Showing posts with label ग्राहक हक्क दिन.consumer. Show all posts
Showing posts with label ग्राहक हक्क दिन.consumer. Show all posts

रेशन माझा हक्क

 


    रेशन माझा हक्क 

अन्न सुरक्षा कायदा २०१३ हा कायदा गोरगरीब अनाथ अपंग जेष्ठ नागरिक. विधवा. निराधार. भूमीहीन. शेतमजूर. आर्थिक दृष्ट्या दुर्बल. परगावाहून. परराज्यातून. येणारे कामगार. व समाजातील अनेक दुर्बल घटकांना. चांगलें स्वच्छ. व सकस अन्न धान्य मिळावे यासाठी रेशन दुकान ही संकल्पना अमलात आणली. सर्वांना पुरेसे रास्त भावात सवलतीच्या दरात निवडक अन्न धान्य वितरण करणे ही रेशन दुकानदार याची जबाबदारी आहे. पण आज सर्वात मोठें दोन नंबर हे पुरवठा विभागात होत आहे. अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम वार्यावर. अपंगांसाठी वेगळी शिधापत्रिका हा निर्णय सुध्दा धूळखात पडला आहे. दारिद्रय रेषेखालील कुटुंबांच्या नावाखाली. सदन लोकांची संख्या जास्त आहे. २००५ नंतर आज पर्यंत दारिद्र्य रेषेचा सर्वे आज १६ वर्षे झाली तरी झाला नाही. दर पाच वर्षांनी. शासनाने गांभीर्याने हा सर्वे करणे गरजेचे होते. पण आज गोरगरीब जनतेला अंत्योदय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळत नाही. आज अंत्योदय अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी महिन्याला मिळणारा ३५ किलो रेशन सोडून प्रति महिना प्रति व्यक्ती पाच किलो प्रमाणे तांदूळ मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यात. प्रधान लाभार्थी कुटुंब यांना सुध्दा सवलतीच्या दरात अन्न धान्य वितरण होत आहे. पण केशरी शिधापत्रिका धारकांना कोणत्याही योजनेत सहभागी केले जात नाही. 

      केशरी शिधापत्रिका धारकांना शासनाने परवा निर्णय दिला आहे तो म्हणजे एक किलो तांदूळ व एक किलो गहू असा वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातसुद्धा पळवाट आहे ती म्हणजे उपलब्धतेनुसार वितरण केले जाईल. म्हणजे १००/ पैकी १६ जणांना अन्न धान्य वितरण करण्यात येणार आहे. म्हणजे एका बाजूला. गरज नसताना वाटप केले जात आहे आणि एका बाजूला भूक असूनसुद्धा वाटप केले जात नाही 

     बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर चे वतीने आम्ही उठाव करणार आहोत की केशरी शिधापत्रिका धारकांना. नोव्हेंबर पर्यंत मोफत अन्न धान्य वितरण करा अन्यथा सर्व शिधापत्रिका धारकाचे अन्न धान्य वितरण थाबवा. रेशन दुकानला कुलपे घाला. अशीच मागणी. सर्वांनी आपल्या गावात तालुका जिल्हा. जिथे पुरवठा विभाग आहे तेथें करा. ग्रामीण भागातील लोकानी. आपल्या गावात ग्रामपंचायती कडे ही मागणी अर्ज निवेदन या माध्यमातून करा. आमची युनियन सर्वोतोपरी आपणांस मदत करेल. 

*रेशनिंगचे नियम –* 

आपण वाचा दुसऱ्याला सांगा,आपली अडचण आम्हाला सांगा,आम्ही तिचे निरसन करू,आपले नाव गुप्त ठेवले जाईल

अध्यक्ष अहमद मुंडे इस्लामपूर

९८९०८२५८५९


● रॉकेल/घासलेट पहिल्‍या पंधरवड्यात न घेतल्‍यास महिना अखेरपर्यंत घेता येते. हप्‍ता बुडत नाही.


