Showing posts with label प्रशासन. Show all posts
Showing posts with label प्रशासन. Show all posts

आम्हाला कधीच वाटले नाही

 


आम्हाला कधीच वाटले नाही

            आपल्या शासनव्यवस्थेचे विविध कार्यालये शासकीय निमशासकीय कार्यालये स्थापन करण्यात आली आहे त्यात प्रामुख्याने. ग्रामपंचायत राज. नगरपालिका महानगरपालिका. पंचायत समिती. अशी विविध कार्यालये. स्थापन करण्यात आली आहेत. यामाध्यमातून विविध विकास व कल्याणकारी योजना राबविल्या जातात. त्या गोरगरीब आणि गरजूंना मिळवून घेण्यासाठी विविध जाचक कागदपत्रांची अट. अधिकारी व कर्मचारी दलाल एजंट यांच्याकडून अगदी हिण वागणूक दिली जाते. 

   ग्रामपंचायत ग्रामिण भागातील मिनी मंत्रालय आहे यामधून खेड्यापाड्यात विविध योजना राबविण्यात येतात त्यात प्रामुख्याने. रस्ते. गटर बगीचे स्मशानभूमी समाजभूमी रस्ते विकास. घरकुल योजना. वयोवृद्ध. महिला निराधार विधवा अनुदान यासाठी गोरगरीब लोक ग्रामपंचायती मध्ये अर्ज दाखल करतात आणि मग त्या त्या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची इनामदारी. जोरात असते. वर्षे नु वर्ष. लाभाचे गोरगरीब जनतेचे अर्ज आज सुध्दा धुळखात पडले आहेत कोणीही अधिकारी व कर्मचारी यांना कोणताही पत्रव्यवहार करून कळविले सुध्दा नाही. म्हणजे या अधिकारी व कर्मचारी यांना कधीच वाटली नाही गोरगरीब यांना छळताना पंचायत समिती हे तर सर्वात मोठें करपशन आहे योजना मोठया पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून नेते पुढारी आमदार खासदार मंत्री पुढारी यांचें बगलबच्चे यांनाच मिळवून देत आहे. तरि सुध्दा या अधिकारी व कर्मचारी यांना कधीच वाटली नाही

          बांधकाम कामगार नोंदणी हे सर्वात मोठें भ्रष्टाचार केंद्र आहे बांधकाम कामगार व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचेकडून बांधकाम कामगार यांचेसाठी 19 कल्याणकारी योजना राबविण्यात येतात त्या मिळवून घेण्यासाठी काही जाचक अटी शर्ती. व कामगार हितचिंतक संघटना दलाल आणि एजंट फुटाला निर्माण झाले आहेत पूर्ण जिल्हा भ्रष्टाचार युक्त झाला आहे. संघटना कामगार हितचिंतक यांनी बांधकाम कामगार यांना शारीरिक मानसिक आर्थिक लुट सुरू केली आहे. त्यांना सहकार्य सहाय्य कामगार आयुक्त भवन मधील अधिकारी व कर्मचारी. यांच्याशी हातमिळवणी करून तुम्ही खा आणि आम्ही खातो असा फंडा अमलात आणला जातो. सर्वात मोठा कामगारांचा अपमान याच सहाय्यक कामगार आयुक्त भवन मधील अधिकारी व कर्मचारी करतात तुम्ही कोणाकडून आला. तुमची संघटना कुठली. कुणाला किती लाभाचे पैसे जमा झाले हे कामगारा आगोदर संघटना वाल्यांना सांगणारे हेच आॅफिस मधील अधिकारी व कर्मचारी आहेत. आम्हाला किती पैसे देणारा. अशी विचारणा करणार्या अधिकारी व कर्मचारी यांना आपल्या पदांवर राहण्याचा अधिकार नाही. आज हजारो कामगार लाभाची प्रकरणे अशा गलथान कारभारामुळे धुळखा पडले आहेत. म्हणजे या अधिकारी व कर्मचारी यांना कधीच वाटली नाही आणि वाटणारं नाही 

              माहिती अधिकार. अधिनियम २००५ सर्व गोरगरीब जनतेला शासकीय निमशासकीय कार्यालयात चालणारे कामकाज तपासणी पडताळणी करण्याचा अधिकार देण्याचा मोठा प्रयत्न आहे पण आज सर्वसामान्य जनतेला गोरगरीब लोकांना एकादी माहिती पाहिजे असेलतर माहिती अधिकार दाखल करण्याची सुध्दा पध्दत माहिती नाही. आणि जाणकार लोक विशिष्ट फी दिल्याशिवाय शिकवत नाहीत म्हणजे सर्वात अगोदर यांना वाटली पाहिजे. माहिती अधिकारांची माहिती देताना माहीती देता येत नाही. सदोष कारण दिले जात नाही. सुनावणी असुन सुद्धा अधिकारी व कर्मचारी हजर राहत नाही. असे एक नाही अनेक नपटणारे कारणें देवून. माहिती अधिकार कायद्यात सजा व दंड तरतूद असुन सुद्धा त्याकडे डोळेझाक करणारे अधिकारी व कर्मचारी यांना जरा सुद्धा वाटली नाही 

