वासिम रिझवी विरोधात कोपरगावात एम आय एम तर्फे निवेदन - AIMIM

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

मुस्लिम लोकांची धार्मिक भावना दुखावल्या बद्दल तकरार


दि. ११ / ०३ / २०२१ रोजी लखनऊ उत्तरप्रदेश येथे राहणारे शिय्या वक्फ बोर्डाचे माझी अध्यक्ष वसीम रिजवी यांनी मा. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखिल करुन इस्लाम धर्माची सर्वात पवित्र धर्मग्रंथ कुराणामध्ये बदल करुन त्याच्यात असलेले आयता मधुन एकुण २६ आयत वळण्यात यावी अशी मागणी केली. आशा आहे की , सुप्रीम कोर्ट याची ही याचिका ऑडमीट न करता ते फेटाळून लावतील, पण वसीम रिजवी यांनी याचिका दाखल केल्यानंतर माध्यमांना बोलतांना कुराण व मुसलामानांचे तीन खलिफा विरुध्द अनेक खोटे बिनबुडाचे अरोप लावले. मुख्यतः त्याने सांगितले की, कुराण हे आतंकवादची शिकवण देतो व इस्लामचे सुरुवातीचे तीन खलिफा यांनी ताकतीचा प्रयोग करुन इस्लामचा फैलाव केला. कुराणामुळे मुसै युवक आतंकवादाकडे वळत आहे वगैरे वसिम रिजवी यांनी दिलेले मिडीया मुलाकात  हे सर्वत्र पसरलेले आहे. व वक्तव्य मुळे मुस्लिम धर्म मानणारे लोकांचे धार्मिक भावना दुखावलेले आहेत व इतर समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम वसिम रिजवी यांनी केलेले आहे. कोपरगाव येथील सर्व मुस्लीम समाज व एम आय एम तर्फे तहेसिलदार साहेबांना निवेदन देऊन कारवाहीची मागणी केली आहे. यावेळी एम आय एम जिल्हा उपाध्यक्ष तौसीफ मनियार, तालुका उपाध्यक्ष  वाजीद मनियार व इतर मान्यवर उपस्तीत होते.

वाचा -

महिला आर्थिक विकास - A. MUNDE ...

खाद्यतेलात भेसळ करणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता पथकाचा छापा - FDA MUMBAI...

आमचं गाव आमचा विकास - Village Development...

ओबीसी जनगणना काळाची गरज...

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या