Showing posts with label आरोग्य. Show all posts
Showing posts with label आरोग्य. Show all posts

प्राथमिक आरोग्य केंद्र जाग्यावर - सेवा सुविधा देशोधडीला

 



प्राथमिक आरोग्य केंद्र जाग्यावर
सेवा सुविधा देशोधडीला

बेकारी. रुग्णाता. विकलांगता. वार्धक्य. मृत्यू. हे माणवाला मिळणे गरजेचे आहे आणि आम्ही त्यासाठी सतत लढा देत असतो 

            गोरगरीब आर्थिक दृष्ट्या दुर्बलता असणारे सर्वसामान्य जनता. माणूस आहे म्हणजे आजारी पडणार. नशिबाला पुजलेली गरिबी अठठरा विश्व दारिद्र्य. असल्यामुळे यांना आपल्या आजारांवर आरोग्यावर उपचार करणे अवघड आहे. उपचार नाही मिळाला तर मृत्यू निश्चित यासाठी शासनाने प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा आरोग्य केंद्र. तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र. प्रत्येक गावात उप आरोग्य केंद्र. सथापन केले आहे त्यानुसार सर्वांना. प्रत्येक वेळी लागणारी आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मदत होते

            आजच आपल्या गावात पहिल्यांदा प्राथमिक आरोग्य केंद्र आहे का ते पहा. नसेल तर त्याची मागणी संबंधित ग्रामपंचायत. नगरपालिका महानगरपालिका. पंचायत समिती. जिल्हा परिषद. यांचेकडे गावातील लोकांच्या सह्या जोडून मागणी करा. आणि आपल्या गावात तालुका जिल्हा यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हा आरोग्य केंद्र असेलतर त्यात गोरगरीब जनतेला वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे का ? डॉ नर्स पेशंट बरोबर कसे वागतात हे पहा. प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये काम करणारे डॉ यांची बाहेर ओपीडी आहे का ? असेल तर ती ओपीडी बघून प्राथमिक आरोग्य केंद्रातील काम कसे आहे ? दवाखान्यात येणारे पेशंट यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार न घेता वैयक्तिक ओपीडी मध्ये उपचार घेण्याचा सल्ला डॉ देतात काय ? सरकारी दवाखान्याला येणारा औषधांचा साठा महिन्याला येतो का ? तो खरोखरच प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेणारे पेशंट यांच्यासाठी वापरला जातो का ? खाजगी दवाखान्यात सरकारी दवाखान्यात येणारे औषध परस्पर लंपास केले जाते का ? रात्री अपरात्री येणारे पेशंट यांचेसाठी डॉ नर्स सरकारी दवाखान्यात हजर असतात का. ? डिलिव्हरी काळात सरकारी दवाखान्यात आई मुल यांची काळजी घेणारा डॉ नर्स स्टाफ उपलब्ध आहे का ? दवाखान्यात कुत्र्याची सापांची लस कायमस्वरूपी उपलब्ध आहे का. ? दवाखान्यात पुरेसा डॉ नर्स स्टाफ आहे का ? ओपीडी चे टाईम प्रमाणे सकाळी ९/१ सरकारी टाईम असताना आपल्या गावातील सरकारी दवाखाना १०.३०/ते ११ वाजता उघडतो का ? सरकारी दवाखान्यात डॉ संख्या किती व रोजच्या रोज हजर असतात का ? औषधाचा तुटवडा आहे का ? महिन्याला औषध कोटा बरोबर येतो का. ? सरकारी दवाखान्यात येणार्या पेशंटला बाहेरून औषधे ड्रेसिंग साहित्य हॅणडगलोज उपलब्ध आहेत का ? पेशंटला हे सर्व बाहेरुन आणण्याचा डॉ सल्ला देतात का ? मलेरिया काविळ हिवताप डेंग्यू दातांचे डॉक्टर. हाडांचे डॉ. एक्सरे मशिन. रक्त लघवी तपासणी लॅब. महिलांचे विविध आजारांवर उपचार करणारे महिला डॉक्टर. असे विविध अवयव यांचे आजारांचे डॉ आपल्या गावातील सरकारी दवाखान्यात वेळेवर दररोज हजर असतात का ? अपघातग्रस्त पेशंटला डेरसिंग करण्यासाठी डॉ उपलब्ध आहे का ? 

