मानवाधिकार संरक्षण अधिनियम १९९३ कशासाठी ?

 


मानवाधिकार संरक्षण अधिनियम १९९३ कशासाठी

                आपण समाजात राहतो आपल्याला प्रत्येकाला व्यक्ती म्हणून हक्क आणि अधिकार असे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे परंतु समाजात आपल्याबरोबर इतर व्यक्ति सुध्दा असतात आणि त्याच्याशी आपले संबंध असतात. एकाच वेळी व्यक्ती म्हणून आपल्या इच्छा आकांक्षा आणि गरजा असतात उदा अन्न वस्त्र निवारा कौटुंबिक जीवन इत्यादी आणि त्यांची पूर्तता करायची असते व समाजांचा घटक म्हणून परस्पर संबंध यांचे संगोपन करायचे आसते. यातूनच आपल्या व्यक्तिगत गुणाचा विकास होतो आणि समाज स्थिर होतो परस्परांच्या गरजा विचार परस्परांना सहकार्य.  आणि एकामेकाबधदल सहानुभूती हा सामाजिक जीवनाचा आधार आहे.  यातूनच हक्काची निर्मिती होते. हकक मानवी जीवनातील समाजशीलतेतून निर्माण होतात. एकाकी व्यक्तिला किंवा मानवी समाजापासून दूर जंगलात राहणारयाला हक्काची अधिकार यांची आवश्यकता नसते. कारण तेथे जीवन अनिर्बंध असते. तेथे व्यक्तिचे स्वातंत्र्य अमर्याद असते.  # स्वातंत्र्याला. # अर्थ नसतो. ती व्यक्ती जेव्हा दुसर्याच्या व्यक्तिच्या संपर्कात येतो तेव्हा त्यांच्या स्वातंत्र्यावर. हक्कांवर. अधिकारांवर. एकामेकांच्या समाजातील काही समाजकंटक. शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यामुळे मर्यादा पडतात त्यातूनच आपले हक्क व अधिकार त्यांच्यावरील मर्यादेची आपल्याला जाणीव लागते. 

      समाजात राहत असताना व दैनंदिन जीवन जगत असताना.  आपणं आपला समाज भयमुक्त असावा. आपल्याला आपल्या लहरी पणामुळे कोणीही शारीरिक मानसिक इजा करू शकत नाही त्याबद्दल आपल्याला संरक्षण असावे. कोणीही आपल्याला बंदि किंवा बंधनात अडकवू शकत नाही.  तसेच आपल्याला आपल्या गुणांचा विकास करण्यासाठी लिहणे.  बोलणे.  हिंडणे. फिरणे.  व्यवसाय धंदा निवडण्याचे अधिकार.  आचार विचार.   धार्मिक श्रध्दा चे स्वातंत्र्य हवे असते.  यातूनच आपण समाजपयोगी बनवू शकतो.  इतरांशी विचारांचे आदान प्रदान करू शकतो.  वेळप्रसंगी त्यांच्या मदतीला धावून जातो भयमुक्त व सभ्य जीवनासाठी असे स्वातंत्र्य. हक्क व अधिकार लोकशाही शासनव्यवस्थेत सहभागी होण्यासाठी काही वेगळ्या प्रकारचें स्वातंत्र्य लागते.  असे. स्वातंत्र्य राजेशाही किंवा हूकूमशाही असलेल्या देशातील नागरिकांना मिळत नाही.लोकशाही राज्यात व्यक्तिच्या हक्काच्या प्रश्न अंत्यंत महत्वाचा असतो लोकशाहीचे यशापयश त्या राज्यातील लोकांना किती स्वातंत्र्य आहे. यावर अवलंबून असते.  ही लोकशाही राज्यात राज्याची खरी निशाणी आहे.  म्हणून प्रत्येक लोकशाही राज्यात व्यक्तिला स्वातंत्र्याचा उपभोग घेता येईल. दहशतवाद नक्षलवाद गुंडगिरी यापासून भयमुक्त असे वातावरण निर्माण करणे आणि राज्याची सुरक्षितता व स्थैर्य कायम राहील या दोन्ही गोष्टींत संतुलन साधने महत्त्वाचे असते आणि उदिष्ट साध्य करण्यासाठी लोकांना हक्क व अधिकार द्यावे लागतात 

            समाजात अनेक प्रकारचें गट असतांत धार्मिक वांशिक. भाषिक. अशा स्वरुपाचे त्यांचे अस्तित्व असते. यातील काही गट बहुसंख्यांक.   असतांत.  तर काहीची सामूहिक शक्ति. संख्याबळ.  मर्यादित असते.  ते अल्पसंख्याक असतात. यांच्यातील संघर्ष अल्पसंख्याक गटातील व्यक्तिंना त्यांच्या मर्यादित शकतिमुळे. विशेष संरक्षणाची गरज भासते आणि त्याची जबाबदारी मानवाधिकार आयोग घेत असतो. आणि दुसर्या बाजूला राज्यावर येवून पडते. राज्य आणि मानवाधिकार आयोग अल्पसंख्याक गोरगरीब सर्वसामान्य व्यक्तिंना हक्क व अधिकार स्पष्ट करून त्यांना संरक्षण देते.  म्हणजेच राज्य या ठिकाणी अल्पसंख्याकांच्या मनांत सुरक्षिततेची भावना निर्माण करते. अलिकडच्या काळात बहुतेक सर्व राज्यांमध्ये व्यक्तिला मिळणार या निवडक हक्क व अधिकार स्पष्ट निर्देश संविधानात केलेला आढळतो.  ही हक्कांची निवड तत्कालीन परिस्थितीच्या संदर्भात निर्माण होणारें प्रश्न त्या त्या ठिकाणी काम करणारे मानवाधिकार आयोग स्थापन करण्यात आला आहे. त्या हक्क व अधिकार यांना न्याय मिळवून देण्यासाठी किंवा तशी ऐपत असणारा आयोग म्हणजे मानवाधिकार आयोग होय. लोकांच्या मागण्या व राज्याची गरज यांसारख्या घटकांवर अवलंबून असते त्यालाच मूलभूत हक्क व अधिकार असे म्हणले जाते. 

      * व्यक्तिच्या वैयक्तिक इच्छा आकांक्षा सुरक्षित

* राज्याचे. स्थैर्य आणि सुरक्षितता

* व्यक्तिच्या जीवनातील राज्याच्या अनावश्यक हसतक्षेपाला प्रतिबंध आणि

* लोकशाही व्यवस्थेत सर्वांनी विकासाची समान संधी व स्वातंत्र्य

* समतेचा हक्क * स्वातंत्र्याचा हक्क *शोषणाविरुद्ध हक्क * शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क*. सवैधानिक उपाययोजना हक्क *वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क व अधिकार * राजकीय हकक. * पर्यावरण * आरोग्य *विज्ञान व तंत्रज्ञान* दलित आणि आदिवासी भटके विमुक्त *शेतमजूर अल्पभूधारक मजूर* ‌लघुउधोग पाणीपुरवठा पाणी वाटप * गृहनिर्माण संस्था * महिला अत्याचार निवारण समिती * नागरि ग्राहक संरक्षण* व्यसनमुक्ती* कायदा आणि सुव्यवस्था * बालकल्याण* अनाथ आणि अपंग पुनर्वसन* धरणग्रस्त व इतर विस्थापित पुनर्वसन * साक्षरता प्रसार * बांधिल मजूरांचे पुनर्वसन * लोककला. * अंधश्रद्धेला आळा *दहशतवाद नक्षलवाद गुन्हेगारी गुंडगिरी *अशा विविध परसथितीला गोरगरीब जनता सर्वसामान्य लोक यांना तोंड द्यावे लागते. 

       मानवाधिकार आयोग स्थापन करण्या मागचा उद्देश आपल्या ध्यानात आला असेल. माणसाच्या मनातील आपल्या हकक अधिकार यांना जाग करण्यासाठी अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी. मानवाधिकार आयोग स्थापन करण्यात आला आहे 

          आज विविध शासकीय निमशासकीय कार्यालयात चालणारे काम आपणांस तपासणी पडताळणी करण्याचा अधिकार आहे.  सर्वत्र चालणारा भ्रष्टाचार. लोकची होणारी आर्थिक मानसिक सामाजिक धार्मिक लुट. यासाठी जनजागृती संबोधन प्रबोधन करण्यासाठी. आज सक्षम समाज प्रतिनिधी यांची आपणांस गरज आहे. 

