Showing posts with label मुस्लीम. Show all posts
Showing posts with label मुस्लीम. Show all posts

मुस्लिम आणि आरक्षण

 



मुस्लिम आणि आरक्षण   आरक्षण

            स्वातंत्र्यानंतर धर्मातील व्यवस्थेच्या पुरस्कार करणाऱ्या राज्यकर्ते यांनी मुस्लिमांसाठी वेगळा शरियत कायदा चालू ठेवून समान नागरी कायदा होऊ दिला नाही. हिंदू कोड बिल मंजूर झाले. सर्वांना फौजदारी कायदा लागू आहे. पण सर्वांना समान नागरी कायदा लागू करण्याचे प्रयत्न एक गठ्ठा मतांसाठी केले नाही. निवडणूका आल्या की मुस्लिम समाजांचे एक गठ्ठा मतदान असल्यामुळे सर्व पक्षाना सर्व राजकीय नेत्यांना पुढारी यांना मुस्लिम समाजाची प्रकरक्षाने आठवण होते मग अल्पसंख्याक नावाखाली मुस्लिम समाजातील युवकांच्या गावापासून जिल्ह्यापर्यंत पदाधिकारी निवडी चालू होतात. आणि आमचा स्वाभिमानी. सन्मान प्रिय. हुजूरि. न करणारा मुस्लिम समाजातील युवक एखाद्या पक्षाच्या दावणीला बांधले जातात. मग निवडणूक असते आमचे युवक आपल्यावर सर्व पक्षाच भार आहे नेता एक दोन वेळा युवकांच्या खांद्यावर हात ठेवला की युवक जीवतोड काम करतो. आश्वासन असते निवडणूक झाली की मुस्लिम आरक्षणाचे आंदोलन उभे करु. सर्वांना मुस्लिम आरक्षण मिळवून देतो. आणि एक वेळ निवडणूक पार पडली की आरक्षण पदाधिकारी वार्यावर जातात. आपल्याला कळणार केव्हा ? मुस्लिम समाजातील एक ही व्यक्ति क्लास वन अधिकारी. कोणत्याही शासकीय आॅफिस मध्ये आमचा गोल टोपीचा अधिकार मी तरी बघितला नाही. तुम्ही बघितला आहे का? 

            मुस्लिम समाजाला. आरक्षण द्या कारण आपला समाज भटक्या विमुक्त जाती मध्ये मोडतो असे म्हणणारे. यांना समाजाबद्दल काय माहित आहे का. ? मुस्लिम समाजाचा प्रसार करण्यासाठी आपले धर्मगुरू मौहंमद पैगंबर. यांना भटकंती करावी लागली. तर मुस्लिम धर्माचे धर्मगुरू भटकंती करत होते म्हणजे आमची पार्श्वभूमी आम्ही भटके आहोत हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे नाही का ? पण कोणताही धर्मग्रंथ आपले समाजांचे वागणे राहणे. चालीरीती हे सिद्ध होते पण तुम्ही भटके आहात हे सिद्ध होत नाही. याचा अर्थ असा होतो की आणि तसा उल्लेख आढळतो पण तो पुरावा होऊ शकतं नाही. मुस्लिम भटके आहेत यासाठी. कारणं धर्मग्रंथ हा समाजाचा पुरावा होऊ शकतो का नाही हे मला माहीत नाही. आज आपण म्हणतो आमचें पूर्वज अडाणी गरजू होते पोटासाठी हे गाव ते गाव फिरत होते. त्यांना शिक्षण कसले ते माहीत नव्हते. त्यावेळी. कुठला कागद. कुठली शाळा. अस्तित्वात होती का नाही काय माहित ? आमच्या पूर्वजांना काय माहित होते एक काळ असा येईल की तुम्ही कोणत्या जाती धर्माचे आहात हे सिद्ध करावे लागेल. पूर्वज अडाणी असल्यामुळे कोणताही १९६७ चा पुरावा आज जातीचा दाखला घेण्यासाठी पुरावा नसल्यामुळे. आमच्या मुलांना. शिक्षण सवलत नाही. नोकरी सवलत नाही. कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ नाही. म्हणजे योजना हजार आहेत पण त्यात सर्वात मोठा साप घालून ठेवला आहे तो म्हणजे जातीचा दाखला. म्हणजे योजना चालू केले की सर्वसामान्य माणसाच्या मुलांना मिळतच नाही. मुस्लिम समाजाने आज आरक्षण मुद्दा घेण्यापेक्षा. जातीच्या दाखल्यावर उठाव करण्याची गरज आहे. जाचक अटी रद्द करा यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. आपली संख्या जास्त आहे त्यामुळे आपली ताकद कोणताही झेंडा न घेता उभी करण्याची गरज आहे सर्वसामान्य माणूस रस्त्यावर कोणताही झेंडा न घेता उतरला पाहिजे त्याशिवाय बदल होणार नाही. नाहीतर मुस्लिम समाजातील मुल नाही नोकरी मग घाल चिकन दुकान. गवंडयाचया हाताखाली जा. भंगार दुकान. गाड्या खरेदी विक्री. कपडे व्यवसाय. असे विविध उद्योग करतानाच दिसणार आणि आपले जीवन कष्टात. दबावात गेले. दहशतीत. हिंदू मुस्लिम. यातच पिसत राहणार आणि मुस्लिम समाजाचा कोणताही मुलगा अधिकार होणार नाही. बंद आंदोलन मोर्चा उपोषण निवेदन. आपल्या समाजाच्या ताकदिवर करा. कारणं सर्वात मोठी ताकद ही समाजाची आहे. तुम्हाला उठवून बसविणारे यांना तरी अल्पसंख्याक म्हणजे काय हे माहित आहे का ? असेल तर त्याची खरी माहिती मुस्लिम समाजाला द्या. मुद्दे आत्ता गरजेचे असतील तरच उठाव करून आपली ताकद दाखवा. संविधानात असणारी खरी माहिती समाजा पर्यंत पोहचवा. 

              राज्यकर्त्यांनी मतांसाठी मुस्लिम अल्पसंख्याक यांचेकडे अधिक लक्ष दिले. हा हिंदू वर अन्याय नाही का अशी हिंदूत्व वादी यांनी तक्रार केली आहे. धर्मनिरपेक्षता प्रतयक्षता नाही. धर्मनिरपेक्ष राज्यव्यवस्थेचा पुरस्कार केला असला तरी समान नागरी कायदया अभावी ही व्यवस्था निर्थक आहे घटनेत ४४ क्रमांकाच्या कलम ह्यासाठी मार्गदर्शक तत्वे म्हणून घटनाकारांनी समाविष्ट केलेले आहे पण ते केवळ शोभेचे तत्व म्हणूनच राहिले आहे.  

             मुस्लिम सुधारणावादाकडे दुर्लक्ष राज्यकर्ते सुधारणांबाबत हिंदूंच्या बाबतीत जेवढे आग्रही आहेत. तेवढे ते मुसलिमाबाबत नाहीत. असा प्रचार करण्यासाठी हिंदू राष्ट्रवादी प्रचारक यशस्वी ठरले. काही प्रश्नांवर सरकारने धरसोड भूमिका घेतली त्यामुळे हिंदू राष्ट्रवाद याना. प्रचारास संधी मिळत आहे. 

