Showing posts with label राज्य. Show all posts
Showing posts with label राज्य. Show all posts

खराटा - देश घाणीपासून मुक्त करण्यासाठी वापरलेले जाणारे प्रभावी शस्त्र म्हणजे खराटा

 


खराटा खराटा

                  आपल्या रोजच्या जीवनात सर्वांना परिचयाचा असणारा शब्द आहे की जो आपले घर अंगण परिसर गाव तालुका जिल्हा राज्य देश घाणीपासून मुक्त करण्यासाठी वापरलेले जाणारे प्रभावी शस्त्र म्हणजे खराटा होय फक्त फोटोसाठी खराटा हातात घेणारे नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांनी ढोंग बंद करा 

            गौतम बुद्धापासून. गाडगेबाबा पर्यंत किंवा महात्मा फुले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यापर्यंत पाहिले तर समाज विकासासाठी काम करणारे ही लोकं माणसांना समाजाच्या जाचापासून जावे लागले. त्यांना स्वच्छता महत्व समाजावून सांगण्यासाठी लोकानी अंगावर शेण टाकले. शिव्या घातल्या. चांगल्या कामाची आधी उपेक्षा करावी नंतर विरोध करावा आणि शेवटी स्वीकार करावा अशी समाजातील रित आहे स्वच्छता म्हणजे प्रसन्नता. स्वच्छता म्हणजे पवित्रता. स्वच्छता म्हणजे समाधान. स्वच्छता म्हणजे आनंद. स्वच्छता म्हणजे प्रगती स्वच्छता म्हणजे स्वावलंबन. स्वच्छता म्हणजे सरवोधदार. स्वच्छता म्हणजे# स्व कडून #पर # कडे जाण्याचा मार्ग. स्वच्छता म्हणजे प्रदुषण पासून मुक्तता. स्वच्छता म्हणजे पर्यावरणास पर्याय. स्वच्छता म्हणजे आरोग्य. स्वच्छता म्हणजे स्वच्छता. आणि स्वच्छता म्हणजे सर्वोदय. या विचारसुत्राचा कृतिशील सुंदर आविष्कार म्हणजे. गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान

          स्वच्छता म्हणजे मानवी जीवनाचा आधारस्तंभ आहे. अन्न. हवा आणि पाणी शुध्द स्वरूपात मिळणे हा उत्तम जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. अस्वच्छतेमुळे अन्न हवा पाणी दुषित होते त्यामुळे अनेक साथीचे आजार रोगांना निमंत्रण मिळते. आजारपण वाढते. आजारपणाची कैद माणसाला असह्य होते. या कैदेतून सुटका करण्यासाठी पैसा अडका कमी पडल्यास मृत्यू अटळ. जगणे संपते. अनमोल जीवन संपते. उरते ते फक्त दुःख. मानवाने जीवनातील हे दुःख ओळखले पाहिजे. मानवी जीवनात स्वच्छतेचा # निर्मळ झरा # निर्माण केला पाहिजे निर्मळ तेच्या मंत्राने लोकांचे मन परिवर्तन केले पाहिजे. सर्वांच्या हदयाची दारे खुली करून त्यात निर्मळ तेचे झरे सोडणे गरजेचे आहे. एका अक्षरशुनय माणसाच्या हातातील खराटा हजारों माणसाच्या मनात #. स्वच्छतेचा नंदादीप # लावू शकतो तो तेवत ठेवू शकतो. ही शब्दावली समाजसेवक यांनाच शोभून दिसते. ही बिरुदावली बाबांच्या बाबतींत खरी वाटते लोकसेवेसाठी आपले पूर्ण जीवनाची होळी करणारे समाजसेवक पाहिजेत. आपल्या हाती. # स्वच्छतेचा कंदील # घेवून सर्वांना स्वच्छतेचा उजेड दाखविणे गरजेचे आहे समाजसेवक यांनी व आपण हातात खराटा घेऊन सार्वजनिक स्वच्छता केली म्हणजे श्रमशक्तीचे संस्कृतींचे उदात्तीकरण केले पाहिजे. स्वच्छतेला परमेश्वर महणा किंवा परमेश्वराला स्वच्छता म्हणा अशा या प्रमेयात अडकून न पडता स्वच्छता करण्याचा कामांचा आजच पुढाकार घेऊन स्वच्छतेला परमेश्वर माणने गरजेचे आहे. हातातली खराटा हा आपल्या श्रमसंसकृतीवर साचलेली धुळ नष्ट करण्याचे साधनं आहे. महारोगयानी केलेली शारीरिक स्वच्छता हा तर श्रम संस्कृतीचा एक पाठपुरावाच असतो

