Showing posts with label जीवन. Show all posts
Showing posts with label जीवन. Show all posts

साहेब - वाचवा ओ वाचवा

 


वाचवा ओ वाचवा साहेब

                  अंगावर काटा उभा करणारी एक ह्रदय द्रावक हाक आपण वेळोवेळी ऐकतो अनुभवतो कोणी पाण्यात बुडताना. जळीत प्रकरणं. अपघातग्रस्त. एखाद्या प्रकरणात संकटात सापडलेला प्रत्येक माणूस कोणाला कोणाला तरी जीवाच्या आकांताने ओरडून मदत मागतो कारणं त्याने जीवन संपताना जवळून पाहिले असते. 

               # वाचवा ओ साहेब # ही हाक आपल्या ३६ जिल्ह्यातील त्या त्या जिल्ह्याचे मायबाप म्हणजे जिल्हाधिकारी यांना दिली आहे कारण आज प्रस्थिती तशीच निर्माण झाली आहे. कारणं प्रत्येक गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये कमीत कमी वेळात जास्त पैसा. कमी श्रमात जास्त पैसा असा फंडा अमलात आणला जातो आहे. जागोजागी तयार होणा-या. राजकीय बॅंका पतसंस्था. बजाज फायनान्स. मायक्रो फायनान्स. बंधन बॅंक. बुलढाणा फायनान्स प्रत्येक गावातील प्रतिष्ठित महिला. यांना आर्थिक लालच दाखवून दहा दहा महिला गटाच्या माध्यमातून हा गोरख धंदा चालतो . एका मिनिटात आधारकार्ड वर लोन. विविध बिझनेस कंपन्या. साखळी पध्दतीने व्यवसाय बिझनेस. विविध शेती संलग्न व्यवसाय. कुक्कुटपालन शेळीपालन शेती औजारे. बि बियाणे खते विविध. जैविक खते. औषध फवारणी यामध्ये चालणारे दोन नंबर. औषध बोगसगिरी. खते बी बियाणे बोगस. असा लुटीचा प्रकार आहे  

  शासकीय योजना. यामध्ये एजंट दलाल अधिकारी व कर्मचारी यांचे मनमानी कारभार.    

              आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये जागोजागी अशी काही समाजाच्या. नावाखाली. अमुक पैसे भरा आणि तमुक तमुक वेळेत. मोठा आर्थिक लाभ घ्या. आपण सुद्धा खुळ्या सारखें व्याजाने काढून उसणेपासने करून अशा बोगस कंपन्या मध्ये अशा चोरांच्या हातात आपली कष्टाची मिळकत देतो. आणि पूर्णपणे फसतो. असे चोर तयार होतात एखाद्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये अलिशान आॅफिस घेतात अधिकारी व कर्मचारी मागेल त्या पगारावर कामाला ठेवतात. अलिशान बंगल्याची आश्वासने. अलिशान महागड्या गाडया अशी एक भुलभुलैया. तयार केली जाते आणि. पहिल्यांदा येणारे ग्राहक यांना. आर्थिक लाभ दिला जातो आणि बघता बघता यांचा चोर बाजार जोरात जोमात चालतो. अलिशान हाॅटेलमधये सेमिनार. महागड्या गिफ्ट. दिल्या जातात. प्रत्येक गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये यांचें एजंट नेमले जातात त्यांना पगार कमिशन दिल जात. सर्व काही अगदी सुरळीत चालते. समाजातील नामांकित लोक नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांचा अशा बोगसगिरी करणार्या कंपनीला वरदहस्त असतो. 

              मोठमोठ्या कंपन्या गव्हरमेंटचया असणार्या बुडाल्या काही जण पैसा देणार होते काहीजण जमीन देणार होते. तर काहिजण. नोकरी देणार होते. काहीजण गाड्या बंगले. देणार होते. काहीजण शेळया कोंबड्या अंडी. मचछिपालन. अशी विविध अमिष दाखवून आपणास लुटणारे आपल्या ध्यानात येई पर्यंत बरिच मोठी आर्थिक माया गोळा करतात आणि रातोरात पोबारा करतात.  