         देशनिषठा. देशातील बहुसंख्य मुस्लिमांची निष्ठा भारतावर नसून पाकिस्तान वर आहे अशी समाजात मुस्लिम धर्माबाबत अफवा केली आहे ज्यांना पाकिस्तान वर निष्ठा आहे त्यांनी तिकडेच स्थलांतर करावे असा आक्रमक प्रचार हिंदू जातीयवादी करीत आहेत

         मुस्लिम संख्या राज्यकर्ते यांनी कुटुंब नियोजन बाबत मुस्लिम धोरण शिथिल ठेवले आहे. त्याचा परिणाम म्हणजे मुस्लिम लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. हा हिंदू वर अन्याय आहे. त्यामुळे भविष्यात हिंदू हे एक दिवस अल्पसंख्याक होतील काय अशी भीती त्यांच्या मनात आहे 

      मुस्लिम धार्जिणे धोरणे देशातील हिंदूंच्या. काही मंदिरांवर मुस्लिमांनी आक्रमण करून कब्जा घेऊन मशिदी उभारल्या आहेत. त्यांचा पाडाव करून पाकिस्तान धार्जिण मुस्लिमांना धडा शिकवावा असा प्रचार होत आहे 

      स्वातंत्र्यानंतर राज्यकर्त्यांनी धर्मनिरपेक्ष व्यवस्थेचा पुरस्कार केला पण समान नागरी कायदा यातून अल्पसंख्याक यांना वगळून त्यांचे धार्मिक कायदे चालू ठेवले. ही वस्तुस्थिती आहे. मुस्लिम समाज हा आजही अल्पसंख्याक समाज आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या आजही त्यांचे प्रमाण ११/ टक्के एवढेच आहे. हया समाजाबद्दल राज्यकर्ते यांची भूमिका लवचिक आहे. १९८७ मध्ये शहाबानो खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचा पोटगी संबंधित निवाडा धुडकावून सरकारने कायद्यात दुरुस्ती करून मुस्लिम महिलांना पोटगीचा हक्क नाकारला होता. अनेक पुरोगामी मुसलमानानी ह्या सरकारी पावित्र्याचा कडाडून विरोध केला होता. ह्यातून हिंदूत्व वादी यांना काहीसे अनुकूल वातावरण मिळाले. ह्या वातावरणाचा फायदा घेऊन समस्त हिंदूत्व वादी. धर्मनिरपेक्ष राज्यव्यवस्था मोडीत काढायला निघाले. आहेत. बाबरी मशीद सारखा नाजूक प्रश्न. साहसवादी भूमिका घेवून हिंदूत्व वादी. संघटनांनी भारताची न्याय व्यवस्था. व संसदीय व्यवस्था अमान्य केली. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत वादग्रस्त बाबरी मशीदचे संरक्षण करण्यात आपली कर्तव्ये विन्मुख हि हिंदू समाजाची सर्वोच्च सेवा असून त्यासाठी आपणं सत्ता गमावली. हौतात्म्य प्राप्त झाले असे समर्थन केले गेले. साहसवाधयाचे केवळ धर्मनिरपेक्ष व्यवस्थेला आव्हान नसून ते न्यायव्यवस्थेला आहे. हेच स्पष्ट होते. बाबरी मशीद पाडावानंतर सरकारने काही मुस्लिम वादी व हिंदूत्व वादी. संघटनांवर बंदी घातली होती परंतु बाहरी लवादाने काही संघटना वरील बंदी अवैध ठरविल्याने त्यांना मोकळीक लाभली आहे. एकंदरीत सध्याच्या परिस्थितीत हिंदूत्व वादी. संघटनांचे आव्हान वाढतं असून ते पुढेही वाढत जाईल. अशी स्थिती दिसते. अर्थात ह्या आवहानाचे उद्रेक मधून मधून दिसतील. 

            मुस्लिम समाजाच्या मनात मानसिक भयाची छाया उमटलेली दिसते. धर्मनिरपेक्ष हे सुद्धा त्यांना हिंदू जमातवादी प्रमाणे थोंताड वाटते. धर्मनिरपेक्ष म्हणजे धर्म व सनातन मूल्य बुडविणे असून त्याद्वारे आपली धार्मिक ओळख संपुष्टात येईल. अशी त्यांची समजूत करून देण्यात आलेली आहे. मुस्लिमांचा धर्मनिरपेक्षतेला होणारा निर्थक विरोध लक्षात घेऊन हिंदू जमातवादी त्याला प्रतिउत्तर म्हणून त्याचं मार्गाने बहुसंख्याकाना धर्माच्या नावाखाली संघटन करणे चालू केले आहे 

        समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

मुस्लिम क्रांतिकारक मौलवी भाग ४ - Muslim Indian Freedom Fighter


 

नवाब अमीर खान (१७६८-१८३४) :

नवाब अमीर खान टोक संस्थानिकाचे संस्थापक आणि राज्यकर्ते होते. वडिलांचे नाव मोहम्मद हयात खान आणि आजोबांचे नाव ताले मोहम्मद खान होते. ताले मोहम्मद खान, मुगल राजा मोहम्मद शहा च्या काळात सरहद पासून रुहेल खंडाच्या ठिकाणी आले. 

अमीर खानचा जन्म १७६८ मध्ये संबल जिल्हा मुरादाबाद मध्ये झाला. आमीर खान हे खूप बहाद्दूर आणि निडर होते. त्यांनी मराठा सरदार यशवंतराव होळकर च्या साथीने अनेक मोहिमावर जाऊन विजय मिळविला होता. सन १८१७ पर्यंत ते इंग्रजांच्या विरुद्ध राहून अनेक वेळा त्यांच्याविरुद्ध युद्धात इंग्रजांना पाणी पाजले होते. पण ६ जानेवारी १८१८ला इंग्रजाबरोबर त्यांना नाईलाजाने तह करावा लागला या तहानुसार मिर खान यांना टॉक संस्थानिकाचा राजा मानण्यात आले. या तहाच्या अगोदर सय्यद अहमद शहीद सात वर्षापर्यंत त्यांच्या सेनेमध्ये होते. सप्टेंबर १८३४ ला आमीर खान यांचा मृत्यू झाला.

नवाब सिराजउद्दौला ला इंग्रजा विषयी खूप गुरूंना होती. त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या किल्ले आणि फॅक्टरीवर कब्जा करून कलकत्त्यामध्ये इंग्रजांना जगणे दुससहाय्य करून सोडले होत. २३ जून १७५७ ला प्लासीच्या मैदानात इंग्रजाबरोबर युद्ध झाले. मीर जाफर सारख्या गद्दाराला मुळे लवकरच त्यांना अटक झाली आणि २ जुलाई १७५७ ला सर्वांसमोर त्यांची हत्या केली गेली.

बहादुर शहा जफर (१७७५-१८६२)

अबू जफर सिराजुद्दीन मोहम्मद बहादुर शहा जफर मोगल साम्राज्याचे शेवटचे बादशाह होते. हाफिज मोहम्मद इब्राहिम आणि कारी मोहम्मद खलील इ. शिक्षकांकडून धार्मिक शिक्षण घेतले. सय्यद जलालुद्दीन हैदर आणि मीर इब्राहीम आली यांच्याकडून लिहायला व वाचायला शिकले. याव्यतिरिक्त धनुष्य चालवणे, तलवारबाजी, निशानेबाजी,आणि घोडेस्वारीमध्ये हि प्राविण्य मिळवले होते. २८ सप्टेंबर १८३७ ला दुसरा अकबर शहा यांच्या मृत्यूनंतर दिल्लीच्या गादीवर विराजमान झाले. १८५७ च्या स्वतंत्र संग्राम आपल्याच झेंड्याखाली लढला गेला. स्वातंत्र्यसंग्रामात इंग्रजांचा विजय झाला. २१ सप्टेंबर १८५७ ला हुमायु च्या कबरीजवळून बहादुर शहा जफर ला अटक केली गेली. युवराजांची हत्या केली गेली होती आणि यांच्याविरुद्ध  द्रोहाचा गुन्हा दाखल केला गेला.२७ जानेवारी १८५८ ला कोर्टाची कारवाई सुरू झाली व ९ मार्च १८५८ ला निकाल देण्यात आला. त्यांना देश सोडण्यास सांगण्यात आले व राणी जीनत महल आणि मुलगा जवान बक्तच्या बरोबर त्यांना रंगूला पाठवण्यात आले. ६०० रू महिना त्यांना ठरवून देण्यात आला होता. ज्याला बहादुर शहा जफर ने घेण्यास नकार दिला आणि राहिलेले चार वर्ष एकदम हलाखीत आणि गरिबीत काढले व त्यातच ७ नोव्हेंबर १८६२ ला त्यांना मृत्यूने कवटाळले.


मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी 

मौलाना चा जन्म १८३२ मध्ये सहारनपुर जिल्ह्यातील नानोता गावात झाला. १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी मोठ्या हिरीरीने भाग घेतला आणि शामली च्या जवळ इंग्रजांच्या विरुद्ध जो मोर्चा तयार झाला होता त्याचे नेतृत्व मौलाना मोहम्मद कासिम नानोत्वी यांनीच केले होते. युद्धात इंग्रजांचा विजय झाला आणि मौलाना यांच्याविरुद्ध अटक वॉरंट निघाले. बक्षिसाची घोषणा करण्यात आली पण इंग्रज पोलीस खूप प्रयत्न नंतरही त्यांना अटक करू शकले नाही. दोन वर्षापर्यंत असेच गावात शहरात भुमिगत राहिले.