* महिला घरेलु अत्याचार. * छेडछाड प्रकरणं *. अर्वाच्च बोलन लज्जा उत्पन्न होण्यासारखे कृत्य करणे *अश्लिल चाळे हावभाव करणे. कामाच्या ठिकाणी होणारे महिला व बालकामगार यांचें शोषण अशा विविध अडचणींवर मात करण्यासाठी आजच मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल करा

          शासकीय अधिकारी व कर्मचारी शासन पगार असूनसुद्धा लाचेची मागणी करत असेल तर.  विनाकारण कामात वेळ लावणे.  कामात टाळाटाळ करणे.  व्यवस्थित न बोलणे.   कामाच्या वेळेत मोबाईल व्यस्त असणे. यासाठी आपण लेखी स्वरूपात तक्रार मानवाधिकार आयोगाकडे दाखल करू शकता

         रेश़न दुकानदार दादागिरी.  पुरवठा अधिकारी व कर्मचारी नविन रेशनकार्ड काढणे. नाव कमी करणे नाव वाढविणे अन्न सुरक्षा योजनेचं सहभागी करणे. जुने फाटलेली शिधापत्रिका बदलून देणे. रेशनकार्ड वरिल मयत व्यक्तिची नावे कमी करणे. यासाठी पुरवठा विभागाच्या नागरि सनदेमधये विहित कालावधी ठरवून दिला आहे त्या कालावधीत आपले काम पुरवठा अधिकारी व कर्मचारी करत नसेल तर आपण आपली तक्रार मानवाधिकार आयोगाकडे दाखल करू शकता. शासकीय गोदाम मध्ये येणारा अन्न धान्य साठा त्याची ठेवण साठवण आणि संरक्षण कशाप्रकारे केले जाते हे जाणून घेणे यासाठी मानवाधिकार आयोग आपणास मदत करिल

             दवाखान्यात आज मोठा भ्रष्टाचार आहे तो म्हणजे डॉ यांची मनमानी फी.  मनमानी औषधाची किंमत.  रुग्ण हक्क सनद न लावणे.  औषध उपचार पद्धती आणि त्यासाठी दरपत्रक न लावणे.   उपचार पद्धती निवडण्याचा अधिकार नाही.  अशा विविध मागण्यासाठी व आपली जीवनाची कमाई लुटणारे डॉ यांच्याविरुद्ध लढण्यासाठी आपणांस मदत करतो तो म्हणजे मानवाधिकार आयोग होय

              बांधकाम कामगार नोंदणी मध्ये. जास्त पैसे घेणे.  कामगारांच्या योजनेच्या            लाभातून मोठा आर्थिक हिस्सा काढून घेणे. बांधकाम कामगार यांना धमकावने.   मारण्याची भिती घालणे.  कामांवर बांधकाम कामगार यांना सुरक्षा साहित्य नसणे.  अपघातग्रस्त बांधकाम कामगार यांना पोलीस केस करण्यापासून लांब ठेवणे वेळ पडल्यास माराहान करणे.   महिला कामगारांना हिन वागणूक देणे.  अंगावर पैसे आहेत म्हणून बांधून ठेवणे बंदी बनविने.  अशा विविध बांधकाम कामगार अडचणींवर व प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी आपणांस शस्त्र मिळाले आहे ते म्हणजे मानवाधिकार आयोग होय 

              समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

साहेब - वाचवा ओ वाचवा

 


वाचवा ओ वाचवा साहेब

                  अंगावर काटा उभा करणारी एक ह्रदय द्रावक हाक आपण वेळोवेळी ऐकतो अनुभवतो कोणी पाण्यात बुडताना. जळीत प्रकरणं. अपघातग्रस्त. एखाद्या प्रकरणात संकटात सापडलेला प्रत्येक माणूस कोणाला कोणाला तरी जीवाच्या आकांताने ओरडून मदत मागतो कारणं त्याने जीवन संपताना जवळून पाहिले असते. 

               # वाचवा ओ साहेब # ही हाक आपल्या ३६ जिल्ह्यातील त्या त्या जिल्ह्याचे मायबाप म्हणजे जिल्हाधिकारी यांना दिली आहे कारण आज प्रस्थिती तशीच निर्माण झाली आहे. कारणं प्रत्येक गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये कमीत कमी वेळात जास्त पैसा. कमी श्रमात जास्त पैसा असा फंडा अमलात आणला जातो आहे. जागोजागी तयार होणा-या. राजकीय बॅंका पतसंस्था. बजाज फायनान्स. मायक्रो फायनान्स. बंधन बॅंक. बुलढाणा फायनान्स प्रत्येक गावातील प्रतिष्ठित महिला. यांना आर्थिक लालच दाखवून दहा दहा महिला गटाच्या माध्यमातून हा गोरख धंदा चालतो . एका मिनिटात आधारकार्ड वर लोन. विविध बिझनेस कंपन्या. साखळी पध्दतीने व्यवसाय बिझनेस. विविध शेती संलग्न व्यवसाय. कुक्कुटपालन शेळीपालन शेती औजारे. बि बियाणे खते विविध. जैविक खते. औषध फवारणी यामध्ये चालणारे दोन नंबर. औषध बोगसगिरी. खते बी बियाणे बोगस. असा लुटीचा प्रकार आहे  

  शासकीय योजना. यामध्ये एजंट दलाल अधिकारी व कर्मचारी यांचे मनमानी कारभार.    

              आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये जागोजागी अशी काही समाजाच्या. नावाखाली. अमुक पैसे भरा आणि तमुक तमुक वेळेत. मोठा आर्थिक लाभ घ्या. आपण सुद्धा खुळ्या सारखें व्याजाने काढून उसणेपासने करून अशा बोगस कंपन्या मध्ये अशा चोरांच्या हातात आपली कष्टाची मिळकत देतो. आणि पूर्णपणे फसतो. असे चोर तयार होतात एखाद्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये अलिशान आॅफिस घेतात अधिकारी व कर्मचारी मागेल त्या पगारावर कामाला ठेवतात. अलिशान बंगल्याची आश्वासने. अलिशान महागड्या गाडया अशी एक भुलभुलैया. तयार केली जाते आणि. पहिल्यांदा येणारे ग्राहक यांना. आर्थिक लाभ दिला जातो आणि बघता बघता यांचा चोर बाजार जोरात जोमात चालतो. अलिशान हाॅटेलमधये सेमिनार. महागड्या गिफ्ट. दिल्या जातात. प्रत्येक गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये यांचें एजंट नेमले जातात त्यांना पगार कमिशन दिल जात. सर्व काही अगदी सुरळीत चालते. समाजातील नामांकित लोक नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांचा अशा बोगसगिरी करणार्या कंपनीला वरदहस्त असतो. 

              मोठमोठ्या कंपन्या गव्हरमेंटचया असणार्या बुडाल्या काही जण पैसा देणार होते काहीजण जमीन देणार होते. तर काहिजण. नोकरी देणार होते. काहीजण गाड्या बंगले. देणार होते. काहीजण शेळया कोंबड्या अंडी. मचछिपालन. अशी विविध अमिष दाखवून आपणास लुटणारे आपल्या ध्यानात येई पर्यंत बरिच मोठी आर्थिक माया गोळा करतात आणि रातोरात पोबारा करतात.  

              परवा एक विषय आला आहे मोबाईल वर एक मॅसेज फिरत आहे २२५० रु भरा आणि ३२ लाखाचे मालक व्हा. तुम्ही मेंबर कराल तेवढे पैसे तुमहाला मिळणार. अस होत का ? आपण सुद्धा खुळ्या प्रमाणे या सर्वांच्या माग जातो आणि जाताना एकट न जाता. सगेसोयरे. मित्रपरिवार. यांना सुध्दा घेवून जातो म्हणजे बुडताना एकट न बुडता सगळी बुडू आणि चोरांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी आपणच कारणीभूत आहोत 

              सर्व जिल्हाधिकारी यांना कळकळीची विनंती आहे की आपल्या जिल्ह्यात गोरगरीब जनता सर्वसामान्य लोक. मिळेल ते काम करून अर्धपोटी उपाशी राहून आपले व आपल्या कुटुंबांचे पालनपोषण करित आहेत. आपण आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये दाखल होणारें. कोणतीही परवानगी शिवाय आपले बोगस उधोग उभे करणारे यांची माहिती. आपल्याच नव्हेतर. ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका. क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांना सुध्दा नसते. म्हणजे आपल्या गावात तालुका जिल्हा यामध्ये आपल्या बोगस उधोगाची. प्रसिद्धी प्रसार जाहिरात करण्यासाठी फिरणारे कोणाच्या परवानगीने फिरतात. त्यांना कोण परवानगी देते यासाठी मा जिल्हाधिकारी साहेब यांनी ग्रामपंचायती क्षेत्रात असा फसवा व्यवसाय करणारे यांच्यासाठी गावबंदी आदेश जारी करणे गरजेचे आहे. तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये सुद्धा बंदी आदेश काढणे गरजेचे आहे

असा कोठेही प्रकार घडत असेल त्या संबंधित आपणाकडे तक्रार आल्यास त्वरित जवळच्या पोलिस स्टेशनला आदेश देवून चौकशी करण्याचे आदेश देण्यात यावेत.   

        जनतेने कमीत कमी वेळात जास्त पैसा मिळविण्यासाठी कोणत्याही भुलभुलयाला बळी पडू नका. फसलेल्या लोकानी विविध आंदोलने केली. मोर्चे काढले. न्यायालयात धाव घेतली काहीजणांनी आत्मदहन केले. उपोषणे केली. पण अशी विविध प्रकारची आंदोलने करून सुध्दा आजपर्यंत आर्थिक लुटललेलया. लोकांना न्याय मिळालाच नाही तुम्ही मेला कोणालाच फरक पडत नाही. तुम्ही उपाशी राहीला तरी कोणाला काही फरक पडत नाही. जनता जोपर्यंत फसणार आहे तोपर्यंत फसवणारे येणारच. तुम्ही देताय म्हणून हे घेतायत. आजच तुम्ही जागा आणि दुस-याला जाग करा. 

          समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

शासकीय अधिकारी यांचेसाठी

शासकीय अधिकारी आपल्या पदांचा वापर. समाजहितासाठी करू शकतो. कोणताही शासकीय अधिकारी गोरगरीब सर्वसामान्य लोकांना आपल्या पदाच्या जोरावर. अन्याय अत्याचार करू शकत नाही

शासकीय अधिकारी व्याजाने पैसे घेवू अथवा देवू शकत नाही. 

