Showing posts with label शेतकरी. Show all posts
Showing posts with label शेतकरी. Show all posts

तुकडजोड तुकडेबंदी अधिनियम १९४७ काय आहे?



 तुकडजोड तुकडेबंदी अधिनियम १९४७ काय आहे ?

          जमीनीचे तुकडे पडल्यामुळे शेती व्यवसाय तोट्यात जातो आणि शेती विकासाला खिळ बसते शेती विकासाला प्रोत्साहन देणे तसेच शेती उत्पादनात सुधारणा करणे. शेतीची उत्पादकता वाढविणे हा प्रमुख उद्देश ठेऊन तुकडेजोड तुकडेबंदी कायदा अंमलात आला आहे जमीनीचे तुकडे पाडून त्याचे बिगरशेती करून कोणताही जमीन व्यवहार शासनाला न कळविता. संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांची कोणतीही परवानगी नाही. असे रोजच व्यवहार महसूल विभागात होत होते. त्यातुन होणारी शासनाची फसवणूक स्टॅम्प ड्युटी कमी भरणे. जमीनीची किंमत कमी दाखविणे. असे सर्व प्रकार करून शासनाला सुध्दा फसविले जाते. असे सर्व प्रकार शासनाच्या व संबंधित जिल्हाधिकारी यांच्या ध्यानात आले त्यामुळे तुकडेजोड तुकडेबंदी अधिनियम कायदा अंमलात आणला आहे. आर्थिक दृष्ट्या परवाडणार नाही असे शेतीचे अनेक तुकडे होण्यास प्रतिबंध करणे. आणि राज्यभरातील तुकड्यांचे एकत्रिकरण करणे हा सदर कायदयामागील हेतू आहे 

           तुकडेजोड तुकडेबंदी अधिनियम मूळ नाव # मुंबई धारण जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत अधिनियम १९४७ # असे होते. सन २०१२ मध्ये महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ अन्वये हे बदलून# महाराष्ट्र धारण जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत अधिनियम १९४७# असे करण्यात आले आहे

            तुकडेजोड तुकडेबंदी अधिनियमाच्या कलम २ (४) अन्वये तुकडा म्हणजे सदर अधिनियम अन्वये ठरविलेल्या समुचित प्रमाण क्षेत्रापेक्षा कमी विस्ताराचा भूखंड. जमीनीचा # तुकडा # म्हणजे किती क्षेत्र आहे आवश्यक ती चौकशी करून शासनाने ठरवायचे होते. त्याप्रमाणे भिन्न भिन्न क्षेत्रासाठी किती क्षेत्राची जमीन तुकडा मानायची हे जाहीर करण्यात आले. त्यासाठी शासनाने. जिरायत. बागायत. आणि वरकस अशा वर्गीकरणाना मान्यता दिली 

* शासनाने ठरविलेले क्षेत्र खालील प्रमाणे

# जिरायत जमीन. १० ते ०४ एकर

# भात जमीन ०१ गुंठा ते ०१ एकर

# बागायत जमीन. ०५ गुंठे ते ०१ एकर

# वरकस जमीन ०२ एकर ते ०५ एकर. तथापि प्रत्येक वर्गीकरणाचया जमीनीसाठी निरनिराळ्या क्षेत्रातून भिन्न भिन्न क्षेत्रफळ निश्चित केले आहे. कोकणातील ठाणे रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ०२ एकर वरकस जमीन २० गुंठे खरिप भातजमीन आणि ०५ बागायत जमीन या खाली क्षेत्र असलेली जमीन हा # तुकडा # आहे 

           तुकडेजोड तुकडेबंदी अधिनियमाच्या कलम ५(३) अन्वये राज्य शासनाने राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध केल्यापासून सदर अधिनियमाच्या तरतूदी लागू होतील या कलमानुसार काढलेले अध्यादेश मागील तारखेपासून लागू करता येणार नाही. तुकडेजोड तुकडेबंदी अधिनियम अंमलात येण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या तुकड्यांचे हस्तांतरण वारसाने होऊ शकते परंतु विभागणी द्वारे जमीनीचे तुकडे करता येणार नाहीत. कुळ कायद्यानुसार कुळास जमीन विकताना तुकड्यांचे हस्तांतरण करण्यास बाधा येत नाही आणि अशा तुकड्यांचे कुळाच्या वारसा मध्ये हस्तांतरण होऊ शकते याशिवाय लगतच्या खातेदाराच्या लाभात तुकड्यांचे हस्तांतरण होऊ शकते तुकडेजोड तुकडेबंदी अधिनियमाच्या कलम ७ अन्वये हा अधिनियम अंमलात आल्यानंतर कोणत्याही तुकड्यांचे हस्तांतरण किंवा तुकडा असे पोटहिससे करणे बेकायदेशीर ठरेल. तथापि अशा तुकडयाशी संलग्न असलेल्या जमीन धारकास तुकड्यांचे हस्तांतरण करणे विधी ग्राह्य आहे 