मौलाना नानोत्वी एक ज्ञानी संपादक होते. रोजगारावर त्यांनी कित्येक पुस्तकांचे प्रकाशन केले होते. शिक्षणाचा प्रसार करण्यात अग्रेसर होते.दारुल उलूम देवबंद सारखे मोठे मोठे मदरसे शिक्षण संस्था उभ्या केल्या व त्यामधूनच त्यांनी खूप प्रमाणात स्वातंत्र्य चळवळीसाठी मोठा युवक वर्ग उभा केला होता.१५ एप्रिल १८८० ला त्यांचा मृत्यू झाला.


मौलाना फरिदुद्दिन देहलवी - शहीद १८५७ 

मौलाना फरिदुद्दिन त्यावेळेचे खूप मोठे धर्मोपदेशक होते. त्यांना बहादुर शहा जफर यांनी जामा मजीत मध्ये धर्मोपदेश  देण्यासाठी नियुक्ती केले होते. त्यांनी  १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतला होता. इंग्रजांच्या विरुद्ध च्या लढ्याच्या फतव्यावर त्यांची सुद्धा स्वाक्षरी होत. स्वातंत्र्य संग्रामाच्या आदेशानंतर एकेदवशी इंग्रजांची सेना त्यांच्या घरात घुसली आणि त्यांना शहीद करण्यात आले.


मौलाना किफायत आली काकी शहीद

शहीद १८५८ मौलाना किफायत आली काकी खानदान चे वारस होते. मुरादाबाद ला ते रहात होते. १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी हिरीरीने भाग घेतला. नवाब मुजददिन उर्फ नवाब मज्जू खानच्या स्वातंत्र्य राज्यात ते कायदा मंत्री होते. जेव्हा मुरादाबाद वर नवाब यांचे रामपूर ला वर्चस्व कायम झाले तर इंग्रजांच्या विरुद्ध लढ्याच फतवा जारी केला आणि या फतव्याला दुसऱ्या ठिकाणी सुद्धा पोहोचविले. २५ ऑक्टोबर १८५० ला मुरादाबाद वर परत इंग्रजांचा कब्जा झाला आणि ३० एप्रिल १८५८ ला त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांना फासावर लटकवण्यात आले. मौलाना काकीला मुरादाबाद च्या जेलच्या बाहेर जमा झालेल्या लोकांसमोर फाशी देण्यात आली आणि तेथेच त्यांना दफन करण्यात आले. 


शैखुल हिंद मौलाना महमूद हसन देवबंदी - 

शैखुल हिंद मौलाना मोहम्मद हसन देवबंदी एक मोठे धार्मिक विद्वान, तर्कशास्त्र, प्राविण्य, धर्मोपदेशक, मार्गदर्शक आणि स्वातंत्र्यसंग्रामातील चळवळीचे अग्रणीचे नेते होते. 

स्वातंत्र्याच्या संग्रामातील मोलाचे योगदान उल्लेखनीय आहे. मौलानांनी स्वातंत्र्यसंग्रामाला सुरुवात त्यावेळेस केली ज्यावेळेस इंडियन नॅशनल काँग्रेस अस्तित्वात सुद्धा नव्हती. १८७८ मध्ये त्यांनी "अंजुमन तम्रतुतर्तिब" स्थापन करून स्वातंत्र्यासाठी संघर्ष सुरू केला. १९०९ मध्ये जमियातुल अन्सार, १९१६ मध्ये रेशमी रुमाल चळवळ या नावाने स्वातंत्र्याच्या चळवळ सुरू करून क्रांतिकारकांना जोडून प्रोत्साहन दिले.

इंग्रजांना देश सोडण्यासाठी एक अशी सुनियोजित योजना तयार केली होती की ती जर यशस्वी झाली असती तर पूर्ण जगातील इंग्रजांचे वर्चस्व समाप्त झाले असते. मौलाना यांच्या या आंदोलनाचा प्रसार भारतातून रशिया जर्मनी तुर्की अफगाणिस्तानात आणि अरब देशापर्यंत झाला होता.पण दुर्दैव हे की वेळेपूर्वीच गुपित फुटले आणि स्वातंत्र्याच्या क्रांतिकारी जेलमध्ये बंद केले गले.

मौलाना मोहम्मद हसन यांना त्यांचे चार सोबत त्यांचं मक्का शहरात अटक करण्यात आली आणि मिश्र (इजिप्त) च्या आणि मालाच्या तुरुंगात बंद करण्यात आले. तीन वर्ष जेल मध्ये राहिल्यानंतर १९२० ला त्यांना भारतात आणण्यात आले. ३० नोवेंबर १९२० ला दीर्घ आजाराने त्यांचा मृत्यू झाला.


मौलाना उबेदउल्ला सिंधी (१८७२-१९४४) 

इन्कलाब चळवळीचे अग्रणी होते. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी २४ वर्षापर्यंत लागोपाठ एका देशातून दुसऱ्या देशात जाऊन प्रयत्न करीत राहिले. विविध शिक्षकांकडून शिक्षण घेतल्यानंतर उच्च शिक्षणासाठी देव बंदला आले आणि तेथे मौलाना गंगोही कडून ज्ञान प्राप्त केला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शेखुल हिंद यांनी स्वातंत्र्य चळवळीच्या आणि ध्येयाचे गुपित सांगून सदस्य बनवून सिंध प्रांतात पाठवले. तेथे ज्ञानदाना बरोबर स्वातंत्र्याच्या चळवळीचे काम वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केले. सन १९१४ मध्ये विश्व युद्ध भडकल्या नंतर शेखुल हिंदच्या आदेशाने काबूलला गेले आणि इंग्रजी राजवटीच्या विरुद्ध इस्लामी देशांची एकजूट करण्याचे प्रयत्न केले आणि स्वतंत्र भारताची पायाभरणी केली व यासाठी विभिन्न देशाचा दौरा केला. भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी मॉस्को पर्यंत गेले. पण शेखुल हिंदीचे स्वातंत्र्याची चळवळ अपयशी ठरली आणि त्यांना देश सोडण्याचा आदेश जारी करण्यात आला देशात ज्या ज्या लोकांना अटक झाली त्यांना काही वर्षानंतर सोडून देण्यात आले. परंतु मौलानांची हद्दपारी रद्द झाली नाही. १९३७ ला त्यांच्यावरील बंदी उठवण्यात आली आणि २४ वर्षानंतर आपल्या मातृभूमीवर पाय ठेवला काही दिवस दिल्लीला राहिले आणि मग लाहोरला गेले. २ ऑगस्ट १९४४ ला त्यांचा मृत्यू झाला.


मौलाना सय्यद हुसेन अहमद मदनी १८७९ - १९५७

शैखुल इस्लाम मौलाना सय्यद हुसेन अहमद मदनी यांचा जन्म १९७९ ला बांगर मऊ जिल्हा उन्नाव मध्ये झाला. हजरत शैखुल हिंद च्या मृत्यूनंतर समाजाचे नेतृत्वाची जबाबदारी त्यांच्यावर आल्यावर त्यांनी यशस्वी करून त्यांची उद्देश पूर्ती केली. मौलाना सय्यद मदनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी चार वेळा जेल मध्ये शिक्षा भोगली आणि खूप यातना सहन केल्या. त्यांनी सर्व मिळून एकंदर सात वर्ष तुरुंगात घालविले, ५ सप्टेंबर १९५७ ला देवबद मध्ये त्यांचा मृत्यू झाला.


मौलाना बरकतुल्लाह भोपाली १८६२-१९२७

मौलाना बरकतुल्लाह भोपाली स्वातंत्र्यलढ्यातील एक मोठे लढवय्ये भोपाल राज्याचे तत्कालीन प्रधानमंत्री, गदर पार्टीचे संस्थापक आणि शैखुल  हिंद द्वारा चालवलेल्या चळवळीचे सेनापती होते. १८६२ मध्ये भोपाळमध्ये जन्म झाला. काही दिवस मुंबईमध्ये राहून इंग्रजीचे शिक्षण घेतले. १८९० मध्ये इंग्लंडला गेले. तेथून त्यांच्यावर देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी प्रयत्न मिळाली आणि त्यामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिले आणि स्वातंत्र्यप्राप्तीच्या प्रयत्नात त्यांनी अनेक देशांचा दौरा केला. युरोप आणि आशिया च्या कानाकोपऱ्यात पोहोचले. लंडन, अमेरिका, तुर्की, फ्रान्स, जर्मनी, डेनमार्क, जपान, रशिया, अफगाणिस्थान आणि अरब देशांचे ३६ वर्षापर्यंत लागोपाठ दौरे केले. जीवनातील सर्वात जास्त काळ त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत घालवला. २७ सप्टेंबर १९२७ ला त्यांचा मृत्यू झाला.





