Showing posts with label AKBAR OWASI. Show all posts
Showing posts with label AKBAR OWASI. Show all posts

उत्तर प्रदेशात आजही गुंडा राज ? डॉ परवेज अशरफी





उत्तर प्रदेशात आजही गुंडा राज ? डॉ परवेज अशरफी


अहमदनगर- उत्तर प्रदेशात निवडणुकीचा रणसंग्राम चालू असून सर्व पक्षांनी आपले उमेदवार मैदानात उतरविले आहे. त्यात हैदराबाद येथून महाराष्ट्र, बिहार चा प्रवास करत उत्तर प्रदेशात आपले पक्षाला बळकट करण्यासाठी आलेले एम आय एम ही आपली पूर्ण ताकत लावत आहे. भागीदारी परिवर्तन मोर्चाचे माद्य्यमातून उत्तर प्रदेशची जनतेला तिसरा परयाय देयासाठी एक प्रयत्न करण्यात आले आहे. मेरठ येथे आपले पक्षाचे उमेदवाराचा प्रचार करून खासदार ओवेसी आपल्या काफिल्या सोबत दिल्लीला रवाना झाले. मेरठ दिल्ली टोल नाक्यावर काही समाजकंटकने खासदार ओवेसी यांच्यावर गोळ्या झाळून हल्ला केला. त्यात ओवेसी आणी त्यांचे सहकारी बचावले. याचा निषेध पूर्ण देशात व्यक्त करण्यात येत आहे. अहमदनगर मध्ये ही एम आय एम जिल्हाध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांच्या नेतृत्वाखाली निषेध नोंदवण्यात आले.यावेळी डॉ परवेज अशरफी यांनी सांगितले की खा.ओवेसी यांच्यावर झालेला हल्ला हा खूप निंदनिय आहे. उत्तर प्रदेशात जर पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष व ४ वेळेचे खासदार सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचा काय?. या घटनेमुळे योगी सरकार जे आपले भाषणात गुंडा राज संपल्याचा दावा करत आहे ते खोटे असल्याचे दिसते. असद साहेबांची लोकप्रियता पाहून विरोधी पक्षाच्या नेतेंना आपल्या पाया खलीची जमीन सरकल्याचे दिसते. ज्या उत्तर प्रदेश मद्य्ये देशाचे गृह मंत्री आपल्या भाषणात सांगतात की बाहुबली संपले, त्याच प्रदेशात हल्ले होतात.

सरकार कडे खासदार ओवेसी आणि खासदार इम्तियाज जलील यांना हल्ले मागचा मास्टरमाईंड शोधून काढण्याची विनंती केली आहे. यावेळी एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी, जिल्हा महासचिव हाजी जावेद शेख, जिल्हा उपाध्यक्ष मुफ्ती अल्ताफ, शहर अध्यक्ष सरफराज जहागीरदार,कार्याध्यक्ष मतीन शेख, महासचिव फिरोज शेख, शहर युवा अध्यक्ष अमीर खान, महासचिव इम्रान शेख, विध्यार्थी शहर अध्यक्ष सनाउल्लाह तांबटकर, डॉ सादीक, शाह फैसल, हाफिज उमेर, आयनुल शेख, फहीम शेख, तौसीफ इनामदार, बशीर शेख, आदी. उपस्तीत होते.



