आपले शासकीय कार्यालय निरीक्षण व सूची

 


आपले शासकीय कार्यालय निरीक्षण व सूची

                     नागरिकांनी शासकीय कार्यालयांची निरीक्षण करताना अवलंबयाची सूची रोज कोणत्याना कोणत्या शासकीय कार्यालयाशी आपला संपर्क येतोच पण कार्यालय उघडण्याची वेळ अधिकारी व कर्मचारी आपल्या पदानुसान नोकरी वर येण्याची वेळ. कार्यालयात कोण कोणत्या सेवा सुविधा भारतीय नागरिक या नात्याने आपणास शासनाने दिल्या पाहिजेत याबाबत आपणास माहीती असणे गरजेचे आहे. आणि तो आपला अधिकार आहे खालील प्रमाणे आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश येथील शासकीय कार्यालयात अंमलबजावणी केली जाते का ? आजच आपल्या नजिकच्या शासकीय कार्यालयात जाऊन बघा 

(१) नाव. व पत्ता

_-____________________

_______________________

(२) कार्यालयाचे नाव

_______________________

_______________________

(३) शासकीय वेळ ९/४५ सकाळी उशीर १० मी= ९ / ५५ वा सकाळी

(४) निर्धारित वेळेत उपस्थिती / अधिकारी व कर्मचारी संख्या = 

(५) लेटमारक वेळेत उपस्थिती अधिकारी व कर्मचारी संख्या

(६) रजेवर असणारे अधिकारी व कर्मचारी संख्या 

(७) नागरिकांची सनद आहे किंवा

(८) माहिती अधिकाकाराचे बोर्ड आहेत किंवा नाहीत

(९) नोटीस बोर्ड आहे किंवा नाही

(१०) तक्रार पुस्तिका ठेवली आहे किंवा नाही

(११) नागरिकांच्या साठी पिण्याच्या पाण्याची सोय आहे किंवा नाही

(१२) बैठक व्यवस्था आहे किंवा नाही

(१३) फायर सिलिंडर नूतनीकरण केले आहे किंवा नाही

(१४) प्राथमिक उपचार पेटी आहे किंवा नाही

(१५) साधी प्रलंबित प्रकरणे किती आहेत

(१६) अरधनयायीक प्रलंबित प्रकरणे

(१७) आवक टपाल संख्या

(१८) जावक टपाल संख्या

(१९) कार्यालयात स्वच्छता आहे किंवा नाही

(२०) प्रसाधन गृह स्वच्छ आहे किंवा नाही

(२१) महिलांच्या विषयी लैंगिक अत्याचार समिती बोर्ड आहे किंवा नाही

(२२) सेवा पुस्तिका व गोपनीय अहवाल लिहिले आहेत किंवा कसे

(२३) अधिकारी व कर्मचारी यांनी ओळखपत्र परिधान केलेलयाची संख्या

(२४) तक्रार पेटी आहे किंवा नाही

(२५) माहिती अधिकारातील कलम ४ मधील १ ते १७ मुद्द्यांची माहिती लावली आहे किंवा नाही

(२६) काम करत असलेले अंशकालीन कर्मचारी यांची संख्या

(२७) मोबाईलवर व्यस्त असणारे लोकसेवकाची संख्या कारयासन नुसार

(२८) कार्यालयाचा मेल आय डी व संपर्क क्र बोर्ड आहेत किंवा नाहीत

(२९) आपले सरकार पोर्टल वरिल प्राप्त तक्रारी संख्या

(३०) अशिक्षितासाठी मदतनीस आहेत किंवा नाहीत

(३१) वर्तणूक बाबत शेरा चांगली बरी अतिउतकृषट खराब वाईट. एकदम वाईट

(३२) व्यक्तिगत अर्जाची स्थिती बाबत दिनांक व त्यावरील कारवाई

(३३) नागरिकांसाठी योजना बोर्ड

(३४) लाभार्थी यादी

(३५) लाभार्थी निकष तक्ता

(३६) वार्षिक लेखा परीक्षण अहवाल

(३७) कार्यालयास प्राप्त अनुदान

(३८) अनुदान विनियोग तक्ता

(३९) निलंबित कर्मचारी व अधिकारी यांची संख्या

(४०) लाचलुचपत विरोधी सापळा प्रकरणांवर मंजुरी

(४१) कार्यालयीन प्रमुखाकडे प्रलंबित प्रकरणे संख्या

जिल्हाधिकारी / निवासी उपजिल्हाधिकारी / प्रांत आॅफिस/ तहसिलदार/नायब तहसीलदार / मंडल अधिकारी/ तलाठी

(४२) माहिती अधिकार दिन साजरा केला जातो किंवा नाही

(४३) वार्षिक विवरण पत्र जमा केलेल्या कर्मचारी संख्या

(४४) वार्षिक विवरण पत्र जमा न केलेलें कर्मचारी संख्या

(४५) ३ अपत्या बाबतचे विवरण पत्र स्टॅम्प

(४६) मासिक मिटींग मध्ये चर्चा झालेले विषय सूची

(४७) फायर आॅडट रिपोर्ट

(४८) माहिती अधिकार अधिनियम २००५ मधील कलम ४(१/१७) मुद्द्यांची माहिती मागील १० वर्षांची

(४९) लोकशाही दिनात समाविष्ट प्रकरणे व निकाली प्रकरणे

(५०) म. से. व. नियम १९७९ कलम १९ मोठ्या रक्कमेची वस्तू खरेदीसाठी वरिष्ठांची परवानगी प्रकरणे

(५१) अभ्यास दौरे याबाबत कार्यालयीन टिप्पणी

(५२) माहिती अधिकारांचे प्रशिक्षित अधिकारी/ कर्मचारी संख्या

(५३) शासनाच्या शासकीय वाहनांचे लाॅगबुक (प्रवासाची रोजनिशी) 

(५४) शासकीय इमारत देखभाल दुरुस्ती /वस्तू खरेदी साठी मंजुरी प्रकरणे व खर्च तपशील

(५५) शासकीय वाहनानुसार मेंटेनन्स दर्शविणारे रजिस्टर

(५६) शासकीय वाहनांचे काम संपलेवर पार्किंग कुठं होते

(५७) सर्वात महत्त्वाचे हालचाल रजिस्टर नोंदी

(५८) प्रत्त्येक कर्मचाऱ्यांची पात्रते प्रमाणे आसन व्यवस्था आहे का? 

(५९) कंत्राटी कामगार संख्या. आणि त्यांची वेतन व्यवस्था काय कामाच्या जबाबदार्या

(६०) शासकीय कर्मचारी यांची दैनंदिन तपशील

(६१) डेड सटाॅक रजिस्टर

(६२) कपाटे खुर्ची कॅमपुटर. बयानर. कपाटे 

(६३) धनादेश नोंदवही

(६४) जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र नोद वही 

(६५) डाक मुद्रांक मागणी तपशील व वापरलेले मुद्रांक नोंदवही

(६६) लोकसभा विधानसभा राज्य सभा. विधानसभेस तारांकीत प्रश्न उत्तरे तपशील

(६७) समित्या नेमणूक व त्यांचे निकष

(६८) समिती सदस्यांची नावे व त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे

(६९) समित्यांच्या बैठका तपशील व इतिवृत्त पुस्तिका

(७०) मुदतीनंतर नष्ट केलेल्या कागदपत्रांची यादी

(७१) वार्षिक टेंडर ( निविदा ) व प्रकिया नोंदवही व निकष

(७२) वार्षिक मंजूर निविदाची यादी व त्याचा देखभाल दुरुस्ती कालावधी

(७३) अमानत रक्कम नोंदवही

(७४) शासकीय समारंभ व त्याचा खर्चाचा तपशील 

             वरील प्रमाणे सर्व शासनाने शासकीय कार्यालय सुरू करताना कोणत्या पध्दतीत राबविणे अंमलबजावणी. केली पाहिजे ते तत्व घालून दिले आहे आपण शासकीय कार्यालयात जातो बघतो आणि न आपले काम करताच येतो 

            समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५८

आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये आत्ता आपल्या अर्थव्यवस्थेची महत्वाची बाब समजली जाणारी ती म्हणजे रस्ते विकास

आपल्या तालुक्यात चालू असणारे सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेमार्फत रस्त्यांची कामे यांची माहिती विचारा

चालू रस्त्याचे काम पद्धत. अनुदानित रक्कम. कोणत्या योजनेतून रस्ता काम चालू. ठेकेदार इंजिनिअर नाव. दोष आणि दायित्व कालावधी. ही माहिती आजच माहिती अधिकार दाखल करून मागवा

महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तयारीला लागा : धर्मराज साळवे

 


अहमदनगर : संघटित राहण्याला खूप महत्त्व आहे. पक्षाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी संघटीत राहून समाजातील गोरगरीब, तळागाळातील नागरिकांसाठी काम करायचे आहे. तसेच महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, असे प्रतिपादन ए. आय. एम. आय. एम. चे पश्चिम महाराष्ट्रातील प्रवक्ते धर्मराज साळवे यांनी केले. खासदार व प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील, प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गफ्फार कादरी यांच्या सूचनेनुसार ते नुकतेच नगर येथे आले होते. येथील शासकीय विश्रामगृहावर पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीत साळवे बोलत होते. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अकील मुजावर यांनी याबाबत एक समितीची स्थापना करून त्या समितीतील पदाधिकाऱ्यांना अहमदनगर येथे पाठवले होते. अहमदनगर येथे होणाऱ्या यापुढील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी तयारी करावी तसेच वारंवार वरिष्ठांशी चर्चा करावी. कार्यकर्त्यांना याबाबत वरिष्ठ पातळीवर सहकार्य केले जाईल, असेही या समितीतील शब्बीर शाह यांनी म्हटले आहे. यावेळी एम. आय. एम. अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष डॉ. परवेज अशरफी यांनी साळवे व शाह यांचा सत्कार करून त्यांचे स्वागत केले. तसेच वर्षभरातील संघटनेच्या माध्यमातून केलेल्या कामांचा अहवाल सादर केला. याप्रसंगी डॉ. परवेज अशरफी म्हणाले की, येणाऱ्या महानगरपालिका तसेच जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या नगरपालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू आहे. जिल्ह्यात कार्यकर्त्यांचे संघटन मजबूत करण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. समाजातील गोरगरीब नागरिकांच्या अडचणी सोडविण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून सुरू आहे. शिवाय, संघटनेच्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी शासन दरबारी निवेदनाच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस पक्ष संघटना मजबूत होत आहे. खासदार असदुद्दीन ओविसी यांना मानणारा युवा वर्ग पक्षासोबत जुळत आहे, असेही डॉ. परवेज अशरफी यांनी सांगितले. शेवटी साळवे व शाह यांनी अहमदनगर येथे डॉ. परवेज अशरफी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या कामांबाबत समाधान व्यक्त केले. तसेच सर्वांनी डॉ. अशरफी यांना पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही साळवे यांनी केले.यावेळी 

पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते साळवे, शब्बीर शाह, एम. आय. एम. जिल्हाध्यक्ष डॉ. परवेज अशरफी, जिल्हा महासचिव जावेद शेख, मुफ्ती अल्ताफ अहमदनगरी, शेवगाव तालुका अध्यक्ष युसुफ शेख, शहर युवा अध्यक्ष अमीर खान, जामखेड तालुका अध्यक्ष जाकिर काझी, कर्जत तालुका अध्यक्ष डॉ. अन्सार शेख, राहुरी तालुका अध्यक्ष नविद बागवान, समाजसेवक उबैद बागवान, शहर युवा प्रवक्ता बशीर शेख शहर युवा महासचिव इम्रान हुसेन आदी उपस्थित होते. डॉ. परवेज अशरफी यांनी उपस्थितांचे आभार मानले.


