रेशन माझा हक्क
अन्न सुरक्षा कायदा २०१३ हा कायदा गोरगरीब अनाथ अपंग जेष्ठ नागरिक. विधवा. निराधार. भूमीहीन. शेतमजूर. आर्थिक दृष्ट्या दुर्बल. परगावाहून. परराज्यातून. येणारे कामगार. व समाजातील अनेक दुर्बल घटकांना. चांगलें स्वच्छ. व सकस अन्न धान्य मिळावे यासाठी रेशन दुकान ही संकल्पना अमलात आणली. सर्वांना पुरेसे रास्त भावात सवलतीच्या दरात निवडक अन्न धान्य वितरण करणे ही रेशन दुकानदार याची जबाबदारी आहे. पण आज सर्वात मोठें दोन नंबर हे पुरवठा विभागात होत आहे. अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम वार्यावर. अपंगांसाठी वेगळी शिधापत्रिका हा निर्णय सुध्दा धूळखात पडला आहे. दारिद्रय रेषेखालील कुटुंबांच्या नावाखाली. सदन लोकांची संख्या जास्त आहे. २००५ नंतर आज पर्यंत दारिद्र्य रेषेचा सर्वे आज १६ वर्षे झाली तरी झाला नाही. दर पाच वर्षांनी. शासनाने गांभीर्याने हा सर्वे करणे गरजेचे होते. पण आज गोरगरीब जनतेला अंत्योदय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळत नाही. आज अंत्योदय अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी महिन्याला मिळणारा ३५ किलो रेशन सोडून प्रति महिना प्रति व्यक्ती पाच किलो प्रमाणे तांदूळ मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यात. प्रधान लाभार्थी कुटुंब यांना सुध्दा सवलतीच्या दरात अन्न धान्य वितरण होत आहे. पण केशरी शिधापत्रिका धारकांना कोणत्याही योजनेत सहभागी केले जात नाही.
केशरी शिधापत्रिका धारकांना शासनाने परवा निर्णय दिला आहे तो म्हणजे एक किलो तांदूळ व एक किलो गहू असा वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातसुद्धा पळवाट आहे ती म्हणजे उपलब्धतेनुसार वितरण केले जाईल. म्हणजे १००/ पैकी १६ जणांना अन्न धान्य वितरण करण्यात येणार आहे. म्हणजे एका बाजूला. गरज नसताना वाटप केले जात आहे आणि एका बाजूला भूक असूनसुद्धा वाटप केले जात नाही
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर चे वतीने आम्ही उठाव करणार आहोत की केशरी शिधापत्रिका धारकांना. नोव्हेंबर पर्यंत मोफत अन्न धान्य वितरण करा अन्यथा सर्व शिधापत्रिका धारकाचे अन्न धान्य वितरण थाबवा. रेशन दुकानला कुलपे घाला. अशीच मागणी. सर्वांनी आपल्या गावात तालुका जिल्हा. जिथे पुरवठा विभाग आहे तेथें करा. ग्रामीण भागातील लोकानी. आपल्या गावात ग्रामपंचायती कडे ही मागणी अर्ज निवेदन या माध्यमातून करा. आमची युनियन सर्वोतोपरी आपणांस मदत करेल.
*रेशनिंगचे नियम –*
आपण वाचा दुसऱ्याला सांगा,आपली अडचण आम्हाला सांगा,आम्ही तिचे निरसन करू,आपले नाव गुप्त ठेवले जाईल
अध्यक्ष अहमद मुंडे इस्लामपूर
९८९०८२५८५९
● रॉकेल/घासलेट पहिल्या पंधरवड्यात न घेतल्यास महिना अखेरपर्यंत घेता येते. हप्ता बुडत नाही.
● बीपीएल् व अंत्योदयचे धान्य गेल्या महिन्यात न घेतल्यास पुढच्या महिन्यातही घेता येते.
