Showing posts with label घोड्याचा चष्मा. Show all posts
Showing posts with label घोड्याचा चष्मा. Show all posts

घोड्याचा चष्मा -A Munde

 


घोड्याचा चष्मा

             सरळ आणि एका रेषेत चालणे फक्त आणि फक्त समोरचं बघणे आपल्या आजूबाजूला काय चाललंय. आपण काय करायला पाहिजे. ही मानसिकता संपने. "सर्वांचं होईल ते माझे होईल " माझ मला हुईना बाकिच बघायला मला कुठ वेळ आहे. आपलं झालं नव्ह का मग बाकिचे काही बघायचे काम नाही. असे मत आज सर्व सामान्य माणूस नव्हे तर शासकीय क्षेत्रात झाले आहे. आज आपलं मत आपला विचार बदलण्याची गरज आहे. 

          अज्ञान/ अंत्ययवाद/अंधश्रद्धा /गरिबी/जातीयवाद/बंडखोरी /अन्याय/प्रादेशिक अस्मिता /वैचारिक भिननता /जात/ धर्म /वर्ण/फुटिरता/निरक्षरता/ राजकीय शिक्षण/ दहशतवाद/ भ्रष्टाचार/गुंडगिरी/ विकलांग विरोध/ लोकसंख्या/ महागाई /बेरोजगारी/ महिला अत्याचार/ देशनिषटा/ देशद्रोही/ धरणे/ बंधारे/ कालवे/ रस्ते/ वीजपुरवठा/ पाणी पुरवठा/  शासकीय/ अन्न धान्य पुरवठा विभाग/ कामगार विभाग/बांधकाम विभाग/ महसूल विभाग/ शिक्षण/आरोग्य/विमा/विज्ञान आणि तंत्रज्ञान/ नागरि स्वातंत्र्य/ अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती इतर मागासवर्गीय/ आदिवासी/ संघटित असंघटित कामगार/ व्यापार आणि औद्योगिक/ विकासवादी पर्यावरणवादी/ समतावादी समरसवादी/ अतिरेकी नक्षलवादी/ घुसखोरी/अल्पसंख्याक आणि बहुसंख्यांक) पांढरपेशा व बहुजनसमाज/ हरिजन आणि दलित/किसान कामगार/ गिरणी संप/ तेलंगणा लढा/ महाड सत्याग्रह/ दांडी यात्रा/ काळाराम प्रवेश/वंगभग चळवळ/१८५७ चा उठाव/जालियनवाला बाग हत्याकांड/ रंग/ निवडणूक चिन्ह/ राष्ट्रीय चिन्ह/ राष्ट्रध्वज/ समतेचा हक्क/स्वातंत्र्याचा हक्क/ शोषनाविरोधी हक्क/धार्मिक स्वातंत्र्य/ शैक्षणिक व सामाजिक/ सवैधानिक उपाययोजना/ प्रसार माध्यमे/ व्यवस्था/लोकशाही/ राजेशाही/ घराणेशाही/निजामशाही/ उदारमतवादी शासनपदधदती/ समाजवादी प्रारुप/ अक्षर निष्ठा/ व केंद्रिकरण आणि विकेंद्रीकरण/सामाजिक आर्थिक/ राजनैतिक/न्याय विचार/ विश्वास श्रद्धा/ अंधश्रद्धा/ सुरक्षा दले/ आंदोलन/ चळवळ/मनोविज्ञान/प्रवास वाहतूक/ बंद/ मोर्चे/ उपोषण/ सत्याग्रह/ माहीतीचा अधिकार / व्यसनमुक्ती/ बालमजुरी बंद/ लोककला/ 

