Showing posts with label भ्रष्टाचार. Show all posts
Showing posts with label भ्रष्टाचार. Show all posts

गौडबंगाल # गौडबंगाल

 

गौडबंगाल # गौडबंगाल 

           बोगस कामगार म्हणजे कोण ? हा प्रश्न आज सर्वांच्या पुढे आहे. बोगस कामगार म्हणजे जया व्यक्तिचा बांधकाम या कामाशी कोणताही संबंध नाही असे विविध कामगार. बांधकाम म्हणजे काय ? वाळू कशाला म्हणतात ? खडी म्हणजे काय ? विट कशापासून तयार होतें ? सिमेंट वापर करतांना मटेरियल प्रमाण काय असतं ? जो व्यक्ती सरकारी आॅफिस मध्ये काम करतो. ज्याला शेती भरमसाठ आहे असा. जो आयकर भरतो. ज्याचा बॅंक बॅलन्स आवक जावक जास्त आहे असा व्यक्ती. बांधकाम क्षेत्र सोडून इतर घरकाम करणाऱ्या महिला. असे सर्वजण बोगस कामगार म्हणून गणले जातात. 

                  महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचेकडून बांधकाम कामगार यांचेसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. त्या मिळविण्यासाठी बांधकाम क्षेत्रात काम करणारा व्यक्तिच नोंदणी करू शकतो त्यासाठी ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे त्यासाठी इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार हे बांधकाम व्यावसायिक यांना अधिकार दिला आहे पण आज खरोखरच कामगार नोंदणी पासून वंचित आहे आणि इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार हे १०००/२००० रूपये घेऊन बोगस कामगार नोंदणी साठी लागणारे दाखले देत आहेत म्हणजे सर्वात मोठा बोगस कामगार नोंदणी साठी त्यांनीच हातभार लावला आहे आणि बराच पैसा मिळविला आहे. आज डिप्लोमा इंजिनिअर कोर्स. असे रोज हजारो इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार पदवी घेऊन बाहेर पडत आहेत. यांना कोण काम देत नाही त्यामुळे दाखले देऊन आपल्या खर्चाचे जुगाड लावणारे बोगस इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार आज आपल्या आसपास फीरत आहेत. 

          आपणच हुशार होण्याची गरज आहे. आजपर्यंत ज्या ज्या इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार यांनी बांधकाम कामगार नोंदणी साठी लागणारे दाखले दिले आहेत त्यांची माहीती जगजाहीर करा. अशा इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार यांची चौकशी लावा. व बोगस कामगार व इंजिनिअर यांचा सर्वे करा. आणि संबंधित व्यक्तिंना दंडात्मक शिक्षा व कारवाई करण्यात यावी. आत्ता बांधकाम कामगार यांच्यासाठी चालू असणारे सुरक्षा संच वाटप कोणकोणते बांधकाम कामगार याचा वापर करतात. याचाही सर्वे झाला पाहिजे. जे बांधकाम कामगार कामावर असताना सुरक्षा संच वापरत नाहीत त्यांनी शासनाला कल्याणकारी मंडळाला चुकीची माहिती देऊन मंडळांची फसवणूक केली या अंतर्गत त्यांच्यावर व त्यांना बांधकाम कामगार म्हणून दाखले देणारे इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. बांधकाम कामगार यांच्यासाठी वाटप करण्यात येणारे आर्थिक लाभ. ज्या ज्या बोगस बांधकाम कामगार यांनी लाभ घेतला आहे. त्याचाही सर्वे करून त्यांच्यावर व त्यांना बांधकाम कामगार म्हणून दाखले देणारे यांच्यावर कारवाई करण्यात यावी व जेवढा निधी बोगस कामगार नोंदणी दाखलयामुळे वाया गेला आहे तेवढा आर्थिक दंड करण्यात यावा. आणि शिक्षा शिवाय त्यांचे बांधकाम कामगार म्हणून असणारे रजिस्ट्रेशन रद्द करण्यात यावे. 

      गोरेपान लोक. टाचतल रगात दिसणा-या महिला सुरक्षा संच वाटप केंद्रावर सुरक्षा संच घेणयास येत आहेत. कुणी या लोकांना बांधकाम कामगार सिध्द केले. कोणत्या अंगाने हे बांधकाम कामगार दिसतात ते सांगा. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ बंद करा. यामुळे खरोखरच बांधकाम कामगार असणारे यांना काहीच फरक पडणार नाही. याचा सर्वात मोठा तोटा होणार आहे तो म्हणजे इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार आणि एजंट यांचा होणार आहे. कारणं आज घाम गाळून आपले पोट भरणारा कामगार उद्या सुध्दा काम करेल पण जर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ बंद झाले तर यांच्या जीवावर लाखोंची कमाई करणारे यांच काय ? दुसरं काम येत नाही घाम गाळायची तयारी नाही. भांगलायला येत नाही. मग यांनी काय करायचं. म्हणून शासनाला विनंती आहे की बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ एक वर्ष बंद करा आणि मग बघा जागोजागी थाटलेली बांधकाम कामगार नोंदणी कार्यालये. यांना कुलप लागणार हे निश्चित. कामगार नेते हितचिंतक गायब होणार. हेच सत्य आहे  

कामगार वर्ग (किंवा कामगार वर्ग ) हा सामाजिक शास्त्रांमध्ये आणि सामान्य संभाषणात निम्न-स्तरीय नोकऱ्यांमध्ये गुंतलेल्या लोकांचे वर्णन करण्यासाठी वापरला जाणारा शब्द आहे (कार्यक्षमता, शिक्षण आणि कमी उत्पन्नानुसार मोजले जाते) आणि बर्‍याचदा हा अर्थ देखील विस्तृत होतो. बेरोजगारी किंवा सरासरी उत्पन्न कमी असलेले लोक. कामगार वर्ग हा प्रामुख्याने औद्योगिक अर्थव्यवस्था असलेल्या आणि औद्योगिक नसलेल्या अर्थव्यवस्था असलेल्या शहरी भागात आढळतो .

