Showing posts with label जग. Show all posts
Showing posts with label जग. Show all posts

साहेब - वाचवा ओ वाचवा

 


वाचवा ओ वाचवा साहेब

                  अंगावर काटा उभा करणारी एक ह्रदय द्रावक हाक आपण वेळोवेळी ऐकतो अनुभवतो कोणी पाण्यात बुडताना. जळीत प्रकरणं. अपघातग्रस्त. एखाद्या प्रकरणात संकटात सापडलेला प्रत्येक माणूस कोणाला कोणाला तरी जीवाच्या आकांताने ओरडून मदत मागतो कारणं त्याने जीवन संपताना जवळून पाहिले असते. 

               # वाचवा ओ साहेब # ही हाक आपल्या ३६ जिल्ह्यातील त्या त्या जिल्ह्याचे मायबाप म्हणजे जिल्हाधिकारी यांना दिली आहे कारण आज प्रस्थिती तशीच निर्माण झाली आहे. कारणं प्रत्येक गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये कमीत कमी वेळात जास्त पैसा. कमी श्रमात जास्त पैसा असा फंडा अमलात आणला जातो आहे. जागोजागी तयार होणा-या. राजकीय बॅंका पतसंस्था. बजाज फायनान्स. मायक्रो फायनान्स. बंधन बॅंक. बुलढाणा फायनान्स प्रत्येक गावातील प्रतिष्ठित महिला. यांना आर्थिक लालच दाखवून दहा दहा महिला गटाच्या माध्यमातून हा गोरख धंदा चालतो . एका मिनिटात आधारकार्ड वर लोन. विविध बिझनेस कंपन्या. साखळी पध्दतीने व्यवसाय बिझनेस. विविध शेती संलग्न व्यवसाय. कुक्कुटपालन शेळीपालन शेती औजारे. बि बियाणे खते विविध. जैविक खते. औषध फवारणी यामध्ये चालणारे दोन नंबर. औषध बोगसगिरी. खते बी बियाणे बोगस. असा लुटीचा प्रकार आहे  

  शासकीय योजना. यामध्ये एजंट दलाल अधिकारी व कर्मचारी यांचे मनमानी कारभार.    

              आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये जागोजागी अशी काही समाजाच्या. नावाखाली. अमुक पैसे भरा आणि तमुक तमुक वेळेत. मोठा आर्थिक लाभ घ्या. आपण सुद्धा खुळ्या सारखें व्याजाने काढून उसणेपासने करून अशा बोगस कंपन्या मध्ये अशा चोरांच्या हातात आपली कष्टाची मिळकत देतो. आणि पूर्णपणे फसतो. असे चोर तयार होतात एखाद्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये अलिशान आॅफिस घेतात अधिकारी व कर्मचारी मागेल त्या पगारावर कामाला ठेवतात. अलिशान बंगल्याची आश्वासने. अलिशान महागड्या गाडया अशी एक भुलभुलैया. तयार केली जाते आणि. पहिल्यांदा येणारे ग्राहक यांना. आर्थिक लाभ दिला जातो आणि बघता बघता यांचा चोर बाजार जोरात जोमात चालतो. अलिशान हाॅटेलमधये सेमिनार. महागड्या गिफ्ट. दिल्या जातात. प्रत्येक गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये यांचें एजंट नेमले जातात त्यांना पगार कमिशन दिल जात. सर्व काही अगदी सुरळीत चालते. समाजातील नामांकित लोक नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांचा अशा बोगसगिरी करणार्या कंपनीला वरदहस्त असतो. 

              मोठमोठ्या कंपन्या गव्हरमेंटचया असणार्या बुडाल्या काही जण पैसा देणार होते काहीजण जमीन देणार होते. तर काहिजण. नोकरी देणार होते. काहीजण गाड्या बंगले. देणार होते. काहीजण शेळया कोंबड्या अंडी. मचछिपालन. अशी विविध अमिष दाखवून आपणास लुटणारे आपल्या ध्यानात येई पर्यंत बरिच मोठी आर्थिक माया गोळा करतात आणि रातोरात पोबारा करतात.  