आपली भाषा. आणि आपले मत

 


आपली भाषा आणि आपले मत

                लिखित भाषा कथित भाषा. सांकेतिक भाषा असे भाषेचे ज्ञान आहे. नेपाळी. असमिया. बंगाली. गुजराती. बोडो. डोंगरी. कन्नड. काश्मीरी. मराठी. उडिया. संस्कृत. तमिळ तेलुगू मल्याळी. सिंधी. सामान्य भाषा. बोली भाषा. विभाषा. राष्ट्रभाषा. राजभाषा. साहित्याची भाषा. कृत्रिम भाषा. संपर्क भाषा. अश्या विविध माध्यमातून आपण आपल्या मायबोली भाषेचा वापर करत असतो 

  भाषा हे इतरांशी संपर्क साधण्याचे व आपले विचार व्यक्त करण्याचे साधन आहे. पण आपली भाषा ही आपल्या व्यक्तीमत्त्वाचाच म्हणून म्हणतो तसं जणू एक भाग असते. आपण लहाणपणापासून आपल्या भाषेच्या सहवासात राहतो. वाढतो त्यामुळे सवभाषेशी आपल्या मनाचे अतूट नाते निर्माण होते. कारणं आपण आपल्या सवभाषेतून आपले विचार आपण प्रभावी पणे मांडू शकतो. त्या भाषेतील प्रतिमा शब्दप्रयोग हे सहजपणे आपल्या पचनी पडलेले असतात. एक साहित्यिक आणि सांस्कृतिक प्रपंच त्या भाषेशी जोडली गेलेली असते. म्हणूनच आपल्या भाषेबद्दल आपल्याला नैसर्गिक जवळिक वाटते. सवभाषेबधदल आपल्या मनात खोलवर निष्ठा असते. परभाषिक प्रदेशात राहतात. वावरताना आपले सवभाषाप्रेम जास्त पक्के बनते. आपण आपली भाषा बोलणारी मंडळी शोधू लागतो. त्यांच्या सहवासात राहतो. एकत्र अणि एकाच वसाहतीत राहतो. सवभाषिक व्यक्ति भेटली की व परभाषिका देखील आपण चटकन आपल्या भाषेत बोलतो. सवभाषेबधदलचे प्रेम इतर मार्गांनी व्यक्त होते. उदा. आपण सहसा इतर भारतीय भाषा शिकत नाही. अगदी परप्रांतात राहवे लागले तरी कामापुरती आपण तेथील भाषा शिकतो पण आपली भाषा मायबोली विसरत नाही. हा आपल्या भाषेबद्दल आपला अभिमान असतो. अन्यथा मात्र मराठी माणूस तमिळ शिकला किंवा कन्नड. आसामी शिकला अशी उदाहरणे विरळच. इतर भाषेचे स्वरूप त्यांची लिपी त्या भाषेमधील साहित्यिक यांच्याबद्दल आपल्याला काही माहिती नसते. आणि त्याची माहिती असावी असे आपणांस वाटत नाही खरेतर आपला सवभाषिमान हा इतर भाषाबधदल आपल्या पूर्वग्रह अज्ञानावर आधारित असतात

              विशिष्ट भाषा ही आपण विशिष्ट धर्मियांशी जोडून टाकतो. उर्दू ही मुस्लिम भाषा किंवा पंजाबी ही शिख लोकांची भाषा असे आपले समिकरण असते. किंवा उत्तरेकडील सर्व लोक हिंदी भाषिक असतांत असाही समज असतो. आपली भाषा सोडून इतर भाषा मागासलेल्याच आहेत असेही आपण मांनतो. मराठी माणूस हिंदीची ही टवाळी करतो आणि दक्षिणात्य भाषाविषयी त्याला पूर्वग्रह असतो. गुजराती. मारवाडी. या भाषा आपण नुसत्याच व्यापारी भाषा समजतो. असे सर्वच भाषिकांचे होते. दक्षिण भाषेमध्ये आपसात जणू काहीच फरक नाही असे धरून आपण त्याची टिंगल करतो. परभाषेविषयी सुप्त आक्रस काही वेळा या पूर्वग्रहाचया पाठीशी असतो. तसेच भाषेबरोबर येणारा प्रांतिक अभिमान हेसुद्धा परभाषा द्वेषाचे कारणं असते. तामिळ लोकांबद्दल किंवा मल्याळी लोकांबद्दल असणार्या रागामुळे आपण त्यांच्या भाषा निकालात काढतो. परप्रांतीया बद्दल. दुरावरावयामुळे. आणि स्पर्धेमुळे त्यांच्या भाषाविषयी आपल्याला सहानुभूती वाटत नाही

      भारतीय भाषा बद्दल असा दुरावा असला तरी इंग्रजी भाषेला आपण वेगळं माप लावतो. ती परकी भाषा आहे असे आपण फारसं मानत नाही. पण उर्दू भाषा परकी आहे ती मुस्लिम धर्माची आहे तर त्याबद्दल आपल्या मनात एवढा राग का ? आपण इंग्रजी सारख्या परक्या भाषेला जागतिक भाषा किंवा ज्ञानभाषेचा दर्जा देतो एकंदरीत इंग्रजी भाषेबद्दल आपल्या मनांत भावना मोठ्या गंमतीचया असतात. या भाषेबद्दल काय भुमिका घ्यावी याबाबत आपला नेहमी गोंधळ उडतो. परकी भाषा म्हणून तिची हकालपट्टी करावी की स्पर्धेत टिकून राहण्यासाठी ती भाषा आत्मसात करावी याबद्दल आपली भूमिका द्विधा असते. मात्र आपल्या समाजात इंग्रजी भाषेला प्रतिष्ठा आहे. देशी भाषापेक्षा इंग्रजी साहित्य. वर्तमानपत्राते. इत्यादी अधिक दर्जेदार आहेत. अशी आपली समजूत असते. इंग्रजी येणार्याला. बरेच काही समजत असणार असे आपण गृहीत धरून चालतो. त्यामुळे कटाक्षाने इंग्रजी शिकणारा. इंग्रजी बोलणारा. इंग्रजी वाचणारा. असा वर्ग आपल्या समाजात निर्माण झालेला दिसतो. इंग्रजी मुळे या वर्गामध्ये आत्मविश्वास आणि अहंगंड निर्माण झाला आहे. या वर्गातील लोक गप्पाही इंग्रजी भाषेतच मारतात. आणि आपल्या भावनाही इंग्रजी भाषेत व्यक्त करतात. घरात कुटुंबियांनी एकामेकाशी इंग्रजीत बोलणे हा या वर्गाचा एक मुख्य गुणधर्म असतो. त्यांच्या दुसर्या टोकाला इंग्रजी नीट न येणारा मोठा जनसमुदाय असतो. पण त्यालाही हे आंगलभाषावरचसव. मान्य असल्यामुळे आपल्याला इंग्रजी येत नाही म्हणून तो नयुनगंडाने पछाडलेला असतो. इंग्रजी न येणे तोही कमीपणाचं मानतो. मग तोडकमोडक इंग्रजी बोलन वाचन. किंवा इंग्रजी शब्द वापरण्याची सवयी लावून या नयुनगंडाची भरपाई करण्याचा प्रयत्न केला जातो. कित्येक वेळा इंग्रजी विषयीचे प्रेम सवभाषाविषयीचे. सवभाषाप्रेम मात करते किंवा खरे तर अनेक जण इंग्रजी भाषेला आपली भाषा मानतात

          भाषेप्रमाणे आपल्याला आपल्या प्रदेशांचा अभिमान असतो. त्या त्या प्रदेशांचा निसर्ग तिथली संस्कृती. प्रादेशिक इतिहास. कला विज्ञान. हे सर्वच आपल्या अभियानाचा विषय असतात. म्हणूनच आपली महाराष्ट्रीय किंवा उडिया किंवा बंगाली अशी खास प्रतिमा तयार होते. बहुतेक वेळा हि प्रादेशिक अस्मिता भाषेवरील निष्ठेची सलगनता असतें. भाषेखेरीज या प्रादेशिक अस्मितेचे प्रगटीकरण होते ते आपल्या इतिहासातून आपल्या प्रदेशात वीरश्री. स्वातंत्र्य प्रेम. धाडस. कल्पकता. यासारखे गुण कसे आढळतात हे आपण ऐतिहासिक दाखलयानिशी दाखवून देत असतो. या इतिहासाचा तपशिल आपल्याला फारसा ज्ञात नसतो. पण इतिहासाच्या ढोबळ प्रतिमा आपला प्रदेशभिमान घडविण्यास पुरेशा असतात. मुघल सत्तेशी आपणच टक्कर दिली असा अभिमान मराठी माणूस बाळगतो त्यातूनच मग त्या त्या भागातील ऐतिहासिक व्यक्ती या प्रादेशिक अस्मितेची प्रतिके बनतात महाराष्ट्र म्हणलं की शिवाजी महाराज हा आपल्या प्रदेश अभिमानाचा अविभाज्य घटक आहे भाग आहे. तीच गोष्ट महाराणा प्रताप बाबतींत किंवा इतर वीरपुरुष संत समाजसुधारक या सर्वांच्या बाबतीत घडते या प्रादेशिक अस्मिते मध्येही इतर प्रदेशापेक्षा आपण श्रेष्ठ आहोत अशी धारणा आपणा मध्ये घर करून बसली आहे

          समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

रेशन आणायला जाताय का?