सामाजिक वर्गाचे वर्णन करण्यासाठी विविध संज्ञा वापरल्या जातात, परंतु कामगार वर्ग परिभाषित केला जातो आणि वेगवेगळ्या प्रकारे वापरला जातो. जेव्हा ते गैर-शैक्षणिक स्वरूपात वापरले जाते, तेव्हा ते सहसा समाजाच्या एका भागाला संदर्भित करते जे शारीरिक श्रमावर अवलंबून असते, विशेषत: ज्यांना तासाभराचे वेतन दिले जाते. शैक्षणिक प्रवचनात त्याचा वापर वादग्रस्त ठरला आहे, विशेषत: औद्योगिकीकरणानंतरच्या समाजात मानवी श्रम कमी झाल्यानंतर. काही शिक्षणतज्ञ कामगार वर्गाच्या संकल्पनेच्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात.

आर्थिक संसाधने, शिक्षण आणि सांस्कृतिक हितसंबंधांमध्ये प्रवेश करण्याच्या बाबतीत हा शब्द सामान्यतः उच्च वर्ग आणि मध्यमवर्गीय हितसंबंधांशी विरोधाभास आहे . कामगार वर्ग आणि मध्यमवर्ग यांच्यातील सीमारेषा अधिक स्पष्ट होते जेथे लोकसंख्या प्रामुख्याने जगण्यापेक्षा जीवनशैलीवर जास्त पैसा खर्च करते (उदाहरणार्थ फॅशन विरुद्ध फक्त पोषण आणि गृहनिर्माण) या भेदभावाच्या पद्धतीवर अवलंबून राहिल्याने अनेकदा ओळखल्या जाणार्‍या अनेकांना वगळले जाईल. कामगार वर्ग म्हणून.

त्याचा वापर वैकल्पिकरित्या अपमानास्पद असू शकतो किंवा जे स्वत: ला कामगार वर्ग म्हणून ओळखतात त्यांच्यामध्ये अभिमानाची भावना व्यक्त करू शकते

कामगार वर्गाचा इतिहास दोन विरोधाभासी प्रक्रियांद्वारे परिभाषित केला जातो, कामगारांच्या निर्मितीसाठी पारंपारिक समुदायांचा आर्थिक विकास आणि चांगले जीवनमान निर्माण करण्यासाठी औद्योगिकीकरणातून उपलब्ध उत्पादनाचा अफाट अधिशेष. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान कामगारांनी औद्योगिक समाजात त्यांची स्वतःची संस्कृती आणि परिस्थिती निर्माण करण्यासाठी सांस्कृतिक आणि राजकीय कृती केली आहे. यापैकी बरेच प्रतिसाद यावर भर देतात की कामगार-वर्गातील व्यक्ती कामाव्यतिरिक्त इतर प्रक्रियांद्वारे परिभाषित केल्या जातात. कामगार वर्गाचा इतिहास सामान्यतः इंग्लिश कॉमन्सच्या धोरणांनी आणि हॉलंड आणि इंग्लंडमधील कारखान्यांमध्ये पगारी औद्योगिक कामगारांच्या पिढीने सुरू झाला असे मानले जाते.

असा कामगार वर्ग सरंजामशाही युरोपात मोठ्या प्रमाणात अस्तित्वात नव्हता. त्याऐवजी, बहुतेक लोक कामगार वर्ग, विविध व्यवसाय, व्यापार आणि व्यवसायांनी बनलेल्या गटाचा भाग होते. वकील, कारागीर आणि शेतकरी हे सर्व एकाच सामाजिक घटकाचे भाग मानले जात होते आणि लोकांचा एक तिसरा गट होता जो अभिजात किंवा चर्च अधिकारी नव्हता. युरोपबाहेरील पूर्व-भांडवलशाही समाजातही अशीच पदानुक्रमे अस्तित्वात होती. या कामगार वर्गांची सामाजिक स्थिती ही नैसर्गिक कायद्याने आणि सामान्य धार्मिक श्रद्धेने ठरलेली होती. या सामाजिक स्थितीला शेतकरी वर्गाने, विशेषतः जर्मन शेतकरी युद्धाच्या वेळी आव्हान दिले होते.

18 व्या शतकाच्या शेवटी प्रबोधनाच्या प्रभावाखाली युरोपीय समाज बदलाच्या स्थितीत होता आणि हा बदल देवाने बनवलेल्या अपरिवर्तित समाजव्यवस्थेशी जुळवून घेता आला नाही. या सोसायटीच्या सदस्यांनी अशा विचारधारांना जन्म दिला ज्याने कामगार वर्गाला (जसे की, जास्त प्रमाणात मद्यपान, आळशीपणा आणि पैसे वाचवण्यास असमर्थता) भेडसावणाऱ्या अनेक समस्यांसाठी त्यांच्या नैतिकता आणि नैतिकतेला दोष दिला. द मेकिंग ऑफ द इंग्लिश वर्किंग क्लासमध्ये , ईपी थॉम्पसनने असा युक्तिवाद केला की इंग्रजी कामगार वर्ग स्वतःच्या अधिकारात अस्तित्वात आहे आणि आधुनिक, राजकीयदृष्ट्या आत्म-जागरूक कामगार वर्गात पोस्टमॉडर्न कामगार वर्गाच्या परिवर्तनाचे वर्णन केले आहे.

व्लादिमीर लेनिन यांनी विकसित देशांमधील कामगार वर्गाच्या निम्न स्तरावरील जीवनमानात आणखी सुधारणा करण्यासाठी साम्राज्यवादाची क्षमता पाहिली आणि युनायटेड किंग्डममध्ये 20 व्या शतकाच्या सुरुवातीस सुरुवात झाली आहे असा युक्तिवाद केला. बॉक्सिंग आणि सायकलिंगसारख्या स्वस्त खेळांमध्ये प्रवेश, कॉफी, चॉकलेट आणि नंतर जंक फूडसह खाद्य संस्कृतीचा विस्तार आणि विशेषत: मोटार वाहने आणि घराची मालकी यामुळे 20 व्या शतकातील जगातील पहिल्या कामगार वर्गाचा चेहरा बदलला. अशीच प्रक्रिया सोव्हिएत-शैलीतील समाजात घडली, परंतु खूपच कमी वेगाने.