● बीपीएल् व अंत्‍योदयचे धान्‍य गेल्‍या महिन्‍यात न घेतल्‍यास पुढच्‍या महिन्‍यातही घेता येते.


● बीपीएल् व अंत्‍योदयचे धान्‍य महिन्‍यात 4 हप्‍त्‍यातही घेता येते.


● रेशनवर घेतलेल्‍या वस्‍तूंची पावती मिळालीच पाहिजे. पावतीवर रेशन दुकानाचा क्रमांक असतो.


● एका दिवशी एकच पावती फाडता येते असा नियम नाही.


● ज्‍या व जेवढ्या वस्‍तू हव्‍या असतील. तेवढ्याच वस्‍तू आपण घेऊ शकतो. इतर गोष्‍टी घेतल्‍याशिवाय रॉकेल मिळणार नाही असे दुकानदार म्‍हणू शकत नाही.


● रेशनकार्ड स्‍वतःकडे ठेवून घेण्‍याचा किंवा ते रद्द करण्‍याचा अधिकार दुकानदाराला नाही.


● रेशन दुकान रोज सकाळी 4 तास व सायंकाळी 4 तास उघडे असलेच पाहिजे. आठवडी बाजाराच्‍या दिवशी उघडे असले पाहिजे. आठवड्यातून एकदाच दुकान बंद ठेवता येते. रेशन दुकान जर आठवड्यातून एक दिवसाहून अधिक दिवस बंद रहात असेल तर त्या बंद दुकानाची छायाचित्रे / चलचित्रे तारीख वेळे सहित http://mahafood.gov.in/pggrams/ या ऑनलाईन लिंकवर अपलोड करावीत. सिद्धता पडताळून दुकानदारावर तात्काळ कारवाई होते.


● रेशन दुकानात लोकांना स्‍पष्‍टपणे वाचता येईल असा महिती फलक असला पाहिजे. या फलकावर दुकानाची वेळ, सुटीचा दिवस, दुकान क्रमांक, तक्रार वही उपलब्‍ध असल्‍याची नोंद, रेशन कार्यालयाचा पत्‍ता व फोन, रेशनकार्ड संख्‍या, भाव व देय प्रमाण उपलब्‍ध कोटा ही माहिती असणे अनिवार्य असते. त्या सोबतच गाव व तालुका स्तरावरील रेशन दक्षता समिती मधील पदाधिकारी चे नाव व संपर्क क्रमांक असलेले फलक दर्शनी भागात लावणे अनिवार्य असते.


● बीपीएल, अंत्‍योदय व अन्‍नपूर्णा लाभार्थ्‍यांची यादी दुकानात लावलेली असते.


● वरीलपैकी कोणतीही गोष्‍ट आपल्‍या गावातल्‍या रेशनदुकानात होत नसेल, तर ताबडतोब लेखी तक्रार नोंदवा. जर गावातील रेशन दुकानदार धाक/धमकी दाखवत दांडगेशाही करून तक्रार करण्यास मज्जाव करत असेल तर त्रासलेल्या ग्राहकांनी गुप्तता राखून एकत्रितपणे लेखी अर्जावर आपली नावे आणि सही करून तो रजिस्टर पोस्टाने तहसिल कार्यालयाला पाठवा. तसेच दुकानातच तक्रारवही ठेवलेली असते. ती वही मागा आणि त्‍यात आपली तक्रार लिहून त्‍याखाली नाव, पत्‍ता, सही/अंगठा करा. जर दुकानदाराने ही वही दिली नाही, तर तहसिलदाराकडे वही न देण्‍याची तक्रार करा. तक्रारवही न देणे हा अदखलपात्र गुन्‍हा म्‍हणून तहसिलदार कारवाई करतात. तक्रारवहीत पाच तक्रारी नोंदल्‍या, की दुकानदाराला 15 हजार रूपये दंड होतो.


