Showing posts with label धोका. Show all posts
Showing posts with label धोका. Show all posts

धोक्याची घंटा

 

धोक्याची घंटा

                  अन्न वस्त्र आणि निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. आपल्या प्रत्येकाला वाटतें पोटभर जेवण दोन वेळचे मिळावं. अंगाला अंगभर कपडे असावेत. सवताचे आणि हक्काचे ते साध असलं तरी चालेल पण सवताचे एक घर आपला निवारा असावा एवढंच जीवन मध्यमवर्गीय कुटुंबातील लोकांचं असतं. आज वाढती बेरोजगारी. वाढती लोकसंख्या. यामुळे राहण्यास जागा कमी पडतं आहे. त्यामुळे आज व याअगोदर शहरांत झोपडपट्टी प्रमाण भयानक भस्मासुर सारखें रुप धारण केले आहे. अपुऱ्या जागेवर झालेली माणसाची दाटी आणि या जागेचा खालावलेला दर्जा. आरोग्य साठी अपायकारक. स्वच्छता अभाव त्या सोयी सवलतींचा अभाव आणि त्यामुळे येथे वास्तव्य असलेल्या रहिवाशी यांच्या किंवा एकंदर समाजाच्या आरोग्याला सुरक्षिततेला किंवा नितीमत्तेला पोहचणारा धोका इत्यादी युक्त असलेली इमारत. इमारतीचा समूह किंवा परिसर आज आपल्यापुढे आ वासून उभा होता ज्या परिस्थितील घरे राहण्यास निकृष्ट अपुरी आरोग्यास हानिकारक संरक्षण नैतिकता आणि तेथील निवासी लोकांच्या दृष्टीने हानिकारक असणे. अवैधरित्या गोंधळाने बळाकवलेलया अविकसित दुर्लक्षित दाट लोकवस्तीच्या असलेल्या मोडकळीस आलेल्या वस्तीला आपणं याअगोदर पाहत होतो. 

      घरे जुनाट असून मोडकळीस आलेली घरे होती. अपुरया जागेवर लोक कसेबसे राहत असतात शयनगृह. व स्नानगृह. यांची विशेषत महिलांसाठी स्वतंत्र सोय नव्हती वेगवेगळ्या आकारांची ओबडधोबड उंचीची घरे अव्यवस्थित पणे एका मेकांना लागून असतांत. घराजवळ मोकळी जागा नाही. घरांच्या रांगात रस्ता होता पण तोही कच्चा. ओबडधोबड आणि अरूंद असतो. हवा नाही उजेड नाही. स्वतंत्र संडास नाही. सांडपाणी वाहून नेण्यासाठी गटार नाही. वीज पाणी यांचा पुरवठा असला तरी तो कमी प्रमाणात किंवा अजिबातच नव्हता. स्वच्छता आणि आरोग्य दृष्टीने असतो. स्थानिक नेते पुढारी आमदार खासदार मंत्री नगरसेवक ग्रामसेवक यांच या अशा वस्त्या कडे लक्ष नव्हते. भोवतालच्या परिसर गलिच्छ दुर्गंधी युक्त कचरा व पाण्याने भरलेली गटार रस्ते होतें. गलिच्छ वस्तीत मोडकळीस आलेल्या घरांचा जसा समावेश होत होता. तसेच बांबू. ताडपत्री. पत्रे. नारळाची झावळी. इत्यादी पासून तयार घरे आगोदर पाहावयास मिळत होती 

                2005 पासून आर्थिक दुर्बल आणि सदन लोकांचा सर्वे झाला. त्यानुसार गोरगरीब लोकांना गरजूंना सोडून स्थानिक  राजकीय सामाजिक नगरसेवक ग्रामसेवक नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांचें बगलबच्चे यांचाच समावेश गृहभेट घेऊन सर्वे करण्याचा आदेश आसतान देखिल एका जागेवर बसून दारू मटनाचया पार्ट्या करून लाच घेऊन सरवेला आलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना जी माहीती दिली त्यानुसार सर्वे करण्यात आला. आणि खरोखरच गरजूंना या अन्न धान्य. घरकुल योजनेतून वगळण्यात आले आणि सर्व आर्थिक सदन लोक या योजनेत धनावर बसलेले साप याप्रमाणे ठाण मांडून बसले आहेत 

       केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी झोपडपट्टी पुनर्वसन करण्याचे धोरण आखले त्यानुसार प्रत्येक गरजू व्यक्तिला सवताचे हक्काचे घर मिळावे यासाठी.  पंतप्रधान घरकुल आवास योजना.  रमाई आवास योजना. शबरी आवास योजना. वाल्मिकी आवास योजना. इंदिरा गांधी आवास योजना. अशा विविध योजना राबविण्यात आल्या आणि यासाठी लाभार्थी निवडले गेले ते 2005 चे सरवेनुसार घरकुल लाभार्थी निवडले गेले. आणि ठेकेदार कंत्राटदार इंजिनिअर हे नामांकित व्यक्तिच्या काखेतील निवडले आणि घरकुल साठी जागा मिळाली आणि बांधकाम चालू झाले. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी असणारा संबंधित विभागाचा अधिकारी व कर्मचारी हा सुध्दा भ्रष्ट  बांधकाम चालू असताना त्यात वापरले जाणारे सळी सिमेंट विट वाळू याचा दर्जा काय होता बांधकामाला पाणी मिळाले कां ? कंत्राटदार इंजिनिअर ठेकेदार काय करणारं शिपाई. मंजूर करणारे अधिकारी व कर्मचारी. टेंडर प्रक्रिया. यासाठी पावलोपावली पैसा वाटावा लागतो आणि मग शिल्लक राहील त्यात उत्कृष्ट मटेरियल उत्कृष्ट बांधकाम कस होणार ? 