मुफ्ती किफायतुल्लाह १८७५ - १९५२

भारताचे प्रसिद्ध मुफ्ती आणि भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाचे सरसेनापती होते. विचारक मार्गदर्शक धर्मापदेशक शायर गणितज्ञ राजनीती तज्ञ आणि क्रांतिकारी लढवय्ये होते. मुफ्ती किफायतुल्लाह, शहाजहाँपूरच्या एका गरीब परिवारात जन्म झाला. वयाच्या २२ व्या वर्षी एक गरीब परिवारातील युवक शैखुल हिंद च्या बरोबर राहून स्वातंत्र्य चळवळीचा भाग बनला. हजरत गंगोही च्या मार्गदर्शनात पुढील वाटचाल केली. १९१७ मध्य स्वातंत्र्यासाठी " अंजुमन अआनत नजर बंदाने इस्लाम" नावाची संघटना उभी केली. जमियात उलमा ए हिंद च्या स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिका होती. २० वर्षापर्यंत जमियतचे अध्यक्ष होते. स्वातंत्र्यचळवळीत अनेकदा जेल जावे लागले.


मौलाना मुहम्मद अली जोहर १८७८-१९३१

मोहम्मद अली जोहर भारतातील एक महान व्यक्ती व महत्त्वाचे नाव आहे. जे इंग्रजी मधील एक जबरदस्त लेखक उर्दूचे प्रसिद्ध शायर आणि निडर व्यक्ती परिपक्व राजनीती तज्ञ आणि स्वातंत्र्याच्या लढाईतील सेनापती होते. मोहम्मद अली जोहर चा जन्म १० डिसेंबर १८७८ ला रामपूर उत्तर प्रदेश मध्ये झाला. प्राथमिक शिक्षण बरेली हायस्कूल येथे झाले. उच्च शिक्षणासाठी प्रथम अलिगड विश्वविद्यालयात आणि नंतर ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी ला गेले. मौलाना अब्दुल बारी फिरंगी महली कडून मार्गदर्शन लाभले. मदरसा निजामीयां मधून मौलाना ची डिग्री प्राप्त केली आणि मिस्टर च्या ऐवजी मौलाना च्या नावाने प्रसिद्ध झाले. 

ते स्वातंत्र्य चळवळीचे महान योद्धा व क्रांतिकारी होते. स्वातंत्र्य संग्रामातील आपल्या कार्याला तोड नव्हती. मौलानांनी इंग्रजी साप्ताहिक कॉम्रेड आणि उर्दू दैनिक वृत्तपत्र हमदर्द च्या माध्यमातून स्वातंत्र्य आंदोलनाला नवे वळण दिले.


मौलाना अबुल कलाम १८८८-१९५८

इमामुल हिंद मौलाना अबुल कलाम आझाद भारताचे एक महान सुपुत्र स्वातंत्र्य चळवळीचे सरसेनापती आणि एक महान हरहुन्नरी व्यक्तिमत्व होते. १७ ऑगस्ट १८८८ रोजी मक्का शहरात जन्म झाला. वडिलांचे नाव खैरुद्दिन होते जे एक प्रसिद्ध धर्मोपदेशक होते. कला आणि संस्कृती वर प्रभुत्व होते. त्यांच्या भाषणात एक प्रकारची जादू होती.

आपल्या भाषणाने आणि लेखणीने हजारो-लाखच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत जागविली. त्यांचे वृत्तपत्र अल हिलाल ने देशाच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्याच्या बिगुल वाजवला. १९१५ मध्य आपल्या राजनीतिक कार्यामुळे बंगाल सरकारने त्यांना हद्दपार करून रांचीमध्ये नजरबंद केले. त्यानंतर स्वातंत्र्याच्या लढाईत अनेक वेळा अटक होत राहिली. मौलानांनी जवळ-जवळ १६ वर्ष तुरुंगात शिक्षा भोगली.

सुरुवातीला जमियात उलमा ए हिंद वर्किंग कमिटीचे सदस्य होते. लाहोरमधील मुख्य अधिवेशन १९२१ आणि कराची चे अधिवेशन १९३१ मध्य कांग्रेस पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते. स्वातंत्र्यापूर्वी सात वर्ष काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वात " अंग्रेज भारत छोडो" quit India movement 1942 आंदोलन चालवले होते. स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले शिक्षण मंत्री झाले.मौलानांच्या राजकीय धार्मिक आणि ज्ञानावर इतके लिहिले गेले आहे की ते सर्व एकत्र केले की कित्येक पुस्तके तयार होतील. सन १९५८ मध्ये मौलानांचा मृत्यू झाला.



मौलाना शौकत अली १८७३-१९३३

मौलाना शौकत अली खिलाफत चळवळीचे महत्त्वाचे नेते. अंजुमने खुद्दामे काबा चे संस्थापक. मौलाना मोहम्मद अली जोहर च मोठे भाऊ होते. १० मार्च १८७३ तुझा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण बरेली च्या हायस्कूलमध्ये झाले. मुस्लीम युनिव्हर्सिटी अलिगड मधून १८८९ का बी. ए पास झाले. ग्रॅज्युएट झाल्यानंतर सरकारी नोकरी केली. सर आगाखान चे खाजगी सेक्रेटरी सुद्धा होते. देश सेवेसाठी नंतर सर्व सोडून दिले. स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला प्रथम ३० मे १९१५ ला अटक झाली. डिसेंबर १९१९ ला सुटका झाली, नंतर खिलाफत चळवळीच्या बाबत प्रसिद्ध कराचीच्या खटल्यात दोन वेळा तुरुंगवास भोगला. आपल्या सोबतया बरोबर दोन वर्ष करायची जेलमध्ये होते. त्याच वेळी दोन्ही भाऊ अली बंधू च्या नावाने प्रसिद्ध झाले.

शौकत अलींच्या समाज सेवेला पाहून त्यांचे गुरु व धर्मोपदेशक मार्गदर्शक मौलाना अब्दुल बारी फिरंगी महली यांनी मौलाना ची मानाची पदवी प्रदान केली आणि त्यानंतर मौलाना च्या नावाने प्रसिद्ध झाले. २६ नोव्हेंबर २९३३ ला दिल्लीमध्ये मृत्यू झाला. जामा मस्जिद च्या पूर्वी कडील दरवाज्याच्या जवळील छोट्या  मस्जिद च्या आवारात दफन करण्यात आले.

संदर्भ - भारतीय स्वतंत्रता आंदोलन और मुसलमान

कांती विशेष अंक ४ ऑक्टोबर २०१५ 

वाचा - 

मुस्लिम धर्मीयांची चौकशी करून जात प्रमाणपत्र द्या! उच्च न्यायालय - Mumbai High court....

चीनी नायलॉन मांजा विकणाऱ्या व्यापारीवर कारवाही का होत नाही? डॉ परवेज अशरफी .....

मखदुम सोसायटीच्यावतीने मिर्जा गालिब जयंती साजरी - MIRZA GALIB....

ऐतिहासिक अहमदनगर काही घटना काही आठवणी - Historical Ahmednagar ....

१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान भाग ३ - Indian Muslim Freedom Fighter...

ऐतिहासिक अहमदनगर काही घटना काही आठवणी - Historical Ahmednagar

 


इ.स. ४ थे शतक : वस्ती चा अंदाज मात्र इ. स. २४०  म्हणजे सम्राट अशोकाच्या साम्राज्यत अहमदनगर प्रांत मोडत होता. स्थूल मानाने अहमदनगर प्रांता वरील पुढील राज घराण्याची सत्ता होती.

राज्य महिना हिजरी सण ८९५ अर्थात २८ मे १४९० भिंगार जवळील मैदानावर वहामनीच्या जहांगीर खानशी  झालेल्या लढाईत मिळालेल्या विजया प्रीत्यर्थ अहमद शहा निजामाने त्याजागी भुईकोट किल्ला (कोट -बाग -) निजाम बांधून अहमदनगर ची स्थापना केली.

इ. स.१४९४ : पंचक्रोशीतील खेडेगावाहून, तलावांतून खापरी नळातून पाणी आणून वाडे महाल बाग यांची निर्मिती करून अहमदनगर शहर बसवले गेले.