● बीपीएल् व अंत्योदयचे धान्य महिन्यात 4 हप्त्यातही घेता येते.
● रेशनवर घेतलेल्या वस्तूंची पावती मिळालीच पाहिजे. पावतीवर रेशन दुकानाचा क्रमांक असतो.
● एका दिवशी एकच पावती फाडता येते असा नियम नाही.
● ज्या व जेवढ्या वस्तू हव्या असतील. तेवढ्याच वस्तू आपण घेऊ शकतो. इतर गोष्टी घेतल्याशिवाय रॉकेल मिळणार नाही असे दुकानदार म्हणू शकत नाही.
● रेशनकार्ड स्वतःकडे ठेवून घेण्याचा किंवा ते रद्द करण्याचा अधिकार दुकानदाराला नाही.
● रेशन दुकान रोज सकाळी 4 तास व सायंकाळी 4 तास उघडे असलेच पाहिजे. आठवडी बाजाराच्या दिवशी उघडे असले पाहिजे. आठवड्यातून एकदाच दुकान बंद ठेवता येते. रेशन दुकान जर आठवड्यातून एक दिवसाहून अधिक दिवस बंद रहात असेल तर त्या बंद दुकानाची छायाचित्रे / चलचित्रे तारीख वेळे सहित http://mahafood.gov.in/pggrams/ या ऑनलाईन लिंकवर अपलोड करावीत. सिद्धता पडताळून दुकानदारावर तात्काळ कारवाई होते.
● रेशन दुकानात लोकांना स्पष्टपणे वाचता येईल असा महिती फलक असला पाहिजे. या फलकावर दुकानाची वेळ, सुटीचा दिवस, दुकान क्रमांक, तक्रार वही उपलब्ध असल्याची नोंद, रेशन कार्यालयाचा पत्ता व फोन, रेशनकार्ड संख्या, भाव व देय प्रमाण उपलब्ध कोटा ही माहिती असणे अनिवार्य असते. त्या सोबतच गाव व तालुका स्तरावरील रेशन दक्षता समिती मधील पदाधिकारी चे नाव व संपर्क क्रमांक असलेले फलक दर्शनी भागात लावणे अनिवार्य असते.
● बीपीएल, अंत्योदय व अन्नपूर्णा लाभार्थ्यांची यादी दुकानात लावलेली असते.
● वरीलपैकी कोणतीही गोष्ट आपल्या गावातल्या रेशनदुकानात होत नसेल, तर ताबडतोब लेखी तक्रार नोंदवा. जर गावातील रेशन दुकानदार धाक/धमकी दाखवत दांडगेशाही करून तक्रार करण्यास मज्जाव करत असेल तर त्रासलेल्या ग्राहकांनी गुप्तता राखून एकत्रितपणे लेखी अर्जावर आपली नावे आणि सही करून तो रजिस्टर पोस्टाने तहसिल कार्यालयाला पाठवा. तसेच दुकानातच तक्रारवही ठेवलेली असते. ती वही मागा आणि त्यात आपली तक्रार लिहून त्याखाली नाव, पत्ता, सही/अंगठा करा. जर दुकानदाराने ही वही दिली नाही, तर तहसिलदाराकडे वही न देण्याची तक्रार करा. तक्रारवही न देणे हा अदखलपात्र गुन्हा म्हणून तहसिलदार कारवाई करतात. तक्रारवहीत पाच तक्रारी नोंदल्या, की दुकानदाराला 15 हजार रूपये दंड होतो.
● दुकानावर देखरेख करण्यासाठी ग्राम पंचायतीची दक्षता समिती असते. या समितीत जागरूक तरुणांनी सहभागी झाले पाहिजे. ग्रामसभेत या समितीविषयी चर्चा करा. गरज असेल, तर समिती बदला. ही समिती दुकानावर धाड घालू शकते. गैरप्रकार असतील, तर दुकानाला टाळेही लावू शकते. तलाठी या समितीचा सदस्य सचिव असतो.
