Showing posts with label MANAVSEVA PROJECT. Show all posts
Showing posts with label MANAVSEVA PROJECT. Show all posts

अन् त्याला जगण्याची वाट सापडली*



अन् त्याला जगण्याची वाट सापडली


*•शनिवार दि. २९ जानेवारी २०२२•*

पायाची बोटे तुटलेली, त्यामुळे झालेली जखम, जखमेतून वाहणारं रक्त व पु त्यातून वाहणारे किडे आणि त्या जखमेचा एक उग्र वास असं अतिशय वेदनादायी आयुष्य एक निराधार मनोरुग्ण व्यक्ती जगत होता. अहमदनगर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वेपुलाखाली हा रुग्ण राहत होता. तुटलेल्या पायामुळे चालणे शक्यच नव्हते, जर कोणाच्या लक्षात आले तर कोणी खायला देत होते, नाही तर उपाशीच!

या वेदनादायी आयुष्य जगणाऱ्या व्यक्तीची माहिती मा. श्री सुभाष जाधव व मा. श्री भरतभाऊ बागरेचा यांनी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांना दिली. 

दिलीप गुंजाळ यांनी संस्थेचे कार्यकर्ते पाठवून त्या व्यक्तीची माहिती घेतली. कोलकाता येथून पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या एका स्थलांतरीत कामगाराचे मानसिक संतुलन बिघडल्याने त्यांच्यावर ही वेदनादायी आयुष्य जगण्याची वेळ आली असल्याची माहीती पुढे आली. संस्थेचे कार्यकर्ते अनिल दुधवडे व मच्छिंद्र दुधवडे यांनी या निराधार मनोरुग्णाला तातडीने शनिवार दि.२९/०१/२०२२ रोजी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या 'मानवसेवा' प्रकल्पात आणून दाखल केले. प्रकल्पात या निराधार मनोरुग्णाचे केस कापून, आंघोळ घालून स्वच्छ केले. आणि त्याच्या जखमेला मलमपट्टी केली. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे. मानवसेवा प्रकल्पामुळे त्याला जगण्याची वाट सापडली. सुशांत गायकवाड, सुरेखा केदार, सरीता गोडे, पुजा मुठे, शाहीद पठाण, अविनाश पिंपळे, राजू थापा हे पुढील काळजी घेत आहेत.

*मानवसेवा हीच, ईश्वर सेवा!*


*मानवसेवा प्रकल्प*

९०११७७२२३३

तिला रस्त्यावर मरण्या साठी सोडले - manavseva project

 


रस्त्यावर मरणयातना भोगणा-या मनोरुग्ण मातेला 'मानवसेवा' चा आधार

श्रीगोंदा तालुक्यातील उक्कलगाव परिसरात रस्त्यावर फिरणाऱ्या (अंदाजित वय ३२ वर्ष) मनोरुग्ण महिलेची अतिशय वाईट अवस्था होती. अंगावर जेमतेम कपडे, केसांत माती, अतिशय कडक थंडीत गारठलेल्या अवस्थेत मरणयातना भोगत होती. उक्कलगाव येथील ग्रामस्थांना या महिलेबाबत अरणगावचे उप-सरपंच आणि श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे मार्गदर्शक महेश पवार यांना सांगितले. रस्त्यावर मरणयातना भोगणा-या मानसिक विकलांग महिलेला 'मानवसेवा' प्रकल्पात शनिवार दि.२२ जानेवारी २०२२ रोजी मायेचा आधार देण्यात आला. या महिलेवर मानसोपचार तज्ञ डॉ अनय क्षीरसागर, डॉ. सुरेश घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू करण्यात आले आहे.   

*मानवसेवा हीच ईश्वर सेवा!*


*मानवसेवा प्रकल्प*

(मन व घर हरवलेल्या मानसांच हक्काचं घर)

द्वारा- श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ

☎️ (०२४१) २४२९९४२

📱 ९०११७७२२३३

हरवलेल्या ज्योतीचा भेटली कुटुंबाला - manavseva Project

 

आयुष्याची नवी वाट...
हरवलेल्या ज्योतीची 'मानवसेवा' मुळे घडली कुटुंबाची भेट


हिंगोली येथील ३० वर्षीय 'ज्योती' मानसिक संतुलन बिघडल्यामुळे कुटुंबापासून दुरावली होती. मानसिक आजारामुळे समाजात तिच्याविषयी एक भीती निर्माण झाल्याची बातमी होती, काही लोकांनी तिला एका बंद खोलीत कोंडून ठेवले. बंद खोलीच्या खिडकीतून तिला जेवण पाणी देत होते.

सदर महिलेची माहिती अहमदनगर येथील श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाला मिळाली. संस्थेचे कार्यकर्ते सुशांत गायकवाड, अविनाश पिंपळे, पुजा मुठे, सुरेखा केदार, सरीता गोडे यांनी या महिलेची बंद खोलीतून सुटका करीत संस्थेच्या *'मानवसेवा प्रकल्पात'* दि.२३/१०/२०२१ रोजी दाखल केले. ज्योती हिच्यावर मानसोपचार तज्ञ डॉ अनय क्षीरसागर आणि डॉ. सुरेश घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात आले. संस्थेच्या स्वयंसेवकांनी तिची मानवसेवा प्रकल्पात काळजी घेवून संरक्षण दिले. संस्थेच्या समुपदेशक पुजा मुठे यांनी ज्योतीचे उपचार पूर्ण करुन समुपदेशनात माहिती घेऊन कुटुंब शोधले. श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या 'मानवसेवा' प्रकल्पाने तिच्या कुटुंबीयांशी संपर्क करुन दि.१२/०१/२०२२ रोजी ज्योतीला सन्मानाने कुटुंबाच्या ताब्यात देवून पुनर्वसन केले. ज्योतीला तिचे मुले आणि कुटुंब मिळताच अश्रू अनावर झाले. 

