Showing posts with label शासन. Show all posts
Showing posts with label शासन. Show all posts

आम्हाला कधीच वाटले नाही

 


आम्हाला कधीच वाटले नाही

            आपल्या शासनव्यवस्थेचे विविध कार्यालये शासकीय निमशासकीय कार्यालये स्थापन करण्यात आली आहे त्यात प्रामुख्याने. ग्रामपंचायत राज. नगरपालिका महानगरपालिका. पंचायत समिती. अशी विविध कार्यालये. स्थापन करण्यात आली आहेत. यामाध्यमातून विविध विकास व कल्याणकारी योजना राबविल्या जातात. त्या गोरगरीब आणि गरजूंना मिळवून घेण्यासाठी विविध जाचक कागदपत्रांची अट. अधिकारी व कर्मचारी दलाल एजंट यांच्याकडून अगदी हिण वागणूक दिली जाते. 

   ग्रामपंचायत ग्रामिण भागातील मिनी मंत्रालय आहे यामधून खेड्यापाड्यात विविध योजना राबविण्यात येतात त्यात प्रामुख्याने. रस्ते. गटर बगीचे स्मशानभूमी समाजभूमी रस्ते विकास. घरकुल योजना. वयोवृद्ध. महिला निराधार विधवा अनुदान यासाठी गोरगरीब लोक ग्रामपंचायती मध्ये अर्ज दाखल करतात आणि मग त्या त्या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची इनामदारी. जोरात असते. वर्षे नु वर्ष. लाभाचे गोरगरीब जनतेचे अर्ज आज सुध्दा धुळखात पडले आहेत कोणीही अधिकारी व कर्मचारी यांना कोणताही पत्रव्यवहार करून कळविले सुध्दा नाही. म्हणजे या अधिकारी व कर्मचारी यांना कधीच वाटली नाही गोरगरीब यांना छळताना पंचायत समिती हे तर सर्वात मोठें करपशन आहे योजना मोठया पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून नेते पुढारी आमदार खासदार मंत्री पुढारी यांचें बगलबच्चे यांनाच मिळवून देत आहे. तरि सुध्दा या अधिकारी व कर्मचारी यांना कधीच वाटली नाही

          बांधकाम कामगार नोंदणी हे सर्वात मोठें भ्रष्टाचार केंद्र आहे बांधकाम कामगार व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचेकडून बांधकाम कामगार यांचेसाठी 19 कल्याणकारी योजना राबविण्यात येतात त्या मिळवून घेण्यासाठी काही जाचक अटी शर्ती. व कामगार हितचिंतक संघटना दलाल आणि एजंट फुटाला निर्माण झाले आहेत पूर्ण जिल्हा भ्रष्टाचार युक्त झाला आहे. संघटना कामगार हितचिंतक यांनी बांधकाम कामगार यांना शारीरिक मानसिक आर्थिक लुट सुरू केली आहे. त्यांना सहकार्य सहाय्य कामगार आयुक्त भवन मधील अधिकारी व कर्मचारी. यांच्याशी हातमिळवणी करून तुम्ही खा आणि आम्ही खातो असा फंडा अमलात आणला जातो. सर्वात मोठा कामगारांचा अपमान याच सहाय्यक कामगार आयुक्त भवन मधील अधिकारी व कर्मचारी करतात तुम्ही कोणाकडून आला. तुमची संघटना कुठली. कुणाला किती लाभाचे पैसे जमा झाले हे कामगारा आगोदर संघटना वाल्यांना सांगणारे हेच आॅफिस मधील अधिकारी व कर्मचारी आहेत. आम्हाला किती पैसे देणारा. अशी विचारणा करणार्या अधिकारी व कर्मचारी यांना आपल्या पदांवर राहण्याचा अधिकार नाही. आज हजारो कामगार लाभाची प्रकरणे अशा गलथान कारभारामुळे धुळखा पडले आहेत. म्हणजे या अधिकारी व कर्मचारी यांना कधीच वाटली नाही आणि वाटणारं नाही 

              माहिती अधिकार. अधिनियम २००५ सर्व गोरगरीब जनतेला शासकीय निमशासकीय कार्यालयात चालणारे कामकाज तपासणी पडताळणी करण्याचा अधिकार देण्याचा मोठा प्रयत्न आहे पण आज सर्वसामान्य जनतेला गोरगरीब लोकांना एकादी माहिती पाहिजे असेलतर माहिती अधिकार दाखल करण्याची सुध्दा पध्दत माहिती नाही. आणि जाणकार लोक विशिष्ट फी दिल्याशिवाय शिकवत नाहीत म्हणजे सर्वात अगोदर यांना वाटली पाहिजे. माहिती अधिकारांची माहिती देताना माहीती देता येत नाही. सदोष कारण दिले जात नाही. सुनावणी असुन सुद्धा अधिकारी व कर्मचारी हजर राहत नाही. असे एक नाही अनेक नपटणारे कारणें देवून. माहिती अधिकार कायद्यात सजा व दंड तरतूद असुन सुद्धा त्याकडे डोळेझाक करणारे अधिकारी व कर्मचारी यांना जरा सुद्धा वाटली नाही 

            प्रत्येक तालुक्यात असणारे तहसिलदार कार्यालय हे लहान जिल्हाधिकारी कार्यालय माणले जाते त्यामध्ये. महसूल. संजय गांधी निराधार. श्रावणबाळ योजना. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन. सर्व पत्र व्यवहार. अपंग विकासासाठी योजना. पुरवठा विभाग. स्टॅम्प. निवडणूक आयोग कार्यालय अशी विविध विभागांचे काम करण्यासाठी विविध विभाग नेमले आहेत. त्यात सर्वात मोठा भ्रष्टाचार म्हणजे महसूल. वर्षानुवर्षे धुळखात पडलेले जमीन संबंधित प्रकरणे. वयोवृद्ध महिला पुरुष निराधार विधवा यांच्यासाठी विविध पेन्शन योजना. यासाठी तहसिलदार कार्यालय मध्ये दाखल केलेले पत्र व्यवहार कोण बघत सुध्दा नाही वयोवृद्ध व अपंग लोकांसाठी असणार्या योजना त्यासाठी लागणारे कागदपत्रे अपंगाला. वयोवृद्ध व्यक्ती आॅफिसला जाता येईना. कोणताही अधिकारी व कर्मचारी यांना एसी रुम सोडू वाटेना. रस्त्याने येणार्या जाणारया लोकांकडे केविलवाणी नजर करून पाहणारे अपंग आणि वयोवृद्ध मी बघितले आहेत पण अधिकार जर आपले आॅफिस सोडून खाली आला तर कमी बापाचा होणार आहे कां ? पण शासनाने ज्याच्या सेवेसाठी यांची निवड केली आहे तयाची सुध्दा यांना कधीच वाटली नाही रेशन दुकानदार आणि शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे संगनमताने चालणारा सावळागोंधळ आपण बघतो. ज्यांचे दारिद्र्य रेषेखालील नाव आहे त्याला रेशनकार्ड नाही. ज्याला दारिद्र्य रेषेखालील प्रमाणात आहे त्याचे दारिद्र्य रेषेखालील रेशनकार्ड नाही दुकान दारची दमदाटी. अधिकारी व कर्मचारी यांचे पैसै खाऊन काम. लाभार्थी वार्यावर. सदन व्यक्ती मुबलक धान्य. नाव कमी करणे नावं वाढविणे. अन्न धान्य सुरू करणे. मयत व्यक्तिची नावे कमी करणे. नविन रेशनकार्ड काढणे यासाठी किती पैसे देताय. मगच काम होतंय. आॅफिसला कर्मचारी कमी ठेकेदार पध्दतीने भरली जाणारी यांचें पगार कमी मग यांना कुराण मोकळ लुटायला अधिकारी व कर्मचारी यांच्या संगनमताने. म्हणून म्हणतो या अशा कामचुकार अधिकारी व कर्मचारी यांना कधीच वाटली नाही. 

