ती एक वर्षा पूर्वी झाली होती लापता

 


वर्षभरापूर्वी हरवलेली योगिता मानवसेवेच्या उपचारानंतर पोहचली सुखरूप कुटुंबात

शनिवार दि.१३/११/२०२१


जळगाव जिल्ह्यातील मालोद या गावातील एक २२ वर्षीय तरुणी मानसिक भान हरवल्याने आपले कुटुंब सोडून अमानवीय आयुष्य जगत होती. मानसिक आजाराने त्रस्त असलेली ही तरुणी वर्षभर रस्त्यावर फिरत जळगाव पासून नाशिक आणि पायीपायी थेट अहमदनगर येथे पोहचली. या बेवारस तरुणीला महिला व बालविकास विभागाच्या वनस्टाॅप सेटरच्या मार्फत दि. २९/०९/२०२१ रोजी बेघर निराधार मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणाऱ्या 'मानवसेवा' प्रकल्पात दाखल करण्यात आले होते. मानवसेवा प्रकल्पात या निराधार तरुणीवर मानसोपचार तज्ञ डॉ. अनय क्षीरसागर व डॉ. सुरेश घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात आले. आणि उपचारांनंतर योगिता हीचे कुटुंब शोधून दि. १३/११/२०२१ रोजी संस्थेच्या स्वयंसेवकांनी जळगाव येथील मालोद या गावी कुटुंबात पोहच केले. वर्षभरानंतर कुटुंबात पोहचलेल्या योगिताच्या ४ वर्षीय मुलीचे व कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. या निराधार तरुणीच्या कौटुंबिक पुनर्वसनासाठी संस्थेचे मार्गदर्शक मा.प्रा.श्री अविनाश मुंडके सर यांनी आर्थिक सहकार्य केले. 

*मानवसेवा हीच, ईश्वर सेवा!*


*मानवसेवा प्रकल्प*

द्वारा- श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ

☎️ (०२४१) २४२९९४२

📱 ९०११७७२२३३

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या