम

* आवश्यकता भासल्यास आधार नोंदणी सुविधा निर्माण करणे

* आपले सरकार सेवा केंद्र कार्यान्वित करणे

* माहिती अपलोड झाल्याची अथवा प्रलबिंत असल्याची सद्यस्थिती तपासणे

* यादी प्रसिद्ध करण्यासाठी ठिकाण व सुविधा निश्चित करणे

*आधार प्रामाणिकरणासठी कॅम्प/ शिबिर आयोजित करणे

        समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या