Showing posts with label LAW. Show all posts
Showing posts with label LAW. Show all posts

मानवाधिकार संरक्षण अधिनियम १९९३ कशासाठी ?

 


मानवाधिकार संरक्षण अधिनियम १९९३ कशासाठी

                आपण समाजात राहतो आपल्याला प्रत्येकाला व्यक्ती म्हणून हक्क आणि अधिकार असे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे परंतु समाजात आपल्याबरोबर इतर व्यक्ति सुध्दा असतात आणि त्याच्याशी आपले संबंध असतात. एकाच वेळी व्यक्ती म्हणून आपल्या इच्छा आकांक्षा आणि गरजा असतात उदा अन्न वस्त्र निवारा कौटुंबिक जीवन इत्यादी आणि त्यांची पूर्तता करायची असते व समाजांचा घटक म्हणून परस्पर संबंध यांचे संगोपन करायचे आसते. यातूनच आपल्या व्यक्तिगत गुणाचा विकास होतो आणि समाज स्थिर होतो परस्परांच्या गरजा विचार परस्परांना सहकार्य.  आणि एकामेकाबधदल सहानुभूती हा सामाजिक जीवनाचा आधार आहे.  यातूनच हक्काची निर्मिती होते. हकक मानवी जीवनातील समाजशीलतेतून निर्माण होतात. एकाकी व्यक्तिला किंवा मानवी समाजापासून दूर जंगलात राहणारयाला हक्काची अधिकार यांची आवश्यकता नसते. कारण तेथे जीवन अनिर्बंध असते. तेथे व्यक्तिचे स्वातंत्र्य अमर्याद असते.  # स्वातंत्र्याला. # अर्थ नसतो. ती व्यक्ती जेव्हा दुसर्याच्या व्यक्तिच्या संपर्कात येतो तेव्हा त्यांच्या स्वातंत्र्यावर. हक्कांवर. अधिकारांवर. एकामेकांच्या समाजातील काही समाजकंटक. शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यामुळे मर्यादा पडतात त्यातूनच आपले हक्क व अधिकार त्यांच्यावरील मर्यादेची आपल्याला जाणीव लागते. 

      समाजात राहत असताना व दैनंदिन जीवन जगत असताना.  आपणं आपला समाज भयमुक्त असावा. आपल्याला आपल्या लहरी पणामुळे कोणीही शारीरिक मानसिक इजा करू शकत नाही त्याबद्दल आपल्याला संरक्षण असावे. कोणीही आपल्याला बंदि किंवा बंधनात अडकवू शकत नाही.  तसेच आपल्याला आपल्या गुणांचा विकास करण्यासाठी लिहणे.  बोलणे.  हिंडणे. फिरणे.  व्यवसाय धंदा निवडण्याचे अधिकार.  आचार विचार.   धार्मिक श्रध्दा चे स्वातंत्र्य हवे असते.  यातूनच आपण समाजपयोगी बनवू शकतो.  इतरांशी विचारांचे आदान प्रदान करू शकतो.  वेळप्रसंगी त्यांच्या मदतीला धावून जातो भयमुक्त व सभ्य जीवनासाठी असे स्वातंत्र्य. हक्क व अधिकार लोकशाही शासनव्यवस्थेत सहभागी होण्यासाठी काही वेगळ्या प्रकारचें स्वातंत्र्य लागते.  असे. स्वातंत्र्य राजेशाही किंवा हूकूमशाही असलेल्या देशातील नागरिकांना मिळत नाही.लोकशाही राज्यात व्यक्तिच्या हक्काच्या प्रश्न अंत्यंत महत्वाचा असतो लोकशाहीचे यशापयश त्या राज्यातील लोकांना किती स्वातंत्र्य आहे. यावर अवलंबून असते.  ही लोकशाही राज्यात राज्याची खरी निशाणी आहे.  म्हणून प्रत्येक लोकशाही राज्यात व्यक्तिला स्वातंत्र्याचा उपभोग घेता येईल. दहशतवाद नक्षलवाद गुंडगिरी यापासून भयमुक्त असे वातावरण निर्माण करणे आणि राज्याची सुरक्षितता व स्थैर्य कायम राहील या दोन्ही गोष्टींत संतुलन साधने महत्त्वाचे असते आणि उदिष्ट साध्य करण्यासाठी लोकांना हक्क व अधिकार द्यावे लागतात 