              तुकडेजोड तुकडेबंदी अधिनियमाच्या कलम ८ अन्वये कोणत्याही जमीनीचे हस्तांतरण किंवा विभागणी तुकडा निर्माण होईल अशा पध्दतीने करता येणार नाही तथापि निरहेतुक हस्तांतरणाला या कलमांच्या तरतूद मुळे बाधा येणार नाही म्हणजेच भूसंपादन कायद्यानुसार संपादित केलेल्या जमनीना या कलमाची तरतूद लागू होणार नाही 

     राज्य शासनाच्या दिनांक ३१ जुलै १९५४ चया परिपत्रकानुसार तुकड्यांची खरेदी झाली असेल त्याची नोंद ७/१२ इतर हक्कात नोंदविण्यात सूचना दिल्या आहेत

          तुकडेजोड तुकडेबंदी अधिनियमाच्या कलम ८ अ अ अन्वये कोणत्याही जमीनीचे हस्तांतरण हूकूमनामा किंवा उत्तराधिकार यामुळे मिळणारा हिस्सा तुकडा निर्माण होणार नाही अशा रितीनेच केला पाहिजे. न्यायालयाने किंवा जिल्हाधिकारी ( तहसिलदार ) यांच्या मार्फत जमिनींचे हस्तांतरण किंवा वाटप केल्यामुळे जर तुकडा निर्माण होत असेल तर त्या तुकड्यांच्या हिशशयाबधदल पैशाच्या स्वरूपात भरपाई देण्याची तरतूद आहे. सदर भरपाईची रक्कम भूमी संपादन अधिनियमाच्या तरतूदी अन्वये ठरविण्यात यावी 

       * पुढील प्रयोजनासाठी तुकडेजोड तुकडेबंदी अधिनियमाच्या तरतूदी लागू होणार नाहीत 

* मुले किंवा प्रौढ व्यक्तिसाठी धर्मशाळा. खेळाचे मैदान. शाळा. महाविद्यालय. ग्रामीण चित्रपट गृह. सार्वजनिक दवाखाने यांच्यासाठी

* मासे मांस फळे फुले भाजीपाला बाजाराचे बांधकाम करण्यासाठी आवश्यक असलेली जमीन

* राज्य परिवहन डेपोसाठी आवश्यक असलेली जमीन

* कृषी विद्यापीठासाठी आवश्यक असलेली जमीन

* सार्वजनिक रस्ते. शौचालय स्मशानभूमी. दफनभूमी. गायरान. छावनीसाठी आवश्यक असलेली जमीन

* सहकारी गृहनिर्माण संस्था घरांचे करण्यासाठी आवश्यक असलेली जमीन. तुकडेजोड तुकडेबंदी अधिनियमाच्या कलम ९ अन्वये या अधिनियमाच्या तरतुदींचा भंग करून केलेलें कोणतेही हस्तांतरण किंवा विभाजन हे अवैध असून रद्द होण्यास पात्र ठरते. संबंधित जिल्हाधिकारी रूपये २५० पेक्षा अधिक नाही इतका दंड करू शकतात आणि याप्रमाणे अनाधिकृतपणे जमिनीचा भोगवटा करणार्या व्यक्तिला त्या जमिनीतून तडकाफडकी काढून टाकले जाऊ शकते 

        शासन परिपत्रक क्रमांक सी ओ एम १०७३/४१४६६-५ दिनांक २४ एप्रिल १९७३ तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारणा भाग -४- ब दिनांक ०३ जानेवारी २०१८ अन्वये तुकडेजोड तुकडेबंदी अधिनियमाच्या कलम ९()३ मध्ये सुधारणा करून असे तुकड्यांचे हस्तांतरण वार्षिक दरपत्रकातील ( रेडीरेकंनर ) बाजार मूल्यांच्या २५ टक्के इतकी रक्कम वसूल करुन नियमानुल करण्याची तरतूद करण्यात आली आहे सदर शेती विषयक तुकड्यांना लागू करता येईल

