पुर्ण जगात कोरोना महामारी मुळे मागील मार्च २०२० पासून अचानक लॉक डाऊन लागल्याने व त्यानंतर पूर्ण देशातील जनतेची आर्थिक परिस्थिती खालावली. नोकरी करणारा असो किंवा व्यापार करणार असो, रोजंदारीवर काम करणारा असो किंवा ठेकेदार पदत्ती ने काम करणारा असो सर्वांना कमी किंवा जास्त प्रमाणात आर्थीक नुकसान झाले आहे. कोरोना काळात प्रशासनाने काही सक्तीचे नियमाची अमल बजावणी केली होती व सद्या ही करत आहे. परंतु सामान्य जनतेने नियमाचा पालन करावे यासाठी त्यांना कायम आर्थिक दंड,फी आकारणे हे कोणता न्याय आहे? प्रशासन सामान्य जनतेला लुटायची कोणतीही जागा सोडत नसल्याचे एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी सांगितले.
अहमदनगर जिल्हा अधिकारी यांनी काडलेल्या आदेशा विरोधात एम आय एम तर्फेनिवेदन देण्यात आले आहे. निवेदनात प्रशासनाने मास्क न वापरल्यास ₹५००/- दंड चा आदेश परत घेण्याची मागणी केली आहे. निवेदनात लिहले आहे की एकीकडे प्रशासन सामान्य जनतेची मदत करीत असल्याचे दाखवते व दुसरी कडे नियमाच्या नावावर सामान्य जनतेची आर्थिक लूट करीत आहे. सद्या कोरोना ची दुसरी लाट येत असल्यामुळे प्रशासनाने काही नियम सक्तीचे केले आहे. त्यात जनतेने मास्क चा वापर केला नाही तर त्यांना रू १००/- दंड नियम बदलून ₹५००/- दंडाची पावती केली आहे. आदेश देताना सामान्य जनतेचा आर्थिक नुकसान होइल याची पूर्ण दखल घेतली असल्याचे डॉ परवेज अशरफी यांनी सांगितले. या आदेशामुळे सर्वात जास्त आर्थिक झळ सामान्य जनतेला बसणार आहे. सामान्य जनता एक वर्षापासून कोरोना मुळे पहिलेच आर्थिक संकटात आहे त्यात या आदेशने जनतेला अजून आर्थिक संकट दिले.
आदेश फक्त सामान्य जाणते साठी आहे की सर्व अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना साठी याचा खुलासा कर्णयची मागणी देखील करण्यात आली आहे. मास्क ना वापरणे असो, गाडी जपती असो, नियमाच्या नावावर फक्त आणि फक्त सामान्य जनतेला धारेवर धरत असल्याचे दिसते. निवेदनावर एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी, जिल्हा महासचिव जावेद शेख, नगरसेवक असिफ सुलतान, मुफ्ती अल्ताफ, विद्यार्थी जिल्हा महासचिव शहेबाज शेख, विध्यार्थी जिल्हा सचीव शहेबाज शेख,मास शहर अध्यक्ष अमीर खान, सलमान खान, आरीफ शेख, समीर बेग फिरोज शेख आदींचे सह्या आहेत.
वाचा -
एम आय एम मेडिया प्रमुख पदी सुफीयान शेख - AIMIM ...
No comments:
Post a Comment