            समाजात अनेक प्रकारचें गट असतांत धार्मिक वांशिक. भाषिक. अशा स्वरुपाचे त्यांचे अस्तित्व असते. यातील काही गट बहुसंख्यांक.   असतांत.  तर काहीची सामूहिक शक्ति. संख्याबळ.  मर्यादित असते.  ते अल्पसंख्याक असतात. यांच्यातील संघर्ष अल्पसंख्याक गटातील व्यक्तिंना त्यांच्या मर्यादित शकतिमुळे. विशेष संरक्षणाची गरज भासते आणि त्याची जबाबदारी मानवाधिकार आयोग घेत असतो. आणि दुसर्या बाजूला राज्यावर येवून पडते. राज्य आणि मानवाधिकार आयोग अल्पसंख्याक गोरगरीब सर्वसामान्य व्यक्तिंना हक्क व अधिकार स्पष्ट करून त्यांना संरक्षण देते.  म्हणजेच राज्य या ठिकाणी अल्पसंख्याकांच्या मनांत सुरक्षिततेची भावना निर्माण करते. अलिकडच्या काळात बहुतेक सर्व राज्यांमध्ये व्यक्तिला मिळणार या निवडक हक्क व अधिकार स्पष्ट निर्देश संविधानात केलेला आढळतो.  ही हक्कांची निवड तत्कालीन परिस्थितीच्या संदर्भात निर्माण होणारें प्रश्न त्या त्या ठिकाणी काम करणारे मानवाधिकार आयोग स्थापन करण्यात आला आहे. त्या हक्क व अधिकार यांना न्याय मिळवून देण्यासाठी किंवा तशी ऐपत असणारा आयोग म्हणजे मानवाधिकार आयोग होय. लोकांच्या मागण्या व राज्याची गरज यांसारख्या घटकांवर अवलंबून असते त्यालाच मूलभूत हक्क व अधिकार असे म्हणले जाते. 

      * व्यक्तिच्या वैयक्तिक इच्छा आकांक्षा सुरक्षित

* राज्याचे. स्थैर्य आणि सुरक्षितता

* व्यक्तिच्या जीवनातील राज्याच्या अनावश्यक हसतक्षेपाला प्रतिबंध आणि

* लोकशाही व्यवस्थेत सर्वांनी विकासाची समान संधी व स्वातंत्र्य

* समतेचा हक्क * स्वातंत्र्याचा हक्क *शोषणाविरुद्ध हक्क * शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क*. सवैधानिक उपाययोजना हक्क *वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क व अधिकार * राजकीय हकक. * पर्यावरण * आरोग्य *विज्ञान व तंत्रज्ञान* दलित आणि आदिवासी भटके विमुक्त *शेतमजूर अल्पभूधारक मजूर* ‌लघुउधोग पाणीपुरवठा पाणी वाटप * गृहनिर्माण संस्था * महिला अत्याचार निवारण समिती * नागरि ग्राहक संरक्षण* व्यसनमुक्ती* कायदा आणि सुव्यवस्था * बालकल्याण* अनाथ आणि अपंग पुनर्वसन* धरणग्रस्त व इतर विस्थापित पुनर्वसन * साक्षरता प्रसार * बांधिल मजूरांचे पुनर्वसन * लोककला. * अंधश्रद्धेला आळा *दहशतवाद नक्षलवाद गुन्हेगारी गुंडगिरी *अशा विविध परसथितीला गोरगरीब जनता सर्वसामान्य लोक यांना तोंड द्यावे लागते. 

       मानवाधिकार आयोग स्थापन करण्या मागचा उद्देश आपल्या ध्यानात आला असेल. माणसाच्या मनातील आपल्या हकक अधिकार यांना जाग करण्यासाठी अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी. मानवाधिकार आयोग स्थापन करण्यात आला आहे 

          आज विविध शासकीय निमशासकीय कार्यालयात चालणारे काम आपणांस तपासणी पडताळणी करण्याचा अधिकार आहे.  सर्वत्र चालणारा भ्रष्टाचार. लोकची होणारी आर्थिक मानसिक सामाजिक धार्मिक लुट. यासाठी जनजागृती संबोधन प्रबोधन करण्यासाठी. आज सक्षम समाज प्रतिनिधी यांची आपणांस गरज आहे. 

