गंज. वाळवी

 


गंज. वाळवी

               सर्वांच्या परिचयाचा आसणारा. हा शब्द आपणास बरेच काही सांगून जातो. सर्वात मजबूत कठीण वस्तू मग ती लोखंड. लाकूड. व अन्य वस्तू यांना निकामी बरबाद करण्याची क्रिया म्हणजे गंज होय. चांगलयातलया चांगले हत्यार.माणसामधये. असणारे विचारात. आचार. यांना सुध्दा आज गंज चढला आहे वाळवी लागली आहे. म्हणजे जीवन बरबाद होणारं जगण्याची इच्छा उमेद संपणार आणि माणसांचे जीवन नरकमय होणार आहे. जगणं झालं सोप मरण झालं महाग असा प्रकार येथून पुढे होणार आहे. 

                 मोघल बादशहा आणि मोघल शासन यांनी २५० वर्षे आपणावर राज्य केले शासन केले याचे कारण आहे ते म्हणजे आपल्याला आपल्या स्वातंत्र्याचा कधी विचारच पडला नाही. आहे असं जगा. चाललंय चालू द्या. सगळ्याच होईल ते माझे होईल. हा सर्वात मोठा आपल्या मनाला लागलेला गंज चढला आहे. लाकडाला ज्या प्रमाणे वाळवी आतून खाते आणि लाकडाचा राहतो तो म्हणजे वरचा भाग तसं आज आपलं जीवन मत. पोकळ झाले आहे. मोघल सत्ता संपली आणि व्यापार करण्याच्या उद्देशाने भारतात पहिला इंग्रज आला तो वास्को द गामा. गेट आॅफ इंडिया. म्हणजे आपले तोंड येथून आत आले उदेश काय होता फक्त व्यापार. आपल्यातील मसाले व मसाल्याचे पदार्थ यांची आपल्यातून निर्यात होण्यास सुरुवात झाली. आणि हे व्यापारी येताना. चहा घेऊन आले. त्यावेळी भारत सोन्याची चिडीया होती. मुबलक पाणी मुबलक जमीन. अन्न व धान्य पुष्कळ. दुध दुपते. खाण सकस. विना औषध विना केमिकल. श्रेष्ठ भारतीय संस्कृती. आचार विचार. सामाजिक सलोखा. वैयक्तिक मतभेद नाही. जातीभेद होता पण थोड्या प्रमाणात. आपल्यात असणारे मंदिर लेणी. गड. दर्या खोरि. पठारे. जंगले. बारमाही वाहणारी नदी. आणि समाजाला एका साखळीत बांधणारे समाजसेवक. क्रांतिकारी. असा भारतीय इतिहास असणारा आमचा भारत. इंग्रज येताना चहा घेऊन आले. आपल्यातील लोकांना चहा माहिती होता पण एवढ्या मोठ्या प्रमाणात माहिती नव्हता. मग हे व्यापारी लोक. हातगाडी वरून फिरून चहा विकत असत. लोकांना या या चहा घ्या. असं म्हणत असतं. कारणं लोकांना चहाची सवय नव्हती. आणि या चोरांच्या प्रयत्नाला यश आले आणि भारतीय लोकांना चहाची एवढी मोठी सवय लागली की लोक चहाची गुलाम झाली. चहासाठी पडेल ते काम करायला लागले. आणि या प्रदेशातून व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते शासन कर्ते बनले. यावेळी सुध्दा आपल्या मनाला विचाराला लागलेला गंज चढला होता त्यामुळेच आपण १५० वर्ष गुलाम म्हणून राहिलो. आज आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये दवाखाने कमी आहेत पण चहाची दुकानें ए सी. तयार करण्यात आली आहेत. म्हणजे गंज वाईट आहे वाळवी आपल्या मनाला लागली आहे

            समाजसेवक. क्रांतिकारी. उठाव करणारे. आंदोलन कर्ते. यांनी काही काळ आपल्या मनाचा. विचारांचा. संस्कृती. यांचा गंज झाडला आणि. गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला. काही जणांचे जीव गेले. काही जणांची कुटुंब रस्त्यावर आली. काहीजणांना मरणयातना देण्यात आल्या. जाळपोळ. लुट. अब्रुचा लिलाव. काही जणांचे पाय हात तोडले. अशी भयानक प्रकार बघून आणि ऐकून आपल्या अंगावर काटा आला तर खरंच ज्यांनी भोगल त्यांचं काय. या सर्वांच्या त्यागाला. १५/ आॅगसट १९४७ रोजी यश आले आणि आपला भारत देश स्वतंत्र झाला. सर्वांना फार मोठा आनंद झाला. की आपण आपल्या मनाप्रमाणे वागू. आपणांस स्वतंत्र मिळाले. पण झालं उलट. आपण गुलामगिरी मध्ये होतो तो काळ चांगला होता. महागाई. शिक्षण बाजार. आर्थिक विषमता. जातीयवाद. गुंडगिरी. दहशतवाद. अशी कोणतीही भिती आपल्या मनात नव्हती. रोजगार करणारे पोटापुरते काम होते. कुटुंब जगत होतें. म्हणजे एकंदरीत गुलामगिरी मध्ये कोणीही उपाशी राहत नव्हते. कारणं आपण त्यावेळी आपल्या मनाला विचाराला लागलेला गंज झाडला नाही आणि तशी गरज भासली नाही