*मानवसेवा हीच ईश्वर सेवा!*


*मानवसेवा प्रकल्प* 

(मन आणि घर हरवलेल्या मानसांच हक्काचं घर)

द्वारा- *श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ*

☎️ (०२४१) २४२९९४२

📱९०११७७२२३३

ती सहा महिन्याची गरोदर होती. Manavseva Project

 

ती सहा महिन्यांची गरोदर बेवारस मनोरुग्ण महिला मानवसेवा प्रकल्पात...

••••••••••••••••••••••••••••••••••••••
एक ३५ वर्षाची गरोदर बेवारस मनोरुग्ण महिला ही अर्ध नग्न अवस्थेत बीड जिल्ह्यातील उमापूर गावामध्ये फिरत होती. त्या बेवारस गरोदर मनोरुग्ण महिलेला अहमदनगर येथील श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या *'मानवसेवा प्रकल्प'* येथे आश्रय देण्यात आला.
काही नराधमांच्या वासनेला बळी ठरलेली ही महिला अंदाजित सहा महिन्यांची गरोदर आहे. या बेवारस महिलेचे खाणेपिणे पासून सर्व हाल सुरू होते त्यामुळे तिच्या पोटातील बाळाचेही हाल होते. मनोरुग्ण असल्यामुळे कोणीही आधार दिला नाही. मानवसेवा प्रकल्पाने या गरोदर महिलेची जबाबदारी घेत महिला व तिच्या पोटातील बाळाचे हाल थांबविले. स्नेहालय संस्थेच्या स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राचे संतोष धर्माधिकारी यांनी आणि चकलांबा पोलीस स्टेशन ता. गेवराई जिल्हा बीड यांनी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांना या गरोदर मनोरुग्ण महिलेची माहिती देत दाखल करुन घेण्याची विनंती केली. दि.५/०२/२०२२ रोजी मध्यरात्री १२:४५ वा. सहा महिन्यांच्या गरोदर मनोरुग्ण महिलेला श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पात दाखल करण्यात आले. 
*मानवसेवा हीच ईश्वर सेवा!*
*मानवसेवा प्रकल्प*
📱९०११७७२२३३

ती एक वर्षा पूर्वी झाली होती लापता

 


वर्षभरापूर्वी हरवलेली योगिता मानवसेवेच्या उपचारानंतर पोहचली सुखरूप कुटुंबात

शनिवार दि.१३/११/२०२१


जळगाव जिल्ह्यातील मालोद या गावातील एक २२ वर्षीय तरुणी मानसिक भान हरवल्याने आपले कुटुंब सोडून अमानवीय आयुष्य जगत होती. मानसिक आजाराने त्रस्त असलेली ही तरुणी वर्षभर रस्त्यावर फिरत जळगाव पासून नाशिक आणि पायीपायी थेट अहमदनगर येथे पोहचली. या बेवारस तरुणीला महिला व बालविकास विभागाच्या वनस्टाॅप सेटरच्या मार्फत दि. २९/०९/२०२१ रोजी बेघर निराधार मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणाऱ्या 'मानवसेवा' प्रकल्पात दाखल करण्यात आले होते. मानवसेवा प्रकल्पात या निराधार तरुणीवर मानसोपचार तज्ञ डॉ. अनय क्षीरसागर व डॉ. सुरेश घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात आले. आणि उपचारांनंतर योगिता हीचे कुटुंब शोधून दि. १३/११/२०२१ रोजी संस्थेच्या स्वयंसेवकांनी जळगाव येथील मालोद या गावी कुटुंबात पोहच केले. वर्षभरानंतर कुटुंबात पोहचलेल्या योगिताच्या ४ वर्षीय मुलीचे व कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. या निराधार तरुणीच्या कौटुंबिक पुनर्वसनासाठी संस्थेचे मार्गदर्शक मा.प्रा.श्री अविनाश मुंडके सर यांनी आर्थिक सहकार्य केले. 

*मानवसेवा हीच, ईश्वर सेवा!*


*मानवसेवा प्रकल्प*

द्वारा- श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ

☎️ (०२४१) २४२९९४२

📱 ९०११७७२२३३

ती तरणी, २४ वर्षीय अनाथ मुलगी रस्त्यावर, त्यात मनोरुग्ण!


 ती तरणी, २४ वर्षीय अनाथ मुलगी रस्त्यावर, त्यात मनोरुग्ण!

रस्त्यावर फिरणा-या त्या अनाथ मनोरुग्ण मुलीला 'मानवसेवा' प्रकल्पाचे मायेचे छत!


मनावर पडलेला ताण आणि कोणतेही भान नसलेली एक २४ वर्षीय तरुणी अहमदनगर शहरात फिरत होती. या अनाथ तरुणीची माहिती आणि परिस्थिती अहमदनगर महिला व बालविकास विभागाच्या 'वन स्टॉप सेंटर' कडून श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांना मिळाली. श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून रस्त्यावर फिरणा-या बेघर, अनाथ, निराधार मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी अरणगाव (मेहराबाद) येथे मानवसेवा प्रकल्प कार्यरत आहे. आणि रस्त्यावर फिरणा-या या अनाथ मनोरुग्ण मुलीला 'मानवसेवा' प्रकल्पाने दाखल करुन मायेचे छत दिले.

‘मी समाजाला नकोशी असणारी, एक अनाथ मुलगी आहे’त्या २४ वर्षीय तरुणीने मानवसेवा प्रकल्पात दाखल होताच हंबरडा फोडला. आत्महत्याच्या विचारांनी या तरुणींची पावलं मृत्यूच्या दरीकडे वळत होती. मात्र संस्थेच्या स्वयंसेवकांनी या मुलीला मानसिक आधार देत समुपदेशन केले. नवजीवनाच्या आशा निर्माण केल्या. मानसोपचार तज्ञ डॉ. अनय क्षीरसागर, डॉ. सुरेश घोलप यांच्या मार्गदर्शनाने या तरुणीवर उपचार सुरु करण्यात आले आहेत.