            आपणच आपल्या महाराष्ट्रात स्वच्छतेचे आंदोलन निर्माण करणे गरजेचे आहे त्यामुळे खेडोपाडी # स्वच्छतेचे वारे # वाहू लागेल. लोकमत जागे करा. लोकांना सज्ञानी करा. लोकांना नम्रता शिकवा. लोकांना आरोग्य संपन्न बनविण्याचे काम करा. लोकांच्या मनात चैतन्य फुलवा. लोकांची प्रगती साधा. लोकमत सदैव प्रफुल्ल ठेवण्यास मदत करा. यासाठी आपणास उपयोगी पडणार म्हणजे खराटा. विषमतेकडून सत्तेकडे. विसंवादाकडून संवादाकडे. जनतेकडून चैतन्य कडे. विघातकाकडून. विधयाकडे. उदासिनतेकडून उतसहाकडे. विफलतेकडून सफलतेकडे. विवदेषाकडून विनयाकडे. अचेतनाकडून सचतेनाकडे. विनाशाकडून विकासाकडे. नैरेशयाकडून आनंदाकडे आणि दवैताकडून अदवैताकडे घेवून जाणारे एक सबल साधनं म्हणजे खराटा होय 

              खराटा हा केवळ घर गाव रस्ते स्वच्छ करणारा नाही तो माणसांची मने स्वच्छ करणारा खराटा होय खराटा बाह्य सवचछतेकडून आंतरसवचछतेकडे नेणारा मार्ग म्हणजे खराटा होय. दिन दुःखी. दलित वंचित आणि शोषित माणसें पाहिली अवकाशात सोडलेल्या बिन दोरिचया पंतगाप्रमाणे समुद्रात वार्यावर सोडलेल्या होडीसारखी ही माणसें होती अशी माणस पाहिली की मनाला अस्वस्थ होत. आपल मन मेनबतती सारखें पागळून जाते. अशा तळागाळातील लोकांना कोणीच वाली नाही हे पाहून मन घायाळ झाले आहे. घरात. दारात आणि गावांत स्वच्छतेची नितांत गरज आहे स्वच्छता ही आपल्या जीवनाची गुरुकिल्ली आहे. सवचछतेशिवाय. घर दार आणि गाव कोंडवाडा सारखे होईल म्हणजे अनेक दिवसांची मुलखाची घाण. जिथे घाण तिथं रोगराई. जिथे रोगराई तिथे मृत्युला आमंत्रण. हे ओळखून स्वच्छता आपला परम धर्म शिरोधार्य मानले पाहिजे

              स्वच्छता करणारा अंगावरील चिंध्या घ्या अंगरखा हे गरिबांचे प्रतिक हातातील खराटा हे सामाजिक स्वच्छतेचे प्रतीक आहे. हे जीवन क्षणभंगुर आहे बांगडी आणि कवडी हे फाटक्या संसाराचे प्रतिक आहे. जसा खराटा स्वच्छतेवर वार आहे तसा काठी समाजाच्या दंभावर. ढोंगावर कर्मकांडावर. अन्यायावर. अहंकारावर. भ्रष्टाचारावर. दुरगुणावर. भोंदूगिरी वर. व्यसनाधीनतेवर अंधश्रद्धैवर हिंसाचारावर. अज्ञानावर. दैववादावर. आणि दुराचारी वर कठोर प्रहार करणारी काठी आहे. स्वच्छता. आरोग्य. ज्ञान. संपत्ती. त्याग. सेवा. काटकसर. साधेपणा आणि असंग्रह वृतीची आठवण करून देणारा खराटा होय. म्हणजे लोकजीवनात आनंदाचे वातावरण अंगण निर्माण करणारा खराटा आहे. गोरगरीब सुखी आणि समृद्ध संपन्न जीवनासाठी अहोरात्र राबणारा खराटा होय. दुःख. दैन्य. आतरता. व्याकुळता. घायाळता. आणि अस्वच्छता. दुखमय जीवनात सुखाची दिवाळी करण्यासाठी खराटया सारखा दुसरा धर्म नाही