              वैद्यकीय सेवा हीच ईश्वर सेवा. मनांत भावना आहे आणि समोर दिसतो तो फक्त पैसा. औषधांचा दर उपचार खर्च मनमानी पद्धतीने आकारली जाणारी फी. गोरगरीब लोकांना कोणत्या दवाखान्यात कोणते उपचार मोफत होतात कोणता दवाखाना कोणत्या योजनेअंतर्गत मोफत वैद्यकीय सेवा देतो हे समजलंच नाही आणि आपणं करूनच दिलें नाहीं म्हणून म्हणतो या सर्व वैद्यकीय बाजार करणारे यांना कधीच वाटली नाही

             शेतकरी आत्महत्या कर्जबाजारी पणा. बेरोजगारी. एस टी संप. पूरग्रस्त अनुदान. बोगस पंचनामे. घरांचे. गोठे. जनावरं. मयत व्यक्ति यांचें बोगस व पैसै खाऊन बोगस पंचनामे करणारे अधिकारी व कर्मचारी. खरोखरच नुकसान झालेले वार्यावर आणि ज्यांचे कांहीच नुकसान झाले नाही अशा लोकांना शासनाची मदत मग पैसा अन्न धान्य याप्रमाणे. म्हणजे खरोखरच या अधिकारी व कर्मचारी यांना कधीच वाटली नाही. प्रकल्प ग्रस्त लोकाची जमीन संपादन करणे. त्यांची परस्पर विक्री करणारे. असे भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांना कधीच वाटली नाही

      आज भरती आहे उद्या भरती तारिख जाहीर होईल या आशेने सकाळ संध्याकाळ. मिळेल ते काम करून अर्धपोटी उपाशी राहून आपले व आपल्या कुटुंबाला हातभार लावणे तरुण आज मोठ्या संकटात सापडलेल्या आहेत. सरकार भरती काढत नाही मुलाची वय संपली लग्न होत नाही म्हणून मनांत झूरणारे आई वडील सगळा प्रकार अगदी भयानक आहे. म्हणूनच सरकारला सुध्दा कधीच वाटली नाही

       समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

आरोग्य वाचवा. शासनाला जागवा.

आरोग्य वाचवा. शासनाला जागवा. 

                    गाव छोटी छोटी होती अशा आकांक्षा कमी होत्या कोणीही आजच्यासारखे रोजच बाहेरचं रस्त्यावर गाडीवर मिळणारे खाद्यपदार्थ खाण्यास जात नव्हते कारण तेवढे आपले चोचले नव्हते आज सर्वत्र गावात तालुका जिल्हा राज्य सर्वच ठिकाणी चौका चौकात वडापाव. चायनीज भेळ. दाबेली. बिर्याणी पाणीपूरी मटन चिकन दुकान. तेल व किराणा विक्री करणारे दुकानें. फिरून खाद्यपदार्थ विक्री करणारे. फळे फुले भाजीपाला विक्री करणारे. अशी एक नाही अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ विक्री करणारे आज जागोजागी ठाण मांडून बसले आहेत त्यातच यांचेकडून ग्राहकाला मिळणारी वागणूक. मिळणारी स्वच्छता. तशा प्रकारची आहे. 

                आज आपणं वडापाव बद्दल बोलू आपल्या आसपासच काय पण ग्रामीण भागात किंवा शहरी भागात आज हातावरचे पोट असणारे. दिवसभर काम करणारे राहण्याचा ठिकाणा नाही. असे व दिवसभर वेड्यासारखे फिरणारे. भिक मागणारे. अशी बरीच जनता आणि यांचं एकमेव बजेट मधील खाण आहे ते म्हणजे वडापाव. स्वस्त परवडणारा असा एकच पदार्थ आहे. आपल्या महाराष्ट्रच केंद्र माणल जाणारी मुंबई येथे प्रथम खाद्यपदार्थ म्हणून वडापाव याचा सहभाग असतो

              वडापाव आणि स्वच्छता आणि वडापाव मध्ये वापरला जाणारा कच्चा माल त्याचा दर्जा. काम करणारे कामगार यांचे आरोग्य. याचा आपण कधीच विचार केला नाही आज मी तुम्हाला एका वडापाव गाडीवर घेऊन जातो. चौकाच्या एका कोपरयात गटारवर फरशी टाकून त्यावर गाडी उभी केलेली. सकाळी सर्व खाद्यपदार्थ विक्री करणारे गाडे चालू होतात. पिण्यासाठी बोअरचे पिण्यास अयोग्य असे पाणी. बाजारात कमी दरातील मिरची. सडलेली कोंथिबीर. सर्वात खराब झालेला काळ पडलेला बटाटा. कमीत कमी आठ दिवस न बदलेले खाद्यतेल. अस सर्व असत कामांवर असतो तो बालकामगार. त्याच्या अंगावर फाटलेली कपडे. वाढलेली केस नखे अशी सर्वच खाद्यपदार्थ विक्री करणार्या गाड्यांची परस्थिती आहे. असे सर्व लहान उद्योग सुरू करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग अशा खाद्यपदार्थ विक्री करणार्या लोकांना नियम अटी घालून परवाने देतात पण सत्यता कोणताही नियम पाळला जात नाही. त्यामुळे खाद्यपदार्थ विक्री करणारे मोकाट झाले आहेत. हेच उधोग नाही तर. बार. हाॅटेल. धाबे. घरगुती खाणावळ. यांच्याबद्दल सुध्दा अन्न व औषध प्रशासन विभागाचे परवाना नियम अटी सारख्याच आहेत. पण सत्यता पालन होत नाही मटन चिकन विक्री करणारे दुकानें यांवर स्वच्छता नाही. कामांवर असणारा कामगार त्याचे आरोग्य. स्वच्छता अभाव. कापण्यात येणारे कोंबडी बकरी त्याचा दर्जा. काय. काही दुकानांवर निकृष्ट दर्जाचे मांस विकले जाते. आपण वृतमापत्रात वाचतो दूरदर्शन वर बघतो अन्न व औषध प्रशासन विभाग यांची मटन मार्केट मधील दुकानांवर छापा टाकला आणि अमुक अमुक किलो निकृष्ट दर्जाचे मांस जप्त केले जप्त केलेले मांस व अन्य पदार्थ कुठे गेले अधिकारी व कर्मचारी यांच्या पोटात. बघा छापा कश्यासाठी टाकला. तुमचे आमचे आरोग्य सांभाळण्यासाठी नाही 

          चायनीज एक मोठ खुळ आपल्या डोक्यात आहे घरातील सर्वजण एकत्र बसून चायनीज खातात पण ते कधी शिजवल जात. तेल कोणत आहे. चिकन कसल आहे. चायनीजला कलर लाल आला म्हणजे कोणत केमिकल त्यात वापरल आहे. ते आपल्या शरिरावर काय विपरीत परिणाम करिल याचा आपण कधी विचार करत नाही मग याचा विचार अन्न व औषध प्रशासन विभाग यांनी तरी केला आहे का ? 