            प्रत्येक तालुक्यात असणारे तहसिलदार कार्यालय हे लहान जिल्हाधिकारी कार्यालय माणले जाते त्यामध्ये. महसूल. संजय गांधी निराधार. श्रावणबाळ योजना. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन. सर्व पत्र व्यवहार. अपंग विकासासाठी योजना. पुरवठा विभाग. स्टॅम्प. निवडणूक आयोग कार्यालय अशी विविध विभागांचे काम करण्यासाठी विविध विभाग नेमले आहेत. त्यात सर्वात मोठा भ्रष्टाचार म्हणजे महसूल. वर्षानुवर्षे धुळखात पडलेले जमीन संबंधित प्रकरणे. वयोवृद्ध महिला पुरुष निराधार विधवा यांच्यासाठी विविध पेन्शन योजना. यासाठी तहसिलदार कार्यालय मध्ये दाखल केलेले पत्र व्यवहार कोण बघत सुध्दा नाही वयोवृद्ध व अपंग लोकांसाठी असणार्या योजना त्यासाठी लागणारे कागदपत्रे अपंगाला. वयोवृद्ध व्यक्ती आॅफिसला जाता येईना. कोणताही अधिकारी व कर्मचारी यांना एसी रुम सोडू वाटेना. रस्त्याने येणार्या जाणारया लोकांकडे केविलवाणी नजर करून पाहणारे अपंग आणि वयोवृद्ध मी बघितले आहेत पण अधिकार जर आपले आॅफिस सोडून खाली आला तर कमी बापाचा होणार आहे कां ? पण शासनाने ज्याच्या सेवेसाठी यांची निवड केली आहे तयाची सुध्दा यांना कधीच वाटली नाही रेशन दुकानदार आणि शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे संगनमताने चालणारा सावळागोंधळ आपण बघतो. ज्यांचे दारिद्र्य रेषेखालील नाव आहे त्याला रेशनकार्ड नाही. ज्याला दारिद्र्य रेषेखालील प्रमाणात आहे त्याचे दारिद्र्य रेषेखालील रेशनकार्ड नाही दुकान दारची दमदाटी. अधिकारी व कर्मचारी यांचे पैसै खाऊन काम. लाभार्थी वार्यावर. सदन व्यक्ती मुबलक धान्य. नाव कमी करणे नावं वाढविणे. अन्न धान्य सुरू करणे. मयत व्यक्तिची नावे कमी करणे. नविन रेशनकार्ड काढणे यासाठी किती पैसे देताय. मगच काम होतंय. आॅफिसला कर्मचारी कमी ठेकेदार पध्दतीने भरली जाणारी यांचें पगार कमी मग यांना कुराण मोकळ लुटायला अधिकारी व कर्मचारी यांच्या संगनमताने. म्हणून म्हणतो या अशा कामचुकार अधिकारी व कर्मचारी यांना कधीच वाटली नाही. 

              वैद्यकीय सेवा हीच ईश्वर सेवा. मनांत भावना आहे आणि समोर दिसतो तो फक्त पैसा. औषधांचा दर उपचार खर्च मनमानी पद्धतीने आकारली जाणारी फी. गोरगरीब लोकांना कोणत्या दवाखान्यात कोणते उपचार मोफत होतात कोणता दवाखाना कोणत्या योजनेअंतर्गत मोफत वैद्यकीय सेवा देतो हे समजलंच नाही आणि आपणं करूनच दिलें नाहीं म्हणून म्हणतो या सर्व वैद्यकीय बाजार करणारे यांना कधीच वाटली नाही

             शेतकरी आत्महत्या कर्जबाजारी पणा. बेरोजगारी. एस टी संप. पूरग्रस्त अनुदान. बोगस पंचनामे. घरांचे. गोठे. जनावरं. मयत व्यक्ति यांचें बोगस व पैसै खाऊन बोगस पंचनामे करणारे अधिकारी व कर्मचारी. खरोखरच नुकसान झालेले वार्यावर आणि ज्यांचे कांहीच नुकसान झाले नाही अशा लोकांना शासनाची मदत मग पैसा अन्न धान्य याप्रमाणे. म्हणजे खरोखरच या अधिकारी व कर्मचारी यांना कधीच वाटली नाही. प्रकल्प ग्रस्त लोकाची जमीन संपादन करणे. त्यांची परस्पर विक्री करणारे. असे भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांना कधीच वाटली नाही

      आज भरती आहे उद्या भरती तारिख जाहीर होईल या आशेने सकाळ संध्याकाळ. मिळेल ते काम करून अर्धपोटी उपाशी राहून आपले व आपल्या कुटुंबाला हातभार लावणे तरुण आज मोठ्या संकटात सापडलेल्या आहेत. सरकार भरती काढत नाही मुलाची वय संपली लग्न होत नाही म्हणून मनांत झूरणारे आई वडील सगळा प्रकार अगदी भयानक आहे. म्हणूनच सरकारला सुध्दा कधीच वाटली नाही

       समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

आरोग्य वाचवा. शासनाला जागवा.

आरोग्य वाचवा. शासनाला जागवा. 

                    गाव छोटी छोटी होती अशा आकांक्षा कमी होत्या कोणीही आजच्यासारखे रोजच बाहेरचं रस्त्यावर गाडीवर मिळणारे खाद्यपदार्थ खाण्यास जात नव्हते कारण तेवढे आपले चोचले नव्हते आज सर्वत्र गावात तालुका जिल्हा राज्य सर्वच ठिकाणी चौका चौकात वडापाव. चायनीज भेळ. दाबेली. बिर्याणी पाणीपूरी मटन चिकन दुकान. तेल व किराणा विक्री करणारे दुकानें. फिरून खाद्यपदार्थ विक्री करणारे. फळे फुले भाजीपाला विक्री करणारे. अशी एक नाही अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ विक्री करणारे आज जागोजागी ठाण मांडून बसले आहेत त्यातच यांचेकडून ग्राहकाला मिळणारी वागणूक. मिळणारी स्वच्छता. तशा प्रकारची आहे. 

                आज आपणं वडापाव बद्दल बोलू आपल्या आसपासच काय पण ग्रामीण भागात किंवा शहरी भागात आज हातावरचे पोट असणारे. दिवसभर काम करणारे राहण्याचा ठिकाणा नाही. असे व दिवसभर वेड्यासारखे फिरणारे. भिक मागणारे. अशी बरीच जनता आणि यांचं एकमेव बजेट मधील खाण आहे ते म्हणजे वडापाव. स्वस्त परवडणारा असा एकच पदार्थ आहे. आपल्या महाराष्ट्रच केंद्र माणल जाणारी मुंबई येथे प्रथम खाद्यपदार्थ म्हणून वडापाव याचा सहभाग असतो