      तुकडेजोड तुकडेबंदी अधिनियमाच्या कलम ३१ अन्वये तुकड्यांची खरेदी किंवा हस्तांतरण न्यायालयाच्या हूकूमनामयाचया अंमलबजावणी साठी विक्री. देणगी अदल बदल. किंवा भाडे पट्टा यासाठी परवानगी देण्यास जिल्हाधिकारी सक्षम आहेत. यांचाच अर्थ जरी दिवाणी न्यायालयाच्या हूकूमनामयाची अंमलबजावणी करताना जर तुकडेबंदी तुकडेजोड अधिनियमाच्या तरतुदींचा भंग होत आहे असे निदर्शनास आल्यास त्यासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक आहे

          महाराष्ट्रा शासन राजपत्र असाधारण भाग ४ दिनांक ०१ जानेवारी २०१६ अन्वये मुंबई धारण अधिनियम २०१५ पारित करून कलम ८- ब जादा दाखल करण्यात आले आहे त्यानुसार महानगर पालिका किंवा नगरपरिषद सीमा मध्ये स्थित असलेल्या जमिनीस किंवा महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चया तरतूदी लागू असलेल्या जमिनीस तसेच विशेष नियोजन प्राधिकरण किंवा नविन नगर विकास प्राधिकरण यांच्या अधिकारेतेमधये स्थित असलेल्या जमिनीस आणि महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगर रचना अधिनियम १९६६ चया अधिकारेतेमधये स्थित असलेल्या जमिनीस तसेच कटकक्षेत्र आणि राज्य शासनाने कृषीतर किंवा औधोगिक विकासासाठी राखून ठेवलेल्या क्षेत्र तुकडेजोड तुकडेबंदी अधिनियमान्वये कलम ७.८.८ अ अ यांच्या तरतुदी लागू होणार नाहीत

        एखाद्या दिवाणी न्यायालयाने तडजोड हूकूमनामा देऊन विभाजनाचा आदेश पारीत केला असेल आणि असे विभाजन तुकडेजोड तुकडेबंदी कायद्याच्या तरतुदींच्या विरुद्ध असेल तर कलम ३१ अन्वये जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक आसेल 

        महाराष्ट्रात शासन महसूल व वन विभाग परिपत्रक क्रमांक २००३/ ३२३३/ प्र क्र ७८८/ म दिनांक ०६/०१/२००३ अन्वये ग्रामीण भागात रस्ते. विहीर. विद्युत पंप बसविणे यासाठी शेतजमीनीचया छोट्या तुकड्यांची खरेदी करण्यास बाधा येत नाही तथापि अशी खरेदी विक्री करण्याआधी संबंधित जिल्हाधिकारी यांची कलम ३१( ब ) अन्वये पूरवसंमती घेणे आवश्यक राहील तसेच संबंधित खरेदी विक्री दसतामधमे सदर जमीनीचा वापर कोणत्या कारणासाठी करणार आहे याचा उल्लेख स्पष्ट करणे बंधनकारक आहे 

       शासन परिपत्रक क्रमांक एस १४/११८९३४- ल -१ दिनांक २७ जानेवारी १९७६ अन्वये शासनाने सर्व जिल्हाधिकारी यांना विनंती करून उपरोक्त अधिनियमाच्या कलम ९ चे अधिकार तहसीलदार यांना प्रदान करण्याबाबत निर्देश दिले होते. तथापि असे अधिकार जिल्हाधिकारी यांनी प्रदान केल्याची खात्री करूनच वापरावेत. प्रदान केलेलें अधिकार वापरून कोणताही आदेश पारित करताना ज्या आदेशा अन्वये असे अधिकार प्रदान केले गेले आहेत त्या आदेशाचा क्रमांक व दिनांक पारित करीत असलेल्या आदेशावर नमुद करावा 