 

रेशन आणायला जाताय का?
              गोरगरीब जनतेला सवलतीच्या दरात अन्न धान्य मिळावे. व त्यांचा अन्न धान्याची गरज मिठावी यासाठी शासनाने दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना रास्त भावात सवलतीच्या दरात अन्न धान्य पुरविण्याची योजना. १/ जून १९९७ पासून अंमलात आणली. त्यानंतर तिहेरी शिधापत्रिका योजना १ मे १९९९ पासून राबविण्यात आली. आय आर डि पी. चया १९९७/१९९८ या यादीमध्ये समाविष्ट होण्यासाठी त्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न. १५००० निश्चित करण्यात आले होते. अंत्योदय अन्न योजना १ मे २००१ मध्ये राबवण्यासाठी शासनाने तत्परता दाखवली. यानंतर. ९/९/२००८ अन्वये राज्यातील विडी कामगार. पारधी. कोल्हाटी. या मागास प्रवर्गासाठी व कुटुंबासाठी शासन निर्णय. २९/९/२००८/१२/२/२००९ अन्वये समाजातील. विधवा महिलांसाठी. परित्यक्ता. निराधार. अशा विविध घटकांसाठी बी पी एल शिधापत्रिका. १७/१/२०११ चे शासन निर्णयात गोरगरीब मागास यांना न्याय व हक्काचे अन्न धान्य मिळण्यासाठी शासन निर्णयात सुधारणा करण्यात आली १७/३/२००९ अन्वये. राज्यात कामगारांनी आपल्या हकक व अधिकार यासाठी संप केला आणि त्यांचे पडसाद म्हणून विविध. कापड गिरण्या. सुत गिरण्या. साखर कारखाने. यामधील कामगारांना त्याची अन्न धान्य याची गरज भागावी यासाठी शासनाने. पिवळी शिधापत्रिका. याचा तात्पुरता लाभ देणयाचा निर्णय घेतला. 
              शासन विविध माध्यमातून सर्वसामान्य जनता जगविण्यासाठी प्रयत्न करत आहे पण काही सामाजिक समाज कंठक यांना रेशन दुकान मंजूर झाले होते ते तो कोणत्या ना कोणत्या शासन अधिकारी व कर्मचारी यांना हाताला धरून मंजूरी दिली जाते मग काय या दुकानाचा उपयोग पैसा मिळविण्याचे साधन म्हणून केला जातो. मग विविध. कारणे सांगून गोरगरीब जनतेचा हक्क मारला जातो. आपण शिधापत्रिका धारक आहोत त्याप्रमाणे आपणांस विशिष्ट हकक व अधिकार दिले आहेत 
(१) काही कारणास्तव आपले अन्न धान्य चालू महिन्यात आपण आणू शकलो नाही तरी घाबरायचे कारण नाही तोच अन्न धान्य आपण पुढच्या महिन्यात सुध्दा आणू शकतो
(२) बी पी एल व अंत्योदय अन्न धान्य महिन्यात केंव्हाही चार हप्त्यात आणू शकतो
(३)! रेशन खरेदी करताना आपण घेतलेल्या वस्तूंची पावती मिळालीच पाहिजे. त्यावर रेशन दुकानाचा नंबर असणे गरजेचे आहे
(४) एकाच दिवशी एकच पावती फाटली पाहिजे असा कोणताही नियम नाही. म्हणजे. आपण रेशन अन्न धान्य आणायला गेला काही कारणास्तव म्हणजे पैसे कमी पडले आणि आपण त्याच दिवशी सकाळी सोडून संध्याकाळी रेशन आणायला गेलो तर रेशन दुकानदार एका दिवशी दुसरी पावती फाडता येणार नाही असे सांगता येणार नाही
  पावती
(५) रेशन आणताना आपणास जेवढ्या वस्तू पाहिजेत तेवढ्या वस्तू आपण खरेदी करू शकतो
(६) राॅकेल मिळणार नाही असे रेशन दुकानदार सांगू शकत नाही
(७) शिधापत्रिका सवताकडे घेण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार रेशन दुकानदारांना नाही
(८) रेशन दुकान रोज सकाळी चार तास आणि संध्याकाळी चार वाजता चालू ठेवले पाहिजे असा नियम आहे
(९) आठवडा बाजार दिवशी रेशन दुकान उघडणे बंधनकारक आहे
(१०) रेशन दुकान एका दिवसांपेक्षा जास्त दिवस बंद असेल तर ग्राहक त्या दुकानांचा फोटो काढून वरिष्ठांकडे तक्रार दाखल करू शकतो
(११) रेशन दुकानात. स्पष्ट दिसेल असे वाचता येईल असे. माहिती फलक / सुट्टीचा दिवस / दुकान नंबर/ तक्रार वही / रेशन कार्यालयाचा पत्ता / फोन नंबर/ रेशन कार्ड संख्या /बी पी एल कार्ड संख्या दुकानांत लावलेली असावी /
(११) रेशन दुकानदार. धमकी / धाक / दांडगेशाही. / करत असेल नाहक न पटणारी कारणें सांगत असेल तर ग्राहक तक्रार दाखल करू शकतो
(१२) आपली तक्रार लिहून त्याखाली नाव/ पत्ता / सही / अंगठा / अशी पूर्तता करून दाखल करावा
(१३) आपल्या गावात आपण रेशन घेतो पण रेशन दुकानदार आपणास आपल्या रेशन मालाची पावती दिली जात नाही
(१४) तक्रार वही न देणें अदखलपात्र गुन्हा आहे
(१५) ग्रामीण भागात ग्रामपंचायत दक्षता समिती नेमू शकते या समितीचा सदस्य सचिव तलाठी असतो. ही समिती रेशन दुकानदारांवर धाड टाकणे. वेळ पडल्यास टाळे लावू शकते 
(१६) रेशन दुकानदारांच्या तक्रार वहित पाच किंवा त्यापेक्षा जास्त तक्रारी नोद झाल्यास रेशन दुकानदाराला १५ हजार दंड होऊ शकतो
        आज आपणांस समजदार होणे जागृत होणे भ्रष्टाचाराच्या विरोधात उभे राहणे. चोरांना चाफ लावण्यासाठी एकत्र येऊन. रेशन हक्क आहे माझा. त्यावर कोणत्याही समाजकंटकांचा अधिकार नाही. आपले कोणतेही प्रकरणं संबंधित पुरवठा विभागात प्रलंबित असल्यास चौकशी करा. का ? कशासाठी ? काय म्हणून ? याची विचारणा करा. आपल्या व प्रलंबित प्रकरणासाठी अधिकार व कर्मचारी यांनी काही आर्थिक मागणी केल्यास संबधिता विरोधात. जवळच्या पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करा 
      समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
रूग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९
x

बेघर बेघर

 


बेघर बेघर 

              आपणांस किती किळसवाणा वाटणारा शब्द आहे. शासनाने सर्वांना स्वताचा हक्काचा निवारा मिळावा यासाठी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचा सर्वे २००५ साली करण्यात आला होता तो सर्वे करताना. निरपेक्ष दारिद्र्य. सापेक्ष दारिद्र्य. अशा तत्वावर करण्यात आला होता. हि समिती. सुरेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली २ डिसेंबर २००५ साली नेण्यात आली होती. त्यानंतर. २००८ साली एन सी सक्सेना यांच्या अध्यक्षतेखाली दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचा सर्वे करण्यासाठी पुन्हा समिती नेमण्यात आली. आणि सर्वात पहिल्यांदा. १९७६ साली सर्वात पहिली दारिद्र्य रेषेखाली कुटुंबाचा सर्वे झाला होता आणि करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. सदन आणि निर्धन या तत्वावर आधारित दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचा सर्वे करण्यात आला होता. पण त्यात मोठ्या प्रमाणात गोलमाल करण्यात आला होता तो गोलमाल स्थानिक स्वराज्य संस्था. नेते पुढारी व त्यांचे बगलबच्चे यांनी केला

            त्यावेळी झालेला दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचा सर्वे हा गृहभेट देवून घेण्यासाठी शासनाने निर्देश दिले होते. पण. ग्रामीण भागातील सरपंच उपसरपंच सदस्य. व रेशन दुकानदार यांच्या एका जागेवर बसून दिलेल्या माहितीनुसार करण्यात आला. अमुक असा तमुक तसा. अशी आपली लोक आगोदर दारिद्र्य रेषेखाली समावेश करण्यात आला. सर्व माहिती ज्याची खरी परस्थिती होती त्यांची खोटी सांगण्यात आली. तसेच शहरी भागातीसाठी. नगरसेवक शासकीय अधिकारी व यांनी सुध्दा शासनाला कोणाच्याही दारात न जाता सर्वे आपल्या मनाप्रमाणे करून आपले कार्यकर्ते बगलबच्चे यांची नावे आगोदर घातली आणि गोरगरीब यांच्यावर तेव्हा झालेला अन्याय ही जनता अजूनही भोगत आहे. रेशन अन्न धान्य यापासून लोक वंचित राहिली. शासनाच्या विविध घरकुल योजना यापासून वंचित राहिली. शासनाच्या लहान लहान उद्योग व्यवसायासाठी असणारे विविध अर्थसहाय्य योजना यापासून खरोखरच दारिद्र्य रेषेखालील लोक वंचित राहीली. अपंग निराधार विधवा अशी लोक यापासून वंचित राहिले यासाठी कारणीभूत आहेत ते म्हणजे आपण आपल्या मताने निवडणून दिलेली आपलीच लोक. यापासून जे काय शिल्लक राहिले ते रेशन दुकानदार यांनी लोक रेशन अन्न धान्य आणायला गेले की हीत सहि करा असे करुन आम्हाला दारिद्र्य रेषेखालील रेशनकार्ड याची गरज नाही रेशन अन्न धान्य या योजनेतून आम्ही बाहेर पडत आहोत. आमच्यापेक्षा गरिब लोकांना अन्न धान्य योजनेचा लाभ व्हावा या अर्जावर लोकानी केव्हा सह्या केल्या लोकाना कळलंच नाही. आणि पुढच्या महिन्यात रेशन अन्न धान्य बंद झाल आपण विचारणा केली असता. तुम्ही सह्या केल्या आहेत त्यामुळे तुमचं नाव दारिद्र्य रेषेखालील यादीतून वगळण्यात आले. अशी फसवी आणि उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. नाव वगळण्यासाठी सर्वे कधी झाला माहित नाही. मग नाव गेली कुठं ? 

            २००५ साली झालेल्या दारिद्र्य रेषेखालील सर्वे चां आधार घेऊन व तळागाळातून खरी आणि सापेक्ष माहिती आली असे ग्रहित धरुन केंद्र सरकारने *बेघर *ही संकल्पना अमलात आणली. बेघर म्हणजे ज्याला कोठेही त्याच्या नावावर जागा नाही. शेती नाही. शासकीय नोकरी नाही. त्याचे उत्पन्न मर्यादित आहे. अशा लोकांच्या साठी बेघर घरकुल योजना राबविण्यात आली. त्यानुसार. २५० चौ मिटर. घर. शासनाच्या निधीतून संबंधित ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांच्या देखरेखीखाली घरकुल पूर्ण तयार करून म्हणजे. हाॅल. बेड. किचन संडास बाथरुम. अशी रचना पूर्ण घर तयार करून लाभार्थी व्यक्तिंना देण्यात येते लाभार्थी व्यक्तिने फक्त जाऊन राहायचे आहे. त्यात प्रामुख्याने (१) प्रधान मंत्री आवास योजना (२) रमाई आवास योजना (३) राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना (४) शबरि आवास योजना (५) इंदिरा आवास योजना (६) वाल्मिकी आवास योजना (७) अशा विविध योजना बेघर लोकांच्यासाठी राबविल्या जातात. त्यात प्रामुख्याने प्रधान मंत्री आवास योजना ही योजना केंद्र व राज्य सरकार यांच्या संगनमताने चालते. ज्यांच्याकडे घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध आहे त्यांना. ३३० चौ मिटर बांधकाम करण्यासाठी अथवा घर दुरुस्ती करण्यासाठी बांधकाम करण्यासाठी. २५० लाख. व दुरुस्ती साठी. १५० लाख. अशा स्वरुपात घराचे बांधकाम टप्प्यात आले की टप्पे बघून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर अनुदान हप्ता वर्ग केला जातो. या योजनेत सुध्दा मोठ्या प्रमाणात बोगस प्रकार झाला आहे. ज्यांच्याकडे घर आहे त्यांनी सुध्दा याचा लाभ उचलला आहे. तर याउलट ज्यांचे बांधकाम पूर्ण झाले व्याजाने पैसे काढून. सगेसोयरे यांचेकडून उसने पासने करून. बॅक कर्ज काढून. त्यांचे आज घर पूर्ण आहे पण त्यांना घरकुल योजनेचा हप्ता अजून आला नाही. काही जणांनी चांगले राहते घर पाडले आणि भाड्याच्या घरात राहिले ते भाडे भरून मेले. तरि त्यांचे घर अपुरेच राहिले. म्हणजे घरकुल योजनेचा सर्वे करणारे यांची काहीतरी चूक होत आहे. 