आपण आपल्या गावात रेशन दुकानातुन रेशन घेतो. परंतु रेशन दुकानदार आपल्याला पावती मात्र देत नाही. म्हणुन
महाराष्ट् शासनाने लोकांना त्यांच्या पावत्या या ऑनलाईन देखील पाहता येण्यासाठी खालील वेबसाईट चालु केलेली आहे. आपण त्या वेबसाईटवर जाऊन आपला RC नंबर जो आपण रेशन घेताना बायोमेट्रीक साठी येतो तो नंबर टाकावा. महाराष्ट् सरकारने जनतेस आवाहन केलेले आहे आपण खालील वेबसाईट वर जाऊन आपले रेशनकार्ड वरील धान्य चेक करावे.
आपले रेशनकार्ड चेक करण्यासाठी खालील लिंक वर RC नंबर जो आपण रेशन घेताना बायोमेट्रीक साठी येतो तो नंबर टाकुन आपण आपली पावती प्राप्त करु शकतो. या साईटवर जाऊन आपल्या कार्डावर एका व्यक्तिमागे किती धान्य आपल्याला मिळण्याचा अधिकार आहे आणि दुकानदार किती देतो याची आपणास ऑनलाईन माहिती मिळते.
https://mahaepos.gov.in/SRC_Trans_Int.jsp
रेशन दुकानदारांचा FPS ID चेक करण्यासाठी खालील लिंक वर पहावे. किंवा आपल्या पावतीवर देखील आयडी असतो.
https://mahaepos.gov.in/FPS_Trans_Abstract.jsp
रेशन दुकानदारानी शासनाकडुन किती माल घेतला हे खालील लिंक वर पहावे
https://mahaepos.gov.in/FPS_Status.jsp
रेशनदुकानदारा विरुध्द तक्रार देण्यासाठी खालील लिंक वर पहावे.
http://mahafood.gov.in/pggrams/
वरील वेबसाईट ही शासनाची अधिकृत आहे. जास्तीत जास्त लोकांना आपले रेशन कार्ड चेक करुन घ्यावे. व अशा रेशन दुकानदाराच्या तक्रारी सार्वजनिक वितरण तक्रार निवारण प्रणाली नि:शुल्क क्रमांक 1800-22-4950 व 1967 तसेच ई-मेल: helpline.mhpds.gov.in पाठवावा. असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासनाकडुन करण्यात आलेले आहे.....
*महत्वपुर्ण_माहिती*
*स्वस्त धान्य दुकानातील धान्य दर..!*
*गहू - २ रू. किलो*
*तांदूळ- ३ रू. किलो*
*साखर - २० रू . किलो*
*चनादाळ- ४५ रू. किलो*
*तुरदाळ- ५५ रू. किलो*
*उडीद दाळ - ४४ रू किलो*
*घासलेट (रॉकेल #केरोसीन ) - २४:५० ( चोवीस रपये पन्नास पैसे लीटर )*
(टिप :- संबंधी आपल्या क्षेत्रातील जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी यांचा कडून वरील दर / किंमत खात्री करुन घ्यावी. )
जर दुकानदार तुमच्या कडून या पेक्षा जास्त दर घेत असेल व तुम्हाला माल (रेशन) घेतल्याची पावती देत नसेल तर स्थानिक #पोलीस_ठाणे (स्टेशन) ला जाऊन तक्रार दाखल करू शकता..!
*चोरांना खुलेआम आपली लूट करण्याची संधी देवू नका...!*
सदरील दर हे चालू दर आहेत याची नोंद घ्यावी..!
जागा ग्राहक जागा ! आता माल (रेशन) घेतल्यास त्याची पावती मागून घ्या. देत नसेल तर पोलीसात तक्सक्रार करा,तसेच *आम्हाला कळवा...आपलाच संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रूग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन कृती समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
No comments:
Post a Comment