*सहायः समसुखदुःखः ॥*


*मानवसेवा प्रकल्प*

९०११७७२२३३

निराधार मानसिक विकलांग मातेला मानवसेवा प्रकल्पाचा आधार

 


-

अहमदनगर तालुका पोलीसांच्या रात्र गस्तीत अहमदनगर- पुणे रस्त्यावर कामरगाव परिसरात भेदरलेल्या अवस्थेत एक निराधार महिला आढळून आली. नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्टेबल श्री धुमाळ सर यांनी सदर महिलेबाबत श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या “मानवसेवा” प्रकल्पाला माहिती दिली. मनाची घालमेल सुरु असलेल्या त्या मातेची माहिती घेवून मानवसेवा प्रकल्पाचे स्वयंसेवक स्वप्नील मधे, अविनाश पिंपळे, कोमल कांबळे यांनी अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय तपासणी नंतर पोलीसांच्या मदतीने 'मानवसेवा' प्रकल्पात दाखल करुन घेतले. दाखल मातेची स्वच्छता केली आणि मानसोपचार तज्ञ डॉ. अनय क्षीरसागर, संस्थेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांच्या मार्गदर्शनाने उपचार सुरु केले आहे. 

*मानवसेवा हीच, ईश्वर सेवा!*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*मानवसेवा प्रकल्प*

☎ ०२४१ २४२९९४२

📱 ९०११७७२२३३

निराधार मातेला दिला मानासेवाने आधार - MANAVSEVA PROJECT

 पुणे शहरात फुटपाथवर फिरणारी निराधार माता मानवसेवा प्रकल्पात दाखल




पुणे येथील बोट क्लब रोड बंडगार्डन परिसरात एक निराधार मानसिक विकलांग माता थंडीने कुडकुडत फुटपाथवर फिरत होती. ही बाब पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी यांच्या निदर्शनास आली. पुणे महानगरपालिकेने या महिलेबाबत कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन पुणे यांना कळविले. या निराधार मातेच्या सुरक्षिततेचा आणि संरक्षणाचा प्रश्न समोर येताच कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री दिलीप शिंदे, महिला पोलीस उपनिरिक्षक सौ. मनिषा टुले, प्रदिप देवकुळे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील अरणगाव (मेहराबाद) येथील रस्त्यावरील निराधार माता-भगिनीं व बंधुच्या पुनर्वसनासाठी कार्य करणा-या *मानवसेवा* प्रकल्पाचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांच्याशी चर्चा केली. दिलीप गुंजाळ व त्यांच्या स्वयंसेवक टीमने कोणत्याही प्रश्नांच्या जंजाळात न पडता *आज बुधवार दि. १०/०२/२०२१* रोजी या उपेक्षित मातेला मानवसेवा प्रकल्पात दाखल करुन घेत मायेचा आधार दिला. या मातेवर मानसोपचार तज्ञ डाॅ. अनय क्षीरसागर, डॉ. सुरेश घोलप यांच्या मार्गदर्शनाने उपचार सुरु केले आहे. या निराधार मातेला दाखल करतेवेळी पुणे येथून कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनचे महिला पोलीस उपनिरिक्षक सौ.मनिषा टुले, पोलीस नाईक संगिता गवारी, जयश्री ढोमे, सामाजिक कार्यकर्ते प्रदिप देवकुळे, प्रतिक महामुनी, स्वाती डिबळे उपस्थित होते. समुपदेशन,पुनर्वसनाकरीता मानवसेवा प्रकल्पाचे स्वयंसेवक अनिता मदणे, प्रसाद माळी, राहुल साबळे अशोक मदणे, सुशांत गायकवाड, सोमनाथ बर्डे, नितीन बर्डे, स्वप्नील मधे, कृष्णा बर्डे, अजय दळवी, सिराज शेख परिश्रम घेत आहेत.  

•••••••••••••••••••••••••••

*मानवसेवा प्रकल्प* 

(मन व घर हरवलेल्या मानसांच हक्काच घर)

द्वारा - *श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ*

☎ (०२४१) २४२९९४२ 

📱९०११७७२२३३ /९११२०५९१९१ / ९११२०४९१९१

वाचा -

Covid-१९ च्या वाढत्या संसर्गामुळे अन्न व औषध प्रशासने घेतला हा निर्णय - FDA ...

कामगार आणि हडताल A . Munde ...

गुलाम. मजूर. कामगार ...

लोकशाही आणि घराणेशाही....

शिष्यवृत्ती आणि विद्यार्थी - अहमद मुंडे

 असुन फायदा नसून खोळांबा 

अल्पसंख्याक योजना व शिष्यवृत्ती



            (१) प्री मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना

अल्पसंख्याक कार्य मंत्रालय भारत सरकार पुरस्कृत योजना आहे सदर योजना राज्यात शालेय शिक्षण विभागातर्फे राबविण्यात येते या योजनेअंतर्गत शासकीय अथवा खाजगी १ली ते १० वी पर्यंत शिक्षण घेणा-या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते सदर योजनेअंतर्गत पात्र ठरविण्यासाठी विद्यार्थ्यांचया पालकाचे उत्पन्न १लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे मागील वर्षी ५०/टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे

सदर अर्ज आॅनलाइन पध्दतीने करणे आवश्यक आहे

(२) पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना

सदर योजना अल्पसंख्याक मंत्रालय व भारत सरकार यांचेकडून राबविली जाते उच्च तंत्रज्ञान तंत्रशिक्षण विभागातर्फे. उच्च संचणालय पुणे यांचेमार्फत राबविण्यात येते ११वी १२वी किंवा समकक्ष अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते सदर योजना पात्र ठरविण्यासाठी वार्षिक उत्पन्न २ लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे विद्यार्थ्याने मागील वर्षी ५०/टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेलें असावेत