      २००५ चा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचा सर्वे नुसार ज्या कुटुंबाकडे सवताचे जगाच्या पाठीवर कुठेही घर नाही यासाठी बेघर योजना राबविण्यात आली. आत्ता मल एक सांगा जगात कोठेही घर किंवा जागा नसणारा आभाळातून पडला पाहिजे. कारणं त्यांच्या वडिलाचे घर असेल जागा असेल शेत असेल ते वारसाहक्काने मुलाला मिळणारं मग तो बेघर कसा ? तो कोणत्या योजनेत बसतो ? मग योजना सुरू करताना शासनाचे काहितरी चुकले काय ? शासनाचा निर्णय बेघर वसाहतीत घर बांधण्यासाठी निर्णय आला. २००५ ला झालेला दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचा सर्वे आपणास माहीत आहे कसा व कोणत्या निकषांवर झाला. मग काय प्रत्त्येक जण ज्याचे नाव दारिद्र्य रेषेखाली आहे तो बेघरासाठी अर्ज करायला लागले. ग्रामीण भागात सुध्दा घरकुल योजना सुरू झाली 

              बेघर वसाहत मधील घरे बांधून पूर्ण झाली. आत्ता याचे लोकार्पण करण्यासाठी नेते पुढारी यांचे राजकीय डाव रंगले आमच्या सत्तेत झाले आम्ही उद्घाटन करणार. मग. लकी ड्रॉ काढण्यात आला आणि फक्त गिलावा. दरवाजे नाही. फरशी नाही. संडास बाथरुम अपुरे पाणी नाही. लाईट नाही. अशी घर. १५०००/२०००० माणसी भरुन वितरित करण्यात आली. याला आपणच कारणीभूत आहोत कारणं शासन सांगत पूर्ण झालेली घरे ताब्यात द्या म्हणजे सर्व सोयी सुविधांनी युक्त असे. पण. मला मिळेल का ? तुला मिळेल ? मिळतय तवर घ्या बाकीचे सर्व काम आपण करू ? अशी आपली धारणा झाली. 

                अपूर्ण असणारी बेघर वसाहतीतील घरे लोकानी ताब्यात घेतली. आणि मग काय. उंची टप दराची फरशी. फॅन्सी दरवाजे. फॅन्सी कलर. पी ओ पी. अशी नजर न थांबण्यासारखी घरे काचची असल्यासारखी तयार केली. आज जर एकादा शासनाचा अधिकारी व कर्मचारी यांनी जर ह्या घरांचा सर्वे केला तर व शासनाचे सुध्दा डोळे उघडतील आणि २००५ साली काय गोलमाल झालं याचं पितळ उघडे पडेल. त्यातला एक वेगळाच प्रकार आहे तो म्हणजे बेघर वसाहती मध्ये असे काही लोक आहेत त्यांच्या नांवाने बेघर घरकुल वितरण झाले आहे पण आजतागायत ती व्यक्ति त्या घराकडे फिरवली सुध्दा नाही. काहीजणांनी तर आपल्याला मिळालेली बेघर घर चांगला मोबदला घेऊन विकली आहेत. काही जणांनी आपल्या बेघर घरकुल मध्ये भाडोत्री ठेवले आहेत. तर काहीजणांनी ना अर्ज ना शासनाची फी न भरता मिळेल तेथें आपले ठाण मांडून बसले आहेत कोण विचारणार. एका घरांत वडिलोपार्जित घर असून सुद्धा घरातील प्रत्येक सदस्याला बेघर घरकुल मध्ये घर आहे ते कसे ? म्हणजे घर तयार आहेत राहण्यास लोक नाहीत. असा झाला २००५ चा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचा सर्वे

          वरिल कोणत्याही प्रकाराबद्दल विचारणा केली असता आम्हाला असे सांगण्यात आले की २००५ चे आगोदर या लोकाची परस्थिती बिकट होती पण आत्ता ते सदन आहेत. त्यांना आत्ता बेघरांची गरज नाही तर यांच्याकडून. आत्ता सापेक्ष पणे सर्वे करून घर काढून घ्या. आज सुध्दा खरोखरच गरज असणारे लोक झोपडीत राहतात. असाच जर सर्वे होत राहिला तर आपण आणि आपला भारत कधीच झोपडपट्टी मुक्त होणार नाही.  

              शासनाला विनंती आहे की आपण आपल्या स्तरावर ज्या ज्या गावात तालुका जिल्हा यामध्ये बेघर वसाहती आहेत तेथें न भ्रष्टाचार करणारे अधिकारी व कर्मचारी याची नेमणूक करून सापेक्ष पणे सर्वे करून खरोखरच लाभार्थी असतील त्यांना बेघर घरकुल योजनेतून घर देण्यात यावे. 

     समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

बीजगणित आणी इस्लाम

 



इस्लामची बीजगणित (Algebra)अंकगणित (Mathematics)त्रिकोणमिति(Trigonometry) वर चर्चा.


अल - ख्वरिजमी (इ. स. ७९५ ते ८४७) याला जगभरात बीजगणित (Algebra) याचा जनक मानले गेले आहे अबू जफर मोहम्मद बिन मुसा अल ख्वरिजमीने अंकगणित (Mathematics) बीजगणित भूमिती आणि त्रिकोणमिति(Trigonometry) वर भरपूर लिखाण केले.जगात पहिल्यांदाच या गणित आणि भूगोल शास्त्रज्ञाने एक-दोन-तीन.... दहा, अशा शब्दात लिहिल्या जाणाऱ्या संख्यांना अंकाचे म्हणजे 1,2,3,4,5.......10 चे रूप दिले. हे अंक अरेबिक अंक(Arabic Numerals) म्हणून ओळखले जातात जगातील सर्व भाषिकांनी थोडेफार बदल करून याच अंकाचा आपल्या भाषेत समावेश करून घेतला आहे.


काही भाषांतर सर्रासपणे अरबिकचे वर दिलेल्या अंकप्रमाणे त्यांचे इंग्रजी रुपांतर वापरतात व त्यांना असे वाटते की हे अंक आकडे ब्रिटिशांनीच योजिले आहे.अल खवारीजमी संख्या शास्त्र संशोधन करताना दिलेल्या संख्या मिळवण्यासाठी विशिष्ट संख्येला तिनेच कितीदा गुनावे लागले तर अपेक्षित संख्या मिळेल याची माहिती दिली. ह्या प्रक्रियेला गणिताच्या भाषेत लोगरीदम(Logarithm) म्हणतात. लोग रिदम हे  अल खवारिजमी यांच्या नावानेच इंग्रजीकरण आहे. या गणित प्रक्रियेचे उदाहरण म्हणजे १०= १०×१०×१० = १००० म्हणून १००० चा ३ हा लोग होय.अल ख्वारिजमिने अनेक पुस्तके लिहिली भूगोल आकारिक "सूरतुल अर्द", खगोल विज्ञान कविता "किताबूल जिज़" इतिहासा कविता "किताबुत तारीख" वगैरे त्याच्या अनमोल ग्रंथांची नावे आहेत.


त्यांच्या सर्वात महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे " किताबुल मुख्तसर फिल हिसाब वल जब्र" हा होय. 

ह्या ग्रंथात त्यांनी बीजगणिताची जगाला ओळख करून दिली आहे. या शास्त्राचे संपूर्ण नाव त्यांनी "अल जब्र वल मुकाबला " असे आयोजिले आहे.जब्र म्हणजे अंकाचे पून: स्थापनेच्या सहाय्याने हिशोब लावणे किंवा विस्कळीत अंकांना सुसंगत करणे आणि जमा - बाकीवर नजर ठेवणे हे होय. त्यांनी प्रथमच अंकाचे मूल्य व त्यांचे स्थान ठरविले.व्याख्येत नाम भारतीय संगणक तज्ञ पद्मश्री डॉक्टर विजय भटकर यांच्या मते अल खावरिजमी ने जर संख्यांचे अंगी आणखी करण केले नसते तर आज संगणक, इंटरनेट, मोबाईल फोन, डिजिटल साहित्य इत्यादी यासारखी उपकरणे अस्तित्वात च आलीच नसती.


पुस्तक संदर्भ : मोहम्मद पैगंबर साहेबांनी मानव समाजाला काय दिले?

लेखक : अनिस चिस्ती

पोस्ट : फिरोज शेख (अहमदनगर)

गंज. वाळवी

 


गंज. वाळवी

               सर्वांच्या परिचयाचा आसणारा. हा शब्द आपणास बरेच काही सांगून जातो. सर्वात मजबूत कठीण वस्तू मग ती लोखंड. लाकूड. व अन्य वस्तू यांना निकामी बरबाद करण्याची क्रिया म्हणजे गंज होय. चांगलयातलया चांगले हत्यार.माणसामधये. असणारे विचारात. आचार. यांना सुध्दा आज गंज चढला आहे वाळवी लागली आहे. म्हणजे जीवन बरबाद होणारं जगण्याची इच्छा उमेद संपणार आणि माणसांचे जीवन नरकमय होणार आहे. जगणं झालं सोप मरण झालं महाग असा प्रकार येथून पुढे होणार आहे. 