1917 च्या आसपास, वरवर पाहता, अनेक देशांनी कामगार वर्गाच्या हितासाठी पावले उचलली. शैक्षणिक इतिहास आणि समाजशास्त्रामध्ये घटलेले राहणीमान आणि संभाव्य वाढीचा दर वादातीत असताना, या देशांचे विकास निर्देशांक समान GDP असलेल्या इतर देशांपेक्षा जास्त आहेत. तथापि, या देशांवर लेखकांद्वारे आणखी टीका केली गेली, ज्यांनी प्रामुख्याने कामगार वर्गाला प्रभावित करणार्‍या व्यापक मानवी हक्कांच्या उल्लंघनाच्या उपस्थितीवर आणि कामगार वर्गामध्ये आणि त्यांच्यामध्ये लोकशाही नसल्याची टीका केली. काही इतिहासकारांनी असे नमूद केले आहे की या सोव्हिएत-शैलीतील समाजांमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल सर्वहारा वर्गाच्या व्यापक नवीन स्वरूपाद्वारे झाला आहे, जो अनेकदा प्रशासकीयरित्या शेतकरी आणि ग्रामीण कामगारांच्या सक्तीने विस्थापनामुळे प्रभावित होतो. तेव्हापासून तीन प्रमुख औद्योगिक देशांमध्ये अर्ध-बाजार-आधारित शासन आहे (चीन, व्हिएतनाम, क्युबा) आणि एका देशाने आपल्यातच गरिबी आणि निर्दयीपणाचे चक्र (उत्तर कोरिया) वाढवायला सुरुवात केली. असे इतर देश एकतर आधीच कोलमडले होते (जसे की सोव्हिएत युनियन) किंवा औद्योगिकीकरण किंवा मोठ्या कामगार वर्गाची लक्षणीय पातळी गाठली होती.

1960 नंतर, तिसर्‍या जगात मोठ्या प्रमाणावर सर्वहारा वर्ग आणि कॉमन्स घेरणे उदयास आले, ज्यामुळे जगण्याच्या किनारी एक नवीन कामगार वर्ग निर्माण झाला. याव्यतिरिक्त, भारतासारख्या देशात हळूहळू सामाजिक बदल होत आहेत, ज्यामुळे शहरी कामगार वर्गाचा आकारही वाढत आहे

           सहहयक कामगार आयुक्त भवन मध्यें आॅनलाइन पध्दतीने नोंदणी केली असतां व लाभाचे विविध अर्ज आॅनलाइन केले असता. वैयक्तिक नोंदणी करणारे बांधकाम कामगार यांना दोन तीन महिने नोंदणी मॅसेज येत नाही पण एखाद्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी. एजंट यांनी १५०० रुपये घेऊन बांधकाम कामगार नोंदणी केली असतां दोन दिवसांत नोंदणी मॅसेज येतो याच काय आहे गौडबंगाल. म्हणजे अधिकारी व कर्मचारी. यांना यातला काय हिस्सा जातो कां ? काय या अधिकारी व कर्मचारी यांना आॅफिस वेळ सोडून बाहेर पार्ट्या. जेवण दिली जातात काय ? भेट गिफ्ट दिली जातात काय ? यांतच आज शासनाने महिलांना सर्व क्षेत्रात ५०/ टक्के आरक्षण दिले यामुळे आज बांधकाम कामगार संघटना मध्ये महिलांचा वाढता सहभाग भविष्यातील संकटांची नांदी आहे. कारणं विचारणा करता येत नाही कोणीही अडवू शकत नाही.  

     समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

भ्रष्टाचारविरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

खराटा - देश घाणीपासून मुक्त करण्यासाठी वापरलेले जाणारे प्रभावी शस्त्र म्हणजे खराटा

 


खराटा खराटा

                  आपल्या रोजच्या जीवनात सर्वांना परिचयाचा असणारा शब्द आहे की जो आपले घर अंगण परिसर गाव तालुका जिल्हा राज्य देश घाणीपासून मुक्त करण्यासाठी वापरलेले जाणारे प्रभावी शस्त्र म्हणजे खराटा होय फक्त फोटोसाठी खराटा हातात घेणारे नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांनी ढोंग बंद करा 

            गौतम बुद्धापासून. गाडगेबाबा पर्यंत किंवा महात्मा फुले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यापर्यंत पाहिले तर समाज विकासासाठी काम करणारे ही लोकं माणसांना समाजाच्या जाचापासून जावे लागले. त्यांना स्वच्छता महत्व समाजावून सांगण्यासाठी लोकानी अंगावर शेण टाकले. शिव्या घातल्या. चांगल्या कामाची आधी उपेक्षा करावी नंतर विरोध करावा आणि शेवटी स्वीकार करावा अशी समाजातील रित आहे स्वच्छता म्हणजे प्रसन्नता. स्वच्छता म्हणजे पवित्रता. स्वच्छता म्हणजे समाधान. स्वच्छता म्हणजे आनंद. स्वच्छता म्हणजे प्रगती स्वच्छता म्हणजे स्वावलंबन. स्वच्छता म्हणजे सरवोधदार. स्वच्छता म्हणजे# स्व कडून #पर # कडे जाण्याचा मार्ग. स्वच्छता म्हणजे प्रदुषण पासून मुक्तता. स्वच्छता म्हणजे पर्यावरणास पर्याय. स्वच्छता म्हणजे आरोग्य. स्वच्छता म्हणजे स्वच्छता. आणि स्वच्छता म्हणजे सर्वोदय. या विचारसुत्राचा कृतिशील सुंदर आविष्कार म्हणजे. गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान

          स्वच्छता म्हणजे मानवी जीवनाचा आधारस्तंभ आहे. अन्न. हवा आणि पाणी शुध्द स्वरूपात मिळणे हा उत्तम जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. अस्वच्छतेमुळे अन्न हवा पाणी दुषित होते त्यामुळे अनेक साथीचे आजार रोगांना निमंत्रण मिळते. आजारपण वाढते. आजारपणाची कैद माणसाला असह्य होते. या कैदेतून सुटका करण्यासाठी पैसा अडका कमी पडल्यास मृत्यू अटळ. जगणे संपते. अनमोल जीवन संपते. उरते ते फक्त दुःख. मानवाने जीवनातील हे दुःख ओळखले पाहिजे. मानवी जीवनात स्वच्छतेचा # निर्मळ झरा # निर्माण केला पाहिजे निर्मळ तेच्या मंत्राने लोकांचे मन परिवर्तन केले पाहिजे. सर्वांच्या हदयाची दारे खुली करून त्यात निर्मळ तेचे झरे सोडणे गरजेचे आहे. एका अक्षरशुनय माणसाच्या हातातील खराटा हजारों माणसाच्या मनात #. स्वच्छतेचा नंदादीप # लावू शकतो तो तेवत ठेवू शकतो. ही शब्दावली समाजसेवक यांनाच शोभून दिसते. ही बिरुदावली बाबांच्या बाबतींत खरी वाटते लोकसेवेसाठी आपले पूर्ण जीवनाची होळी करणारे समाजसेवक पाहिजेत. आपल्या हाती. # स्वच्छतेचा कंदील # घेवून सर्वांना स्वच्छतेचा उजेड दाखविणे गरजेचे आहे समाजसेवक यांनी व आपण हातात खराटा घेऊन सार्वजनिक स्वच्छता केली म्हणजे श्रमशक्तीचे संस्कृतींचे उदात्तीकरण केले पाहिजे. स्वच्छतेला परमेश्वर महणा किंवा परमेश्वराला स्वच्छता म्हणा अशा या प्रमेयात अडकून न पडता स्वच्छता करण्याचा कामांचा आजच पुढाकार घेऊन स्वच्छतेला परमेश्वर माणने गरजेचे आहे. हातातली खराटा हा आपल्या श्रमसंसकृतीवर साचलेली धुळ नष्ट करण्याचे साधनं आहे. महारोगयानी केलेली शारीरिक स्वच्छता हा तर श्रम संस्कृतीचा एक पाठपुरावाच असतो

