Showing posts with label human. Show all posts
Showing posts with label human. Show all posts

माणूस असे नाव

 


माणूस असे नाव

                  देवाने सर्वात हुशार आणि सुंदर बुध्दिमत्ता असणारा. वेळ येईल तसा वागणारा प्राणी तयार केला त्याला माणूस असे नाव.

      माणसाला जन्मापासून सुख दुःख चांगले वाईट. सकारात्मक नकारात्मक. कसे गुण आहेत त्यातला सर्वात महत्वाचा गुण आहे तो म्हणजे विसरायचा. आपल्या जीवनात चांगल्या वाईट घटना गोष्टी आपण लवकरच विसरतो आणि आपल्या कामाला लागतो म्हणजे. आपले सगेसोयरे मृत्यू पावलेल्यास एक ठराविक वेळेपर्यंत आपण दुःख पाळतो आणि त्यांना आपण विसरून जातो. शासकीय योजना यामध्ये अधिकारी व कर्मचारी यांचेकडून झालेला मानसिक त्रास. झालेली आर्थिक लूट आपण लवकरच विसरतो. कामगार कल्याण योजना. अपंग योजना. निराधार. वयोवृद्ध यांच्यासाठी असणार्या योजना यासाठी होणारी फसवणूक आपणं लवकरच विसरतो 

                कोरोना सारखे महाभयंकर महामारी संकटाने थैमान घातले होते टाळेबंदी जारी करण्यात आली होती. लोक घरातच जीव वाचवण्यासाठी अडकून पडले होते. उपाशीपोटी राहून पण शासन सांगेल त्या नियमानुसार जगत होती. त्यावेळी आपल्यावर झालेला अनयाय. मग तो शासनाचा असो अथवा टाळेबंदी काळाचा फायदा उचलणारे. भाजी पाला विक्री करणारे. दुध. अन्न धान्य विक्री करणारे. किराणा दुकानदार यांची मनमानी पद्धतीने घेण्यात आलेला दर. पोलिसांचा मार मास्क साठी होणारी अडवणूक.टाळेबदी काळात वेळेचा फायदा घेऊन जादा व्याजदराने कर्जपुरवठा करणारे लोक. वेळेचा पुरेपूर फायदा घेऊन टाळेबंदी काळात पैसाच मिळवला काही लोकांनी याचवेळी. ग्रामीण भागात शहरी भागात महानगरपालिका क्षेत्रात कर्मचारी व अधिकारी यांच्या सर्वसामान्य जनता यावर केलेला मनमानी व्यवहार आपण सर्वजण हे सर्व विसरून जातो कारणं माणूस याच नाव

              कोरोना काळात कोणीही उपाशी राहू नये यासाठी शासनाने विविध अन्न धान्य योजना सुरू केल्या गोरगरिबांसाठी पण रेशन दुकानदार व पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे लागेबांधे असल्यामुळे खरोखरच उपाशी असणार्या लोकांना काहीच मदत नाही एका बाजूला जनता. टाळेबंदी मुळे उपाशी मरत होती त्याचवेळी आपल्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी टनाने बोगस तांदूळ सापडत होता कुठुन आला ? शासकीय गोदाम मधून गाड्या विकल्या नसतील कशावरून राईस मिल वाल्यांना. टाळेबंदी काळात रेशन दुकानदार यांनी रेशन अन्न धान्य आल नाही ? नाव दिसतं नाही ? थम उठत नाही ? यापेक्षा वेगळ म्हणजे टाळेबंदी काळात जेव्हा या रेशन दुकानदार यांची जनतेला गरज होती त्यावेळी रेशन दुकानदार यांनी विमा कवच मिळावे यासाठी बंदचा इशारा दिला होता. याचवेळी जे जे दुकानदार संपावर जाणार आहेत त्यांचे दुकान लाईन्स रद्द केले पाहिजे होते. टाळेबंदी काळात काही रेशन दुकानदार यांचे परवाने रद्द केले अशी बातमी प्रसिद्ध झाली खरोखरच ती दुकाने आजही बंद आहेत का ? रेशन साठी वाटप करण्यासाठी शासनाकडून आलेल्या अन्न धान्य मध्ये. आजही आपल्या जिल्ह्यात हरभरा शिल्लक आहे असं शासननिर्णय सांगतो. म्हणूनच माणूस याच नाव 