              वडापाव आणि स्वच्छता आणि वडापाव मध्ये वापरला जाणारा कच्चा माल त्याचा दर्जा. काम करणारे कामगार यांचे आरोग्य. याचा आपण कधीच विचार केला नाही आज मी तुम्हाला एका वडापाव गाडीवर घेऊन जातो. चौकाच्या एका कोपरयात गटारवर फरशी टाकून त्यावर गाडी उभी केलेली. सकाळी सर्व खाद्यपदार्थ विक्री करणारे गाडे चालू होतात. पिण्यासाठी बोअरचे पिण्यास अयोग्य असे पाणी. बाजारात कमी दरातील मिरची. सडलेली कोंथिबीर. सर्वात खराब झालेला काळ पडलेला बटाटा. कमीत कमी आठ दिवस न बदलेले खाद्यतेल. अस सर्व असत कामांवर असतो तो बालकामगार. त्याच्या अंगावर फाटलेली कपडे. वाढलेली केस नखे अशी सर्वच खाद्यपदार्थ विक्री करणार्या गाड्यांची परस्थिती आहे. असे सर्व लहान उद्योग सुरू करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग अशा खाद्यपदार्थ विक्री करणार्या लोकांना नियम अटी घालून परवाने देतात पण सत्यता कोणताही नियम पाळला जात नाही. त्यामुळे खाद्यपदार्थ विक्री करणारे मोकाट झाले आहेत. हेच उधोग नाही तर. बार. हाॅटेल. धाबे. घरगुती खाणावळ. यांच्याबद्दल सुध्दा अन्न व औषध प्रशासन विभागाचे परवाना नियम अटी सारख्याच आहेत. पण सत्यता पालन होत नाही मटन चिकन विक्री करणारे दुकानें यांवर स्वच्छता नाही. कामांवर असणारा कामगार त्याचे आरोग्य. स्वच्छता अभाव. कापण्यात येणारे कोंबडी बकरी त्याचा दर्जा. काय. काही दुकानांवर निकृष्ट दर्जाचे मांस विकले जाते. आपण वृतमापत्रात वाचतो दूरदर्शन वर बघतो अन्न व औषध प्रशासन विभाग यांची मटन मार्केट मधील दुकानांवर छापा टाकला आणि अमुक अमुक किलो निकृष्ट दर्जाचे मांस जप्त केले जप्त केलेले मांस व अन्य पदार्थ कुठे गेले अधिकारी व कर्मचारी यांच्या पोटात. बघा छापा कश्यासाठी टाकला. तुमचे आमचे आरोग्य सांभाळण्यासाठी नाही 

          चायनीज एक मोठ खुळ आपल्या डोक्यात आहे घरातील सर्वजण एकत्र बसून चायनीज खातात पण ते कधी शिजवल जात. तेल कोणत आहे. चिकन कसल आहे. चायनीजला कलर लाल आला म्हणजे कोणत केमिकल त्यात वापरल आहे. ते आपल्या शरिरावर काय विपरीत परिणाम करिल याचा आपण कधी विचार करत नाही मग याचा विचार अन्न व औषध प्रशासन विभाग यांनी तरी केला आहे का ? 

 फळें विक्री करणारे नासकी कुजकी फळे विकली जातात. फळे पिकविण्यासाठी विविध औषध केमिकल वापरले जाते त्यामुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे 

         गुटखा. खैनी सिगारेट विडी तंबाखू. अफू चरस गांजा नशेची औषधे. गोळया. पाऊडर. अशी विविध व्यसनाची सवय आपणास आपल्या चौकात चौकात आपल्या घराजवळच्या पानटपरी पासून लागते. शाळा कॉलेज विद्यालये महाविद्यालये यांच्या जवळ नशेचा कोणताही पदार्थ विक्री करण्यास शासनाने बंदी घातली आहे पण आज सर्वत्र सर्रास नशेच्या पदार्थांची विक्री केली जात आहे कोणताही रोख ठोक नाही यामुळे आपली तरुण पिढी धोक्यात आहे आतातरी अन्न व औषध प्रशासन विभाग कुठे आहे 

              दारूबंदी साठी शासन नुसता आदेश काढते पण त्यावर कोणतीही कारवाई होत नाही आज काही गावांत शाळेच्या भिंतीला लागून आज दारू दुकान आहे ज्या महिलांनी उलटी बाटली आंदोलन केली त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि राजकारणी लोकांनी आंदोलन खुडून काढली. कोणीही काहीही बोलत नाही कारणं ही दुकाने सत्ताधारी यांच्या बगलबच्चे यांचीच आहे याला कोण लगाम घालेल काय माहित नाही 

अन्न आणि औषधे यांचे

 प्रमाणीकरण करून, त्यांच्या निर्मितीवर व वाटपावर नियंत्रण ठेवणारी शासकीय यंत्रणा. १९३५ नंतर अन्नाची गरज खूप वाढली होती, परंतु उत्पादन मात्र कमी होत होते. अशा परिस्थितीत अन्नामध्ये इतर पदार्थांची भेसळ करण्याचे प्रमाण वाढले. अन्नभेसळीस प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र शासनाने ‘अन्नभेसळ प्रतिबंधक कायदा-१९५४’, अंमलात आणला. इ.स. १९५५ पासून या कायद्यातील त्रुटी घालवून व योग्य त्या तरतुदी करून त्याची सर्व राज्यांत अंमलबजावणी करण्यात आली आहे. या कायद्यामुळे अन्नात व पेयात भेसळ करण्यास मनाई करण्यात आली. अन्नाची साठवण योग्य ठिकाणी व योग्य प्रकारे व्हावी; त्यावरील वेष्टन अन्नाला व औषधाला घातक नसावे; त्यावर निर्मितीची तारीख, कालावधी व साठविण्यासंबंधीच्या सूचना इ. सर्व बाबी स्पष्टपणे लिहिलेल्या असाव्यात, असे या कायद्यात नमूद करण्यात आले आहे.

अन्न आणि औषधे यांचे विश्लेषण करण्यासाठी प्रत्येक विभागात सर्व सुविधायुक्त प्रयोगशाळा शासनाकडून उभारल्या जातात. त्या ठिकाणी योग्य शिक्षण असलेले प्रशासक व तपासणी अधिकारी नेमले जातात. तपासणी अधिकारी अन्न वा औषधे खरेदी करून परीक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठवितात. उत्पादनात भेसळ आढळल्यास संबंधित व्यक्तीवर किंवा उद्योगावर खटला भरण्याचा अधिकार त्यांना असतो. एखादा ग्राहकदेखील अन्नाची व औषधाची खरेदी करून परीक्षणासाठी ते प्रयोगशाळेत पाठवू शकतो. मात्र ग्राहकाने त्याचा हा उद्देश विक्रेत्याला अगोदर सांगावा लागतो. महानगरपालिका, नगरपालिका इत्यादी संस्थाही त्यांचे अधिकारी नेमू शकतात.


केंद्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत या प्रशासनाचे नियंत्रण केले जाते. आरोग्य सेवेचे महासंचालक हे प्रशासन विभागाचे अध्यक्ष असतात. इतरही सदस्य या समितीवर असतात. अन्न व औषध परीक्षण यांसाठी वेगवेगळ्या समित्या असतात. औषधे आणि सौंदर्यप्रसाधने यांविषयीचा कायदा १९४० मध्ये अंमलात आणला गेला. १९६२ मध्ये सर्व प्रकारची प्रसाधने या कायद्याखाली आली. अशा कायद्यामुळे संपूर्ण भारतात औषधे व प्रसाधने यांची निर्मिती, साठवण, वाटप व विक्री यांवर नियंत्रण आले. ग्राहकांना प्रमाणित औषधांचा पुरवठा योग्य तर्‍हेने व्हावा, हा यामागील मुख्य उद्देश असतो. इंटरनॅशनल कॉंग्रेस ऑफ हार्मोनायझेशन ही आंतरराष्ट्रीय संस्था या नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्त्वे ठरविते.

