मोर्चा मोर्चा
आपल्या घरातील वातावरण. कुटुंबाची रचना यांचा आपल्या राजकीय आणि सामाजिककरण यांच्याशी घनिष्ठ संबंध असतो. याचा अर्थ घरात आई-वडील आपल्याला राजकारण समजावून सांगतात असे नाही पण "अधिकार" या गोष्टी विषयी आपली मते कुटुंबातील अनुभवांवर अवलंबून असतात. कारणं कुटुंबात आपण आपल्या अधिकारांचा दिर्घकाळ अगदी जवळून अधिकारांचा अनुभव घेत असतो. आपली कुटुंबव्यवस्था ही वर्चस्व प्रधान आहे. वडीलधाऱ्याचे कर्त्या पुरुषाचे वर्चस्व घरातलयावर असते आपली या वर्चस्वाबददल भावना काय असतें ? सामान्यपणे वडीलधाऱ्या व्यक्ति पुढे आपण नमतो. पण त्यातूनच आपल्या मनात बंडखोरीची भावना वाढीस लागते. ती व्यक्त होतें असे नाही. पुढे या कौटुंबिक अनुभवांची परिणती मोठेपणी आपल्या राजकीय स्वभावात येते. उदा आज्ञापालनासाठी. आपली तयारी. बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी बंडखोरी किंवा विरोध. भावना आपल्या मनात पुरेशी खोलवर घर करून बसते आणि राजकारणात ती क्वचितच उफाळून येते. मग सत्ता. मनमानी पद्धतीने कारभार करण्यासाठी आपण कोणत्याही स्तराला जाण्यास तयार असतो.
मोर्चा हा सर्वसामान्य माणसाला आपल्यावर आपल्या समाजावर. झालेल्या अन्यायाच्या विरोधात मोर्चा काढण्याचा अधिकार आहे. पण आपल्या स्वार्थासाठी आज आपली ताकद दाखविणे. माझ्या मागे एवढी जनता आहे हे दाखवण्यासाठी आज शक्तिप्रदर्शन करण्यासाठी गोरगरीब जनता. बांधकाम कामगार. आशा वर्कर्स. कंपन्या कामगार. यांना एक पटेल असे गाजर दाखवून त्यांना यात सहभागी करण्यात येते. निदर्शने मोर्चे यांचा अनुभव लहान-मोठ्या शहरांत राहणा-या लोकांना येतो. कारणं ज्यावेळी मोर्चा रस्त्यावरुन जातो घोषणा देत रस्त्याने एखादा मोर्चा जायला लागला की आजूबाजूने बघ्याची गर्दि जमते त्यांना मोर्चाबददल कुतूहल वाटत. घोषणा फलक यांच्यामुळे मोर्चेवाले कोण आहेत ते कळते त्यांचे म्हणने काय आहे याचीही थोडीफार कल्पना येते. मुख्य म्हणजे आपले म्हणने मांडण्यासाठी रस्त्यावर उतरलेले लोक हे विसरतात की जेव्हा मोर्चा काढला जातो आणि तो जर एखाद्या नेत्यांचा असेल किंवा संघटना सेवाभावी संस्था युनियन यांचा असेल तर त्यांना त्या मोर्चा वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आपले पोलिस बांधव संरक्षण देतात. हे परम कर्तव्य माणून हे काम केले जाते. हे सर्व झाले मोर्चा काढणारे आणि त्यात सामिल होणारें यांचेसाठी. त्याच रस्त्यावरून जाणाऱ्या सर्वसामान्य जनतेच काय. कारण रस्ता रोको आंदोलन असेल किंवा मोर्चा असेल तर तासन तास रस्ते अडविले जातात. त्यावेळी सर्वसामान्य जनतेत. शाळेला जाणारी मुले. नोकरी साठी जाणारे लोक. काॅलेज महाविद्यालय. अनेक शिकवणी. कोर्स साठी जाणारे तरुण. डबेवाले. रिक्षा चालक. एस टी सेवा. मालवाहतूक पॅसेंजर वाहतूक. दवाखान्यात जाणारया आशा वर्कर्स. डॉ. यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. सर्वांत वाईट काय असेल तर ज्यावेळी मोर्चा रस्ता रोको. चालू असेल त्यावेळी त्या रस्त्यावर वाहनांची गर्दी निर्माण होते. आणि त्यातच जर एकादि. अॅमबुलनस अडकून पडली आहे त्यात अतिदक्षता जीवन मरणाच्या दारात असणारा पेशंट असेलतर. त्याच्या जीवनाचा. कोण विचार सुध्दा करत नाही.जर अशावेळी त्यात असणारा पेशंट जर एकधयाचया घरचा कर्ता पुरुष असेल आणि अशा मोर्चा वेळी निर्माण झालेल्या. वाहन गर्दि मुळें त्याला दवाखान्यात नेण्यास उशीर झाला आणि त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या मृत्यू होण्यासाठी कारणीभूत असणारे हे मोर्चा काढणारे यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि मृत्यू पावलेल्या कुटुंबातील सदस्यांना योग्य तो आर्थिक मोबदला देण्यात यावा. शासनाने अशी तरतूद करण्याची गरज आहे. बघा किती टक्के मोर्चे कमी होतील. सर्वसामान्य नावाखाली आपली भाकरी मोर्चा या माध्यमातून भाजून घेणारयाना निश्चित चाफ बसेल. दगडफेक. वाहनांची जाळपोळ. आत्मदहन व बंद आंदोलन मोर्चा उपोषण यावेळी होणा-या शासकीय सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले तर सदर हे सर्व घडवून आणणारे. सदर संघटना सेवाभावी संस्था युनियन व अन्य राजकीय सामाजिक. यातील सदस्यांवर सदर नुकसानभरपाई वसूल करण्यात यावी