            आपणच आपल्या महाराष्ट्रात स्वच्छतेचे आंदोलन निर्माण करणे गरजेचे आहे त्यामुळे खेडोपाडी # स्वच्छतेचे वारे # वाहू लागेल. लोकमत जागे करा. लोकांना सज्ञानी करा. लोकांना नम्रता शिकवा. लोकांना आरोग्य संपन्न बनविण्याचे काम करा. लोकांच्या मनात चैतन्य फुलवा. लोकांची प्रगती साधा. लोकमत सदैव प्रफुल्ल ठेवण्यास मदत करा. यासाठी आपणास उपयोगी पडणार म्हणजे खराटा. विषमतेकडून सत्तेकडे. विसंवादाकडून संवादाकडे. जनतेकडून चैतन्य कडे. विघातकाकडून. विधयाकडे. उदासिनतेकडून उतसहाकडे. विफलतेकडून सफलतेकडे. विवदेषाकडून विनयाकडे. अचेतनाकडून सचतेनाकडे. विनाशाकडून विकासाकडे. नैरेशयाकडून आनंदाकडे आणि दवैताकडून अदवैताकडे घेवून जाणारे एक सबल साधनं म्हणजे खराटा होय 

              खराटा हा केवळ घर गाव रस्ते स्वच्छ करणारा नाही तो माणसांची मने स्वच्छ करणारा खराटा होय खराटा बाह्य सवचछतेकडून आंतरसवचछतेकडे नेणारा मार्ग म्हणजे खराटा होय. दिन दुःखी. दलित वंचित आणि शोषित माणसें पाहिली अवकाशात सोडलेल्या बिन दोरिचया पंतगाप्रमाणे समुद्रात वार्यावर सोडलेल्या होडीसारखी ही माणसें होती अशी माणस पाहिली की मनाला अस्वस्थ होत. आपल मन मेनबतती सारखें पागळून जाते. अशा तळागाळातील लोकांना कोणीच वाली नाही हे पाहून मन घायाळ झाले आहे. घरात. दारात आणि गावांत स्वच्छतेची नितांत गरज आहे स्वच्छता ही आपल्या जीवनाची गुरुकिल्ली आहे. सवचछतेशिवाय. घर दार आणि गाव कोंडवाडा सारखे होईल म्हणजे अनेक दिवसांची मुलखाची घाण. जिथे घाण तिथं रोगराई. जिथे रोगराई तिथे मृत्युला आमंत्रण. हे ओळखून स्वच्छता आपला परम धर्म शिरोधार्य मानले पाहिजे

              स्वच्छता करणारा अंगावरील चिंध्या घ्या अंगरखा हे गरिबांचे प्रतिक हातातील खराटा हे सामाजिक स्वच्छतेचे प्रतीक आहे. हे जीवन क्षणभंगुर आहे बांगडी आणि कवडी हे फाटक्या संसाराचे प्रतिक आहे. जसा खराटा स्वच्छतेवर वार आहे तसा काठी समाजाच्या दंभावर. ढोंगावर कर्मकांडावर. अन्यायावर. अहंकारावर. भ्रष्टाचारावर. दुरगुणावर. भोंदूगिरी वर. व्यसनाधीनतेवर अंधश्रद्धैवर हिंसाचारावर. अज्ञानावर. दैववादावर. आणि दुराचारी वर कठोर प्रहार करणारी काठी आहे. स्वच्छता. आरोग्य. ज्ञान. संपत्ती. त्याग. सेवा. काटकसर. साधेपणा आणि असंग्रह वृतीची आठवण करून देणारा खराटा होय. म्हणजे लोकजीवनात आनंदाचे वातावरण अंगण निर्माण करणारा खराटा आहे. गोरगरीब सुखी आणि समृद्ध संपन्न जीवनासाठी अहोरात्र राबणारा खराटा होय. दुःख. दैन्य. आतरता. व्याकुळता. घायाळता. आणि अस्वच्छता. दुखमय जीवनात सुखाची दिवाळी करण्यासाठी खराटया सारखा दुसरा धर्म नाही

          स्वच्छता ही आयुष्भर माणुसकीच्या आराधनेत रमली आहे. आपल्या त्यागाने. प्रेमाणे आणि सेवेने समाजाची दुखणी सुखद करण्याची गरज आहे. त्यासाठी समाजाच्या अंगणापरयणत खराटा नेणे गरजेचे आहे. खराटा अंधश्रद्धा अंधार नषट करतो. समाजातील विषमता. पाखंडता. कर्मकांड. मूढता. नष्ट केली. समता प्रेम बंधुता बंधुभाव न्याय सदाचार. सौजन्य. सामाजयशी शिकवन. असा खराटा होय 

            समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रूग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

गाजर

 

गाजर 

                  अतिशय पोषक असत गाजर. दिसायला गोंडस खायला गोड असे गाजर आहे सर्व लोक खाण्यात वापरतात हे म्हणजे एखाद्याला खुश आपलसं करण्याचे सामर्थ्य गुलाम आपल्या मनाप्रमाणे वागण्यास लावण्यासाठी  दाखविण्यात येणारी एक मनमोहक वस्तू म्हणजे गाजर