            आपल्या गावात तालुका जिल्हा यामध्ये चालणारे प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वात मोठा बोजवारा आहे तो म्हणजे सफाई. नसणे सर्वत्र घाणीचे साम्राज्य असणे. दवाखान्यात निघणारा. कचरा सुई. सलाईन बाटल्या. रक्ताची कपडे. औषधाचा कचरा. मुदती बाह्य औषध कचरा. अशा विविध कचरयाची विल्हेवाट कशी लावली जाते. दवाखाना रोजच्या रोज निर्जंतुकीकरण केला जातो का. ? निघणारा कचरा अस्ताव्यस्त पसरलेला असतो काय ? सफाई कर्मचारी यांचें वेतन नियमित नियमानुसार दिले जाते का ? नर्स डाॅ यांच्याकडून पेशंट व नातेवाईक यांना कशाप्रकारे वागणूक दिली जाते ? 

             रात्री अपरात्री येणारे डिलिव्हरी पेशंट यांच्यासाठी आपल्या विभागातील दवाखान्यात रात्रीचे मुक्कामी डॉ नर्स आहेत का ? डिलिव्हरी पेशंट नाजूक अवस्थेत असल्यास दवाखान्यात रुग्णवाहिका सेवा उपलब्ध आहे का ? डिलिव्हरी काळात सर्व लागणारी वैद्यकीय सेवा सुविधा आपल्या विभागातील दवाखान्यात उपलब्ध आहे का ? डिलिव्हरी काळात बाहेरच्या दवाखान्यात म्हणजे आपल्याच ओपीडी मध्ये उपचार घेण्यासाठी पाठवितात काय ? लहान मुलांना गोवर लसीकरण. पोलिओ लसीकरण व इतर लहान मुलांना रोगप्रतिकारक डोस प्रत्येक महिन्याला दिले जातात का ? सर्व प्रकारची आॅपरेशन करण्याची सुविधा सरकारी दवाखान्यात उपलब्ध आहे का. ? लाईट गेल्यास जनरेटरची सोय आहे का ? 

          आजच आपल्या विभागातील गावातील शहरातील तालुक्यातील जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वरिल प्रमाणे सर्व सेवा सुविधा उपलब्ध आहेत का ? याची आजच सरकारी दवाखान्यात जाऊन चौकशी करा तो आपला जन्मसिद्ध अधिकार हक्क आहे शासन सगळीकडे लक्ष ठेवू शकत नाही आपणांस यांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे 

              आपले आदरणीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या भरघोस निधी मधून दुर्बल घटकातील मुलांना महिलांना लोकांना वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आपल्या जिल्ह्यात २६ दवाखाने धर्मादाय अंतर्गत उपचार करतात तोही पूर्णपणे मोफत त्यात सर्वांना निःपक्षपाती पणाने वैद्यकीय सेवा सुविधा मिळावी कोणीही उपचाराविना मरू नये हा सार्थ उदेश आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना. पंतप्रधान आयुष्मान आरोग्य योजना. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना. आयुष्यमान भारत आरोग्य योजना. जननी शिशु सुरक्षा योजना. नेत्ररोग तपासणी उपचार. धनुर्वात प्रतिबंधक लसीकरण. टि बी सेंटर. कॅन्सर सेंटर. अशा विविध आजारांवर विविध योजना मोफत उपचार करण्यासाठी धर्मादाय आयुक्त यांचेकडून आपल्या जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयात. उपजिल्हा रुग्णालयात. ग्रामिणरूगणालय. पासून सामान्य माणसाला गोरगरीब जनतेला पोहोचविण्याचा मा जिल्हाधिकारी साहेब यांचा निर्णय कौतुकास्पद आहे. 