          तुकडेजोड तुकडेबंदी अधिनियमाच्या कलम ३१ चया तरतूदी वयकतिरिकत. असलेल्या बाबींबाबत महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारणा भाग ४ दिनांक ०७ सप्टेंबर २०१७ ( अधिनियम क्रमांक ५८ ) अन्वये महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत सुधारणा अधिनियम २०१७ पारित करून कलम ९ पोट कलम (३) नंतर पुढील प्रमाणे जादा स्पष्टिकरण देणार आहे 

          दिनांक १५ नोव्हेंबर १९६५ रोजी किंवा त्यांनंतर किंवा त्यांनंतर दिनांक ०७ सप्टेंबर २०१७ पूर्वी तुकड्यांची विक्री करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांचेकडे व्यक्तिने अर्ज केला असेल किंवा उपरोक्त अधिनियमाच्या तरतुदींच्या विरुद्ध केलेलें कोणतेही हस्तांतरण किंवा विभागणी नियमाकूल करण्यासाठी बाबत जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज प्राप्त झाला असेल आणि सदर जमीन प्रचलित प्रारुप किंवा अंतिम प्रादेशिक योजनेमध्ये निवासी. वाणिज्य. औद्योगिक. सार्वजनिक. किंवा निम सार्वजनिक किंवा कोणत्याही अकृषिक वापरासाठी नियत वाटप झालेली खातेदाराने किंवा लगतच्या कायदेशीर पोट हिस्सा धारकाने किंवा लगतच्या भोगवटदाराने सदर सरकार जमा केलेली जमीन घेण्यास नकार दिला तर या सरकार जमा केलेल्या जमीनीच्या लिलाव करण्यात येईल आणि लिलावातून प्राप्त रक्कम ज्या खातेदारांची जमीन सरकार जमा करण्यात आली होती त्याला आणि शासन यांच्यात ३;१ याप्रमाणे वाटून घेण्यात येईल. 

         शासन परिपत्रक क्रमांक रा भू अ २०१६/ प्र क्र ३४७/ ल दिनांक १ नोव्हेंबर २०१८ अन्वये दिनांक ०७/सप्टेंबर २०१७ ( अधिनियम क्रमांक ५८) अन्वये नियमानुकुल करताना आकारण्यात येणारी रक्कम पुढील प्रमाणे लेखाशिरषारत जमा करण्यात यावी 

      मा नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक. महाराष्ट्र राज्य पुणे यांनी महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेने महाराष्ट्र नोंदणी नियम १९६१ मध्ये सुधारणा करून महाराष्ट्र नोंदणी सुधारणा नियम २००५ पारित केला आहे जो १जुलै २००६ पासून अंमलात आहे. महाराष्ट्रा नोंदणी सुधारणा अधिनियम २००५ याद्वारे महाराष्ट्र नोंदणी नियम १९६१ नियम ४४ नोंदणीसाठी दस्त ऐवज स्वीकारण्यापूर्वी वीविक्षित अशा आवश्यक गोष्टींची फेरतपासणी करणे. पोटनियम १ मध्ये खंड ( ह ) नंतर खंड ( इ ) दाखल करण्यात आला आहे

        दस्तावेज उदेशीत असणा-या व्यवहाराबाबत केंद्र शासन अथवा राज्य शासन यांच्या एखाद्या कायद्यानुसार निर्बंध असेल तर त्या कायद्यातील तरतुदी प्रमाणे सक्षम अधिकारी यांच्याकडील परवानगी अथवा ना हरकत प्रमाणपत्र सत्य प्रत त्या दस्तावेज बरोबर जोडली आहे व त्या परवानगी अथवा ना हरकत प्रमाणपत्र नमूद कोणत्याही प्रमाणभूत अटि व शर्ती विसंगत रितीने तो दस्त ऐवज लिहलेला नाही 

      एखाद्या वयवहाराबाबत केंद्र शासन अथवा राज्य शासन यांच्या एखाद्या कायद्यानुसार निर्बंध असेल तर त्या कायद्यातील तरतुदीनुसार सक्षम अधिकारी यांच्याकडील परवानगी अथवा ना हरकत प्रमाणपत्राची सत्य प्रत त्या दस्तावेज सोबत जोडली आहे किंवा नाही याची खात्री करण्याची जबाबदारी दुय्यम निबंधकाचीही आहे हे लक्षात घ्यावे 

      समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

दुष्काळ १९७२ चा?