इ. स. १४९४ : भांगरे नावाच्या गोष्टी समाजातील श्रीमंत माणसाने अहमदशहा च्या परवानगीने कापड विणण्याचा व्यवसाय सर्वप्रथम सुरू केला.

इ. स. १५०८ : अहमदनगर संस्थापक अहमदशहा निजामाचे निधन.

इ. स. १५२६ : बुर्‍हाण शहाच्या कारकिद्रीत विद्वान शहा  ताहीरच्या प्रयत्नाने कोटला ( मदर्सा) बांधून पूर्ण झाला. बाराईमाम (ताबूत) उत्सव सुरू झाले. हुसैनी मदर्स स्थापन झाले.

इ. स  १५५० : चुलबी रुबी खान या तुर्की तंत्राने धूळधाण आणि सुप्रसिद्ध तोफ मलिक ई मैदान या २ तोफा ओतल्या.

इ.स. १५५९ : हुसेन निजामशहाने भुईकोट किल्ला दुरुस्त करून पुन्हा नव्याने बांधला.

इ.स. १५८० : शहा डोंगरावर सलाबतखानाने टेहळणी मनोरा (चांदबीबी महाल) बांधला. (सलाबतखान महाल)

इ.स. १५८३ : फरहा बक्ष बागेची निर्मित.

२० फेब्रुवारी स. १५९६ : मोगलांच्या सुरुंगामुळे कोसळलेली तटाची भिंत पाहून चांद सुलतान चौथडलेल्या वाघिणीसारखी शत्रूवर अपुर्‍या सैन्यासह धावून गेली. रातोरात भिंत बांधून काढली. चिटपणे मोगलांशी लढा देऊन अहमदनगर चे रक्षण केले.

इ. स. १६२४ : कुतुबशाही, आदिलशाही, मोगलशाही या ३ शहांशी आपल्या अपुऱ्या सैन्यासह गनिमीकाव्याने मलिक अंबर आणि शहाजीराजे भोसले यांनी भातवडी येथे चिवटपणे लढून त्यांचा पराभव केला.

इ. स. १६३६ : निजामशाहीची अखेर. 



मोगल साम्राज्याची राजवट सुरू.

२७ फेब्रुवारी १७०७ : मोगलांच्या सम्राट आलमगीर औरंगजेब यांचा (मराठ्यांशी लढता-लढता) आजारी पडून मृत्यू.

१७५९ नानासाहेब पेशवे आणि मोगल सेनापती मत अहमद खान उर्फ कविजंग यांच्यामधील करारानुसार अहमदनगर मराठ्यांच्या साम्राज्यात विलीन. नारो बाबाजी नगरकर नवा कर्तबगार सुभेदार.

८ ऑगस्ट १८०३ : दुष्काळाच्या भीषण छायेत गव्हर्नर लॉर्ड वेलस्लीच्या फंद फितुरीने अहमदनगर किल्ल्यावर कब्जा.

इ. स. १८१८ पेशवाईच्या अस्ता नंतर अहमदनगर पूर्णपणे ब्रिटिशांच्या ताब्यात.

इ. स १८३१ : ख्रिस्ती मिशनरी ॲलन आणि रीड यांचे अहमदनगर मध्ये आगमन.

इ. स १८३३ : दुष्काळ

इ. स १८३८ : महाराष्ट्रातील सर्वात जुने वाचनालय, अहमदनगर जिल्हा वाचनालयाची स्थापना.

इ. स १८४२ : ख्रिस्ती मिशनरी मंडळाचे ज्ञानोदय नवोदय नियतकालिक सुरू.

इ. स.१८४५-४६ : दुष्काळाचे वर्ष.

इ. स १८४७ : पारशी समाजाचे अग्यार (प्रार्थना मंदिर) सुरू.

इ. स. १८५१ : अहमदनगर मधील कॅम्प भागात रोमन कॅथलिक सेंटर जॉन ऐनस चर्च बांधले गेले.

१ नोव्हेंबर १८५४ : अहमदनगर पालिका स्थापना झाली.

इ. स.१८५५ : आजच्या वाडिया पार्क भागात विश्रामबाग (रिक्रिएशन गार्डन) तयार केले गेले.

इ. स १९५७ : स्वातंत्र्या समरा मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील कोळी समाजातील लोकांची ठिकाणी बंडे आणि होतातम्या.

इ. स. १८६० : दैनिक वृत्त वैभव पत्र सुरू.

इ.स.१८६२ : दुष्काळ

इ. स १८६४-६५ : नगरपालिकेची घरपट्टी लागू.

इ. स.१८६५-६६ : नगरपालिकेने दोन मराठी शाळा स्थापन केल्या.

इ. स. १८६६ : संपादक कुकडे यांचे दैनिक न्यायसिंधू सुर.

इ. स १८६९ : मुंबई प्रांत गव्हर्नर ने गॅझेटियरमध्ये अहमदनगर ची माहिती प्रकाशित केली.

इ. स १८७२ : दुष्काळ निवारण समिती स्थापन.

इ. स १८७३ : पहिली वकृत्व सभा स्थापन.

इ. स.१८७८ : दौंड मनमाड रेल्वे मार्ग सुरू. अहमदनगरशी रेल्वेमार्गाचा संपर्क. 

इ. स १८८० : हरिजनांसाठी नगरपालिकेची शाळा सुरू.

इ. स. नोव्हेंबर १८८४ : शेतकी (कृषी) अवजारांचे, जनावरांचे, घोड्यांचे,  कॉटन मार्केट येथे प्रदर्शन.

इ. स.१८८७ : मिशनऱ्यांचे प्रयत्नाने अहमदनगर कॉलेजची स्थापना.

इ. स १८९०: कापड बाजार विभागाची निर्मिती.

इ. स. जानेवारी १८९३ : राजकीय हेतूने लिबरल क्लब ची स्थापना.

इ. स २५ नोव्हेंबर १८९३ : हिंदी राष्ट्रीय सभा (काँग्रेस) अध्यक्ष सर हियुम साहेब यांची अहमदनगरला भेट.

इ. स १८९४ : पांजरपोळ संस्था स्थापन. संस्थापक पाशुभाई भाटे.

इ. स १८९९ : प्लेगची साथ सुरू.

इ. स १९००- १९०१ : कॉलराची साथ जोरावर.

इ. स १९०६ : वैद्य श्री गंगाधर शास्त्री गुणे यांच्या प्रयत्नाने आयुर्वेदाष्रम वनौषधी शाळा स्थापन.

इ. स १९०७ : सनातन धर्म सभेची स्थापना. 

इ. स.१९०९ - १० : सिटीसर्वे चे काम पूर्ण झाले.

इ. स १० एप्रिल १९१० : अर्बन सेंट्रल को-ऑपरेटिव बँकची स्थापना.

इ. स. १९९१ : अहमदनगर म्युनिसिपल सर्वेंट्स को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

इ. स.१९९३ : अनाथ विद्यार्थी गृहा ची स्थापना.

इ. स.१९९३ : हिंदी सेवा मंडळाची स्थापना. बाळासाहेब देशपांडे, नानासाहेब देवचक्के, सम.म. बोरकर.

इ. स १९१६ : अमेरिकन मिशन गर्ल्स हायस्कूल सुरू.

इ. स.१९१६ : स्वतः काम प्रशिक्षणासाठी उद्योग मंदिर स्थापना.

इ.स. १९१७ २४ एप्रिल - आयुर्वेद महाविद्यालय स्थापन संस्थापक वैद्य प.गो.  गुणे शास्त्री.

इ. स.१९१८ : टाऊन प्लॅनिंग  शहरास लागू झाला.

इ स. १९१९ : अहमदनगर प्रायमरी टीचर्स को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड स्थापन.

इ. स १९२० २० ऑगस्ट : नगर पोस्टल रिविजन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड स्थापन.

इ. स.१९२१ : अहमदनगर राष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन होऊन त्याच वर्षी राष्ट्रीय पार्क शाळेची सुरुवात झाली. संस्थापक दादा चौधरी, चिंचोळकर.

इ. स. १९२२ : करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज वस्तीगृह सुरू.

इ. स. १९२२ : मराठा जिल्हा प्रसारक समाज शिक्षण संस्था स्थापन.

इ. स. १९२३ : स्कूल बोर्डाची स्थापना.

इ. स. १९२३ १४ ऑगस्ट : कै. बाळासाहेब देशपांडे धर्मार्थ दवाखाना. प्रसूतिगृह स्थापना.

इ. स. १९२४ : जैन बोर्डिंग सुरू.