                 मोघल बादशहा आणि मोघल शासन यांनी २५० वर्षे आपणावर राज्य केले शासन केले याचे कारण आहे ते म्हणजे आपल्याला आपल्या स्वातंत्र्याचा कधी विचारच पडला नाही. आहे असं जगा. चाललंय चालू द्या. सगळ्याच होईल ते माझे होईल. हा सर्वात मोठा आपल्या मनाला लागलेला गंज चढला आहे. लाकडाला ज्या प्रमाणे वाळवी आतून खाते आणि लाकडाचा राहतो तो म्हणजे वरचा भाग तसं आज आपलं जीवन मत. पोकळ झाले आहे. मोघल सत्ता संपली आणि व्यापार करण्याच्या उद्देशाने भारतात पहिला इंग्रज आला तो वास्को द गामा. गेट आॅफ इंडिया. म्हणजे आपले तोंड येथून आत आले उदेश काय होता फक्त व्यापार. आपल्यातील मसाले व मसाल्याचे पदार्थ यांची आपल्यातून निर्यात होण्यास सुरुवात झाली. आणि हे व्यापारी येताना. चहा घेऊन आले. त्यावेळी भारत सोन्याची चिडीया होती. मुबलक पाणी मुबलक जमीन. अन्न व धान्य पुष्कळ. दुध दुपते. खाण सकस. विना औषध विना केमिकल. श्रेष्ठ भारतीय संस्कृती. आचार विचार. सामाजिक सलोखा. वैयक्तिक मतभेद नाही. जातीभेद होता पण थोड्या प्रमाणात. आपल्यात असणारे मंदिर लेणी. गड. दर्या खोरि. पठारे. जंगले. बारमाही वाहणारी नदी. आणि समाजाला एका साखळीत बांधणारे समाजसेवक. क्रांतिकारी. असा भारतीय इतिहास असणारा आमचा भारत. इंग्रज येताना चहा घेऊन आले. आपल्यातील लोकांना चहा माहिती होता पण एवढ्या मोठ्या प्रमाणात माहिती नव्हता. मग हे व्यापारी लोक. हातगाडी वरून फिरून चहा विकत असत. लोकांना या या चहा घ्या. असं म्हणत असतं. कारणं लोकांना चहाची सवय नव्हती. आणि या चोरांच्या प्रयत्नाला यश आले आणि भारतीय लोकांना चहाची एवढी मोठी सवय लागली की लोक चहाची गुलाम झाली. चहासाठी पडेल ते काम करायला लागले. आणि या प्रदेशातून व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते शासन कर्ते बनले. यावेळी सुध्दा आपल्या मनाला विचाराला लागलेला गंज चढला होता त्यामुळेच आपण १५० वर्ष गुलाम म्हणून राहिलो. आज आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये दवाखाने कमी आहेत पण चहाची दुकानें ए सी. तयार करण्यात आली आहेत. म्हणजे गंज वाईट आहे वाळवी आपल्या मनाला लागली आहे

            समाजसेवक. क्रांतिकारी. उठाव करणारे. आंदोलन कर्ते. यांनी काही काळ आपल्या मनाचा. विचारांचा. संस्कृती. यांचा गंज झाडला आणि. गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला. काही जणांचे जीव गेले. काही जणांची कुटुंब रस्त्यावर आली. काहीजणांना मरणयातना देण्यात आल्या. जाळपोळ. लुट. अब्रुचा लिलाव. काही जणांचे पाय हात तोडले. अशी भयानक प्रकार बघून आणि ऐकून आपल्या अंगावर काटा आला तर खरंच ज्यांनी भोगल त्यांचं काय. या सर्वांच्या त्यागाला. १५/ आॅगसट १९४७ रोजी यश आले आणि आपला भारत देश स्वतंत्र झाला. सर्वांना फार मोठा आनंद झाला. की आपण आपल्या मनाप्रमाणे वागू. आपणांस स्वतंत्र मिळाले. पण झालं उलट. आपण गुलामगिरी मध्ये होतो तो काळ चांगला होता. महागाई. शिक्षण बाजार. आर्थिक विषमता. जातीयवाद. गुंडगिरी. दहशतवाद. अशी कोणतीही भिती आपल्या मनात नव्हती. रोजगार करणारे पोटापुरते काम होते. कुटुंब जगत होतें. म्हणजे एकंदरीत गुलामगिरी मध्ये कोणीही उपाशी राहत नव्हते. कारणं आपण त्यावेळी आपल्या मनाला विचाराला लागलेला गंज झाडला नाही आणि तशी गरज भासली नाही

             स्वतंत्र भारतात. राजकीय पक्ष नेते पुढारी सत्ता बिपासू लोक यांचीही निर्मिती झाली. कारणं स्वतंत्र मिळाले आणि जागोजागी राजकीय पक्ष तयार झाले. सरपंच. नगरसेवक. आमदार. खासदार. मंत्री. याची लोकांना अशा सुटली. आणि मग काय मतदान ही संकल्पना अमलात आली. लोकांनी लोकांच्यासठी तयार केलेले राज्य म्हणजे लोकशाही असे लोकांच्या मनात बसविण्यात आले. मतदान. त्यात पैशांचा वापर. गुंडगिरी. दहशतवाद. मतदारांना धमकी देणें. उचलून नेणे. मतदानासाठी मटन दारू याचा वापर. आपसात जातीयवाद. सामाजिक तेढ. भांडणे. दंगली. जाळपोळ. इत्यादी साधनांचा वापर पहिल्यापासूनच आहे. आत्ता हे आपणास नवीन नाही. मतदारांना सुध्दा या गोष्टीची सवय झाली. वरिल प्रमाणे आपण सर्व बघतो पण याबाबत आवाज. आंदोलन करत नाही माझा नेता नाराज होईल म्हणून. हे कारणं नाही कारणं आपल्या मनाला आणि संस्कृती विचार आचार यांना गंज चढला आहे.झाडा नाहीतर गुलाम परकयानी केल होत आत्ता आपण आपल्या आपण निवडून दिलेल्या लोकांच्या गुलामगिरी मध्ये मरावे लागेल. आपली पिढी सुध्दा गुलामच जन्माला येणार आणि गुलामच होऊन मरणार. मोठा आणखी मोठा होणार आणि गरिब गरिबच राहणार ज्या देशात आदर नाही. जगण्याचे साधन नाही. खाण्यास अन्न नाही पिण्यास पाणी नाही. शिक्षणाचे साधन नाही. अशा ठिकाणी राहून काही उपयोग नाही. अशा ठिकाणी कोणताही जीव आपली प्रगती करु शकणार नाही. असे गाव तालुका जिल्हा राज्य देश सोडून जाणे फायदेशीर आहे. जिथे वेदपाठक ब्राम्हण. श्रीमंत लोक. चांगला दयाळू राजा. राहण्यास योग्य जागा. वैद्यकीय सेवा सुविधा. उपचार मिळत नसतील अशा ठिकाणी राहून कुठलेही सुख मिळणार नाही. अशा देशात राहणे व्यर्थ आहे. दुःख जरुर मिळणार. मित्र अशा ठिकाणच्या लोकांशी केले जावे ज्ञ जिथे भीती. लाज. चातुर्य. त्याग. अशा सवयी आवश्यक असतील. ज्या देशात लोकांत गुण नसतील त्या देशात गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये राहणें व्यर्थ आहे. तिथे राहून कुठलाही पुरुष कुटुंब जनसमुदाय पुढ जावू शकत नाही कारण यांच्या मनला व हकक अधिकार विचार आचार संस्कृती याला गंज चढला आहे 

                २०२० कोरोना काळ आपण सर्वांनी भोगला आहे. उपासमारी. डबल दराने मालाची विक्री. शाळा बंद. बॅक मनमानी कारभार. टाळेबंदी. जमावबंदी. जिल्हा बंदी. गाव बंदी. हाताला काम नाही त्यामुळे हातात पैसा नाही. अशी एक नाही दोन नाही अनेक वाईट अनुभव आपणांस आलें आहेत. एका नेत्याच्या. पुढारी. यांना आपणच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री केले. आणि शासनाचे नोकर म्हणजे जिल्ह्याचा माय बाप माणले जाणारे मा जिल्हाधिकारी सो यांच्या व राजकीय संगणमताने. एका सहिने जिल्हा गाव तालुका. बंद होतो. म्हणजे आपणांस आपले मत. विरोध. करण्याचा अधिकार आहे का ? नाही. कारणं आपल्या मनाला हक्क व अधिकार. सत्ताधारी यांची भीती. अशा विविध गोष्टींचा गंज चढला आहे त्यामुळे आपण मूरदाड झालों आहे. 

              सर्वात मोठा गंज चढला आहे तो म्हणजे. विविध शासकीय निमशासकीय संस्था कार्यालय. विविध कल्याणकारी मंडळे. विविध समाजकल्याण आॅफिस. ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद तहसिलदार. नायब तहसिलदार. पुरवठा विभाग. विविध निराधार विधवा वयोवृद्ध महिला पुरुष. यांच्यासाठी विविध कल्याणकारी योजना. यामध्ये लोकांनी आपल्या विविध मागण्या. तक्रार अर्ज. व विविध प्रकारचा पत्र व्यवहार. याला कोणतेच उत्तर मिळतं नाही आज सर्वच शासकीय कार्यालयात हजारों अर्ज धुळखात पडले आहेत. आपण याची कधीच चौकशी करत नाही अधिकारी व कर्मचारी यांना कधी जाब विचारत नाही. वरिल सर्व विषयांबाबत एखादा समाजसेवक जो खरोखरच समाजसेवक उपोषण. बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको इत्यादी आंदोलन तो त्याच्या बरोबर सर्वांसाठी करत असतो पण आम्ही त्याला घटनास्थळी पाठिंबा सुध्दा देत नाही. कारणं आमच्या मनालाच गंज चढला आहे. आम्हाला काय करायचं आहे ? ‌. ही आपली मानसिकता आहे. 

       रेशन दुकानदार रेशनचे अन्न धान्य व्यवस्थित व रास्त देत नाही. काही फसवी कारणे सांगून आपला हक्क मारतो पण आम्ही कांहीच करू शकत नाही कारणं आम्हाला गंज लागला आहे. बांधकाम कामगार यांची दलाल एजंट समाजसेवक यांच्याकडून कल्याणकारी योजना मिळवून देतो म्हणून होणारी. आर्थिक मानसिक सामाजिक पिळवणूक कामगार आॅफिस मध्ये अधिकारी व कर्मचारी यांचेकडून मिळणारी वागणूक. यांच्या जीववर लाखों रुपये किंमतीची मालमत्ता. नेते पुढारी यांची फसवी आश्वासने. महिला छेडछाड. महिला अत्याचार. महिलांचा घरेलु व समाजाकडून होणारा छळ. मुलींना शाळेत जाताना वाटणारी असुरक्षितता. बचत गटांच्या नावाखाली राजकारण. वरील सर्व प्रकार आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहत असतो पण आपण कधीच याबाबत आवाज उठवला नाही कारणं आपणांस फार मोठा गंज चढला आहे. 

       माणूस दोनच ठिकाणी आपले हात जोडतो एक देव ज्याने जन्माला घातले आणि दुसरा म्हणजे डॉ ज्याकडे जीवन वाचविण्यासाठी. पण आज या रोगी सेवा ईश्वर सेवा. याच फक्त आणि फक्त पैसा मिळविण्याचे साधन झाले आहे. उपचार पद्धती कोणती निवडण्याचा अधिकार आहे. पेशंट बरा होत नसेल तर दवाखाना बदलण्याचा आपणास अधिकार आहे. उपचारासाठी काय दर आकारले हे विचारण्याचा अधिकार. दवाखान्यात रूग्ण हक्काची सनद लावली आहे का. धर्मादाय अंतर्गत उपचार करणारे दवाखाने व त्याची माहिती सांगणारे मदतनीस दवाखान्यात आहेत का. औषध खरेदी करण्यासाठी मेडिकल निवडण्याचा अधिकार आपणांस आहे. ज्या डॉ कडे उपचार घेतला आहे त्यांच्याच दवाखान्यात असणार्या मेडिकल मध्ये औषध घेणे बंधनकारक नाही. आजपर्यंत जेवढी सर्वात मोठी आंदोलने झाली आपण सर्वांनी बघितली पण आजतागायत औषधांच्या किमती साठी कोणीही आंदोलन केले नाही आज करण्याची गरज आहे

पण आपण करत नाही कारण आपणांस गंज लागलाय

        ‌‌. माहिती अधिकार कायदा २००५ शासकीय निमशासकीय कार्यालयात चालणारे सर्व हितांचे. भ्रष्ट कामकाज. २/३/२००८ रोजी तयार नागरिक सनदेनुसार सर्वसामान्य जनतेला तपासणी पडताळणी चौकशी करण्याचा अधिकार आहे. माहिती अधिकार दाखल करणार्या कार्यकर्ते यांचेवर जीवघेणे हल्ले. माराहान. कार्यालय फोडणे. कुटुंबाला वेठीस धरणे. आपण वृतमापत्रात वाचतो दूरदर्शन वर बघतो आणि विसरून जातो. आज जो कोणी माहिती अधिकार दाखल करत असेल तर त्याला आपला सहयोग द्या. त्याला लढण्यासाठी हिम्मत द्या हौसला द्या. पण आपण देत नाही उलट पैशासाठी माहिती अधिकार दाखल केला असेल असं मत व्यक्त करतो आणि सर्व विसरून जातो कारणं आपणांस गंज लागला आहे आपला काहीच उपयोग होणार नाही

         जरा बदल करा आणि आपला गंज झाडा आणि नव्याने कामाला लागा कोणाला देऊ नका कोणाला घेऊन देवू नका. गैरप्रकार घडत असेल तर आवाज उठवा 

          समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

कुंपण कुंपण

 


कुंपण कुंपण

                आपणा सर्वांना परिचयाचा असणारा शब्द आहे.  शेतीचे अथवा  जागा. विहीर बोअर. घराला. व अन्य कोणत्याही ठिकाणी की जिथे चोरी होण्याची भीती असणार्या भागाला करण्यात येणारी संरक्षण भिंत म्हणजे कुंपण होय. 