            उलट या सर्व योजना व त्यांची माहिती गोरगरीब जनतेला माहीतच होत नाही आणि कोणी कळून देत नाही हे सर्वात वाईट आहे औषध तुटवडा. आरक्षित खाटा उपलब्ध नाहीत. आमच्या. दवाखान्यात ही योजना नाही. सुई हॅणडगलोज. सलाईन व सर्वात महागडी औषधे. बाहेरून आणायला सांगतात. म्हणजे शासनाकडून येणारा व जिल्हाधिकारी साहेब यांचा वैद्यकीय सेवा सुविधा साठी करण्यात आलेला प्रयत्न कुठेतरी फसताना दिसतं आहे. 

            समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

आरोग्य वाचवा. शासनाला जागवा.

आरोग्य वाचवा. शासनाला जागवा. 

                    गाव छोटी छोटी होती अशा आकांक्षा कमी होत्या कोणीही आजच्यासारखे रोजच बाहेरचं रस्त्यावर गाडीवर मिळणारे खाद्यपदार्थ खाण्यास जात नव्हते कारण तेवढे आपले चोचले नव्हते आज सर्वत्र गावात तालुका जिल्हा राज्य सर्वच ठिकाणी चौका चौकात वडापाव. चायनीज भेळ. दाबेली. बिर्याणी पाणीपूरी मटन चिकन दुकान. तेल व किराणा विक्री करणारे दुकानें. फिरून खाद्यपदार्थ विक्री करणारे. फळे फुले भाजीपाला विक्री करणारे. अशी एक नाही अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ विक्री करणारे आज जागोजागी ठाण मांडून बसले आहेत त्यातच यांचेकडून ग्राहकाला मिळणारी वागणूक. मिळणारी स्वच्छता. तशा प्रकारची आहे. 

                आज आपणं वडापाव बद्दल बोलू आपल्या आसपासच काय पण ग्रामीण भागात किंवा शहरी भागात आज हातावरचे पोट असणारे. दिवसभर काम करणारे राहण्याचा ठिकाणा नाही. असे व दिवसभर वेड्यासारखे फिरणारे. भिक मागणारे. अशी बरीच जनता आणि यांचं एकमेव बजेट मधील खाण आहे ते म्हणजे वडापाव. स्वस्त परवडणारा असा एकच पदार्थ आहे. आपल्या महाराष्ट्रच केंद्र माणल जाणारी मुंबई येथे प्रथम खाद्यपदार्थ म्हणून वडापाव याचा सहभाग असतो