इ. स. १९२४ : अहमदनगर ज्युडिशियल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड स्थापना.

इ. स १९२४ : हिंदी सेवा मंडळाचे मोहन मुद्रा मंदिर (छापखाना /प्रेस) सुरू.

इ. स १९२६-२७ : महात्मा गांधी यांची अहमदनगर ला भेट. त्यांच्या भव्य सत्कार.

इ. स.१९२७ : अहमदनगर डिस्ट्रिक्ट लोकल बोर्ड को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सुरू.

इ. स.१९२७ : क्षय आणि देवीची सात जोरावर.

इ. स.१९२८ : अहमदनगर वाडयोपासक मंडळ रे टिळक, कै. दत्ता कवीबुवा, नानासाहेब मिरीकर यांच्या सहभागाने स्थापन.

इ. स १९३० : अहमदनगर तालुका डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड चालू.

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357dइ. स. मे १९३१ : स्टेशन रोड वर इलेक्ट्रिक सप्लाय कंपनी लिमिटेड चालू.

इ. स. १९३२ : अहमदनगर मध्ये वीज आली.

इ. स. १९३३ : यशवंतराव त्रिंबकराव उर्फ काकासाहेब मिरीकर यांनी अहमदनगर इतिहास हा ग्रंथ लिहिला.

इ. स. १९३३ : आयुर्वेद फार्मसी प्रायव्हेट लिमिटेड सुरू.

इ. स. १९३३ : फ्रेंड्स ऑफ डी डिस्प्रेड लीग (दलित दोस्त दल) यांची भाई सत्ता यांच्या सहकार्याने सुरुवात.

इ. स. १९३३ : जानकीबाई आपटे यांची हरिजन वस्तीत मुलींची शाळा सुरू.

इ. स. १३ जून १९३३ : गांधी मैदान येथे मुलींची पहिली मोठी शाळा सुरू.

इ. स. ६ जानेवारी १९३५ : अहमदनगर महिला मंडळ स्थापन.

इ. स.१९३५-३६ : डॉ बाबू राजेंद्रप्रसाद यांची अहमदनगरला भेट

इ. स.१९३६-३७ : स्वातंत्र्यवीर बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर यांच्या अहमदनगरला भेट.

इ. स. १९३९ : महिला को-ऑपरेटिव भंडार लिमिटेड स्थापन.

इ. स. १९३९ : महाराष्ट्रातील 24 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अहमदनगर येथे स्थानिक वडमयोपसक मंडळांचे सहकार्याने संपन्न झाले. स्वागत अध्यक्ष रा. ब. ग. देशमुख, अध्यक्ष म.म. द. वा. पोतदार.

इ. स. १९३९ : एक मिशनरी दवाखान्याचे बूथ हॉस्पिटल नावाने नामांतर बूथ हॉस्पिटल सुरू.

इ. स. १९३९ : सिरत कमिटीचे अँग्लो उर्दू स्कूल स्थापन.

इ. स. १९४१ : द सारडा बिल्डींग अँड ओईल मिल, सावेडी रस्ता येथे सुरू.

इ स. १९४२ : अहमदनगर रिमांड होम संस्था स्थापन.

इ स. १९४२ : अहमदनगर किल्ल्या मध्ये काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचे शंकरराव देव, पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल कलाम आझाद, सरदार वल्लभाई पटेल, आचार्य देव, बॅरिस्टर असिफ अली, मेहमूद साहब वगैरे राजकीय पुढारी म्हणून ब्रिटिश सरकारकडून ठेवण्यात आले.

इ स. १४ ऑक्टोबर १९४३ : बालिकाश्रम इमारत पूर्ण, बालिकाश्रम सुरू.

इ.स. १९४३ जे.एस.रानडे, मुथा फाटक, रुस्तमजी हातीदास, ताम्हणकर गुरुजी, डॉ आपटे यांच्या प्रयत्नाने अहमदनगर संगीत कला मंडळाची स्थापना.

इ. स.१४ जून १९४३ : ग. ज. चितांबर यांच्या अथक प्रयत्नांनी कन्या विद्या मंदिराची स्थापना.

इ. स.१९४३ : नगर को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर्स स्टोअर्स ची स्थापना.

७ ऑगस्ट १९४३ : आजच्या वाडिया पार्क भागात वृक्षारोपण दिन साजरा.

इ. स. १९४४ : इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा सुरू.

इ स १९४४ : पंडित नेहरूंची अन्य नेत्यांचा अहमदनगर किल्ल्यातून सुटका. ह्याच कैदेत असताना पंडितजींनी जगप्रसिद्ध डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहून पूर्ण केला.

इ. स १९४४ : मौलाना आझाद यांची अहमदनगर किल्ल्यातून सुटका झाली. ह्या कैदेत असताना जत प्रसिद्ध गुबार ए खातिर या ग्रंथ लिहिला.

इ. स. १९४४ : दा. पं. आपटे, निसाळ, बाळासाहेब भारदे यांच्या प्रयत्नाने अहमदनगर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कार्य सुरू.

इ. स १९४५ : श्रीरामपूर तालुका अस्तित्वात. अहमदनगर जिल्ह्यातील तालुका निर्मिती प्रक्रिया पूर्ण.

इ. स १९४५ : उर्दू अँग्लो स्कूलचे हायस्कूल झाल्या. चांद सुलतान हायस्कूल सुरू.

इ. स.१९४५ : भारत नाट्यसेवा संस्थापन.

इ. स.१९४६ : चित्रपट टीकाकार संघ स्थापन.

इ. स १९४७ : भिकुसा यामास क्षत्रिय विडी कारखाना सिन्नर ची शाखा सुरू.

इ. स १९४७ : प्रायमरी ट्रेनिंग महाविद्यालयाची सुरुवात.

इ. स १८ जून १९४७ : दि रोटरी क्लब स्थापन.

इ. स १५ ऑगस्ट १९४७ : भारताच्या या स्वतंत्र दिनाच्या फत्ते बुरुजावर आचार्य नरेंद्र देव यांच्या हस्ते ध्वजारोहण समारोह संपन्न.

इ. स १९४७ : अहमदनगर महाविद्यालय पुन्हा सुरू झाले.

इ. स १ डिसेंबर १९४७ : सिद्धी बाग येथे बाबावाडी सुरू.

इ. स १९४८ : अहमदनगर एक्स सर्विसमेन ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह सोसायटी सुरू.

इ. स १९४८ : राष्ट्रभाषा सेवा संघ स्थापन.

इ. स १९४८ : ग्रामोद्योग प्रचिती लिमिटेड ची सुरुवात.

इ. स.१९४८ : होमगार्ड संघटना कार्याची सुरुवात.

१ जून १९४८ : अहमदनगर- पुणे -अहमदनगर मार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची सेवा (एसटी) श्री सरोष  इमरानी यांच्या हस्ते सुरू पुण्याहून श्री बाबुराव सणस यांनी सुरू केल.

१२ जुलाई १९४८ : भारत बालवीर गाईड संस्था स्थापन.

२० जानेवारी १९४९ : अहमदनगर मधील राष्ट्रीय यांचे डांबरीकरण सुरू झाले.

५ नोव्हेंबर १९५० : भारत स्काऊट गाईड असोसिएशनची स्थापना.

इ. स. मार्च १९५१ : अहमदनगर जिल्हा पत्रकार संघातर्फे महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषदेचे अकरावी अधिवेशन अहमदनगर येथे संपन्न.

इ. स मे १९५१ : श्री. ल.को.कुलकर्णी व हेमराज बोरा यांनी अथक परिश्रम घेऊन अहमदनगर विषयावरील अहमदनगर डिरेक्टरी हा ग्रंथ लिहून संपादित करून प्रकाशित केला.

इ. स १६ जानेवारी १९५२ : इंजिनियर्स बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर्स यांची बिल्डिंग सेंटरची स्थापना.

इ. स.११ मे १८५२ : अहमदनगर मध्ये दुपारी १२ वाजता व रात्री ९.३० वाजता दररोज घडविण्यात येणारी तोफ बंद केली गेली. त्याऐवजी दररोज पहाटे ५ वाजता रात्री ८.३० वाजता अहमदनगर नगरपालिकेतर्फे भोंगे (सायरन)  वाजने सुरू झाले.

१ मे १९५३ : स्वतंत्र भारताचे पहिले महामंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांची दुष्काळग्रस्त अहमदनगरल भेट.

२८ डिसेंबर १९५४ : अहमदनगर पालिका शतसावंत सरिक  महोत्सव संपन्न.