      ‌. आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी शासनाने विविध विभाग नेमले आहेत त्यात प्रामुख्याने अन्न व औषध प्रशासन विभाग. अन्न सुरक्षा अधिनियम. असे विविध विभाग आपल्यासाठी आहेत यामध्ये आपणांस काही चुकीचे आपल्या आरोग्यास हानिकारक अपायकारक असे वाटत असेल तर आजच आवाज उठवा आणि त्याची तक्रार संबंधित ठिकाणी करा आरोग्य वाचवा शासनाला जागवा. 

         समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९ 

    बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर यांचेकडून शिराळा तालुक्यातील सार्थ निवड कामांची आवड सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे धडाडीचे नेतृत्व. श्रीमती सौ अनिता विजय धस यांची युनियनच्या. शिराळा तालुका कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली

कोण विचारणार आहे का?

 


कोण विचारणार आहे का? 

               सर्वसामान्य माणसाला ग्रामीण व शहरी भागात शासकीय आर्थिक सामाजिक शैक्षणिक योजनांची माहिती अंमलबजावणी होणेसाठी. शासनाने प्रत्त्येक विभागाकडून एक कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे 

            ग्रामीण भागातील लोकांचा रोजगार हा स्थायी नाही नसतो त्यामुळे त्यांच्या हाताला वर्षभर पुरेसा रोजगार उपलब्ध होत नाही. यामुळे ग्रामीण भागातील नागरिक. हे मागास प्रवर्ग म्हणून ओळखले जातात. आपली रोजगाराची असणारी तुट भरून काढण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांचा रोजगार शोधात. शहराकडे वाढवणारा लोंढा. त्यामुळे. राहण्याचा पिण्याच्या पाणी. शिक्षण अभाव. सामाजिक अस्थिरता. यामुळे वाढती गुन्हेगारी. रोजगार अभाव यामुळे वाढते अवैध धंदे व्यसनाधीनता. असे एक नाही अनेक प्रश्न आज आपल्या पुढे आ वासून उभे राहिले आहेत त्यामुळे तरुण पिढी धोक्यात आली आहे. सर्वांना वर्षभर पुरेसा रोजगार आपल्या गावातच उपलब्ध व्हावा यासाठी 

             शासनाने महाराष्ट्र उधोग उर्जा व कामगार विभागाच्या दिनांक. २५/२/२०१३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार ग्रामीण भागासाठी संजिवनी माणली जाणारी. * महात्मा गांधी रोजगार हमी योजना. * व त्याअंतर्गत रोपवाटिका. घर घर गोठा. गोबर गॅस. वृक्ष लागवड. वृक्षसंवर्धन. लहान लहान बंधारे भरणं. खणण. औषधी वनस्पती लागवड देखरेख. अशी विविध कामे करणार्या कामगारांची नोंदणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात करण्यासाठी स्थापन केलेल्या जिल्हा स्तरीय समन्वय समितीचे पुनर्गठन करणे व तीची कार्यक्षमता वाढविण्यासाठी शासनाने निर्णय घेतला होता 

          वरील विषयास अनुसरून समाजसेवक या माध्यमातून लोकांचा जास्ती जास्त संपर्क असणारे समाजातील. मग ते कोणत्याही प्रवरगातील. असू दे. फक्त तो समाजसेवक कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नसावा. असा शासन निर्णय जारी करण्यात आला होता

              मा जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांचेकडून २०१८ एक परिपत्रक जारी करण्यात आले होते. त्यानुसार ग्रामीण भागात शासकीय योजना प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात करणारे समाज प्रबोधन करणारे समाजसेवक. महात्मा गांधी स्वयंरोजगार हमी योजनेत सदस्य म्हणून निवड करण्याचे पत्रक जारी केले होते 

            बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या सदस्य निवडीसाठी आम्ही संबंधित कार्यालयात. मा जिल्हाधिकारी कार्यालयात ९/१/२०१८ ‌रोजी. निवेदन सादर केले होते. १६/२/२०१८ रोजी इस्लामपूर नगरपरिषद इस्लामपूर यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. १६/२/२०१८ रोजी इस्लामपूर तहसिलदार कार्यालय येथे निवेदन दिले होते. ९/१/२०१८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रोजगार हमी योजना सांगली या विभागात मागणी साठी निवेदन दिले होते. ९/१/२०१८ रोजी समाज कल्याण विभाग सांगली तेथे सदस्य निवडीसाठी निवेदन दिले होते. ९/१/२०१८ रोजी सहायक कामगार आयुक्त भवन विश्राम बाग सांगली येथे सदस्य निवडीसाठी निवेदन दिले होते. युनियनच्या माध्यमातून आजपर्यंत निस्वार्थी पणे फक्त आणि फक्त आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना मनात घेऊन काम करणारे आमच्या युनियनचे संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे यांची निवड करण्यात यावी यासाठी संबंधित ग्रामीण भागातून मागणी करण्यात आली होती. आम्हाला कोणताही राजकीय वरदहस्त नाही. कोणी नेता पुढारी. कोणतेही पैशांचे पाठबळ नाही. जनसमुदाय भरघोस पणे पाठीमागे आहे. फक्त आम्हाला समाजसेवा करण्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजना सदस्य म्हणून निवड करण्यात यावी. 

            बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर ही युनियन कोणत्याही पक्षाला निगडित नसल्यामुळे आमच्या मागणीचा राजकीय दबामुळे विचार करण्यात आलेला नाही. 

    आज जवळपास तीन वर्ष पूर्ण होत आली आहेत पण आम्ही दाखल केलेल्या एकाही पत्राचा आम्हाला लेखी स्वरूपात उत्तर देण्यात आले नाही. तुम्ही आम्हाला सदस्य म्हणून निवडू नका पण का ? निवड करता येणार नाही याचे कारण तरी आम्हाला लेखी कळविणे आपली जबाबदारी आहे आणि तशी शासन तरतूद आहे पण आज कोणत्याही शासकीय आॅफिस मधून निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज यांना कोणतेही लेखी उत्तर दिले जात नाही. ही बाब विचार करण्यासारखी आहे. सदस्य निवड झाली किंवा नाही हे कळविणे गरजेचे होते. त्याठिकाणी कोणाची कोणत्या कागदपत्राने निवड झाली हे सुद्धा सांगणे गरजेचे होते. असा कोणताही पत्र व्यवहार करण्यात आलेला नाही म्हणजे शासनाचा लाखो रुपये पगार घेऊन ए सी आॅफिस मध्ये बसून सर्वसामान्य माणसाला गोरगरीब लोकांच्या पत्राला कचराकुंडी दाखविली काय ? असं आमचंच नाही अशी कित्येक पत्र व्यवहार आज उत्तराची वाट पाहत आहेत त्यांना उत्तर मिळणार का ? यांना कोण विचारणार आहे का ?  

            समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

प्रश्न प्रशासनाला?

 


प्रश्न प्रशासनाला

                    आपण ज्या गावात राहतो तेथे एक लहान राज्य आपल्या विविध अडचणी प्रश्नावर आपणास न्याय मिळवून तलाठी ग्रामसेवक मंडलाधिकारी. गटविकास अधिकारी. सरपंच  असतात  त्याला पंचायत राज म्हणतात. आणि त्यापेक्षा मोठा प्रश्न असेलतर ग्रामीण भागासाठी पंचायत समिती जिल्हा परिषद.  व शहरी भागासाठी तहसिलदार नायब तहसीलदार. कार्यकारी अधिकारी.  पुरवठा विभाग महसूल विभाग. पुनर्वसन विभाग.  निराधार विधवा अपंग यासाठी निराधार योजना  आरोग्य विभाग. कामगार विभाग. जमीन खरेदी विक्री करणारे स्टॅम्प वहेंडर.  घरकुल योजना.  विकास आराखडा.  रस्ते गटर बगीचे स्मशानभूमी. पुतळयासाठी असे विविध आरक्षण. असे एक नाही अनेक प्रश्न रोजच्या जीवनात आपला पिछा सोडत नाहीत.  पण यातील एकही काम शासन नियमानुसार होत नाही 

                आज सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे जमीन खरेदी विक्री. महसूल विभागात आज मोठ्याप्रमाणात भोंगळ कारभार सुरू आहे. समजा उदा. दाखल एक. सातबारा घ्या की त्या सातबारावर.  कु का.  तु बं. तु जो. आरक्षण विविध कलर मध्ये.   नोंद १ वर्ग.  नोंद २ वर्ग. विविध वतनी जमीन. वारस नोंदी घोटाळा  पुनर्वसन ग्रस्त  प्रकल्प ग्रस्त.   बक्षिस पत्र.  गहाण खत.  देवस्थान जमीन.  कोणतेही हस्तांतर अथवा विक्री बंदी कायदा.   पोटखराब.  भोगवटदार.  शासकीय इनाम.  महारकी.  देवसकी.  मुलाणकी.  वरील प्रमाणे विविध माध्यमातून शासन गोरगरीब जनतेला जगण्यासाठी आवश्यक असेल त्या प्रमाणात जमीन उपलब्ध करून देते.  त्याचे देखरेख. व व्यवस्थित कागदपत्रांचा व्यवहार पाहण्यासाठी शासकीय अधिकारी व कर्मचारी नेमले जातात 

              आपणांस हे माहीत आहे का. शासकीय आॅफिस मध्ये दाखल केलेल्या प्रत्त्येक कागदांचा लेखाजोखा ठेवला जातो म्हणजे तो साधा कागद. शासकीय कागद होतो आणि त्यात काय लिहिलं आहे त्यापेक्षा तो शासकीय आॅफिस मध्ये आला म्हणजे त्याला वजन येते.  त्यामुळे तसंच. शासनाच्या विविध योजना जमीनी.  किंवा अन्य कोणताही शासकीय एवज याची नोंद शासनाकडे असणारं बरोबर आहे ना. ?  एका जमीनीचे किती वेळा व्यवहार झाले आहेत कोणत्या जमीनीवर आरक्षण आहे किंवा अन्य कोणतेही शासन निर्बंध आहेत हे शासनाला माहीत असते. मग तरीसुद्धा. विविध योजनांचा बोगस लाभ घेतला जातो.  भुखंड व्यवहार. दोनदा होतात मग ती जागा शासनाच्या निर्बंधांमुळे आरक्षित असेल तरी आज सर्वच शासनाला माहिती असून सुद्धा शासन त्याचा खरेदी दस्त व्यवहार करत आहे.   दस्त रोज होणार आहेत कारणं शासनाला स्टॅम्प ड्युटी मिळण्यासाठी दस्त होणारच. मग त्या भुखंडावर निर्बंध असतानाही 

                आज आपण म्हणतो बक्षिस पत्राला किंमत नाही.  नोटरि कोण माणत नाही.  दस्त ठराविक कालावधीमध्ये जर नाही नोंदविला तर दस्त रद्द होतों. असे महसूल अधिनियम मध्ये उल्लेख आहे. तर मग शासकीय विभागात अशा जागांचे दस्त होतातच कसे ? समजा मोठा आर्थिक वाठा मिळवून दस्त झाले तर ?

              दस्त महत्त्वाचा नाही. आणि शासकीय निर्बंध असणार्या. कोणत्याही विभागातील. बोगस दस्त झाला तर त्याचा उल्लेख शासनाकडे असतो तरी सुद्धा दस्त होतात. आणि. पण अशा कोणत्याही खरेदी विक्री व्यवहाराला. शासनाचा दर्जा देणारे सर्व अधिकारी व कर्मचारी. कारवाईस पात्र आहेत. त्याचा पुढील सातबारा.   फेरफार.  तयार करणारे खरेदी विक्री व्यवहार करणार्या पेक्षा मोठे गुन्हेगार आहेत.

          वर एक सातबारा आपल्या अभ्यासाठी देत आहे. त्यात  तुकडा खरेदी विक्री बंदी असताना सुध्दा खरेदी व्यवहार झाला आहे. पुनर्वसन कायदा ११/१०/१९८३ पासून कोणतेही खरेदी विक्री हस्तांतर विभागणी करण्यास बंदी आहे असा उल्लेख असतानाही याचा खरेदी विक्री व्यवहार झाला आहे  जिल्हाधिकारी परवानगी नाही. तरीसुद्धा दस्त झाले. आणि त्यांचे सातबारा फेरफार तयार झालेच कसे. ? करणारे कोण सर्वसामान्य लोक नव्हती शासकीय अधिकारी व कर्मचारी होते.  त्यांना कळलं नाही का त्यांनी किती पैसे खाल्ले हे काम करण्यासाठी ? 