                  माग वळुन जरा बघा. ग्रामीण भागात सर्वात सुरवातीला वस्ती ही संकल्पना अमलात होती. त्यांनतर लोकसंख्या वाढली आणि वस्तीचे रुपांतर वाड्यामध्ये झाले. लोकं एकत्र समुह करून राहण्यास सुरुवात झाली त्यांच्यामागे कारणं होतें एकी. आणि एकामेकांचे संरक्षण वाडीचे रुपांतर गावांत झाले. आणि गावांत सुखसोयी भांडणतंटे. शुभ अशुभ कार्य. न्यायनिवाडा. सामाजिक. आर्थिक शैक्षणिक संरक्षण देण्यासाठी लोकांच्या मधून समाजहितासाठी समाजसेवक नेमण्यात आले.  यांच्यामुळे लोकांना संरक्षण मिळण्यास मदत झाली. त्यावेळी गावांत कोणताही व्यक्ति. कोणत्याही कारणासाठी येणारं असेल तर त्याला. #. गावाच्या वेशीवर असणाऱ्या. #. त्या समाजसेवकाना भेट देऊन आपण कशासाठी काय प्रयोजन घेऊन गावांत आलो आहे हे सांगून परवानगी घेऊन मगच गावांत दाखल होता येत होते.      आलेल्या व्यक्तिचा हेतू. पूर्वी गाव मागायला बैतकरी येत असत.  पिंगळे. वासुदेव. कडकलक्ष्मी वाले.  असे विविध समाजातील लोक येत असत  समाजातील लोकांना फायदेशीर असेलतरच त्याला गावांत प्रवेश देण्यात येत होता.  अन्यथा त्याला गावाच्या वेशीवर रोखले जात होतें.  

      आत्ता ग्रामपंचायत राज अमलात आले. ग्रामपंचायत अधिनियम १९५९ आणि त्याचवेळी झालेल्या सुधारणा व ग्रामपंचायत लेखासहिता २०११ व अन्य संलग्न कायदे यांच्या प्रभावी अंमलबजावणी साठी व ग्रामपंचायतींचे कामकाज सुरळीत व लोकाभिमुख व्हावे यासाठी शासन वेळोवेळी शासन निर्णय शासन आदेश व परिपत्रके काढत असते. ग्रामपंचायत राज अमलात आले आणि निवडणूक. दहशतवाद भ्रष्टाचार. गुंडगिरी. राजकीय दबाव मतदारसंघ निर्मिती. राजकीय नेते पुढारी बगलबच्चे यांचें गावागावात ठाण मांडून बसणे. यांना कोणताही रोखठोक नाही.  गावाला कसलही कुंपण नाही. कुणीबी या कवाबी या. यामुळे जनजीवनाला धोका निर्माण होण्यास सुरुवात झाली लोकांचे जीवन कष्टमय झाले. 

             गावांत. पोलिओ डोस सर्वे.   मतदार नोंदणी.  जनगणना नोंदणी.  बालक सर्वे.  गरोदर मातांचा सर्वे.  विधवा निराधार. ६५ वर्षापूढील वयोवृद्ध.  विविध आरोग्य शिबीर.  स्वच्छता.  विविध शासकीय अंगणवाडी.  बालसुधारगृहात. बालमजुरी वर रोख.  समाजहितासाठी योजना.  महात्मा गांधी रोजगार हमी योजना.  वन संवर्धन.  असे एक नाही अनेक योजना ग्रामपंचायत. पंचायत समिती जिल्हा परिषद. यांचेकडून. जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार राबविल्या जातात.  वरिल सर्व सर्वे साठी येणारे अधिकारी व कर्मचारी हे शासनाने जरी पाठविले असले तरी ग्रामपंचायत परवानगी शिवाय गावांत जावून सर्वे करू शकत नाहीत. म्हणजे शासनाचे चालणार सर्व काम नियमानुसार चालते.  याचा अर्थ असा होतो की गावाला सर्व अनिष्ट परिणाम यापासून वाचविण्यासाठी शासनाने प्रयत्न केला आहे आणि त्याची अंमलबजावणी ग्रामपंचायत त्यांच्या स्तरावर करतं आहेत. असेच. तालुकास्तरीय सुध्दा कामकाज चालते.  तसेच जिल्हा स्तरीय कामकाज चालतें. राज्य. व देश यांच सुध्दा कामकाज शासन निर्णयानुसार नियमानुसार चालतें.  म्हणजे सर्व स्तरांवर जनतेचे हित जोपासले जाते.  हाच त्यामागचा उद्देश असतो. 

                आज आपणांस असे पहावयास मिळत नाही. कारणं. गावाच्या मुंडकयावर बसलेले राजकीय भूत. आपसातील मतभेद.  फुटिरता. एकीचा अभाव. अज्ञान अशिक्षित.  व्यसनी पणा. अशा विविध कारणानें आपण मगे आहोत आणि राहणारच.  आज सर्व ग्रामीण. शहरी. भाग हा ठराविक. एल आय सी.  कंपन्या प्रोडक्शन.  जाहिरात.  प्रचार.  विविध शासकीय निमशासकीय योजनांसाठी होणारें मेळावे.   सिमेंट कंपन्या मेळावे.  महिला बचत गट मेळावे.  बांधकाम कामगार योजनांसाठी गावागावात फिरणारे एजंट. संघटना वाले. युनियन वाले.  असे विविध लोक गावागावात आपले दुकान मनमानी दराने चालवत असतात. यांना ग्रामीण भागात ग्रामपंचायत. शहरात नगरपरिषद.  महानगरपालिका.  या क्षेत्रात फिरणारे असे हजारों लोक. सर्वसामान्य माणसाला गोरगरीब लोकांना दिवसाढवळ्या लुटत आहेत.  यांचेवर कोणाचे नियंत्रण नाही का? अशा सर्व लोकानी. गावात. तालुका जिल्हा.  व अन्य ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत प्रवेश केला असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.  कारणं यांनी गावात तालुका जिल्हा यामध्ये प्रवेश करताना संबंधित शासकीय विभाग म्हणजे. ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका. यांचेकडे. त्या त्या भागात कोणताही नोंदणी किंवा अन्य कोणताही मेळावा किंवा कार्यक्रम आयोजित करावयाचा असल्यास त्या त्या विभागाची परवानगी काढणे गरजेचे आहे तशी परवानगी काढली नसेल तर कोणालाही कोणत्याही भागात विनापरवाना घुसखोरी करून देवू नका. आपल्या गावात शहरात तालुका जिल्हा यामध्ये येणारा नविन व्यक्ति किंवा व्यक्ति समूह. मग तो संघटना सेवाभावी संस्था युनियन किंवा कोणताही  राजकीय पक्ष यांना आपल्या संबंधित विभागांची परवानगी शिवाय आपल्या गावात प्रवेश देवू नका.  यापासून आपणच आपले संरक्षण आर्थिक लुट.  समाजातील तेढ.  गटा गटातील भांडणे.  यापासून आपणच आपल्याला वाचवू शकतो 

              समजा आपल्या गावात

नविन कोणी आलं. आपल्या गावातील सर्वात मोठा भाग असतो तो म्हणजे पिण्याचे पाणी.  समजा कोणी नविन आला आणि आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये काय  विषारी औषध टाकलें तर आपणांस केव्हा कळणार म्हणूनच म्हणतो कोणालाही नविन व्यक्तिला आपल्या गावात शहरात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये प्रवेश देवू नका 

         समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

इस्लाम आणी विविध शेत्र

 



इस्लाम ची औषधी व वैद्यकशास्त्र, भूगर्भशास्त्र, खगोलशास्त्र, लेखन शास्त्र, इ. विषयांवर चर्चा.


इस्लामच्या उदयानंतर शिक्षणाच्या क्षेत्रात एक अत्यंत लाभदायक क्रांती घडून आली. सातव्या शतकापासून थेट अठराव्या शतकापर्यंत जगात इस्लामी शास्त्रज्ञांचे नाव गाजत होते. इबनुल हैसंम (इ. स.९६५ ते १०३९) ने अवकाशशास्त्रावर नवनवीन प्रयोग केले. 


त्यांनी प्रथम ह्या सिद्धांताचा शोध लावला की डोळ्यांवर प्रकाश न पडता वस्तूवर प्रकाश पडला तरच त्या दिसतात. नेत्र हे केवळ एक जिवंत यंत्र आहे. त्यात प्रकाश निर्माण करण्याची क्षमता नाही ईबने खलदून (१३३२ ते १४०६) याने इतिहास व समाजशास्त्र सारख्या अनोळखी विषयांवर जबरदस्त संशोधन करून लिखाण केले ईबने सीना (बुअलीसिना = Avecinna) ई. स. ९८० ते १०३७ चे इस्लामी तत्ववेत्यानमधे अत्यंत उच्च स्थान आहे. 


औषधी व वैद्यकशास्त्र, भूगर्भशास्त्र, खगोलशास्त्र, लेखन शास्त्र, इ. विषयांवर त्यांनी २७६ पुस्तके लिहिली त्यांचे संपूर्ण नाव बू अली अलहुसैन इब्ने अब्दुल्लाह इब्ने सीना असे होते. पर्शियन आणि अरेबिक भाषेत याला बूअली सीना म्हणून देखील उच्चारले जाते. त्यांची दोन  प्रसिद्ध ग्रंथ अलकानून फित तीब (औषधांविषयी फतवे - Canon of Medicine) आणि अश्शिफा (आत्मोपचार Healing of Soul) पैकी अलकानुन ला जगभरात औषधी व उपचाराचे ज्ञानकोश समजले जाते. 