(३) मेरीट कम मिन्स् शिष्यवृत्ती

     सदर योजना अल्पसंख्याक कार्य मंत्रालय भारत सरकार पुरस्कृत असून राज्यांमध्ये ती उच्च व तंत्रशिक्षण तांत्रिक शिक्षण व व्यवसाय शिक्षण या विभागात शिक्षण घेणा-या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते सदर योजनेअंतर्गत पात्र ठरविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न २-५० लाखा पेक्षा कमी असणे आवश्यक आहे विद्यार्थ्याने मागील वर्षी ५०/टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेले असावेत

(४) व्यावसायिक शिक्षण शिष्यवृत्ती योजना

        उच्च व्यावसायिक व इयत्ता बारावीच्या नंतर सर्व अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेणाऱ्या राज्यातील गुणवत्ताधारक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना उच्च व्यावसायिक व १२वी नंतर सर्व अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेणाऱ्या राज्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचया कुटुंबाची मिळणार या वार्षिक उत्पन्न मर्यादा २-५० लाखावरुन ६ लाख करण्यात आली आहे

(५) मदरशांमध्ये शिकत असलेल्या विविध वयोगटातील विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पारंपारिक धार्मिक शिक्षणाबरोबर विज्ञान. गणित. समाजशास्त्र. हिंदी. मराठी. इंग्रजी. व उर्दू. या विषयांचे शिक्षण देणे तसेच मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये प्रवेश घेणा-या इयत्ता ९वी १०वी ११वी व १२ वी यातील आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे जेणेकरून त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत व रोजगार क्षमतेत वाढ होऊन त्यांचा आर्थिक स्तर सुधारणे

(६) अल्पसंख्याक बहुल शाळांना अनुदान

      धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी बहुल शासन मान्य खाजगी अनुदानित /विना अनुदानित/ कायम विनाअनुदानित शाळा कनिष्ठ महाविद्यालये औधोगिक प्रशिक्षण संस्था व दिवयांग (अपंग ) शाळांमध्ये पायाभूत सुविधा सोयी पुरविण्यासाठी अनुदान योजना

(७) विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह (केंद्र व राज्य )

    विद्यार्थिनींसाठी वसतीगृह (केंद्र व राज्य) अल्पसंख्याक समाजातील मुलीना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मा न्या सचचर समितीने केलेल्या शिफारशीनुसार अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठी वसतीगृहे सुरू करणे हि शिफारस असून त्याअनुषंगाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृहे बांधण्यात येत आहे

(८) मौलाना आझाद मोफत शिकवणी व संबंध योजना

(९) मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजना

कर्ज मर्यादा. २-५० लाखांपर्यंत

      व्याजदर फक्त ३/टक्के

       १००/टक्के कर्ज

परतफेड. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यांपासून पुढील ५ वर्ष शैक्षणिक कर्ज योजना तसेच राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास महामंडळाचा शैक्षणिक कर्ज योजना या मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत राबविण्यात येतात याची सविस्तर माहिती मंडळ कार्यालयात मिळेल कर्ज मर्यादा वाढवून ५ लाख करण्यात आली आहे

(१०) राजीव गांधी शिक्षण कर्ज योजना

कर्ज मर्यादा. दोन लाख पन्नास हजार 

  व्याजदर फक्त ३/टक्के

१००/टक्के कर्ज

परतफेड शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यांपासून पुढील ५. वर्षे 

        पात्रता

अर्जदार अल्पसंख्याक समाजातील असावा मुस्लिम. शिख. पारशी. बुध्दीषट व जैन. समाजाचा 

             समावेश

अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा 

वयोमर्यादा १ते ३२ वर्ष

कुटुंबातील वार्षिक उत्पन्न शहरी भागात. रुपये. १/०३/०००पेक्षा कमी ग्रामीण भागात ८१००० पेक्षा कमी

       राजीव गांधी शैक्षणिक कर्ज योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

विहित नमुन्यातील अर्ज

अल्पसंख्याक असल्याचा पुरावा

आधार कार्ड /इलेक्शन कार्ड/ बॅंक पासबुक झेरॉक्स /पॅन कार्ड /यापैकी एक

अर्जदार व जामिनदार आधार कार्ड/इलेक्शन कार्ड /पारपतरक /बॅंक पासबुक /वाहन लायसन्स /पॅन कार्ड /पैकी एक

उत्पन्न प्रमाणपत्र

कुटुंब नावे तहसिलदार/तलाठी /यांचा उत्पन्न दाखला /शासकीय/खाजगी /क्षेत्रतातील कर्मचारी असल्यास फाॅरम १६

(११) मराठी भाषा फौंडेशन वर्ग योजना

राज्यातील अमराठी शाळांमध्ये इयत्ता ८वी९वी१०वी इयत्तेत शिकत असलेल्या अल्पसंख्याक लोकसमूहातील मुला मुली साठी मराठी भाषा फौंडेशन वर्ग योजना सुधारित स्वरुपात राबविण्याबाबत 

   आज अलिकडे अल्पसंख्याक कार्यशाळा. अल्पसंख्याक मेळावे. अल्पसंख्याक हक्क व अधिकार. नियोजन. जिल्ह्यात अल्पसंख्याक अध्यक्ष आपल्या वाहनांना आपल्या अध्यक्ष पदाच्या मोठ्या मोठ्या पाट्या लावून फिरतात एक वेळ अशी आली कि अल्पसंख्याक दिन आॅनलाइन पध्दतीने साजरा करण्यात आला प्रत्त्येक जण आपापल्या राजकीय वर्तुळात या अल्पसंख्याक समाजातील लोकांचा कसा वापर करता येईल याकडे जादा लक्ष आहे