 फळें विक्री करणारे नासकी कुजकी फळे विकली जातात. फळे पिकविण्यासाठी विविध औषध केमिकल वापरले जाते त्यामुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे 

         गुटखा. खैनी सिगारेट विडी तंबाखू. अफू चरस गांजा नशेची औषधे. गोळया. पाऊडर. अशी विविध व्यसनाची सवय आपणास आपल्या चौकात चौकात आपल्या घराजवळच्या पानटपरी पासून लागते. शाळा कॉलेज विद्यालये महाविद्यालये यांच्या जवळ नशेचा कोणताही पदार्थ विक्री करण्यास शासनाने बंदी घातली आहे पण आज सर्वत्र सर्रास नशेच्या पदार्थांची विक्री केली जात आहे कोणताही रोख ठोक नाही यामुळे आपली तरुण पिढी धोक्यात आहे आतातरी अन्न व औषध प्रशासन विभाग कुठे आहे 

              दारूबंदी साठी शासन नुसता आदेश काढते पण त्यावर कोणतीही कारवाई होत नाही आज काही गावांत शाळेच्या भिंतीला लागून आज दारू दुकान आहे ज्या महिलांनी उलटी बाटली आंदोलन केली त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि राजकारणी लोकांनी आंदोलन खुडून काढली. कोणीही काहीही बोलत नाही कारणं ही दुकाने सत्ताधारी यांच्या बगलबच्चे यांचीच आहे याला कोण लगाम घालेल काय माहित नाही 

अन्न आणि औषधे यांचे

 प्रमाणीकरण करून, त्यांच्या निर्मितीवर व वाटपावर नियंत्रण ठेवणारी शासकीय यंत्रणा. १९३५ नंतर अन्नाची गरज खूप वाढली होती, परंतु उत्पादन मात्र कमी होत होते. अशा परिस्थितीत अन्नामध्ये इतर पदार्थांची भेसळ करण्याचे प्रमाण वाढले. अन्नभेसळीस प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र शासनाने ‘अन्नभेसळ प्रतिबंधक कायदा-१९५४’, अंमलात आणला. इ.स. १९५५ पासून या कायद्यातील त्रुटी घालवून व योग्य त्या तरतुदी करून त्याची सर्व राज्यांत अंमलबजावणी करण्यात आली आहे. या कायद्यामुळे अन्नात व पेयात भेसळ करण्यास मनाई करण्यात आली. अन्नाची साठवण योग्य ठिकाणी व योग्य प्रकारे व्हावी; त्यावरील वेष्टन अन्नाला व औषधाला घातक नसावे; त्यावर निर्मितीची तारीख, कालावधी व साठविण्यासंबंधीच्या सूचना इ. सर्व बाबी स्पष्टपणे लिहिलेल्या असाव्यात, असे या कायद्यात नमूद करण्यात आले आहे.

अन्न आणि औषधे यांचे विश्लेषण करण्यासाठी प्रत्येक विभागात सर्व सुविधायुक्त प्रयोगशाळा शासनाकडून उभारल्या जातात. त्या ठिकाणी योग्य शिक्षण असलेले प्रशासक व तपासणी अधिकारी नेमले जातात. तपासणी अधिकारी अन्न वा औषधे खरेदी करून परीक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठवितात. उत्पादनात भेसळ आढळल्यास संबंधित व्यक्तीवर किंवा उद्योगावर खटला भरण्याचा अधिकार त्यांना असतो. एखादा ग्राहकदेखील अन्नाची व औषधाची खरेदी करून परीक्षणासाठी ते प्रयोगशाळेत पाठवू शकतो. मात्र ग्राहकाने त्याचा हा उद्देश विक्रेत्याला अगोदर सांगावा लागतो. महानगरपालिका, नगरपालिका इत्यादी संस्थाही त्यांचे अधिकारी नेमू शकतात.


केंद्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत या प्रशासनाचे नियंत्रण केले जाते. आरोग्य सेवेचे महासंचालक हे प्रशासन विभागाचे अध्यक्ष असतात. इतरही सदस्य या समितीवर असतात. अन्न व औषध परीक्षण यांसाठी वेगवेगळ्या समित्या असतात. औषधे आणि सौंदर्यप्रसाधने यांविषयीचा कायदा १९४० मध्ये अंमलात आणला गेला. १९६२ मध्ये सर्व प्रकारची प्रसाधने या कायद्याखाली आली. अशा कायद्यामुळे संपूर्ण भारतात औषधे व प्रसाधने यांची निर्मिती, साठवण, वाटप व विक्री यांवर नियंत्रण आले. ग्राहकांना प्रमाणित औषधांचा पुरवठा योग्य तर्‍हेने व्हावा, हा यामागील मुख्य उद्देश असतो. इंटरनॅशनल कॉंग्रेस ऑफ हार्मोनायझेशन ही आंतरराष्ट्रीय संस्था या नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्त्वे ठरविते.

      ‌. आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी शासनाने विविध विभाग नेमले आहेत त्यात प्रामुख्याने अन्न व औषध प्रशासन विभाग. अन्न सुरक्षा अधिनियम. असे विविध विभाग आपल्यासाठी आहेत यामध्ये आपणांस काही चुकीचे आपल्या आरोग्यास हानिकारक अपायकारक असे वाटत असेल तर आजच आवाज उठवा आणि त्याची तक्रार संबंधित ठिकाणी करा आरोग्य वाचवा शासनाला जागवा. 

         समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९ 

    बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर यांचेकडून शिराळा तालुक्यातील सार्थ निवड कामांची आवड सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे धडाडीचे नेतृत्व. श्रीमती सौ अनिता विजय धस यांची युनियनच्या. शिराळा तालुका कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली

कुंपण कुंपण

 


कुंपण कुंपण

                आपणा सर्वांना परिचयाचा असणारा शब्द आहे.  शेतीचे अथवा  जागा. विहीर बोअर. घराला. व अन्य कोणत्याही ठिकाणी की जिथे चोरी होण्याची भीती असणार्या भागाला करण्यात येणारी संरक्षण भिंत म्हणजे कुंपण होय. 

                  माग वळुन जरा बघा. ग्रामीण भागात सर्वात सुरवातीला वस्ती ही संकल्पना अमलात होती. त्यांनतर लोकसंख्या वाढली आणि वस्तीचे रुपांतर वाड्यामध्ये झाले. लोकं एकत्र समुह करून राहण्यास सुरुवात झाली त्यांच्यामागे कारणं होतें एकी. आणि एकामेकांचे संरक्षण वाडीचे रुपांतर गावांत झाले. आणि गावांत सुखसोयी भांडणतंटे. शुभ अशुभ कार्य. न्यायनिवाडा. सामाजिक. आर्थिक शैक्षणिक संरक्षण देण्यासाठी लोकांच्या मधून समाजहितासाठी समाजसेवक नेमण्यात आले.  यांच्यामुळे लोकांना संरक्षण मिळण्यास मदत झाली. त्यावेळी गावांत कोणताही व्यक्ति. कोणत्याही कारणासाठी येणारं असेल तर त्याला. #. गावाच्या वेशीवर असणाऱ्या. #. त्या समाजसेवकाना भेट देऊन आपण कशासाठी काय प्रयोजन घेऊन गावांत आलो आहे हे सांगून परवानगी घेऊन मगच गावांत दाखल होता येत होते.      आलेल्या व्यक्तिचा हेतू. पूर्वी गाव मागायला बैतकरी येत असत.  पिंगळे. वासुदेव. कडकलक्ष्मी वाले.  असे विविध समाजातील लोक येत असत  समाजातील लोकांना फायदेशीर असेलतरच त्याला गावांत प्रवेश देण्यात येत होता.  अन्यथा त्याला गावाच्या वेशीवर रोखले जात होतें.  

      आत्ता ग्रामपंचायत राज अमलात आले. ग्रामपंचायत अधिनियम १९५९ आणि त्याचवेळी झालेल्या सुधारणा व ग्रामपंचायत लेखासहिता २०११ व अन्य संलग्न कायदे यांच्या प्रभावी अंमलबजावणी साठी व ग्रामपंचायतींचे कामकाज सुरळीत व लोकाभिमुख व्हावे यासाठी शासन वेळोवेळी शासन निर्णय शासन आदेश व परिपत्रके काढत असते. ग्रामपंचायत राज अमलात आले आणि निवडणूक. दहशतवाद भ्रष्टाचार. गुंडगिरी. राजकीय दबाव मतदारसंघ निर्मिती. राजकीय नेते पुढारी बगलबच्चे यांचें गावागावात ठाण मांडून बसणे. यांना कोणताही रोखठोक नाही.  गावाला कसलही कुंपण नाही. कुणीबी या कवाबी या. यामुळे जनजीवनाला धोका निर्माण होण्यास सुरुवात झाली लोकांचे जीवन कष्टमय झाले. 