              वडापाव आणि स्वच्छता आणि वडापाव मध्ये वापरला जाणारा कच्चा माल त्याचा दर्जा. काम करणारे कामगार यांचे आरोग्य. याचा आपण कधीच विचार केला नाही आज मी तुम्हाला एका वडापाव गाडीवर घेऊन जातो. चौकाच्या एका कोपरयात गटारवर फरशी टाकून त्यावर गाडी उभी केलेली. सकाळी सर्व खाद्यपदार्थ विक्री करणारे गाडे चालू होतात. पिण्यासाठी बोअरचे पिण्यास अयोग्य असे पाणी. बाजारात कमी दरातील मिरची. सडलेली कोंथिबीर. सर्वात खराब झालेला काळ पडलेला बटाटा. कमीत कमी आठ दिवस न बदलेले खाद्यतेल. अस सर्व असत कामांवर असतो तो बालकामगार. त्याच्या अंगावर फाटलेली कपडे. वाढलेली केस नखे अशी सर्वच खाद्यपदार्थ विक्री करणार्या गाड्यांची परस्थिती आहे. असे सर्व लहान उद्योग सुरू करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग अशा खाद्यपदार्थ विक्री करणार्या लोकांना नियम अटी घालून परवाने देतात पण सत्यता कोणताही नियम पाळला जात नाही. त्यामुळे खाद्यपदार्थ विक्री करणारे मोकाट झाले आहेत. हेच उधोग नाही तर. बार. हाॅटेल. धाबे. घरगुती खाणावळ. यांच्याबद्दल सुध्दा अन्न व औषध प्रशासन विभागाचे परवाना नियम अटी सारख्याच आहेत. पण सत्यता पालन होत नाही मटन चिकन विक्री करणारे दुकानें यांवर स्वच्छता नाही. कामांवर असणारा कामगार त्याचे आरोग्य. स्वच्छता अभाव. कापण्यात येणारे कोंबडी बकरी त्याचा दर्जा. काय. काही दुकानांवर निकृष्ट दर्जाचे मांस विकले जाते. आपण वृतमापत्रात वाचतो दूरदर्शन वर बघतो अन्न व औषध प्रशासन विभाग यांची मटन मार्केट मधील दुकानांवर छापा टाकला आणि अमुक अमुक किलो निकृष्ट दर्जाचे मांस जप्त केले जप्त केलेले मांस व अन्य पदार्थ कुठे गेले अधिकारी व कर्मचारी यांच्या पोटात. बघा छापा कश्यासाठी टाकला. तुमचे आमचे आरोग्य सांभाळण्यासाठी नाही 

          चायनीज एक मोठ खुळ आपल्या डोक्यात आहे घरातील सर्वजण एकत्र बसून चायनीज खातात पण ते कधी शिजवल जात. तेल कोणत आहे. चिकन कसल आहे. चायनीजला कलर लाल आला म्हणजे कोणत केमिकल त्यात वापरल आहे. ते आपल्या शरिरावर काय विपरीत परिणाम करिल याचा आपण कधी विचार करत नाही मग याचा विचार अन्न व औषध प्रशासन विभाग यांनी तरी केला आहे का ? 

 फळें विक्री करणारे नासकी कुजकी फळे विकली जातात. फळे पिकविण्यासाठी विविध औषध केमिकल वापरले जाते त्यामुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे 

         गुटखा. खैनी सिगारेट विडी तंबाखू. अफू चरस गांजा नशेची औषधे. गोळया. पाऊडर. अशी विविध व्यसनाची सवय आपणास आपल्या चौकात चौकात आपल्या घराजवळच्या पानटपरी पासून लागते. शाळा कॉलेज विद्यालये महाविद्यालये यांच्या जवळ नशेचा कोणताही पदार्थ विक्री करण्यास शासनाने बंदी घातली आहे पण आज सर्वत्र सर्रास नशेच्या पदार्थांची विक्री केली जात आहे कोणताही रोख ठोक नाही यामुळे आपली तरुण पिढी धोक्यात आहे आतातरी अन्न व औषध प्रशासन विभाग कुठे आहे 

              दारूबंदी साठी शासन नुसता आदेश काढते पण त्यावर कोणतीही कारवाई होत नाही आज काही गावांत शाळेच्या भिंतीला लागून आज दारू दुकान आहे ज्या महिलांनी उलटी बाटली आंदोलन केली त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि राजकारणी लोकांनी आंदोलन खुडून काढली. कोणीही काहीही बोलत नाही कारणं ही दुकाने सत्ताधारी यांच्या बगलबच्चे यांचीच आहे याला कोण लगाम घालेल काय माहित नाही 