            बेघर वसाहत. या अंतर्गत घरे तयार झाली  ही सर्व घरं पूर्ण तयार करून लाभार्थी लोकांच्या ताब्यात देण्याचा शासन आदेश आहे पण घरकुल योजनेचे श्रेय लाटण्यासाठी लाॅटरी काढून एकच बिल्डिंग तयार करून लाभार्थी लोकांना वाटण्यात आली. आणि बाकी असणारी सर्व घरें बिगर गिलावा. बिगर दरवाजे. बिगर फरशी   बिगर संडास बाथरुम सोय न करता. लाईट नाही. पाणी नाही. परमाणसी पंधरा हजार भरून ताब्यात दिली. मग या सर्व घरांना पूर्ण करण्याचे अनुदान कुठे गेलं ? ही सर्व चूक आहे ती म्हणजे आपलीच आहे कारणं तुला मिळतंय का? मला मिळतंय अश्या वागण्यामुळे ठेकेदार कंत्राटदार इंजिनिअर यांचाच कोट्यवधी रुपयांचा फायदाच झाला म्हणजे आपण मूर्ख आहोत हे शंभर टक्के

               बेघर वसाहत मधील अपूर्ण घर ज्या ज्या लाभार्थी नियमानुसार लोकांनी घरं ताब्यात घेतली त्यांनी त्या घरकुल बेघर वसाहत मधील घरामध्ये. गिलावा. फरशी. पी ओ पी. कलर. लाईट फिटिंग हे सर्व उंची मटेरियल महागडे मटेरियल वापरून घर तयार केली ती घर आज चांगल्या बंगल्याला लाजवित आहेत मग यांना दारिद्र्य रेषेखालील म्हणता येईल का ? आत्ता जर नगरपालिका प्रशासक यांनी याचा बेघर वसाहत बांधून तयार झाल्यापासून सर्वे केलाच नाही नाहीतर त्यांच्या ध्यानात आले असते की ज्यांना बेघर म्हणून लाभार्थी केलं ते कोणत्या बाजूने बेघर आहेत सर्वे करणारे. त्यांनी सर्वे करतांना लाभार्थी निवड करताना किती पैसे घेतलें  आज ५०३ घर आहेत २५४ कुटुंब नियमानुसार आहेत मग आत्ता बेघर वसाहत मध्ये जागा नाही एकही घर शिल्लक नाही ते कसे ? विकणारे.  भाड्याने देणारे. गरज नसणारे. जाऊन रहा तुला कोण काढतय मी बघतो अशी राहिलेली.  यांचा सर्वे झाला आहे कां ? 

        ‌‌.  यांतच प्रामुख्याने इस्लामपूर शहरात  रमाई आवास योजनेंतर्गत अतिशय सुलभ सुटसुटीत पध्दतीने बांधकाम करण्यात आलेली वसाहत आज बर्याच दिवसांपासून राजकीय तेढ निधीचा अभाव. राजकीय श्रेय यामुळे अर्धवट स्थिती पडून आहे. बांधकाम अपूरे आहे परवा यादी जाहीर झाली आत्ता सर्वच लोकांच्या मनांत भिती आहे की आहे तसंच देणार का ? पूर्ण करून देणार ? 