आरक्षण मुस्लिमांचा अधीकार - खा. इम्तियाज जलील



आरक्षण मुस्लिमांचा अधीकार - खा. इम्तियाज जलील

२०१४ साली महाराष्ट्रातील काँग्रेस - राष्ट्रवादी सरकार ने मुस्लिमांना ५ % आरक्षण देण्याची घोषणा केली परंतु आज पर्यंत मुस्लिम आरक्षण देण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आले नाही. जेव्हा निवडणुका येत्या तेव्हा मुस्लिमांना आरक्षणाचे गाजर दाखून मत घेण्यात आले परंतु आज पर्यंत मुस्लीम आरक्षण बाबत ब्र शब्द काडण्यात कोणीही तयार नाही. मुस्लीम आरक्षण हा तर मुस्लिमांचा अधीकार असुन ते मुस्लिमांना मिळालाच पाहिजे अशे वक्तव्य एम आय एम प्रदेश अध्यक्ष तथा औरंगाबाद चे खासदार इम्तियाज जलील यांनी अहमदनगर एम आय एम टीम शी चर्चा करतांना सांगितले. २७ नोव्हेंबर रोजी मुस्लीम आरक्षण साठी पूर्ण महाराष्ट्रातून तिरंगा रॅली मुंबई पर्यंत काढण्यात येणार असून सर्वांनी ही लढाई आपली समजून तिरंगा रॅलीत शामील होण्याचे आव्हान खा. इम्तियाज जलील यांनी केले. अहमदनगर जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी आश्वासन दिले की  मुस्लीम आरक्षण साठी पूर्ण अहमदनगर जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून तिरंगा रॅलीत शामिल होणार आहे त्यासाठी आम्ही पूर्ण जिल्ह्यात जागो जागी बैठक घेत आहे व नागरिकांना मुस्लीम आरक्षणाची गरज आणि फायदे समजून सांगत आहे. खा. इम्तियाज जलील यानी पक्षाचे काम जोमाने चालू ठेवा व काही अडचण आल्यास संपर्क साधण्याचे सांगितले. यावेळी अहमदनगर एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी, जिल्हा महासचिव हाजी जावेद शेख, शिर्डी लोकसभा अध्यक्ष तोसिफ मनियार, औरंगाबाद युवा जिल्हा अध्यक्ष मुंशी पटेल, नगरसेवक कलीम बागवान, जिल्हा सह- सचिव फय्याज कुरेशी, शेवगाव तालुका अध्यक्ष युसुफ शेख, कोपरगाव तालुका अध्यक्ष जावेद पटेल, जामखेड तालुका अध्यक्ष जाकिर काजी, श्रीरामपुर तालुका अध्यक्ष शकील शेख, कर्जत तालुका अध्यक्ष डॉ अन्सार शेख, अजीज व्होरा,उबैद बागवान, राहुरी तालुका अध्यक्ष नविद बागवान, रहाता तालुकाध्यक्ष समीर बेग, श्रीरामपुर शहर अध्यक्ष शहाबाज शेख, संगमनेर शहर अध्यक्ष दानिश मिर्जा, आदी उपस्थित होते.



एम आय एम ची अहमदनगर जिल्ह्यात शानदार एंट्री - AIMIM AHMEDNAGAR MAHARASHTRA

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

एम आय एम ची अहमदनगर जिल्ह्यात शानदार एंट्री


अहमदनगर - 


पुर्ण महाराष्ट्रात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत सर्वच पक्षांनी आपले उमिदवार रिंगणात उतरवले होते. काँग्रेस राष्ट्रवादी सेना भाजप बरोबर प्रदेशातील अनेक राजकीय पक्षांनी उमेदवार दिले होते. एम आय एम ने महाराष्ट्रात आपला पक्ष मजबूत करण्यासाठी सर्व निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याने ग्रामपंचायत निवडणूकित ही एन्ट्री केली. एम आय एम पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांच्या तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील व प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असून. अहमदनगर जिल्ह्याची कमान डॉ परवेज अशरफी यांच्या हातात आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एम आय एम ने आपले ६ उमेदवार दिले होते त्यापैकी ४ उमेदवारांनी विजय नोंदविला आहे. शेवगाव व श्रीरामपूर तालुक्यात एम आय एम ने आपले उमेदवार उतरविले होते. शेवगाव तालुक्यात ५ तर श्रीरामपूर तालुक्यात १ उमेदवार देऊन एम आय एम आपली सुरुवात केली होती. त्या पैकी ३ शेवगाव मधून तर १ श्रीरामपुर तालुक्यातून निवडून आल्याने एम आय एम ने अहमदनगर जिल्ह्यात शानदार एंट्री केली असल्याचे दिसते. निवडून आलेल्या उमेदवारांना एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी अभिनंदन केले व शेवगाव तालुका अध्यक्ष युसुफ शेख आणि श्रीरामपुर तालुका अध्यक्ष शकील शेख यांचा ही अभिनंदन केले. 

ज्या प्रकारे पूर्ण देशात एम आय एम ला चांगला प्रतिसाद मिळत आहे त्याच प्रकारे ग्राम पंचायत निवडणूक पहाता एम आय एम आता गावा गावात पोहोचत असल्याचे दिसते.

निवडून आल्या नंतर एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेब, प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील साहेब, प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफ्फर कादरी साहेब यांना देताच सर्वांनी एम आय एम अहमदनगर टीमचा अभिनंदन केले.

येणाऱ्या काळात एम आय एम अहमदनगर जिल्ह्यातील होणाऱ्या नगर परिषद, नगर पालिका, जिल्हा परिषद निवडणुकी कडे आपला लक्ष केंद्रित करणार असल्याचे एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी एका पत्रकारांशी बोलतांना सांगितले.




वाचा -

ती दिवस- रात्र रस्त्यावर फिरत होती - Manavseva Project...

शिष्यवृत्ती आणि विद्यार्थी - अहमद मुंडे...

संविधान व लोकशाही विरोधी कृत्य सहन करणार नाही - हाजी इर्शादभाई , Pune...

चुकीची माहिती देऊ नका - खासदार इम्तियाज जलील AIMIM MP IMTIYAZ JALIL....