          अल्पसंख्याक समाजा बद्दल जर कोणाला कळवाळा असेल तर त्यांनी एकाच काम करा ते म्हणजे अल्पसंख्याक असल्याचा पुरावा देणे हि अट रद्द करा जुना समाज अडाणी होता कागदाची किंमत त्यांना त्यावेळी कळली नाही त्यामुळे ६० वर्षाचा पुरावा मिळणे शक्यच नाही 

          अल्पसंख्याक योजनेअंतर्गत शिक्षणासाठी कर्ज योजना आहे पण त्या योजनेचा कर्ज पुरवठा मंडळाने करणे गरजेचे आहे कारण मंडळाने जर कर्ज प्रकरणे मंजूर केली तरि बॅंका हि प्रकरणे निकाली काढत नाही त्यात विनाकारण अटि घालून कर्ज प्रकरणे बाद केले जाते नाहि तर मग बॅंक मॅनेजर यांना टक्केवारी दिली तरच कर्ज प्रकरणाला मंजुरी मिळते किती वाईट आहे बघ

               वरील प्रमाणे समाजसेवा उठाव बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको प्रचार प्रसार प्रसिध्दी वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी विविध गाव तालुका जिल्हा राज्य देश यातून पदाधिकारी नेमणे आहे तरी इच्छुक व्यक्ति तरुण यांनी संपर्क साधावा

     संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अन्न धान्य सुरक्षा रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

९८९०८२५८५९

माहिती अधिकार

आपण जर एखाद्या शासकीय आॅफिस मध्ये माहिती अधिकार दाखल केला असेल तर त्या संदर्भात असणारि माहिती हि त्या कार्यालयाच्या लेटर हेड वर देणे बंधनकारक आहे अशी माहिती मिळत नसेल तर कार्यालय दिरंगाई वरिष्ठांकडे तक्रार दाखल करा


वाचा - 

डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जीवन घटनाक्रम आणि कार्यकर्तृत्व - Dr Babasaheb Ambedkar...

कशी नशिबाने थट्टा मांडली - मानवसेवा प्रकल्प ....

अहमदनगर किला - AHMEDNAGAR FORT ...

चुकीची माहिती देऊ नका - खासदार इम्तियाज जलील AIMIM MP IMTIYAZ JALIL....


ती दिवस- रात्र रस्त्यावर फिरत होती - Manavseva Project

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

रस्त्यावरच दिवस-रात्र काढणा-या २४ ‌वर्षीय बेघर, 

निराधार तरुणीला मानवसेवा प्रकल्पाचा आधार.



जळगाव जिल्ह्यातील अमळनेर परिसरात एक २४ ‌वर्षाची तरुणी रस्त्यावर दिवस-रात्र फिरत होती. मानसिक भान नसल्यामुळे सर्व नाती विस्कटली, आयुष्याची पुर्ण लक्तरी उडाली. अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री संजय पाटील यांनी समाजसेवी संस्थांचे मार्गदर्शक मा. प्रा. श्री अविनाश मुंडके सर यांना कळविले. मुंडके सर यांनी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांना या तरुणीबाबत माहिती दिली. एक एअर होस्टेज मानसिक ताण-तणावातून सर्व काही हरपून वेदनांच ओझं घेवून आयुष्य जगत होती. रस्त्यावर दिवस-रात्र काढणा-या या निराधार मनोरुग्ण तरुणीला दिलीप गुंजाळ यांनी दि. १३/०१/२०२१ रोजी संस्थेच्या मानवसेवा प्रकल्पात दाखल करुन घेत मायेचा आधार दिला. मानसोपचार तज्ञ डॉ. अनय क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने उपचार सुरु केले आहे. सध्या मानवसेवा प्रकल्पात ४० बेघर, निराधार मनोरुग्ण माता-भगिनीं व बंधु उपचार घेत असल्याची माहिती प्रकल्प समन्वयक राहुल साबळे यांनी दिली. या बेघर तरुणीला दाखल करुन घेणेसाठी आणि उपचार देखभालीसाठी संस्थेचे स्वयंसेविका अनिता मदणे, कोमल कांबळे, समुपदेशक सुशांत गायकवाड, सोमनाथ बर्डे, सिराज शेख, स्वप्नील मधे, नितीन बर्डे, अजय दळवी, कृष्णा बर्डे, प्रसाद माळी, अशोक मदणे हे पुढाकार घेत आहेत.

*मानवसेवा प्रकल्प*

(मन व घर हरवलेल्या मानसांच हक्काचं घर)

द्वारा- *श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ*

☎ (०२४१) २४२९९४२

📱 ९०११७७२२३३ / ९११२०४९१९१ / ९११२०५९१९१





वाचा - 

अखिलेश यादव यांच्यावर ओवैसी यांची टीका, म्हणाले- त्यांची भिती हाच आमचा विजय AIMIM-SP..

संविधान व लोकशाही विरोधी कृत्य सहन करणार नाही - हाजी इर्शादभाई , Pune....

चुकीची माहिती देऊ नका - खासदार इम्तियाज जलील AIMIM MP IMTIYAZ JALIL...

डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जीवन घटनाक्रम आणि कार्यकर्तृत्व - Dr Babasaheb Ambedkar...