* महिला घरेलु अत्याचार. * छेडछाड प्रकरणं *. अर्वाच्च बोलन लज्जा उत्पन्न होण्यासारखे कृत्य करणे *अश्लिल चाळे हावभाव करणे. कामाच्या ठिकाणी होणारे महिला व बालकामगार यांचें शोषण अशा विविध अडचणींवर मात करण्यासाठी आजच मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल करा

          शासकीय अधिकारी व कर्मचारी शासन पगार असूनसुद्धा लाचेची मागणी करत असेल तर.  विनाकारण कामात वेळ लावणे.  कामात टाळाटाळ करणे.  व्यवस्थित न बोलणे.   कामाच्या वेळेत मोबाईल व्यस्त असणे. यासाठी आपण लेखी स्वरूपात तक्रार मानवाधिकार आयोगाकडे दाखल करू शकता

         रेश़न दुकानदार दादागिरी.  पुरवठा अधिकारी व कर्मचारी नविन रेशनकार्ड काढणे. नाव कमी करणे नाव वाढविणे अन्न सुरक्षा योजनेचं सहभागी करणे. जुने फाटलेली शिधापत्रिका बदलून देणे. रेशनकार्ड वरिल मयत व्यक्तिची नावे कमी करणे. यासाठी पुरवठा विभागाच्या नागरि सनदेमधये विहित कालावधी ठरवून दिला आहे त्या कालावधीत आपले काम पुरवठा अधिकारी व कर्मचारी करत नसेल तर आपण आपली तक्रार मानवाधिकार आयोगाकडे दाखल करू शकता. शासकीय गोदाम मध्ये येणारा अन्न धान्य साठा त्याची ठेवण साठवण आणि संरक्षण कशाप्रकारे केले जाते हे जाणून घेणे यासाठी मानवाधिकार आयोग आपणास मदत करिल

             दवाखान्यात आज मोठा भ्रष्टाचार आहे तो म्हणजे डॉ यांची मनमानी फी.  मनमानी औषधाची किंमत.  रुग्ण हक्क सनद न लावणे.  औषध उपचार पद्धती आणि त्यासाठी दरपत्रक न लावणे.   उपचार पद्धती निवडण्याचा अधिकार नाही.  अशा विविध मागण्यासाठी व आपली जीवनाची कमाई लुटणारे डॉ यांच्याविरुद्ध लढण्यासाठी आपणांस मदत करतो तो म्हणजे मानवाधिकार आयोग होय

              बांधकाम कामगार नोंदणी मध्ये. जास्त पैसे घेणे.  कामगारांच्या योजनेच्या            लाभातून मोठा आर्थिक हिस्सा काढून घेणे. बांधकाम कामगार यांना धमकावने.   मारण्याची भिती घालणे.  कामांवर बांधकाम कामगार यांना सुरक्षा साहित्य नसणे.  अपघातग्रस्त बांधकाम कामगार यांना पोलीस केस करण्यापासून लांब ठेवणे वेळ पडल्यास माराहान करणे.   महिला कामगारांना हिन वागणूक देणे.  अंगावर पैसे आहेत म्हणून बांधून ठेवणे बंदी बनविने.  अशा विविध बांधकाम कामगार अडचणींवर व प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी आपणांस शस्त्र मिळाले आहे ते म्हणजे मानवाधिकार आयोग होय 

              समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

मुस्लिम वारस नियम - मुस्लिम Law part १

  


मुस्लिम वारस नियम
               मुस्लिम Law part १

मुस्लिम कायदा हा मुस्लिम धर्मियांचा व्यक्तिगत कायदा असून तो जगभरातील धर्मियांसाठी लागू आहे. मुस्लिम कायद्याचे मूळ पुढील चार तत्वावर आधारित आहे. (१) कुराण (२) सुनना. (३) इजमा (४) कियास. याशिवाय इतिहासन, इतिलाह, रुढी परंपरा कायदे हि दुय्यम दर्जाची स्त्रोत आहे 


      ‌. मुस्लिम कायद्यानुसार मुस्लिम समाजात प्रामुख्याने दोन शाखा आहेत. त्यासुद्धा मुस्लिम बांधवांनी आप आपल्या सोयीनुसार केल्या आहेत. (१) शिया. (२) सुन्नी. 


