जर माझ्या जिवाचे काही बरे - वाईट झाल्यास जबाबदारी पोलिस व इतर प्रशासनाची - हाजी इर्शादभाई
राजुरी ता. जुन्नर येथे धार्मिक संस्थे कडून झालेल्या संविधान - लोकशाही विरोधी व जात पंचायत धमकी प्रकरणात माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या जीवितास व होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी संबंधित संस्थेचे कार्यकारी मंडळ, पोलिस व इतर प्रशासनाची असेल असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष हाजी इर्शादभाई यांनी केले आहे.
संबंधित धार्मिक संस्थेच्या जबाबदार व्यक्तींनी शुक्रवार ता. २२ जानेवारी २०२१ रोजी पुन्हा एकदा माझ्या अनुपस्थितीत बेकायदेशीरपणे जात पंचायत घेऊन लोकांना खोटी माहिती देऊन व दिशाभूल करून माझ्या विरोधात लोकांच्या भावना भडकाऊन शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. समाजाची काही चूक अथवा भूमिका नसतानाही धार्मिक संस्थेचे पदाधिकारी त्यास वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करीत आहेत. या सर्व प्रकारातून माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. माझे गावात एकच घर असून तेथे माझे कोणतेही नातेवाईक नाहीत. पोलिस प्रशाननाने अजून कोणतीही करवाई केलेली नाही. पोलिस प्रशासनाने वेळीच दखल घेतली असती तर शुक्रवारी झालेली जात पंचायत झालीच नसती अशी माहिती हाजी इर्शादभाई यांनी दिली.
सदर संविधान - लोकशाही व जात पंचायत विरोधी प्रकरणास महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून प्रसार माध्यमातून सहकार्य करीत आहेत. तृप्तीताई देसाई, अशोक धनगांवकर, डॉ. परवेज अशरफी, अॅड. सुमीत साबळे, अशोक अल्हाट, अलीम वजीर पटेल, भीम आर्मी तसेच अनेक मान्यवरांनी प्रत्यक्षात भेटून पाठिंबा दिला असल्याची माहिती हाजी इर्शादभाई यांनी दिली आहे.
सदर प्रकरण संविधान - लोकशाही विरोधी व जात पंचायतीचे असून देखिल प्रशासन कोणतीही भूमिका घेत नसल्याने हाजी इर्शादभाई यांनी आश्चर्य व्यक्त करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
वाचा -
तर हे सरकार इतरांना काय न्याय देणार - डॉ. परवेज अशरफी AIMIM MAHARASHTRA ...
मानवाधिकरांचे हनन म्हणजेच संविधानद्रोह - अलिम वजिर पटेल..
एम आय एम ची अहमदनगर जिल्ह्यात शानदार एंट्री - AIMIM AHMEDNAGAR MAHARASHTRA..
संविधान व लोकशाही विरोधी कृत्य सहन करणार नाही - हाजी इर्शादभाई , Pune..