स्त्रोत : 

मखदूम उर्दू - स्वातंत्र्य चाळवलीतील मुस्लीम हुतात्म्यांचे अपूर्ण यादी.  

 सेडिशन कमिटी रिपोर्ट 

रोल ऑफ ऑनर - के सी घोष

हुज हु ऑफ इंडिया मात्रीअर्स खंड १,२,३ संपादक - डॉ पी एन चोप्रा

HISTORY OF FREEDOM FOGHTER MOVEMENT OF CARE - T V KRUSHNAN

THE RIN STRIKE - A GROUP OF VITIMISED RATING

नव विद्रोह  कॅप्टन बी.दत्ता

COMMUNIST MARTOURS - COMMITTE OF COMMUNIST PARTY OF INDIA 

SUNIL BENARGEE, ABDUL RAZZAK KHAN AND ABDUL BADUD WRITTEN ARTICLES



वाचा - 





तारिक कासमी को उम्रकैद का फैसला तथ्यों से परे- रिहाई मंच TARIK KASMI

 तारिक कासमी को उम्रकैद का फैसला तथ्यों से परे- रिहाई मंच



लखनऊ 22 दिसंबर 2020. रिहाई मंच ने गोरखपुर सीरियल ब्लॉस्ट मामले में आजमगढ़ के तारिक कासमी को आजीवन कारावास के फैसले पर बोला की यह फैसला तथ्यों से परे है. मंच ने कहा कि इससे पहले भी निचली अदालतों द्वारा आतंकवाद के विभिन्न मामलों में सजा सुनाए जाने के बाद ऊपरी अदालतों ने फैसले को पलट दिया और बेगुनाह बरी किए गए. अक्षरधाम मामला इसकी मिसाल है जिसमें फांसी की सजा को सुप्रीम कोर्ट ने पलट दिया.

रिहाई मंच महासचिव राजीव यादव ने कहा कि 25 मई 2007 को गोरखपुर में हुई घटना के महीनों बाद 12 दिसंबर 2007 को तारिक़ का यूपी एसटीएफ ने आजमगढ़ से अपहरण किया था. इस बात को यूपी सरकार द्वारा गठित आरडी निमेष आयोग ने भी सही ठहराते हुए दोषी पुलिस वालों के खिलाफ करवाई की सिफारिश की थी. 19 सितंबर 2008 बाटला हाउस फर्जी एनकाउंटर के बाद पुलिस ने नई थ्योरी लाई और कहा कि गोरखपुर सीरियल ब्लास्ट इंडियन मुजाहिदीन ने किया था. जबकि पहले महीनों तक किसने किया इसके बारे में कुछ नहीं कहा गया बाद में इसका ज़िम्मेदार हूजी को बताया गया फिर आईएम को. इस तरह देखें तो पुलिस की थ्योरी में भारी अंतर्विरोध है. 

इससे पहले भी लखनऊ में तारिक कासमी के मामले में ट्रायल पूरा होने से पहले ही सजा सुना दी गई थी. इससे साफ होता है कि तारिक कासमी को लेकर एक पूर्वाग्रह है. यहां यह बताना महत्वपूर्ण है कि यूपी में आतंकवाद के मामलों में झूठे फसाए जा रहे युवाओं को लेकर जो आंदोलन हुए उसकी शुरुआत तारिक कासमी के मामले से हुई.

गौरतलब है कि मायावती सरकार ने उस दौरान यूपी में हुई विभिन्न आतंकी घटनाओं की सीबीआई जांच की बात कही थी लेकिन केंद्र की कांग्रेस सरकार ने नहीं करवाया. यहां गौर करने की बात है कि इसी दौरान विभिन्न हिंदुत्वादी संगठनों के नेताओं और कार्यकर्ताओं पर आतंकवाद के विभिन्न मामलों में आरोप लगे और गिरफ्तारियां हुई. वहीं सपा सरकार में गोरखपुर मामले में तारिक़ का मुकदमा वापस ले लिया था.

राजीव यादव ने कहा कि रिहाई मंच ने जांच एजेंसियों पर सवाल उठाते हुए विवेचना की धांधलियों को परत दर परत खोलती गोरखपुर सीरियल ब्लास्ट पर रिपोर्ट लाई थी. जिसमें कहा गया कि गोरखपुर सीरियल ब्लास्ट मामले में तारिक कासमी समेत सैफ, सलमान, मिर्जा शादाब बेग को झूठी कहानी और झूठे साक्ष्य गढ़कर फसाया गया जिसका मकसद उन हिन्दुत्वादी सांप्रदायिक तत्वों को बचाना था, जो इस पूरे मामले के असल अभियुक्त हैं. इस रिपोर्ट में कहा गया है कि कोई भी ऐसा चश्मदीद गवाह नहीं है जिसने किसी भी व्यक्ति को गोरखपुर के तीनों स्थलों पर साइकिलें खड़ी करते हुए और उसने उन्हीं साइकिलों से विस्फोट होते हुए देखा था. पुलिस द्वारा घटना के बाद जो स्केच जारी किए गए और जिनका प्रकाशन हुआ वो किसकी चश्मदीद गवाही और शिनाख्त के बाद बनाए गए थे, वो किसके थे यह मुकदमें के किसी भी रिकार्ड से साबित नहीं है. इसी तरह इस मामले के अहम गवाह मरहूम मौलाना अफजालुल हक का बयान कि तारिक कासमी 21 मई की शाम को उनके मदरसे में दो अन्य के साथ साइकिलें लेकर आया था, भी विश्वसनीय नहीं है. राजू उर्फ मुख्तार जिसको सैफ बताया जा रहा है और छोटू जिसको सलमान बताया जा रहा है, इस पूरे मामले में पुलिस द्वारा दो गढ़े गए व्यक्ति हैं. पहले आफताब आलम अंसारी को राजू उर्फ मुख्तार बताया जा रहा था परंन्तु लखनऊ न्यायालय द्वारा यह नहीं माना गया और आफताब को बरी कर दिया गया. वाराणसी कचहरी विस्फोट के मामले में सैफ को अभियुक्त बनाया गया था और मुकदमे में उस पर यह आरोप था कि उसी ने राजू उर्फ मुख्तार नाम रखकर धमाके किए परन्तु विवेचना के दौरान ही यह कहानी दम तोड़ गई और सबूत के अभाव में विवेचक द्वारा अन्तर्गत धारा 169 सैफ को बरी कर दिया गया. तारिक कासमी जो कथित इकबालिया बयान दिनांक 22 दिसंबर 2007 पुलिस बताती है, वह निमेष आयोग द्वारा फर्जी करार दिया जा चुका है. इस पूरे मामले में कोई सीधा और परिस्थितिजन्य साक्ष्य पुलिस के पास नहीं. धमाके कैसे हुए और इसकी किस तरह तैयारियां की गईं इस संबनन्ध में जो तारिक और सलमान के बयान पुलिस रिकार्ड में हैं वो सभी परस्पर विरोधी हैं. तारिक कासमी सलमान और सैफ की कोई शिनाख्त परेड तथाकथित गवाहों के सामने नहीं कराई गई बल्कि तारिक कासमी का फोटो दिखाकर साइकिल विक्रेताओं के झूठे बयान लिख लिए गए.

द्वारा- राजीव यादव

महासचिव, रिहाई मंच

9452800752



वाचा -

१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान भाग ३ - Indian Muslim Freedom Fighter...

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग २ INDIAN MUSLIMS FREEDOM FIGHTER...

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग १ MUSLIMS INDIAN FREEDOM FIGHTER...

१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान भाग ३ - Indian Muslim Freedom Fighter


 १८५७ च्या उठावमध्ये  भारतीय मुस्लीम  स्त्रियांचा योगदान



ब्रिटिशांनी चालविलेल्या या अन्याय शोषणाच्या विरोधात भारताच्या वेगवेगळ्या भागात ब्रिटिशविरोधी असंतोष वेळोवेळी सैनिक उठावाच्या रुपाने प्रकट होत गेला. 