                     मुस्लिम समाजात लग्न निकाह, घटस्फोट तलाक., मेहर मंजे लग्नाआधी नवरदेवाने नवर्या मुलीला देण्याची रक्कम बक्षीस पत्र, हिबा मृत्यू पत्र. वसियतनामा, वारसा हक्क, पालनपोषण हक्क, अज्ञान पालकत्व, वफत आदी सर्व बाबी मुस्लिम कायधयांनवये पार पाडल्या जातात. 


      ‌. ब्रिटिश राजवटीत मुस्लिमांसाठी काही कायदे केले गेले त्यातील शरियत ॲक्ट १९३७ ‌हा महत्वाचा कायदा आहे 


            शरियत ॲक्ट हा. ७ आक्टेबर १९३७ रोजी अमलात आला याचा मुस्लिम धर्मियांचा व्यक्तिगत कायदा असे म्हणले जाते. या कायद्यातील कलम २ अन्वये. रुढी परंपरा विरुद्ध असली तरी शेत जमीन सोडून इतर अन्य बाबी जसे वारसा हक्क. सत्रिची विशेष संपत्तीी, निकाह. तलाक. उदरनिर्वाह. मेहर. पालकत्व. बक्षीस. न्यास मालमत्ता. वफत या सर्व बाबी मुस्लिम व्यक्तिगत कायद्यान्वये ठरविले जातात. त्यासाठी अटि म्हणजे (१) व्यक्ति मुसलमान असावी. (२) भारतीय करार कायद्यातील कलम ११ अन्वये व्यक्ती करार करण्यास सक्षम असावी. (३) हा कायदा ज्या प्रदेशात लागू पडतो त्या प्रदेशातील रहिवासी असावी. 


                हिंदू उत्तराधिकार. अधिनियम १९५६ चे तरतुदी मुस्लिम धर्मियांना लागू होत नाहीत. त्यांच्या मिळकतीचे वारस मुस्लिम व्यक्तिगत. पर्सनल लॉ. कायद्यातील तरतुदी प्रमाणे ठरविले जाते. मुस्लिमांच्या वैयक्तिक कायद्याप्रमाणे हनाफि सुन्नी आणि शिया अशा दोन्ही पंथाचे वारस कायदे वेगवेगळे नियम आहेत 


                मुस्लिम वारसा हक्क कायदा. (१) पवित्र कुराण. (२) सुन्नी प्रेषिताला मानणारे (३) इझमा एका ठराविक मुद्द्यावर निर्णय घेताना समाजातील सुशिक्षित लोकाचा विचार घेणारे (४) किया देवाने जे चांगले आणि योग्य ठरवून दिले आहे त्याच सामाजिक आर्थिक मानसिक सुधारणा करणारे. 


          मुस्लिम व्यक्तिगत कायद्याप्रमाणे वारसा विषयक सर्वसाधारण नियम करण्यात आले आहेत. 


         . अमान्य संकल्पना. इंग्रजी कायद्यात असलेला #. स्थावर मालमत्ता संपत्ती # व जंगम मालमत्ता संपत्ती. असा भेद मुस्लिम कायद्यात केला जात नाही हिंदू कायद्यामध्ये असलेला. #. वडिलोपार्जित संपत्ती # आणि स्व संपादित संपत्ती असा भेद मुस्लिम कायद्यात नसतो. मुस्लिम कायद्यात संयुक्त किंवा एकत्र कुटुंब ही संकल्पना नसते. मुस्लिम व्यक्तिची सर्व मालमत्ता त्यांच्या एकट्याच्या मालकिची असते. व तो मृत झाल्यावर तिच्या वारसदार यांचेकडे हिशयाप्रमाणे प्रक्रांत होते. मुस्लिम कायद्याला#. जन्मसिद्ध अधिकार. # मान्य नाही मुसलमान व्यक्तिचा वारसधिकार पूरवसवामीचया मृत्यू नंतरचं होतो. पूर्व स्वामी जीवंत असताना केवळ जन्मामुळे कोणालाही वडिलोपार्जित संपत्तीत काहीही हितसंबंध निर्माण होऊ शकत नाही. तसेच कोणी हस्तांतर केले तर ते बेकायदेशीर ठरते. मुस्लिम कायद्याला प्रतिनिधित्व मान्य नाही. मात्र याबाबतीत शिया आणि सुन्नी यांच्या नियमात फरक आहे. वारस मृत्यू वेळी ठरतात.  