             स्वतंत्र भारतात. राजकीय पक्ष नेते पुढारी सत्ता बिपासू लोक यांचीही निर्मिती झाली. कारणं स्वतंत्र मिळाले आणि जागोजागी राजकीय पक्ष तयार झाले. सरपंच. नगरसेवक. आमदार. खासदार. मंत्री. याची लोकांना अशा सुटली. आणि मग काय मतदान ही संकल्पना अमलात आली. लोकांनी लोकांच्यासठी तयार केलेले राज्य म्हणजे लोकशाही असे लोकांच्या मनात बसविण्यात आले. मतदान. त्यात पैशांचा वापर. गुंडगिरी. दहशतवाद. मतदारांना धमकी देणें. उचलून नेणे. मतदानासाठी मटन दारू याचा वापर. आपसात जातीयवाद. सामाजिक तेढ. भांडणे. दंगली. जाळपोळ. इत्यादी साधनांचा वापर पहिल्यापासूनच आहे. आत्ता हे आपणास नवीन नाही. मतदारांना सुध्दा या गोष्टीची सवय झाली. वरिल प्रमाणे आपण सर्व बघतो पण याबाबत आवाज. आंदोलन करत नाही माझा नेता नाराज होईल म्हणून. हे कारणं नाही कारणं आपल्या मनाला आणि संस्कृती विचार आचार यांना गंज चढला आहे.झाडा नाहीतर गुलाम परकयानी केल होत आत्ता आपण आपल्या आपण निवडून दिलेल्या लोकांच्या गुलामगिरी मध्ये मरावे लागेल. आपली पिढी सुध्दा गुलामच जन्माला येणार आणि गुलामच होऊन मरणार. मोठा आणखी मोठा होणार आणि गरिब गरिबच राहणार ज्या देशात आदर नाही. जगण्याचे साधन नाही. खाण्यास अन्न नाही पिण्यास पाणी नाही. शिक्षणाचे साधन नाही. अशा ठिकाणी राहून काही उपयोग नाही. अशा ठिकाणी कोणताही जीव आपली प्रगती करु शकणार नाही. असे गाव तालुका जिल्हा राज्य देश सोडून जाणे फायदेशीर आहे. जिथे वेदपाठक ब्राम्हण. श्रीमंत लोक. चांगला दयाळू राजा. राहण्यास योग्य जागा. वैद्यकीय सेवा सुविधा. उपचार मिळत नसतील अशा ठिकाणी राहून कुठलेही सुख मिळणार नाही. अशा देशात राहणे व्यर्थ आहे. दुःख जरुर मिळणार. मित्र अशा ठिकाणच्या लोकांशी केले जावे ज्ञ जिथे भीती. लाज. चातुर्य. त्याग. अशा सवयी आवश्यक असतील. ज्या देशात लोकांत गुण नसतील त्या देशात गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये राहणें व्यर्थ आहे. तिथे राहून कुठलाही पुरुष कुटुंब जनसमुदाय पुढ जावू शकत नाही कारण यांच्या मनला व हकक अधिकार विचार आचार संस्कृती याला गंज चढला आहे 

                २०२० कोरोना काळ आपण सर्वांनी भोगला आहे. उपासमारी. डबल दराने मालाची विक्री. शाळा बंद. बॅक मनमानी कारभार. टाळेबंदी. जमावबंदी. जिल्हा बंदी. गाव बंदी. हाताला काम नाही त्यामुळे हातात पैसा नाही. अशी एक नाही दोन नाही अनेक वाईट अनुभव आपणांस आलें आहेत. एका नेत्याच्या. पुढारी. यांना आपणच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री केले. आणि शासनाचे नोकर म्हणजे जिल्ह्याचा माय बाप माणले जाणारे मा जिल्हाधिकारी सो यांच्या व राजकीय संगणमताने. एका सहिने जिल्हा गाव तालुका. बंद होतो. म्हणजे आपणांस आपले मत. विरोध. करण्याचा अधिकार आहे का ? नाही. कारणं आपल्या मनाला हक्क व अधिकार. सत्ताधारी यांची भीती. अशा विविध गोष्टींचा गंज चढला आहे त्यामुळे आपण मूरदाड झालों आहे. 