          स्वच्छता ही आयुष्भर माणुसकीच्या आराधनेत रमली आहे. आपल्या त्यागाने. प्रेमाणे आणि सेवेने समाजाची दुखणी सुखद करण्याची गरज आहे. त्यासाठी समाजाच्या अंगणापरयणत खराटा नेणे गरजेचे आहे. खराटा अंधश्रद्धा अंधार नषट करतो. समाजातील विषमता. पाखंडता. कर्मकांड. मूढता. नष्ट केली. समता प्रेम बंधुता बंधुभाव न्याय सदाचार. सौजन्य. सामाजयशी शिकवन. असा खराटा होय 

            समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रूग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

पंचायत राज्य -A.M

 पंचायत राज्य



                 विसाव्या शतकातील लोकशाही ही सहभागी लोकशाही आहे ते जनते बरोबरचे शासन आहे लोकशाही व्यवस्थेत विकेंद्रीकरण अभिप्रेत असते भारतासारख्या खंडप्राय देशात तर त्याची नितांत आवश्यकता आहे राज्य घटनेतील तरतुदीनुसार भारत एक राज्य संघराज्य आहे हा देश बहुभाषिक बहुप्रांत. बहू धार्मिक आहे या देशातील लोकांमध्ये प्रंचड भिननता आहे केंद्र सरकार हे प्रभावी सरकार आहे भारतीय संघ राज्य यांना त्या तुलनेत कमी अधिकार आहेत लोकांना राज्य कारभारात सहभागी होता यावे यासाठी १९६२ साली पहिल्यांदा पंचायत राज्य प्रयोग राबविण्यात आला तसेच पंचायत राज्य सुरळीत चालावे म्हणून संसदेने ७३ वी घटनादुरुस्ती समंत केली सत्ता विकेंद्रीकरण हि प्रथा आपल्याकडे ब्रिटिश काळात आली  १८८२ मध्ये लाॅरड रिपीन काळात स्थानिक स्वराज्य संस्था कायदा लागू करण्यात आला तो कायदा आजच्या इतका विकसित झाला नव्हता स्थानिक प्रश्न जनतेने स्वता सहभागी होऊन सोडवावेत हा पंचायत राज्य यांचा मूळ उद्देश आहे लोकशाही शासन पध्दतीत तळागाळातील लोकांना शासन चालविता आले पाहिजे लोकशाही विकेंद्रीकरण आपल्यात आले कुठून  लोकशाही विकेंद्रीकरण मांडताना पंचायत राज्य व्यवस्थेचा जो प्रयोग करण्यात आला त्याचा विचार करते आवश्यक आहे राज्य कारभारात जनतेचा सहभाग असावा जनतेनेच स्थानिक प्रश्न स्थानिक पातळीवर सोडविण्याचा प्रयत्न करावा ह्या उद्देशाने पंचायत राज्य हि संकल्पना अमलात आणली होती भारतीय समाजाला टोळी. जाती आणि गाव पंचायतीचा फार मोठा वारसा आहे भारतीय समाजाची हजारो वर्षांची व्यवस्था हि ग्रामीण पंचायत राज्यामुळे टिकून आहे त्याचे काही दुष्परिणामही झाले उदा भारतीय समाजात जातीव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी पंचायत व्यवस्थेची मदत झाली समाजात विषमता टिकवून ठेवण्यासाठी देखील पंचायत राज्य व्यवस्था मोठी कारणीभूत आहे ब्रिटिश काळात लारड रिपनचया अमदनीत स्थानिक स्वराज्य पंचायत राज्य यांचा उदय झाला प्राचीन पंचायत व्यवस्था देखील टिकून होती देशात काही प्रांतांमध्ये अजूनही अनेक जाती जमाती यांच्या जात पंचायती बोलविणयाची प्रथा आहे आणि पंचायतीने दिलेला न्याय निवाडा ची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे

               स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताला नवी राज व्यवस्था उभी करण्याची संधी मिळाली भारतीय घटनाकारांनी संसदीय पद्धतीची लोकशाही स्वीकारून सर्वांना नवीन व्यवस्था तयार करण्याची संधी दिली भारतीय राज्यघटनेने समाज परिवर्तन कार्य लोकशाही पद्धतीने करण्याचे ठरविले भारतीय समाज हा खेड्यापाड्यात राहणारा आहे नव्या समाजाची उभारणी व राष्ट्रीय उदेश साध्य करण्यासाठी ग्रामीण भारताचे ब्रिटिश कालीन पोलादी चित्र बदलने आवश्यक होते त्यात सुधारणा करणे आवश्यक होते तसेच ग्रामीण जनतेला

 नवीन ज्ञान. विज्ञान. व नवीन दृष्टी प्राप्त करून देणे त्यांच्या मनात प्रगतीच्या अशा आकांक्षा निर्माण करणे गरजेचे असल्यामुळे भारत सरकारने.  सामूहिक विकास कार्यक्रम.  हाती घेतला पंचवार्षिक योजनांची आखणी केली सामूहिक विकास कार्यक्रम याला जनतेचे पूर्ण सहकार्य मिळावे म्हणून तालुका जिल्हा व राज्यपातळीवर अस्थायी समित्या स्थापन करण्यात आल्या  ग्रामीण भागाचा विकास व सामूहिक विकास कार्यक्रम याची पुनर्रचना करण्यासाठी पंचवार्षिक योजना प्रकलप समितीने गुजरातचे माजी मुख्यमंत्री बळवंतराव मेहता यांच्या अध्यक्षतेखाली १९५७ मध्ये एक समिती नेमली ह्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार व आधारावर पंचायत राज्य प्रयोग सुरू झाला ह्या समितीने खालील प्रमाणे शिफारशी केल्या

(१) विकास गट व्याप्ती लहान असावी विशेषतः तालुक्यापुरते विकास गट क्षेत्र असावे

(२) विकास गटाच्या स्थानिक समितीला तालुका पंचायत समिती असे संबोधण्यात यावे विकास गटात कार्यरत असणाऱ्या ग्रामपंचायत. नगरपरिषद. नगरपालिका. सहकारी संस्था. व संघटनांना प्रतिनिधित्व मिळावे

(३) महसूल बाबी पंचायत समिती कडे सोपविण्यात याव्यात

(४) जिल्हा पातळीवरील लोकल बोर्ड ऐवजी जिल्हा परिषद स्थापना करून तिच्याकडे ग्रामपंचायती व पंचायत समितीचे नेतृत्व सोपवावे

(५) ग्रामपंचायती   पंचायत समिती. जिल्हा परिषद. ह्याच्या साठी लागणारे लोक प्रतिनिधींची निवड प्रौढ मतधिकाराने व्हावी

(६)! पंचायत समित्यांना स्वताचे अंदाजपत्रक मांडून ते मंजूर करण्याचा अधिकार असावा

             पंचायत राज्य प्रयोग त्रिस्तरीय पातळीवर सुचविला होता हया समितीचे शिफारशी आधारें काही राज्यांनी लोकशाही विकेंद्रीकरण प्रयोग सुरू केला उत्तर प्रदेश.  राजस्थान. बिहार. ह्या राज्यात समितीच्या शिफारशी आधारें पंचायतीचा प्रयोग सुरू झाला महाराष्ट्रात मेहता समितीच्या शिफारशी जशाच्या तशाच न स्वीकारता १९६० मध्ये कै वसंतराव नाईक ह्यांच्या अध्यक्षतेखाली त्या समितीचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्यात आली नाईक समितीने मेहता समितीच्या शिफारशी अभ्यास सुरू करून महाराष्ट्रासाठी पंचायती राज्याच्या सुधारित शिफारशी केल्या नाईक समितीच्या शिफारशी आधारें १९६२ मध्ये महाराष्ट्रात पंचायत राज्याच्या अभिनव उपक्रम सुरू झाला