 


१९७२ दुष्काळ

                  आपण आत्ता सुध्दा आपल्या वडीलधाऱ्या लोकांच्या कडून दुष्काळाचे ऐकतो. दुष्काळ पडला आणि आम्ही सुकडी. मिलो खाल्ला. तसा आणि तेवढा मोठा दुष्काळ कधी पडला नाही. दुःखाचा काळ म्हणजे दुष्काळ अस म्हणलं तर वावगे ठरणार नाही १९७२ साली आत्ता असणारे शेती तंत्रज्ञान. पाणी अडविण्याचा अभाव. चुकिची शेती पध्दत. लोकसंख्या प्रमाणात. लोकांच्या आशा आकांक्षा कमी होत्या. जेवढ मिळेल त्यात संतुष्ट होणारें लोक. मोठ मोठी वृक्षांची घनदाट जंगल. जनावरांना मुबलक चारा. वाहत्या नद्या स्वच्छ पाणी. आजारांचे प्रमाण होते पण लोकांच्या खाण्यासाठी जनावरें असल्यामुळे दुध. दही. सकस आहार. केमिकल विरहित वातावरण. अशी सर्व जीवनप्रणाली अस्तित्वात होती 

                १९७२ चा तो काळ म्हणजे एक अतिशय ह्रदय भरून टाकणारा काळ येण्यास आपणच कारणीभूत होतो आणि आहे. कारणं आपल्याच अशा आकांक्षा वाढल्या आपणच झाडें तोडली. जनावरांचा चारापाणी संपला. जनावरें कमी झाली. शेतीची कामे करण्यासाठी बैलांचा वापर केला जात असे आज शेती कामासाठी टृकटर विविध शेतीची कामे करण्यासाठी मशिन आल्या त्यामुळे जनावरा पासून मिळवणारे खत पाणी संपले आणि रासायनिक खते बी बियाणे यांचा वापर चालू झाला रासायनिक खते वापरामुळे जमीनीचा पौत कमी झाला जमीनीची उपजाऊ दर्जा कमी झाला त्यामुळे अन्न धान्य तुटवडा जाणवू लागला. त्यामुळे कुपोषण सारख्या महाभयंकर संकटाने आपणांस आपल्या विळख्यात घेण्यास सुरुवात झाली. वर्षाच्या वर्षाला पाडणारा पाऊस. आपल्या जमीनीच्या खपापुरता पडतो मग काही वेळा पूर येतात त्यावेळी पाणी अडविणयाची गरज नाही. तंत्रज्ञान नाही. अज्ञान जास्त असल्यामुळे. येणारे पाणी वाहून जात होते. जमीनीत त्या पाण्याचा अडवून निचरा करण्यासाठी मार्गदर्शन करणारे लोक नाहीत. त्यामुळे आले पाणी गेले पाणी असा प्रकार होत होता. 

त्यामुळे आपणांस हळूहळू पाण्याची कमतरता जाणवू लागली. दुष्काळ लगेच पडत नाही किंवा येत नाही त्यासाठी बरेच दिवस आपल्या काही चुकिचे निर्णयांची आठवण होते तो पर्यंत वेळ निघून जाते

         जेव्हा दुष्काळ पडतो त्यावेळी सर्वात मोठा फटका बसतो तो म्हणजे जनावरे त्यांना पाऊस पाणी नसल्यामुळे चारा नाही त्यामुळे जनावरें उभ्या उन्हात उघड्या माळरानावर फिरत असतात. अंगावर माॅस नाही चालायला अंगात जीव नाही. काही जनावरे विना चारा पाण्याची टाचा खुडून मरतात. त्यांना खाण्यास गिधाडे सुध्दा ज्या भागात दुष्काळ पडतो तिकडं फिरकत सुद्धा नाहीत मेलेल्या जनावरांमुळे दुर्गंधी पसरते. त्यामुळे रोगराई पसरते त्याचा परिणाम जी लोक दुष्काळाचा सामना करत असतात त्यांच्यावर होते. जनावराप्रमाणे माणसाचे हाल सुध्दा असेच होतें लोकांना खाण्यास अन्न नाही पिण्यास पाणी नाही लोक अन्नासाठी गावोगावी फिरायला लागलें. लहान मुल महिला म्हातारी माणसं. यांचे अगदी विचार करण्यापलीकडचे हाल होते काही लोक उपासमारीची हालत सहन करू शकत नाहीत त्यामुळे आपल्या कुटुंबाची उपासमारीची वेळ बघून आत्महत्या करतात. दुष्काळामुळे गावांत कोण नाही त्यामुळे या आत्महत्या व दुष्काळात उपासमारीने मयत व्यक्तिंना दहन दफन सुध्दा मिळाले नाही. कोल्हे कुत्रे व इतर जंगली जनावरे यांना खात होती किती वाईट आहे. दुष्काळात काही समाजसेवक मदत देतात पण सर्वजण जर अशा परिस्थितीत असले तर कोण कोणाला मदत करणारं