                 शासकिय क्षेत्रात आपल्यावर झालेल्या अन्यायाची दाद मागण्यासाठी पत्र व्यवहार करण्यात येतो त्यांना न्याय मिळत नाही तर त्यांना भुलभुलयाचे गाजर दाखवतात हे शासकीय अधिकारी व कर्मचारी हे आपण बघतो. काहीजण उपोषण रस्ता रोको आंदोलन बंद आंदोलन मोर्चा असे मार्ग निवडतात  तर काहीजण उपाशी तापाशी ऊन पाऊस वारा याची तमा न बाळगता आपल्याला न्याय मिळण्यासाठी कित्येक दिवसांपासून उपोषण करताना मी पाहिले आहेत  त्यावेळी फक्त फाॅरमेलीटी म्हणून काही अधिकारी व कर्मचारी उपोषण करतयाला भेट देतात आणि उपोषण करतयाची मागणी सोडून दुसरेच गाजर दाखवतात आणि फक्त वेळ दाबून नेतात. यालाच गाजर दाखविणे असं म्हणलं जातं

              बांधकाम कामगार व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचेकडून बांधकाम कामगार यांचेसाठी 19 कल्याणकारी योजना राबविण्यात येतात त्यात प्रामुख्याने महिला. मुल. स्वता बांधकाम कामगार यांना शैक्षणिक. सामाजिक. आर्थिक. संरक्षण. विमा यांचा प्रामुख्याने समावेश असतो बांधकाम कामगार आहे हे सिद्ध करण्यासाठी इंजिनिअर दाखला देणे अनिवार्य आहे तोही 98 दिवसांपेक्षा जास्त दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र गरजेचे आहे. पण. योजना चांगल्या आहेत त्या राबविण्याची जबाबदारी सहायक कामगार आयुक्त व अधिकारी व कर्मचारी यांची आहे. आज या बांधकाम कामगार यांच्या हक्काच्या योजना काही बोगस कामगार संघटना सेवाभावी संस्था युनियन सामाजिक संघटना. यांच्यामुळे बोगस नोंदणी जादा पैसे घेऊन कामगार भवन मधील काही भ्रष्ट अधिकारी व यांना हाताला धरून जिल्ह्यात एजंट दलाल कामगार शुभचिंतक यांचं भल मोठ पेव फुटले आहे काही संघटना सेवाभावी संस्था युनियन हे आपली दुकाने जोरात चालावी यासाठी काही नेत्यांच्या काखेत घुसले आहेत. त्यांच्या नावाखाली कामगारांना तुला हे मिळवून देतो ते मिळवून देतो अशी आशेची गाजरे दाखवून आर्थिक. मानसिक लुट करतांना दिसत आहेत.  याचा अर्थ असा होतो की ज्याला काही काम नाही त्याने बांधकाम कामगार जो अडाणी गरजू व्यसनी पोटासाठी मिळेल ते काम करणारा आहे त्याला लुटायचे व आम्ही निवडणुकी पुरतेच तुम्हाला हे देतो ज्यांना कामगाराकडे बघायला सुध्दा वेळ नाही असा सुध्दा कामगार हितचिंतक शुभचिंतक असल्याचा आव आणतो. गावातील लोक शहरातील लोक कामगार मेळावे शिबीर आयोजित करण्यास सुरुवात करतात. म्हणजे मी अस ऐकलय की बांधकाम कामगार यांना घरबांधणी साठी पैसे मिळवून देतो म्हणून कमीत कमी 20 ते 25 हजार रुपये कामगारांकडून घेतल्याची माहिती आमच्याकडे आली आहे पण बोलणार कोण कारणं त्यांच्यामागे मोठा नेता आहे म्हणजे बांधकाम कामगार यांना कसे गाजर दाखवून लुटलं जातंय बघा शासनाने खरोखरच बांधकाम कामगार शोधायचं असतील तर एक वर्ष महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ बंद ठेवा बघा या कामगार हितचिंतक शुभचिंतक संघटना सेवाभावी संस्था युनियन यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य जे आज चारचाकी गाडी मधून हातात सोन सोबत बाॅडीगारड घेवून फिरत आहे त्यांना भांगलायला जाण्याशिवाय पर्याय उरणार नाही  आणि यांना कोण शासकीय अधिकारी व कर्मचारी मदत करतात त्यांची सी बी आय तर्फे चौकशी करा आणि मग बघा कोण किती पाण्यात आहे 

    .            रेशन सर्वात मोठा जटिल प्रश्न आज सर्वसामान्य जनता गोरगरीब लोक यांचें पुढं आ वासून उभा आहे. गोरगरीबांना पोटभर अन्न मिळावे. कुपोषण सारखा सर्वात मोठा कलंक पुसला जावा यासाठी शासनाने अन्न सुरक्षा विधेयक मंजूर केले आणि सर्वसामान्य माणसाला हक्काचे अन्न स्वस्त दरात आणि रास्त भावात मिळावे यासाठी रेशन दुकान ही संकल्पना अमलात आणली  लोकांना अन्न धान्य मिळण्यासाठी 2005 ला जनतेचा आर्थिक दुर्बल सबल या तत्वावर जनगणना करण्यात आली. त्यानुसार. अंत्योदय. बी पी एल. केशरी शिधापत्रिका. अशी वर्गवारी करण्यात आली पण यात खरोखरच लाभ झाला तो म्हणजे ज्याला गरज नाही.  सवताचे घर आहे. नोकरी आहे. गाडी आहे. व शेती आहे. म्हणजे जे आर्थिक सबल आहेत त्यांनाच लाभ झाला. म्हणजे गोरगरिबांना शासनाने नाही तर आपण निवडून दिले त्यांनीच गाजर दाखवल. यातून जी काही कसर बाकी राहिली ती रेशन दुकानदार यांनी बरोबर केली म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या नावावर येणारे अन्न धान्य.  दुकान बंद. थम उठत नाही. नाव दिसत नाही. युनिटचे आधार लिंक नाही. तुमच अन्न धान्य आल नाही.  पावती दिली जात नाही.  वागणूक बरोबर नाही.  अशी एक नाही अनेक कारणांने गोरगरीब जनतेचा हक्क मारला जातो आहे. शासन मोफत अन्न धान्य वाटप करायला सांगत आहे पण दुकानदार व भ्रष्ट गोदाम इन्चार्ज.  पुरवठा अधिकारी. यांच्या मनमानी कारभार पध्दतीमुळे जनता भरडली जात आहे  आज पुरवठा विभागात. नविन रेशनकार्ड काढणे.  नाव कमी करणे.  नाव वाढविणे.  अन्न सुरक्षा योजनेत सहभागी अर्ज.  असे एक नाही अनेक अर्ज धुळखात पडले आहेत त्या अर्ज दाखल करणार या लोकांना. उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.  बघतो करतो. साहेब रजेवर आहेत.  कागदपत्रे कमी आहेत. अशी गाजर दाखविल्याप्रमाणे उत्तरे दिली जात आहेत. 