इब्ने सिनाने औषधविज्ञान,शरीरशास्त्र औषध निर्मिती शास्त्र, औषधालय प्रशिक्षण, रोगांची चिन्हे रोग निदान शास्त्र, यासारखे विषयावर सविस्तर माहिती दिली आहे. सदर ग्रंथाचे युरोप खंडात मध्ययुगीन काळात ८७ वेळा अनुवाद करण्यात आले.युरोपियन विद्यापीठातून हा ग्रंथ तब्बल ६०० वर्षापर्यंत पाठ्यपुस्तक म्हणून वापरला गेला. 


त्याने आपल्या संशोधनाने व लिखाणाने असंख्य पाशचात्य विद्यवानाना व विचारवंतांना प्रभावित केले. त्यापैकी रॉजर बेकन, अल्बर्ट मॅग्नस, डून स्कॉट्स, रीने डिस्काट्रेस, स्पिनोझा आणि बर्गासा उल्लेखनीय आहेत सेंट थॉमस अेकविनोस ने आपला ग्रंथ "सुम्मा थिओलोजिया" मध्ये एकूण 400 वेळा इब्ने सिनाचा उल्लेख केला आहे.


पुस्तक संदर्भ : मोहम्मद पैगंबर साहेबांनी मानव समाजाला काय दिले?

लेखक : अनिस चिस्ती

पोस्ट : फिरोज शेख (अहमदनगर)

चौथा स्तंभ - पत्रकारीता

 


चौथा स्तंभ - पत्रकारीता

                    आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना राजकारण आपल्यापर्यंत आणून पोहचविण्यासाठी वर्तमानपत्र. आकाशवाणी. दूरचित्रवाणी. पत्रकार. वार्ताहर यांचाही मोठा वाटा आहे. या साधनाप्रमाणे एकाच वेळी खूप मोठ्या संख्येने लोकाशी संपर्क साधला जातो. म्हणूनच त्यांना * सामूहिक संपर्क माध्यमे * असं म्हणलं जातं 

         आपणं जर रोज वर्तमानपत्र उघडून पाहिले की त्यात देशातील राजकीय. सामाजिक. आर्थिक. धार्मिक. जातीय. घडामोडींची माहिती मिळते. एकाच घटनेबद्दल वेगवेगळ्या नेत्या पुढारी. यांची वेगवेगळी मतें. कशी वेगळी आहेत हे आपणांस समजावून सांगण्यासाठी संपर्क माध्यमांचा वापर केला जातो. शिवाय ह्या अशा विविध बातम्या प्रकाशित करणार्या वर्तमानपत्राला स्वताच्या एक दृष्टिकोन असतो. त्याचा प्रभाव वर्तमानपत्राला बातम्यांवर अप्रत्यक्षपणे पडतोच. कोणत्या व घटनेची किती माहिती द्यायची तिला किती महत्व द्यायचे. हे त्या त्या वर्तमानपत्राचया धोरणाप्रमाणे ठरते त्यामुळे आपण जे वृत्तपत्र वाचतो त्याचा धोरणांचा आपल्यावरही थोडाफार परिणाम होतोच वेगवेगळ्या विश्लेषण. करणारे लेख त्या घडामोडींवर भाष्य करणारे लेख. अग्रलेख. हे वर्तमानपत्रे आणखी एक वैशिष्ट्य या लेखांमधून अधिक तपशीलवार माहिती आपल्याला मिळते. लेख आणि अग्रलेख यामधून अधिक स्पष्टपणे विशिष्ट मतांचा आणि दृष्टीकोणाचा पुरस्कार केला जातो. त्यामुळे लोकांना एखाद्या विशिष्ट विचारांकडे आकर्षित करण्यात किंवा राजकीय कृतीला उधुकत करण्यात काही वेळेला वर्तमानपत्राचा मोठा वाटा असतो. वर्तमानपत्रातील काही बातम्या वाचून आपण अस्वस्थ होतो. किंवा आपल्याला राग येतो वेगवेगळे पक्ष यांच्या बद्दल आपल्या मनात ठराविक प्रतिभा तयार होतात कित्येक वेळा आपल्या मनातील काही मतांना वर्तमानपत्रामुळे पुष्टि मिळून आपले मत विचार पक्के होण्यास मदत होते. वर्तमानपत्राप्रमाणे मत प्रसाराचे कार्य छोट्या पुस्तिका. पत्रके यांच्याद्वारे केलं जातं. एखाद्या विशिष्ट विषयांची थोडक्यात आणि सोप्या भाषेत ओळख करून देण्यासाठी चळवळीत काम करणारे कार्यकर्ते अशा पुस्तिका पत्रके. तयार करतात. एखाद्या कार्यक्रम किंवा आंदोलन यांचीही माहिती करून देण्यासाठी पत्रकाचा वापर केला जातो

        अर्थात वरिल सर्व माध्यमांचा उपयोग फक्त वाचण्यासाठी होतो. त्यामानाने आकाशवाणी दूरदर्शन ही माध्यमे जास्त लोकांपर्यंत पोहचू शकतात. दूरचित्रवाणी याचा फारसा प्रसार झाला नव्हता त्या काळी आकाशवाणी हेच मोठं आणि प्रभावशाली माध्यम होतें. बातम्या आणि इतर कार्यक्रम या प्रसार माध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोहोचविले जात. दूरदर्शनच्या प्रसारामुळे आता माहिती ऐकत असतानाच संबंधित तपशील आपण पाहूसुधदा शकतो. त्यामुळेच दूरदर्शन हे संपर्काचे सर्वाधिक प्रभावी माध्यम मानलें जाते दूरदर्शन आणि आकाशवाणी या माध्यमाचा नुसत्या बातम्या देण्यासाठीच उपयोग होतो असे नाही. इतर रंजक कार्यक्रमा. मार्फत विचार माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा. माहिती पट. किंवा लघुपट अशा मार्गांनी प्रतयक्ष दृश्याचा मदतीने आपण अनेक घडामोडी समजून घेऊ शकतो. तंत्रज्ञान जसजशी प्रगती होते. स्वातंत्र्य पूर्व काळात लोकसंपर्क पद्धत बदलत जाते. स्वातंत्र्य पूर्व ध्वनी क्षेपनासारखया सोयी जिथे नसतील तिथे वक्त्याला मोठ्याने ओरडून बोलणयाऐवजी. गत्यंतर नसते. त्याउलट आत्ता आधुनिक तंत्रज्ञान मुळे मोठ्या नेत्यांचे भाषण ध्वनिफिती रिक्षातून वाजवून सुध्दा प्रचार केला जातो. अलिकडच्या काळात याबाबतीत झालेला आणखी एक बदल म्हणजे चित्रफितीचा/ व्हिडिओ कॅसेट्स/ प्रचारासाठी उपयोग या नव्या साधनांमुळे मोठे नेते ज्या गावांना भेटी देऊ शकत नाहीत तेथें त्यांच्या भाषणाच्या चित्रफिती परिणामकारक उपयोग केला जातो आणि जास्तीत जास्त जनसमुदायाला प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जातो

              सामाजिक किंवा राजकीय समस्यांची. चर्चा करणारी नाटके तसेच चित्रपट हे सुद्धा आपल्या राजकीय सामाजिकरणाला चालना देत असतात. रंजक पध्दतीने मांडणी केल्यामुळे आपण अशा माध्यमाकडे ओढले जातो आणि अधिक तन्मयतेने त्यातील आशय समजवून घेण्याचा प्रयत्न करतो. अलिकडच्या काळात मुद्दाम राजकीय सामाजिक जागृती करण्याच्या हेतूने देशाच्या विविध भागात पथनाटयाची चळवळ उभी राहत आहे. एखाद्या विषयांबाबत सरकारवर दडपण आणण्यापेक्षा लोकांना जागे करणे ज्यांना अधिक महत्वाचे वाटते. असे आंदोलक पथनाटयाचया मार्गाचा वापर लोकांच्या भाषेत सुटसुटीत स्वरूपात. चौका चौकात नाट्य विषकार सादर करून पथनाट्य द्वारे लोकांना समस्यांची जाणीव करून दिली जाते तसेच राजकीय कृतीला उधुकतही केले जाते

          आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये चालणारे चांगलें वाईट बातम्या काम सर्वसामान्य माणसाला कानाकोपऱ्यात संपर्क माध्यमांच्या माध्यमातून कळावया यासाठी संपर्क माध्यमांचा उगम झाला पण आज समाजातील सर्वच प्रसार माध्यमे. बोगस आहेत असे नाही. यातील काही माध्यमाच्या संपर्क माध्यमांचे काम. अजून सुद्धा गर्व निर्माण करणारे आहे. पण काही संपर्क माध्यमांच्या नावाखाली फक्त पैसा मिळविण्याचे साधनं मानलं जातं आहे हे वाईट आहे. 

                  समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा 2013 रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

9890825859

माणूस असे नाव

 


माणूस असे नाव

                  देवाने सर्वात हुशार आणि सुंदर बुध्दिमत्ता असणारा. वेळ येईल तसा वागणारा प्राणी तयार केला त्याला माणूस असे नाव.

      माणसाला जन्मापासून सुख दुःख चांगले वाईट. सकारात्मक नकारात्मक. कसे गुण आहेत त्यातला सर्वात महत्वाचा गुण आहे तो म्हणजे विसरायचा. आपल्या जीवनात चांगल्या वाईट घटना गोष्टी आपण लवकरच विसरतो आणि आपल्या कामाला लागतो म्हणजे. आपले सगेसोयरे मृत्यू पावलेल्यास एक ठराविक वेळेपर्यंत आपण दुःख पाळतो आणि त्यांना आपण विसरून जातो. शासकीय योजना यामध्ये अधिकारी व कर्मचारी यांचेकडून झालेला मानसिक त्रास. झालेली आर्थिक लूट आपण लवकरच विसरतो. कामगार कल्याण योजना. अपंग योजना. निराधार. वयोवृद्ध यांच्यासाठी असणार्या योजना यासाठी होणारी फसवणूक आपणं लवकरच विसरतो 

                कोरोना सारखे महाभयंकर महामारी संकटाने थैमान घातले होते टाळेबंदी जारी करण्यात आली होती. लोक घरातच जीव वाचवण्यासाठी अडकून पडले होते. उपाशीपोटी राहून पण शासन सांगेल त्या नियमानुसार जगत होती. त्यावेळी आपल्यावर झालेला अनयाय. मग तो शासनाचा असो अथवा टाळेबंदी काळाचा फायदा उचलणारे. भाजी पाला विक्री करणारे. दुध. अन्न धान्य विक्री करणारे. किराणा दुकानदार यांची मनमानी पद्धतीने घेण्यात आलेला दर. पोलिसांचा मार मास्क साठी होणारी अडवणूक.टाळेबदी काळात वेळेचा फायदा घेऊन जादा व्याजदराने कर्जपुरवठा करणारे लोक. वेळेचा पुरेपूर फायदा घेऊन टाळेबंदी काळात पैसाच मिळवला काही लोकांनी याचवेळी. ग्रामीण भागात शहरी भागात महानगरपालिका क्षेत्रात कर्मचारी व अधिकारी यांच्या सर्वसामान्य जनता यावर केलेला मनमानी व्यवहार आपण सर्वजण हे सर्व विसरून जातो कारणं माणूस याच नाव