              सर्वात मोठा गंज चढला आहे तो म्हणजे. विविध शासकीय निमशासकीय संस्था कार्यालय. विविध कल्याणकारी मंडळे. विविध समाजकल्याण आॅफिस. ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद तहसिलदार. नायब तहसिलदार. पुरवठा विभाग. विविध निराधार विधवा वयोवृद्ध महिला पुरुष. यांच्यासाठी विविध कल्याणकारी योजना. यामध्ये लोकांनी आपल्या विविध मागण्या. तक्रार अर्ज. व विविध प्रकारचा पत्र व्यवहार. याला कोणतेच उत्तर मिळतं नाही आज सर्वच शासकीय कार्यालयात हजारों अर्ज धुळखात पडले आहेत. आपण याची कधीच चौकशी करत नाही अधिकारी व कर्मचारी यांना कधी जाब विचारत नाही. वरिल सर्व विषयांबाबत एखादा समाजसेवक जो खरोखरच समाजसेवक उपोषण. बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको इत्यादी आंदोलन तो त्याच्या बरोबर सर्वांसाठी करत असतो पण आम्ही त्याला घटनास्थळी पाठिंबा सुध्दा देत नाही. कारणं आमच्या मनालाच गंज चढला आहे. आम्हाला काय करायचं आहे ? ‌. ही आपली मानसिकता आहे. 

       रेशन दुकानदार रेशनचे अन्न धान्य व्यवस्थित व रास्त देत नाही. काही फसवी कारणे सांगून आपला हक्क मारतो पण आम्ही कांहीच करू शकत नाही कारणं आम्हाला गंज लागला आहे. बांधकाम कामगार यांची दलाल एजंट समाजसेवक यांच्याकडून कल्याणकारी योजना मिळवून देतो म्हणून होणारी. आर्थिक मानसिक सामाजिक पिळवणूक कामगार आॅफिस मध्ये अधिकारी व कर्मचारी यांचेकडून मिळणारी वागणूक. यांच्या जीववर लाखों रुपये किंमतीची मालमत्ता. नेते पुढारी यांची फसवी आश्वासने. महिला छेडछाड. महिला अत्याचार. महिलांचा घरेलु व समाजाकडून होणारा छळ. मुलींना शाळेत जाताना वाटणारी असुरक्षितता. बचत गटांच्या नावाखाली राजकारण. वरील सर्व प्रकार आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहत असतो पण आपण कधीच याबाबत आवाज उठवला नाही कारणं आपणांस फार मोठा गंज चढला आहे. 

       माणूस दोनच ठिकाणी आपले हात जोडतो एक देव ज्याने जन्माला घातले आणि दुसरा म्हणजे डॉ ज्याकडे जीवन वाचविण्यासाठी. पण आज या रोगी सेवा ईश्वर सेवा. याच फक्त आणि फक्त पैसा मिळविण्याचे साधन झाले आहे. उपचार पद्धती कोणती निवडण्याचा अधिकार आहे. पेशंट बरा होत नसेल तर दवाखाना बदलण्याचा आपणास अधिकार आहे. उपचारासाठी काय दर आकारले हे विचारण्याचा अधिकार. दवाखान्यात रूग्ण हक्काची सनद लावली आहे का. धर्मादाय अंतर्गत उपचार करणारे दवाखाने व त्याची माहिती सांगणारे मदतनीस दवाखान्यात आहेत का. औषध खरेदी करण्यासाठी मेडिकल निवडण्याचा अधिकार आपणांस आहे. ज्या डॉ कडे उपचार घेतला आहे त्यांच्याच दवाखान्यात असणार्या मेडिकल मध्ये औषध घेणे बंधनकारक नाही. आजपर्यंत जेवढी सर्वात मोठी आंदोलने झाली आपण सर्वांनी बघितली पण आजतागायत औषधांच्या किमती साठी कोणीही आंदोलन केले नाही आज करण्याची गरज आहे

पण आपण करत नाही कारण आपणांस गंज लागलाय

        ‌‌. माहिती अधिकार कायदा २००५ शासकीय निमशासकीय कार्यालयात चालणारे सर्व हितांचे. भ्रष्ट कामकाज. २/३/२००८ रोजी तयार नागरिक सनदेनुसार सर्वसामान्य जनतेला तपासणी पडताळणी चौकशी करण्याचा अधिकार आहे. माहिती अधिकार दाखल करणार्या कार्यकर्ते यांचेवर जीवघेणे हल्ले. माराहान. कार्यालय फोडणे. कुटुंबाला वेठीस धरणे. आपण वृतमापत्रात वाचतो दूरदर्शन वर बघतो आणि विसरून जातो. आज जो कोणी माहिती अधिकार दाखल करत असेल तर त्याला आपला सहयोग द्या. त्याला लढण्यासाठी हिम्मत द्या हौसला द्या. पण आपण देत नाही उलट पैशासाठी माहिती अधिकार दाखल केला असेल असं मत व्यक्त करतो आणि सर्व विसरून जातो कारणं आपणांस गंज लागला आहे आपला काहीच उपयोग होणार नाही

         जरा बदल करा आणि आपला गंज झाडा आणि नव्याने कामाला लागा कोणाला देऊ नका कोणाला घेऊन देवू नका. गैरप्रकार घडत असेल तर आवाज उठवा 

          समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या