                वैद्यकीय सेवा ही ईश्वर सेवा. वाचायला बर वाटत. पण खरोखरच या उलट होताना दिसत आहे.  वैद्यकीय खर्च करण्यास आर्थिक दुर्बल असणारी काही कुटुंब उपचारा विना मयत होताना आपण बघतो. कारण दोन वेळचे जेवण कसंबसं मिळत काहीजण अर्धपोटी उपाशी राहून आपले व आपल्या कुटुंबांचे पालनपोषण करत आहेत. शासनाने या विषयाचा गांभीर्याने विचार करून  आपल्या 36 जिल्ह्यात लोकसंख्या नुसार  धर्मादाय अंतर्गत उपचार करणारे दवाखाने स्थापन करण्यात आले त्यात सर्व उपचार मोफत करण्याचा शासन आदेश असूनही दवाखाने. विविध टेस्ट.  मेडिकल बिल. या मार्गाने पेशंटला लुटलं जात आहे.  त्यातून सर्वात वेगळ म्हणजे जेवढ्या  आरोग्यदायी योजना आहेत त्या विमा कंपन्या चालवतात आणि त्यांना परवानगी देत आपल शासन म्हणजे एका बाजूने आरोग्यदायी योजना सुरू करायच्या आणि त्या योजना फुकट गोरगरीब जनतेला मिळू नये यासाठी विमा कंपन्या यांच्याच. धर्मादाय अंतर्गत उपचार करणारे दवाखाने यांचेच. म्हणजे सर्व पैसा घरातच. यांचाच अर्थ असा होतो की जनतेच्या हातात गाजरच शेवटी. दवाखान्यात कोणती योजना आहे  योजनेसाठी कोण मार्गदर्शक आहे.  दवाखान्यात मेडिकल आहे का ?  दवाखान्यात रुग्ण हक्काची सनद लावली आहे का  ? उपचार पद्धती निवडण्याचा अधिकार आहे का ? याचाच अर्थ जनतेच्या हातात शेवटी गाजारच आहे

                आर्थिक विकास महामंडळ सर्व जाती जमाती धर्माचे लोक यामधील शिक्षित तरूण यांना आपल्या हक्काचा रोजगार ‌रोजीरोटी मिळावी. सबलीकरण.  महिलांना सबलीकरण योजना. अपंग विकास महामंडळ.  वयोवृद्ध महिला पुरुष निराधार विधवा यांना अनुदान. अशा विविध माध्यमातून शासन विविध महामंडळ स्थापन करत आहे त्यामाध्यमातून. लघु उद्योग. उद्योगपती होण्यासाठी. २५/ हजार ते १ कोटी रुपयांची तरतूद करत आहे पण या सर्व योजना वृतमापत्रात. डिजिटल. बोर्ड.  निवडणूक भांडवल. यापुरतया मर्यादित आहेत खरोखरच गरज असणारे तरूण यांना शिक्षण उधोगासाठी. आजपर्यंत कोणालाही विकास महामंडळ यांचा लाभ झालेला नाही.  कारण योजना आहे पण त्यात घालण्यात आलेला मोठा साप आहे तो म्हणजे. आय टी रिटर्न.  जी स टी.  अनुसूचित जमाती जमाती व इतर मागासवर्गीय भटके विमुक्त. जाती. यांना जात प्रमाणपत्र व त्यात ६० वर्षांचा जातींचा पुरावा नाही त्यामुळे वंचित गरिब तरूण या विकास योजनांपासून वंचित आहेत. म्हणजे योजना सुरू करायची आणि त्यात अशी काही अट घालायची की ती पूर्ण होणार नाही. त्यातच राष्ट्रीय कृत बॅका यांनाच विकास महामंडळ यांचा कर्ज पुरवठा करण्याचा अधिकार आहे. पण आज बॅंका व त्यातील बॅक अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून कर्ज प्रकरण मंजूर करण्यासाठी विविध असा आर्थिक लाभ द्यावा लागतो मगच काम होते अन्यथा नेते पुढारी यांची शिफारस पाहिजे. मग मला सांगा योजना सुरू करण्याच्या वेळी ही अट का नमूद केली जात नाही. म्हणजे एका बाजूने कर्ज योजना सुरू करायची आणि ती गोरगरीब जनतेला न मिळता नेते पुढारी यांचें बगलबच्चे त्यांनाच मिळाली पाहिजे अशी तरतूद केली जाते म्हणजे तुमच्या आमच्या हातात काय आहे गाजर

                आज समाजसेवक. समाजात चांगला विचार. चांगले आचार. विचारवंत. शासनाबरोर जनतेच्या हक्कासाठी लढणारी लोक यांच जीवन आज धोक्यात आले आहे कारणं सत्य आणि खर बोलणारा कोणालाही पचत आणि रुचत नाही कारण सत्य नेहमी कटू असत. खोट बोलून गाजर दाखवून लुटणारे एसी रुम मध्ये आहेत.  चारचाकी गाडी.  अमाप संपत्ती गोळा करून.  उजळ माथ्याने फिरत आहेत.  त्यांच्याकडे पैसा आहे. राजकीय पक्षाची ताकद आहे.  खर बोलणारा नेहमी कायद्याप्रमाणे बोलतो पण त्यांचे विचार. मत.  शासकीय अधिकारी व कर्मचारी समाजातील काही विध्वंसक वृत्तीचे लोक खुडून काढण्यात मग्न आहेत.   खोट आज तुपाशी आहे आणि खर उपाशी आहे. म्हणजे खर बोलणारे लोक यांच्याच हातात गाजार आहे मग काय असे विचारवंत संपणार काय ? ‌

    . आपल्या काळात इमारतींची उंची वाढली पण माणसकीची कमी झाली. रस्ते रूंद झाले पण दृष्टी अरुंद झाली. घर मोठी कुटुंब छोटी विचार आचार छोटे झाले सुखसोयी पुष्कळ पण समाधान आणि वेळ कमी पदव्या स्वस्त झाल्या पण शहानपणा अभाव. माहीतीचे डोंगर जमले पण नेमकेपणाचे झरे आटले तज्ञ वाढले आणि सोबत समस्या वाढल्या औषध भरपूर पण आरोग्य अभाव. मालकी माझ तुझ भाषा वाढली संस्कार मूल्यांची कमी झाली आपण बोलतो जास्त प्रेम कमी झाले आणि तिरस्कार वाढला. राहणीमान उंचावले पण जगणं दारिद्र्य झाल. जगन अवघड झालं मरण स्वस्त झाल आपल्या जगण्यात वर्षांची भर पडली पण आपल्या वर्षांमध्ये जगण्याची नाही. आपण भले चंद्रावर गेलो पण आपल्या शेजारी असलेल्या लोकांना भेटने दुर्मिळ झाले बाहेरचं जिंकत चाललो आहोत पण आतल्या आत हारणयाचे काय ? हवा पाणी शुद्ध नाही शुध्द करण्याचा आटापिटा पण गुदमरून मेलो त्याचे काय ? 

