आपणा सर्वांना परिचयाचा असणारा शब्द आहे. शेतीचे अथवा जागा. विहीर बोअर. घराला. व अन्य कोणत्याही ठिकाणी की जिथे चोरी होण्याची भीती असणार्या भागाला करण्यात येणारी संरक्षण भिंत म्हणजे कुंपण होय.
माग वळुन जरा बघा. ग्रामीण भागात सर्वात सुरवातीला वस्ती ही संकल्पना अमलात होती. त्यांनतर लोकसंख्या वाढली आणि वस्तीचे रुपांतर वाड्यामध्ये झाले. लोकं एकत्र समुह करून राहण्यास सुरुवात झाली त्यांच्यामागे कारणं होतें एकी. आणि एकामेकांचे संरक्षण वाडीचे रुपांतर गावांत झाले. आणि गावांत सुखसोयी भांडणतंटे. शुभ अशुभ कार्य. न्यायनिवाडा. सामाजिक. आर्थिक शैक्षणिक संरक्षण देण्यासाठी लोकांच्या मधून समाजहितासाठी समाजसेवक नेमण्यात आले. यांच्यामुळे लोकांना संरक्षण मिळण्यास मदत झाली. त्यावेळी गावांत कोणताही व्यक्ति. कोणत्याही कारणासाठी येणारं असेल तर त्याला. #. गावाच्या वेशीवर असणाऱ्या. #. त्या समाजसेवकाना भेट देऊन आपण कशासाठी काय प्रयोजन घेऊन गावांत आलो आहे हे सांगून परवानगी घेऊन मगच गावांत दाखल होता येत होते. आलेल्या व्यक्तिचा हेतू. पूर्वी गाव मागायला बैतकरी येत असत. पिंगळे. वासुदेव. कडकलक्ष्मी वाले. असे विविध समाजातील लोक येत असत समाजातील लोकांना फायदेशीर असेलतरच त्याला गावांत प्रवेश देण्यात येत होता. अन्यथा त्याला गावाच्या वेशीवर रोखले जात होतें.
आत्ता ग्रामपंचायत राज अमलात आले. ग्रामपंचायत अधिनियम १९५९ आणि त्याचवेळी झालेल्या सुधारणा व ग्रामपंचायत लेखासहिता २०११ व अन्य संलग्न कायदे यांच्या प्रभावी अंमलबजावणी साठी व ग्रामपंचायतींचे कामकाज सुरळीत व लोकाभिमुख व्हावे यासाठी शासन वेळोवेळी शासन निर्णय शासन आदेश व परिपत्रके काढत असते. ग्रामपंचायत राज अमलात आले आणि निवडणूक. दहशतवाद भ्रष्टाचार. गुंडगिरी. राजकीय दबाव मतदारसंघ निर्मिती. राजकीय नेते पुढारी बगलबच्चे यांचें गावागावात ठाण मांडून बसणे. यांना कोणताही रोखठोक नाही. गावाला कसलही कुंपण नाही. कुणीबी या कवाबी या. यामुळे जनजीवनाला धोका निर्माण होण्यास सुरुवात झाली लोकांचे जीवन कष्टमय झाले.