          आपणांस वाढत्या लोकसंख्येला तोंड देण्यासाठी जगणे व जगविण्यासाठी रोजगार पाहिजे मग काय औधोगिक वसाहत. एम आय डी सी. विविध केमिकल कंपनी. यामुळे आपणास उधोग मिळाला पण आरोग्य गेले नविन नविन नाव बदलून रोग आले. पिण्याचे दुषित पाणी त्यामुळे पोटाचे आजार विकार वाढ झाली. 

               आपण आज सुध्दा १९७२ सारख्या महाभयंकर दुष्काळात आहोत. कारणं आज आपण सक्षम नाही. रोजगार नाही. नोकरी नाही. भरती नाही. व्यसन. खून मारामाऱ्या अपहरण खंडणी. बलात्कार महिला अत्याचार. भ्रष्टाचार. लुटमार मग ती शासकीय अधिकारी असो अथवा. सार्वजनिक दलाल एजंट. वाढती गुन्हेगारी. वाढती लोकसंख्या. अंधश्रद्धेचे बळी. शिक्षणाचा अभाव. स्वातंत्र्याचा अभाव. भिक मागणारी मुलं. गैरमार्गाने पैसा मिळविणे. शासकीय योजना आहेत त्या गोरगरीब जनतेला मिळत नाहीत. गोरगरीब जनतेला सकस अन्न धान्य रास्त किंवा मोफत चांगलें स्वच्छ धान्य वितरण करण्याचा शासन निर्णय घेतय पण काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांच्यामुळे गोरगरीब उपासीच आहे त्याला पोटभर अन्न सुध्दा मिळत नाही सर्वात जास्त कुपोषण आपल्या देशात आहे हा सर्व प्रकार १९७२ दुषकाळापेक्षा मोठा दुष्काळ आहे. 

             दुष्काळ ग्रस्त. पूर ग्रस्त. प्रकल्प ग्रस्त. असे विविध प्रकारचे ग्रस्त लोकांची कॅटेगरी केली जाते. त्यांना या बिकट परिस्थिती मुळे होणारे नुकसान भरपाई देण्यासाठी शासन विविध योजना शासन निर्णय जारी करत आहे नुकसानाचे पंचणामे करून पिडित लोकांना भरपाई दिली जाते. त्यात सुध्दा अधिकारी व कर्मचारी हा माझा हा तुझा असा भेदभाव करतात ज्या घराच्या उंबरठ्यावर पाणी येत नाही तो योजनेत बसतो आणि ज्यांचे घर पूराचया पाण्याने पडतात किंवा वाहून जातात ते मोकळं राहतात. अन्न धान्य वितरण करतांना पिडिताना अन्न धान्य मिळतच नाही. असा भेदभाव पक्षपाती पणा केला जातो

      म्हणून म्हणतो १९७२ चया दुषकाळापेक्षा सर्वात मोठा दुष्काळ आत्ता आहे 

      समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

 


     जिल्हाधिकारी यांचेसाठी मार्गदर्शक सूचना

      देशांचा कणा मानला जाणारा तो शेतकरी. विदर्भ मराठवाडा यामध्ये. अवेळी अवकाळी पडणारा पाऊस दुष्काळ.  ओला दुष्काळ व पाणीटंचाई कोरडा दुष्काळ. शेतीसाठी लागणारे बि बियाणे. रासायनिक खते. शेतीची मशागत मेहनत. यासाठी लाखो रुपये खर्च येतो आणि निसर्गावर अवलंबून असणारा शेतकरी कर्जात बुडत आहे. त्यामुळे. आज हजारो शेतकऱ्यांनी. कर्जाला कंटाळून अखेर आत्महत्या केल्या. वेळोवेळी शेतकरी न्याय देण्यासाठी आंदोलने. फक्त मतदान आल्यावर नेते पुढारी यांना शेतकऱ्यांची आठवण होते आणि मग आंदोलन संपले की पुन्हा शेतकरी डोक्याला हात लावून केविलवाणा चेहरा करून शेताकडे व आभाळाकडे बघतो आहे. शासनाने या सर्व गोष्टींचा विचार करून विविध योजना चालू केल्या त्यातील महत्त्वाची योजना म्हणजे " महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९" चालू करण्यात आली आणि मा जिल्हाधिकारी यांना ही योजना राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या