वेल्लोर मधील उठाव १८०६

बराकपूर १८२४

फिरोजपुर १८२४

त्यापाठोपाठ झालेल्या सातव्या बंगाल घोड दलाचा ६४  रेजिमेंट चा उठाव, 

२२ व्ही एन आय १८४९

६६ वी एन आय १८५०

३८ व्ही एन आय १८५२

बरेली चा उठाव १८१६

कोळ्याचे बंड १८३१ -३२

कांगडा राज्याचा विरोध १८४८

संथालचा उठाव १८५५ - ५६

या सर्व असंतोषाच्या मागे राजकीय आर्थिक प्रशासकीय सामाजिक स्वरूपाची व्यापक करणे होती. खदखदत असलेल्या या असंतोषाचा स्फोट होऊन १८५७ चे वादळ निर्माण झाले ज्याने भारतातील ब्रिटिश साम्राज्याच्या मुळांना जबरदस्त धक्का दिला होता.
१८५७ पूर्वीची ही बंडे संख्येने कमी असली तरी त्यांचे परिणाम मर्यादित होते. उदासीन जनता व शस्त्रसामग्री मर्यादित असल्यामुळे हे उठाव यशस्वी झाले नाही. परंतु यश येवो न येवो त्यांची राजवट खपून घ्यायची नाही या वृत्तीतूनच ही बंडे घडून आलेली आपणास दिसून येतात. आपल्या मर्यादांची तुटपुंजा साधन सामुग्रीची व मनुष्यबळाची कल्पना असतानाही पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांनीही मर्दुमकी गाजविल. इतिहास घडविला. विविध स्वरूपाची व्यक्तिमत्वे असलेल्या या स्त्रिया आपल्या स्वराज्यासाठी संघर्ष करताना जिवाची बाजी लावताना आपणास दिसून येतात. पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनीही या उठावात भाग घेऊन त्यांनी प्रामुख्याने संदेश पाठविणे फरारी घोषित झालेल्या क्रांतीकारकांना आश्रय देणे, जेवण पुरविणे जखमी क्रांतीकारांची शुश्रूषा करणे एवढेच नव्हे तर हातात शस्त्र घेऊन त्यांनी या उठावाचे नेतृत्व ही केल्याचे आपणास दिसून येते
पण यातील काही स्त्रियांची नावे काळाच्या ओघात दुर्लक्षित राहिली. या दुर्लक्षित स्त्रियांना इतिहासात पुन्हा प्रस्थापित करणे त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा शोध घेणे सध्याच्या परिस्थितीत आवश्यक आहे. या उठाव यातील स्त्रीयांचे योगदान निश्चित महत्वपूर्ण आहे म्हणूनच या स्त्रियांचे योगदान स्पष्ट करणे हा या लेखाचा उद्देश.

बेगम हजरत महल -

भारतीय स्वातंत्र्य संग्रामात जे नाव प्रामुख्याने पुढे येते ते म्हणजे बेगम हजरत महल यांचे. नवाब वाजिद अली शहा बरोबर विवाह करण्यापूर्वी ती एक नर्तकी होती. विवाहानंतर ती एक सन्मानित बेगम झाली. ती इतकी सुंदर आणि आकर्षक होती की नवाब तिला महकपरी असे संबोधित असे. या उठावातील त्यांचे कार्य हे वाखाणण्यासारखे आहे. अवधच्या नवाबाची ही पत्नी विलक्षण शमते वाली महिला होती जिने स्वातंत्र्यसंग्राम मध्ये खूपच अग्रगण्य अशी भूमिका निभावली. आपल्या अल्पवयीन पुत्र बिज्रिस कद्र याला प्रतिनिधी बनविले. त्याला आपल्या पतीचा उत्तराधिकारी घोषित केला. त्यांनी लखनऊच्या रक्षणासाठी सक्रिय सहभाग घेतला आणि सतत आपल्या सैनिकांमध्ये त्या सामील असत. जेव्हा इंग्रजांनी अवध वर पुन्हा विजय प्राप्त केला तेव्हा बेगम हजरत महल ने नेपाळमध्ये शरण घेतले आणि आपल्या मुलाचे अधिकार सोडण्यास नकार दिला. त्यांच्या या उठावयातील कार्याचे मूल्यमापन करताना अशा राणी व्होरा "महिला और स्वराज्य" या त्यांच्या ग्रंथात म्हणतात "बेगम हजरत महल निव्वळ बहादूर महिलांमध्ये एक होत्या ज्या आपल्या हुशारीने संघटक क्षमतेने आणि रनकुशलते मुळे आपल्या अंतिम श्वासापर्यंत इंग्रजांची डोकेदुखी बनल्या होत्या."

अझिझन -

अझिझान या कानपूरच्या एका कलावंतीन होत्या. त्यांच्या १८५७ च्या उठावातील सहभागा विषयी सर जॉर्ज ट्रेविलियन , नानासाहेब पेशव्यांचे चरित्रकार आनंद स्वरुप तसेच नानकचंद यांनी गौरव पर लिहिले आहे. बेगम आलियाने जसे स्त्रियांचे पथक उभारले होते तसेच अजिझन या कलावंतीन नेही स्त्रियांचे पथक तयार केले होते. पुरुष वेश धारण करून झाशीच्या राणी प्रमाणे करणे हि घोड्यावर स्वार होऊन समशेर चालवीत असे. तसेच त्यांनी घरोघर जाऊन अनेक स्त्रियांना या पथकात दाखल करून घेतले होते. डॉ सुंदर लाल हे इतिहासकार त्यांच्या भारत मे अंग्रेजी राज या ग्रंथ यांच्याबाबत म्हणतात की "शस्त्रसज्ज घोड्यावर स्वार होऊन शहराच्या रस्त्यावर आणि सैनिकांच्या छावणीमध्ये फिरत असत. कधी त्या रस्त्यावरील थकलेल्या आणि जखमी झालेल्या सैनिकांना दूध आणि भाकरी वाटत असेल आणि कधी इंग्रजांच्या किल्ल्याच्या बरोबर भिंतीखाली लढणाऱ्या लोकांना धीर देत असत."

बेगम जीनत महल -

दिल्लीच्या बादशहा बहादूरशहा जफर यांची जीनत महल ही आवडती बेगम होती. विद्रोही सैनिक ज्या वेळी दिल्लीत गेले त्यावेळी त्यांनी बहादूर शा सह क्रांतिकारी सैनिकांचे नेतृत्व स्वीकारण्याची विनंती केली. परंतु वृद्धावस्था आणि रिकाम्या खजिना यामुळे प्रारंभी यांनी नेतृत्व करण्यास नकार दिला पण याच वेळेस बेगम बोलली ही वेळ गझल गाऊन मन रमण्याची नाही. विठूर येथून निरोप घेऊन देशभक्त सैनिक आले आहेत. आज पूर्ण भारताचे लक्ष दिल्लीवर आणि आपल्यावर लागले आहे असे ठणकावून सांगितले होते. बेगम  जीनत महाल बरोबरच कवियत्री कन्या बस्ती बेगम ही उठावात सहभागी झाली होती.

बेगम आलिया -

१८५७ च्या उठावात राणी लक्ष्मीबाई खेरीज बेगम आलियाच्या नेतृत्वाखाली शस्त्रसज्ज स्त्रियांचे पथक होत. या स्त्रिया शत्रूच्या हालचालींची बातमी काढण्यात पटाईत होत्या. रणनीती आणि डावपेज याबाबत तिची समज जबरदस्त होती पण १८५७ च्या उठावात नेत्यांमधील मतभेदांमुळे पुढे जेव्हा विसंवाद निर्माण झाला आणि ते एक दिलाने लढेना झाले तेव्हाही बेगम आलिया चा अखेरपर्यंत लढण्याचा निर्धार अभंग राहिला. १८५७ च्या उठावाचे संबंधी अनेक इंग्रज इतिहासकारांनी ग्रंथ प्रसिद्ध केले आहेत त्यापैकी त्यांच्या ग्रंथाचा अहवाल अनेकदा दिला आहे. त्या मेलेसन ने म्हंटले आहे, "आयोध्या ने जितका निश्चयात्मक दीर्घकालीन लढा दिला तितका भारतातील दुसऱ्या कोणत्याही भागने दिला नाही, या दीर्घकाळ चाललेल्या झुंजीत पराभव होणार असे दिसू लागल्यावर ही ज्यांनी शरण जाण्यापेक्षा मरण पत्करले त्यामध्ये बेगम आलिया ही एक होती."



स्वातंत्र्य लढ्यातील मुस्लिमांचे योगदान - 
संकलन सोमनाथ रामचंद्र देशकर

संदर्भ - १८५७ च्या उठावातील स्त्रियांचा सहभाग
लेखक - डॉक्टर विनोद बोरसे 
कार्यकारी संपादक - डॉ अनिल कठारे
कंधारपूर - इतिहास संशोधन त्रेमासिक



वाचा -



सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या