गावांत. पोलिओ डोस सर्वे. मतदार नोंदणी. जनगणना नोंदणी. बालक सर्वे. गरोदर मातांचा सर्वे. विधवा निराधार. ६५ वर्षापूढील वयोवृद्ध. विविध आरोग्य शिबीर. स्वच्छता. विविध शासकीय अंगणवाडी. बालसुधारगृहात. बालमजुरी वर रोख. समाजहितासाठी योजना. महात्मा गांधी रोजगार हमी योजना. वन संवर्धन. असे एक नाही अनेक योजना ग्रामपंचायत. पंचायत समिती जिल्हा परिषद. यांचेकडून. जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार राबविल्या जातात. वरिल सर्व सर्वे साठी येणारे अधिकारी व कर्मचारी हे शासनाने जरी पाठविले असले तरी ग्रामपंचायत परवानगी शिवाय गावांत जावून सर्वे करू शकत नाहीत. म्हणजे शासनाचे चालणार सर्व काम नियमानुसार चालते. याचा अर्थ असा होतो की गावाला सर्व अनिष्ट परिणाम यापासून वाचविण्यासाठी शासनाने प्रयत्न केला आहे आणि त्याची अंमलबजावणी ग्रामपंचायत त्यांच्या स्तरावर करतं आहेत. असेच. तालुकास्तरीय सुध्दा कामकाज चालते. तसेच जिल्हा स्तरीय कामकाज चालतें. राज्य. व देश यांच सुध्दा कामकाज शासन निर्णयानुसार नियमानुसार चालतें. म्हणजे सर्व स्तरांवर जनतेचे हित जोपासले जाते. हाच त्यामागचा उद्देश असतो.
आज आपणांस असे पहावयास मिळत नाही. कारणं. गावाच्या मुंडकयावर बसलेले राजकीय भूत. आपसातील मतभेद. फुटिरता. एकीचा अभाव. अज्ञान अशिक्षित. व्यसनी पणा. अशा विविध कारणानें आपण मगे आहोत आणि राहणारच. आज सर्व ग्रामीण. शहरी. भाग हा ठराविक. एल आय सी. कंपन्या प्रोडक्शन. जाहिरात. प्रचार. विविध शासकीय निमशासकीय योजनांसाठी होणारें मेळावे. सिमेंट कंपन्या मेळावे. महिला बचत गट मेळावे. बांधकाम कामगार योजनांसाठी गावागावात फिरणारे एजंट. संघटना वाले. युनियन वाले. असे विविध लोक गावागावात आपले दुकान मनमानी दराने चालवत असतात. यांना ग्रामीण भागात ग्रामपंचायत. शहरात नगरपरिषद. महानगरपालिका. या क्षेत्रात फिरणारे असे हजारों लोक. सर्वसामान्य माणसाला गोरगरीब लोकांना दिवसाढवळ्या लुटत आहेत. यांचेवर कोणाचे नियंत्रण नाही का? अशा सर्व लोकानी. गावात. तालुका जिल्हा. व अन्य ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत प्रवेश केला असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. कारणं यांनी गावात तालुका जिल्हा यामध्ये प्रवेश करताना संबंधित शासकीय विभाग म्हणजे. ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका. यांचेकडे. त्या त्या भागात कोणताही नोंदणी किंवा अन्य कोणताही मेळावा किंवा कार्यक्रम आयोजित करावयाचा असल्यास त्या त्या विभागाची परवानगी काढणे गरजेचे आहे तशी परवानगी काढली नसेल तर कोणालाही कोणत्याही भागात विनापरवाना घुसखोरी करून देवू नका. आपल्या गावात शहरात तालुका जिल्हा यामध्ये येणारा नविन व्यक्ति किंवा व्यक्ति समूह. मग तो संघटना सेवाभावी संस्था युनियन किंवा कोणताही राजकीय पक्ष यांना आपल्या संबंधित विभागांची परवानगी शिवाय आपल्या गावात प्रवेश देवू नका. यापासून आपणच आपले संरक्षण आर्थिक लुट. समाजातील तेढ. गटा गटातील भांडणे. यापासून आपणच आपल्याला वाचवू शकतो
समजा आपल्या गावात
नविन कोणी आलं. आपल्या गावातील सर्वात मोठा भाग असतो तो म्हणजे पिण्याचे पाणी. समजा कोणी नविन आला आणि आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये काय विषारी औषध टाकलें तर आपणांस केव्हा कळणार म्हणूनच म्हणतो कोणालाही नविन व्यक्तिला आपल्या गावात शहरात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये प्रवेश देवू नका
समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९