अन्न आणि औषधे यांचे

 प्रमाणीकरण करून, त्यांच्या निर्मितीवर व वाटपावर नियंत्रण ठेवणारी शासकीय यंत्रणा. १९३५ नंतर अन्नाची गरज खूप वाढली होती, परंतु उत्पादन मात्र कमी होत होते. अशा परिस्थितीत अन्नामध्ये इतर पदार्थांची भेसळ करण्याचे प्रमाण वाढले. अन्नभेसळीस प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र शासनाने ‘अन्नभेसळ प्रतिबंधक कायदा-१९५४’, अंमलात आणला. इ.स. १९५५ पासून या कायद्यातील त्रुटी घालवून व योग्य त्या तरतुदी करून त्याची सर्व राज्यांत अंमलबजावणी करण्यात आली आहे. या कायद्यामुळे अन्नात व पेयात भेसळ करण्यास मनाई करण्यात आली. अन्नाची साठवण योग्य ठिकाणी व योग्य प्रकारे व्हावी; त्यावरील वेष्टन अन्नाला व औषधाला घातक नसावे; त्यावर निर्मितीची तारीख, कालावधी व साठविण्यासंबंधीच्या सूचना इ. सर्व बाबी स्पष्टपणे लिहिलेल्या असाव्यात, असे या कायद्यात नमूद करण्यात आले आहे.

अन्न आणि औषधे यांचे विश्लेषण करण्यासाठी प्रत्येक विभागात सर्व सुविधायुक्त प्रयोगशाळा शासनाकडून उभारल्या जातात. त्या ठिकाणी योग्य शिक्षण असलेले प्रशासक व तपासणी अधिकारी नेमले जातात. तपासणी अधिकारी अन्न वा औषधे खरेदी करून परीक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठवितात. उत्पादनात भेसळ आढळल्यास संबंधित व्यक्तीवर किंवा उद्योगावर खटला भरण्याचा अधिकार त्यांना असतो. एखादा ग्राहकदेखील अन्नाची व औषधाची खरेदी करून परीक्षणासाठी ते प्रयोगशाळेत पाठवू शकतो. मात्र ग्राहकाने त्याचा हा उद्देश विक्रेत्याला अगोदर सांगावा लागतो. महानगरपालिका, नगरपालिका इत्यादी संस्थाही त्यांचे अधिकारी नेमू शकतात.


केंद्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत या प्रशासनाचे नियंत्रण केले जाते. आरोग्य सेवेचे महासंचालक हे प्रशासन विभागाचे अध्यक्ष असतात. इतरही सदस्य या समितीवर असतात. अन्न व औषध परीक्षण यांसाठी वेगवेगळ्या समित्या असतात. औषधे आणि सौंदर्यप्रसाधने यांविषयीचा कायदा १९४० मध्ये अंमलात आणला गेला. १९६२ मध्ये सर्व प्रकारची प्रसाधने या कायद्याखाली आली. अशा कायद्यामुळे संपूर्ण भारतात औषधे व प्रसाधने यांची निर्मिती, साठवण, वाटप व विक्री यांवर नियंत्रण आले. ग्राहकांना प्रमाणित औषधांचा पुरवठा योग्य तर्‍हेने व्हावा, हा यामागील मुख्य उद्देश असतो. इंटरनॅशनल कॉंग्रेस ऑफ हार्मोनायझेशन ही आंतरराष्ट्रीय संस्था या नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्त्वे ठरविते.

      ‌. आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी शासनाने विविध विभाग नेमले आहेत त्यात प्रामुख्याने अन्न व औषध प्रशासन विभाग. अन्न सुरक्षा अधिनियम. असे विविध विभाग आपल्यासाठी आहेत यामध्ये आपणांस काही चुकीचे आपल्या आरोग्यास हानिकारक अपायकारक असे वाटत असेल तर आजच आवाज उठवा आणि त्याची तक्रार संबंधित ठिकाणी करा आरोग्य वाचवा शासनाला जागवा. 

         समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९ 

    बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर यांचेकडून शिराळा तालुक्यातील सार्थ निवड कामांची आवड सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे धडाडीचे नेतृत्व. श्रीमती सौ अनिता विजय धस यांची युनियनच्या. शिराळा तालुका कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली

फिरते आरोग्य शिबीर

 


फिरते आरोग्य शिबीर

                   आरोग्य ही माणसाची मूलभूत गरज आहे. जिथे आरोग्य शिक्षण रोजगार आणखी काही मूलभूत सुख सुविधा उपलब्ध असतील तरच आपणांस राहण्यास ते गाव शहर तालुका जिल्हा राज्य देश यातील सर्व लोक जनता समाधानी आणि राहण्यास योग्य अशी जागा आहे येथेच माणसांचा सर्व बाजूंनी विकास होतो 

             दिनांक १०/६/२०१७ रोजी बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर चे वतीने बांधकाम कामगार यांच्यासाठी फिरते आरोग्य शिबीर आयोजित केले होते. बांधकाम कामगार अडाणी गरजू व्यसनी मिळेल ते काम मिळेल त्या मजूरीवर करणारा. कामांवर असताना काही तार. मोळा दगड. गंजलेल्या वस्तू यांचा संपर्क रोज येतो. हाताला पायाला व अन्य कोणत्याही भागाला इजा झाल्यास काय हुतय तेला म्हणत न दवाखान्यात जाता चालढकल करत असतात त्यामुळे. अशा गंजलेल्या वस्तू यापासून भविष्यात. हाता पायाला गंभीर जखमा होण्याचा धोका असतो. अगोदरच मिळकत कमी आणि त्यातच दवाखाना माग लागला तर तो कामगार आणि त्यांचे कुटुंब मोठया आर्थिक अडचणीत सापडते. आणि काही वेळा कामगारांचा मृत्यू झाल्याच्या घटना सुध्दा आम्ही पाहिल्या आहेत. या सर्व बाबींचा विचार करून बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर यांनी कामांवर जाऊन जाग्यावर बांधकाम कामगार आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्याचा एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला

      दिनांक. १/६/२०१७ रोजी बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन चे वतीने फिरते आरोग्य शिबीर आयोजित करण्यासाठी त्यावेळच्या कर्तव्य दक्ष तहसिलदार. मा सविता लष्करे. मॅडम. अतिशय कामात प्रामाणिक असणारे. सर्वसामान्य जनता गोरगरीब लोक यांना व त्यांच्या कोणत्याही कामात सहकार्य करणारे. तहसिलदार मॅडम यांना. फिरते आरोग्य शिबीर याचे उद्घाघाटन उपस्थित व मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणे यासाठी युनियन चे वतीने निवेदन देण्यात आले होते

     तसेच १/६/२०१७ रोजी जिल्हा उप रुग्णालय इस्लामपूर येथे. अॅमबुलनस. डॉ. नर्स. आणि आम्ही आयोजित केलेल्या फिरत्या आरोग्य शिबीरासाठी लागणारे औषध याचा पुरवठा करण्यासाठी निवेदन देण्यात आले.

        युनियनच्या कामाला प्रतिसाद. देण्यासाठी दिनांक १०/६/२०१७ रोजी सकाळी १० वाजता. विलासराव पेट्रोल पंपाजवळ. प्रमुख पाहुण्या. तहसिलदार मा सविता लष्करे मॅडम. हजर राहिल्या. कामगारांना. आरोग्याचे महत्त्व पटवून दिले. आपले युनियनच्या कामाबद्दल मनोगत व्यक्त केले व युनियनच्या पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या तोवर. जिल्हा उप रुग्णालय इस्लामपूर येथील. अॅमबुलनस. डॉ. नर्स. औषध साठा. घेऊन. डॉ. व्हि एस कोरे वैद्यकीय अधिकारी. डॉ आर व्ही. कुंडले. श्री. ए एन वनारसे अधिपरिचारक श्री एस ए सुतार वाहन चालक श्री आनंदा कांबळे शिपाई. हा सर्व फौजफाटा वेळेत फिरते आरोग्य शिबीर सुरु करण्याच्या जागेवर उपस्थित झाला. मा तहसिलदार मॅडम यांनी. अॅमबुलनस गाडीला हार नारळ वाढवून शिबिरांची सुरुवात केली व या समाजपयोगी कार्यक्रमाला हिरवा झेंडा दाखवला. आणि फिरणे आरोग्य शिबीर सुरु झाले. इस्लामपूरच नाही तर बाजूच्या खेड्यातील कामगारांची कामांवर जाऊन आरोग्य तपासणी मोफत करून धनुर्वात प्रतिबंधक लस देण्यात आली 