    ‌.            रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल अपुरे आहे त्यात अवैध धंद्याला उत आला आहे म्हणजे. जुन्या काळात एक म्हण होती. मोकळी विहीर. मोकळ घर. मोकळ डोकं. माणसाला कामच लावणार म्हणजे आज या घरकुल मध्ये अवैध धंदे जोरात चालू आहेत. तंबाखू. गांजा अफू चरस दारुच्या बाटल्यांचा जागोजागी ढिग. सिगरेट विडी. अनैतिक काम सुध्दा येथे चालत. हे सर्व गुन्हेगारी. दहशतवाद. गुंड. टोळी युद्ध. भविष्यात गुंड तयार होणार. कारणं आज काही तरुणांना काम नाही काम करण्याची इच्छा नाही. कमी वेळात जास्त पैसा मिळविण्याच्या दृष्टीने व आपली नशा पूर्ण करण्यासाठी हे उद्या खून सुद्धा करायला मागे पुढे पहाणार नाहीत आत्ता या परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ झाला आहे. गाड्यांतील पेट्रोल चोरी.  भांडी चोर. चारचाकी गाड्यांच्या स्टेफनी. डीझेल. सायकल. दोन चाकी गाडया. यांच्या चोरिचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे घरकुल मध्ये राहणा-या लोकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे एवढेच काय अशी उंडगी मुल रात्री बारा एक वाजेपर्यंत फिरत असतात त्यामुळे संध्याकाळी कामावरुन येणार्या महिलांना अरावाचच बोलणें. हाक मारणे. खुणावने. अशा विविध त्रासाला सामोरे जावे लागत आहेत यासाठी या परिसरातील लोकानी चोरी व अवैध धंदे रोखण्यासाठी सदर विभागांत सी सी टिव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी  मा पोलिस निरीक्षक इस्लामपूर पोलिस स्टेशनला ५/११/२०२१ रोजी १२३ लोकांच्या सह्या चे निवेदन दाखल केले आहे. ७/७/२०२१ रोजी  मा लोकनियुक्त नगराध्यक्ष यांना १२३ लोकांच्या सह्या चे निवेदन सादर केले आहे. ७/७/२०२१ रोजी मा नगरपालिका मुख्य अधिकारी यांना सुध्दा १२३ लोकांच्या सह्या चे निवेदन सादर करण्यात आले होते. आजपर्यंत कोणताही प्रतिसाद मिळाला नाही म्हणजे आपण मागणी केली आमची मागणी चूकीची असेल तरी सुद्धा सदर विभागाने पत्र व्यवहार करून संबंधित व्यक्तींना कळविणे आवश्यक होते मा  नगरपालिका मुख्य अधिकारी यांनी संबंधित व्यक्तिच्या मागणीनुसार या अशा बिल्डिंगला कंपाऊंड करणे व त्या बंद पडलेल्या घरकुल योजनेच्या सुरक्षेसाठी वाॅचमन नेमणे गरजेचे आहे

      बेघर वसाहत असो किंवा रमाई आवास घरकुल योजनेतील घरकुल असो गरिब निराधार अपंग. समाजातील वंचित घटक यांना हक्काचा निवारा देण्याचा शासनाचा उपक्रम कौतुकास्पद आहे पण आज या घरांत राहणारे लोक गरिब आणि गरजू आहेत दिवसभर मोलमजुरी करणे आणि आणि संध्याकाळी जर आपल्या घरांत निवांत आणि मनमोकळ. विना भिती. राहता झोपता येत नसेल कोणी काय चोरतय का ? संध्याकाळी व्यक्ती घरांत सुखरूप येईल का ?  अशी भिती असेलतर हे हक्काचे घर काय कामाचे ?

            संबंधित ज्या ज्या प्रशासनाकडे बेघर वसाहत घरकुल वसाहत यामधील लोकानी पत्र व्यवहार केला आहे त्यांनी या लोकांना  न्याय देणे गरजेचे आहे. नको तिथे सी सी टिव्ही कॅमेरे बसविले जात आहेत मग या ठिकाणी एकादा सी सी टिव्ही कॅमेरा बसविला तर काही मोठा फरक पडेल अस मला नाही वाटत

      समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

भ्रष्टाचारविरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

हाक - धोक्याची जाणीव

 

हाक - हाक  - धोक्याची जाणीव

धोक्याची जाणीव करून देण्यासाठी दिली जाते त्याला हाक म्हणलं जात. हाक हा शब्द खेडेगावातील आहे पण आज सर्व भागात या शब्दाची गरज भासली आहे. आज. विविध योजनांच्या नावाखाली होणारी लूट. विविध पेन्शन योजना मिळवून देण्यासाठी लुट. रेशनकार्ड काढून देण्यासाठी लुट. दवाखान्यात डॉ कडून रुग्णांची लुट. पेट्रोल डिझेल दरवाढ. घरगुती गॅस दरवाढ. भरमसाठ विज बिल. ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांचीही पठाणी पध्दतीने मालमत्ता कर वसुली. बॅका पतसंस्था यांचें मनमानी व्याज. गावातील शहरातील विकास कामे गटर बगीचे स्मशानभूमी समाजभूमी रस्ते. यामध्ये लाखो रूपयांचा अपहार. महिला सुरक्षा अभाव. महिलांना मिळणारी वागणूक. शाळा कॉलेज विद्यालये महाविद्यालये यामध्ये फी चे नावाखाली पालकांची लुट. बस सेवा प्रवाशांची लुट. घरकुल घोटाळा. अपंग कल्याण योजनांचा बाजार. सुशिक्षित बेरोजगारांची वाढती संख्या. वाढती गुन्हेगारी. आत्महत्या प्रमाण. राजकीय दबाव. विविध हक्कांना तिलांजली. अशा एक नाही अनेक प्रश्नांवर विचार करण्यासाठी व तुम्हाला जाग करण्यासाठी # हाक दिली आहे. # 