         .   समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

शेळ्यांच्या कळपात लांडगे घुसलेत?

 


शेळ्यांच्या कळपात लांडगे घुसलेत ?

    देशाच्या औद्योगिक. सांस्कृतिक. आर्थिक. शैक्षणिक. सामाजिक. उन्नतीचा कणा माझा बांधकाम कामगार आहे गरिब श्रीमंत. बलवान दुर्बल. अशी वर्गवारी आपल्याला आपल्या समाजात. राजकारणात. आर्थिक. सांस्कृतिक. शैक्षणिक. धार्मिक. भाषिक. शासकीय सेवा योजना. विविध सामाजिक कामगार महिला. संघटित असंघटित क्षेत्रातील कामगार संघटना अशा विविध वर्गातून आपणास आपल्या अडाणी अशिक्षित पणाचे दर्शन करून दिले जाते 

            जसे शेळी हा प्राणी गरिब. मिळेल ते खाणारा. ना. मारणारा. न चावणारा. खायला घातले तर खाणारा नाही तर उपाशी राहणारा. पण आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक असणारा. अन्याय अत्याचार या विरोधात आवाज न उठवणारा. असा एक प्राणी आहे 

            सर्वसामान्य माणसाचे जीवन एका गरिब शेळी प्रमाणे झाले आहे. आधुनिक काळामध्ये आपली समाज रचना अतिशय गुंतागुंतीची झाली आहे. समाजातील विविध घटक राज्य सत्ता शासन प्रशासन विविध कल्याणकारी मंडळे याकडून आपल्या बर्याच अशा अपेक्षा असतात पण त्या पूर्ण होतांना दिसत नाहीत

          उदा दाखल. बांधकाम कामगार. आमचा बांधकाम कामगार अडाणी अशिक्षित गरजू व्यसनी पोटासाठी मिळेल ते काम करणारा असून. मिळेल ती मजूरि न बोलता घेणारा. असा हा वंचित घटक आहे. शासनाला या वंचित घटकांचा सहानुभूती पूर्वक विचार करून. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ याची स्थापना करण्यात आली. त्यामुळे बांधकाम कामगार यांच्यासाठी विविध कल्याणकारी १९ योजना राबविण्यात आल्या . त्याचबरोबर राज्यस्तरीय १९ कामगार कायदे व केंद्रिय ७ कायदे असे २६ कामगार कल्याण कायदे तयार करण्यात आले आहेत. बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक कामगार भवन निर्माण करण्यात आले. तेथे बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी. अधिकारी व कर्मचारी यांची निवड करण्यात आली. स्वता कामगार आॅफिस मध्ये जाऊन नोंदणी करायला लागला. सुरवातीला. कामगार स्वता बांधकाम कामगार करत होते. त्यानंतर गठ्ठा पध्दत अमलात आली. त्यानंतर विविध बोगस मार्गाने कामगार नोंदणी होण्यास सुरुवात झाली. यातून सोपा मार्ग म्हणून शासनाने आत्ता आॅनलाइन पध्दतीने बांधकाम कामगार नोंदणी करण्यास सुरुवात केली बोगस नोंदणी थांबविण्यासाठी. बांधकाम कामगार आहे हे ठरविण्याचे अधिकार मान्यता असणारे इंजिनिअर. यांना देण्यात आले यात सुध्दा यापूर्वी फक्त सहि शिक्का चालत होता पण आत्ता सहि शिक्का रजिस्ट्रेशन नंबर आवक जावक नंबर असा सर्व प्रोसेस लागतो. काही ठिकाणी असा प्रकार इंजिनिअर बाबतीत उघड आला आहे की आजही इंजिनिअर लोक बांधकाम कामगार नोंदणी साठी लागणार्या प्रमाणपत्रासाठी पैसे घेत आहेत. खरोखरच कामगार हितचिंतक असणारे इंजिनिअर बांधकाम कामगार यांना कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ मिळावा म्हणून कामगारांना मदत करताना दिसत आहेत