              नोंदणी क्रमांक (३६) नुसार एक गाव मो का वि म्हणून घोषित करण्यात आले होते त्यात १०/११/१९८३  अन्वये महाराष्ट्रात प्रकल्प ग्रस्त पुनर्वसन अधिनियम १९७६ मधील ११ प्रमाणे हे गाव मोरणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पांचे लक्ष क्षेत्र म्हणून घोषित केले आहे वरिल कायद्याचे कलम १२ ओ. जमीनीचे कोणत्याही प्रकारचें हस्तांतर विभागणी करण्यास ११/१०/१९८३ पासून बंदी घालण्यात आली आहे असे असताना सुध्दा शासकीय अधिकारी व प्रशासन यांनी शासनाचा कायदा मोडला आहे तरी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचेवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे.  खरेदी विक्री व्यवहार करणारे त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.  खरेदी करणार्या लोकांची बाजू घेणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. जागा प्रकलप ग्रस्त लोकांना. परत द्यावी

            समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर 

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

घोड्याचा चष्मा -A Munde

 


घोड्याचा चष्मा

             सरळ आणि एका रेषेत चालणे फक्त आणि फक्त समोरचं बघणे आपल्या आजूबाजूला काय चाललंय. आपण काय करायला पाहिजे. ही मानसिकता संपने. "सर्वांचं होईल ते माझे होईल " माझ मला हुईना बाकिच बघायला मला कुठ वेळ आहे. आपलं झालं नव्ह का मग बाकिचे काही बघायचे काम नाही. असे मत आज सर्व सामान्य माणूस नव्हे तर शासकीय क्षेत्रात झाले आहे. आज आपलं मत आपला विचार बदलण्याची गरज आहे. 

          अज्ञान/ अंत्ययवाद/अंधश्रद्धा /गरिबी/जातीयवाद/बंडखोरी /अन्याय/प्रादेशिक अस्मिता /वैचारिक भिननता /जात/ धर्म /वर्ण/फुटिरता/निरक्षरता/ राजकीय शिक्षण/ दहशतवाद/ भ्रष्टाचार/गुंडगिरी/ विकलांग विरोध/ लोकसंख्या/ महागाई /बेरोजगारी/ महिला अत्याचार/ देशनिषटा/ देशद्रोही/ धरणे/ बंधारे/ कालवे/ रस्ते/ वीजपुरवठा/ पाणी पुरवठा/  शासकीय/ अन्न धान्य पुरवठा विभाग/ कामगार विभाग/बांधकाम विभाग/ महसूल विभाग/ शिक्षण/आरोग्य/विमा/विज्ञान आणि तंत्रज्ञान/ नागरि स्वातंत्र्य/ अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती इतर मागासवर्गीय/ आदिवासी/ संघटित असंघटित कामगार/ व्यापार आणि औद्योगिक/ विकासवादी पर्यावरणवादी/ समतावादी समरसवादी/ अतिरेकी नक्षलवादी/ घुसखोरी/अल्पसंख्याक आणि बहुसंख्यांक) पांढरपेशा व बहुजनसमाज/ हरिजन आणि दलित/किसान कामगार/ गिरणी संप/ तेलंगणा लढा/ महाड सत्याग्रह/ दांडी यात्रा/ काळाराम प्रवेश/वंगभग चळवळ/१८५७ चा उठाव/जालियनवाला बाग हत्याकांड/ रंग/ निवडणूक चिन्ह/ राष्ट्रीय चिन्ह/ राष्ट्रध्वज/ समतेचा हक्क/स्वातंत्र्याचा हक्क/ शोषनाविरोधी हक्क/धार्मिक स्वातंत्र्य/ शैक्षणिक व सामाजिक/ सवैधानिक उपाययोजना/ प्रसार माध्यमे/ व्यवस्था/लोकशाही/ राजेशाही/ घराणेशाही/निजामशाही/ उदारमतवादी शासनपदधदती/ समाजवादी प्रारुप/ अक्षर निष्ठा/ व केंद्रिकरण आणि विकेंद्रीकरण/सामाजिक आर्थिक/ राजनैतिक/न्याय विचार/ विश्वास श्रद्धा/ अंधश्रद्धा/ सुरक्षा दले/ आंदोलन/ चळवळ/मनोविज्ञान/प्रवास वाहतूक/ बंद/ मोर्चे/ उपोषण/ सत्याग्रह/ माहीतीचा अधिकार / व्यसनमुक्ती/ बालमजुरी बंद/ लोककला/ 

            वरील प्रमाणे सर्व विषय मांडण्याचे कारणं आहे की. आपल्या आजूबाजूला बरेच असे प्रकार घडतात उदा. छेडछाड प्रकरण.  मारामाऱ्या. अपहरण. लुट. मग ती शासनाच्या अधिकारी व कर्मचारी यांचेकडून असो किंवा इतर कोणाकडून असो आपण आवाज उठविण्याची गरज आहे पण आपल्याला आज अशी सवय लावली आहे लागली आहे त्याकडे दुर्लक्ष करा. मी माझे कुटुंब आणि मी ही मानसिकता तयार झाली आहे.  छेडछाड करणारे मोठ्याने हसत असतात आणि पिडीत मुलगी मदतीसाठी हाक मारत असते आपण पुढे जात नाही कारण छेडछाड करणारे कोणत्या नेत्यांच्या पुढार्यांचे बगलबच्चे आहेत कोण त्यांच्या तोंडाला लागणार.  शेजारी होणारी भांडणे सोडवायला सुध्दा आपण जात नाही. खासगी सावकारी संबंधित आपण आवाज उठवत नाही. रेशन दुकानदार. भाजीवाले. किराणा दुकानदार. ग्राहकांना डबल भावात जीवनावश्यक वस्तू विकतात आणि मोठा आर्थिक नफा मिळवता आपण आवाज उठवतो का ? नाही कारणं आपण घोड्याचा चष्मा घातला आहे

              कोणत्याही समाजामध्ये सामाजिक राजकीय आर्थिक सांस्कृतिक इत्यादी स्वरूपाच्या विविध समस्यांकडे पाहण्याचे भिन्न भिन्न मत प्रवाह तयार केले आहेत त्यातूनच व्यक्ति आणि वयकतिगटात संघर्ष निर्माण होऊन लोकांमध्ये फुट पाडण्याचे काम राजकारणी यांनी केलं आहे.  पारंपारिक राजकारणाच्या चौकटीत महिला पर्यावरण.  विज्ञान आणि तंत्रज्ञान. आरोग्य. अंधश्रद्धा. इत्यादी संदर्भात समसयाचाच फारसा गंभीरतेने. पूर्वी कधी विचार झाला नाही.  राजकीय पक्षाचे लक्ष केवळ निवडणुका सत्ता संपादन.  याकडे लक्ष आहे.  म्हणजे आपण आवाज उठवावा का नाही.  कारणं आपणाला याच काही देनघेण नाही.  आपण घोड्याचा चष्मा घालून सर्व काही पुढचं बघतो. बाजूंचे बघायला आपणास वेळ कुठ आहे

