Showing posts with label life after death. Show all posts
Showing posts with label life after death. Show all posts

मेल्यानंतरचे अधिकार

 


मेल्यानंतरचे अधिकार

             माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे. हि मानव अधिकारची सर्वात सोपी व सर्वाधिक उत्तम आशय असणारी व्याख्या आहे. कोणत्याही ठिकाणी कोणत्याही वेळी जर माणूस माणसाशी माणसाप्रमाणे वागत नसेल तर त्या ठिकाणी मानव अधिकारांचे हणन होताना दिसते. हे आपणं पक्के ध्यानात ठेवले पाहिजेत. "जगा आणि जगू द्या"हे मानवी मुल्य आहे. मानव अधिकार कार्यकर्त्याने मानव अधिकार याची माहिती प्रबोधन करणे गरजेचे आहे. "सन्मानाने जगा आणि सन्मानाने जगू द्या" असे थोडे विस्ताराने लक्षात ठेवले पाहिजे. आपल्या कामांचे क्षेत्र किती व्यापक व सखोल यांची जाणीव होईल. माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत म्हणजेच भ्रूण. बालपण. महिला. स्त्रिया कामगार. श्रमिक. शेतकरी. सामाजिक न्याया पासून वंचित असे. अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती आदिवासी. अल्पसंख्याक. अलपभाषिक आणि साधन संपत्ती यापासून वंचित लोक यांच्या अन्न वस्त्र निवारा शिक्षण व आरोग्य यासाठी मानवी अधिकार आपणांस मोठ्याप्रमाणात जागृत करतो. 

            संविधानात जीवंत माणसासाठी तरतूद आहे पण मेल्यानंतर काय. ? मेलेल्या माणसाला एखाद्या मृतदेहालाही असे कायदेशीर अधिकार असतांत काय? जीवंत माणसाला ज्या प्रमाणे कायदेशीर अधिकार असतांत तसेच अधिकार मृत माणसालाही असतांत ९ मे पासून गंगा यमुना या नद्यांमध्ये हजारों मृतदेह तरंगताना दिसतायत. आत्तापर्यंत जवळपास दोन हजार मृतदेह गंगेत सांपडले आहेत. हे सर्व मृतदेह कोरोना बाधित होतें काय ? तसे म्हणनं स्थानिक म्हणने आहे. हे मृतदेह संक्रमित लोकांचे नाहीत असेही राज्यातले अधिकारी व कर्मचारी सांगत होते पण मुळातच ते आले कोठून. ते कोरोना संक्रमित आहेत की नाही याबाबतची कसलीही ठोस माहिती अधिकारी यांचेकडे नव्हती. 

       अनेक आंतरराष्ट्रीय कायद्यातही ही तरतूद करण्यात आली आहे जीनिवहा करार हा त्यादृष्टीने मृतांचा अधिकाराविषयी बोलणारा पहिला कायदा म्हणावा लागेल. या कायद्यातील कलम १६ नुसार युध्दात मेलेल्या सैनिकांचे संरक्षण करण्यासाठी सगळ्यांनी पुढाकार घ्यायला शिवाय २००५ ला स्वीकारलेल्या मानवाधिकार ठरावातही मेलेल्या माणसांना सन्मानाने हाताळण्याचे महत्व अधोरेखित करण्यात आली आहे. मृतदेहाच्या कुटुंबाची मागणी असेल त्याप्रमाणे त्याच योग्य व्यवस्थापन झाल पाहिजे मृतदेह योग्य पध्दतीने समाजाच्या नियमांनुसार. धर्माच्या रितीरिवाज प्रमाणे विघटित झाला पाहिजे हेहि या ठरावाच्या तिस-या कलमात सांगितले आहे. नैसर्गिक आपत्तीत मानवाधिकार कसे पाळायचे याबद्दल सांगितले आहे. मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तिची ओळख पटेल असे नियोजन व्यवस्थापन केले पाहिजे. आपघात. जसे वाहन अपघात. पाण्यात बुडवून मृत्यू. भाजून मृत्यू. ढिगारयाखाली सापडून मृत्यू. खून. आत्महत्यांचे मृतदेह. अशा विविध कारणानें मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तिंना सन्मानाने बाहेर काढून योग्य पध्दतीने धर्माच्या नियमानुसार पुरायला व दहन देण्यात यावे.  