              कोरोना काळात कोणीही उपाशी राहू नये यासाठी शासनाने विविध अन्न धान्य योजना सुरू केल्या गोरगरिबांसाठी पण रेशन दुकानदार व पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे लागेबांधे असल्यामुळे खरोखरच उपाशी असणार्या लोकांना काहीच मदत नाही एका बाजूला जनता. टाळेबंदी मुळे उपाशी मरत होती त्याचवेळी आपल्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी टनाने बोगस तांदूळ सापडत होता कुठुन आला ? शासकीय गोदाम मधून गाड्या विकल्या नसतील कशावरून राईस मिल वाल्यांना. टाळेबंदी काळात रेशन दुकानदार यांनी रेशन अन्न धान्य आल नाही ? नाव दिसतं नाही ? थम उठत नाही ? यापेक्षा वेगळ म्हणजे टाळेबंदी काळात जेव्हा या रेशन दुकानदार यांची जनतेला गरज होती त्यावेळी रेशन दुकानदार यांनी विमा कवच मिळावे यासाठी बंदचा इशारा दिला होता. याचवेळी जे जे दुकानदार संपावर जाणार आहेत त्यांचे दुकान लाईन्स रद्द केले पाहिजे होते. टाळेबंदी काळात काही रेशन दुकानदार यांचे परवाने रद्द केले अशी बातमी प्रसिद्ध झाली खरोखरच ती दुकाने आजही बंद आहेत का ? रेशन साठी वाटप करण्यासाठी शासनाकडून आलेल्या अन्न धान्य मध्ये. आजही आपल्या जिल्ह्यात हरभरा शिल्लक आहे असं शासननिर्णय सांगतो. म्हणूनच माणूस याच नाव 

                आपल्या जिल्ह्यात परवाचा नाही तर सतत आलेला पूर. या परिस्थितीला आपणच कारणीभूत आहोत. वाढती लोकसंख्या यामुळे निर्माण होणारी रहाण्याची समस्या पण एक महत्वाचं सत्य आहे ते म्हणजे लोकसंख्या वाढली पण जमीन वाढली नाही मग आपणं गावातून बाहेर घर बांधायला लागलो हळूहळू आपण जागोजागी सिमेंटची जंगले उभी केली त्यामुळे जमीनीत जाणारे मुरणारे पाऊसाचे पाणी मुरणे बंद झाले आणि वेळोवेळी महापूर येण्यास सुरुवात झाली. वृक्ष तोड बदलते वातावरण यामुळे अतिवृष्टी होण्यास सुरुवात झाली. परवाचा पूर आपण सर्वांनी बघितला आहे माणस. जनावरें. कुत्री. कोंबड्या. शेती. घर. याच मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. समाजातील काही लोकांनी पूरग्रस्त भागातील लोकांना अन्न धान्य कपडे याची मदत पोहोचविली पण ज्याच्या घरांत पाणी घुसले त्यांचे नुकसान झाले त्यांना मदत मिळालीच नाही. आणि ज्यांच्या दारात सुध्दा पाणी आल नाही त्यांच्या घरात अन्न धान्य मुबलक गेलं. गावातील प्रमुख ज्यांच्याकडे वाटप करायला गेलं त्यांनी आगोदर आपली घर भरली. शासनाने पूरग्रस्त भागातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आणि पंचनामे चालू झाले त्यात सुध्दा गोलमाल झालं ज्याचं घर पडून जमीनदोस्त झाले आहे त्याला काहीच आर्थिक लाभ नाही. आणि ज्यांच्या घराच्या उंबरठ्यावर सुध्दा पाणी नाही त्यांना पूर्ण भरपाई मिळाली. शेती नुकसान भरपाई मिळविण्यासाठी सर्वे करणार्या अधिकारी व कर्मचारी यांना खरोखरच भरपाई मिळावी म्हणून लाच सुध्दा दयावी लागत आहे. पूरग्रस्त भागातील लोकांना मदत म्हणून १० किलो तांदूळ. १० किलो गहू. ५ किलो तुरडाळ. केरोसीन. असे वाटप करण्याचे आदेश शासनाने दिले होते वाटप झाले किती झाले कुणाला माहीत? 

                नगरपालिका बिगूल वाजायला लागले. गाठीभेटी. मिटिंगा. कोपरासभा. मतदार अडचणी जाणून घेण्यासाठी सुरवात झाली. कोरोना काळात टाळेबंदी जारी झाली तुम्ही घरातच अडकून पडला त्यावेळी एकतरी आला होता का ? तुम्ही काय खायाय. जगलाय का मेलाय. बघायला. आत्ताच आपली काळजी यांना का ? लोकांनी आपली मानसिकता बदलाच्या ची गरज आहे कारणं अशा राजकारणी लोकांना माहीत आहे गेल्या वर्षी १००० वाटले आत्ता काय २००० हजार वाटायला लागतील. जनता मूर्ख आहे खुळी आहे मटनाच जेवन दारु. यापुढे सर्व निर्थक आहे. बघा आपली पाच वर्षांची किंमत काय आहे ? विचार निर्णय बदला आपल्या बाजूने जे कोणी उभे राहिले. अडचणी काळात तुम्ही सुद्धा त्यांच्याच बाजूने उभे रहा आपल मत विकू नका रास्त मत रास्त निवड पण आपली एक मानसिकता आहे की आपण सर्वजण हे सर्व विसरतो 

          समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

कोण विचारणार आहे का?

 


कोण विचारणार आहे का? 

               सर्वसामान्य माणसाला ग्रामीण व शहरी भागात शासकीय आर्थिक सामाजिक शैक्षणिक योजनांची माहिती अंमलबजावणी होणेसाठी. शासनाने प्रत्त्येक विभागाकडून एक कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे 

            ग्रामीण भागातील लोकांचा रोजगार हा स्थायी नाही नसतो त्यामुळे त्यांच्या हाताला वर्षभर पुरेसा रोजगार उपलब्ध होत नाही. यामुळे ग्रामीण भागातील नागरिक. हे मागास प्रवर्ग म्हणून ओळखले जातात. आपली रोजगाराची असणारी तुट भरून काढण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांचा रोजगार शोधात. शहराकडे वाढवणारा लोंढा. त्यामुळे. राहण्याचा पिण्याच्या पाणी. शिक्षण अभाव. सामाजिक अस्थिरता. यामुळे वाढती गुन्हेगारी. रोजगार अभाव यामुळे वाढते अवैध धंदे व्यसनाधीनता. असे एक नाही अनेक प्रश्न आज आपल्या पुढे आ वासून उभे राहिले आहेत त्यामुळे तरुण पिढी धोक्यात आली आहे. सर्वांना वर्षभर पुरेसा रोजगार आपल्या गावातच उपलब्ध व्हावा यासाठी 

             शासनाने महाराष्ट्र उधोग उर्जा व कामगार विभागाच्या दिनांक. २५/२/२०१३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार ग्रामीण भागासाठी संजिवनी माणली जाणारी. * महात्मा गांधी रोजगार हमी योजना. * व त्याअंतर्गत रोपवाटिका. घर घर गोठा. गोबर गॅस. वृक्ष लागवड. वृक्षसंवर्धन. लहान लहान बंधारे भरणं. खणण. औषधी वनस्पती लागवड देखरेख. अशी विविध कामे करणार्या कामगारांची नोंदणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात करण्यासाठी स्थापन केलेल्या जिल्हा स्तरीय समन्वय समितीचे पुनर्गठन करणे व तीची कार्यक्षमता वाढविण्यासाठी शासनाने निर्णय घेतला होता 

          वरील विषयास अनुसरून समाजसेवक या माध्यमातून लोकांचा जास्ती जास्त संपर्क असणारे समाजातील. मग ते कोणत्याही प्रवरगातील. असू दे. फक्त तो समाजसेवक कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नसावा. असा शासन निर्णय जारी करण्यात आला होता

              मा जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांचेकडून २०१८ एक परिपत्रक जारी करण्यात आले होते. त्यानुसार ग्रामीण भागात शासकीय योजना प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात करणारे समाज प्रबोधन करणारे समाजसेवक. महात्मा गांधी स्वयंरोजगार हमी योजनेत सदस्य म्हणून निवड करण्याचे पत्रक जारी केले होते 

            बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या सदस्य निवडीसाठी आम्ही संबंधित कार्यालयात. मा जिल्हाधिकारी कार्यालयात ९/१/२०१८ ‌रोजी. निवेदन सादर केले होते. १६/२/२०१८ रोजी इस्लामपूर नगरपरिषद इस्लामपूर यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. १६/२/२०१८ रोजी इस्लामपूर तहसिलदार कार्यालय येथे निवेदन दिले होते. ९/१/२०१८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रोजगार हमी योजना सांगली या विभागात मागणी साठी निवेदन दिले होते. ९/१/२०१८ रोजी समाज कल्याण विभाग सांगली तेथे सदस्य निवडीसाठी निवेदन दिले होते. ९/१/२०१८ रोजी सहायक कामगार आयुक्त भवन विश्राम बाग सांगली येथे सदस्य निवडीसाठी निवेदन दिले होते. युनियनच्या माध्यमातून आजपर्यंत निस्वार्थी पणे फक्त आणि फक्त आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना मनात घेऊन काम करणारे आमच्या युनियनचे संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे यांची निवड करण्यात यावी यासाठी संबंधित ग्रामीण भागातून मागणी करण्यात आली होती. आम्हाला कोणताही राजकीय वरदहस्त नाही. कोणी नेता पुढारी. कोणतेही पैशांचे पाठबळ नाही. जनसमुदाय भरघोस पणे पाठीमागे आहे. फक्त आम्हाला समाजसेवा करण्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजना सदस्य म्हणून निवड करण्यात यावी. 

            बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर ही युनियन कोणत्याही पक्षाला निगडित नसल्यामुळे आमच्या मागणीचा राजकीय दबामुळे विचार करण्यात आलेला नाही. 

    आज जवळपास तीन वर्ष पूर्ण होत आली आहेत पण आम्ही दाखल केलेल्या एकाही पत्राचा आम्हाला लेखी स्वरूपात उत्तर देण्यात आले नाही. तुम्ही आम्हाला सदस्य म्हणून निवडू नका पण का ? निवड करता येणार नाही याचे कारण तरी आम्हाला लेखी कळविणे आपली जबाबदारी आहे आणि तशी शासन तरतूद आहे पण आज कोणत्याही शासकीय आॅफिस मधून निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज यांना कोणतेही लेखी उत्तर दिले जात नाही. ही बाब विचार करण्यासारखी आहे. सदस्य निवड झाली किंवा नाही हे कळविणे गरजेचे होते. त्याठिकाणी कोणाची कोणत्या कागदपत्राने निवड झाली हे सुद्धा सांगणे गरजेचे होते. असा कोणताही पत्र व्यवहार करण्यात आलेला नाही म्हणजे शासनाचा लाखो रुपये पगार घेऊन ए सी आॅफिस मध्ये बसून सर्वसामान्य माणसाला गोरगरीब लोकांच्या पत्राला कचराकुंडी दाखविली काय ? असं आमचंच नाही अशी कित्येक पत्र व्यवहार आज उत्तराची वाट पाहत आहेत त्यांना उत्तर मिळणार का ? यांना कोण विचारणार आहे का ?  

            समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या