          भारतातील आरोग्याचा प्रश्न हा अनेक घटकांवर अवलंबून आहे. प्रामुख्याने. गरिबी. दारिद्र्य. बेरोजगारी. रेशन घोटाळा. रेशन दुकानदार आणि पुरवठा अधिकारी व कर्मचारी सगणमत. जागोजागी भ्रष्टाचार. पैशाची उकाळणी. लोकशाहीचा अभाव. अशा विविध घटकाशी निगडित आहे. अफाट दारिद्र्य आणि बेरोजगारी यांनी देशातील 60/टक्के पेक्षा अधिक लोकांना पोटभर एकावेळचे अन्न मिळत नाही. आणि ज्यांना मिळते त्यांचाही आहार. चौरस. संतुलित व पोषणमूल्य युक्त असत नाही. जीवनसतवाचा अभावी अनेक व्यक्तिंना कोणते ना कोणते तरि भयानक आजार असतताच. सर्वसामान्य भारतीय माणसाच्या आहारात प्रथिनाचा अभाव असतो. गोरगरीबांना दुध फळे सकस आहार मिळत नाही. त्यांच्या अन्नपदार्थांत पालेभाज्या व इतर भाज्यांचा समावेश नाही या कारणांमुळे सर्वसामान्य कुटुंबातील मुल कुपोषणाचे बळी होतात. शारीरिक मानसिक वाढ नाही. त्यांची कार्यशक्ती पूरेशी नाही. एवढेच काय काही ठिकाणी पिण्यास स्वच्छ व वर्षभर पाणी सुध्दा उपलब्ध नाही. यामुळे याभागात साथीचे आजार रोग झपाट्याने पसरतात आणि गावच्या गावं बाधित होतात. 

              आरोग्याची काळजी आणि औषधांचा वापर याबाबत भारतामध्ये पुरातन परंपरा आहे. ग्रामीण भागामध्ये रांनपाला वनस्पती आणि गावठी औषधांचा वापर केला जातो. व त्या विषयांचे ज्ञान एका पिढिकडून दुसऱ्या पिढीकडे येते. या ज्ञानाचे आत्ता आयुर्वेदिक औषधां मध्ये झालेलेच दिसते. पूर्वी राजदरबारी राजवैध असत आणि सामान्य लोकांसाठी इतर वैद्यांची मदत मिळत असे. मुघल साम्राज्याच्या उदयाबरोबर युनानी औषध उपचार पद्धती काही ठिकाणी लोकप्रिय झाली. अनेक ठिकाणी हकिम अशा प्रकारचीं औषधयोजना करीत असत. म्हणजे पूर्वी औषध उपचार समाजसेवा आणि रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा म्हणून केली जात असे. माणूस वाचला पाहिजे पैशांची अशा नव्हती आज या वैद्यकीय पेशाचा पैसा मिळविण्यासाठी बाजार मांडला आहे. कोणताही नियम नाही. कोणतेही उपचार दर निश्चित नाही. औषधांचे दर निश्चित नाही.  

           ब्रिटिश आगमनानंतर ख्रिश्चन मिशनरयानी पाश्चात्य अॅलोपथी. चिकित्सक प्रसार सुरू केला व ही पध्दती लवकरच म्हणजे कमी वेळात लोकप्रिय झाली. त्यामुळे आयुर्वेदिक आणि युनानी चिकित्सा पद्धती मागे पडल्या. सामान्य आणि स्वस्त रितीने मिळणारी औषधांची सोय रितीने मागे पडली महात्मा गांधी याचे मर्म ओळखून निसर्गोपचार. योग आणि शाकाहारी यांचा प्रसार सुरू केला. म्हणजे ब्रिटिशांनी सुरवातीला आपणांस वेगवेगळ्या पध्दतीने लुटले आणि नंतर मुळालाच हात घातला तो म्हणजे वैद्यकीय साधने औषध नावाखाली लुटले त्यात अजून बदल झाला नाही ती लुट आज आपलेच परकियांच्या संगनमताने सर्वसामान्य जनतेला लुटत आहेत 

                ब्रिटिशांनी साधारणपणे जिल्ह्याच्या ठिकाणी नागरि रूग्णालयाची इस्पितळाची निर्मिती करून आरोग्याची सोय पहिल्यांदा केली. स्वातंत्र्यानंतर काळात ग्रामपातळी पर्यंत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे स्थापन करण्याची योजना आखण्यात आली. तरिही आज भारतात सर्वत्र सुलभ आणि गोरगरीब जनतेला परवडणारया खर्चात औषधोपचाराची सेवा उपलब्ध झालेली नाही त्याला कारणीभूत आहे ते म्हणजे आपल्यातील आरोग्य सेवेचा बाजार. शासकिय योजना विमा कंपन्या यांचेकडे वर्ग करणे. महात्मा फुले जन आरोग्य योजना. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य. पंतप्रधान आयुष्मान आरोग्य योजना. या फक्त नावालाच आहेत त्यांची मक्तेदारी ठराविक राजकीय दवाखाने यांनाच देण्यात आली आहे. याबाबतची भारतातील परस्थिती अंत्यंत मागासलेल्या देशा सारखीच आहे. याचा अर्थ देशांमध्ये उत्तम वैद्यकीय तज्ञ. शल्यविशारद यांची कमतरता आहे असे नाही. केरळ किंवा पंजाब सारख्या देशात वैद्यकीय सेवा अधिक चांगल्या रितीने उपलब्ध आहेत तर उत्तर प्रदेश. बिहार. मध्य प्रदेश. राजस्थान या राज्यात वैद्यकीय सेवेचा दर्जा निकृष्ट आहे असे म्हणता येईल 1960 नंतर आरोग्य क्षेत्रात कार्य करणार्या स्वयंपूर्ण संघटनांची वाढ होऊ लागली. आज देशात सर्वसाधारण पणे 5000 स्वयंस्फूर्तीने काम करणार्या संघटना वैद्यकीय क्षेत्रात कार्य करीत आहेत. अनेकदा या संस्था युनियन संघटना वैद्यकीय उपचार किंवा आरोग्य सेवा शिबिरे. कान. नाक. घसा. तसेच नेत्रचिकितसा इत्यादी सर्वसामान्य जनतेसाठी गोरगरीब लोकांसाठी शिबिरे भरवली जातात. यांतच कुटुंब कल्याण शिबिरांचे आयोजन केले जाते. अलीकडेचया काळात काही डॉ संघटना याबाबतीत जाणीवपूर्वक सहभाग घ्यावयास सुरुवात केली आहे. धार्मिक तसेच सामाजिक संघटना या क्षेत्रात अविरतपणे काम करताना आपण बघतो. . 