          एकदया मृत्यू पावलेल्या व्यक्तिला सन्मान मिळाला पाहिजे असे सुप्रिम कोर्टाचा आदेश आहे त्या आदेशानुसार मृतदेहाची विल्हेवाट अंत्यसंस्कार झाले पाहिजेत हे सुप्रीम कोर्टाने केसमध्ये सांगितले आहे. सन्मानाने जगण्याचा अधिकार मृत व्यक्तिलाही लागू होतों राज्याने मृत व्यक्तिचे योग्य व्यवस्थापन करून मृतदेहाला सन्मान दिलाच पाहिजे. मृत्यू अपघाती असेल तर अपघात कसा झाला. अपघातांचे कारणं काय. खून कसा झाला. मरणाच कारण काय विषारी औषध घेवून मृत्यू झाला काय. पोसपमॅटिन. एखाद वैज्ञानिक संशोधन. डॉ शिकणारयासाठी आणि कायद्याप्रमाणे एखाद्या दुसऱ्या माणसाच जीव वाचवण्यासाठी मृतदेहाच जतन करता येत. अस सुप्रीम कोर्टाने या निकालात म्हणलं आहे २००२ चया सुप्रीम कोर्टाचे निकालानुसार आजारी आणि बेघर व्यक्तिचे ही त्यांच्या धर्मानुसार अंत्यसंस्कार झालेच पाहिजेत 

          संविधानात कलम मृतांसाठी २०२० मध्ये मद्रास हायकोर्टानं दिलेला निकाल तो असा होतो की एका डाॅकटरचा कोरोनाने मृत्यू झाला होता शेजारी पाजारी यांनी त्यांना पाहण्यास गर्दि केली होती डाॅ कुटुंबीयांना मृतांचे अंत्यविधी करायला विरोध केला तेव्हा न्यायमुर्ती एम सत्यनारायण आणि एम निर्मल कुमार यांच्या खंडपीठाने संविधातल कलम २१ मध्ये मृतांचे योग्य पध्दतीने अंतिम संस्कार करण हेही येत असा निर्वाळा देण्यात आला होता. शिवाय भारतीय दंड संहिता सेकसन २९७ चा संदर्भ दिला आहे. या सेक्शन मध्ये २९७ प्रमाणे व्यक्तिला पुरणयाचया ठिकाणी अतिक्रमणे दहन दफन भूमी रस्ते अतिक्रमण करण गुन्हा मानला जातो. कोणत्याही उपासना स्थानी किंवा कोणत्याही दफन करण्याच्या जागी अंत्यसंस्कार पार पाडण्यासाठी किंवा मृतांच्या अवशेषांचे जतन करणार ठिकाण म्हणून राखून ठेवलेल्या जागी कोणत्याही प्रकारे अतिक्रमण करेल किंवा कोणत्याही मानवी शवाची कशाही प्रकारे अप्रतिष्ठा करेल किंवा अंत्यसंस्कार पार पाडण्यासाठी कोणत्याही प्रकारे व्यत्यय आणेल त्याला एका वर्षांपर्यंत कोणत्याही एका प्रकारच्या कारावासाची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा. अस सेक्शन सांगत आहे अशाच पध्दतीने आय पी सी. चे सेक्शन ४०४ सेक्शन ४९९ आणि सेक्शन ५०३ ही मृतांच्या सन्मानाविषयी आपणांस माहीती सांगतात. सेक्शन ४०४ प्रमाणे मृत व्यक्तिच्या मालमत्तेचा चुकिचा वापर केला जाऊ शकत नाही. सेक्शन ४९९ प्रमाणे मृत व्यक्तिची बदनामी. अवहेलना करणं हा अमानवीय प्रकार आहे. मृतांचे नातेवाईक या सेकशनचया आधारे गुन्हा दाखल करू शकतात ५०३ प्रमाणे नातेवाईकांना मृतांची बदनामी करण्यासाठी धमकावने हाही अमानवीय गुन्हा मानला जातो 

            कायदेभंगाबधदल दोषी व्यक्तीला कायदेशीर तरतूदीनुसार नयायीक प्रकिया व यंत्रणांच्या माध्यमातून योग्य ते शासन झालेच पाहिजे. हे अगदी खरे आहे परंतु अपराधी व्यक्तिचे ही दंड शक्ती कडून मानवीय हणण मुळीच होऊ नये समाजात नेहमी सबल घटक दुर्बल घटकांवर अन्याय करतात त्यांचे आर्थिक मानसिक शोषण करतात शोषणाच्या प्रकिरयेत व्यक्तिचा अधिकार व हक्काचे हनन होते. मग व्यक्तिची प्रतिष्ठा बळी दिली जाते तसे माणसांचे हकक व प्रतिष्ठा नाकारली की जीवंत माणूस गुलाम बनतो मग गुलामाचे आर्थिक सामाजिक व राजकीय शोषन करणे फार सोपे जाते. 

      आज वैद्यकीय सेवा देणारे देवदूत हे आपल्या कामाला काळीमा लागणारे कार्य करत आहेत ते म्हणजे उपचार जीवंत माणसांवर केले जातात मेलेल्या माणसांवर नाही. मेलेल्या माणसाला सन्मानाने अंत्यविधी व. प्रत्त्येक धर्माच्या चाली रिती प्रमाणे करणे आपले परम कर्तव्य आहे 

    निषेध नको निलंबन नको निर्णय द्या

       समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या