                आपल्या जिल्ह्यात परवाचा नाही तर सतत आलेला पूर. या परिस्थितीला आपणच कारणीभूत आहोत. वाढती लोकसंख्या यामुळे निर्माण होणारी रहाण्याची समस्या पण एक महत्वाचं सत्य आहे ते म्हणजे लोकसंख्या वाढली पण जमीन वाढली नाही मग आपणं गावातून बाहेर घर बांधायला लागलो हळूहळू आपण जागोजागी सिमेंटची जंगले उभी केली त्यामुळे जमीनीत जाणारे मुरणारे पाऊसाचे पाणी मुरणे बंद झाले आणि वेळोवेळी महापूर येण्यास सुरुवात झाली. वृक्ष तोड बदलते वातावरण यामुळे अतिवृष्टी होण्यास सुरुवात झाली. परवाचा पूर आपण सर्वांनी बघितला आहे माणस. जनावरें. कुत्री. कोंबड्या. शेती. घर. याच मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. समाजातील काही लोकांनी पूरग्रस्त भागातील लोकांना अन्न धान्य कपडे याची मदत पोहोचविली पण ज्याच्या घरांत पाणी घुसले त्यांचे नुकसान झाले त्यांना मदत मिळालीच नाही. आणि ज्यांच्या दारात सुध्दा पाणी आल नाही त्यांच्या घरात अन्न धान्य मुबलक गेलं. गावातील प्रमुख ज्यांच्याकडे वाटप करायला गेलं त्यांनी आगोदर आपली घर भरली. शासनाने पूरग्रस्त भागातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आणि पंचनामे चालू झाले त्यात सुध्दा गोलमाल झालं ज्याचं घर पडून जमीनदोस्त झाले आहे त्याला काहीच आर्थिक लाभ नाही. आणि ज्यांच्या घराच्या उंबरठ्यावर सुध्दा पाणी नाही त्यांना पूर्ण भरपाई मिळाली. शेती नुकसान भरपाई मिळविण्यासाठी सर्वे करणार्या अधिकारी व कर्मचारी यांना खरोखरच भरपाई मिळावी म्हणून लाच सुध्दा दयावी लागत आहे. पूरग्रस्त भागातील लोकांना मदत म्हणून १० किलो तांदूळ. १० किलो गहू. ५ किलो तुरडाळ. केरोसीन. असे वाटप करण्याचे आदेश शासनाने दिले होते वाटप झाले किती झाले कुणाला माहीत? 

                नगरपालिका बिगूल वाजायला लागले. गाठीभेटी. मिटिंगा. कोपरासभा. मतदार अडचणी जाणून घेण्यासाठी सुरवात झाली. कोरोना काळात टाळेबंदी जारी झाली तुम्ही घरातच अडकून पडला त्यावेळी एकतरी आला होता का ? तुम्ही काय खायाय. जगलाय का मेलाय. बघायला. आत्ताच आपली काळजी यांना का ? लोकांनी आपली मानसिकता बदलाच्या ची गरज आहे कारणं अशा राजकारणी लोकांना माहीत आहे गेल्या वर्षी १००० वाटले आत्ता काय २००० हजार वाटायला लागतील. जनता मूर्ख आहे खुळी आहे मटनाच जेवन दारु. यापुढे सर्व निर्थक आहे. बघा आपली पाच वर्षांची किंमत काय आहे ? विचार निर्णय बदला आपल्या बाजूने जे कोणी उभे राहिले. अडचणी काळात तुम्ही सुद्धा त्यांच्याच बाजूने उभे रहा आपल मत विकू नका रास्त मत रास्त निवड पण आपली एक मानसिकता आहे की आपण सर्वजण हे सर्व विसरतो 

          समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

वन्य जीवांच्या विश्वात नागरिकांचे अतिक्रमण




              आपल्या कडे भरपूर प्रमाणात वने व जंगले होती सर्वत्र झाडें झुडपे विविध पशू पक्षी जलचर प्राणी. सरपटणारे प्राणी असे विविध जीव आनंदाने आणि गुण्यागोविंदाने नांदत होती सर्वांना खाण्यास अन्न पिण्यासाठी पाणी. राहण्यासाठी आपल्यापरीने घरटी गुहा पाण्याचे जलस्त्रोत होते मोठें प्राणी लहान लहान प्राण्यांना खात होते पण कधीही कोणत्याही प्राण्यांच्या संख्येत घट किंवा वाढ होत नव्हती सर्व निसर्ग नियमानुसार व्यवस्थित चालू होते जर आपण विचार केला तर वने व जंगले. उष्ण कटिबंधातील सदाहरित अरण्ये / उष्ण कटिबंधातील निमसदाहरित अरण्ये / उप उष्ण कटिबंधातील सदाहरित अरण्ये / उष्ण कटिबंधातील आद्र व पानझडी / उष्ण कटिबंधातील मान्सून अरण्ये / उष्ण कटिबंधातील रूक्ष पानझडी अरण्ये / उष्ण कटिबंधीय काटेरी अरण्ये / राखीव वने / संरक्षित वने / अवरगीकृत वने / अति घनदाट खाणज वने / मध्यम दाट खाजण वने / खुली खाजण वने / ताडोबा राष्ट्रीय उद्यान / पेंच राष्ट्रीय उद्यान / गुगामाळ राष्ट्रीय उद्यान / नवेगाव राष्ट्रीय उद्यान / बोरिवली राष्ट्रीय उद्यान / चांदोली अभयारण्य व राष्ट्रीय उद्यान /संजय गांधी राष्ट्रीय उद्यान / इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान / राधानगरी अभयारण्य / अशी विविध वने जंगले वन्यजीव संरक्षण करण्यासाठी काही नैसर्गिक होती तर काही आपण वन्यजीव संरक्षण करण्यासाठी तयार केली होती त्यात औषधी वनस्पती व वाघ / सिंह / बिबट्या / चिता / हत्ती / कोल्हे / लांडगे / तरस / भेकर / सांबर / काळवीट / रानमांजर / साळींदर / रानमुंगस / अस्वल /रानडुक्कर / पटटेवाले वाघ /सायाळी /रानगवा / ससे /खोकड / नीलगाय / चिंकारा / वानर /उदमांजर / गवा / पिसारा / हरीण / नाग /धामण / फुरसे / मन्यार / अजगर /सरडा / गांडूळ /हरणटोळ / विरुळा / घोरपड / सापसुरळया / रानपाली / वृक्षसरप / पारवे / बुलबुल /सुतार /हसरा /गरूड / ससाणे /कोकीळ /घुबड / घारि / गिधाडे / पोपट /शिंपी / चंडोल / खंड्या / माळढोक / मोर / करकोचा / पानकावळा / बदक / बगळा / मधमाशी / किटक / टोळ / फुलपाखरे / भुंगे / किडे / मुंग्या /व अन्य औषधी व जनावरांच्या चराईसाठी चारा उपयोग वृक्ष झाडं झुडपे वरिल प्रमाणे सर्व जीव आपला जीवन प्रवास सुखात चालला होता एकामेकावर अवलंबून असणारे प्राणी पशू पक्षी एकामेकाना खातात पण संख्या समान राहते मग वाघ. सिंह. चित्ता. बिबटे. असे हिंस्त्र प्राण्यांना कोणताही प्राणी खात नाही मग यांची संख्या झपाट्याने वाढायला हवी होती पण आज हे सर्व प्राणी बचाव अशी मोहीम राबवावी लागते विचार करा यांची संख्या कशामुळे कमी झाली विचार करण्याची गरज आहेे >