              परवा एक विषय आला आहे मोबाईल वर एक मॅसेज फिरत आहे २२५० रु भरा आणि ३२ लाखाचे मालक व्हा. तुम्ही मेंबर कराल तेवढे पैसे तुमहाला मिळणार. अस होत का ? आपण सुद्धा खुळ्या प्रमाणे या सर्वांच्या माग जातो आणि जाताना एकट न जाता. सगेसोयरे. मित्रपरिवार. यांना सुध्दा घेवून जातो म्हणजे बुडताना एकट न बुडता सगळी बुडू आणि चोरांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी आपणच कारणीभूत आहोत 

              सर्व जिल्हाधिकारी यांना कळकळीची विनंती आहे की आपल्या जिल्ह्यात गोरगरीब जनता सर्वसामान्य लोक. मिळेल ते काम करून अर्धपोटी उपाशी राहून आपले व आपल्या कुटुंबांचे पालनपोषण करित आहेत. आपण आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये दाखल होणारें. कोणतीही परवानगी शिवाय आपले बोगस उधोग उभे करणारे यांची माहिती. आपल्याच नव्हेतर. ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका. क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांना सुध्दा नसते. म्हणजे आपल्या गावात तालुका जिल्हा यामध्ये आपल्या बोगस उधोगाची. प्रसिद्धी प्रसार जाहिरात करण्यासाठी फिरणारे कोणाच्या परवानगीने फिरतात. त्यांना कोण परवानगी देते यासाठी मा जिल्हाधिकारी साहेब यांनी ग्रामपंचायती क्षेत्रात असा फसवा व्यवसाय करणारे यांच्यासाठी गावबंदी आदेश जारी करणे गरजेचे आहे. तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये सुद्धा बंदी आदेश काढणे गरजेचे आहे

असा कोठेही प्रकार घडत असेल त्या संबंधित आपणाकडे तक्रार आल्यास त्वरित जवळच्या पोलिस स्टेशनला आदेश देवून चौकशी करण्याचे आदेश देण्यात यावेत.   

        जनतेने कमीत कमी वेळात जास्त पैसा मिळविण्यासाठी कोणत्याही भुलभुलयाला बळी पडू नका. फसलेल्या लोकानी विविध आंदोलने केली. मोर्चे काढले. न्यायालयात धाव घेतली काहीजणांनी आत्मदहन केले. उपोषणे केली. पण अशी विविध प्रकारची आंदोलने करून सुध्दा आजपर्यंत आर्थिक लुटललेलया. लोकांना न्याय मिळालाच नाही तुम्ही मेला कोणालाच फरक पडत नाही. तुम्ही उपाशी राहीला तरी कोणाला काही फरक पडत नाही. जनता जोपर्यंत फसणार आहे तोपर्यंत फसवणारे येणारच. तुम्ही देताय म्हणून हे घेतायत. आजच तुम्ही जागा आणि दुस-याला जाग करा. 

          समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

शासकीय अधिकारी यांचेसाठी

शासकीय अधिकारी आपल्या पदांचा वापर. समाजहितासाठी करू शकतो. कोणताही शासकीय अधिकारी गोरगरीब सर्वसामान्य लोकांना आपल्या पदाच्या जोरावर. अन्याय अत्याचार करू शकत नाही

शासकीय अधिकारी व्याजाने पैसे घेवू अथवा देवू शकत नाही. 

माझा मामा काका भाऊ मित्र चुलता. जवळचा पाहुणा. शासकीय अधिकारी आहे म्हणून मी महणील तसच होईल असे कोणीही म्हणू शकत नाही