पीरजादे अब्बास सिद्दीकी: बंगालमध्ये ओवेसी बरोबर? ASAD OWAISI


 

कोलकाता

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना सत्तेत आणण्यासाठी सिंगूर आणि नंदीग्राम चळवळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या फुरफुरा शरीफ दर्गाचे पीरजादा अब्बास सिद्दीकी यांनी आता मोठा राजकीय संकेत दिला आहे. मे महिन्यात होणार्‍या पश्चिम बंगाल निवडणुकीपूर्वी अब्बास सिद्दीकी यांनी रविवारी एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांची भेट घेतली. ही बैठक पश्चिम बंगालच्या राजकारणाची एक मोठी घटना मानली जाते. फुरफुरा शरीफ हे बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील प्रसिद्ध दर्गा आहे. या दर्ग्याचा दक्षिण बंगालमध्ये विशेष हस्तक्षेप आहे. डाव्या आघाडीच्या सरकारच्या काळात या दर्ग्याच्या मदतीने ममतांनी सिंगूर आणि नंदीग्राम यासारख्या दोन मोठ्या आंदोलनांचे आयोजन केले.
पश्चिम बंगालच्या राजकारणातील 31 टक्के मतदार मुस्लिम आहेत. पीरजादे अब्बास सिद्दीकीशी संबंधित असलेल्या फुरफुरा शरीफ दर्गा हा मुस्लिम व्होट बँकेचा गेम चेंजर मानला जातो. सिद्दीकी हे बर्‍याच काळापासून ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय होते. जरी सिद्दीकी काही काळापासून ममताविरोधात निवेदने देत आहेत आणि टीएमसीचा ते उघडपणे विरोध करत आहेत तरी ओवेसी यांची भेट घेणे महत्वाचे आहे.

अलीकडेच पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढवण्याची घोषणा केल्याने सिद्दीकी यांच्याबरोबर झालेल्या भेटीत मुस्लिम मतदारांना एआयएमआयएमच्या पक्षात घेण्याचा प्रयत्न असल्याचे पाहिले जाते. मोठी गोष्ट अशी आहे की पश्चिम बंगाल सत्तेत येण्यापूर्वी जिन सिंगूर आणि नंदीग्रामच्या हालचालींमुळे ममता बॅनर्जी लोकांमध्ये लोकप्रिय होत्या, त्यांच्यात फुरफुरा शरीफ यांची मोठी भूमिका होती.


एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी रविवारी फुरफुरा शरीफ दर्गाचे पीरजादे अब्बास सिद्दीकी यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की अब्बास सिद्दीकी यांचे आम्हाला समर्थन आहे आणि ते जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य असेल. ओवैसी यांनी अब्बास सिद्दीकी आणि पिरजादे नौशाद सिद्दीकी, पिरजादे बैजीद अमीन, सबबीर गफर यांच्यासह अनेक प्रभावी नेते यांची भेट घेतली.


पीरजादे अब्बास सिद्दीकी ममता बॅनर्जी यांचे समर्थक होते. ३८ वर्षांचे पिरजादे अब्बास सिद्दीकी एकेकाळी ममता बॅनर्जींचे समर्थक होता. पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी ममता बॅनर्जी यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. ममता सरकारने मुस्लिमांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप सिद्दीकी यांनी केला आहे. फुरफुरा शरीफ दर्गाचा बंगालमधील सुमारे 100 जागांवर प्रभाव आहे. अशा परिस्थितीत निवडणुकीपूर्वी दर्गाचे पीरजादे अब्बास सिद्दीकी यांची नाराजी विकत घेणे ममतांसाठी राजकीय फायदा करणार नाही.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची एकूण २९४ विधान्जासाभाचे जागा असून यावर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीला २११ जागा, डाव्या ३३, कॉंग्रेसला ४४ आणि भाजपला केवळ ३ जागा मिळाल्या. तथापि, यानंतर, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने चमकदार कामगिरी केली. भाजपला एकूण 2 कोटी 30 लाख 28 हजार 343 मते मिळाली, तर टीएमसीला 2 कोटी 47 लाख 56 हजार 985 मते मिळाली.

एम आय एम अध्यक्ष खासदार असदुद्दिन ओवेसी आपल्या पक्षाला बळकट करण्यासाठी पूर्ण देशात समविचारी पक्षासोबत गठबंधन करत आहे. गुजरात आणी राजस्थान येती प्रभावी असलेल्या भारतीय ट्रायबल पार्टी मंजे बी.पी.टी च्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करण्यासाठी औरंगाबाद चे खासदार इम्तियाज जलील आणी एम आय एम राष्ट्रीय प्रवक्ते व माजी आमदार अड. वारीस पठाण यांना पाटवले असून गुजरात मध्ये होणाऱ्या नगर पालीका निवडणुकात एम आय एम उतरणार असल्याचे संकेत देण्यात आले आहे. https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357d

एम आय एम अध्यक्ष खासदार असदुद्दिन ओवेसी ने मद्य प्रदेश येतेही आपले प्रतिनिधी पाटवले आहे.
बिहार निवडणुकीत चांगला प्रतिसाद मिळाल्या नंतर एम आय एम ने पूर्ण देशात सक्रीय आणी पक्ष प्रत्यक राज्यात बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे.


सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या