            लोकसंख्या झपाट्याने वाढली आणि लोकांना राहणे व वाढती लोकसंख्या यांना रोजगार सुख सोयी देण्यासाठी व लोकांना राहण्यासाठी जागा कमी पडायला लागली लोक हळूहळू गावाच्या बाहेर आले पण वाढता लोकांचा स्वार्थ आणि जमीनीवरील अधिकार करण्याची वृत्ती गावापासून थोड दूर घेवून गेली आणि एकवेळ माणूस जंगलात गेला हा वन्यजीवांचा असरा असणारा त्याचे घर असणारे लाखो प्राणी पशू पक्षी किटक यांच्या वास्तव्यावर त्याची नजर गेली आणि थोडी थोडी करत जंगले तोडायला सुरुवात झाली रस्त्याच्या नावांवर / बांध / बंधारे / कालवे / एम आय डी सी उधोग व्यवसाय / मोठी मोठी सिमेंट जंगले टोलेजंग इमारती / कारखाने व अन्य उधोगाना बाॅयलर साठी लागणारे जळाऊ लाकूड / घरबांधणी साठी लाकूड / काही समज गैरसमज यासाठी निरापराध प्राणी पशू पक्षी यांची कत्तल / अशा विविध आपल्या स्वार्थापोटी माणसाने जंगल तोड करण्यास सुरुवात केली बघता बघता जंगलांची क्षेत्रे कमी झाली आणि औधोगीकरण झाले पण आपली संस्कृती दर्शविणारे प्राणी पशू पक्षी यांचा निवारा आसरा नष्ट झाला आणि त्यांच्या जमाती नष्ट होण्यास सुरुवात झाली आज काही प्राणी पशू पक्षी आपणं पुस्तकातच वाचतो आणि आपल्या मुलांना गोष्टी सांगण्याची वेळ आली याला अमुक म्हणतात त्याला तमुक म्हणतात किती वाईट आहे डोंगरे शासनाने विविध योजना सांगून हजारो हेक्टर जमीन ढापली आहे त्यात विविध झाडांची लागवड केली ती माणसाला कोणत्याही उपयोगाची नाही ती कशी त्याची माहिती पुढे देणार आहे 

               आपण केलेल्या विघातक कामाची पोचपावती आपणास मिळायला सुरुवात झाली प्राण्यांना. राहण्यासाठी व जगण्यासाठी अन्न. पिण्यासाठी पाणी. वेळोवेळी लागणारे जंगलातील वनवे आपण वानरे माकड बघितली आहेत पूर्वी काळात रानात. रताळे. बटाटे. मका. भुईमुग शेंगा. केळी. अशी शेती केली जात होती त्यावेळी जनावराला अन्न मुबलक मिळत होते आज सर्वत्र ऊस व अन्य पिकांची शेती केली जाते याप्रमाणे जनावराला अन्न मिळते बंद झाले त्यामुळे वानर / माकडे रानगवे. / निलगाय. अशा जनावरांनी गावाचा मानवी वस्तीचा रस्ता धरला. याला कारणीभूत आपणच आहोत तसेच. वाघ सिंह चित्ते बिबट्या यांनासुद्धा जंगलांची तोड झाल्यामुळे राहणे खाणे मिळणं बंद झाले आणि त्यांनी गावाकडे मानव वस्तीकडे रस्ता वळविला शेळ्या मेंढ्या कोंबड्या कुत्री माणस लहान मुले यांचेवर हल्ला करण्यास सुरुवात केली त्यांना गावाकडे येण्यास भाग पाडणारे व बाहेरचे कोणी नाहीत आपणच आहोत आणि आपण आत्ता एखादे जनावरं शहरात गावात दाखल झाले की त्याला अमानुषपणे पकडतो काही वेळा पकडताना काही वन्यजीवांचा मृत्यू सुध्दा होतों म्हणजे त्यांच्यावर आपण याचे अगोदर केलेला अन्याय कमी होता म्हणून आज सुध्दा या मुक्या निरापराध प्राणी पशू पक्षी यांना यांचा वंश संपत आला तरी अजून किती दिवस अन्याय सहन करावा लागणार काय आपलं वाईट केलं आहे या जनावरांनी मी म्हणतो ते आपणास देत असणारी सजा दंड आपण केलेल्या कामाच्या किंमतीत कमी आहे आणि आपण ताठ मानेने वन्यजीव संरक्षण दिन साजरा करतो आपल्याला कस काहीच वाटतं नाही जरा तरी वाटायला हवं 