            वरील प्रमाणे सर्व विषय मांडण्याचे कारणं आहे की. आपल्या आजूबाजूला बरेच असे प्रकार घडतात उदा. छेडछाड प्रकरण.  मारामाऱ्या. अपहरण. लुट. मग ती शासनाच्या अधिकारी व कर्मचारी यांचेकडून असो किंवा इतर कोणाकडून असो आपण आवाज उठविण्याची गरज आहे पण आपल्याला आज अशी सवय लावली आहे लागली आहे त्याकडे दुर्लक्ष करा. मी माझे कुटुंब आणि मी ही मानसिकता तयार झाली आहे.  छेडछाड करणारे मोठ्याने हसत असतात आणि पिडीत मुलगी मदतीसाठी हाक मारत असते आपण पुढे जात नाही कारण छेडछाड करणारे कोणत्या नेत्यांच्या पुढार्यांचे बगलबच्चे आहेत कोण त्यांच्या तोंडाला लागणार.  शेजारी होणारी भांडणे सोडवायला सुध्दा आपण जात नाही. खासगी सावकारी संबंधित आपण आवाज उठवत नाही. रेशन दुकानदार. भाजीवाले. किराणा दुकानदार. ग्राहकांना डबल भावात जीवनावश्यक वस्तू विकतात आणि मोठा आर्थिक नफा मिळवता आपण आवाज उठवतो का ? नाही कारणं आपण घोड्याचा चष्मा घातला आहे

              कोणत्याही समाजामध्ये सामाजिक राजकीय आर्थिक सांस्कृतिक इत्यादी स्वरूपाच्या विविध समस्यांकडे पाहण्याचे भिन्न भिन्न मत प्रवाह तयार केले आहेत त्यातूनच व्यक्ति आणि वयकतिगटात संघर्ष निर्माण होऊन लोकांमध्ये फुट पाडण्याचे काम राजकारणी यांनी केलं आहे.  पारंपारिक राजकारणाच्या चौकटीत महिला पर्यावरण.  विज्ञान आणि तंत्रज्ञान. आरोग्य. अंधश्रद्धा. इत्यादी संदर्भात समसयाचाच फारसा गंभीरतेने. पूर्वी कधी विचार झाला नाही.  राजकीय पक्षाचे लक्ष केवळ निवडणुका सत्ता संपादन.  याकडे लक्ष आहे.  म्हणजे आपण आवाज उठवावा का नाही.  कारणं आपणाला याच काही देनघेण नाही.  आपण घोड्याचा चष्मा घालून सर्व काही पुढचं बघतो. बाजूंचे बघायला आपणास वेळ कुठ आहे

            २०२० ला एक महामारी संकट आलं आणि गाडीला घुणा लागावा तसा माणवी जीवनाला घुणा लागला सर्व काही जनजीवन विस्कळित झाले.  महामारी संकटापासून वाचण्यासाठी शासनाने टाळेबंदी पुकारली आणि गोरगरीब जनता शेतकरी बांधकाम कामगार.  फळें फुले भाजीपाला विक्री करणारे.  वडापाव गाडी.  चायनिज.  हाॅटेल. रेस्टॉरंट.  घरकाम करणाऱ्या महिला.  पापड लोणची चटण्या तयार करणार्या महिला.  वडाप करणारे वाहन वाले.   मालवाहतूक करणारे वाहन मालक चालक.   एस टी कामगार.  विविध कंपन्यांचे कामगार बेरोजगार झाले.  अशा विविध ठिकाणचे कामगार टाळेबंदी काळात घरातच अडकून पडले त्यामुळे त्यांच्या हाताला काम नाही त्यामुळे हातात पैसा नाही त्यामुळे त्यांच्या वर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली ही आलेली बिकट वेळ काही कुटुंब कर्त्ये पालनपोषण करणारे. यांना आपल्या कुटुंबाची उपासमारीची पाळी बघविली नाही. त्यांनी आत्महत्या सारखें मार्ग निवडले आणि आपलीं जीवन यात्रा संपवली. शासन म्हणतंय तेव्हा टाळेबंदी आहे पेशंट येथे वाढले येथे कमी झाले. शासनाच्या मनात येईल तेव्हा शासन टाळेबंदी जारी करत आहे आणि मनात येईल तेव्हा उठवत असे. आपणांस आवाज उठविण्यासाठी बाजूंचे दिसताच नाही कारणं आपण घोड्याचा चष्मा घातला आहे. सर्वांचे होईल ते माझे होईल. हा विचार मनात खोलवर बसला आहे. 

             समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज इत्यादी दाखल करणारे सवताचे मुद्दे घेऊन भांडत नाहीत. समाजातील समाजावर व्यक्तिवर विविध मागण्यासाठी करत असतात. उपोषणाला बसणारे. त्यात त्यांचं हीत कमी असते पण समाजांचा विचार जास्त असतो. त्यामुळे आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये निवेदन उपोषण विविध मागणी अर्ज दाखल करणार या व्यक्तिच्या मागे खंबीरपणे उभे राहणे आपलेच काम आहे आपण अस काय करतो का ? नाही कारणं आपण सर्वांनी घोड्याचा चष्मा घातला आहे आपल्याला आपल्या पुरते दिसते बाजूंचे दिसत नाही आणि आपणं बघत नाही ही आपली मानसिकता आहे

                बांधकाम कामगार नोंदणीच्या नावाखाली विविध संघटना युनियन सेवाभावी संस्था हे कामगारांचे आम्ही हितचिंतक असल्याचा आव आणतात पण त्यातूनच दलाल एजंट बांधकाम कामगारांना लुटत आहेत  एम पी सी स्पर्धा परीक्षा पास झालेले विद्यार्थी. २०१७ पासून व्यायाम करत आहेत पोलिस भरती.  शासकीय क्षेत्रातील. भरती  निघेल. आपण आपल्या आई वडिलांच्या साठी काही तरी करु अशी मानसिकता आहे पण आज अशी काही मुले आहेत त्यांचे वय आत्ता सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे निघून गेले आहे. वय जास्त झाल्यामुळे लग्न होत नाही. नोकरी नाही भिक मागू शकत नाही.  भरती आहे म्हणून वेळोवेळी भरतीसाठी आॅनलाइन अर्ज केले आहेत एका अर्जाचा खर्च सहासे रुपये धरला तर माझ्या अंदाजे कमीत कमी दहा लाख मुले भरतीसाठी उतरणार होती मग. ६००+ १० दहा लाख किती झाले एवढे पैसे गेले कुठे सर्वांना नुकसान भरपाई मिळते मग या एम पी सी स्पर्धा परीक्षा पास झाले ज्यांनी आॅनलाइन पध्दतीने अर्ज केले ती रक्कम व्याजासह परत द्यायला हवी. मी माझे मत मांडले आहे मला माहित आहे आपण सर्वजण आवाज उठवणार नाही कारण आपण सर्वांनी घोड्याचा चष्मा घातला आहे. आत्ता तरी जाग व्हा नाहीतर

          राजकारणी आणि अर्थकारण करणारे एवढेच सुखी राहणार आहेत. शासनाला खरोखरच जनता जगवायची आहे तर. एक किलो तांदूळ एक किलो गहू देण्यापेक्षा. जनतेची कर्जे माफ करा. नाहीतर कमीत कमी त्या रककमेचे व्याज तरी माफ करण्याच धाडस तुमच आहे ते बघा.  आपण असेच मरणार आहोत. विद्यार्थी.  शेतकरी. कामगार. आणि सर्वसामान्य माणूस.  आत्महत्याच करणारं आणि मरणार कारणं.  टाळेबंदी काळात. सर्वकाही चालू आहे बंद आहे ते कामगारांचे काम भयानक महगाई. यामुळे एक वेळ अशी येईल की आपली घर दार शेती. हे अर्थकारण करणारे लिहून घेणारं. कारणं त्यांचे कर्ज आहे त्याचे व्याज सुध्दा भरायला आपल्याला जमणार नाही. आणि हेंच पुढचे आपले आणि आपल्या मुलांचे भविष्य आहे.  मुलाला नोकरी नाही म्हणून आई वडील मरणार मुलीचे लग्न होत नाही म्हणून आई वडील मनात झुरणार. एकंदरीत चारी बाजूने सर्वसामान्य जनता मरणार आत्ता तरी घोड्याचा चष्मा उतरा आणि जागे व्हा.  आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी. आपल्या मुलाच्या साठी. आपल्या समाजासाठी. आपले कर्तव्य म्हणून घोड्याचा चष्मा उतरा. नाहीतर आपण जन्माला येवून आपले जीवन गुलामगिरीत गेल काय तोंड दाखवणार. माझ कामच आहे लिहणयाच कारणं वेळ आली आहे तशी. तुम्हाला विचार करायचा आहे 

        समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या