             गावांत. पोलिओ डोस सर्वे.   मतदार नोंदणी.  जनगणना नोंदणी.  बालक सर्वे.  गरोदर मातांचा सर्वे.  विधवा निराधार. ६५ वर्षापूढील वयोवृद्ध.  विविध आरोग्य शिबीर.  स्वच्छता.  विविध शासकीय अंगणवाडी.  बालसुधारगृहात. बालमजुरी वर रोख.  समाजहितासाठी योजना.  महात्मा गांधी रोजगार हमी योजना.  वन संवर्धन.  असे एक नाही अनेक योजना ग्रामपंचायत. पंचायत समिती जिल्हा परिषद. यांचेकडून. जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार राबविल्या जातात.  वरिल सर्व सर्वे साठी येणारे अधिकारी व कर्मचारी हे शासनाने जरी पाठविले असले तरी ग्रामपंचायत परवानगी शिवाय गावांत जावून सर्वे करू शकत नाहीत. म्हणजे शासनाचे चालणार सर्व काम नियमानुसार चालते.  याचा अर्थ असा होतो की गावाला सर्व अनिष्ट परिणाम यापासून वाचविण्यासाठी शासनाने प्रयत्न केला आहे आणि त्याची अंमलबजावणी ग्रामपंचायत त्यांच्या स्तरावर करतं आहेत. असेच. तालुकास्तरीय सुध्दा कामकाज चालते.  तसेच जिल्हा स्तरीय कामकाज चालतें. राज्य. व देश यांच सुध्दा कामकाज शासन निर्णयानुसार नियमानुसार चालतें.  म्हणजे सर्व स्तरांवर जनतेचे हित जोपासले जाते.  हाच त्यामागचा उद्देश असतो. 

                आज आपणांस असे पहावयास मिळत नाही. कारणं. गावाच्या मुंडकयावर बसलेले राजकीय भूत. आपसातील मतभेद.  फुटिरता. एकीचा अभाव. अज्ञान अशिक्षित.  व्यसनी पणा. अशा विविध कारणानें आपण मगे आहोत आणि राहणारच.  आज सर्व ग्रामीण. शहरी. भाग हा ठराविक. एल आय सी.  कंपन्या प्रोडक्शन.  जाहिरात.  प्रचार.  विविध शासकीय निमशासकीय योजनांसाठी होणारें मेळावे.   सिमेंट कंपन्या मेळावे.  महिला बचत गट मेळावे.  बांधकाम कामगार योजनांसाठी गावागावात फिरणारे एजंट. संघटना वाले. युनियन वाले.  असे विविध लोक गावागावात आपले दुकान मनमानी दराने चालवत असतात. यांना ग्रामीण भागात ग्रामपंचायत. शहरात नगरपरिषद.  महानगरपालिका.  या क्षेत्रात फिरणारे असे हजारों लोक. सर्वसामान्य माणसाला गोरगरीब लोकांना दिवसाढवळ्या लुटत आहेत.  यांचेवर कोणाचे नियंत्रण नाही का? अशा सर्व लोकानी. गावात. तालुका जिल्हा.  व अन्य ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत प्रवेश केला असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.  कारणं यांनी गावात तालुका जिल्हा यामध्ये प्रवेश करताना संबंधित शासकीय विभाग म्हणजे. ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका. यांचेकडे. त्या त्या भागात कोणताही नोंदणी किंवा अन्य कोणताही मेळावा किंवा कार्यक्रम आयोजित करावयाचा असल्यास त्या त्या विभागाची परवानगी काढणे गरजेचे आहे तशी परवानगी काढली नसेल तर कोणालाही कोणत्याही भागात विनापरवाना घुसखोरी करून देवू नका. आपल्या गावात शहरात तालुका जिल्हा यामध्ये येणारा नविन व्यक्ति किंवा व्यक्ति समूह. मग तो संघटना सेवाभावी संस्था युनियन किंवा कोणताही  राजकीय पक्ष यांना आपल्या संबंधित विभागांची परवानगी शिवाय आपल्या गावात प्रवेश देवू नका.  यापासून आपणच आपले संरक्षण आर्थिक लुट.  समाजातील तेढ.  गटा गटातील भांडणे.  यापासून आपणच आपल्याला वाचवू शकतो 

              समजा आपल्या गावात

नविन कोणी आलं. आपल्या गावातील सर्वात मोठा भाग असतो तो म्हणजे पिण्याचे पाणी.  समजा कोणी नविन आला आणि आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये काय  विषारी औषध टाकलें तर आपणांस केव्हा कळणार म्हणूनच म्हणतो कोणालाही नविन व्यक्तिला आपल्या गावात शहरात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये प्रवेश देवू नका 

         समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

खेळ - अपंग जीवनाचा

 


खेळ - अपंग जीवनाचा 

               जन्मापासून अवयव निकामी असणारा व्यक्ति म्हणजे अपंग होय. आज आपण आपल्या आजूबाजूला अशी अपंग व्यक्ती बघतो. त्यात मनोविकलांग. शारीरिक विकलांग. कसे दोन प्रकार असतात. त्यातच मानसिक अपंग. शारीरिक अवयव अपंग असणारे व्यक्ती. समाजाचा व त्यांच्या कुटुंबाचा अशा अपंग लोकांकडे बघण्याचा दृष्टीकोन अगदी वेगळाच असतो. समाजातील काही लोक. यांना. लंगड्या. पांगळया. बहिरया.मुकया लुळया. अशा विविध. अगदी खालच्या थराला जाऊन यांना संबोधतात. आरे. ज्याला एखादा जरी शारीरिक अवयव कमी असेल तर त्याला त्याचे दुःख विचारा. ज्याच्या घरांत. एकदा अपंग व्यक्ती आहे एखादे मुलं आहे त्यांना व त्याची सेवा करणार्या माउलीला त्याचे दुःख याचा जर आपण विचार जरी केला तरी अंगावर काटा उभा राहतो. त्या माऊलीला एक दिवस अशा अपंग मुलाला सोडून गावाला जाता येत नाही कोणाकडे जाता येत नाही. कोणीही आपले लहान मुल या माऊलीच्या हातात देत नाही कारण तीचे मुल अपंग आहे म्हणून. समाजाला अंधश्रद्धेची किड लागली आहे. खेळणारी बागडणारी मुल बघताच त्या आईचा उर भरून येतो  

          शासकीय आॅफिस मध्ये अपंग व्यक्ती यांना वर जाता येत नाही. शासकीय अधिकारी व कर्मचारी आपले आॅफिस सोडून खाली येत नाहीत. कारणं त्यांना तयाचे एसी आॅफिस सोडायचे नाही उन्हात जायाच नाही पण विचार करा एक अपंग आपल्यासाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत त्यांची कागदपत्रे देण्यासाठी उनहातच उभा असतो. पण अधिकारी व कर्मचारी यांना कसलीही किंमत देत नाहीत. हा अपंग केविलवाणा चेहरा करून माझ्या मदतीसाठी कोण येतय का याची वाट पाहत असतो. पण मदत मिळत नाही

          आज एक नवीन प्रकार पहावयास मिळतो तो म्हणजे नैसर्गिक अपंगत्व आणि अपघाती अपंगत्व. असे नविन प्रकरण समोर येत आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पैसे घेवून अपंग व्यक्तींना प्रमाणपत्र दिले जात आहे की जे अपघाती अपंग आहेत त्यांना सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळत आहे. प्रमाणपत्रावरिल टक्केवारी वाढविणे. यासाठी सुध्दा लाच द्यावी लागत आहे. त्यासाठी एजंट दलाल यांचे आणि सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉ यांचें लागेबांधे आहेत. यांनी ग्रिहाईक आणायचं तुमचं भरा आणि आमचं पण भरा. असा नविन फंडा राबविला जात आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉ आम्ही अपंग व्यक्तींना पाहिल्याशिवाय अपंग प्रमाणपत्र देत नाही. मग विचार करा. दोन्ही पायाने अपंग व्यक्तींना एस टी मधून प्रवास करताना काय त्रास होत असेल. एस टी महामंडळ मध्ये मोठ्या अक्षरात लिहिलेले असते अपंग व्यक्तींना चढणे व उतरणे साठी वाहक मदत करील. पण प्रत्यक्षात त्याच त्याला होईना मग तो अपंग व्यक्तींना मदत करील का ? नाही मग तो अपंग सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येण्यास काय काय त्रास सहन करतो. माझे मत आहे की शासन सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉ अधिकारी व कर्मचारी यांना पगार देत मग यांनी गावोगावी फिरून अपंग सर्वे केला म्हणून काय बिघडले. हे दवाखान्यात बसून शासनाचा पगार लाटतात. 