            आरोग्य सेवेच्या क्षेत्रात अनेक संघटना जरी कार्य करीत असल्या तरी अजूनही त्या एकत्रित कार्य करू राजकीय दबावामुळे शकत नाहीत. त्यामुळे शासकीय धोरणांवर त्याचा पाहिजे त्या प्रमाणात परिणाम होत नाही. विविध विचार प्रणाली. विविध पक्षाचा दबाव. विचार मत भिननता. या क्षेत्रात कार्य करीत असल्याने त्यांच्यात एक वाकयता होणे कठीण आहे. केरला शास्त्र साहित्य परिषद नाव या संदर्भात अपवादात्मक म्हणून सांगता येईल. सामान्य माणसापर्यंत प्राथमिक स्वरुपाचे वैद्यकीय ज्ञान नेण्याचा संघटनेने जाणिवपूर्वक प्रयत्न केला आहे. मद्यपान. धूम्रपान. व इतर अमली पदार्थ याबाबतची वयसनता बाबतीतील व्यसनाधीनता भारतीय समाजात विशेषत युवकवरगामधये. आज वाढत आहे. काही संघटनांनी मोठ्या मोठ्या शहरांत व्यसन मुक्ती याबाबत मोहीम उघडली आहे. परंतु अखेरीला आरोग्य प्रश्न हा सामाजिक व आर्थिक न्यायाच्या प्रशनाशी निगडित असल्याची व्यापक जाणीव समाजामध्ये निर्माण झाल्याखेरीज या संघटना. सेवाभावी संस्था युनियन समाजसेवक यांच्या प्रयत्न अपुरे पडतील 

          समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा 2013 रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

9890825859

धोका वाढला?

 


धोका वाढला?

          ‌ डेंग्यू ताप. मलेरिया. काविळ. हिवताप. पोटाचे विकार . सर्वात घातक लहान मुले मोठी माणसं.महिला. वयोवृद्ध व्यक्ती. यांना याचा धोका जास्त असतो. अशी परिस्थिती आपल्याच गलथान कारभारामुळे आपल्या नशिबाला येते 

 ‌ गावाचं रुपांतर शहरात झाले लोकसंख्या वाढली त्यामुळे‌ लोकांच्या राहण्याचा प्रश्न त्यामुळे वाढती दाटीवाटीने उभ्या असलेल्या इमारती जागोजागी डोंगरासारखे कचरयाचे ढीग वाढती लोकसंख्या त्यामुळे नदीप्रमाणे वाहणारी गटारे. जागोजागी सार्वजनिक. भरलेली गटारी मुतारी यातून येणारा उग्र वास आपल्या नाकाला रुमाल लावून आपण वावरत असतो. आठवडा बाजार त्यातच. विकून शिल्लक राहीलेला भाजी पाला पाचोळा कुजकी नासकी फळे. यामुळे सुध्दा दुर्गंधी पसरते. आणि सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागतो

               परवा मौसमी पण जोरात पडलेल्या पावसामुळे. रस्त्यात जागोजागी साठलेली. उगवलेली मोठ मोठी झुडपे. डपकी. चिखल. त्यातच गाढव. कुत्री. गाय म्हैस.मेलेले उंदीर. घुशी. अन्य जनावरे यांची विष्टा यामुळे भयानक येणारा. भयानक वास.पाऊस. उघडला पण आजून सुध्दा काही ठिकाणी पाण्याची डबकी अजून तसीच आहेत. परवा आपल्या जिल्ह्यात जवळपास १०५ गावांत पूराचे पाणी घुसले होते. त्यामुळे नदीच्या पूरातून वाहत येणारा कचरा. घाण. पूर ओसरल्यावर जागोजागी राहीली आणि आत्ता पाऊस उघडला आणि त्या घाणीचे बाष्पीभवन होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे विविध साथीचे रोग जसे. ढेंगू. मलेरिया. काविळ. हिवताप. पाण्यामुळे पोटाचे रोग होण्याचे प्रमाण वाढले आहे