आपले म्हणने मांडण्यासाठी मोर्चे मिरवणुका हा मार्ग असल्याचे लोकांच्या लक्षात येते. मोर्चाने जाऊन आपण आपली मागणी मागू शकतो किंवा कोणाचा तरी निषेध करत असतात आपल्याला जे म्हणायचं आहे ते सर्वांनी मिळून शांततेच्या मार्गाने मांडले तर त्याचा परिणाम होतो. आपल्या मागणीकडे सर्वांचे लक्ष वेधून घेता येते मोर्चे निदर्शने हा आपले विचार व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. ती एक राजकीय कृती आहे. हे अशा प्रसंगातून आपल्या लक्षात येते तुम्ही शहरात राहणारे असाल तर आणखी एक घटना तुम्हाला माहीत असेलच ती म्हणजे"धरणे" एखाद्या गोष्टीचा निषेध म्हणून पाचपन्नास माणसं दिवसभर एका जागी बैठक मारुन बसतात त्याला "धरणे धरुन बसने " असा शब्द प्रयोग प्रचलित आहे. साधारणपणे मोठ्या चौकात किंवा सरकारी कार्यालयापुढे असे " धरणे" धरले जाते बंद. हरताळ. या गोष्टी आपल्या सर्वांचा परिचय असतो. प्रत्त्येक चळवळीत असे अनेक मार्ग चोखाळले जातात. आपले म्हणने मान्य होत नाही म्हणून गावकरी एखाद्या मंत्र्याला गावात प्रवेश नाकारतात. किंवा घेराव घालतात कधी हमरसते वाहतुकीला बंद करतात. रेल्वे अडविणे. या मार्गाचा ही अवलंब केला जातो " सत्याग्रह" हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे हेही तुम्ही अनुभवाने शिकला असाल एखाद्या मागणीसाठी चळवळ उभी करताना जरुर तर शासनाने घातलेले निर्बंध मोडणे आणि त्याबद्दल होणारी शिक्षा सविकारणे असे साधारण सत्याग्रहाचे स्वरूप असतें या सर्व प्रकारांचा चळवळीच्या वेळी उपयोगी केला जातो शहरवासीयांना बंद. मोर्चे. धरणे. हे मार्ग जास्त व परिचयाचे असतात तर लहान गावात राहणा-या लोकांना गावबंदी. घेराव. रस्ता रोको. यांचा जवळून परिचय असतो. शिवाय उपोषण हे राजकीय चळवळीत प्रभावशाली हत्यार म्हणून वापर केला जातो. तुम्ही या कृतीमध्ये कधी सहभागी झाला नसलात तरि त्या पाहिलेल्या ऐकलेल्या नक्किच असतील. या कृतीमुळे आपल्याला राजकारणातील वादग्रस्त प्रदर्शनाचे आकलन होते आणि राजकीय वाद कसे व्यक्त होतात यांचीही आपणांस कल्पना येते.
शासकीय आॅफिस मध्ये आज ग्रामपंचायत. पंचायत समिती. जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका तहसिलदार कार्यालय प्रांत आॅफिस. वन विभाग. जलसंधारण विभाग. महावितरण कंपन्या. महसूल विभाग. जिल्हाधिकारी कार्यालय. कामगार विभाग. विविध संस्था. राजकीय सामाजिक विभाग. आर्थिक विभाग.पुरवठा. विभाग माहिती अधिकार अशा एक नाही अनेक विभागांत. लोकांनी आपली निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज स्मरण पत्र. विविध विषयांचे पत्र व्यवहार केले आहेत आपल्या नागरि सनद मध्ये कोणता पत्र व्यवहार किती दिवसात निकाली काढायचा आहे यांच्या सूचना देऊन सुध्दा. काही शासकीय व इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी कामात कामचुकार पणा करत आहेत त्यामुळे आजही. प्रत्त्येक विभागातील असे विविध पत्र व्यवहार जर काढले तर लाखोंच्या पटीत निघतील. या अधिकारी व कर्मचारी यांच्या गलथान कारभारामुळे सर्वसामान्य जनता मोर्चे आंदोलने हे मार्ग निवडत आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेचे शोषण इतर पक्षगार करत आहेत. त्यामुळे विविध शासन निर्णय शासन काढत आहे तर असा एक शासन निर्णय शासनाने काढला पाहिजे की वेळेत ज्या अधिकारी व कर्मचारी यांनी पत्रव्यवहार निकालात काढला नाही. त्यांना आर्थिक दंड म्हणून अर्ज पत्रव्यवहार दाखल करणार्या व्यक्तिला एक ठराविक रक्कम कामात कुचराई केल्याबद्दल देण्यात यावी. म्हणजे यांच्या पगाराला कात्री लागल्याशिवाय हे आपले काम वेळेत करणार नाहीत. यामुळे मोर्चे निघणार नाहीत. ज्या कारणांमुळे मोर्चा काढण्यात आला आहे ज्या विभागामुळे ही परस्थिती निर्माण झाली आहे त्याची सर्व नुकसान भरपाई संबंधित विभागांवर घालण्यात यावी
समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९
No comments:
Post a Comment