माझा मामा काका भाऊ मित्र चुलता. जवळचा पाहुणा. शासकीय अधिकारी आहे म्हणून मी महणील तसच होईल असे कोणीही म्हणू शकत नाही

शासकीय प्रशासकीय अधिकारी. पोलिस. तहसिलदार. प्रांत. मंडलधिकारी. ग्रामसेवक. तलाठी. नायब तहसीलदार. गटविकास अधिकारी. मुख्य अधिकारी. कार्यकारी अधिकारी. पंचायत समिती विभाग. जिल्हा परिषद विभाग. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली येणारी विविध शासकीय निमशासकीय कार्यालये. अशी एक नाही अनेक शासकीय अधिकारी व कर्मचारी आपल्या व आपल्या घरच्या कोणत्याही अधिकारी व कर्मचारी यांच्या पदाच्या जोरावर शेजारी. यांना शिविगाळ करणे. दम देणें. जीवे मारण्याची धमकी देणे. दहशत गुंडगिरी. व्याजाचा व्यवसाय. आपल्या परिसरात दहशत माजविणयासारखे. कृत्य करणे. दारु पिऊन लोकांना त्रास देणारा अधिकारी व कर्मचारी. महसुल विभागात याचा गुंठा त्यांच्यात घालणारे अधिकारी. अशी एक नाही अनेक अधिकारी आपल्या पदांचा गैरवापर करून नागरिकांना त्रास देत असतात. आजच शासनाने एक शासन निर्णय जारी करण्याची गरज आहे जो कोणी अधिकारी व कर्मचारी आपल्या पदाच्या जोरावर गोरगरीब लोकांना. सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास देत असेल आणि जर त्या सर्वसामान्य माणसाने गोरगरीबाने संबंधित. शासकीय अधिकारी अधिकारी व कर्मचारी यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यास शासनाने व जिल्हाधिकारी साहेब यांनी विना चौकशी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना निलंबित करण्यात यावे आणि लोकांना संरक्षण द्यावे.

प्राथमिक आरोग्य केंद्र जाग्यावर - सेवा सुविधा देशोधडीला

 



प्राथमिक आरोग्य केंद्र जाग्यावर
सेवा सुविधा देशोधडीला

बेकारी. रुग्णाता. विकलांगता. वार्धक्य. मृत्यू. हे माणवाला मिळणे गरजेचे आहे आणि आम्ही त्यासाठी सतत लढा देत असतो 

            गोरगरीब आर्थिक दृष्ट्या दुर्बलता असणारे सर्वसामान्य जनता. माणूस आहे म्हणजे आजारी पडणार. नशिबाला पुजलेली गरिबी अठठरा विश्व दारिद्र्य. असल्यामुळे यांना आपल्या आजारांवर आरोग्यावर उपचार करणे अवघड आहे. उपचार नाही मिळाला तर मृत्यू निश्चित यासाठी शासनाने प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा आरोग्य केंद्र. तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र. प्रत्येक गावात उप आरोग्य केंद्र. सथापन केले आहे त्यानुसार सर्वांना. प्रत्येक वेळी लागणारी आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मदत होते

            आजच आपल्या गावात पहिल्यांदा प्राथमिक आरोग्य केंद्र आहे का ते पहा. नसेल तर त्याची मागणी संबंधित ग्रामपंचायत. नगरपालिका महानगरपालिका. पंचायत समिती. जिल्हा परिषद. यांचेकडे गावातील लोकांच्या सह्या जोडून मागणी करा. आणि आपल्या गावात तालुका जिल्हा यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हा आरोग्य केंद्र असेलतर त्यात गोरगरीब जनतेला वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे का ? डॉ नर्स पेशंट बरोबर कसे वागतात हे पहा. प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये काम करणारे डॉ यांची बाहेर ओपीडी आहे का ? असेल तर ती ओपीडी बघून प्राथमिक आरोग्य केंद्रातील काम कसे आहे ? दवाखान्यात येणारे पेशंट यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार न घेता वैयक्तिक ओपीडी मध्ये उपचार घेण्याचा सल्ला डॉ देतात काय ? सरकारी दवाखान्याला येणारा औषधांचा साठा महिन्याला येतो का ? तो खरोखरच प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेणारे पेशंट यांच्यासाठी वापरला जातो का ? खाजगी दवाखान्यात सरकारी दवाखान्यात येणारे औषध परस्पर लंपास केले जाते का ? रात्री अपरात्री येणारे पेशंट यांचेसाठी डॉ नर्स सरकारी दवाखान्यात हजर असतात का. ? डिलिव्हरी काळात सरकारी दवाखान्यात आई मुल यांची काळजी घेणारा डॉ नर्स स्टाफ उपलब्ध आहे का ? दवाखान्यात कुत्र्याची सापांची लस कायमस्वरूपी उपलब्ध आहे का. ? दवाखान्यात पुरेसा डॉ नर्स स्टाफ आहे का ? ओपीडी चे टाईम प्रमाणे सकाळी ९/१ सरकारी टाईम असताना आपल्या गावातील सरकारी दवाखाना १०.३०/ते ११ वाजता उघडतो का ? सरकारी दवाखान्यात डॉ संख्या किती व रोजच्या रोज हजर असतात का ? औषधाचा तुटवडा आहे का ? महिन्याला औषध कोटा बरोबर येतो का. ? सरकारी दवाखान्यात येणार्या पेशंटला बाहेरून औषधे ड्रेसिंग साहित्य हॅणडगलोज उपलब्ध आहेत का ? पेशंटला हे सर्व बाहेरुन आणण्याचा डॉ सल्ला देतात का ? मलेरिया काविळ हिवताप डेंग्यू दातांचे डॉक्टर. हाडांचे डॉ. एक्सरे मशिन. रक्त लघवी तपासणी लॅब. महिलांचे विविध आजारांवर उपचार करणारे महिला डॉक्टर. असे विविध अवयव यांचे आजारांचे डॉ आपल्या गावातील सरकारी दवाखान्यात वेळेवर दररोज हजर असतात का ? अपघातग्रस्त पेशंटला डेरसिंग करण्यासाठी डॉ उपलब्ध आहे का ? 

            आपल्या गावात तालुका जिल्हा यामध्ये चालणारे प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वात मोठा बोजवारा आहे तो म्हणजे सफाई. नसणे सर्वत्र घाणीचे साम्राज्य असणे. दवाखान्यात निघणारा. कचरा सुई. सलाईन बाटल्या. रक्ताची कपडे. औषधाचा कचरा. मुदती बाह्य औषध कचरा. अशा विविध कचरयाची विल्हेवाट कशी लावली जाते. दवाखाना रोजच्या रोज निर्जंतुकीकरण केला जातो का. ? निघणारा कचरा अस्ताव्यस्त पसरलेला असतो काय ? सफाई कर्मचारी यांचें वेतन नियमित नियमानुसार दिले जाते का ? नर्स डाॅ यांच्याकडून पेशंट व नातेवाईक यांना कशाप्रकारे वागणूक दिली जाते ? 

             रात्री अपरात्री येणारे डिलिव्हरी पेशंट यांच्यासाठी आपल्या विभागातील दवाखान्यात रात्रीचे मुक्कामी डॉ नर्स आहेत का ? डिलिव्हरी पेशंट नाजूक अवस्थेत असल्यास दवाखान्यात रुग्णवाहिका सेवा उपलब्ध आहे का ? डिलिव्हरी काळात सर्व लागणारी वैद्यकीय सेवा सुविधा आपल्या विभागातील दवाखान्यात उपलब्ध आहे का ? डिलिव्हरी काळात बाहेरच्या दवाखान्यात म्हणजे आपल्याच ओपीडी मध्ये उपचार घेण्यासाठी पाठवितात काय ? लहान मुलांना गोवर लसीकरण. पोलिओ लसीकरण व इतर लहान मुलांना रोगप्रतिकारक डोस प्रत्येक महिन्याला दिले जातात का ? सर्व प्रकारची आॅपरेशन करण्याची सुविधा सरकारी दवाखान्यात उपलब्ध आहे का. ? लाईट गेल्यास जनरेटरची सोय आहे का ? 

          आजच आपल्या विभागातील गावातील शहरातील तालुक्यातील जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वरिल प्रमाणे सर्व सेवा सुविधा उपलब्ध आहेत का ? याची आजच सरकारी दवाखान्यात जाऊन चौकशी करा तो आपला जन्मसिद्ध अधिकार हक्क आहे शासन सगळीकडे लक्ष ठेवू शकत नाही आपणांस यांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे 

              आपले आदरणीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या भरघोस निधी मधून दुर्बल घटकातील मुलांना महिलांना लोकांना वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आपल्या जिल्ह्यात २६ दवाखाने धर्मादाय अंतर्गत उपचार करतात तोही पूर्णपणे मोफत त्यात सर्वांना निःपक्षपाती पणाने वैद्यकीय सेवा सुविधा मिळावी कोणीही उपचाराविना मरू नये हा सार्थ उदेश आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना. पंतप्रधान आयुष्मान आरोग्य योजना. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना. आयुष्यमान भारत आरोग्य योजना. जननी शिशु सुरक्षा योजना. नेत्ररोग तपासणी उपचार. धनुर्वात प्रतिबंधक लसीकरण. टि बी सेंटर. कॅन्सर सेंटर. अशा विविध आजारांवर विविध योजना मोफत उपचार करण्यासाठी धर्मादाय आयुक्त यांचेकडून आपल्या जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयात. उपजिल्हा रुग्णालयात. ग्रामिणरूगणालय. पासून सामान्य माणसाला गोरगरीब जनतेला पोहोचविण्याचा मा जिल्हाधिकारी साहेब यांचा निर्णय कौतुकास्पद आहे. 