कशी नशिबाने थट्टा मांडली - मानवसेवा प्रकल्प

 कशी नशिबाने थट्टा मांडली




"त्या" अर्धनग्न मातेला मानवसेवेच्या मायेने झाकले

अहमदनगर :- १० जानेवारी २०२१

चिखलाने माखलेले केस, मानसिक भान हरवून नुसती बडबड, अंगावर फाटके कपडे, संपुर्ण शरीराची किळसवाणी अवस्थेतील एक निराधार महिला बुरुडगाव रोड, साळुंके मळा परीसरात फिरत होती. या महिलेची अवस्था पाहून श्री स्वप्नील कुलकर्णी सर आणि श्री समीर बोरा सर यांनी निराधार मानसिक विकलांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणा-या श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांना whatsapp द्वारे माहिती दिली. आज रविवार दि. १०/०१/२०२१ रोजी संस्थेचे स्वयंसेवक राहुल साबळे, सुशांत गायकवाड, अनिता मदणे, सोमनाथ बर्डे, कृष्णा बर्डे, अजय दळवी, स्वप्नील मधे, चंदा मावशी हे प्रत्यक्ष बुरुडगाव रोडवर जावून या निराधार मानसिक विकलांग महिलेची सुशृषा करुन उपचार व पुनर्वसनाकरीता श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या“मानवसेवा”प्रकल्पात दाखल करुन आधार दिला. मानसोपचार तज्ञ डॉ. अनय क्षीरसागर हे या महिलेवर उपचार करीत आहेत. 

अहमदनगर - मैला बालों वाली एक बेघर महिला, होश खो बैठी, फटे कपड़े, बदहवास बदन बड़ागांव रोड के सालुंके माला इलाके में घूम रही था। इस महिला की स्थिति को देखकर, श्री स्वप्निल कुलकर्णी सर और श्री समीर बोरा सर ने श्री अमृतवाहिनी ग्राम विकास मंडल के संस्थापक दिलीप गुंजल को सूचित किया, जो व्हाट्सएप के माध्यम से मानसिक रूप से विकलांगों के पुनर्वास के लिए काम कर रहे हैं। आज रविवार है। 10/01/2021 को, संगठन के स्वयंसेवकों राहुल सेबल, सुशांत गायकवाड़, अनीता मदने, सोमनाथ बर्डे, कृष्णा बर्डे, अजय दलवी, स्वप्निल माधे, चंदा मावे ने सीधे बुरडगाँव रोड पर जाकर इस बेसहारा मानसिक रूप से विकलांग महिला की देखभाल की। "मानव सेवा" परियोजना में दाखिल करके समर्थित। मनोचिकित्सक डॉ अनय क्षीरसागर इस महिला का इलाज कर रहे हैं।

मानवसेवा हीच, ईश्वर सेवा!

•••••••••••••••••••••••••

मानवसेवा प्रकल्प

(मन व घर हरवलेल्या मानसांच हक्काच घर)

द्वारा - *श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ*

☎ (०२४१) २४२९९४२

📱 ९०११७७२२३३, ९११२०४९१९१, ९११२०५९१९१




वाचा - 

गुटखा मावा बंदीवर सर्व उच्च न्यायालयाचा आदेश- Gutkha,Mawa, Banned...

पूर्व सैनिक ने ISI को दी थीं भारतीय सेना की खुफिया सूचनाएं, टेरर फंडिग के मिले सबूत...

मुस्लिम क्रांतिकारक मौलवी भाग ४ - Muslim Indian Freedom Fighter ....

महिलांनी आपल्या आरोग्याबाबत जागरुक राहिले पाहिजे - डॉ.रेश्मा चेडे...

गुजरात राज्यातील हरवलेल्या वृद्ध महिलेला मानवसेवा प्रकल्पामुळे पुन्हा मिळाले कुटुंब - manavseva project ....


निराधार मानसिक विकलांग मातेला "मानवसेवा" प्रकल्पात मायेचा आधार manavseva project

निराधार मानसिक विकलांग मातेला "मानवसेवा" प्रकल्पात मायेचा आधार


अहमदनगर- दि. २०/११/२०२० रात्री १०:१२ वा. तारकपुर परिसरात आठ दिवसांपासून एक निराधार मानसिक विकलांग महिला (अंदाजित वय ३५ वर्ष) फिरतांना सामाजिक कार्यकर्त्या मा. संध्याताई मेढे यांच्या नजरेस पडली. या निराधार मातेला आधार मिळण्याकरीता संध्याताई यांनी अरणगाव येथे मनोरुग्णांना जगण्याची नवी उर्मी देणारे श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या *'मानवसेवा'* प्रकल्पाचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांना कळविले. दिलीप गुंजाळ स्वयंसेवकांसह तारकपुर परिसरात पोहचले आणि पिडीत महिलेशी चर्चा केली. दररोजच्या वेदना सहन करुन मिळेल ते खाऊन जगणं...! सर्व भान हरवून बसलेल्या या मातेला वैयक्तिक स्वच्छतेचही भान नव्हतं. काही दुकानांच्या पायरीवर रात्र काढतांना एका माणसांकडून दररोजचं शोषणही व्हायचं. हे ऐकून काळजात चर्रर्र...झालं. संस्थेचे दिलीप गुंजाळ व संध्याताई मेढे यांनी लागलीच या सर्व परिस्थितीची माहिती तोफखाना पोलीस स्टेशनला दिली. या निराधार मातेचं दु:ख जाणून घेवून दिलीप गुंजाळ, अनिता मदणे, विकास बर्डे, ऋतिक बर्डे यांनी निराधार मनोरुग्ण मातेला *"मानवसेवा"* प्रकल्पात दाखल करीत मायेचा आधार दिला. अखेर या मातेच्या सुरक्षिततेचा प्रश्न सुटला. मानसोपचार तज्ञ डॉ. अनय क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने उपचार सुरु केले आहे. मानवसेवा प्रकल्पामुळे या निराधार मातेच्या आयुष्याची नवी वाट निर्माण झाल्याची भावना सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई मेढे यांनी व्यक्त केली.

*मानवसेवा प्रकल्प*

(मन व घर हरवलेल्या मानसांच हक्काच घर)

द्वारा- *श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ*

☎ (०२४१) २४२९९४२

📱 ९०११७७२२३३

वाचा -

विद्यापीठाची स्थापना व टिपूंचे ग्रंथालय....

