आपली भाषा. आणि आपले मत

 


आपली भाषा आणि आपले मत

                लिखित भाषा कथित भाषा. सांकेतिक भाषा असे भाषेचे ज्ञान आहे. नेपाळी. असमिया. बंगाली. गुजराती. बोडो. डोंगरी. कन्नड. काश्मीरी. मराठी. उडिया. संस्कृत. तमिळ तेलुगू मल्याळी. सिंधी. सामान्य भाषा. बोली भाषा. विभाषा. राष्ट्रभाषा. राजभाषा. साहित्याची भाषा. कृत्रिम भाषा. संपर्क भाषा. अश्या विविध माध्यमातून आपण आपल्या मायबोली भाषेचा वापर करत असतो 

  भाषा हे इतरांशी संपर्क साधण्याचे व आपले विचार व्यक्त करण्याचे साधन आहे. पण आपली भाषा ही आपल्या व्यक्तीमत्त्वाचाच म्हणून म्हणतो तसं जणू एक भाग असते. आपण लहाणपणापासून आपल्या भाषेच्या सहवासात राहतो. वाढतो त्यामुळे सवभाषेशी आपल्या मनाचे अतूट नाते निर्माण होते. कारणं आपण आपल्या सवभाषेतून आपले विचार आपण प्रभावी पणे मांडू शकतो. त्या भाषेतील प्रतिमा शब्दप्रयोग हे सहजपणे आपल्या पचनी पडलेले असतात. एक साहित्यिक आणि सांस्कृतिक प्रपंच त्या भाषेशी जोडली गेलेली असते. म्हणूनच आपल्या भाषेबद्दल आपल्याला नैसर्गिक जवळिक वाटते. सवभाषेबधदल आपल्या मनात खोलवर निष्ठा असते. परभाषिक प्रदेशात राहतात. वावरताना आपले सवभाषाप्रेम जास्त पक्के बनते. आपण आपली भाषा बोलणारी मंडळी शोधू लागतो. त्यांच्या सहवासात राहतो. एकत्र अणि एकाच वसाहतीत राहतो. सवभाषिक व्यक्ति भेटली की व परभाषिका देखील आपण चटकन आपल्या भाषेत बोलतो. सवभाषेबधदलचे प्रेम इतर मार्गांनी व्यक्त होते. उदा. आपण सहसा इतर भारतीय भाषा शिकत नाही. अगदी परप्रांतात राहवे लागले तरी कामापुरती आपण तेथील भाषा शिकतो पण आपली भाषा मायबोली विसरत नाही. हा आपल्या भाषेबद्दल आपला अभिमान असतो. अन्यथा मात्र मराठी माणूस तमिळ शिकला किंवा कन्नड. आसामी शिकला अशी उदाहरणे विरळच. इतर भाषेचे स्वरूप त्यांची लिपी त्या भाषेमधील साहित्यिक यांच्याबद्दल आपल्याला काही माहिती नसते. आणि त्याची माहिती असावी असे आपणांस वाटत नाही खरेतर आपला सवभाषिमान हा इतर भाषाबधदल आपल्या पूर्वग्रह अज्ञानावर आधारित असतात

              विशिष्ट भाषा ही आपण विशिष्ट धर्मियांशी जोडून टाकतो. उर्दू ही मुस्लिम भाषा किंवा पंजाबी ही शिख लोकांची भाषा असे आपले समिकरण असते. किंवा उत्तरेकडील सर्व लोक हिंदी भाषिक असतांत असाही समज असतो. आपली भाषा सोडून इतर भाषा मागासलेल्याच आहेत असेही आपण मांनतो. मराठी माणूस हिंदीची ही टवाळी करतो आणि दक्षिणात्य भाषाविषयी त्याला पूर्वग्रह असतो. गुजराती. मारवाडी. या भाषा आपण नुसत्याच व्यापारी भाषा समजतो. असे सर्वच भाषिकांचे होते. दक्षिण भाषेमध्ये आपसात जणू काहीच फरक नाही असे धरून आपण त्याची टिंगल करतो. परभाषेविषयी सुप्त आक्रस काही वेळा या पूर्वग्रहाचया पाठीशी असतो. तसेच भाषेबरोबर येणारा प्रांतिक अभिमान हेसुद्धा परभाषा द्वेषाचे कारणं असते. तामिळ लोकांबद्दल किंवा मल्याळी लोकांबद्दल असणार्या रागामुळे आपण त्यांच्या भाषा निकालात काढतो. परप्रांतीया बद्दल. दुरावरावयामुळे. आणि स्पर्धेमुळे त्यांच्या भाषाविषयी आपल्याला सहानुभूती वाटत नाही