            उलट या सर्व योजना व त्यांची माहिती गोरगरीब जनतेला माहीतच होत नाही आणि कोणी कळून देत नाही हे सर्वात वाईट आहे औषध तुटवडा. आरक्षित खाटा उपलब्ध नाहीत. आमच्या. दवाखान्यात ही योजना नाही. सुई हॅणडगलोज. सलाईन व सर्वात महागडी औषधे. बाहेरून आणायला सांगतात. म्हणजे शासनाकडून येणारा व जिल्हाधिकारी साहेब यांचा वैद्यकीय सेवा सुविधा साठी करण्यात आलेला प्रयत्न कुठेतरी फसताना दिसतं आहे. 

            समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

आरक्षण मुस्लिमांचा अधीकार - खा. इम्तियाज जलील



आरक्षण मुस्लिमांचा अधीकार - खा. इम्तियाज जलील

२०१४ साली महाराष्ट्रातील काँग्रेस - राष्ट्रवादी सरकार ने मुस्लिमांना ५ % आरक्षण देण्याची घोषणा केली परंतु आज पर्यंत मुस्लिम आरक्षण देण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आले नाही. जेव्हा निवडणुका येत्या तेव्हा मुस्लिमांना आरक्षणाचे गाजर दाखून मत घेण्यात आले परंतु आज पर्यंत मुस्लीम आरक्षण बाबत ब्र शब्द काडण्यात कोणीही तयार नाही. मुस्लीम आरक्षण हा तर मुस्लिमांचा अधीकार असुन ते मुस्लिमांना मिळालाच पाहिजे अशे वक्तव्य एम आय एम प्रदेश अध्यक्ष तथा औरंगाबाद चे खासदार इम्तियाज जलील यांनी अहमदनगर एम आय एम टीम शी चर्चा करतांना सांगितले. २७ नोव्हेंबर रोजी मुस्लीम आरक्षण साठी पूर्ण महाराष्ट्रातून तिरंगा रॅली मुंबई पर्यंत काढण्यात येणार असून सर्वांनी ही लढाई आपली समजून तिरंगा रॅलीत शामील होण्याचे आव्हान खा. इम्तियाज जलील यांनी केले. अहमदनगर जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी आश्वासन दिले की  मुस्लीम आरक्षण साठी पूर्ण अहमदनगर जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून तिरंगा रॅलीत शामिल होणार आहे त्यासाठी आम्ही पूर्ण जिल्ह्यात जागो जागी बैठक घेत आहे व नागरिकांना मुस्लीम आरक्षणाची गरज आणि फायदे समजून सांगत आहे. खा. इम्तियाज जलील यानी पक्षाचे काम जोमाने चालू ठेवा व काही अडचण आल्यास संपर्क साधण्याचे सांगितले. यावेळी अहमदनगर एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी, जिल्हा महासचिव हाजी जावेद शेख, शिर्डी लोकसभा अध्यक्ष तोसिफ मनियार, औरंगाबाद युवा जिल्हा अध्यक्ष मुंशी पटेल, नगरसेवक कलीम बागवान, जिल्हा सह- सचिव फय्याज कुरेशी, शेवगाव तालुका अध्यक्ष युसुफ शेख, कोपरगाव तालुका अध्यक्ष जावेद पटेल, जामखेड तालुका अध्यक्ष जाकिर काजी, श्रीरामपुर तालुका अध्यक्ष शकील शेख, कर्जत तालुका अध्यक्ष डॉ अन्सार शेख, अजीज व्होरा,उबैद बागवान, राहुरी तालुका अध्यक्ष नविद बागवान, रहाता तालुकाध्यक्ष समीर बेग, श्रीरामपुर शहर अध्यक्ष शहाबाज शेख, संगमनेर शहर अध्यक्ष दानिश मिर्जा, आदी उपस्थित होते.



खराटा - देश घाणीपासून मुक्त करण्यासाठी वापरलेले जाणारे प्रभावी शस्त्र म्हणजे खराटा

 


खराटा खराटा

                  आपल्या रोजच्या जीवनात सर्वांना परिचयाचा असणारा शब्द आहे की जो आपले घर अंगण परिसर गाव तालुका जिल्हा राज्य देश घाणीपासून मुक्त करण्यासाठी वापरलेले जाणारे प्रभावी शस्त्र म्हणजे खराटा होय फक्त फोटोसाठी खराटा हातात घेणारे नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांनी ढोंग बंद करा 

            गौतम बुद्धापासून. गाडगेबाबा पर्यंत किंवा महात्मा फुले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यापर्यंत पाहिले तर समाज विकासासाठी काम करणारे ही लोकं माणसांना समाजाच्या जाचापासून जावे लागले. त्यांना स्वच्छता महत्व समाजावून सांगण्यासाठी लोकानी अंगावर शेण टाकले. शिव्या घातल्या. चांगल्या कामाची आधी उपेक्षा करावी नंतर विरोध करावा आणि शेवटी स्वीकार करावा अशी समाजातील रित आहे स्वच्छता म्हणजे प्रसन्नता. स्वच्छता म्हणजे पवित्रता. स्वच्छता म्हणजे समाधान. स्वच्छता म्हणजे आनंद. स्वच्छता म्हणजे प्रगती स्वच्छता म्हणजे स्वावलंबन. स्वच्छता म्हणजे सरवोधदार. स्वच्छता म्हणजे# स्व कडून #पर # कडे जाण्याचा मार्ग. स्वच्छता म्हणजे प्रदुषण पासून मुक्तता. स्वच्छता म्हणजे पर्यावरणास पर्याय. स्वच्छता म्हणजे आरोग्य. स्वच्छता म्हणजे स्वच्छता. आणि स्वच्छता म्हणजे सर्वोदय. या विचारसुत्राचा कृतिशील सुंदर आविष्कार म्हणजे. गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान

          स्वच्छता म्हणजे मानवी जीवनाचा आधारस्तंभ आहे. अन्न. हवा आणि पाणी शुध्द स्वरूपात मिळणे हा उत्तम जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. अस्वच्छतेमुळे अन्न हवा पाणी दुषित होते त्यामुळे अनेक साथीचे आजार रोगांना निमंत्रण मिळते. आजारपण वाढते. आजारपणाची कैद माणसाला असह्य होते. या कैदेतून सुटका करण्यासाठी पैसा अडका कमी पडल्यास मृत्यू अटळ. जगणे संपते. अनमोल जीवन संपते. उरते ते फक्त दुःख. मानवाने जीवनातील हे दुःख ओळखले पाहिजे. मानवी जीवनात स्वच्छतेचा # निर्मळ झरा # निर्माण केला पाहिजे निर्मळ तेच्या मंत्राने लोकांचे मन परिवर्तन केले पाहिजे. सर्वांच्या हदयाची दारे खुली करून त्यात निर्मळ तेचे झरे सोडणे गरजेचे आहे. एका अक्षरशुनय माणसाच्या हातातील खराटा हजारों माणसाच्या मनात #. स्वच्छतेचा नंदादीप # लावू शकतो तो तेवत ठेवू शकतो. ही शब्दावली समाजसेवक यांनाच शोभून दिसते. ही बिरुदावली बाबांच्या बाबतींत खरी वाटते लोकसेवेसाठी आपले पूर्ण जीवनाची होळी करणारे समाजसेवक पाहिजेत. आपल्या हाती. # स्वच्छतेचा कंदील # घेवून सर्वांना स्वच्छतेचा उजेड दाखविणे गरजेचे आहे समाजसेवक यांनी व आपण हातात खराटा घेऊन सार्वजनिक स्वच्छता केली म्हणजे श्रमशक्तीचे संस्कृतींचे उदात्तीकरण केले पाहिजे. स्वच्छतेला परमेश्वर महणा किंवा परमेश्वराला स्वच्छता म्हणा अशा या प्रमेयात अडकून न पडता स्वच्छता करण्याचा कामांचा आजच पुढाकार घेऊन स्वच्छतेला परमेश्वर माणने गरजेचे आहे. हातातली खराटा हा आपल्या श्रमसंसकृतीवर साचलेली धुळ नष्ट करण्याचे साधनं आहे. महारोगयानी केलेली शारीरिक स्वच्छता हा तर श्रम संस्कृतीचा एक पाठपुरावाच असतो

            आपणच आपल्या महाराष्ट्रात स्वच्छतेचे आंदोलन निर्माण करणे गरजेचे आहे त्यामुळे खेडोपाडी # स्वच्छतेचे वारे # वाहू लागेल. लोकमत जागे करा. लोकांना सज्ञानी करा. लोकांना नम्रता शिकवा. लोकांना आरोग्य संपन्न बनविण्याचे काम करा. लोकांच्या मनात चैतन्य फुलवा. लोकांची प्रगती साधा. लोकमत सदैव प्रफुल्ल ठेवण्यास मदत करा. यासाठी आपणास उपयोगी पडणार म्हणजे खराटा. विषमतेकडून सत्तेकडे. विसंवादाकडून संवादाकडे. जनतेकडून चैतन्य कडे. विघातकाकडून. विधयाकडे. उदासिनतेकडून उतसहाकडे. विफलतेकडून सफलतेकडे. विवदेषाकडून विनयाकडे. अचेतनाकडून सचतेनाकडे. विनाशाकडून विकासाकडे. नैरेशयाकडून आनंदाकडे आणि दवैताकडून अदवैताकडे घेवून जाणारे एक सबल साधनं म्हणजे खराटा होय 