     # तपशील#

(१) योजनेचे उद्दिष्ट

(२) योजनेचे वैशिष्ट्य

   अ. योजनेचा निकष

   ब. अपात्रता 

(३) कार्यपद्धती

(४) जिल्हास्तरीय समितीची रचना व कार्यपद्धती

(५) जिल्हाधिकारी व इतर संलग्न विभागाची भूमिका

    (१) योजनेचे उद्दिष्ट 

* शेतकऱ्यांना खरीप  २०२० या हंगामात कर्ज घेण्यासाठी पात्र करणे

* सुमारे ३० लाख शेतकऱ्यांना अल्प मुदत पीक कर्ज मिळण्यासाठी सक्षम करणे

    (२) योजनेचे निकष

* अल्प मुदत पीक कर्ज/ हंगामी पीक कर्ज व किसान क्रेडिट कार्डचे योजनेअंतर्गत

*. पुनर्गठित कर्ज / मध्यम मुदत कर्जात रुपांतरीत अल्प मुदत पीक कर्ज

*. यामध्ये सोनं तारण पीक कर्जाचा अंतर्भाव करण्यात आलेला नाही

* अल्प मुदत पीक कर्ज

   (१) दि ०१/०४/२०१५ ते ३१/०३/२०१९ या कालावधीत वितरित केलेलें कर्ज

    (२) दि ३०/०९/२०१९ अखेर थकित ( मुद्दल+ व्याज ) व परतफेड न केलेली कर्ज

* ‌पुनगरगठित कर्ज

(१) दि. ०१/०४/२०१५ ते. ३१/०३ / २०१९ या कालावधीत वितरित केलेलें अल्प मुदत पीक कर्ज

(२) तसेच दि ३१/०३/२०१९ अखेर मध्यम मुदत कर्जात रुपांतरीत कर्ज

(३) वरिल कर्जाचे दि. ३०/०९/२०१९ अखेर थकित ( मुद्दल + व्याज मिळून ) आणि परतफेड न झालेले हप्ते

(४) दि ३०/०९/२०१९ अखेर मुद्दल व व्याजासह केवळ रु २ लाख या मर्यादेपर्यंत थकित व परतफेड न झालेले अल्प मुदत पीक कर्ज खाते पात्र असतील

     # योजनेचे अपात्र व्यक्ति #

* आजी/माजी / राज्य मंत्री/ राज्य सभा  सदस्य / विधानसभा व विधानपरिषद सदस्य

* केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी व कर्मचारी ( रु २५०००. पेक्षा जास्त मासिक वेतन असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून

*. राज्य शासनाच्या सार्वजनिक उपक्रमाचे अधिकारी व कर्मचारी ( महावितरण.  परिवहन मंडळ.  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ इ ) आणि अनुदानित संस्थांचे अधिकारी व कर्मचारी ( रु २५००० पेक्षा जास्त मासिक वेतन असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून) 

* शेती बाह्य उत्पन्नातून आयकर भरणारया व्यक्ति 

* रु २५००० पेक्षा जास्त मासिक निवृत्ती वेतन घेणारे व्यक्ति ( माजी सैनिक वगळून) 

* खालील संस्थांचे अध्यक्ष/ उप अधक्ष. / संचालक व अधिकारी ( रु २५००० पेक्षा जास्त मासिक वेतन असणारे) 

* जिल्हा मध्यवर्ती बँका. / नागरि सहकारी बँक /सहकारी साखर कारखाने / सहकारी दूध संघ /सहकारी सूत गिरणी / कृषी उत्पन्न बाजार समिती 