              कोरोना काळात तर सर्व टाळेबंदी लाॅकडाऊन जारी केल्यामुळे सर्व बंद त्यातच अपंग व्यक्तिला काम करता येतच नाही जे काही करत होतें त्यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली. त्यातच आमचें अपंग बांधव कोरोना पाॅझिटिवह आले त्यांना विलगीकरण कक्षात त्यांच्या घरातच ठेवण्यात आले. त्यांना खाण्याचा प्रश्न पडला.पैसा नाही त्यामुळे औषधांचा प्रश्न. ज्यांनी यांचे विलिनीकरण घरात केलें त्यांनी त्यांची बाकीची सोय केली का ? शासनाने ज्यांना गरज नाही त्यांना मोफत धान्य वाटप केले. आणि या अपंगांसाठी कोणत्याही प्रकारची मदत उभी केली नाही त्यातच समाजातील काही समाजसेवक यांनी अन्न धान्य किट या अपंग लोकांना दिलें. एवढेंच काय पण अपंग लोकांसाठी असणारी पेन्शन सुध्दा आधार कार्ड दिसत नाही. कागदपत्रे अपुरी अशी फसवी कारणे दाखवून सहा सहा महिने पेन्शन सुध्दा जमा झाली नाही. विचारणा करण्यासाठी संबंधित आॅफिस मध्ये या अपंग व्यक्तींना जाता येत नाही कोण अधिकारी व यांची विचारणा करत नाही. शासन म्हणतंय की प्रत्त्येक शासकीय कार्यालयात एक अपंगांसाठी मदत करणारे मदतनीस नेमण्यात यावे पण खरोखरच आहेत का ? अन्न सुरक्षा योजनेत शासनाने नमुद केले आहे की ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असणारे. वयोवृद्ध महिला. विधवा अपंग व्यक्तींना. महिन्याला दहा किलो धान्य मोफत देण्याचा निर्देश दिला आहे पण कोण राबवितो. अपंगाना वेगळी शिधापत्रिका त्वरित द्यावी आणि देताना अन्न सुरक्षा योजनेत सहभागी करून द्या असा शासन निर्णय असून सुद्धा आज एक वर्ष झाले तरी काही अपंग व्यक्तींना वेगळी शिधापत्रिका मिळाली नाही. सर्कल चौकशी. गोडाऊन इन्चार्ज यांची चौकशी. इतकेच काय पण. आॅफिस मधून अपंगांची जाणूनबुजून प्रकरणे गहाळ करणे असे प्रकार पाहावयास मिळतात. मग अशा अधिकारी व कर्मचारी यांचेवर शासन निर्णय अवमान केला प्रकरणी निलंबनाची कारवाई का करण्यात येवू नये 

            ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांच्यासाठी येणारा वार्षिक निधी यातील ३/५/ निधी अपंग कल्याणासाठी वापरणे बंधनकारक आहे यासाठी. शासनाने. १९९६/ २००५/२०१०/२०१२/२०१४/२०१५/२०१६/२०१७/२०१८/ नुसार अपंग वयकतिसाठी समान संधी हक्काचे संरक्षण आणि पूर्ण सहभाग अधिनियम १९९५ सन १९९६ पासून लागू करण्यात आला त्यातील कलम ४० अन्वये सर्व स्थानिक स्वराज्य संस्था यांनी आपल्या गावाच्या नगराच्या विकासासाठी येणार्या रककमेतील ३/५/ टक्के अपंग कल्याणासाठी वापरायची आहे 

         अपंग शालेय शिक्षण. उच्च शिक्षण. खेळाडू राष्ट्रिय सतरिय. आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती. घरकुल. अपंग विना जामीन विना तारण कर्ज योजना. वैद्यकीय मदत. प्रवास सवलत. दुकान शाॅपिंग माॅल. मंडी. दुकान उभारण्यासाठी अर्थ सहाय्य. बस स्टॉप. डेपो मध्ये वहिलचेअर उपलब्ध करून देणे. अपंग बचत गट. अपंग लग्नासाठी मदत. रात्र निवारा अपंग भुवन. पेन्शन योजना. अपंग बेरोजगार भत्ता. अपंग योजनांचा प्रसार प्रचार.    

         यासाठी विविध प्रकारच्या कॅटेगरी करण्यात आली आहे त्यानुसार ८० ते १००/टक्के

            ६० ते ८०/टक्के

             ४०/ ते ६०/टक्के अशी वर्गवारी करण्यात आली आहे पण वरिल सर्व योजना कागदावरच आहेत त्यासाठी आत्ता सर्व अपंग बांधवांनी उठाव करण्याची गरज आहे शासन झोपले आहे त्याला ढोल वाजवून जाग करण्याची गरज आहे 

         समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

दक्षता समिती

 


दक्षता समिती

                  शासनाने गोरगरिबांना सकस आहार रास्त भावात मिळावा.  रेशनकार्ड वर्गवारी. अंत्योदय. बी पी एल.  प्रधान लाभार्थी कुटुंब.  केशरी शिधापत्रिका धारक. हा सर्वे कोणत्या प्रकारे झाला आहे.  त्यात खरोखरच गरज असणारे लाभार्थी आहेत का.  रेशन दुकानदार रेशनकार्ड धारकांच्या सोबत कसा व्यवहार करतात. त्यांच्याकडे वितरण करण्यात आलेला अन्न धान्य. याचा दर्जा काय आहे.  त्याचे वितरण रेशन दुकानदार व्यवस्थित करतात का.  आणि ते अन्न धान्य गरजू लोकांना त्यांच्या हक्कानुसार होत काय.  रेशन अन्न धान्य व रेशन दुकान तपासणी करणे. यासाठी एक समिती नेमली जाते. त्याला दक्षता समिती म्हणतात

    सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत वितरण करण्यात येणार्या जीवनावश्यक वस्तूंवर देखरेख ठेवण्यासाठी दक्षता समिती गठीत करण्यासाठी शासन निर्णय. दक्षस. 1007/ प्र क्र 548/नापु 21/ जानेवारी 2008 नुसार खालील प्रमाणे गाव पातळीवर दक्षता समिती गठीत केली जाते

(१) सरपंच ग्रामपंचायत. अध्यक्ष

(२) पोलिस पाटील सदस्य

(३) ग्रामसेवक. सदस्य

(४) अधक्ष विविध कार्यकारी सोसायटी.  सदस्य

(५) तीन महिला. सदस्य

(६) विरोधी पक्षाचे दोन सदस्य. यापैकी एक महिला.  सदस्य

(७) अनुसूचित जमाती एक प्रतिनिधी.  सदस्य

(८) अनुसूचित जातीचा एक प्रतिनिधी.  सदस्य

(९) एक सामाजिक कार्यकर्ता.  सदस्य

(१०) तलाठी.  सदस्य सचिव

अशा प्रमाणे गोरगरीब जनतेला न्याय मिळण्यासाठी दक्षता समिती गठीत करण्यात येते दक्षता समिती बैठक महिन्यातून एकदा घेण्यात यावी.  प्रत्त्येक महिन्यात घेण्यात आलेल्या बैठकीचा आढावा पुढील महिन्याच्या १० तारखेपर्यंत शासनास न चुकता सादर करावा. आपल्या गावात तालुका जिल्हा येथे अशी कोणती दक्षता समिती आहे का? आपणांस या बैठकीत बोलावले जाते का ? 