        जवळजवळ २७३ कामगारांची मोफत वैद्यकीय तपासणी धनुर्वात प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. सकाळी १० वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत फिरते आरोग्य शिबीर सुरु होते. 

            छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ फिरत्या आरोग्य शिबीराची सांगता करण्यात आली. युनियनचे संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे यांनी सर्व डॉ व त्यांचे सहकारी याचे मनापासून आभार मानले यावेळी. आमच्या व युनियनचे. चेतन चव्हाण. पांडूरंग खोत. अशोक गवळी. जमीर मगदूम. सागर चव्हाण. यांचे सुध्दा सहकार्य केले बद्दल आभार मानले. फिरत्या आरोग्य शिबीराचे सर्व नियोजन. नियंत्रण. शहारुख मुंडे यांनी केले होते. 

              आत्ता एक वेळ असे फिरते आरोग्य शिबीर आयोजित करण्याची गरज आहे

समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

धोका वाढला?

 


धोका वाढला?

          ‌ डेंग्यू ताप. मलेरिया. काविळ. हिवताप. पोटाचे विकार . सर्वात घातक लहान मुले मोठी माणसं.महिला. वयोवृद्ध व्यक्ती. यांना याचा धोका जास्त असतो. अशी परिस्थिती आपल्याच गलथान कारभारामुळे आपल्या नशिबाला येते 

 ‌ गावाचं रुपांतर शहरात झाले लोकसंख्या वाढली त्यामुळे‌ लोकांच्या राहण्याचा प्रश्न त्यामुळे वाढती दाटीवाटीने उभ्या असलेल्या इमारती जागोजागी डोंगरासारखे कचरयाचे ढीग वाढती लोकसंख्या त्यामुळे नदीप्रमाणे वाहणारी गटारे. जागोजागी सार्वजनिक. भरलेली गटारी मुतारी यातून येणारा उग्र वास आपल्या नाकाला रुमाल लावून आपण वावरत असतो. आठवडा बाजार त्यातच. विकून शिल्लक राहीलेला भाजी पाला पाचोळा कुजकी नासकी फळे. यामुळे सुध्दा दुर्गंधी पसरते. आणि सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागतो

               परवा मौसमी पण जोरात पडलेल्या पावसामुळे. रस्त्यात जागोजागी साठलेली. उगवलेली मोठ मोठी झुडपे. डपकी. चिखल. त्यातच गाढव. कुत्री. गाय म्हैस.मेलेले उंदीर. घुशी. अन्य जनावरे यांची विष्टा यामुळे भयानक येणारा. भयानक वास.पाऊस. उघडला पण आजून सुध्दा काही ठिकाणी पाण्याची डबकी अजून तसीच आहेत. परवा आपल्या जिल्ह्यात जवळपास १०५ गावांत पूराचे पाणी घुसले होते. त्यामुळे नदीच्या पूरातून वाहत येणारा कचरा. घाण. पूर ओसरल्यावर जागोजागी राहीली आणि आत्ता पाऊस उघडला आणि त्या घाणीचे बाष्पीभवन होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे विविध साथीचे रोग जसे. ढेंगू. मलेरिया. काविळ. हिवताप. पाण्यामुळे पोटाचे रोग होण्याचे प्रमाण वाढले आहे