              परवा एक विषय आला आहे मोबाईल वर एक मॅसेज फिरत आहे २२५० रु भरा आणि ३२ लाखाचे मालक व्हा. तुम्ही मेंबर कराल तेवढे पैसे तुमहाला मिळणार. अस होत का ? आपण सुद्धा खुळ्या प्रमाणे या सर्वांच्या माग जातो आणि जाताना एकट न जाता. सगेसोयरे. मित्रपरिवार. यांना सुध्दा घेवून जातो म्हणजे बुडताना एकट न बुडता सगळी बुडू आणि चोरांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी आपणच कारणीभूत आहोत 

              सर्व जिल्हाधिकारी यांना कळकळीची विनंती आहे की आपल्या जिल्ह्यात गोरगरीब जनता सर्वसामान्य लोक. मिळेल ते काम करून अर्धपोटी उपाशी राहून आपले व आपल्या कुटुंबांचे पालनपोषण करित आहेत. आपण आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये दाखल होणारें. कोणतीही परवानगी शिवाय आपले बोगस उधोग उभे करणारे यांची माहिती. आपल्याच नव्हेतर. ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका. क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांना सुध्दा नसते. म्हणजे आपल्या गावात तालुका जिल्हा यामध्ये आपल्या बोगस उधोगाची. प्रसिद्धी प्रसार जाहिरात करण्यासाठी फिरणारे कोणाच्या परवानगीने फिरतात. त्यांना कोण परवानगी देते यासाठी मा जिल्हाधिकारी साहेब यांनी ग्रामपंचायती क्षेत्रात असा फसवा व्यवसाय करणारे यांच्यासाठी गावबंदी आदेश जारी करणे गरजेचे आहे. तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये सुद्धा बंदी आदेश काढणे गरजेचे आहे

असा कोठेही प्रकार घडत असेल त्या संबंधित आपणाकडे तक्रार आल्यास त्वरित जवळच्या पोलिस स्टेशनला आदेश देवून चौकशी करण्याचे आदेश देण्यात यावेत.   

        जनतेने कमीत कमी वेळात जास्त पैसा मिळविण्यासाठी कोणत्याही भुलभुलयाला बळी पडू नका. फसलेल्या लोकानी विविध आंदोलने केली. मोर्चे काढले. न्यायालयात धाव घेतली काहीजणांनी आत्मदहन केले. उपोषणे केली. पण अशी विविध प्रकारची आंदोलने करून सुध्दा आजपर्यंत आर्थिक लुटललेलया. लोकांना न्याय मिळालाच नाही तुम्ही मेला कोणालाच फरक पडत नाही. तुम्ही उपाशी राहीला तरी कोणाला काही फरक पडत नाही. जनता जोपर्यंत फसणार आहे तोपर्यंत फसवणारे येणारच. तुम्ही देताय म्हणून हे घेतायत. आजच तुम्ही जागा आणि दुस-याला जाग करा. 

          समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

शासकीय अधिकारी यांचेसाठी

शासकीय अधिकारी आपल्या पदांचा वापर. समाजहितासाठी करू शकतो. कोणताही शासकीय अधिकारी गोरगरीब सर्वसामान्य लोकांना आपल्या पदाच्या जोरावर. अन्याय अत्याचार करू शकत नाही

शासकीय अधिकारी व्याजाने पैसे घेवू अथवा देवू शकत नाही. 