दुकानावर देखरेख करण्‍यासाठी ग्राम पंचायतीची दक्षता समिती असते. या समितीत जागरूक तरुणांनी सहभागी झाले पाहिजे. ग्रामसभेत या समितीविषयी चर्चा करा. गरज असेल, तर समिती बदला. ही समिती दुकानावर धाड घालू शकते. गैरप्रकार असतील, तर दुकानाला टाळेही लावू शकते. तलाठी या समितीचा सदस्‍य सचिव असतो.


आपण आपल्या गावात रेशन दुकानातुन रेशन घेतो. परंतु रेशन दुकानदार आपल्याला पावती मात्र देत नाही. म्हणुन

महाराष्ट् शासनाने लोकांना त्यांच्या पावत्या या ऑनलाईन देखील पाहता येण्यासाठी खालील वेबसाईट चालु केलेली आहे. आपण त्या वेबसाईटवर जाऊन आपला RC नंबर जो आपण रेशन घेताना बायोमेट्रीक साठी येतो तो नंबर टाकावा. महाराष्ट् सरकारने जनतेस आवाहन केलेले आहे आपण खालील वेबसाईट वर जाऊन आपले रेशनकार्ड वरील धान्य चेक करावे.


आपले रेशनकार्ड चेक करण्यासाठी खालील लिंक वर RC नंबर जो आपण रेशन घेताना बायोमेट्रीक साठी येतो तो नंबर टाकुन आपण आपली पावती प्राप्त करु शकतो. या साईटवर जाऊन आपल्या कार्डावर एका व्यक्तिमागे किती धान्य आपल्याला मिळण्याचा अधिकार आहे आणि दुकानदार किती देतो याची आपणास ऑनलाईन माहिती मिळते.


https://mahaepos.gov.in/SRC_Trans_Int.jsp


रेशन दुकानदारांचा FPS ID चेक करण्यासाठी खालील लिंक वर पहावे. किंवा आपल्या पावतीवर देखील आयडी असतो.


https://mahaepos.gov.in/FPS_Trans_Abstract.jsp


रेशन दुकानदारानी शासनाकडुन किती माल घेतला हे खालील लिंक वर पहावे


https://mahaepos.gov.in/FPS_Status.jsp


रेशनदुकानदारा विरुध्द तक्रार देण्यासाठी खालील लिंक वर पहावे.


http://mahafood.gov.in/pggrams/


वरील वेबसाईट ही शासनाची अधिकृत आहे. जास्तीत जास्त लोकांना आपले रेशन कार्ड चेक करुन घ्यावे. व अशा रेशन दुकानदाराच्या तक्रारी सार्वजनिक वितरण तक्रार निवारण प्रणाली नि:शुल्क क्रमांक 1800-22-4950 व 1967 तसेच ई-मेल: helpline.mhpds.gov.in पाठवावा. असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासनाकडुन करण्यात आलेले आहे.....


*महत्वपुर्ण_माहिती*

*स्वस्त धान्य दुकानातील धान्य दर..!*

*गहू - २ रू. किलो*

*तांदूळ- ३ रू. किलो* 

*साखर - २० रू . किलो*

*चनादाळ- ४५ रू. किलो*

*तुरदाळ- ५५ रू. किलो*

*उडीद दाळ - ४४ रू किलो*

*घासलेट (रॉकेल #केरोसीन ) - २४:५० ( चोवीस रपये पन्नास पैसे लीटर )*

(टिप :- संबंधी आपल्य‍ा क्षेत्रातील जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी यांचा कडून वरील दर / किंमत खात्री करुन घ्यावी. )

            जर दुकानदार तुमच्या कडून या पेक्षा जास्त दर घेत असेल व तुम्हाला माल (रेशन) घेतल्याची पावती देत नसेल तर स्थानिक #पोलीस_ठाणे (स्टेशन) ला जाऊन तक्रार दाखल करू शकता..!

*चोरांना खुलेआम आपली लूट करण्याची संधी देवू नका...!*

सदरील दर हे चालू दर आहेत याची नोंद घ्यावी..! 