शासकीय प्रशासकीय अधिकारी. पोलिस. तहसिलदार. प्रांत. मंडलधिकारी. ग्रामसेवक. तलाठी. नायब तहसीलदार. गटविकास अधिकारी. मुख्य अधिकारी. कार्यकारी अधिकारी. पंचायत समिती विभाग. जिल्हा परिषद विभाग. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली येणारी विविध शासकीय निमशासकीय कार्यालये. अशी एक नाही अनेक शासकीय अधिकारी व कर्मचारी आपल्या व आपल्या घरच्या कोणत्याही अधिकारी व कर्मचारी यांच्या पदाच्या जोरावर शेजारी. यांना शिविगाळ करणे. दम देणें. जीवे मारण्याची धमकी देणे. दहशत गुंडगिरी. व्याजाचा व्यवसाय. आपल्या परिसरात दहशत माजविणयासारखे. कृत्य करणे. दारु पिऊन लोकांना त्रास देणारा अधिकारी व कर्मचारी. महसुल विभागात याचा गुंठा त्यांच्यात घालणारे अधिकारी. अशी एक नाही अनेक अधिकारी आपल्या पदांचा गैरवापर करून नागरिकांना त्रास देत असतात. आजच शासनाने एक शासन निर्णय जारी करण्याची गरज आहे जो कोणी अधिकारी व कर्मचारी आपल्या पदाच्या जोरावर गोरगरीब लोकांना. सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास देत असेल आणि जर त्या सर्वसामान्य माणसाने गोरगरीबाने संबंधित. शासकीय अधिकारी अधिकारी व कर्मचारी यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यास शासनाने व जिल्हाधिकारी साहेब यांनी विना चौकशी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना निलंबित करण्यात यावे आणि लोकांना संरक्षण द्यावे.