             वारसाधिकार. मुस्लिम कायद्यानुसार महिलांना वारसा अधिकार नसतो. मात्र नात्यांच्या दृष्टीने एकाच स्तरावरील महिला व पुरुषाला. महिलेपेक्षा दुप्पट हिस्सा मिळतो. अनौरस संततीला वडिलांचा हिस्सा मिळत नाही. पण आईचा मिळतो. मनुष्य वध करणार्या व्यक्तिला वारसाधिकार मिळत नाही


            हनाफी ( सुन्नी ) वारसा नियम. नुसार. मुस्लिम कायद्यानुसार वारसदाराचे सात वर्ग करण्यात आले आहे त्यापैकी तीन वर्ग प्रमुख असून चार दुय्यम वर्ग आहेत 


            वारसाचे सात वर्ग. हनाफी नियमानुसार वारसाचे सात वर्ग आहेत तिन प्रमुख वर्ग. (१) हिस्सेदार. (२) अवशिषटग्राही. (३) दुरचे नातेवाईक या तीन वर्गामध्ये. गोत्रज. असोत किंवा भिन्न गोत्रज. असे मृतांचे सर्व रक्त संबंधी नातेवाईक त्यांच्या निवाय नवरा बायको ही विवाहाने नातेवाईक झालेली वयकतिही येते. वरिल तीन वर्गात कोणी वारस नसल्यास अपवाद म्हणून दुय्यम वारसदार उत्तराधिकारी होतात


चार. दुय्यम वर्ग. (४) संविदा निर्मित उत्तराधिकारी (५) अभिसवीकृत. नातेवाईक. (६) एकमेव उततरदानग्राही. ( ७) वरील ४ ते ६ यांच्या अभावी सरकार.


          तीन प्रमुख वर्ग या वर्गामध्ये मृतांचे काही निकटचे नातेवाईक येतात. त्यांना पवित्र कुराण विनिर्दिष्ट हिस्सा देण्यात आला आहे. म्हणून त्यांना प्रमुख वारसदार म्हणतात नवरा बायको हे विवाहसंबधाने नातेवाईक धरून हिससेदारांचा संखया बारा आहे 


      माहिती उद्याच्या मॅसेज मध्ये


समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी


बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर


रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा


रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा


मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा


माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा


संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे


९८९०८२५८५९

कायदा माझ्या भारतीय घटनेचा -

कायदा माझ्या भारतीय घटनेचा



                राज्य घटनेने आपणास विविध स्वातंत्र्य हक्क व अधिकार दिले तसेच त्यासाठी कायदेशीर तरतूद सुध्दा करण्यात आली आहे