          जागा ग्राहक जागा ! आता माल (रेशन) घेतल्यास त्याची पावती मागून घ्या. देत नसेल तर पोलीसात तक्सक्रार करा,तसेच *आम्हाला कळवा...आपलाच संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रूग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन कृती समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन विशेष - विलास जगदाळे

 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन विशेष



आज 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन. 

24 डिसेंबर 1986 साली अखिल भारतीय ग्राहक पंचायती च्या प्रयत्नातून भारतीय संसदेने ग्राहक संरक्षण कायदा मंजूर केला. म्हणून आजच्या दिवसाला अनन्य साधारण असे महत्व आहे. या दिवशी संपूर्ण देशभर राष्ट्रीय ग्राहक दिन मोठया उत्साहात विविध जनजागृती कार्यक्रमांनी साजरा केला जातो. तसे पाहता दैनंदिन जीवनामध्ये आजही खेडा पाड्यातील ग्राहकांना बऱ्याचशा अडचणींना सामोरे जावे लागते... 

दूध किंवा शीतपेय छापील किंमती (एम.आर.पी.) पेक्षा जादा किमतीने घ्यावे लागते. आठवडा बाजारातील भाजीवाला तराजूत वजना ऐवजी दगड ठेवतो. अखाद्य रंग वापरलेल्या मिठाईची विक्री केली जाते , दुधात भेसळ होते, अश्लील, हीन अभिरुचीच्या जाहिरातींतून नको ते ओंगळवाणे प्रदर्शन केले जाते. रिक्षा-टॅक्सीवाल्यांची लुबाडणूक आपण निमूटपणे सहन करतो. बिल्डर, फायनान्स कंपन्या, प्रवासी कंपन्या, वस्तूंचे उत्पादक आपल्याला फसवताहेत, यांसारख्या बऱ्याचशा अडचणींना ग्राहकांना सामोरे जावे लागते...


हे सगळं का ? 

यामागील कारण एकच,.. अजूनही आपल्यातील शोषणाविरुद्ध लढणारा खरा ग्राहक बाहेर येत नाही. म्हणूनच आजच्या *24 डिसेंबर या राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने आपणांस ग्राहक संरक्षण कायद्या ने प्राप्त झालेल्या काही मूलभूत अधिकारांची माहिती घेणं महत्वाचं आहे.. ..* 


1 ) सुरक्षिततेचा हक्क :-

बाजारात उपलब्ध असणारी कोणतीही वस्तू आरोग्याला घातक नसणे तिचा कोणत्याही प्रकारे उपद्रव न होणे हा आपला ग्राहक म्हणून हक्क आहे. उदा.- लहान मुलांची खेळणी ज्यापासून त्यांना इजा होऊ शकेल अशी नसावीत. 


2 ) माहिती मिळविण्याचा हक्क :- 

जी वस्तू खरेदी करावयाची आहे त्या वस्तू,उत्पादना विषयी, कंपनी विषयी तिच्या उपयोगा विषयी अगर सेवे विषयी, वस्तूच्या वापरातून होणाऱ्या परिणामां विषयी सर्व प्रकारची सत्य माहिती ग्राहक म्हणून जाणून घेण्याचा आपला अधिकार आहे.


3 ) वस्तू निवडण्याचा हक्क :-

अनेक दर्जाच्या अनेक कंपन्यांच्या नानाविध किंमती असलेल्या वस्तूतून चौकस राहून गुणवत्ता पूर्ण अशी वस्तू निवडण्याचा ग्राहकास हक्क आहे.


4 ) मत मांडण्याचा किंवा तक्रार निवारणाचा हक्क :- 

वस्तू अगर सेवा घेतल्यानंतर काही दोष अथवा तक्रार उद्भवल्यास आणि आपली फसवणूक झाली आहे असे वाटल्यास ग्राहकाला तक्रार करण्याचा आणि ती निवारण करुन घेण्याचा पूर्ण अधिकार आहे.