 # प्रमुख वैशिष्ट्य#

* आधार क्रमांक निश्चित करण्याचा मूलभूत घटक

* प्रति लाभार्थी रु २ लाख पर्यंत लाभ

* एकापेक्षा अधिक अर्ज खाते असलेल्या व एकापेक्षा अधिक बॅंकेचे कर्ज खाते असलेल्या लाभार्थ्यांना सर्व कर्ज मिळून रु २ लाख या मर्यादेपर्यंत लाभ मिळणार

* खालील बॅंकांनी दिलेल्या अल्प मुदत पीक कर्ज योजनेसाठी पात्र

* राष्ट्रीय कृत बॅंका / खाजगी बँका/ग्रामीण बॅंका / जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक/ वि का स संस्था ( जिमस बॅंका मार्फत)

* वि का स संस्था ( सवनिधी)

     # कार्यपद्धती #

* योजनांची घोषणा

* पात्रता /अर्हता दिनांक/ लाभाची रक्कम/अपवरजन/अपात्र यादी/योजना प्रकिया /आधार/प्रामाणिकरण

  # प्रसिद्धी #

* रेडिओ/दुरचित्रवाणी /वृत्तपत्र/मॅसेज मोहीम/समाज माध्यम 

    # व्यापारी बॅंका #

* आधार संलग्न नसलेल्या कर्जदार यादी तयार करणे / पोर्टल आधार संलग्न कर्ज खाती यादी अपलोड करणे /उर्वरित खाते आधार संलग्न करून अपलोड करणे

     # वि का स संस्था#

* आधार संलग्न नसलेल्या कर्ज खाते यादी तयार करणे/ कर्ज खाती तपासणी/ ले प करणे /आधार लिंक अपलोड करणे / उर्वरित खाते आधार संलग्न करून अपलोड करणे 

     # जिल्हा स्तरीय समितीची रचना आणि कार्यपद्धती#


*. जिल्हाधिकारी / मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद /जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी/ जि म स बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी /व्यवस्थापक अग्रणी बँक/ जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था

* पोर्टल द्वारे प्राप्त तक्रारी दाखल घेणे /जिल्हा स्तरीय समिती पोर्टल लाॅग ईन करून आॅनलाइन तक्रार पाहणे

/आॅनलाइन तक्रार.  / आधार क्रमांक न जुळणे /कर्ज खात्यातील रक्कम न जुळणे

* आॅफलाईन तक्रार

बॅंकेने अपलोड न केलेले कर्ज खाते 

    # जिल्हाधिकारी व इतर संलग्न विभागाची भूमिका# जिल्हाधिकारी यांचे कार्य

खालील बाबींची खात्री करणे

*. योजनेतील मुद्द्यांची तपशीलवार प्रसिध्दी करणे

* आधार संलग्न न झालेल्या खातेदारांची यादी गावनिहाय प्रसिद्ध करणे

* योजनेच्या अंमलबजावणीत सक्रिय सहभाग घेण्याबाबत क्षेत्रीय यंत्रणेचे प्रबोधन करणे

* विविध पातळीवर योजनेच्या प्रगतीचे /अंमलबजावणी संनियंत्रण करणे 

* कर्ज खाते आधार संलग्नीकरण

* बॅंकांकडून कर्ज खाते माहिती अपलोड करणे

* आधार प्रमाणीकरण

* कालमर्यादेत तक्रार निवारण

* आपले सरकार सेवा केंद्र आवश्यक सुविधा सह सुरू असल्याची खात्री करणे

* जिल्ह्यातील यंत्रणा व आपले सरकार सेवा केंद्र चालक यांचें प्रशिक्षण व प्रबोधन करणे 

   # जिल्हाधिकारी चेक लिस्ट#

* बॅंका व वि का स संस्थांकडून आधार संलग्न न झालेली कर्ज खात्याची यादी प्राप्त करून घेणे

* योजनेच्या. जाहिराती साहित्य प्राप्त करणे

* प्रसिध्दी टिम

* आवश्यकता भासल्यास आधार नोंदणी सुविधा निर्माण करणे

* आपले सरकार सेवा केंद्र कार्यान्वित करणे

* माहिती अपलोड झाल्याची अथवा प्रलबिंत असल्याची सद्यस्थिती तपासणे

* यादी प्रसिद्ध करण्यासाठी ठिकाण व सुविधा निश्चित करणे

*आधार प्रामाणिकरणासठी कॅम्प/ शिबिर आयोजित करणे

        समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या