माणूस म्हणून जगण्याचा आधार मानव अधिकार



माणूस म्हणून जगण्याचा आधार मानव अधिकार 


         10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्र संघाने हा वैश्विक जाहीरनामा अखिल मानव जातीच्या प्रति विविध हक्क व अधिकार. यांची जाणीव करून देण्यासाठी समर्पित केला. म्हणून तर 1 डिसेंबर हा दिवस जागतिक मानव अधिकार दिवस म्हणून साजरा केला जातो. मानव अधिकार कार्यकर्त्यांनी हा दिवस 30 कलमी जाहिरनामा मनापासून माहिती करून घेणे गरजेचे आहे
                मानव कुटुंब प्रिय आहे. समूहाने राहणे. आपण जिथे राहतो तिथे आपल्या जीवनासाठी व जगण्यासाठी आवश्यक असणार्या सुख सोयी उपलब्ध करून घेण्यासाठी संविधानात आपणांस काही मूलभूत अधिकार व हक्क कर्तव्य आखून दिली आहेत जया अर्थी मानव कुटुंबातील सर्व व्यक्ती चे स्वाभाविक प्रतिष्ठा. व त्यांचे सन्मान न्याय व शांतता यांच्या प्रसथापनेचा पाया आहे ज्या अर्थी मानवी हक्क व अधिकार यांचें हनन अवहेलना व अप्रतिष्ठा झाल्याने अमानुष कृत्य घडून आली त्यामुळे सर्व मानवी जीवन विस्कळीत झाले. आणि त्यायोगे मानव जातीच्या सदविवेक बुध्दी वर मोठा आघात झाला त्यातून. गुंडगिरी. दहशतवाद नक्षलवाद व्यसन. असया समाजासाठी विघातक असणार्या प्रवृत्तीने डोकं वर काढलं. आणि त्यातून मानवाच्या भाषण स्वातंत्र्याचा व उपभोगता घेता व यातळी गरज यापासून त्याची मुक्तता होईल अशा जगाची उभारणी करणे ही सर्वोच्च आकांक्षा म्हणून घोषित करण्यात आली आहे यांच्यावर उपाय म्हणून जुलुम दडपशाही यांच्याविरुद्ध अखेरचा उपाय म्हणून आणि सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून घेण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या हेतूने व मानवाला बंड करणे. आंदोलन करणे. उपोषण करणे. व अन्य मार्गाने आपल्या वर झालेल्या अन्यायाची दाद मागणयाची वेळ येवू नये म्हणून मानवी अधिकारांचे संरक्षण कायद्याने करणे गरजेचे आहे म्हणून मानव अधिकार ही संकल्पना अमलात आणली
          राष्ट्र राष्ट्रा मध्ये मित्रत्व संबंध वृद्धिंगत करण्याच्या कार्यासाठी चालना देणे गरजेचे आहे. संयुक्त राष्ट्रा चया सनदेमधये मूलभूत हक्क अधिकार मानवी अधिकार प्रतिष्ठा व महत्व महिला व पुरुष समानता समान अधिकार यावरील आपली श्रद्धा निश्चिय पूर्ण पुन्हा व्यक्त केली आहे आणि अधिक अधिक स्वातंत्र्याचे वातावरण समाजप्रगती. घडवून आणण्याच्या व जीवनभर सुधारण्याचा निर्धार केला आहे. संयुक्त राष्ट्रानी सदस्य राष्ट्रसंघटनेचा सहकार्याने व कर्मचारी पदाधिकारी मानवी हक्क व अधिकार मूलभूत अधिकार स्वातंत्र्य जागतिक प्रतिष्ठा. प्राप्त करून देणायाचे व त्याबद्दल जनजागृती जाहिरात संबोधन प्रबोधन व त्यांचे पालन करण्याचे ध्येय साध्य करण्याची मानव अधिकार कार्यकर्त्यांनी शपथ घेतली आहे. हा मानवीय अधिकारांचा वैश्विक जाहीरनामा सर्व लोकांसाठी ध्येय सिध्दी एक समान आदर्श म्हणून उद्घोषणा करते व त्यासाठी प्रत्येक व्यक्तिने व समाजातील प्रत्येक घटकाने हा मानव अधिकार जाहीरनामा सतत डोळ्यासमोर ठेवणे आवश्यक आहे. अध्यापन व शिक्षण यांच्या द्वारे या अधिकारांचा व स्वातंत्र्याचा मान राखला जाण्यासाठी आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा प्रगतिक स्वरूपाचा उपाय योजनांच्या द्वारे सदस्य राष्ट्रांच्या लोकांमध्ये व त्यांच्या क्षेत्राधिकार प्रदेशातील लोकांमध्ये त्यांना जागतिक मान्यता मिळवून व त्यांचे परिणामकारक पालन केले जाण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत
       # तक्रार कोठे आणि कशी करावी #
        भारतीय राज्य घटनेने प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क व अधिकार दिले आहेत त्यांचा वापर उपभोग घेण्यासाठी विविध तरतूद करण्यात आली आहे प्रशासन शासकीय निमशासकीय कार्यालयाकडून. प्रशासनाकडून एखाद्या व्यक्तिच्या मूलभूत हक्क व अधिकार यांची पायमल्ली होत असेल. अशा सर्वसामान्य माणसाला गोरगरीब जनतेच्या मदतीला मानव अधिकार आयोग धावून जातो. आयोगाचा कार्यकाल पूर्ण माहिती असणे गरजेचे आहे आणि हे मानव अधिकार कार्यकर्त्यांचे परम कर्तव्य आहे. मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ हा २८ सप्टेंबर १९९३ रोजी लागू करण्यात आला. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग नोव्हेंबर २००१ रोजी स्थापन करण्यात आला. 
        #*#* ‌‌. (१) अशी कोणतीही व्यक्ती की ज्याच्या मानवी हक्कांचे उल्लंघन किंवा हनन झाले असेल त्या व्यक्तिस किंवा त्या व्यक्तिच्या वतीने कोणताही व्यक्ती स्वता किंवा पोस्टाने. फॅक्स. वर मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करू शकतात
(२) कोणत्याही स्वरूपाचे शुल्क अथवा तिकीट लागत नाही
(३) सदर तक्रार संबंधित अध्यक्ष किंवा मानवी हक्क आयोग यांना संबोधित करून करावी
(४) कोणत्याही शासकीय निमशासकीय अधिकार्यांचे विरोधात तक्रार दाखल करता येते
(५) तक्रार मराठी. हिंदी गुजराती. भाषेतून करता येते
(६) सरकार किंवा सरकारी अधिकारी व कर्मचारी यांचेकडून होत असलेला शारीरिक अत्याचार. मानवी हक्क विषयक. फसवणूक व कोणत्याही प्रकारचा छळ. तसेच सन्मानाने जगण्याच्या प्रयत्नात सरकारी अधिकारी व कर्मचारी यांनी केलेला अमानविय हस्तक्षेप आदी करण्यासाठी तक्रार करता येते
(७) पोलिस स्टेशनमध्ये आरोपीला झालेली अमानविय माराहान त्याबद्दल तक्रार दाखल करता येते
(८) पोलिस कोठडी. कारागृह. बालसुधारगृह. येथे झालेला अमानवीय छळ. आणि मृत्यू. हरवलेली बालके व व्यक्ती यांचा शोध घेण्यास टाळाटाळ अशावेळी मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल करता येते
(९) अन्न. वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण. आदि मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी अपेक्षित समाजाची शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून होणारी हेळसांड या विरोधात मानव अधिकार आयोगाकडे तक्रार दाखल करता येते 
     माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारा मानव अधिकार
  समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९