माझा मामा काका भाऊ मित्र चुलता. जवळचा पाहुणा. शासकीय अधिकारी आहे म्हणून मी महणील तसच होईल असे कोणीही म्हणू शकत नाही

शासकीय प्रशासकीय अधिकारी. पोलिस. तहसिलदार. प्रांत. मंडलधिकारी. ग्रामसेवक. तलाठी. नायब तहसीलदार. गटविकास अधिकारी. मुख्य अधिकारी. कार्यकारी अधिकारी. पंचायत समिती विभाग. जिल्हा परिषद विभाग. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली येणारी विविध शासकीय निमशासकीय कार्यालये. अशी एक नाही अनेक शासकीय अधिकारी व कर्मचारी आपल्या व आपल्या घरच्या कोणत्याही अधिकारी व कर्मचारी यांच्या पदाच्या जोरावर शेजारी. यांना शिविगाळ करणे. दम देणें. जीवे मारण्याची धमकी देणे. दहशत गुंडगिरी. व्याजाचा व्यवसाय. आपल्या परिसरात दहशत माजविणयासारखे. कृत्य करणे. दारु पिऊन लोकांना त्रास देणारा अधिकारी व कर्मचारी. महसुल विभागात याचा गुंठा त्यांच्यात घालणारे अधिकारी. अशी एक नाही अनेक अधिकारी आपल्या पदांचा गैरवापर करून नागरिकांना त्रास देत असतात. आजच शासनाने एक शासन निर्णय जारी करण्याची गरज आहे जो कोणी अधिकारी व कर्मचारी आपल्या पदाच्या जोरावर गोरगरीब लोकांना. सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास देत असेल आणि जर त्या सर्वसामान्य माणसाने गोरगरीबाने संबंधित. शासकीय अधिकारी अधिकारी व कर्मचारी यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यास शासनाने व जिल्हाधिकारी साहेब यांनी विना चौकशी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना निलंबित करण्यात यावे आणि लोकांना संरक्षण द्यावे.

इस्लाम जगत व शिकवण: नजीर शेख Islamic Teaching


 


कॉम्रेड एम.एन रॉय यांनी आपल्या Historical Role of lslam( इस्लामचे ऐतिहासिक योगदान )या ग्रंथाच्या माध्यमातून द्वंद्वात्मक भौतिकवादी दृष्टिकोनातून इस्लामच्या राजकीय पैलूंवर प्रकाश टाकणारे विवेचन केले आहे. इस्लाम हे धर्म वेड्या व हिंसक लोकांची एक चळवळ होती व यातून त्यांना यश मिळाले असे भाष्य केले जाते व इस्लाम हा तलवारीच्या जोरावर लादला गेला आहे. असे विचार रूढ़ झाले आहेत. या मतांचे व या लबाडीचे खंडन करून इस्लामच्या वाढीसाठी कोणते घटक करणींभुत होते याची मीमांसा केली आहे. रॉय मते इस्लाम वाढी साठी समतावादी प्रेरणा कारणीभुत आहे ज्यामुळे इस्लाम जगभर पसरला आहे. 

 रॉय यांचे मूळ ग्रंथ इंग्रजीत आहेत व आपल्याकडे हे वाचले जात नाही. अलीकडे प्राध्यापक सुभाष भिंगे यांनी याचे अनुवाद केले व आज हे वाचकांना उपलब्ध आहे. रॉय हे कम्युनिस्ट व भिंगे हे ख्यातनाम लेखक यांनी हे ग्रंथ संपादित केला आहे यावरून विषयाचे गांभीर्य लक्षात येईल.रॉय यांनी हा ग्रंथ 1936 मध्ये तुरुंगात असताना लिहिला आहे मार्क्सवादी व्यक्तीने इस्लामवर लिहिणे हे अनेकांना नवल वाटेल परंतु तत्कालीन खोट्या समजुतींचा पर्दाफाश करण्यासाठी हे लिखाण लिहिणे भाग होते.

आजही इस्लाम बाबत इतर धर्मीयात गैरसमजुती आहेत ते या पुस्तकाच्या वाचनातून नक्कीच कमी होतील.

 त्याचा उद्देश इस्लामचे गोडवे गाणे नव्हे भारतीय मार्क्सवादाचे जनक असणारे एम एन रॉय यांना कोणत्या धर्माचे गुणगान करण्याची आवश्यकता नव्हती परंतु वास्तव व सत्य मांडने हे त्यांनी आपले आद्य कर्तव्य मानले व या ग्रंथाचे लेखन केले.