          वरील प्रमाणे सर्व सामान्य विचार केला तर आपल्या असे लक्षात येईल की सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे त्यातच बाकी काही राहीले ते. शहराच्या बाजूला असणारे उपनगर यांनी काढली आहे. या भागात सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे मोकळे भूखंड यांचें मालक जागा विकत घेऊन परगावी राहण्यास आहेत. त्यामुळे या जागेकडे वर्षातून काही वेळा येतात. त्याची स्वच्छता हा प्रश्न कायमच राहतो. मोकळ्या भूखंडावर पावसाळ्यात उगवणारी विविध वनस्पती असणारे डबरी यामुळे साठणारे पाणी व उगवणारी झाडे झुडपे यातील बहुतांशी जागा मोठ्या लोकांच्या आहेत यांना कोण विचारणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. काही लोक आपल सांडपाणी लोकांच्या दारात गटारात सोडत आहेत यामुळे यांवर डेंग्यू तापाचे मच्छर हजारो संख्येने जन्म घेतात आसपास राहण्यास असणार्या लोकांना याचा फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर यांनी नगरपालिका प्रशासन यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती की या भुखंड मालकांवर कायदेशीर कारवाई.अथवा मोकळे भूखंड स्वच्छ करण्याची सक्ती करण्यात यावी अशी मागणी केली होती. पण कोणतीही कारवाई झाली नाही

        आज आपण कुठेतरी कोरोना सारख्या महाभयंकर महामारी संकटाने थैमान घातले होते त्यातून काही काळ सूटका झाली आहे. संकट संपले नाही. तोवर आपल्या गावावर. तालुक्यावर. जिल्ह्यावर. ढेंगू. मलेरिया. काविळ. हिवताप. असे भयानक रोगांनी थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. सर्वसामान्य असो लहान मोठा. गरीब श्रीमंत. रोगाला काही समजत नाही तो सर्वात समान समजतो. त्यामुळे टाळेबंदी मुळे सर्व सामान्य जनता अजूनही सुरळीत झाली नाही हाताला म्हणावं तसं काम नाही. त्यामुळे आत्ता दवाखान्याचा.दवाखाने. फुल्ल होण्यास सुरुवात झाली आहे औषधांचा खर्च आपणांस कर्जबाजारी करणारं आहे. त्यामुळे आपण आपल्या घराजवळच्या परिसर स्वच्छ ठेवा. मोकळे टायर. भंगार. अस्ताव्यस्त पडलेले सामान आजच हालवा. कारणं या जागेतच डेंग्यूचा मच्छर. पनपतो त्यामुळे आपला परिसर स्वच्छ ठेवा संडास बाथरुम यांचे सांडपाणी जेथे गोळा होते तेथे. तेल सोडा. उघडे खड्डे झाकून टाका. हे आपल्यालाच करावे लागणार आहे.काही ठिकाणी गटारे नाहीत. शेजारीपाजारी एकामेकाचे सांडपाणी लोकांच्या जागेत गेले तर रोज भांडणे होतात. आपणासच आपले प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. कारणं मतांसाठी येणारे आत्ता नाहीत जरा थांबून येणार आहेत

                ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका. यांनी पाऊस उघडले बरोबर. मच्छर नाशक औषधे पावडर फवारणी करणे गरजेचे होते. पण फवारणी गावात झाली पण आजूबाजूला जी उपनगर आहेत त्यांच्याकडे कोणाचेही लक्ष नाही त्यामुळे उपनगरात राहणारया लोकांचे धोक्यात आले आहे. नागरिकांना आपल्या आपल्या विभागासाठी ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांचेकडे मच्छर नाशक पावडर फवारणी औषध फवारणी करण्यासाठी मागणी करा. अन्यथा आपल्यातून. ठराविक रक्कम काढून आपला आपला परिसर गल्ली आपले घर. औषध फवारणी. पावडर फवारणी करून घ्या. 

             समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९  

बांधकाम कामगार यांचें कोणाचें सुरक्षा संच आणावयाचे राहीले असतील तर संपर्क साधावा.

मोर्चा मोर्चा - इतना भुका हू सहाब के धोका भी खा लेता है

 