आशेवर जीवन कायम

 


                  आपल्या जीवनाला एक भौगोलिक परिणाम असते. यापूर्वी आपण प्रादेशिक अस्मितेचा विचार केला आहेच. पण त्याशिवाय आपण ज्या भागात राहतो. त्या परिसराचे घटक होतों. आपणं केवळ तामिळ तेलगू कन्नड मराठी मुस्लिम मल्याळी असे विविध जातींचे नसतोच. आपल्या प्रादेशिक अस्मितेबरोबर आपल्याला एक विभागीय चेहरा मिळतो. मग आपण दक्षिण/ दक्षिणात्य बनतो. पूर्वेकडील किंवा उत्तरेकडील भारतीय किंवा अन्य जाती धर्माचे असतो. त्याबरोबर आचारविचार शहरि व ग्रामीण जीवनाची छाप असते. आपल्या जीवनाच्या या भौगोलिक संदर्भातून काही राजकीय सामाजिक प्रश्नांना तोंड फुटते 

        आजच्या आपल्या सार्वजनिक जीवनात दक्षिण भारतीय आणि उत्तर भारतीय अशी विभागणी झालेली दिसते. शिवाय उत्तर भारताच्या सांस्कृतिक वर्चस्व दक्षिणेला नकोसे वाटते. हिंदीचा आग्रह हा दक्षिणात्याना या उत्तर भारतीय वर्चस्वाचा एक नमुना वाटतो. व याउलट दक्षिणातयाचया भाषेचे वेगळे स्वरूप वेगळी लिपी. त्यांचा वेगळा पोशाख. यांच्यामुळे उत्तर भारतीयांनाही त्यांच्याविषयी साशंकता वाटते. दक्षिणात्य संस्कृती फटकून लाघणारी आहे. त्यांचा इंग्रजीचा आग्रह हा उत्तरेकडील लोकांना नोकर्या पासून दूर राखण्यासाठी आहे असे ग्रह बाळगले जातात. विशेषत तामिळाचया वेगळ्या संस्कृतीमुळे आणि भिननतव टिकविण्याच्या आग्रहामुळे दाक्षिणात्य म्हणजे फुटीर अशीच अनेकांची समजूत असते