 

इस्लामच्या वाढीसाठी कारणीभूत इस्लामच्या वाढीच्या कारणांची चर्चा करताना ते म्हणतात की " इतरांना सामावून घेण्याची, वृत्ती विश्वव्यापक प्रेरणा, लोकशाही प्रणाली आणि इस्लामचा एकेश्वरवाद हे विचार अरबांच्या भौगोलिक परिस्थिती ने दिलेली देणगी आहे."(७५)

इस्लामच्या अनुयायांनी विजयानंतर रक्तपात व इतर धर्मियांचे धार्मिक अधिकार हिरावून घेतले व त्यांना धर्म स्वीकारला किंवा मृत्यु असे दोनच पर्याय ठेवून क्रुरतचे दर्शन दिले असे जे बोलले जाते व आजही समाजात हे विचार रुजले आहे व हे विचार खूप द्वेषाशाचे रूप धारण करते. परंतु वास्तविक असे नाही इस्लामच्या उदयाचा काळ आम्ही लक्षात घेतला असता तो काळ प्राचीन काळाचा शेवटचा भाग होतात लढाया होणे साहजिक आहे परंतु कशासाठी? व का? झाली यावर हे लक्ष देणे भाग असते.

 विजया नंतर पराभुतांना,शरणागतांना तुम्ही कोणती वागणूक देता यावरून शिकवणीचे सार लक्षात येते

 "जेरूसलम ने शरणागती पत्करल्यानंतर उमर खलिफाने पराभूत नगरवासयांची मालमत्ता पूर्ववत त्यांच्या ताब्यात दिली. त्यांना त्यांच्या उपासनेचे पूर्ण स्वातंत्र्य दिले"(८३)

 या उलट ख्रिश्चनांनी ताबा मिळवला त्यात त्यांनी कत्तल केली आहे

गिबन या जगप्रसिद्ध इतिहासकारांनी असे म्हणटले नाहीतर पुराव्यानिशी सिद्ध केले आहे की हजरत मोहम्मद पैगंबर(स) यांनी ख्रिश्चनांना व्यक्तिगत संरक्षण पुरवले होते. त्यांच्या व्यापाऱ्यांच्या संपत्तीचे संरक्षण केले त्यांना आपापल्या धर्मानुसार उपासना करण्याचे स्वातंत्र्य दिले होते.पैगंबरांचे आचरण व त्यांची शिकवण ही सबंध मानवजातीसाठी उपयुक्त होती व आहे तरी आज काल काही द्वेषपूर्ण आक्षेप घेऊन चरित्र मलीन करण्याचा प्रयत्न करीत आहेत.या प्रवृत्तिच्या लोकांना आपल्या लिखाणातून रॉय चांगलीच चपराक दिली आहे.


मी प्रेषितांना सर्वप्रथम सुधारक म्हणून पाहतो सामाजिक सुधारणेच्या दृष्टिकोनातून पाहता अशी कोणतीच कुप्रथा नाही ज्याचा विरोध केला नाही. विरोध दर्शवला नाही तर त्या प्रथेचे उच्चाटन केले. या यासंबंधी एक लेख वेगळा लिहावे लागेल. इस्लाम मध्ये केवळ धार्मिक शिकवणी नाहीं फक्त धार्मिक गोष्टींना महत्त्व दिले नसून इहलोकी व पारलौकिक जीवन यांचा अभ्यास करण्याचीही मुभा दिली आहे. आम्हाला इस्लाम मध्ये खगोलशास्त्रज्ञ व यावर चिंतन करणारेही निर्माण झाले याचा विसर आम्हाला पडू नये. आम्हा केवळ पारलौकिक स्वर्ग-नर्क धर्मग्रंथ याचाच अभ्यास करावा असे सांगत नाही. इस्लामी इहलौकीक व पारलौकिक या दोन्ही पातळीवर मानवी जीवनाची वाटचाल व्हावी असे सांगतो.इस्लामिक परंपरेत विद्वानांना व त्यांच्या विद्वत्तेला तोटा नाही. परंतु या प्रेरणा घेतल्या जात नाही आज धर्म व विज्ञान यापासून व्यक्ती दुरावला आहे. एकतर खुप अभिमान किंवा न्युंनगड आहे. 