मोर्चा मोर्चा

              आपल्या घरातील वातावरण. कुटुंबाची रचना यांचा आपल्या राजकीय आणि सामाजिककरण यांच्याशी घनिष्ठ संबंध असतो. याचा अर्थ घरात आई-वडील आपल्याला राजकारण समजावून सांगतात असे नाही पण "अधिकार" या गोष्टी विषयी आपली मते कुटुंबातील अनुभवांवर अवलंबून असतात. कारणं कुटुंबात आपण आपल्या अधिकारांचा दिर्घकाळ अगदी जवळून अधिकारांचा अनुभव घेत असतो. आपली कुटुंबव्यवस्था ही वर्चस्व प्रधान आहे. वडीलधाऱ्याचे कर्त्या पुरुषाचे वर्चस्व घरातलयावर असते आपली या वर्चस्वाबददल भावना काय असतें ? सामान्यपणे वडीलधाऱ्या व्यक्ति पुढे आपण नमतो. पण त्यातूनच आपल्या मनात बंडखोरीची भावना वाढीस लागते. ती व्यक्त होतें असे नाही. पुढे या कौटुंबिक अनुभवांची परिणती मोठेपणी आपल्या राजकीय स्वभावात येते. उदा आज्ञापालनासाठी. आपली तयारी. बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी बंडखोरी किंवा विरोध. भावना आपल्या मनात पुरेशी खोलवर घर करून बसते आणि राजकारणात ती क्वचितच उफाळून येते. मग सत्ता. मनमानी पद्धतीने कारभार करण्यासाठी आपण कोणत्याही स्तराला जाण्यास तयार असतो. 

              मोर्चा हा सर्वसामान्य माणसाला आपल्यावर आपल्या समाजावर. झालेल्या अन्यायाच्या विरोधात मोर्चा काढण्याचा अधिकार आहे. पण आपल्या स्वार्थासाठी आज आपली ताकद दाखविणे. माझ्या मागे एवढी जनता आहे हे दाखवण्यासाठी आज शक्तिप्रदर्शन करण्यासाठी गोरगरीब जनता. बांधकाम कामगार. आशा वर्कर्स. कंपन्या कामगार. यांना एक पटेल असे गाजर दाखवून त्यांना यात सहभागी करण्यात येते. निदर्शने मोर्चे यांचा अनुभव लहान-मोठ्या शहरांत राहणा-या लोकांना येतो. कारणं ज्यावेळी मोर्चा रस्त्यावरुन जातो घोषणा देत रस्त्याने एखादा मोर्चा जायला लागला की आजूबाजूने बघ्याची गर्दि जमते त्यांना मोर्चाबददल कुतूहल वाटत. घोषणा फलक यांच्यामुळे मोर्चेवाले कोण आहेत ते कळते त्यांचे म्हणने काय आहे याचीही थोडीफार कल्पना येते. मुख्य म्हणजे आपले म्हणने मांडण्यासाठी रस्त्यावर उतरलेले लोक हे विसरतात की जेव्हा मोर्चा काढला जातो आणि तो जर एखाद्या नेत्यांचा असेल किंवा संघटना सेवाभावी संस्था युनियन यांचा असेल तर त्यांना त्या मोर्चा वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आपले पोलिस बांधव संरक्षण देतात. हे परम कर्तव्य माणून हे काम केले जाते. हे सर्व झाले मोर्चा काढणारे आणि त्यात सामिल होणारें यांचेसाठी. त्याच रस्त्यावरून जाणाऱ्या सर्वसामान्य जनतेच काय. कारण रस्ता रोको आंदोलन असेल किंवा मोर्चा असेल तर तासन तास रस्ते अडविले जातात. त्यावेळी सर्वसामान्य जनतेत. शाळेला जाणारी मुले. नोकरी साठी जाणारे लोक. काॅलेज महाविद्यालय. अनेक शिकवणी. कोर्स साठी जाणारे तरुण. डबेवाले. रिक्षा चालक. एस टी सेवा. मालवाहतूक पॅसेंजर वाहतूक. दवाखान्यात जाणारया आशा वर्कर्स. डॉ. यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. सर्वांत वाईट काय असेल तर ज्यावेळी मोर्चा रस्ता रोको. चालू असेल त्यावेळी त्या रस्त्यावर वाहनांची गर्दी निर्माण होते. आणि त्यातच जर एकादि. अॅमबुलनस अडकून पडली आहे त्यात अतिदक्षता जीवन मरणाच्या दारात असणारा पेशंट असेलतर. त्याच्या जीवनाचा. कोण विचार सुध्दा करत नाही.जर अशावेळी त्यात असणारा पेशंट जर एकधयाचया घरचा कर्ता पुरुष असेल आणि अशा मोर्चा वेळी निर्माण झालेल्या. वाहन गर्दि मुळें त्याला दवाखान्यात नेण्यास उशीर झाला आणि त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या मृत्यू होण्यासाठी कारणीभूत असणारे हे मोर्चा काढणारे यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि मृत्यू पावलेल्या कुटुंबातील सदस्यांना योग्य तो आर्थिक मोबदला देण्यात यावा. शासनाने अशी तरतूद करण्याची गरज आहे. बघा किती टक्के मोर्चे कमी होतील. सर्वसामान्य नावाखाली आपली भाकरी मोर्चा या माध्यमातून भाजून घेणारयाना निश्चित चाफ बसेल. दगडफेक. वाहनांची जाळपोळ. आत्मदहन व बंद आंदोलन मोर्चा उपोषण यावेळी होणा-या शासकीय सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले तर सदर हे सर्व घडवून आणणारे. सदर संघटना सेवाभावी संस्था युनियन व अन्य राजकीय सामाजिक. यातील सदस्यांवर सदर नुकसानभरपाई वसूल करण्यात यावी 