          भौगोलिक संदर्भातून निर्माण होणारा असाच आणखी एक वाद म्हणजे ग्रामीण विरुद्ध शहरी हा वाद. सर्व सुखसोयी सुविधा या शहरांना मिळतात. रेल्वे. रस्ते स्वच्छ पाणी. वीज कारखाने. सगळे शहरातच असते. मूठभर शहरी पांढरपेशा चे शासनावर प्रभुत्व असते. अशी तक्रार केली जाते. तर शहरी लोकांना ग्रामीण भागातून पुढे येणारे नेतृत्व. ग्रामीण भागातील शिक्षणसंस्था वगैरे गुणवत्ता बद्दल शंका असते. ग्रामीण सवलती देणे. शेतीसाठी सवलती देणे. याला शहरांमधून विरोध होतो. कारण कारखाने. व्यापार. हीच प्रगतीची मुख्य साधनें मानली जातात. निर्णय प्रक्रियेत शहरे. नागरी सुविधा. त्यांनाच प्राधान्य मिळते आणि त्यात चूक आहे शहरी लोकांना वाटत नाही. त्यातही मुंबई. दिल्ली ही महानगरे म्हणजे आर्थिक. राजकीय शक्तीची केंद्रस्थाने. सर्व निर्णय तेथें होतात समाजजीवनावर त्याचा वरचष्मा असतो. भारत म्हणजे जणू ही महानगरे अशीच बर्याच जणांची समजूत असते. त्यामुळे महानगरे विरुद्ध उर्वरित भारत असाही वाद उद्भवतो. "गल्लीत काय चालते " त्यांची फिकीर दिल्लीत केली जात नाही. असेच लोकांना वाटते सत्ता केंद्रे. ( दिल्ली ) आणि स्थानिक समाज ( गल्ली) असा दुजा भाव / असे मत दवत समाजात असतें. आपल्या देशाच्या मोठ्या पसारयामुळे आणि केंद्र सरकारच्या व्यापक. अधिकारामुळे दिल्ली ते गल्ली यांच्यात असं अंतर पडते आपणही अनेक वेळा फक्त राष्ट्रीय प्रश्नांवरच लक्ष केंद्रित करत़ो राष्ट्रीय प्रशनाबाबत काळजी करतो. पण त्या तुलनेने स्थानिक पातळीवरील समस्यांची फारशी कोणी दखल घेत नाही. आपल्या गावांचे प्रश्न काय आहेत. त्यांच्या सोडवणुकीसाठी आपण काय सहभाग घ्यायला हवा वगैरे गोष्टी आपल्या गावी नसतात पण राष्ट्रीय प्रश्नांना आपण वर्तमानपत्रात जास्त जागा देतो निर्णय घेताना त्यांना प्राधान्य देतो इतकेच काय. कृती करायची वेळ. आपल्यावरही आपला कल विशिष्ट. मर्यादेत प्रशनापेक्षा मोठ्या. राष्ट्रीय प्रश्नांवर कृती करण्याकडे अधिक असतो. राष्ट्र वाचविण्यासाठी आपण मोर्चा काढतो एखाद्या सर्वसाधारण प्रश्नावर आपणं आंदोलन करतो याचे कारण 

              आशेवर जगण्याचा आपला प्रवास घरापासून सुरू होतों आई वडील भाऊ बहीण यांच्या आशेवर मुलें जगतात की माझे कोणीतरी सुखात दुःखात सहभागी होणारें आहे यामुळे. मोठे झाल्यावर उच्च शिक्षण मिळेल का ? शाळा कॉलेज कसे असेल. हक्काचे व मोफत शिक्षण मिळणार का ? बेमाफी फि वसूली थांबणार का ? यावर नंतर नोकरी मिळेल का ? ती कोणती असेल ? कशी किती पगाराची असेल ? नाहि मिळाली तर काय मोठा प्रश्न ? चोरी. लबाडी. खून मारामाऱ्या अपहरण सारखे गुन्हे करावे लागतील का ? मुलांना. पोलिस. सैनिक भरती. मोठमोठ्या कंपन्या यात. भरती मिळेल का ? एम सी स्पर्धा परीक्षा तारखेनुसार होणार का ? तंबाखू गुटखा खैणी पान मसाला दारु अशा विविध व्यसनापासून मी दूर राहीण का ? लग्न होणार का ?मिळणारी मुलगी मिळवणारे सोयरे. कसे असतील. ? लग्नात खर्च किती होईल ? पैसा कोठून येणार ? कोणते काम करावे लागणार ? मजूरांना मजूरी पाहिजे तसी मिळेल का ? ठेकेदार पगार व वागणूक देणार का ? शेतकरी यांच्या मालाला दलाल एजंट योग्य भाव देणार का ? बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज यांना न्याय मिळणार का ? शासन प्रशासन सरकार सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी निर्णय घेणार का ? महिला अत्याचार हुंडाबळी जाळपोळ. गोरगरीब जनतेला न्याय मिळणार का ? साथीच्या रोगांवर निदान उपचार निघणार का ? भ्रष्टाचारावर अंकुश येणार का ? शासकीय अधिकारी व कर्मचारी विविध पत्र व्यवहार यांना उत्तर देणार का ? पालकांच्या मनाप्रमाणे मुलांना नोकरी शिक्षण हक्क अधिकार स्वतंत्र मिळेल का ?

            अशा एक नाही अनेक प्रकारच्या आपल्याला मिळेल या आशेवर जीवन जगत आहोत आपण. आत्ता विचार करा 

       समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या