5 ) ग्राहक शिक्षणाचा हक्क :- 

ग्राहकांचे त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणारे अनेक कायदे आहेत त्यांची आणि बाजारपेठेत केल्या जाणाऱ्या सर्व व्यापारी व्यवहारा तील बदलांची शासनाने केलेल्या नवीन कायदे, तरतूदी तसेच नियमांची माहिती करून घेण्याचा ग्राहक म्हणून आपला हक्क आहे.


6 ) आरोग्यदायी पर्यावरणाचा हक्क :- 

आपले जीवनमान चांगले राहण्यासाठी प्रदूषणा पासून संरक्षण मिळवण्याचा, याचा अर्थ आपण ज्या परिसरात राहतो तो परिसर स्वच्छ असणे,सांडपाण्या चा निचरा व्यवस्थित होणे, आरोग्यसंबंधी वैद्यकीय सुविधा तात्काळ उपलब्ध होणे हा आपला अधिकार आहे.


दैनंदिन जीवनात ग्राहक म्हणून वावरताना बऱ्याचदा आपल्या या अधिकारांची, हक्कांची पायमल्ली होते. हे आपण वरचेवर अनुभवतो. अशा वेळी गरज असते ती ठामपणे आणि चिकाटीने आपल्या अधिकारांची अंमलबजावणी करून घेण्याची. *जागरूक ग्राहक हा या देशाचा सुरक्षित नागरिक असतो या तत्वाने आपण सर्वानी आपला ग्राहक डोळा सजग ठेवून व्यवहार करायला हवेत.* 


 ग्राहकाभिमुख प्रशासन, शोषणमुक्त समाज आणि कल्याणकारी अर्थव्यवस्था ही त्रिसूत्री डोळ्यासमोर ठेऊन 1974 साली ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत ची स्थापना केली आहे. 

 "संवाद समन्वयात ग्राहक कल्‍याणम् !! " कारखानदार, व्यापारी, शेतकरी, श्रमिक आणि ग्राहक हि अर्थक्षेत्राची पाच अंगे आहेत. यांच्यात संघर्ष नको अंगअंगी भाव हवा कारण शेवटी सर्व " ग्राहक " आहेत. तेव्हा यात समरसता हवी म्हणूनच ग्राहक संघटन, ग्राहक प्रबोधन, रचनात्मक कार्य आणि संघर्षात्मक कार्यक्रम अशीही ग्राहक चळवळीच्या कार्याची चतुःसूत्री गुंफत ग्राहक चळवळ संपूर्ण देशभर कणखरपणे उभी आहे.


असे असले तरी ग्रामीण भागातील बाजारपेठेत वावरताना मात्र बऱ्याच वेळेला ग्राहक म्हणून असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागते. केली जाणारी अडवणूक पीळवणूक ही केवळ वस्तू खरेदीच्या स्वरूपातच असते असं नाही, तर त्यात जीवनावश्यक अशा सेवांचा ही समावेश होतो. मग पेट्रोलपंपावर वाहनात पेट्रोल भरताना, औषध दुकानातून औषध घेताना, विविध फायनान्स कंपन्या कडून उपलब्ध केल जाणार अर्थसहाय्य, सुट्टी दरम्यान निघणाऱ्या कौटुंबिक सहली, पूर्वनियोजित कार्यक्रमांसाठी बुकिंग केली जाणारी मंगल कार्यालय, शेती हंगामानुसार खरेदी केली जाणारी बी बियाणे, खतांचा पुरवठा, बँकेच्या ए. टी. एम मधून न मिळालेली रक्कम, विद्यार्थ्याना मिळणारी एस. टी ची पास सवलत, गॅस कंपन्यांचे अनुदान न मिळणे, रुग्णालयांतून होणारी अवास्तव बिल आकारणी, वीज वितरण कंपनीची विमा रक्कम मिळण्यातील अडचणी, रेल्वे आरक्षण शुल्क, विशीष्ट भाडे करारानुसार पुरवली जाणारी विविध सेवा साधने अशा एक ना अनेक सेवांचा या ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये अंतर्भाव होतो. 