 या जगात कुठेही जाऊन अभ्यास करावा या बुद्धीच्या व तर्काच्या आधारे निसर्गातील नवनवीन गोष्टींचा अभ्यास करावा. एकंदरीत तर्क,चिकित्सा या आधारे मानवी जीवन सफल बनवावे. प्रेषित सर्व प्रथम येथे शिक्षण घेण्यासाठी पुढे या म्हणतात. प्रेषितांनी सर्व प्रथम शिक्षणाचा संदेश दिला.

 "ग्रीकांच्या वैभवसंपन्न ज्ञानाचा वारसा अरबांनी चालवला आहे . "वैज्ञानिक संशोधनाचा पितामह रॉजर बेकन हा अरबांचा शिष्य होता, होमबॉल्ट मते अरब हेच भौतिकशास्त्राचे खरेखुरे संस्थापक होत."(११०)

इस्लामी परंपरेत तत्त्वज्ञानाची एक दीर्घ परंपरा होती. अलकाजी,अलहसन,अवेसीना,अलफराबी, अबुबकर,अलगजाली असे शेकडो नावे सांगता येतील हे तत्त्ववेते बुद्धीप्रमाण्यावादी होते त्यांनी इस्लामी परंपरेत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. इस्लामिक परंपरेत ज्ञानाच्या सर्व कक्षा खुल्या होत्या. विद्वानांना महत्त्व प्राप्त होते विद्वानांचे ही धर्म कधी विचारले जात नसेत. "मायदेशातून पलायन करून आश्रयासाठी भटकणाऱ्या     

परकीय ग्रीक विद्वानां बगदादच्या खलिफाने स्वीकार केले. त्यांच्या अश्रद्ध ज्ञानाने आणि प्रतिभेने खलिफा इतका प्रभावित झाला होता.की त्याने ना कुरान पर्याय ठेवला ना तलवारीचा. त्यांने केवळ संरक्षण नाही तर विद्वत्तेची कदर केली त्याशिवाय अनेक विद्वानांचे तत्वज्ञान अरबी भाषेत भाषांतरीत केले. बहुतांश विद्वान नास्तिक होते तरीपण त्यांनी आपला धर्म लादला नाही."( ११२)

"आधुनिक युरोपने अरबांकडून वैद्यक शास्त्र व गणिताचे ज्ञान तर घेतले सोबत निसर्गाचे ज्ञान नियम उलगडून दाखवणारे व मनुष्याची दृष्टी विशाल बनवणारे खगोलशास्त्राचे ज्ञान ही उत्साहाने निर्माण केले होते"(११९)


  गणितीय सिद्धांतांना जे मोल प्राप्त झाले त्याचे स्त्रोत अरबस्तान होते परंतु अरबांनी स्वतः होऊन त्याचे श्रेय विनम्रतापूर्वक ग्रीक तत्त्ववेताना दिले. इस्लामी परंपरेचे इतिहासात एक महत्त्वपूर्ण योगदान राहिलेले काळाच्या ओघात मुस्लिम समाजला याचा विसर पडला आहे।


---संदर्भ _इस्लामचे ऐतिहासिक योगदान

लेखक:कॉम्रेड एम.एन रॉय 

अनुवाद:प्रा.सुभाष भिंगे

    

प्रेषितांची शिकवण यावर उद्या एक दिर्घ लेख किंवा दोन लेख पोस्ट करेन आपल्या काहि सुचना असल्या कमेंट करा किंवा खालील नंबर वर फोन करा. नक्कीच विचार करेन.


©समाज साथी

Najir Shaikh         

Nanded

9561991736

आपण व पोलीसांची भूमिका - We and Police...

गिधाडे...

भूक भूक भूक -Humger Hunger...

शेख सरांचे रुपात मला विठ्ठलाचे दर्शन झाले. - संदीप दंडवते Oxygen shortage...

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या