       ७३ वी घटनादुरुस्ती

राज्य घटनेच्या ७३ वी घटनादुरुस्ती विधयकाने पंचायती राज्याच्या प्रयोगाला नवे रूप प्राप्त होण्याची संधी मिळत आहे. १९८९ मध्ये पंतप्रधान श्री राजीव गांधी यांनी नवे पंचायत राज्य धोरण मांडले होते त्यात पंचायत राज्य विकास निधी नियमित निवडणूका अशा अनेक तरतुदी होत्या परंतु काही अडचणींमुळे हे विधेयक त्यावेळी पारित झाले नाही परंतु सदरचे ७३ वी राज्यघटना दुरूस्ती विधेयक पंतप्रधान पी व्हि नरसिंह राव यांच्या कारकिर्दीत १९९२ मध्ये मान्य झाले व त्याचा अंमलबजावणी आदेश २४ एप्रिल १९९३ मध्ये निघाला या घटना दुरुस्तीमुळे पंचायत राज्य संस्थांना घटनात्मक दर्जा आणि मान्यता देऊन त्यांना आपल्या लोकशाहीचा एक कार्यक्षम घटक बनविण्यासाठी त्यांची पुनर्रचना पुनर्जीवन आणि अंमलबजावणी करणे ही केंदाची भूमिका आहे त्यानुसार पंचायत राज्य संस्थांना घटनात्मक दर्जा मिळाला ग्रामसभा व ग्रामपंचायत निर्मिती. रचना. अधिकार. अधिकार क्षेत्र. कार्ये. निधी. पंचायत राज्यासाठी अर्थ मंडळ. हिशेब तपासणी. निवडणुका. निवडणूक प्रक्रिया. यंत्रणा.  ग्रामस्थांना ग्रामसभा उपस्थितीचा अधिकार. अदिची तरतूद केली गेली दर पाच वर्षांनी पंचायत राज्य संस्थेत निवडणूका सक्तीच्या करून स्वतंत्र निवडणूक मंडळांची तरतुद ही केली अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या २७/टक्के जागा मागास जाती जमाती  आणि ३०/टक्के जागा महिलांसाठी राखीव असतात. हि तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम ३३४ मध्ये नमूद केलेल्या कालावधी पर्यंत अस्तित्वात राहील या घटना दुरुस्तीमुळे आज देशात  १० लाख महिला निवडून येऊन शकतात तर ७५ हजार महिला  अध्यक्ष पदे भूषवू शकतात या घटना दुरुस्ती नुसार नवा पंचायत राज्य कायदा प्रथम कर्नाटक राज्याने १० मे १९९५ रोजी अमलात आणला महाराष्ट्र राज्याने १९९३/१९९४ मध्ये या पध्दतीने कायदे करून अमलात आणले तसेच ७३ वी राज्यघटना दुरूस्ती राज्यघटनेच्या कलम  २४३ अन्वये अकरावे परिशिष्ट समाविष्ट करण्यात येवून त्यात स्थानिक विकास निगडित २९ विषय समाविष्ट केले 

            आपल्या राज्यघटनेनुसार सर्वांना समान अधिकार देण्यात आले आहेत आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यात चालणारे सर्व कामकाज मासिक त्रेमासिक सहामाही. वार्षिक. या सभा ग्रामसभा घेऊन आपल्याकडून कोणती नवीन कामे उपक्रम योजना राबविण्यात आल्या यांचा लेखाजोखा सर्वसामान्य जनता यांचें उपस्थित गाव चावडी वाचन करण्यात यावे सर्व जाती धर्माचे लोकांना या ग्रामसभेला बोलावण्यात यावे आॅफिस मध्ये चालणारे काम कामाच्या वेळा अधिकारी व कर्मचारी उपस्थिती याचा फलक ग्रामपंचायत इमारतींवर लावने गरजेचे आहे नियमापेक्षा कोणत्याही दाखल्यासाठी जादा पैसे मागणे कायद्यानुसार गुन्हा आहे 

              समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

वाचा -

चिपको आंदोलन -अ. मुंडे ....

आमचं गाव आमचा विकास - Village Development...

बालमजुरी निर्मुलन व पुनर्वसन - Child Labour

राजकारण मुस्लिम आरक्षणाचे _ Muslim Reservation...

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या