              वरील प्रमाणे सर्व प्रकार प्राणी पशू पक्षी यांचेवर होणारा अन्याय / शिकार / वन्यजीवांची अवैध शिकार. / वनोपजाचा बेकायदेशीर व्यापार / वन्यजीव संवर्धन / वन्यजीव संरक्षण / राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण / जलचर प्राणी / सरपटणारे प्राणी / वन्यप्राण्यांना विष प्रयोग करणे /पारध करणे /जाळ्यात पकडने /सापळ्यात अडकवणे /छळ करणे /शरिराचा कोणताही भाग जखमी करणे /जायबंदी करणे /स्वताच्या इच्छेनुसार तोडणे. उपटू वा गोळा करणे /जिवंत अथवा मृत विक्री /आग लावणे /विस्फोटक वापरणे / राष्ट्रीय उद्यान मध्ये खाजगी जनावरें चरण्यासाठी बंदी /पर्यटनावर बंदी /वरिल प्रमाणे तरतूद करण्यासाठी शासनाने वन्यजीव संरक्षण कायदा. "१९७२" आणि "२००३" व त्यात प्रामुख्याने महत्वाच्या सुधारणा करण्यासाठी "२००६" हा सुधारित कायदा तयार केला यात जम्मू काश्मीर वगळता संपूर्ण भारतातील वन्यजीवांचा समावेश करण्यात आला "वन्यजीव " याचा अर्थ प्राणी. जलचर. तसेच भू वनस्पती. जे कोणत्याही अधिवासाचा हिस्सा आहेत

    या कायद्यात केंद्र आणि राज्य यांची अधिकार मंडळे

केंद्र शासन 

(१) वन्यजीव संगोपन अधिकार कलम. (३) 

(२) राष्ट्रीय वन्यजीव मंडळ ज्यामध्ये पंतप्रधान अध्यक्ष असतील त्यांची व मंडळांची कामे खालील प्रमाणे

(१) वन्यजीव संवर्धन कार्यात सुधारणा

(२) राज्यशासनाला वन्यजीव संवर्धन चालना देण्यासाठी मदत

(३) वन्यजीव अवैध शिकार वनोपजाचा बेकायदेशीर व्यापार रोखण्यासाठी सल्ला व धोरण तयार करणे

(३) वन्यजीव संवर्धन सुधारणेतील उपाययोजना

(४) वन्यजीव भाष्य करणारा अहवाल किमान दोन वर्षांतून एकदा तयार करणे व जनहितासाठी प्रकाशित करणे

वाघ बचाव संरक्षण व संवर्धन

राष्ट्रीय वाघ सरक्षण व संवर्धन अधिकार मंडळ ( एन टि सी ए ) ची स्थापना वन्यजीव कायद्यात २००६ चया सुधारणेनंतर झाली पर्यावरण व वन्य मंत्री अधक्ष असणारे अधिकार मंडळ स्थापन करण्यात आले

( कलम "८"प्रमाणे

(१) वाघ सरक्षित क्षेत्रात जैवसृषटी मारक पध्दतीने होणारा जमीन वापर

(२) मानव व वनयप्राणी संघर्ष थांबविण्यासाठी उपाययोजना करणे वाघांना हाणी न पोहचता सहवावर भर देणे

            अजून वेळ गेलेली नाही आपणांस आत्ता वन्यजीवांना संरक्षण व संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे कायद्याची पूर्ण माहिती उद्या मॅसेज मध्ये देणार आहे 

       समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

वाचा

बॅंक खाजगीकरण - Bank privatiazation ...

कलाकार....

जेष्ठ नागरिक जेष्ठ नागरिक. -Senior citizen...

पळवाट पळवाट...

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या