# समिती काय कार्य करते #

(१) गावाची लोकसंख्या.  शिधापत्रिका आणि एकांकाची संख्या.  जीवनावश्यक वस्तू परिमाण.  या आधारें जीवनावश्यक वस्तूंची गरज आणि प्रत्यक्ष उचल याचा तपशील तपासून आढावा घेणे

(२) रास्त भाव दुकानात झालेली जीवनावश्यक वस्तूंची आवक दक्षता समिती किमान दोन सदस्यांनी प्रमाणित करणे. व त्याची प्रत तहसिलदार आणि दुकानदार यांना देणे

(३) जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा. आवश्यक नियतन. प्रत्यक्षात झालेली आवक. उचल गरज. व साठयाचया तुटीचा आढावा घेणे

(४) रास्त भाव दुकानदार यांचेकडून शिधापत्रिका धारकांना पुरविल्या जाणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंची प्रत तपासणी. करणे व त्याबाबत अहवाल तहसिलदार यांना देणे

(६) रास्त भाव दुकानातून शिधापत्रिका धारकांना नियमितपणे विहित प्रमाणात शासन निर्धारित किंमतीत आणि शासनाने निश्चित केलेली प्रत असलेल्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने आवश्यक बाबींवर विचार करून त्याबाबतचा अहवाल तहसिलदार यांना सादर करणे

(७) अधिकृत शिधावाटप / रास्त भाव दुकानदारांच्या गैरव्यवहार विरुद्ध करण्यात येणारी कारवाई कामी सुसुत्रता आणणेबाबत रास्त भाव धान्य व केरोसीन दुकान तपासणी करणे 

        पण आज प्रत्येक गावात ज्याची सत्ता आहे त्यांच्याच बगबलबचे यांचेच रेशन दुकान आहे त्यामुळे त्यांची तपासणी करायला कुठली दक्षता येणार म्हणजे समिती तपासणी हे सर्व गोरगरीबांने एखादे दुकान किंवा विधवा अपंग निराधार यांनी जर रेशन दुकान घेतलें असले तर त्यांना हे चोर जगून देत नाहीत

  # दक्षता समिती आणि रास्त भाव दुकानदार यांचे दोष आणि कारवाई # तीन प्रकारचें दोष रेशन दुकानदार यांचेकडे आढळतात

(१) स्वस्त धान्य दुकानदाराने पहिल्या व शेवटच्या पानावर सहि न करणे

(२) धान्य दुकानांचा नंबर / दुकानातून वितरित होणारे अन्न धान्य/ दुकानांची वेळ / दुकानदार मोबाईल नंबर.  / दर्शविणेत येणारा फलक नसणे

(३) रेशन दुकान परवाने दुकानांत न ठेवणें

(४) धान्य नमुने/ दराचा फलक / धान्य पारदर्शक बाटल्यांत न ठेवणं

(५) काही पावतीवर रेशन अन्न धान्य घेणा-या ग्राहकांच्या सह्या किंवा अंगठे न घेणें

 #दक्षता. समिती कडून दंडात्मक कारवाई #

(१) ताकीद देणे

(२) ५०/टक्के पर्यंत अनामत रक्कम जमा न करणे

   # मध्यम स्वरूपाचे दोष #

(१) दिलेल्या पावत्या टाकणे.  विक्री रजिस्टर न ठेवणें

(२) परवान्यांने उचलेलेला माल त्याच दिवशी रजिस्टर मध्ये न नोंद करणे

(३) शिधापत्रिका धारकांचया शिधापत्रिकेवर मालाची नोंदणी न करणे

(४) कार्ड धारकांना शिधापत्रिकेवर दर्शविलेल्या माल मिळत नाही अशी तक्रार नोंदविणे

(५) पुस्तकी शिल्लक व प्रत्यक्ष साठे यात तफावत असणे

(६) सातत्याने ग्राहकांच्या सह्या अंगठे पावतीवर न घेणें

(७) स्वस्त धान्य दुकान वेळेवर व निश्चित काळात न उघडणे

  # दक्षता समिती कडून दंडणीय कारवाई #

वरील प्रमाणे एक किंवा अनेक दोष आढळल्यास खालील प्रमाणे कारवाई करणेत यावी

वरील प्रमाणे दोष आढळल्यास रेशन दुकानदार यांची अनामत रक्कम सरकार जमा करण्यात यावी

    #गंभीर. स्वरुपाचे दोष #

(१) अन्न धान्य व इतर वस्तू शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त दराने विकणे. वेगवेगळ्या प्रकारचें हिशोब एकामेकाशी न जुळणे

(२) महाराष्ट्र फुडग्रेन रेशनिंग ( सेकंड ) आॅरडर १९६६ व महाराष्ट्र अनुसूचित वस्तू ( वितरणाचे विनिमय ) आदेश १९७५ अन्वये विहित केलेली वेगवेगळी रजिस्टर न ठेवणें

(३) १९६६ व १९७५ या आदेशांचे पालन न करणे

(४) मालाचा गैरव्यवहार व दुकानात माल न आणणे किंवा उचलेला रेशन माल रास्त भाव दुकानात न आणता त्याची अन्यत्र विक्री करणे

(५) अधिकृत वजन मापे न करणे

(६) माल न उचलणे किंवा दुकान बंद ठेवणे

  #करावयाची. दंडात्मक कारवाई #

वर नमूद केलेल्या गंभीर स्वरूपाचे एक किंवा अनेक दोष आढळल्यास संपूर्ण अनामत रक्कम जप्त करण्यात यावी व दुकानाचा परवाना रद्द करण्यात यावा. तसेच शिधावसतू काळाबाजार मालाची अफरातफर इ दोष आढळून आल्यास जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३/७ अन्वये दुकानदारा विरोधात खटले दाखल करण्यात यावेत 

          वरील प्रमाणे सर्व कारवाईची आखणी करावयाची असल्यास त्यासाठी मोठ्या लोकांची रेशन दुकान काढून घ्या.  बचत गटांच्या नावाखाली रेशन दुकान चालते मग ते दुकान महिला बचत गटांना चालविण्यासाठी बंधनकारक करा अशी किती दुकानें आहेत त्यांनी बचत गटांचा वापर करून पुरवठा विभाग यातील अधिकारी व कर्मचारी यांना हाताला धरून रेशन दुकाने मंजूर करून घेतली आहेत. 

        २०२० मध्ये सांगली जिल्ह्यातील ९९० रेशन दुकान परवाने रद्द करण्यात आले होते ती दुकानें खरोखरच बंद आहेत का. 

      समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

शासकीय गोदाम - अन्न धान्य साठा

 


शासकीय गोदाम

              आपल्याला वितरण करण्यात येणारा शासनाकडून रेशन अन्न धान्य साठा. प्रत्त्येक तालुक्याच्या ठिकाणी व जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय गोदामात ठेवला जातो. तो कशाप्रकारे साठवण व संरक्षण करण्यात येतो हे आपण कधीच पाहत नाही. शासनाकडून सर्वांना स्वच्छ निवडक. सकस निर्भेळ. असे अन्न धान्य वितरण होण्यासाठी प्रत्येक शासकीय गोदामात. सक्षम प्राधिकारी अधिकारी व कर्मचारी हमाल वाहतूक व्यवस्था. अन्न किडणे कुजने असे होऊ नये यासाठी विविध पाऊडर केमिकल. केले जाते का. ? आपण आपल्या शहरांचे तालुक्याचे जिल्हा यांचे प्रथम नागरिक या नात्याने कधीच बघत नाही त्यामुळे. रेशन शासकीय गोदामात येणारा रेशन अन्न धान्य साठ किती. गाड्यांच्या गाड्या शासकीय गोदामातून बोगस मार्गाने विक्री केली जाते वितरण किती होतो. धान्याचा दर्जा काय आहे ? धान्य कशाप्रकारे ठेवलें जाते. याची आपण कधी गांभीर्याने विचार करणारं का असच चालणार आज मी जी माहिती देणारं आहे त्याप्रमाणे आपल्या भागातील शासकीय गोदामात जाऊन तपासणी करा रजिस्ट्रर तपासा तो आपला अधिकार आहे 

           * शासकीय गोदामाची बांधणी जमिनीपासून एक ते दिड फूट उंचीवर केली जाते. यामुळे उंदीर घुशी. आणि तत्सम प्राण्यांना गोदामात प्रवेश करता येणार नाही. बहुतांश शासकीय गोदामावर सिमेंट पत्रे छत म्हणून वापरले जातात. 

 ‌. * शासकीय गोदाम तपासणी अधिकार

गोदाम तपासणी अधिकार व जबाबदारी

* जिल्हाधिकारी सवता किंवा उपजिल्हाधिकारी दर्जाहून कमी नाही असा अधिकारी जिल्ह्यातील तालुक्यातील गावातील कोणत्याही शासकीय गोदाम तपासणी करु शकतात

* जिल्हा पुरवठा अधिकारी. जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी दरमहा सखोल तपासणी तसेच जिल्ह्यातील इतर गोदामांची आवश्यकतेनुसार तपासणी करु शकतात

* उपविभागीय अधिकारी कार्यालय. मुख्यालयाच्या ठिकाणी महिन्याच्या एकदा व इतर तालुक्यात दौरा असताना तपासणी करु शकतात

*तहसिलदार यांनी त्रेमासिक सखोल साठा पडताळणी तसेच दरमहा पुरवठा निरीक्षक मार्फत तपासणी करणे आवश्यक आहे

* पुरवठा निरीक्षक/ पुरवठा अव्वल कारकून. /गोदाम व्यवस्थापक यांनी दरमहा सखोल साठा पडताळणी करणे आवश्यक आहे

* मा संचालक यांचें आदेशानुसार गोदाम तपासणी पथक राज्यातील कोणत्याही गोदामांची तपासणी करु शकतात

* विभागनिहाय तपासणी पथक किंवा उप आयुक्त पुरवठा स्वताच्या किंवा त्यांच्या पथका मार्फत विभागातील गोदामांची तपासणी करु शकतात

** धान्य गोदामात ठेवण्यात येणारया नोंदवह्या व फाॅरम **

* रजिस्ट्रर नंबर १

* प्रत्त्येक धान्य प्रकारासाठी स्वतंत्र भाग केले आहेत कां

* या नोंदवह्या मधील थपपया चढत्या क्रमाने असाव्यात. जसे. ए पी एल. एक क्रमांक. अंत्योदय आवक असेल तर त्यासाठी दोन क्रमांक

* प्रत्त्येक अन्न धान्य थप्पी ही निरंक झाली पाहिजे. उदा. एका थपपीत १० किलो धान्य शिल्लक आहे. २० किलो धान्य द्यायचे आहे तर कमी असलेली थप्पी अगोदर संपवावी. व उर्वरित धान्य दुसर्या थप्पी मधून द्यावे

* या नोंदवहीत प्रतिवारीबाबत रकाना क्रमांक २२/ दर १५ दिवसांनी लिहून त्याचा अहवाल जिल्ह्यात पाठवणे आवश्यक आहे. धानयातील किटकांच्या प्रमाणानुसार. अ. ब. क. प्रतिवारी केली जाते

* एम बी. शेड. गोदामात थप्पी रचण्याच्या आगोदर भिंतीपासून दोन फूट. दोन दरवाज्याच्या पॅसेज चार फूट व समोर चार फूट जागा सोडून तीनं इंच जाडीचा आखणी पांढ-या रंगाच्या आॅईल पेंट करून घेणें आवश्यक आहे

* गोदाम तूट किंवा स्वच्छता तूट यांचीही नोद थप्पी नोदवहित केली जाते तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ ठेवलेल्या थप्पी मध्ये १/ टक्के. गोदाम तूट मान्य केली जाऊ शकते. परंतु योग्य चौकशी शिवाय सरसकट तूट मान्य करता येणार नाही. जिल्हाधिकारी रुपये. २५०००/ व जिल्हा पुरवठा अधिकारी ७५००/ पर्यंत तूट मान्य करू शकतात

   ** आपणांस पहावयास मिळणारी शासकीय गोदाम मधील रजिस्टर **

(१) e रजिस्ट्रर. साठा सटाॅक थप्पी रजिस्टर

(२) e -1 रजिस्ट्रर वाहतूक पास नोंदवही

(३) e -2 रजिस्ट्रर. बिन रेशन कार्ड रजिस्टर

(४) f. रजिस्ट्रर. गोदाम तूट रजिस्टर

(५) f-१ रजिस्टर. स्वच्छता तूट रजिस्टर

(६) g. रजिस्ट्रर. वसुली रजिस्टर

(७) h. रजिस्ट्रर. परमिट रजिस्टर

(८) h-१ ‌. रजिस्ट्रर तालुका परमिट रजिस्टर

(९) h. -2. रजिस्ट्रर. तालुका चलन रजिस्टर

(१०) h -3. रजिस्ट्रर. जिल्ह्याअंतरगत. व बाहेरून आवक वाहतूक रजिस्टर

(११) I. रजिस्ट्रर. गोदाम भाडे

(१२) j from. आवक जावक शिल्लक आठवडा गोषावार

(१३) k रजिस्टर जड संग्रह नोंदवही

(१४) l रजिस्टर. हमाली रजिस्टर

(१५) l-1. रजिस्ट्रर. बिल रजिस्टर

(१६) m रजिस्टर. वाहतूक खर्च/ पास रजिस्टर

(१७) n रजिस्टर रिक्त बारदान/ सुतळी रजिस्टर

(१८) o रजिस्टर नवीन बारदान/ सुतळी खरेदी आणि वितरण रजिस्टर

(१९) r. From. रजिस्ट्रर तालुका आवक जावक फाॅरम

(२०) r -1. From. गोदामातील आवक फाॅरम

(२१) r. -2 from. प्रलंबित बटवडा गोषावार

(२२) a रजिस्टर प्रलंबित आवक गोषावार

(२३) s रजिस्टर जिल्हा अंतरंग वाहतूक 

(२४) t रजिस्टर जिल्हा बाहेर होणारी वाहतूक

(२५) z रजिस्टर अखाद्य धान्य साठा 

(२६) चाचणी नोद वही आवक धान्य तूट व वजन रजिस्टर

        आजच आपल्या विभागातील शासकीय गोदामाला भेट द्या आणि वरील प्रमाणे सर्व उपलब्ध आहे का याची खात्री करा. माहिती मी रोज देत जाईन मदत तुमची मला पाहीजे

          समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा2013 रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

9890825859

सामाजिक कार्यकर्ते व आरटीआय कार्यकर्ते व्हिसल बलोअर यांना पोलीस संरक्षण देणे बाबत

 सामाजिक कार्यकर्ते व आरटीआय कार्यकर्ते व्हिसल बलोअर यांना पोलीस संरक्षण देणे बाबत