              खराटा हा केवळ घर गाव रस्ते स्वच्छ करणारा नाही तो माणसांची मने स्वच्छ करणारा खराटा होय खराटा बाह्य सवचछतेकडून आंतरसवचछतेकडे नेणारा मार्ग म्हणजे खराटा होय. दिन दुःखी. दलित वंचित आणि शोषित माणसें पाहिली अवकाशात सोडलेल्या बिन दोरिचया पंतगाप्रमाणे समुद्रात वार्यावर सोडलेल्या होडीसारखी ही माणसें होती अशी माणस पाहिली की मनाला अस्वस्थ होत. आपल मन मेनबतती सारखें पागळून जाते. अशा तळागाळातील लोकांना कोणीच वाली नाही हे पाहून मन घायाळ झाले आहे. घरात. दारात आणि गावांत स्वच्छतेची नितांत गरज आहे स्वच्छता ही आपल्या जीवनाची गुरुकिल्ली आहे. सवचछतेशिवाय. घर दार आणि गाव कोंडवाडा सारखे होईल म्हणजे अनेक दिवसांची मुलखाची घाण. जिथे घाण तिथं रोगराई. जिथे रोगराई तिथे मृत्युला आमंत्रण. हे ओळखून स्वच्छता आपला परम धर्म शिरोधार्य मानले पाहिजे

              स्वच्छता करणारा अंगावरील चिंध्या घ्या अंगरखा हे गरिबांचे प्रतिक हातातील खराटा हे सामाजिक स्वच्छतेचे प्रतीक आहे. हे जीवन क्षणभंगुर आहे बांगडी आणि कवडी हे फाटक्या संसाराचे प्रतिक आहे. जसा खराटा स्वच्छतेवर वार आहे तसा काठी समाजाच्या दंभावर. ढोंगावर कर्मकांडावर. अन्यायावर. अहंकारावर. भ्रष्टाचारावर. दुरगुणावर. भोंदूगिरी वर. व्यसनाधीनतेवर अंधश्रद्धैवर हिंसाचारावर. अज्ञानावर. दैववादावर. आणि दुराचारी वर कठोर प्रहार करणारी काठी आहे. स्वच्छता. आरोग्य. ज्ञान. संपत्ती. त्याग. सेवा. काटकसर. साधेपणा आणि असंग्रह वृतीची आठवण करून देणारा खराटा होय. म्हणजे लोकजीवनात आनंदाचे वातावरण अंगण निर्माण करणारा खराटा आहे. गोरगरीब सुखी आणि समृद्ध संपन्न जीवनासाठी अहोरात्र राबणारा खराटा होय. दुःख. दैन्य. आतरता. व्याकुळता. घायाळता. आणि अस्वच्छता. दुखमय जीवनात सुखाची दिवाळी करण्यासाठी खराटया सारखा दुसरा धर्म नाही

          स्वच्छता ही आयुष्भर माणुसकीच्या आराधनेत रमली आहे. आपल्या त्यागाने. प्रेमाणे आणि सेवेने समाजाची दुखणी सुखद करण्याची गरज आहे. त्यासाठी समाजाच्या अंगणापरयणत खराटा नेणे गरजेचे आहे. खराटा अंधश्रद्धा अंधार नषट करतो. समाजातील विषमता. पाखंडता. कर्मकांड. मूढता. नष्ट केली. समता प्रेम बंधुता बंधुभाव न्याय सदाचार. सौजन्य. सामाजयशी शिकवन. असा खराटा होय 

            समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रूग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

नदी उशाला आणि कोरड घशाला

 



नदी उशाला आणि कोरड घशाला 

            किती महत्वाचा संदेश देणारा शब्द आहे. आपल्या जवळ एकांदी वस्तू मग ती नैसर्गिक असो वा कृत्रिम असो त्याचा आपणांस उपभोग घेता येत नसेल त्यासाठी काही मानवनिर्मित कारणे असो नैसर्गिक कारणें असो त्यावेळी आपणांस हा शब्द बरेच काही सांगून जातो. आपल्या जवळ आहे पण आपणं त्यासाठी बरिच पराकाष्ठा करून सुध्दा उपभोग घेता येत नाही. 


                सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील. डोंगराकडेला जेमतेम लोकसंख्या जेमतेम उधोग धंदा म्हणजे फक्त आणि फक्त शेती त्यातून जेमतेम होणारी मिळकत त्यावरच समाधान मानणारे गाव म्हणजे गवहाणवाडी. अगदी छोट गाव त्या गावापासून डोंगरात बरिच लहान लहान खेडी आहेत. त्यांची सुध्दा प्रस्थिती अशीच आहे


              लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या रुपाने या खेडेगावाना हक्काचा माणूस मिळाला. यांची ओळख करून द्यायची म्हणलं की. एकावेळी फार मोठा भुकंप झाला आणि लोकांच्या घराची जीवनावश्यक वस्तूंची फार मोठी हाणी झाली तसेच पाटण तालुक्यात एकवेळ फार मोठा दुष्काळ पडला लोकाची अन्न पाणी याची हालत बेहाल झाली जनावरे चारापाणी विना उपाशी टाचा खुडून मेली काही लोक अन्न पाणी विना मरण पावली त्यावेळी या सर्व परस्थितीत सर्वांना मोठा आधार दिला तो म्हणजे सर्वांचे लाडके लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांनी. भुकंपात घराची पडझड झाली तर स्वता लक्ष घालून सर्वांना हक्काचे छप्पर डोक्यावर उभे करून दिले. जीवनावश्यक वस्तूंची मदत केली. पत्रा. इमारत साहित्य. याची भरघोस मदत केली. दुष्काळात लोकांच्या साठी धान्याची गोदाम खुली केली. आणि लोकांना जगण्यास कोणतेही राजकारण. राजकीय स्वार्थ न मनात ठेवता मदत केली. आज सुध्दा त्यांची ही सेवाभावी वृत्ती आपणांस खडबाडून जाग करते त्यावेळी नेते पुढारी यांच्या अंगावर पांढरी कपडे नव्हती मनात स्वच्छता होती. मानव म्हणून सेवा करण्याचा फक्त आणि फक्त ध्यास आणि ध्येय होते पण आज या गावाकडे बघितले की कुठंतरी त्याचा वारसा कमी पडता दिसत आहे लोकांना हक्काचे काम मिळावं यासाठी साखर कारखाना उभा केला. त्यामुळे बर्याच बेरोजगार तरुणांना काम मिळाले. शेती आधुनिक पद्धतीने करण्यासाठी साधन सामुग्री उपलब्ध करून दिली. शेतात ऊस पिकांचे उत्पादन वाढले त्यामुळे लोकांच्या कडे पैसा वाढला लोकांना सदन करणार हेच ते लोकनेते बाळासाहेब देसाई


                नामदार मा श्री शंभूराजे देसाई यांना लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा वारसा लाभला आहे. साखर कारखाना शिक्षण संस्था. औद्योगिक वसाहत अशा अनेक शासकीय संस्था पतसंस्था बॅंका यांच्या माध्यमातून त्यांनी आपला दबदबा लोकांच्या मनात राखून ठेवला आहे. गावांसाठी रस्ते गटर स्मशानभूमी समाजभूमी रस्ते विकास स्मशानभूमी समाजमंदिर अपंग कल्याण. आरोग्य सुविधा अशा सर्वसामान्य माणसाला गोरगरीब जनतेच्या मदतीला विविध माध्यमातून मदत केली जात. हजारों कार्यकर्ते जागोजागी आहेत सभा मोर्चे निदर्शने. सरकार महागाई विरोधात जनतेच्या हक्कांवर गदा आणणारे सरकारी निर्णय यासाठी वेळोवेळी स्वता नामदार साहेब कायम समोर आहेत कार्यकाळ सर्व संपन्न आहे 


           सर्वात वाईट आणि सर्व कार्यकाळ मग तो लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा असो अथवा नामदार शंभूराजे देसाई यांचा असो आम्ही गवहाणवाडी गावाचा सर्वे केला असता अशी निंदनीय प्रकार समोर आला तो म्हणजे. गवहाणवाडी गावातील काही लोक आपल्या ऐपतीप्रमाणे आप आपल्या शेतात राहण्यास म्हणजे सुळवाडी रस्त्याला राहण्यास आहेत. म्हणजे आपणांस शेतात जाण्यायेण्यास जमावे यासाठी लोकांनी पक्की घरे बांधून रहिवासी आहेत सर्वात वाईट प्रकार असा आहे गवहाणवाडी गावांत नळयोजना आहे पण गावातून बाहेर शेतात रहिवासी असणार्या लोकांना पिण्यासाठी पाणी सुध्दा नाही कुठेही बोअरवेल नाही. म्हणजे. गावाला लागूनच मोरणा नदी आहे पण लोकांना पिण्यास स्वच्छ पाणी नाही. नामदार साहेबांनी जनतेसाठी. राजकारण राजकीय हेवेदावे विसरून. कार्यकर्ते विरोध. याचा विचार न करता आपल्या वाढदिवसाला फाटा देऊन तोच खर्च या नळयोजनेवर खर्च करायला हवा होता. जर असे झाले असते तर तुम्हाला मतांसाठी कोणाकडे हातजोडायची गरज पडणार नाही. जनता देव्हारा यात देवा प्रमाणे तुम्हाला पुजलया शिवाय राहणार नाही. 