कलम (१) कायद्याचे नाव

कलम (२) भारतात केलेल्या अपराधास शिक्षा

कलम (३) भारताच्या बाहेरील हददित केलेलें अपराध

कलम (४) परमुलकी अपराधास हा कायदा लागू

कलम (५) अमुक कायद्यास हा अधिनियम लागू नाही

कलम (६) ह्या कायद्यातील लक्षणास अपवाद

कलम (७) अर्थ पूर्ण शब्द

कलम (८) लिंग

कलम (९) वचन

कलम (१०) पुरुष आणि स्त्री शब्दाचा अर्थ

कलम (११) मनुष्य

कलम (१२) साधारण सर्व लोक

कलम (१३) हुकुमशाही व राजेशाही रद्द

कलम (१४) शासकीय सेवक

कलम (१५) रद्द

कलम (१६) रद्द

कलम (१७) सरकार

कलम (१८) भारत

कलम (१९) न्यायाधीश

कलम (२०) न्यायाचे कोर्ट

कलम (२१) लोकसेवक

कलम (२२) जंगल मालमत्ता

कलम (२३) गैरलाभ /गैरहानी

कलम (२४) लबाडीने

कलम (२५) कपटाने

कलम (२६) समजण्यास कारण

कलम (२७) बायको

कलम (२८) नकली पदार्थ

कलम (२९) (अ) विदूत नोंदी

कलम (३०) मुलयवान रोखा

कलम (३१) मृत्यू लेख

कलम (३२) कृत्याचया करण्यास /वरजनास लागू

कलम (३३) कृती आकृती

कलम (३४) सामायिक इरादा

कलम (३५) गुन्हा करण्याच्या इराधान कृत्य

कलम (३६) अंशतः समजून कृत्य

कलम (३७) अपराध्यांना सामील होणे

कलम (३८) अपराधाचा दोष येणे

कलम (३९) अपारकशीने / इजापूरवक

कलम (४०) अपराध

कलम (४१) विशेष कायदा

कलम (४२) सथलविशेषाचा कायदा

कलम (४३) गैरफायदा कायद्याने करणे पात्र

कलम (४४) क्षती / हाणी

कलम (४५) जीव

कलम (४६) मरण

कलम (४७) प्राणी

कलम (४८) नाव

कलम (४९) वर्ष

कलम (५०) कलम

कलम (५१) शपथ

कलम (५२) इनामाने / शुध्द हेतूने 

कलम (५२) अ आसरा देणे आश्रय अपवाद 

कलम (७६) कायदेशीर बांधिलकी असलेल्या व्यक्तिने तथ्य विषयक चुकभुलीमुळे केलेले कृती

कलम (८२) सात वर्ष वयाखालील बालकाने केलेला गुन्हा कृती

कलम (८३) सात वर्षांच्या वरिल व बारा वर्षां खालील अपरिपक्व व समजशकति असलेल्या बालकाने केलेलीं कृती

कलम (८४) वेड्या मनुष्याने केलेले कृत्य

कलम (९०) भीतीमुळे दिलेली संमती

कलम (९६) खासगी रित्या बचाव करण्याचा ओघात

कलम (९७) शरिर व मालमत्तेचा खासगी रित्या बचाव करण्याचा हक्क

कलम (१००) शरिराचा खासगी रित्या बचाव करण्याचा हक्क हा मृत्यू घडवून आणणयाइतपत केंव्हा व्यापक असतो

कलम (१०१) असा हक्क मृत्यू हून अन्य अपाय करण्याइतपत केंव्हा व्यापक असतो

कलम (१०२) शरिराचा खासगी रित्या बचाव करण्याचा हक्क सुरू हेणे व चालू राहणे

   सहाय्य करण्याविषयी

कलम (१०७) एखादा गुन्हा करण्यासाठी सहाय्य करणे

कलम (१०८) अप्रेरक

कलम (१०९) अप्रेरकामुळे परिणामतः

कलम (११४) अपराधावेळी सहाय्य करणारा जवळ असणे

कलम (१४१) बेकायदेशीर जमाव

कलम (१४२) बेकायदेशीर जमावाचा घटक असणे

कलम (१४३) शिक्षा

कलम (१४४) प्राणघातक हतयारासह बेकादेशीर जमावात सामिल होणे

कलम (१४५) बेकायदेशीर जमावाला पांगविण्याचा आदेश झाल्याने माहिती असूनही सामील होणे

कलम (१४६) दंगा भरणे

कलम (१४७) दंगा करण्याबद्दल शिक्षा

कलम (१४९) विधिनियूकत जबाबदारी

कलम ((१५१) पाच किंवा अधिक व्यक्तिंना पांगविणयाचा आदेश मिळाल्यानंतर जाणिवपूर्वक थांबून राहणे

कलम (१५३) अ धर्म. वंश. जन्म. निवास. भाषा. ई 

         वरील सर्व कायदे कलम आपणासाठी घटनेत लिहून ठेवली आहेत तरि सुध्दा आज खून मारामाऱ्या. अपहरण बलात्कार. कौटुंबिक हिंसाचार. या घटनात वाढ होतच आहे

  संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

९८९०८२५८५९

वरील प्रमाणे समाजसेवा उठाव बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार व प्रसार वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी विविध गाव तालुका जिल्हा राज्य देश यातून पदाधिकारी नेमणे आहे तरी इच्छुक व्यक्ति तरुण यांनी खालील नंबरवर संपर्क साधावा

माहिती अधिकार

पत्र दाखल केल्यापासून ३० दिवसांच्या आत उत्तर देणे बंधनकारक आहे





वाचा - 

अन्न धान्य वितरण आणि कायदा - FOOD ...

लूट आणि फक्त लूट - अहमद मुंडे ...

खाद्य तेलावर अन्न प्रशासन ची धाड- FDA MUMBAI

दफ्तर दिरंगाई कायदा 2006 - ...

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या