        महाराष्ट्र शासन

         गृह विभा माहिती

शासन निर्णय क्रमांक सीआरटी (२०१२)प्र क्र (६९६)/पोल १

जागतिक व्यापार केंद्र सेंटर  १/१० वा मजला

कफ परेड मुंबई  ४०००

तारीख २७ फेब्रुवारी २०१

           प्रस्तावना

राज्यातील विविध भागांतील सामाजिक कार्यकर्ते/ आरटिआय कार्यकर्ते व्हिसल बलोअर यांचेवर विशिष्ट कामांत हितसंबंध गुंतलेल्या समाजकंटकांकडून प्राणघातक हल्ला होण्याच्या घटना घडतात त्यामुळे अशाच एका प्रकरणाची सुनावणी मा उच्च न्यायालयाने दखल घेऊन सुमोटो रिट पिटिशन क्रमांक/मध्ये वेळोवेळी झालेल्या सुनावणी दरम्यान सदर कार्यकर्त्यांना पोलिस संरक्षण पुरविण्याबाबत शासनास काही सुचना केल्या आहेत त्या अनुषंगाने यासंदर्भात शासनाच्या वतीने मा उच्च न्यायालयात शपथ पत्र देखील दाखल करण्यात आले आहे या सर्व परस्थिती विचार करून सामाजिक कार्यकर्ते व/ आरटिआय कार्यकर्ते व व्हिसल कार्यकर्ते बलोअर यांना संरक्षण पुरवण्याबाबत सर्वसमावेशक सूचना देण्याची वाव शासनाच्या विचाराधीन हो

               शासन निर्ण

सामाजिक कार्यकर्ते/ आरटीआय कार्यकर्ते व व्हिसल बलोअर कार्यकर्ते यांना पोलीस संरक्षण पुरवण्याबाबत शासन निर्णय नुसार खालीलप्रमाणे निर्देश देत आहे

(१)  यासंदर्भात उपरोक्त अनुक्रमांक ३व ४ येथील शासन निर्णयाअनवये गठित केलेल्या समित्यांची खालील प्रमाणे पुनर्रचना करण्यात येत आ

a / जिल्हा स्तरावरील समीती

        (१) पोलिस अधीक्षक.          अध्यक्ष

         (२). पोलिस उपअधीक्षक      सदस्य

         (३) पोलिस निरीक्षक (स्थानिक गुन्हे शाखा ).   सद

         (४). पोलिस निरीक्षक ( जिल्हा विशेष शाखा ) सदस्य

 b/.    पोलिस आयुक्तालय स्तरावरील समीती.

          (१) पोलिस आयुक्त / सह आयुक्त          अध्यक्ष

          (२) सह / अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे)    सदस्य

          (३). अतिरिक्त पोलीस आयुक्त/ पोलिस उप आयुक्त (विशेष शाखा ) सद

 c/ पोलिस मुख्यालयात स्तरावरील समीती

           (१) अप्पर पोलीस महासंचालक ( का व सु

            (२) महाराष्ट्र राज्य मुंबई.         अध्यक्ष

           (३) ‌ अप्पर पोलीस महासंचालक (विशेष अभियान

           (४) महाराष्ट्र राज्य मुंबई विशेष पोलिस महानिरीक्षक ( सुरक्षा 

            (५) राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई         सदस्य

सामाजिक कार्यकर्ते व व्हिसल बलोअर कार्यकर्ते व आरटिआय कार्यकर्ते यांनी त्यांच्याशी संबंधित कार्यक्षेत्रातील पोलिस आयुक्त/ पोलिस अधीक्षक यांचेकडे संरक्षण मिळणे बाबत अर्ज करावे

सदर अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पोलिस आयुक्त/पोलिस अधीक्षक अर्जदारास तत्काळ संरक्षण देणे आवश्यक आहे किंवा कसे याबाबत निर्णय घेतील व त्यांना त्याप्रमाणे संरक्षण पुरवितील तथापि सदर अर्ज करण्याची अ/ब समितीच्या बैठकीत ठेवण्यात ये

 संबंधित समितीने अर्ज रद्द केला तर अर्जदारांना यांना पुरविण्यात आलेले संरक्षण तत्काळ काढून घेण्यात येईल प्रस्तुत संरक्षण मान्य केल्यास मानयतेवर सदर अर्ज अंतिम समिती कडे पाठविण्यात येई

     प्रस्तुत अर्जदाराच्या प्रकरणी (क) समितीचा निर्णय होईपर्यंत संरक्षण कायम राहील तथापि या समितीने संरक्षण नाकारले तर संरक्षण काढून घेण्यात येईल.  

       सदर समित्यांनी सरक्षणास मान्यता त्या संरक्षण अवधी किंवा कशा प्रकारची सुरक्षा पुरवण्याची आहे यांचा स्पष्ट उल्लेख संरक्षण मंजुरी आदेशात करावा लागतो

       समितिने नमुद केलेल्या संरक्षणाचा अवधी पूर्ण होण्याचे दिवस आधी संबंधित पोलिस आयुक्त / पोलिस अधीक्षक यांनी सदर संरक्षण चालू ठेवावे किंवा कसे याबाबत चे आभिप्राय समितीकडे सादर करावे

सामाजिक कार्यकर्ते व व्हिसल बलोअर कार्यकर्ते व आरटिआय कार्यकर्ते यांनी संरक्षणासाठी अर्ज केला नाही तथापि संरक्षण पुरवावे व याबाबतचा प्रस्ताव अ/ब समितीच्या बैठकीत ठेवण्यात यावा

       सामाजिक कार्यकर्ते व व्हिसल बलोअर कार्यकर्ते व आरटिआय कार्यकर्ते हे त्यांना वाटलेस (क) समितीकडे देखील परस्पर अर्ज करू शकती

        अ / ब /क/ समितीच्या बैठका प्रत्त्येक महिन्यात दोन वेळा (दिवसांच्या अंतराने ) घेण्यात याव्या

          वरील समिती ने दिलेले संरक्षण हे निःशुल्क राहि

सामाजिक कार्यकर्ते व व्हिसल बलोअर कार्यकर्ते व आरटिआय कार्यकर्ते यांनी केलेल्या  अरजानुसार त्यांना देण्यात आलेल्या धमक्या. आरोप. हल्ले याबाबतची चौकशी तत्काळ सहायक पोलिस आयुक्त/पोलिस उपअधीक्षक यांचेपेक्षा कमी दर्जा नसलेले अधिकारी यांनी  पुढे येवून करावे

        प्रकरणाची सखोल व निःपक्ष चौकशी जलद गतीने होण्यासाठी नियंत्रक यंत्राणा म्हणून पोलिस मुख्यालयातील समिती (क) वेळोवेळी आढावा घे

        मा न्यायालयाने / मानवी हक्क आयोगाने आदेशीत केल्यास त्यांना आवश्यक ते सहकार्य पुरविण्यात येई

         या पूर्वी धमक्या आरोप हल्ले बाबत केलेलीं तक्रार सामाजिक कार्यकर्ते/व आरटीआय कार्यकर्ते / व्हिस्ल बलोअर यांच्या जिवितास अतिधोकादायक व्यक्ति / संस्था यांची माहिती प्रत्त्येक समिती तयार करेल तसेच संबंधित व्यक्ती / संस्था यांचे ओळखीयावत योग्य ती कारवाई करून गोपनियता राखली जाई

  सदर शासन निर्णय महाराष्ट्र राज्यपाल यांचें आदेशानुसार व नावाने जारि करण्यात आला आहे

            (इ मु काझी )

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर यांचें वतीने महत्व पूर्ण माहिती आपणासाठी सादर केली आहे शासन निर्णयानुसार माहिती अधिकार दाखल करणारे व सामाजिक कार्यकर्ते यांना आत्ता संरक्षण देणे साठी शासन बांधील आहे पण आपण कोणीही या संरक्षणाचा गैर वापर केल्यास कायद्यानुसार आपल्यावर सुध्दा कायदेशीर कारवाई करण्यात येईल कायदा सर्वांसाठी समान आहे

समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपू

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा 2013 रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जि

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९  ल्हार   ललईललंतल त लईलत) ) )स्य  स्य हेयती३०५१गन

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या