डॉ धर्मराज सुरोसे यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड...

दुचाकी भेट - मानवसेवा...

मतदार यादीत दुरुस्तीची सरकारची विशेष मोहीम

दुचाकी भेट - मानवसेवा - MANAVSEVA PROJECT

मानवसेवा प्रकल्पाला दुचाकी गाडीची भेट

अहमदनगर -

अनेक सामाजसेवी संस्थांच्या कार्याला बळ देणारे आणि प्रेरित स्वयंसेवकांमध्ये सामाजिक विचारांची परिपक्वता निर्माण करणारे आमचे मार्गदर्शक व आधारस्तंभ मा. श्री भरतभाऊ बागरेचा यांनी आज दि.१६/११/२०२० रोजी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या *"मानवसेवा"* प्रकल्पाला (रस्त्यावरील बेघर, निराधार मनोरुग्णांचे हक्काचे घर) स्वत: वापरत असलेली दुचाकी गाडी पाडव्याच्या शुभमुहर्तावर देणगीदाखल दिली. आज ही गाडी मिळताच सर्व निराधार माता-भगिनीं व बंधुंच्या चेह-यावर आनंद पहावयास मिळाला. मानवसेवा प्रकल्पातील लाभार्थ्यांनी या गाडीची पुजा देखील केली. मा. श्री भरत भाऊ आपल्या या मदतीने संस्थेच्या कार्याला नवी ऊर्जा मिळाली. आम्ही आपले मनापासून ऋणी आहोत. 

*मानवसेवा हीच, ईश्वराची सेवा!*

🙏🙏🌹🇳🇪🌹🙏🙏

*मानवसेवा प्रकल्प*

(मन व घर हरवलेल्या मानसांच•• हक्काचे घर)

द्वारा- *श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ* 

☎ ०२४१ २४२९९४२

📱 ९०११७७२२३३

वाचा - 

अगर है शौक़े सफ़र तो हमारे साथ चलो,। नहीं है मौत का डर तो हमारे साथ चलो !

शिष्यवृत्ती परिक्षेत तन्मय आडेप राज्यात तृतीय ...

मन सुन्न करणारी घटना...!- Manavseva..

जागतिक दयाळू दिन - World Kindness Day..

मन सुन्न करणारी घटना...!- Manavseva

निराधार शोषित मनोरुग्ण मातेला १५ दिवसाच्या बाळासह 'मानवसेवेचा' आधार


अहमदनगर-

रात्रीचे दिड वाजलेले...अन् अवघ्या पंधरा दिवसांच्या बाळाला कुशीत घेऊन भेदरलेल्या अवस्थेत निराधार मनोरुग्ण महिला माका ता. नेवासा या गावात फिरत होती. दोन वर्षापासूनची तीची अवस्था बिकटच! विस्कटलेले केस...मळकटलेली साडी, तसी तिला कोणाचीच पर्वा नव्हती. काट्याकुट्यात स्वत:ची स्वत:च प्रसुती केली. ना डॉक्टर, ना दायी...आणि एका बाळाला जन्म दिला. दिड वर्षापासून रस्त्यावर फिरणा-या मातेवर काही नराधमांनी अत्याचार केले होते. याबाबत सोनई पोलीस स्टेशनचे पोलीस कॉस्ट्रेबल श्री माने, व स्थानिक ग्रामस्थांनी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांना कळवले. दिलीप गुंजाळ यांनी संस्थेच्या महिला स्वयंसेवकांच्या मदतीने निराधार मनोरुग्ण मातेची व बाळाची माहिती घेतली. निराधार मातेवर झालेल्या अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलीस स्टेशनकडून मिळताच दिलीप गुंजाळ यांनी त्या रात्री आशेने तेवत असलेल्या निराधार मातेला,पंधरा दिवसांच्या बाळासह श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या *मानवसेवा* प्रकल्पात आणुन आधार दिला. या मातेवर मानसोपचार तज्ञ डॉ. अनय क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने उपचार सुरु केले आहे. मातेला व बाळाला *मानवसेवा प्रकल्पात* दाखल करण्यासाठी मा.प्रा.अविनाश मुंडके, मा. श्री शशिकांत चंगेडे, मा.श्री संजय शिंगवी, मा. सौ.शारदा हौशिंग यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या माय-लेकराची अवस्था पाहून संस्थेच्या स्वयंसेवकांचे मन हेलावून गेले. संस्थेचे स्वयंसेवक अनिता मदणे, कोमल कांबळे, सिराज शेख, अंबादास गुंजाळ, राहुल साबळे, अशोक मदणे, सुशांत गायकवाड, प्रसाद माळी यांनी तातडीने भोजन ‌व कपडे देवून तिची व बाळाची काळजी घेत आहेत. 

*मानवसेवा हीच ईश्वर सेवा!* 

👏👏👏🌹🇳🇪🌹👏👏👏

*मानवसेवा प्रकल्प*

(मन व घर हरवलेल्या मानसांच हक्काच घर)

द्वारा- *श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ*

☎ (०२४१) २४२९९४२

📱९०११७७२२३३

वाचा -

दिपावली और बहादूर शाह जफर...

मराठवाड्यातील पहिले बॅरिस्टर- उमर कमाल फारुकी .....

जागतिक दयाळू दिन...