      भारतीय भाषा बद्दल असा दुरावा असला तरी इंग्रजी भाषेला आपण वेगळं माप लावतो. ती परकी भाषा आहे असे आपण फारसं मानत नाही. पण उर्दू भाषा परकी आहे ती मुस्लिम धर्माची आहे तर त्याबद्दल आपल्या मनात एवढा राग का ? आपण इंग्रजी सारख्या परक्या भाषेला जागतिक भाषा किंवा ज्ञानभाषेचा दर्जा देतो एकंदरीत इंग्रजी भाषेबद्दल आपल्या मनांत भावना मोठ्या गंमतीचया असतात. या भाषेबद्दल काय भुमिका घ्यावी याबाबत आपला नेहमी गोंधळ उडतो. परकी भाषा म्हणून तिची हकालपट्टी करावी की स्पर्धेत टिकून राहण्यासाठी ती भाषा आत्मसात करावी याबद्दल आपली भूमिका द्विधा असते. मात्र आपल्या समाजात इंग्रजी भाषेला प्रतिष्ठा आहे. देशी भाषापेक्षा इंग्रजी साहित्य. वर्तमानपत्राते. इत्यादी अधिक दर्जेदार आहेत. अशी आपली समजूत असते. इंग्रजी येणार्याला. बरेच काही समजत असणार असे आपण गृहीत धरून चालतो. त्यामुळे कटाक्षाने इंग्रजी शिकणारा. इंग्रजी बोलणारा. इंग्रजी वाचणारा. असा वर्ग आपल्या समाजात निर्माण झालेला दिसतो. इंग्रजी मुळे या वर्गामध्ये आत्मविश्वास आणि अहंगंड निर्माण झाला आहे. या वर्गातील लोक गप्पाही इंग्रजी भाषेतच मारतात. आणि आपल्या भावनाही इंग्रजी भाषेत व्यक्त करतात. घरात कुटुंबियांनी एकामेकाशी इंग्रजीत बोलणे हा या वर्गाचा एक मुख्य गुणधर्म असतो. त्यांच्या दुसर्या टोकाला इंग्रजी नीट न येणारा मोठा जनसमुदाय असतो. पण त्यालाही हे आंगलभाषावरचसव. मान्य असल्यामुळे आपल्याला इंग्रजी येत नाही म्हणून तो नयुनगंडाने पछाडलेला असतो. इंग्रजी न येणे तोही कमीपणाचं मानतो. मग तोडकमोडक इंग्रजी बोलन वाचन. किंवा इंग्रजी शब्द वापरण्याची सवयी लावून या नयुनगंडाची भरपाई करण्याचा प्रयत्न केला जातो. कित्येक वेळा इंग्रजी विषयीचे प्रेम सवभाषाविषयीचे. सवभाषाप्रेम मात करते किंवा खरे तर अनेक जण इंग्रजी भाषेला आपली भाषा मानतात

          भाषेप्रमाणे आपल्याला आपल्या प्रदेशांचा अभिमान असतो. त्या त्या प्रदेशांचा निसर्ग तिथली संस्कृती. प्रादेशिक इतिहास. कला विज्ञान. हे सर्वच आपल्या अभियानाचा विषय असतात. म्हणूनच आपली महाराष्ट्रीय किंवा उडिया किंवा बंगाली अशी खास प्रतिमा तयार होते. बहुतेक वेळा हि प्रादेशिक अस्मिता भाषेवरील निष्ठेची सलगनता असतें. भाषेखेरीज या प्रादेशिक अस्मितेचे प्रगटीकरण होते ते आपल्या इतिहासातून आपल्या प्रदेशात वीरश्री. स्वातंत्र्य प्रेम. धाडस. कल्पकता. यासारखे गुण कसे आढळतात हे आपण ऐतिहासिक दाखलयानिशी दाखवून देत असतो. या इतिहासाचा तपशिल आपल्याला फारसा ज्ञात नसतो. पण इतिहासाच्या ढोबळ प्रतिमा आपला प्रदेशभिमान घडविण्यास पुरेशा असतात. मुघल सत्तेशी आपणच टक्कर दिली असा अभिमान मराठी माणूस बाळगतो त्यातूनच मग त्या त्या भागातील ऐतिहासिक व्यक्ती या प्रादेशिक अस्मितेची प्रतिके बनतात महाराष्ट्र म्हणलं की शिवाजी महाराज हा आपल्या प्रदेश अभिमानाचा अविभाज्य घटक आहे भाग आहे. तीच गोष्ट महाराणा प्रताप बाबतींत किंवा इतर वीरपुरुष संत समाजसुधारक या सर्वांच्या बाबतीत घडते या प्रादेशिक अस्मिते मध्येही इतर प्रदेशापेक्षा आपण श्रेष्ठ आहोत अशी धारणा आपणा मध्ये घर करून बसली आहे

          समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या