            आपले म्हणने मांडण्यासाठी मोर्चे मिरवणुका हा मार्ग असल्याचे लोकांच्या लक्षात येते. मोर्चाने जाऊन आपण आपली मागणी मागू शकतो किंवा कोणाचा तरी निषेध करत असतात आपल्याला जे म्हणायचं आहे ते सर्वांनी मिळून शांततेच्या मार्गाने मांडले तर त्याचा परिणाम होतो. आपल्या मागणीकडे सर्वांचे लक्ष वेधून घेता येते मोर्चे निदर्शने हा आपले विचार व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. ती एक राजकीय कृती आहे. हे अशा प्रसंगातून आपल्या लक्षात येते तुम्ही शहरात राहणारे असाल तर आणखी एक घटना तुम्हाला माहीत असेलच ती म्हणजे"धरणे" एखाद्या गोष्टीचा निषेध म्हणून पाचपन्नास माणसं दिवसभर एका जागी बैठक मारुन बसतात त्याला "धरणे धरुन बसने " असा शब्द प्रयोग प्रचलित आहे. साधारणपणे मोठ्या चौकात किंवा सरकारी कार्यालयापुढे असे " धरणे" धरले जाते बंद. हरताळ. या गोष्टी आपल्या सर्वांचा परिचय असतो. प्रत्त्येक चळवळीत असे अनेक मार्ग चोखाळले जातात. आपले म्हणने मान्य होत नाही म्हणून गावकरी एखाद्या मंत्र्याला गावात प्रवेश नाकारतात. किंवा घेराव घालतात कधी हमरसते वाहतुकीला बंद करतात. रेल्वे अडविणे. या मार्गाचा ही अवलंब केला जातो " सत्याग्रह" हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे हेही तुम्ही अनुभवाने शिकला असाल एखाद्या मागणीसाठी चळवळ उभी करताना जरुर तर शासनाने घातलेले निर्बंध मोडणे आणि त्याबद्दल होणारी शिक्षा सविकारणे असे साधारण सत्याग्रहाचे स्वरूप असतें या सर्व प्रकारांचा चळवळीच्या वेळी उपयोगी केला जातो शहरवासीयांना बंद. मोर्चे. धरणे. हे मार्ग जास्त व परिचयाचे असतात तर लहान गावात राहणा-या लोकांना गावबंदी. घेराव. रस्ता रोको. यांचा जवळून परिचय असतो. शिवाय उपोषण हे राजकीय चळवळीत प्रभावशाली हत्यार म्हणून वापर केला जातो. तुम्ही या कृतीमध्ये कधी सहभागी झाला नसलात तरि त्या पाहिलेल्या ऐकलेल्या नक्किच असतील. या कृतीमुळे आपल्याला राजकारणातील वादग्रस्त प्रदर्शनाचे आकलन होते आणि राजकीय वाद कसे व्यक्त होतात यांचीही आपणांस कल्पना येते. 

    शासकीय आॅफिस मध्ये आज ग्रामपंचायत. पंचायत समिती. जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका तहसिलदार कार्यालय प्रांत आॅफिस. वन विभाग. जलसंधारण विभाग. महावितरण कंपन्या. महसूल विभाग. जिल्हाधिकारी कार्यालय. कामगार विभाग. विविध संस्था. राजकीय सामाजिक विभाग. आर्थिक विभाग.पुरवठा. विभाग माहिती अधिकार अशा एक नाही अनेक विभागांत. लोकांनी आपली निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज स्मरण पत्र. विविध विषयांचे पत्र व्यवहार केले आहेत आपल्या नागरि सनद मध्ये कोणता पत्र व्यवहार किती दिवसात निकाली काढायचा आहे यांच्या सूचना देऊन सुध्दा. काही शासकीय व इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी कामात कामचुकार पणा करत आहेत त्यामुळे आजही. प्रत्त्येक विभागातील असे विविध पत्र व्यवहार जर काढले तर लाखोंच्या पटीत निघतील. या अधिकारी व कर्मचारी यांच्या गलथान कारभारामुळे सर्वसामान्य जनता मोर्चे आंदोलने हे मार्ग निवडत आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेचे शोषण इतर पक्षगार करत आहेत. त्यामुळे विविध शासन निर्णय शासन काढत आहे तर असा एक शासन निर्णय शासनाने काढला पाहिजे की वेळेत ज्या अधिकारी व कर्मचारी यांनी पत्रव्यवहार निकालात काढला नाही. त्यांना आर्थिक दंड म्हणून अर्ज पत्रव्यवहार दाखल करणार्या व्यक्तिला एक ठराविक रक्कम कामात कुचराई केल्याबद्दल देण्यात यावी. म्हणजे यांच्या पगाराला कात्री लागल्याशिवाय हे आपले काम वेळेत करणार नाहीत. यामुळे मोर्चे निघणार नाहीत. ज्या कारणांमुळे मोर्चा काढण्यात आला आहे ज्या विभागामुळे ही परस्थिती निर्माण झाली आहे त्याची सर्व नुकसान भरपाई संबंधित विभागांवर घालण्यात यावी 

            समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या