लायनेस क्लब च्या वतीने मानवसेवा येथे फराळ भेट - MANAVSEVA PROJECT

लायनेस क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने मानवसेवेतील माता-भगिनींना साडी चोळी व फराळ भेट



अरणगाव येथील बेघर निराधार मनोरुग्ण माता-भगिनीं व बंधुंच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या मानवसेवा प्रकल्पातील माता- भगिनींना दिवाळीनिमित्त आज दि.१०/११/२०२० रोजी लायनेस क्लबच्या वतीने साडी चोळी व फराळ देण्यात आले. समाजाप्रती प्रत्येकाला काही तरी देणे आहे. असे समजून व्यक्ती अथवा संस्थानी समाजास उपयुक्त ठरतील अशा सामाजिक कर्तव्याचा निर्वहान करण्याची जबाबदारी नैतिक दुष्टिकोनातुन स्वीकारने गरजेचे आहे. समाजातील गरजूना मदतीचा हात दिल्यास सामाजिक सलोखा निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे लायनेस क्लब ऑफ अहमदनगरच्या अध्यक्षा मा. सुरेखाताई कदम यांनी म्हटले. यावेळी लायनेस क्लब ऑफ अहमदनगर च्या सदस्या मा. शारदाताई हौशिंग, मा. शारदाताई पवार, मा.सुनंदाताई तांबे, मा.दिपालीताई आढाव, मा.सविताई शिंदे, मा. शर्मिलाताई कदम आदी उपस्थित होते. श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या स्वयंसेवक प्रसाद माळी, विकास बर्डे यांनी फराळ व मानवसेवा प्रकल्पातील माता-भगिनीसाठी साडी चोळी स्वीकारले. 

*मानवसेवा हीच ईश्वर सेवा!*

👏👏🌹🇳🇪🌹👏👏

*मानवसेवा प्रकल्प*

(मन व घर हरवलेल्या मानसांच हक्काच घर)

द्वारा- *श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ*

☎ (०२४१) २४२९९४२

📱९०११७७२२३३

मानवसेवा प्रकल्पाने दाखवली‘माणुसकी -

मानवसेवा प्रकल्पाने दाखवली‘माणुसकी’!

निराधार मानसिक विकलांग तरुणाला आधार




सुपा ता. पारनेर येथे एका निराधार मनोविकलांग तरुणामुळे भीतीचे वातावरण तयार झाले होते. केस वाढलेले, दाढी-आंघोळीचा पत्ता नाही, अवतार मळकटलेला! रस्त्यावर ही कड ते ती कड  फिरून जेवण अन्नपाणी मागणे त्यामुळे महिलांमध्ये अतिशय भितीचे वातावरण निर्माण झाले होते. काही महिलांनी सुपा पोलीस स्टेशनला कळवले. सुपा पोलीस स्टेशनचे मा. श्री संदिप चौधरी साहेब यांनी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या‘मानवसेवा’प्रकल्पाला माहिती दिली, आणि या तरुणाला दाखल करुन घेण्याबाबत विनंती केली. या निराधार मानसिक विकलांग तरुणाच्या डोळ्यातून रक्त वाहत होते, संपुर्ण शरीर मळकटले होते. अतिशय अस्वस्थ झालेल्या या तरुणाला श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ व संस्थेच्या स्वयंसेवकांनी दि. २९/१०/२०२० रोजी मानवसेवा प्रकल्पात दाखल करुन घेतले. जेवण देवून, दाढी, आंघोळ-स्वच्छ-कपडे इतकंच नाही तर त्याला मानसोपचार तज्ञ डॉ. अनय क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने उपचार सुरु केले. या तरुणावर उपचार करुन, कुटुंब शोधून पुनर्वसनही करण्यात येणार असल्याचे संस्थेचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांनी म्हटले.‘जे का रंजले गांजले, त्‍यासि म्‍हणे जो आपुले, तोचि साधु ओळखावा, देव तेथेंचिं जाणावा’या उक्‍तीचा तंतोतंत प्रत्‍यय श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे स्वयंसेवक अंबादास गुंजाळ, सिराज शेख, प्रसाद माळी, राहुल साबळे, सुशांत गायकवाड, अशोक मदणे, अनिता मदणे यांनी दाखवून दिला.

*मानवसेवा हीच ईश्वर सेवा!*

*मानवसेवा प्रकल्प*

(मन व घर हरवलेल्या माता-भगिनीं व बंधूंचे हक्काचे घर)

द्वारा- *श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ*

☎ (०२४१) २४२९९४२

📱 ९०११७७२२३३


https://janmatanchaprahar.blogspot.com/2020/10/eid-mubarak.html

https://janmatanchaprahar.blogspot.com/2020/10/manavseva.html

मानवसेवा निराधार माता - भगिनी व बंधूना मदत - MANAVSEVA

मानवसेवा प्रकल्पातील निराधार माता-भगिनीं व बंधूना एक हात मदतीचा



अहमदनगर - एक हात मदतीचा या संघटनेने सामाजिक बांधिलकी जपत दस-याच्या शुभमुहर्तावर दि. २५/१०/२०२० रोजी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पातील बेघर निराधार मनोरुग्ण माता-भगिनीं व बंधुंसाठी जीवनावश्यक वस्तु व भांडी (कप्याची ताट ४०, ग्लास ४०, चमचे ४०, मग २, भातवाढी ४, पळी ४ पाण्याचे पिंप २) स्वरूपात मदत दिली. 

एक हात मदतीचा
देईल कुणा जीवदान !
पुण्यकर्म करून बघा
लाभे तुम्हाही समाधान... 



    या उक्तीप्रमाणे एक हात मदतीचा या संघटनेचे मा. ओंकार कोकाटे, मा. निलेशजी रासकर, मा. महेशजी जोशी, मागितेश्वर दळवी, स्वप्निल गायकवाड यांनी मानवसेवेतून खरी ईश्वराची सेवा आहे आणि आपली मदत ही कोणाला तरी जीवनदान देत असते असा संदेश या मदत भावनेतून दिला. एक हात मदतीचा या संघटनेने सामाजिक भावनेतून केलेल्या या मदतीबद्दल श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांनी कृतज्ञ व्यक्त केले. 

"मानवसेवा हीच, ईश्वर सेवा!"
मानवसेवा प्रकल्प
(मन व घर हरवलेल्या मानसांच हक्काच घर)
द्वारा- श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ*

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या