            आपल्या गावचा नामदार असून सुद्धा जर पिण्यास पाणी नसेल तर जनतेने. लोकसहभागातून लोकपुढाकार यातून थोडी थोडी आर्थिक मदत बाजूला काढून स्वताचा विकास स्वताचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावा. आणि मग कोणताही नेता मतांसाठी तुमच्या दारात येता कामा नये हे ध्यानात ठेवा 


          समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी


रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा


रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा


मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा


माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा


संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे


९८९०८२५८५९

ती एक वर्षा पूर्वी झाली होती लापता

 


वर्षभरापूर्वी हरवलेली योगिता मानवसेवेच्या उपचारानंतर पोहचली सुखरूप कुटुंबात

शनिवार दि.१३/११/२०२१


जळगाव जिल्ह्यातील मालोद या गावातील एक २२ वर्षीय तरुणी मानसिक भान हरवल्याने आपले कुटुंब सोडून अमानवीय आयुष्य जगत होती. मानसिक आजाराने त्रस्त असलेली ही तरुणी वर्षभर रस्त्यावर फिरत जळगाव पासून नाशिक आणि पायीपायी थेट अहमदनगर येथे पोहचली. या बेवारस तरुणीला महिला व बालविकास विभागाच्या वनस्टाॅप सेटरच्या मार्फत दि. २९/०९/२०२१ रोजी बेघर निराधार मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणाऱ्या 'मानवसेवा' प्रकल्पात दाखल करण्यात आले होते. मानवसेवा प्रकल्पात या निराधार तरुणीवर मानसोपचार तज्ञ डॉ. अनय क्षीरसागर व डॉ. सुरेश घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात आले. आणि उपचारांनंतर योगिता हीचे कुटुंब शोधून दि. १३/११/२०२१ रोजी संस्थेच्या स्वयंसेवकांनी जळगाव येथील मालोद या गावी कुटुंबात पोहच केले. वर्षभरानंतर कुटुंबात पोहचलेल्या योगिताच्या ४ वर्षीय मुलीचे व कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. या निराधार तरुणीच्या कौटुंबिक पुनर्वसनासाठी संस्थेचे मार्गदर्शक मा.प्रा.श्री अविनाश मुंडके सर यांनी आर्थिक सहकार्य केले. 

*मानवसेवा हीच, ईश्वर सेवा!*


*मानवसेवा प्रकल्प*

द्वारा- श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ

☎️ (०२४१) २४२९९४२

📱 ९०११७७२२३३

एक दिवसाचा सहाय्यक कामगार आयुक्त ??

 



मला एक दिवसाचा सहाय्यक कामगार आयुक्त केले तर ???

            # कामगार देवो भव# जगाच्या सर्वात मोठया अर्थक्रांतीचा कणा बांधकाम कामगारच आहे कारण.  बांधकाम क्षेत्रातून सर्वात मोठा आयकर शासनाला मिळतो दिवसभर उन्हात घाम गाळून आपले व आपल्या कुटुंबांचे पालनपोषण करणारा बांधकाम कामगार. हक्काच्या विविध मागणीसाठी निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन करणारे खरोखरच कामगारांसाठी कोणच काही करत नाही माझ्या माग किती लोक आहेत कोण नेता मला बोलावतो काय ? काय देतोय का ? कामगार दबाव. गुंडगिरी बेकायदा वसुली.  कामगाराना लुटण्याचे प्रमाण जास्त वाढले की मग एखाद्या नेत्याच्या छत्रछायेखाली दडणारे कामगारांचे काय भल करणार.  कोरोना काळात बांधकाम कामगार उपाशी होता हाताला काम नव्हते त्यावेळी एक रस्त्यावर होता का ? आत्ता आले कूठुन ? कामगार जाग व्हा ? कोणालाही आपल्या मंडळाच्या लाभातील एक रूपया सुध्दा देवू नका ? सुरक्षा संच दर ५०० चालू आहे. एक रूपया सुध्दा देवू नका ? सहायक कामगार आयुक्त भवन मधील एकादा अधिकारी व कर्मचारी जर तुम्हाला म्हणाला तुम्ही कोणत्या संघटनेकडून आला आहे. तर त्याची तक्रार लेखी करा आम्ही त्याची खबरबात घेऊ 

शासकीय निमशासकीय कार्यालये आपल्या हितासाठी तयार करण्यात आली आहेत. त्या त्या आयुक्त भवन मध्ये त्या त्या जिल्हा तालुका या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्त नेमण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता गोरगरीब लोक अडाणी गरजू अशिक्षित कामगार यांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचेकडून राबविण्यात येणारया स्वता बांधकाम कामगार. मुल. महिला. यांचेसाठी आरोग्य योजना. आर्थिक संरक्षण. विमा संरक्षण. मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना. कामगार सुरक्षा.  कामगार पेन्शन योजना.  अशा एक ना अनेक योजना राबविल्या जातात. त्यासाठी आवश्यक असणारे इंजिनिअर प्रमाणात. ९० दिवस कामांचे प्रमाणपत्र. याची आवश्यकता असते आणि ते देण्याचा अधिकार मंडळाने इंजिनिअर लोकांना दिला आहे.  जागोजागी संघटना सेवाभावी संस्था युनियन राजकीय संघटना सामाजिक संघटना अशी विविध दुकानें तयार झाली. कामगार नेते कामगार हितचिंतक. यांना आपल्या जिल्ह्यात उत आला आहे यासाठी कारणीभूत आहेत ते म्हणजे बांधकाम कामगार कार्यालयातील. अधिकारी व कर्मचारी यांना फितुर असणारे सहाय्यक कामगार आयुक्त 

        मी कोण नेता नाही पुढारी नाही   आहे तो म्हणजे कामगारांना संबोधन प्रबोधन करणारा एक मामुली कामगार. मी आज आपल्या सर्वांच्या कडे एक मागणी करत आहे एक दिवस मला सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून काम करणयाचा अधिकार द्या.  आज सर्वात मोठे दोन नंबर आहे ते म्हणजे सहाय्यक कामगार आयुक्त भवन मध्ये. आहे सर्वात महत्वाचे काम करावे लागेल ते म्हणजे सहाय्यक कामगार आयुक्त भवन मध्ये मुक्काम करणारे संघटना वाले यांना हाकलणे हे माझे पहिले काम असेल कोणी परवानगी दिली यांना आॅफिस मध्ये ढवळाढवळ करायची. ज्या अधिकारी व कर्मचारी यांनी यांना आत येण्याची परवानगी दिली त्यांना नोकरीवरून काढून टाकले पाहिजे सहाय्यक कामगार आयुक्त भवन चया आवारात टेबल घेऊन दिवसाढवळ्या कामगारांना आर्थिक लुटणारे पहिले हाकलून धया सहाय्यक कामगार आयुक्त भवन चया आसपास सुध्दा कोणी एजंट दलाल संघटना सेवाभावी संस्था युनियन यांचा अध्यक्ष उपाध्यक्ष दिसला नाही पाहिजे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करीन.  

              कामगार नोंदणी साठी इंजिनिअर दाखले देतात ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र दिले जाते तो मंडळाने दिलेला अधिकार आहे पण आज काही इंजिनिअर लोक ठराविक रक्कम घेऊन नोंदणी दाखले देत आहेत. जे इंजिनिअर असे कामगार नोंदणी दाखले देतात. # त्यांनी ज्या बांधकाम कामगार यांना दाखला दिला आहे # त्या बरोबर ९० दिवस कामांचे हजेरी पत्रक जोडणे बंधनकारक करीन # पगार पत्रक रोज पगार देत असेलतर शपथपत्र जोडणे बंधनकारक करिन # पगार बॅंकेतून दिला जात असेल तर बॅंक खात्याचे स्टेटमेंट जोडणे बंधनकारक करिन # त्यामुळे बोगस कामगार नोंदणी होणार नाही. सर्वात पहिलें आत्तापर्यंत ज्या ज्या इंजिनिअर लोकांनी कामगार नोंदणी दाखले दिले आहेत त्यांना नोटिसा बजावून. खरोखरच दाखले दिलेले कामगार त्यांच्याकडे कामाला आहेत का याची चाचपणी तपासणी करीन. ज्यांनी जेवढे कामगार नोंदणी दाखले दिले तेवढे कामगार त्यांच्याकडे कामाला नसल्यास अशा इंजिनिअर लोकांचें रजिस्ट्रेशन रद्द करून त्यांच्यावर शासनाची फसवणूक केली अंतर्गत दंडात्मक कारवाई करीन.यामुळे बोगस कामगार नोंदणी बंद करण्यासाठी पहिलें पाऊल टाकले जाईल. 

        २०२० मध्ये कामगार अपघातात मृत्यू होऊ नये यासाठी मंडळाने सुरक्षारक्षक संच वाटप केले होते त्या अंदाजानुसार २८३०० सुरक्षा संच वाटप करण्यात आले. त्यामध्ये असे आढळून आले की मिळतय घया. कोणीही त्यासाठी अर्ज भरु लागला.  यामध्ये महिला संख्या जास्त आहे. आणि दुःखाची बातमी म्हणजे जिल्ह्यात कोठेही कोणताही महिला पुरुष कामगार या सुरक्षा संच वापरत नाही. मंडळाला ज्या प्रमाणे सुरक्षा संच वाटप करण्याचा अधिकार आहे त्यानुसार तो वापरला जातो का नाही याचा सुध्दा अधिकार मडळाला व सहाय्यक कामगार आयुक्त यांना आहे कामगार भवन मध्ये अधिकारी व कर्मचारी कमी असलयासा जिल्ह्यात कामगारांच्या हितासाठी काम करणारे समाजसेवक.  युनियन संघटना आहेत यांची नेमणूक सुरक्षा संच वापर होतो का नाही हे बघण्यासाठी करीन. प्रत्येक तालुक्यात एक दिवस बांधकाम जिथे जिथे चालू असेल तिथे जाऊन कामगाराची सुरक्षा संच वापर होतो का नाही हे बघण्याचा अधिकार देईन. ज्याला सुरक्षा संच मिळाला आहे तो बांधकाम कामगार आहे का नाही. अशी कोणतीही सबब आढळल्यास. शासनाची चुकीची माहिती देऊन फसवणूक केली या अंतर्गत बांधकाम कामगार व तो बांधकाम कामगार आहे हे सिद्ध करणारे इंजिनिअर यांच्यावर दंडात्मक अटकेची कारवाईची.   करण्याचे आदेश काढीन. 