            २०२० ला एक महामारी संकट आलं आणि गाडीला घुणा लागावा तसा माणवी जीवनाला घुणा लागला सर्व काही जनजीवन विस्कळित झाले.  महामारी संकटापासून वाचण्यासाठी शासनाने टाळेबंदी पुकारली आणि गोरगरीब जनता शेतकरी बांधकाम कामगार.  फळें फुले भाजीपाला विक्री करणारे.  वडापाव गाडी.  चायनिज.  हाॅटेल. रेस्टॉरंट.  घरकाम करणाऱ्या महिला.  पापड लोणची चटण्या तयार करणार्या महिला.  वडाप करणारे वाहन वाले.   मालवाहतूक करणारे वाहन मालक चालक.   एस टी कामगार.  विविध कंपन्यांचे कामगार बेरोजगार झाले.  अशा विविध ठिकाणचे कामगार टाळेबंदी काळात घरातच अडकून पडले त्यामुळे त्यांच्या हाताला काम नाही त्यामुळे हातात पैसा नाही त्यामुळे त्यांच्या वर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली ही आलेली बिकट वेळ काही कुटुंब कर्त्ये पालनपोषण करणारे. यांना आपल्या कुटुंबाची उपासमारीची पाळी बघविली नाही. त्यांनी आत्महत्या सारखें मार्ग निवडले आणि आपलीं जीवन यात्रा संपवली. शासन म्हणतंय तेव्हा टाळेबंदी आहे पेशंट येथे वाढले येथे कमी झाले. शासनाच्या मनात येईल तेव्हा शासन टाळेबंदी जारी करत आहे आणि मनात येईल तेव्हा उठवत असे. आपणांस आवाज उठविण्यासाठी बाजूंचे दिसताच नाही कारणं आपण घोड्याचा चष्मा घातला आहे. सर्वांचे होईल ते माझे होईल. हा विचार मनात खोलवर बसला आहे. 

             समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज इत्यादी दाखल करणारे सवताचे मुद्दे घेऊन भांडत नाहीत. समाजातील समाजावर व्यक्तिवर विविध मागण्यासाठी करत असतात. उपोषणाला बसणारे. त्यात त्यांचं हीत कमी असते पण समाजांचा विचार जास्त असतो. त्यामुळे आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये निवेदन उपोषण विविध मागणी अर्ज दाखल करणार या व्यक्तिच्या मागे खंबीरपणे उभे राहणे आपलेच काम आहे आपण अस काय करतो का ? नाही कारणं आपण सर्वांनी घोड्याचा चष्मा घातला आहे आपल्याला आपल्या पुरते दिसते बाजूंचे दिसत नाही आणि आपणं बघत नाही ही आपली मानसिकता आहे

                बांधकाम कामगार नोंदणीच्या नावाखाली विविध संघटना युनियन सेवाभावी संस्था हे कामगारांचे आम्ही हितचिंतक असल्याचा आव आणतात पण त्यातूनच दलाल एजंट बांधकाम कामगारांना लुटत आहेत  एम पी सी स्पर्धा परीक्षा पास झालेले विद्यार्थी. २०१७ पासून व्यायाम करत आहेत पोलिस भरती.  शासकीय क्षेत्रातील. भरती  निघेल. आपण आपल्या आई वडिलांच्या साठी काही तरी करु अशी मानसिकता आहे पण आज अशी काही मुले आहेत त्यांचे वय आत्ता सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे निघून गेले आहे. वय जास्त झाल्यामुळे लग्न होत नाही. नोकरी नाही भिक मागू शकत नाही.  भरती आहे म्हणून वेळोवेळी भरतीसाठी आॅनलाइन अर्ज केले आहेत एका अर्जाचा खर्च सहासे रुपये धरला तर माझ्या अंदाजे कमीत कमी दहा लाख मुले भरतीसाठी उतरणार होती मग. ६००+ १० दहा लाख किती झाले एवढे पैसे गेले कुठे सर्वांना नुकसान भरपाई मिळते मग या एम पी सी स्पर्धा परीक्षा पास झाले ज्यांनी आॅनलाइन पध्दतीने अर्ज केले ती रक्कम व्याजासह परत द्यायला हवी. मी माझे मत मांडले आहे मला माहित आहे आपण सर्वजण आवाज उठवणार नाही कारण आपण सर्वांनी घोड्याचा चष्मा घातला आहे. आत्ता तरी जाग व्हा नाहीतर

          राजकारणी आणि अर्थकारण करणारे एवढेच सुखी राहणार आहेत. शासनाला खरोखरच जनता जगवायची आहे तर. एक किलो तांदूळ एक किलो गहू देण्यापेक्षा. जनतेची कर्जे माफ करा. नाहीतर कमीत कमी त्या रककमेचे व्याज तरी माफ करण्याच धाडस तुमच आहे ते बघा.  आपण असेच मरणार आहोत. विद्यार्थी.  शेतकरी. कामगार. आणि सर्वसामान्य माणूस.  आत्महत्याच करणारं आणि मरणार कारणं.  टाळेबंदी काळात. सर्वकाही चालू आहे बंद आहे ते कामगारांचे काम भयानक महगाई. यामुळे एक वेळ अशी येईल की आपली घर दार शेती. हे अर्थकारण करणारे लिहून घेणारं. कारणं त्यांचे कर्ज आहे त्याचे व्याज सुध्दा भरायला आपल्याला जमणार नाही. आणि हेंच पुढचे आपले आणि आपल्या मुलांचे भविष्य आहे.  मुलाला नोकरी नाही म्हणून आई वडील मरणार मुलीचे लग्न होत नाही म्हणून आई वडील मनात झुरणार. एकंदरीत चारी बाजूने सर्वसामान्य जनता मरणार आत्ता तरी घोड्याचा चष्मा उतरा आणि जागे व्हा.  आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी. आपल्या मुलाच्या साठी. आपल्या समाजासाठी. आपले कर्तव्य म्हणून घोड्याचा चष्मा उतरा. नाहीतर आपण जन्माला येवून आपले जीवन गुलामगिरीत गेल काय तोंड दाखवणार. माझ कामच आहे लिहणयाच कारणं वेळ आली आहे तशी. तुम्हाला विचार करायचा आहे 

        समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

पारदर्शी पंचायत राज प्रशासन "



  "पारदर्शी पंचायत राज प्रशासन "

          आपल्या गावातील ग्रामपंचायत कामकाज सुरळीत व व्यवस्थित चालावे. चालणार्या कामांचा आढावा तपशील. ग्रामसभा बैठका यांना नागरिकांना बोलाविण्यात यावे. 