          वरील प्रमाणे सर्व सामान्य विचार केला तर आपल्या असे लक्षात येईल की सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे त्यातच बाकी काही राहीले ते. शहराच्या बाजूला असणारे उपनगर यांनी काढली आहे. या भागात सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे मोकळे भूखंड यांचें मालक जागा विकत घेऊन परगावी राहण्यास आहेत. त्यामुळे या जागेकडे वर्षातून काही वेळा येतात. त्याची स्वच्छता हा प्रश्न कायमच राहतो. मोकळ्या भूखंडावर पावसाळ्यात उगवणारी विविध वनस्पती असणारे डबरी यामुळे साठणारे पाणी व उगवणारी झाडे झुडपे यातील बहुतांशी जागा मोठ्या लोकांच्या आहेत यांना कोण विचारणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. काही लोक आपल सांडपाणी लोकांच्या दारात गटारात सोडत आहेत यामुळे यांवर डेंग्यू तापाचे मच्छर हजारो संख्येने जन्म घेतात आसपास राहण्यास असणार्या लोकांना याचा फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर यांनी नगरपालिका प्रशासन यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती की या भुखंड मालकांवर कायदेशीर कारवाई.अथवा मोकळे भूखंड स्वच्छ करण्याची सक्ती करण्यात यावी अशी मागणी केली होती. पण कोणतीही कारवाई झाली नाही

        आज आपण कुठेतरी कोरोना सारख्या महाभयंकर महामारी संकटाने थैमान घातले होते त्यातून काही काळ सूटका झाली आहे. संकट संपले नाही. तोवर आपल्या गावावर. तालुक्यावर. जिल्ह्यावर. ढेंगू. मलेरिया. काविळ. हिवताप. असे भयानक रोगांनी थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. सर्वसामान्य असो लहान मोठा. गरीब श्रीमंत. रोगाला काही समजत नाही तो सर्वात समान समजतो. त्यामुळे टाळेबंदी मुळे सर्व सामान्य जनता अजूनही सुरळीत झाली नाही हाताला म्हणावं तसं काम नाही. त्यामुळे आत्ता दवाखान्याचा.दवाखाने. फुल्ल होण्यास सुरुवात झाली आहे औषधांचा खर्च आपणांस कर्जबाजारी करणारं आहे. त्यामुळे आपण आपल्या घराजवळच्या परिसर स्वच्छ ठेवा. मोकळे टायर. भंगार. अस्ताव्यस्त पडलेले सामान आजच हालवा. कारणं या जागेतच डेंग्यूचा मच्छर. पनपतो त्यामुळे आपला परिसर स्वच्छ ठेवा संडास बाथरुम यांचे सांडपाणी जेथे गोळा होते तेथे. तेल सोडा. उघडे खड्डे झाकून टाका. हे आपल्यालाच करावे लागणार आहे.काही ठिकाणी गटारे नाहीत. शेजारीपाजारी एकामेकाचे सांडपाणी लोकांच्या जागेत गेले तर रोज भांडणे होतात. आपणासच आपले प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. कारणं मतांसाठी येणारे आत्ता नाहीत जरा थांबून येणार आहेत

                ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका. यांनी पाऊस उघडले बरोबर. मच्छर नाशक औषधे पावडर फवारणी करणे गरजेचे होते. पण फवारणी गावात झाली पण आजूबाजूला जी उपनगर आहेत त्यांच्याकडे कोणाचेही लक्ष नाही त्यामुळे उपनगरात राहणारया लोकांचे धोक्यात आले आहे. नागरिकांना आपल्या आपल्या विभागासाठी ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांचेकडे मच्छर नाशक पावडर फवारणी औषध फवारणी करण्यासाठी मागणी करा. अन्यथा आपल्यातून. ठराविक रक्कम काढून आपला आपला परिसर गल्ली आपले घर. औषध फवारणी. पावडर फवारणी करून घ्या. 

             समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९  

बांधकाम कामगार यांचें कोणाचें सुरक्षा संच आणावयाचे राहीले असतील तर संपर्क साधावा.

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या