          सहाय्यक कामगार आयुक्त भवन मध्ये संघटना सेवाभावी संस्था युनियन राजकीय सामाजिक संघटना. यांचा कामगार भवन मध्ये येणारा संपर्क थांबवा. नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांना आॅफिस मध्ये घेऊन येवून सहायक कामगार आयुक्त यांवर दबाव आणण्यासाठी प्रयत्न करणारे कामगार हितचिंतक नेते यांचा वावर त्वरित थांबविन. असे करणारे कामगार हितचिंतक यांच्यावर आॅफिस कामामध्ये अडथळा आणणें यासाठी कारवाई करण्यात यावी. अशी तरतूद करण्यात येईल.  कामगार भवन येथे काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्या मोबाईल मध्ये कामगार हितचिंतक व अन्य लोक यांचें नंबर कशासाठी काय काम आहे त्या नंबरचे ? ज्या अधिकारी व कर्मचारी यांच्या मोबाईल मध्ये कामगार हितचिंतक व अन्य कोणत्याही इसमाचा मोबाईल नंबर आढळल्यास त्याला नोकरीवरून काढून टाकण्याची तरतूद केली जाईल तुम्ही शासनाचे कर्मचारी आहात मग बाकीच्या कोणाचाही नंबर तुमच्यात कशासाठी पाहिजे सबळ कारण नसल्यास हाकलपटटी करण्यात येईल.  आॅनलाइन पध्दतीने नोंदणी होत असताना आपल्या कामात कुचराई करणारे अधिकारी व कर्मचारी यांना चांगला चाफ लावला जाईल. वेळेवर मॅसेज पाठविणे.  स्मार्टकार्ड वेळेवर मिळते का नाही याची दक्षता घेणे.  सहाय्यक कामगार आयुक्त भवन मध्ये कामगार आणि अधिकारी व कर्मचारी समोर असेच धोरण अंमलात आणले जाईल.#  नो वशिला नो पैसा. # 

           मी जे काय मत मांडले किती जणांना पटले किती लोकांना पटले नाही. ज्यांना पटल त्यांनी उठाव करण्यासाठी मदत करा आणि ज्यांना पटल नाही त्यांनी आपलं सगळ जीवन वेचले आहे ते कामगार भल करण्यासाठी नाही तर फक्त आणि फक्त पैसा मिळविण्यासाठी. ज्यांना काही काम त्यांच्यासाठी मोकळ कुराण म्हणजे बांधकाम कामगार. 

          समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रूग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

आम्हाला कधीच वाटले नाही

 


आम्हाला कधीच वाटले नाही

            आपल्या शासनव्यवस्थेचे विविध कार्यालये शासकीय निमशासकीय कार्यालये स्थापन करण्यात आली आहे त्यात प्रामुख्याने. ग्रामपंचायत राज. नगरपालिका महानगरपालिका. पंचायत समिती. अशी विविध कार्यालये. स्थापन करण्यात आली आहेत. यामाध्यमातून विविध विकास व कल्याणकारी योजना राबविल्या जातात. त्या गोरगरीब आणि गरजूंना मिळवून घेण्यासाठी विविध जाचक कागदपत्रांची अट. अधिकारी व कर्मचारी दलाल एजंट यांच्याकडून अगदी हिण वागणूक दिली जाते. 

   ग्रामपंचायत ग्रामिण भागातील मिनी मंत्रालय आहे यामधून खेड्यापाड्यात विविध योजना राबविण्यात येतात त्यात प्रामुख्याने. रस्ते. गटर बगीचे स्मशानभूमी समाजभूमी रस्ते विकास. घरकुल योजना. वयोवृद्ध. महिला निराधार विधवा अनुदान यासाठी गोरगरीब लोक ग्रामपंचायती मध्ये अर्ज दाखल करतात आणि मग त्या त्या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची इनामदारी. जोरात असते. वर्षे नु वर्ष. लाभाचे गोरगरीब जनतेचे अर्ज आज सुध्दा धुळखात पडले आहेत कोणीही अधिकारी व कर्मचारी यांना कोणताही पत्रव्यवहार करून कळविले सुध्दा नाही. म्हणजे या अधिकारी व कर्मचारी यांना कधीच वाटली नाही गोरगरीब यांना छळताना पंचायत समिती हे तर सर्वात मोठें करपशन आहे योजना मोठया पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून नेते पुढारी आमदार खासदार मंत्री पुढारी यांचें बगलबच्चे यांनाच मिळवून देत आहे. तरि सुध्दा या अधिकारी व कर्मचारी यांना कधीच वाटली नाही

          बांधकाम कामगार नोंदणी हे सर्वात मोठें भ्रष्टाचार केंद्र आहे बांधकाम कामगार व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचेकडून बांधकाम कामगार यांचेसाठी 19 कल्याणकारी योजना राबविण्यात येतात त्या मिळवून घेण्यासाठी काही जाचक अटी शर्ती. व कामगार हितचिंतक संघटना दलाल आणि एजंट फुटाला निर्माण झाले आहेत पूर्ण जिल्हा भ्रष्टाचार युक्त झाला आहे. संघटना कामगार हितचिंतक यांनी बांधकाम कामगार यांना शारीरिक मानसिक आर्थिक लुट सुरू केली आहे. त्यांना सहकार्य सहाय्य कामगार आयुक्त भवन मधील अधिकारी व कर्मचारी. यांच्याशी हातमिळवणी करून तुम्ही खा आणि आम्ही खातो असा फंडा अमलात आणला जातो. सर्वात मोठा कामगारांचा अपमान याच सहाय्यक कामगार आयुक्त भवन मधील अधिकारी व कर्मचारी करतात तुम्ही कोणाकडून आला. तुमची संघटना कुठली. कुणाला किती लाभाचे पैसे जमा झाले हे कामगारा आगोदर संघटना वाल्यांना सांगणारे हेच आॅफिस मधील अधिकारी व कर्मचारी आहेत. आम्हाला किती पैसे देणारा. अशी विचारणा करणार्या अधिकारी व कर्मचारी यांना आपल्या पदांवर राहण्याचा अधिकार नाही. आज हजारो कामगार लाभाची प्रकरणे अशा गलथान कारभारामुळे धुळखा पडले आहेत. म्हणजे या अधिकारी व कर्मचारी यांना कधीच वाटली नाही आणि वाटणारं नाही 

              माहिती अधिकार. अधिनियम २००५ सर्व गोरगरीब जनतेला शासकीय निमशासकीय कार्यालयात चालणारे कामकाज तपासणी पडताळणी करण्याचा अधिकार देण्याचा मोठा प्रयत्न आहे पण आज सर्वसामान्य जनतेला गोरगरीब लोकांना एकादी माहिती पाहिजे असेलतर माहिती अधिकार दाखल करण्याची सुध्दा पध्दत माहिती नाही. आणि जाणकार लोक विशिष्ट फी दिल्याशिवाय शिकवत नाहीत म्हणजे सर्वात अगोदर यांना वाटली पाहिजे. माहिती अधिकारांची माहिती देताना माहीती देता येत नाही. सदोष कारण दिले जात नाही. सुनावणी असुन सुद्धा अधिकारी व कर्मचारी हजर राहत नाही. असे एक नाही अनेक नपटणारे कारणें देवून. माहिती अधिकार कायद्यात सजा व दंड तरतूद असुन सुद्धा त्याकडे डोळेझाक करणारे अधिकारी व कर्मचारी यांना जरा सुद्धा वाटली नाही 

            प्रत्येक तालुक्यात असणारे तहसिलदार कार्यालय हे लहान जिल्हाधिकारी कार्यालय माणले जाते त्यामध्ये. महसूल. संजय गांधी निराधार. श्रावणबाळ योजना. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन. सर्व पत्र व्यवहार. अपंग विकासासाठी योजना. पुरवठा विभाग. स्टॅम्प. निवडणूक आयोग कार्यालय अशी विविध विभागांचे काम करण्यासाठी विविध विभाग नेमले आहेत. त्यात सर्वात मोठा भ्रष्टाचार म्हणजे महसूल. वर्षानुवर्षे धुळखात पडलेले जमीन संबंधित प्रकरणे. वयोवृद्ध महिला पुरुष निराधार विधवा यांच्यासाठी विविध पेन्शन योजना. यासाठी तहसिलदार कार्यालय मध्ये दाखल केलेले पत्र व्यवहार कोण बघत सुध्दा नाही वयोवृद्ध व अपंग लोकांसाठी असणार्या योजना त्यासाठी लागणारे कागदपत्रे अपंगाला. वयोवृद्ध व्यक्ती आॅफिसला जाता येईना. कोणताही अधिकारी व कर्मचारी यांना एसी रुम सोडू वाटेना. रस्त्याने येणार्या जाणारया लोकांकडे केविलवाणी नजर करून पाहणारे अपंग आणि वयोवृद्ध मी बघितले आहेत पण अधिकार जर आपले आॅफिस सोडून खाली आला तर कमी बापाचा होणार आहे कां ? पण शासनाने ज्याच्या सेवेसाठी यांची निवड केली आहे तयाची सुध्दा यांना कधीच वाटली नाही रेशन दुकानदार आणि शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे संगनमताने चालणारा सावळागोंधळ आपण बघतो. ज्यांचे दारिद्र्य रेषेखालील नाव आहे त्याला रेशनकार्ड नाही. ज्याला दारिद्र्य रेषेखालील प्रमाणात आहे त्याचे दारिद्र्य रेषेखालील रेशनकार्ड नाही दुकान दारची दमदाटी. अधिकारी व कर्मचारी यांचे पैसै खाऊन काम. लाभार्थी वार्यावर. सदन व्यक्ती मुबलक धान्य. नाव कमी करणे नावं वाढविणे. अन्न धान्य सुरू करणे. मयत व्यक्तिची नावे कमी करणे. नविन रेशनकार्ड काढणे यासाठी किती पैसे देताय. मगच काम होतंय. आॅफिसला कर्मचारी कमी ठेकेदार पध्दतीने भरली जाणारी यांचें पगार कमी मग यांना कुराण मोकळ लुटायला अधिकारी व कर्मचारी यांच्या संगनमताने. म्हणून म्हणतो या अशा कामचुकार अधिकारी व कर्मचारी यांना कधीच वाटली नाही. 