                कामगारांना विविध कल्याणकारी मंडळांच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी. कामगारांचा कामगारांशी कोणताही संबंध नसणारे काही विविध कामगार संघटना तयार झाल्या. कामगार संघटना तयार करणारे. बांधकाम कशाला म्हणतात बांधकाम करतांना काय आणि कसे वापरतता हे माहीत सुध्दा नसणारे कामगार नेते झाले. कामगार हितचिंतक झाले. जागोजागी मोठ्या नेत्यांच्या जोडीला या बगलबच्चे यांचें डिजिटल लागण्यास सुरुवात झाली. राजकीय. गुन्हेगारी. गुंडगिरी. असे. कॅरेक्टर असणारे कामगार नेते. कामगार हितचिंतक म्हणून प्रसिद्ध झाले आणि सायकल वरून चार चाकी आणि त्यानंतर कोठयाची मालमत्ता. राजकारण याचा मोठा मेळ यांनी घातला. यातून गावा गावात यांनीच दलाल एजंट तयार केले आम्हाला एवढे द्या तुम्ही कितीही मिळवा असा फंडा अमलात आला ‌कामगार. भवन परिसरात वाढता संघटना सेवाभावी संस्था युनियन यांचा वाढता वावर. कामगार भवन मध्ये संघटना कार्यकर्ते आहेत का अधिकार व कर्मचारी हे सुद्धा कळत नाही. असा. वावर आजही रासरोस पणे चालू आहे. मग काय एक दरपत्रक ठरलं.( ५००० मिळवून देण्यासाठी १५०० ‌) (२०००० मिळवून देण्यासाठी ७००० )( २०००००मिळवून देण्यासाठी ५०/ हजार) ( शालेय शिष्यवृत्ती यातून मोठा आर्थिक हिस्सा ) ( अपघाती मृत्यू ५००००० मिळवून देण्यासाठी १००००० रुपये ) ( कामगार सुरक्षा संच शासन मोफत देतय पण त्यासाठी सुध्दा ५००) ( महिलांच्या विविध योजना यासाठी महिला संघटना यात महिलांचा वाढता सहभाग विचार करायला लावणारा आहे ) ( घरकूल योजना मिळवून देतो म्हणून १५००० ज्या योजनेअंतर्गत आजतागायत कोणत्याही बांधकाम कामगार यांना घर मिळाले नाही )( जागोजागी कामगार नोंदणी कामगार मेळावे घेणे कामगार हितासाठी नाही तर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी) कामगार जगो अथवा मरो यांना काहीच सुखदुःख नाही. यासाठी कोण जबाबदार आहे स्वता कामगार आहे कारणं तुम्ही यांना पैसे देताय म्हणून हे घेतात शासन तुमच्या नावाने विविध योजना त्यांचे लाभ तुमच्या बॅक खात्यात जमा करते. आणि तुम्ही हेच तुमचे पैसे संघटना वाले यांना देता का ? कळत नाही ? खरोखरच जो कामगार आहे तो पैसे देणार नाही. कारणं तो खरच कामगार आहे. बोगस कामगार. दुकानात काम करणारे. बुट चप्पल दुकान कामगार. नोकरी करणारे. बांधकामाशी कोणताही संबंध नसणारे कामगार. कामाला न जाणारे घरकाम करणाऱ्या महिलां. हे सर्व जण संघटना वाल्यांना पैसे देणार कारण त्यांना हे सर्व फुकट मिळत म्हणून. मला फुकट मिळालंय तुम्हीही घ्या. बांधकाम कामगार यांचेसाठी अपघात टळावे कामगार जीवन सुखकर व्हावे यासाठी शासनाने सुरक्षा संच वितरित केला आहे. त्यात पत्र्याच्यी पेटी धरून १३ सुरक्षा प्रधान करणार्या वस्तू आहेत. पण आज अस ध्यानात आले की शासनाने जेवढे सुरक्षा संच वाटप केले ते पुरुष कामगारापेक्षा. महिलांना जास्त वाटप झाले आहेत. आज कोठेही हा सुरक्षा संच कोठेही वापरला जात नाही. म्हणजे शासनाचे कोट्यावधी रुपये पाण्यात गेले असा याचा अर्थ होतो का ? कल्याणकारी मंडळाने ज्या विभागांत बांधकाम कामगार यांना किती सुरक्षा संच वाटप झाले हे माहीत आहे त्यामुळे शासकीय अधिकारी व याना आपापल्या गाव जिल्हा तालुका यामध्ये महिन्यातील एक दिवस मंडळाकडून वितरण करण्यात अलेला सुरक्षा संच वापरता आहे का ? हे पाहणे गरजेचे आहे ? ज्या कामगारांकडून हा सुरक्षा संच वापरला जात नाही त्यांच्यावर शासनाला खोटी माहिती देऊन शासनाची फसवणूक केली यांच्या अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात यावी. 

      अधिकारी व कर्मचारी जे सहाय्यक कामगार आयुक्त भवन मध्ये आहेत यांचें आणि संघटना. सेवाभावी संस्था युनियन. राजकीय युनियन. समाजाची संघटना. यांचीशी लागेबांधे आहेत. तुम्ही खा आणि आम्ही खातो असे तत्व आहे. ज्याचे मागें राजकीय पक्ष आहे त्याचे पहिले काम. सर्वसामान्य कामगार गेला की त्याला अधिकारी व कर्मचारी विचारतात तुम्ही कोणत्या संघटनेकडून आला आहे म्हणजे शासनापेक्षा संघटना मोठ्या काय ? हे सर्वात मोठे लहान मोठे लांडगे आहेत ते गरिब शेळी म्हणजे कामगार यांच्या कळपात मोकाट घुसले आहेत लवकरच आवर घाला नाहीत तर सुपडा साफ करतील हे लांडगे. 

         कोणत्याही जिल्ह्यात बांधकाम कामगार यांचे विविध लाभाचे अर्ज प्रलंबित असतील तर. संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्याशी चर्चा करा. आपणास पाहिजे तसे उत्तर मिळाले नाही तर. जिल्हाधिकारी सो यांचेकडे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची तक्रार दाखल करा बांधकाम कामगार यांना मदत करा त्यांच्या अडाणी अशिक्षित गरजू पणाचा लाभ घेऊ नका. कामगार दिवसभर उन्हात राबतो. आणि आपले आणि आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करतो. आज कामगार नेते कामगार हितचिंतक यांनी एक दिवस बांधकाम कामगार होऊन बघा. सगळी नेतेगिरी विसरुन जाल. एसी आॅफिस मध्ये बसणारे अधिकारी व कर्मचारी शासनाने बांधकाम कामगार यांना सहकार्य करण्यासाठी आपली निवड केली आहे. तर आपले काम आपले कर्तव्य चोख पार पाडा.  

बांधकाम कामगार यांना एक कळकळीची विनंती कोणालाही एक रूपया देवू नका

शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा

         रस्त्यावर या आपल्या हक्कासाठी आवाज उठवा कोणत्याही राजकीय झेंडा खांद्यावर घेवू नका. तुमचा आवाज मोठा आहे एवढा मोठा करा की मुंबई काय दिल्ली पर्यंत पोहचला पाहिजे.

    खरोखरच आपण शेळी होऊन जगायच का ? आजच ठरवा आपल्याला लुटणारे. आपल्या जीवावर आपल्या कामगार कल्याणच्या लाभावर मोठे होणार याचा. आत्ता कार्यक्रम लावायची गरज आहे आपल्या गावात कोणीही कामगार संघटना नावाखाली कोणाची खोटी माहिती नोंदणी फी पेक्षा जास्त पैसे घेऊन कामगारांना गंडा घालत असेल तर जवळच्या पोलिस स्टेशनला तक्रार द्या. आपल्या गावात कोणत्याही संघटना वाल्यांना प्रवेश दवू नका.

      माझ्याबद्दल बर्याच जणांचे मत सार्थक नाही 

       समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या