          जबाबदार. गतिमान. प्रतिसादशिल व लोकाभिमुख पंचायत राज व्यवस्थेसाठी. "ग्रामस्थांची सनद " अमलात यावी. पंचायत राज संस्थां मार्फत. ग्रामस्थांना पुरविण्यात येणा-या सेवांचा दर्जा उंचावून योजनांच्या अंमलबजावणीत गतिमानता आणणे. प्रशासन पारदर्शक व लोकाभिमुख करणे. यासाठी या विभागाच्या. दि. १०/मार्च २००६ चया शासन निर्णयानुसार. "पारदर्शी पंचायत राज प्रशासन " ही नागरिकांची सनद म्हणून प्रसिद्ध करण्यात आली आहे. सध्याची सनद प्रसिद्ध करून झालेला कालावधी व सनदेत सुधारणा करण्याची आवश्यकता तसेच ग्रामस्थांना सुटसुटीत सनद देण्याचा प्रयत्न शासन करत आहे. यासाठी. "पारदर्शक पंचायत राज प्रशासन ही नागरिकांची सुधारित करणे आवश्यक आहे

                    सध्याची सनद प्रसिद्ध करून झालेला कालावधी सनदेत सुधारणा करण्याची आवश्यकता व गठीत करण्यात आलेल्या समितीने नविन सनदेस दिलेली मान्यता या बाबी विचारात घेऊन वरिल संदर्भानुसार शासन निर्णय. १० मार्च २००६ अन्वये प्रसिद्ध करण्यात सध्याची. "पारदर्शी पंचायत राज प्रशासन "ही नागरिकांची सनद अधिक्रमित करून नविन ग्रामस्थांची सनद प्रसिद्ध करण्याचा शासन निर्णय घेतला आहे 

            राज्यातील सर्व ग्रामस्थांना पारदर्शक व गतिमान लोकाभिमुख व प्रतिसादशिल. प्रशासनादवारे. जबाबदारी सेवा पुरविणे ही पंचायत राज संस्थेची जबाबदारी आहे. जनतेला स्वताच्या हक्काची अधिकारांची कर्तव्य. जाणीव करून देणे. पंचायत राज संस्थेमार्फत पुरविण्यात येणा-या सेवेचा दर्जा राखण्यासाठी पंचायत राज संस्थेमार्फत काम करणाऱ्या सर्व अधिकार व कर्मचारी त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणे. त्यानुसार अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. सेवा पुरविण्याचा स्तर निश्चित करून ग्रामस्थांना सेवा पुरविण्यात विलंब झाला अथवा अधिकार/ व कर्मचारी यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही. तर ग्रामस्थांनी कोणाकडे दाद मागावी याबाबत निश्चित स्तर ठरविण्यात आलेला आहे. 

      पंचायत राज संस्थांमार्फत अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या योजना त्या त्या योजनांबाबत. गाव. तालुका. व जिल्हास्तरावर जबाबदार असलेलें अधिकारी व कर्मचारी ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या संविधानिक जबाबदार्या याबाबतची माहिती ग्रामस्थांना व्हावी यासाठी ग्रामस्थांच्या संनदेमधये. खालील परिशिष्ट समावेश करण्यात आलेला आहे. त्यानुसार ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषद त्यांची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे

          (१) परिशिष्ट

ग्रामविकास विभागाची ( मंत्रालय स्तर ) संरचना व उद्दिष्टे

      ग्रामपंचायत. पंचायत समिती. व जिल्हा परिषद. मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती होणे आवश्यक आहे व आवश्यक सेवा तातडीने मिळते गरजेचे आहे. वरील सेवांची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने मंत्रालयीन स्तरावरची संरचना ग्रामस्थांना माहीत असणे आवश्यक आहे. म्हणून याबाबतचा सर्व तपशील परिशिष्ट (१) व प्र पत्र (१) मध्ये देण्यात आलेला आहे तसेच ग्रामविकास विभागाच्या संरचनेबाबत मा मंत्री ग्रामविकास ते ग्रामपंचायत. याबाबतचा धावता तक्ता सोबत देण्यात यावा

       (२) परिशिष्ट

पंचायत राज संस्थांची योजनांविषयक जबाबदारी

          पंचायत राज संस्थांच्या स्व उत्पन्नाचया योजना. राज्य सरकारने हस्तांतरित केलेल्या योजना अभिकरण तत्वावर राबविण्यात येणाऱ्या योजना. व केंद्र शासन पुरस्कृत योजनांच्या समावेश या परिशिष्टात करण्यात आला आहे. तसेच साधारणतः योजना अंमलबजावणी साठी ग्राम तालुका उपविभाग व जिल्हास्तरावर कोणाची जबाबदारी आहे हे निश्चित करण्यात आले आहे

       (३) परिशिष्ट

पंचायत राज संस्थांची संविधानिक जबाबदारी

पंचायत राज संस्थांमार्फत ग्रामस्थांना पुरविण्यात येणाऱ्या सेवांच्या अनुषंगाने व ग्रामपयतीची कामे. ग्रामसेवकांची कामे. सरपंचाची कर्तव्य. आणि पंचायत समिती व जिल्हा परिषद यांची संविधानिक जबाबदारी याबाबतचा सविस्तर तपशील सदर परिशिष्ट मध्ये देण्यात आला आहे

       (४) परिशिष्ट

ग्रामिण विकास योजना प्रगती दर्शक फलक लावण्यात यावे पंचायत राज संस्था मधील महत्वाच्या कार्यालयामार्फत राबविण्यात येणारया योजनेची माहिती कार्यालयाच्या दर्शनी भागात फलकावर नमुद करण्यासाठी विहित केलेल्या नमुन्यांच्या या परिशिष्टात समावेश करण्यात आलेला आहे

          ग्रामपंचायत राज हे गावच लहान सरकार आहे त्यानुसार चालणारा व्यवहार. चालणार कामकाज. ग्रामपंचायत मध्ये येणारा निधी. व योजना याचा होणारा विनियोग. रास्त चालावा यासाठी पारदर्शी पंचायत राज प्रशासन संस्था अंमलात येणे आणि आणणे गरजेचे आहे

      समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या