              वैद्यकीय सेवा हीच ईश्वर सेवा. मनांत भावना आहे आणि समोर दिसतो तो फक्त पैसा. औषधांचा दर उपचार खर्च मनमानी पद्धतीने आकारली जाणारी फी. गोरगरीब लोकांना कोणत्या दवाखान्यात कोणते उपचार मोफत होतात कोणता दवाखाना कोणत्या योजनेअंतर्गत मोफत वैद्यकीय सेवा देतो हे समजलंच नाही आणि आपणं करूनच दिलें नाहीं म्हणून म्हणतो या सर्व वैद्यकीय बाजार करणारे यांना कधीच वाटली नाही

             शेतकरी आत्महत्या कर्जबाजारी पणा. बेरोजगारी. एस टी संप. पूरग्रस्त अनुदान. बोगस पंचनामे. घरांचे. गोठे. जनावरं. मयत व्यक्ति यांचें बोगस व पैसै खाऊन बोगस पंचनामे करणारे अधिकारी व कर्मचारी. खरोखरच नुकसान झालेले वार्यावर आणि ज्यांचे कांहीच नुकसान झाले नाही अशा लोकांना शासनाची मदत मग पैसा अन्न धान्य याप्रमाणे. म्हणजे खरोखरच या अधिकारी व कर्मचारी यांना कधीच वाटली नाही. प्रकल्प ग्रस्त लोकाची जमीन संपादन करणे. त्यांची परस्पर विक्री करणारे. असे भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांना कधीच वाटली नाही

      आज भरती आहे उद्या भरती तारिख जाहीर होईल या आशेने सकाळ संध्याकाळ. मिळेल ते काम करून अर्धपोटी उपाशी राहून आपले व आपल्या कुटुंबाला हातभार लावणे तरुण आज मोठ्या संकटात सापडलेल्या आहेत. सरकार भरती काढत नाही मुलाची वय संपली लग्न होत नाही म्हणून मनांत झूरणारे आई वडील सगळा प्रकार अगदी भयानक आहे. म्हणूनच सरकारला सुध्दा कधीच वाटली नाही

       समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

सर्वात मोठा फास - बेरोजगारीचा शाप

 


सर्वात मोठा फास आहे तो म्हणजे आपली व आपल्या देशाला लागलेला शाप बेरोजगारी 

ग्रामिण बेकारीची कारणे

1/लोकसंख्या वाढ

2/ जिरायत शेती अधिक

3/ कृषी प्रधान अर्थ व्यवस्था

4/ शेतीमधील जुने तंत्रज्ञान

5/ हंगामी योजना

6/ शेतजमीन विभाजन व अपखंडन

7/ एकत्रित कुटुंब पद्धती

8/ वारसा हक्क कायदा

9/ भुसंधारण कायदयाचे अपयश


शहरी बेकारीची कारणे

1/ औधोगिक व सेवा क्षेत्राताचा विकास

2/ उत्पादन तंत्रात बदल

3/ मंद आर्थिक विकास

4/ तेजी मंदी चे व्यवसाय चक्र

5/ धंदेवाईक शिक्षणाचा अभाव

6/ ग्रामिण जनतेचे स्थलांतर

7/ घुसखोरी

8/ शासकीय उदासिनता


बेकारीचे दुष्यपरिणाम

आर्थिक परिणाम

1/ आर्थिक असुरक्षितता

2/ उत्पादन वितरणात विषमता

3/ दारिद्र्य वाढ

4/ मानवी संसाधन अभाव

5/ राहणीमानात तफावत

6/ अनुत्पादक लोकसंख्या वाढ

7/ आर्थिक विकासाला खिळ


सामाजिक परिणाम

1/ सामाजिक स्थैर्यासाठी धोका

2/ गुन्हेगारी वाढत

3/ सामाजिक अधिपतन

4/ निष्क्रियेत वाढ


भारतामधील बेकारी कमी करण्यासाठी उपाययोजना

भगवती समिती

/नेमणूक 1970/ अहवाल 1973

भारतीय बेकारीची बेरोजगारी अभ्यास करून त्यासंबंधी उपाययोजना सुचविण्यासाठी केंद्र शासनाने डिसेंबर 1970 मध्ये भगवती समिती नेमली या समितीने 15/मे 1973 रोजी आपला अहवाल सादर केला

1/ भगवती समिती अहवालानुसार शिफारशीनुसार ग्रामिण बांधकाम योजना हि सुरू करण्यात आली सार्वजनिक बांधकामाच्या माध्यमातून ग्रामिण भागात रोजगार निर्मिती व टिकाऊ साधनसंपत्ती निर्माण करणे हा उद्देश त्यामागे होता

2/ धडक योजना

याला तात्काळ योजना असे म्हणतात याअंतर्गत लघूसिंचन भूसंधारण रस्ते निर्माण इत्यादी कार्यक्रम आखून बेरोजगारांना वर्षातून. /10/ महिने रोजगार उपलब्ध करून दिला जातो 

3/ दारिद्र्य निर्मूलन व बेकारी निर्मूलन कार्यक्रमांतर्गत योजना अर्थशास्त्र याच घटकांत सविस्तर दिल्या आहेत

आत्ता आपणं अशा परिस्थितीत बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी सफाई कामगार महिला कामगार बेरोजगारी मुळे उपासमारीची वेळ आली आहे तरतूद लोक मरण्याच्या अगोदर नियोजन लावावे लागेल 

केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पकेज अंतर्गत विना रेशनकार्ड धारक व परगावाहून मजूरीसाठी आलेले मजूर यांना मोफत 5/महिने धान्य वाटप होणार होतें पण /2/ महिने वाटप झाले बाकिचे कुठे गेले माहित नाही हि आपली शासन व्यवस्था सर्व रेशनकार्ड धारकाचे धान्य वाटप चालू आहे रेग्युलर महिन्याचे धान्य मिळून मोफत सुध्दा मिळत आहे आमच्या पाहण्यात आले हाच रेशनचा माल 2/3/ रु मिळतो तो जादा दराने विकला जात आहे 


बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

संस्थापक अध्यक्ष अहमद मुंडे

9890825859

ध्यास मदतीचा

 

ध्यास मदतीचा

      समाजात प्रत्येकजण आपापल्या परीने गोरगरीब जनतेला मदत करतो कोण धान्य दान करतो. कोणी पाणी दान करतो. कोण आर्थिक मदत करतो. कोण शारीरिक कष्ट करून मदत करतो पण सर्वात मोठा आणि जटिल असणारा असा प्रश्न आहे तो म्हणजे आपल्या समाजात अशी काही लोक आहेत कि जी अर्धपोटी उपाशी राहून कशीबशी जगत आहेत मग त्यांना दवाखान्यात जाण्यासाठी अठठरा विश्व दारिद्र्य असल्यामुळे वैद्यकीय खर्च करणे शक्य नाही यासाठी बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा यांचेकडून आमचें शिराळा तालुका महिला अध्यक्ष. व शिराळा तालुका उपाध्यक्ष. व त्यांचे सहकारी यांनी आपला अनमोल वेळ धन खर्ची घालून सोनवडे सारख्या गावांत मोफत डोळ्यांचे विविध विकार यांवर तपासणी व उपचार यासाठी मोफत शिबीर आयोजित केले होते 

सोनवडे येथे डोळ्यांचं शिबिर 9 /11/ 2019 रोजी संपन्न झालेल्या डॉक्टर सविता नलवडे, रवी यादव, नांगरे चेअरमन सतीश पाटील शिवाजी संचालक, विजय चौगुले, मणदुर उपसरपंच, आयोजक हसीना मुल्ला. संगीता बाबर मनीषा बाबर पूनम भोसले, वैभव बाबर, त्यांनी सर्वांनी मिळून सोनवडे, आरळा ,मणदूर ,बेरडे वाडी, शित्तुर ,शिराळा या भागातील लहान मुले व मोठी माणसे पेशंट मोतीबिंदू, काचबिंदू ,लासरू, मास वाढणे असे डोळ्यांचे गंभीर आजार तपासणी करून मोफत शस्त्रक्रिया पाठवले. या समाज कार्याला आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो.हा विचार मनात आणतात मरावे परी कीर्तिरूपे उरावे. आपण समाजात जन्माला आलो म्हणजे आपल्या हातून कळत नकळत आपण समाजाचे काही तरी देण लागतो ही भावना मनात घेऊन आमच्या रमाई आंबेडकर. झासीची राणी. अहिल्याबाई होळकर. राजमाता जिजाऊ. मदर तेरेसा. सावित्रीबाई फुले. यांच्या लेकी. यांनी सर्वात मोठा उपक्रम हाती घेतला सलाम त्यांच्या कामाला # ध्यास मदतीचा#

    बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या