पावती शिवाय खरेदी करु नका, ऑनलाईन खरेदी टाळा, आणि जाहिरातींच्या भुलभुलैयांना बळी पडू नका.* जागरूक राहूनही फसवणूक झालीच तर संबंधित यंत्रणेशी ग्राहक म्हणून आपण स्वतः लेखी तक्रार करुन आपले म्हणणे मांडू शकता. या सर्व समस्यांच्या निराकरण आणि मार्गदर्शनासाठी गांव तिथे ग्राहक पंचायत हा संकल्प या निमित्ताने आपण सारेजण करूया. गावोगावी मार्गदर्शन सेवा केंद्र सुरु करूया. तुम्ही एकटे नाही आहात तुमच्या मदतीला ग्राहक पंचायतीचे अनेक कार्यकर्ते जिल्हाभर सेवाशरण वृत्तीने कार्यरत आहेत. ग्राहक चळवळ बहिष्काराची पुरस्कर्ती आहे पण संप, मोर्चे, टाळेबंदी, घेरावो, जलादो अशा चुकीच्या पद्धतीचा अवलंब कधीही करीत नाहीत याला आमचा सक्त विरोध आहे. *चर्चा, संवाद आणि समन्वयातून अनेक प्रश्न सुटतात या विश्वासावर गेली 45 वर्ष ग्राहक चळवळ उभी आहे .


एखादा जटिल प्रश्न नाहीच सुटला तर ग्राहक संरक्षण कायद्याने आपणांस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे 1 कोटी रु.पर्यंत मुल्य असलेल्या तक्रारी सुनावणीसाठी नजीकच्या जिल्हा आयोगात दाखल करता येतात. तर 5 लाख रुपया पर्यंतच्या तक्रारीसाठी कोणतेही शुल्क आकारले जातं नाही.10 कोटी पर्यंतच्या तक्रारी राज्य आयोगाकडे तर 10 कोटी हुन अधिक रक्कमेच्या तक्रारी राष्ट्रीय आयोगात दाखल करण्याची तरतूद आहे. 


 नव्याने प्रारित झालेल्या 2019 च्या कायद्यानाव्ये उत्पादन दायीत्व, नुकसान भरपाई कार्यक्षेत्र वाढ करुन तिच्या अंलबजावणी साठी स्थापित झालेल प्राधिकरण, मध्यस्त, ऑनलाईन व्यवहार, आणि फसव्या किंवा दिशाभूल जाहिराती करणाऱ्यांवर थेट कारवाई, तसेच दंड आणि कारावास अशा महत्वपूर्ण बदलामुळे आजचा ग्राहक हा खऱ्या अर्थानं राजा झाला आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.* आता गरज आहे ती ग्राहकाने अन्याया विरुद्ध उठून उभं राहण्याची. आणि " जेजे आपणांस ठावे | तेते इतरांसी सांगावे | शहाणे करून सोडावे सकळजन | हे संत वचन सार्थ ठरवण्याची. 

 || जय भारत - जय ग्राहक ||


 विलास जगदाळे ,

अध्यक्ष:-अखिल भारतीय ग्राहक पंचायत.

नगर जिल्हा

सदस्य:-

 नगर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद

 _____ __मो._9765986601

          9422086601

वाचा - 

तारिक कासमी को उम्रकैद का फैसला तथ्यों से परे- रिहाई मंच TARIK KASMI ....

ओबीसी, व्ही.जे., एन.टी. चा अहमदनगर मध्ये जनमोर्चा - OBC,VJ,NT MORCHA ....

१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान भाग ३ - Indian Muslim Freedom Fighter...

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग २ INDIAN MUSLIMS FREEDOM FIGHTER..

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग १ MUSLIMS INDIAN FREEDOM FIGHTER....


सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या